We will send you 4 digit OTP to confirm your number
नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
26 नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता. मला आठवते आहे की 2015 साली जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करत होतो, त्याच वेळी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करावा अशी कल्पना समोर आली. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. मी सर्व देशवासियांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत, आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू.
मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले हे आपणा सर्वांना माहीती आहे. श्री सच्चिदानंद सिन्हाजी हे संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आणि दीर्घ चर्चेनंतर आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. मसुदा तयार झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात पुन्हा २ हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही, आत्तापर्यंत एकूण 106 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. कालमान, परिस्थिती आणि देशाची आवश्यकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारांनी निरनिराळ्या वेळी ह्या सुधारणा केल्या. पण ही दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी केली गेली होती. 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या त्या चुका सुधारण्यात आल्या.
मित्रांनो, संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. हे देखील खूप प्रेरणादायी आहे की त्यापैकी 15 महिला होत्या. अशाच एक सदस्या, हंसा मेहताजी ह्यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्या वेळी भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक होता जिथे संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असेल तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. मला समाधान वाटते की संविधान निर्मात्यांच्या याच दूरदृष्टीचे पालन करत भारताच्या संसदेने आता 'नारी शक्ती वंदन कायदा' संमत केला आहे. ‘नारी शक्ती वंदन कायदा’ हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचे उदाहरण आहे. आपल्या विकसित भारत ह्या संकल्पाला चालना देण्यासाठी देखील हा कायदा तितकाच उपयुक्त ठरेल.
माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा देशातील जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतामध्ये देखील हे स्पष्टपणे आढळते आहे की देशातील अनेक बदलांचे नेतृत्व हे भारतातील 140 कोटी जनताच करीत आहे. ह्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण आपण या सणासुदीच्या काळात पाहिले आहे. गेल्या महिन्यातील ‘मन की बात’ मध्ये मी ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात भारतीयांनी स्थानिक उत्पादने खरेदी करावी ह्यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या काळात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. आणि ह्याच दिवसांत, लोकांनी भारतातील स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह दाखवला. आता तर घरातील लहान मुलेदेखील दुकानातून काही खरेदी करताना त्या वस्तूंवर मेड इन इंडिया असे लिहिलेले आहे की नाही हे पाहू लागली आहेत. केवळ इतकेच नाही तर आता ऑनलाइन खरेदी करताना देखील लोक वस्तूचे country of origin , वस्तूंचे निर्मिती स्थान पाहायला विसरत नाहीत.
मित्रांनो, ज्याप्रमाणे 'स्वच्छ भारत अभियानाला ’ मिळणारे यश हेच त्या अभियानाचे प्रेरणास्थान बनत आहे, त्याचप्रमाणे ‘व्होकल फॉर लोकल ‘ अभियानाचे यश हेच विकसित भारत - समृद्ध भारत यशाचे महाद्वार उघडत आहे. ‘व्होकल फॉर लोकलचे ‘ हे अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. ‘वोकल फॉर लोकल अभियान’ ही देशवासियांना रोजगार मिळण्याची हमी आहे. हीच विकासाची हमी आहे, हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे. ह्या अभियानामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना समान संधी मिळते. ह्या अभियानामुळे स्थानिक उत्पादनांसाठी मूल्य वर्धनाचा मार्गही मोकळा होतो आणि जर कधी जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार झालेच तर व्होकल फॉर लोकल हा मंत्र आपल्या अर्थव्यवस्थेचेही संरक्षण करतो.
मित्रांनो, भारतीय उत्पादनेच खरेदी करायची हा विचार केवळ सणांच्या दिवसांपुरताच मर्यादित राहू नये. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. काही व्यापारी संस्थांच्या अंदाजानुसार या लग्नसराईत जवळपास 5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवाहसमारंभासाठी खरेदी करताना देखील आपण सर्वांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच महत्त्व द्यावे. आणि हो, जेव्हा लग्नाचा विषय निघालाच आहे तर सांगतो की एक गोष्ट मला खूप काळापासून सलते आहे आणि माझ्या मनातील वेदना, मी माझ्या कुटुंबियांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? जरा विचार करा, आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाहसमारंभ साजरा करण्याची एक नवी पद्धत सुरु होते आहे. पण असे करणे आवश्यक आहे का?
जर आपण भारतातच, भारतातील आपल्या लोकांमध्ये विवाह समारंभ साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील. देशातील लोकांना तुमच्याकडील विवाहसमारंभात काही सेवा पुरवण्याची संधी मिळेल, अगदी गरीब लोकही आपल्या लहान लहान मुलांना तुमच्याकडील लग्नसमारंभाची वर्णने सांगतील. व्होकल फॉर लोकल या अभियानाला तुम्ही अशी साथ देऊन ते अभियान पुढे नेऊ शकता का? असे लग्न सोहळे आपण आपल्याच देशात का करू नयेत? कदाचित तुम्हाला हवी तशी व्यवस्था आज इथे उपलब्ध नसेल, अशीही शक्यता आहे. पण असे सोहळे आपण देशातच आयोजित केले तर आपल्या देशातील व्यवस्थाही विकसित होईल. हा खूप मोठ्या कुटुंबांशी संबंधित असा विषय आहे. मला आशा वाटते आहे की माझी वेदना त्या मोठ्या कुटुंबांपर्यंत नक्कीच पोहोचेल.
माझ्या कुटुंबियांनो, या सणासुदीच्या काळातच लोकांचा आणखी एक मोठा कल दिसला आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे की जेव्हा दिवाळीनिमित्त खरेदी करताना रोख रक्कम देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच आता लोक जास्तीत जास्त वेळा डिजिटल पेमेंट करत आहेत. हे खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही देखील आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्ही ठरवू शकता की पुढचा महिनाभर तुम्ही फक्त UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट कराल आणि रोख रक्कम देणार नाही. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे आता हे शक्य होणार आहे. आणि असा एक महिना पूर्ण झाल्यावर, तुम्ही कृपया आपले अनुभव आणि फोटो मला पाठवा. मी तुम्हाला आत्ताच पुढच्या महिन्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो, आपल्या तरुण मित्रांनी देशाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे आपले मन अभिमानाने फुलून जाणार आहे. बुद्धिमत्ता, नूतन कल्पना आणि नवोन्मेष - ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीनेच त्यांच्या intellectual property मध्ये, बौद्धिक संपदेत देखील सतत वाढ होत राहणे, हीच मुळात देशाच्या क्षमता वाढवणारी महत्त्वाची प्रगती आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट अर्जांमध्ये 2022 मध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने एक अतिशय मनोवेधक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सांगतो की पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप-10 देशांमध्येही ह्या पूर्वी असे कधीच घडले नव्हते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल मी माझ्या तरुण सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण मित्रांना विश्वासाने सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक पाऊलामध्ये देश तुमच्या साथीला आहे. सरकारने ज्या प्रशासकीय आणि नियमांतील सुधारणा केल्या आहेत त्यानंतर आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषात, नव्या संशोधनात गुंतली आहे. 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर आज आमच्या पेटंटसना 10 पट अधिक मंजुरी मिळत आहे.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की पेटंटसमुळे देशाची बौद्धिक संपदाच फक्त वाढते असे नाही, तर त्यामुळे आपल्यासाठी नवनवीन संधींची दारेदेखील खुली होतात. इतकेच नाही तर त्यामुळे आपल्या स्टार्ट-अपस ची ताकद आणि क्षमता देखील वाढते. आज आपल्या शाळकरी मुलांच्या मनात देखील नवीन संशोधनात आणि नवोन्मेषाच्या भावनेचा विकास केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोव्हेशन मिशन, महाविद्यालयात इन्क्युबेशन सेंटर्स, स्टार्ट-अप इंडिया अभियान, अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम देशवासियांसमोर दिसत आहेत. हे देखील भारताच्या युवा शक्तीचे, भारताच्या नाविन्यपूर्ण शक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. याच उत्साहाने आपण ह्या पुढेही चालत राहू व विकसित भारताचा आपला संकल्प निश्चित साध्य करून दाखवू आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो, 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान '.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की मी 'मन की बात' मध्येच, काही दिवसांपूर्वी भारतात मोठ्या संख्येने भरणाऱ्या मेळ्यांबद्दल, जत्रांबद्दल सांगितले होते. तेव्हा एका स्पर्धेची कल्पना समोर आली, ज्यामध्ये लोक मेळ्यांचे वा जत्रांशी संबंधित फोटो प्रसिद्ध करतील. सांस्कृतिक मंत्रालयाने ह्याच विषयी ‘ मेला मोमेंट्स स्पर्धेचे ; - मेळ्यातील क्षण ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की हजारो लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातील अनेकांनी बक्षिसेही जिंकली. कोलकाता येथे राहणारे श्री. राजेश धरजी यांनी “चरक मेळा” मधील फुगे आणि खेळणी विकणाऱ्याच्या त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसाठी पुरस्कार मिळवला. ही जत्रा ग्रामीण बंगालमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनुपम सिंह जी यांना वाराणसीच्या होळी उत्सवाच्या फोटोसाठी “ मेळा पोर्ट्रेट पुरस्कार मिळाला. 'कुलसाई दसरा'शी संबंधित एक आकर्षक पैलू दाखविल्याबद्दल अरुण कुमार नलीमेलाजी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच पंढरपूरमधील भक्तीभाव दाखवणारा एक फोटो लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या फोटोमध्ये समाविष्ट झाला. तो फोटो पाठवला होता महाराष्ट्रातील श्री. राहुलजी ह्यांनी. या स्पर्धेत आलेले अनेक फोटो, जत्रेत मिळणाऱ्या स्थानिक पदार्थांचे, पक्वान्नांचे होते. यामध्ये पुरलिया येथे राहणारे आलोक अविनाश जी ह्यांनी पाठवलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागातील एका जत्रेमधील खाद्यपदार्थ दाखवले होते. प्रणव बसाकजींनी काढलेल्या फोटोलाही बक्षीस मिळाले. त्यांनी भगोरिया महोत्सवात कुल्फीचा आनंद घेणाऱ्या महिलांचा फोटो काढला होता. रुमेला जी ह्यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील गावातील जत्रेत भजी खाणाऱ्या महिलांचा फोटो पाठवला होता - त्यालाही बक्षीस मिळाले.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला , प्रत्येक पंचायतीला अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची विनंती करेन. . आजकाल सामाजिक माध्यमांची शक्ती इतकी वाढली आहे, तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन घरा घरात पोहोचले आहेत. मग तो तुमचा स्थानिक सण असो किंवा उत्पादन, ह्या द्वारे तुम्ही जगापर्यंत पोचू शकता.
मित्रांनो, जसं गावोगाव जत्रा भरतात, त्याचप्रमाणे इथल्या विविध नृत्यांचीही स्वतःची परंपरा आहे. झारखंड, ओडिशा आणि बंगालच्या आदिवासी भागात 'छऊ' नावाचे नृत्य अतिशय प्रसिद्ध आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत ‘ ह्या विचाराने, श्रीनगरमध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान 'छऊ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वांनी 'छऊ' नृत्याचा आनंद लुटला. श्रीनगरमधील तरुणांना 'छऊ' नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. ह्याच प्रकारे, काही आठवड्यांपूर्वी कठुआ जिल्ह्यात 'बसोहली उत्सव' आयोजित करण्यात आला होता. हे स्थान जम्मूपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवात स्थानिक कला, लोकनृत्य आणि पारंपरिक रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते.
मित्रांनो, भारतीय संस्कृतीचं सौदंर्य सौदी अरेबियातही अनुभवायला मिळालं. याच महिन्यात सौदी अरेबियात संस्कृत उत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत अनोखा होता आणि तो संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमध्ये होता. संवाद, संगीत, नृत्य सारे काही संस्कृतमध्ये. त्यात स्थानिक लोकांचा सहभागही पहायला मिळाला.
माझ्या परिवारातील सदस्यांनो, स्वच्छ भारत आता तर संपूर्ण देशाचा प्रिय विषय बनला आहे. माझा तर तो आवडता विषय आहेच. आणि जेव्हा मला त्या विषयाशी एखादी जोडलेली बातमी मिळते तेव्हा माझं मन त्याकडे धावत जातं. आणि हे स्वाभाविक आहे की मन की बातमध्ये त्या बातमीला जागा मिळतेच. स्वच्छ भारत अभियानानं साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला आहे, जिने करोडो देशवासियांचं जीवन सुखमय बनवलं आहे. या अभियानानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना खास करून युवकांच्या सामूहिक भागीदारीसाठी प्रेरित केलं आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न सूरतमध्ये पहायला मिळाला आहे. युवकांच्या एका संघानं इथं प्रोजेक्ट सुरत ची सुरूवात केली आहे. याचं लक्ष्य सुरतला एक आदर्श शहर बनवायचं आहे जे स्वच्छता आणि शाश्वत विकासांचं एक उत्कृष्ट उदाहरण बनले. सफाई संडे नावाच्या सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरतचे युवक प्रथम सार्वजनिक जागा आणि ड्यूमास बीचची स्वच्छता करत असत. नंतर हे लोक तापी नदीच्या किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे जोडले गेले आणि आपल्याला हे समजून आनंद होईल की पाहता पाहता या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांची संख्या आता पन्नास हजारावर पोहचली आहे. लोकांकडून मिळालेल्या समर्थनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी कचरा गोळा करण्याचं कामही सुरू केलं. आपल्याला हे समजून संतोष वाटेल की या लोकांनी लाखो किलो कचरा हटवला आहे. जमिनी स्तरावरून केले जाणारे असे प्रयत्न खूप मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरतात.
मित्रांनो, गुजरातेतूनच एक माहिती हाती आली आहे. काही आठवडे अगोदर तेथे अंबाजीमध्ये भादरवी पून मेळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या मेळ्यात ५० लाखाहून अधिक लोक आले. हा मेळा दरवर्षी होत असतो. या मेळ्याची सर्वात खास बाब ही होती की मेळ्य़ासाठी आलेल्या लोकानी गब्बर हिल च्या एक मोठ्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरांच्या आसपासच्या सर्व जागेची स्वच्छता करण्याचं हे अभियान अत्यंत प्रेरक आहे.
मित्रानो, मी नेहमी हे सांगत असतो की हे स्वच्छता अभियान एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं अभियान नाही. तर ते एक जीवनात झोकून देण्याचं काम आहे. आम्ही आपल्या आसपास असे लोक पहातो की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्वच्छतेशी संबंधित विषयातच घालवलं आहे. तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील लोगानाथजी हे यांचं उदाहरण अजोड आहे. लहानपणी ते गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते व्यथित होत. त्यानंतर त्यांनी अशा मुलांना मदत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या कमाईतील एक भाग ते या मुलांच्या मदतीसाठी दान करू लागले. पैसे कमी पडले तर लोगानाथनजी यांनी लोकांचे स्वच्छतागृहांचीही साफसफाई केली ज्यामुळे गरजू मुलांना मदत होईल. ते गेल्या २५ वर्षात पूर्णपणे समर्पित भावानं या कामाला जोडले गेले आहेत आणि आतापर्यंत १५०० हून अधिक मुलांची त्यांनी मदत केली आहे. मी पुन्हा एकदा अशा प्रयत्नांची प्रशंसा करतो. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न हे आम्हाला केवळ प्रेरणा देत नाहीत तर काही तरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही आमच्यात जागवतात.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, २१व्या शतकातील आव्हानांपैकी एक आहे जल सुरक्षा. पाण्याचं संरक्षण करणं हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आम्ही सामूहिकतेच्या भावनेतून एखादं काम करतो. तेव्हा तर यशही मिळत असतं. याचं एक उदादरण देशातील प्रत्येक जिल्ह्यात तयार होत असलेल्या अमृतसरोवर हेही आहे. अमृत महोत्सव दरम्यान भारताने जी ६५ हजाराहून अधिक अमृत सरोवरं बनवली आहेत, ती येणाऱ्या पिढ्यांना लाभ देतील. आता आमची ही जबाबदारी आहे की जेथे जेथे अमृत सरोवरं बनली आहेत.त्यांची निरंतर देखभाल केली जावी. ते जल संरक्षणाचे प्रमुख स्रोत बनून रहावेत.
मित्रांनो, जल संरक्षणाच्या अशाच चर्चेमध्ये मला गुजरातच्या अमरेलीमध्ये झालेल्या जलउत्सवाबद्दलही समजलं. गुजरातेत बारा मास वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आहे . त्यामुळे लोकांना जास्त करून पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावं लागतं. गेल्या वीस पंचवीस वर्षात सरकार आणि सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांनंतरही तेथील स्थितीत परिवर्तन जरूर आलं आहे. म्हणून तेथे जलउत्सवाची प्रमुख भूमिका आहे. अमरेली मध्ये झालेल्या जल उत्सवाच्या दरम्यान जल संरक्षण आणि तलावाच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यात वॉटर स्पोर्ट्सलाही उत्तेजन देण्यात आलं. जल सुरक्षेबाबत जाणकारांशी चर्चाही करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना तिरंग्याचा कारंजे फारच पसंत पडलं. या जल उत्सवाचं आयोजन सूरतमध्ये हिरे व्यवसायात नाव कमावलेल्या सावजी भाई ढोलकिया प्रतिष्ठाननं केलं होतं. मी तेथे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं
अभिनंदन करतो, जल संरक्षणासाठी असंच काम करत रहाण्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबीयांनो, आज जगभरात कौशल्य विकासासाठी स्वीकारार्हता मिळत आहे. जेव्हा आम्ही एखाद्याला कौशल्य शिकवतो तेव्हा त्याला त्याला एक हुनरच नाही तर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देत असतो. जेव्हा मला हे समजलं की एक संस्था गेल्या चार दशकांपासून कौशल्य विकासाच्या कामात गुतलेली आहे, तर मला अधिकच चांगल वाटलं. ही संस्था आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये आहे. आणि तिचं नाव बेल्जीपुरम यूथक्लब असं आहे. कौशल्य विकासावर फोकस करून बेल्जीपुरम यूथ क्लबनं जवळपास 7000 महिलांना सक्षम बनवलं आहें. यातील सर्वाधिक महिला आज स्वबळावर काही काम करत आहेत. या संस्थेनं बाल मजुरी करणाऱ्या मुलांनाही काही ना काही कौशल्य शिकवून त्यांना दुष्टचक्रातून बाहेर निघण्यास मदत केली आहे. बेल्जीपुरम यूथक्लबच्या टीमनं शेतकरी उत्पादन संघ म्हणजे एफपीओ शी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना नवीन कौशल्य शिकवलं आहे ज्यामुळे शेतकरी सक्षम झाले आहेत. हा यूथ क्लब स्वच्छतेबाबतही गावागावात जागृती करत आहे. संस्थेने अनेक शौचालयं निर्माण करण्यातही मदत केली आहे. मी कौशल्य विकासासाठी या संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं अभिंनंदन करतो. त्यांची प्रशंसा करतो. देशाच्या गावागावात कौशल्य विकासासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. मित्रांनो, जेव्हा एका लक्ष्यासाठी सामूहिक प्रयत्न होतो. तेव्हा, तेव्हा यशाची उंचीही अधिक होऊन जाते. मी आपल्यासर्वांना लद्दाखचे एक प्रेरक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पश्मिना शालींच्याबात तर ऐकलंच असेल,गेल्या काही काळापासून लद्दाखी पश्मिना शालींची खूप चर्चा होत आहे. लद्दाखी पश्मिना लूम्स ऑफ लद्दाखनावाने जगभरात बाजारपेठांत जात आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की या शाली तयार करण्यात १५ गावांतील ४५० हून अधिक महिला सहभागी आहेत. सुरूवातीला त्या ही उत्पादने येथे आलेल्या पर्यटकांनाच विकत होत्या. पण आता डिजिटल भारतच्या या काळात त्यांनी बनवलेल्या या वस्तु देश आणि जगातील वेगवेगळ्या बाजारात पोहचत आहेत. म्हणजे आमचे लोकल आता ग्लोबल होत आहे.आणि यातून या महिलांचं उत्पन्न ही वाढलं आहे.
मित्रांनो, नारी शक्तीचं असं यश देशाच्या कानाकोप-यात आहे. अशा बाबी जास्तीत जास्त समोर आणण्याची आवश्यकता आहे. आणि हे सांगण्यासाठी मन की बातपेक्षा दुसरे अधिक चांगले व्यासपीठ काय असू शकते. तर आपणही अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणे माझ्यासोबत सामायिक करा ते सुद्धा आपल्यासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
माझ्या कुटुंबियांनो, मन की बातमध्ये आपण असे सामूहिक प्रयत्नांची चर्चा करत आहोत. ज्यांनी समाजात मोठमोठी बदल झाले आहेत. मन की बातचं एक यश हेही आहे की, याने घराघरात रेडिओला लोकप्रिय बनवलं आहे. माय गव्ह वर मला उत्तरप्रदेशच्या अमरोहाचे रामसिंह बौद्धजी यांचं पत्र मिळालं आहे. रामसिंह जी गेल्या अनेक वर्षापासून रेडिओंचा संग्रह करण्याच्या कामात जोडले आहेत. त्यांचे असं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रमानंतर त्यांचा रेडिओ म्युझियम संग्रह पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. असंच मन की बात ने प्रेरित होऊन अहमदाबादच्या जवळच तीर्थधाम प्रेरणा तीर्थनं एक मनोरंजक प्रदर्शन भरवलं आहे. यात देशविदेशातले १०० हून जास्त जुने रेडिओ ठेवले आहेत. इथं मन की बात चे सारे भाग ऐकले जाऊ शकतात. आणखी ही अशी उदाहरणे आहेत की जेथे मन की बात पासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपलं स्वतःचं काम सुरू केलं. असंच एक उदाहरण कर्नाटकच्या चामराजनगर च्या वर्षाजींचं आहे. ज्यांना मन की बातनं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. या कार्यक्रमातील एका एपिसोडपासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळीपासून जैविक खत तयार करण्यास सुरूवात केली. निसर्गाशी अत्यंत जवळीक जपलेल्या वर्षाजींचा हा उपक्रम इतरांसाठीही रोजगाराची संधी घेऊन आला आहे.
माझ्या कुटुंबियांनो, उद्या २७ नोव्हेंबरला कार्तिक पूर्णिमेचं पर्व आहे. याच दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते. आणि माझं मन तर असं म्हणतं की काशीची देवदिवाळी जरूर पाहू. यावेळी मी काशीला तर जाऊ शकत नाही. परंतु बनारसच्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून माझ्य़ा शुभकामना पाठवत आहे. यावेळीही काशीच्या घाटांवर लाखो दिवे पेटवले जातील. भव्य आरती होईल, लेसर शो होईल लाखांच्या संख्येने देशविदेशातील लोक येऊन देवदिवाळीचा आनंद लुटतील.
मित्रांनो, उद्या कार्तिक पोर्णिमेच्या दिवशीच गुरू नानकदेवजींचं प्रकाश पर्व आहे. गुरू नानकजींचे अनमोल संदेश भारताच नव्हे तर जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत. ते आम्हाला साधेपणा, सद्भाव आणि दुस-यांप्रती समर्पित होण्यासाठी प्रेरित करतात. गुरू नानकदेवजी यांनी सेवाभावना आणि सेवाकार्याची जी शिकवण दिली आहे, तिचं पालन पूर्ण विश्वातली शीख बंधुभगिनी करताना दिसतात. मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना गुरू नानकदेवजीच्या प्रकाशपर्वबद्दल शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियानो, आज मन की बातमध्ये यावेळी इतकंच. पाहता पाहता वर्ष २०२३ समाप्तीच्या दिशेंनं निघालं आहे. प्रत्येकवर्षी प्रमाणेच आपण आणि मी विचार करत आहोत की अरे किती लवकर हे वर्ष संपलं. पण हेही सत्य आहे की हे वर्ष भारतासाठी असीम यशाचं राहिलं आहे. भारताचं यश हे प्रत्येक भारतीयांचं यश आहे. मला याचा आनंद आहे की मन की बात भारतीयांचं यश समोर आणण्याचं एक सशक्त माध्यम बनलं आहे. पुढील वेळेला देशावासियांच्या अनेक यशांबद्दल पुन्हा आपल्याशी चर्चा होईल. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद,
नमस्कार.
नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
26 नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता. मला आठवते आहे की 2015 साली जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करत होतो, त्याच वेळी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करावा अशी कल्पना समोर आली. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. मी सर्व देशवासियांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत, आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू.
मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले हे आपणा सर्वांना माहीती आहे. श्री सच्चिदानंद सिन्हाजी हे संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आणि दीर्घ चर्चेनंतर आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. मसुदा तयार झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात पुन्हा २ हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही, आत्तापर्यंत एकूण 106 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. कालमान, परिस्थिती आणि देशाची आवश्यकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारांनी निरनिराळ्या वेळी ह्या सुधारणा केल्या. पण ही दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी केली गेली होती. 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या त्या चुका सुधारण्यात आल्या.
मित्रांनो, संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. हे देखील खूप प्रेरणादायी आहे की त्यापैकी 15 महिला होत्या. अशाच एक सदस्या, हंसा मेहताजी ह्यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्या वेळी भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक होता जिथे संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असेल तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. मला समाधान वाटते की संविधान निर्मात्यांच्या याच दूरदृष्टीचे पालन करत भारताच्या संसदेने आता 'नारी शक्ती वंदन कायदा' संमत केला आहे. ‘नारी शक्ती वंदन कायदा’ हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचे उदाहरण आहे. आपल्या विकसित भारत ह्या संकल्पाला चालना देण्यासाठी देखील हा कायदा तितकाच उपयुक्त ठरेल.
माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा देशातील जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतामध्ये देखील हे स्पष्टपणे आढळते आहे की देशातील अनेक बदलांचे नेतृत्व हे भारतातील 140 कोटी जनताच करीत आहे. ह्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण आपण या सणासुदीच्या काळात पाहिले आहे. गेल्या महिन्यातील ‘मन की बात’ मध्ये मी ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात भारतीयांनी स्थानिक उत्पादने खरेदी करावी ह्यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या काळात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. आणि ह्याच दिवसांत, लोकांनी भारतातील स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह दाखवला. आता तर घरातील लहान मुलेदेखील दुकानातून काही खरेदी करताना त्या वस्तूंवर मेड इन इंडिया असे लिहिलेले आहे की नाही हे पाहू लागली आहेत. केवळ इतकेच नाही तर आता ऑनलाइन खरेदी करताना देखील लोक वस्तूचे country of origin , वस्तूंचे निर्मिती स्थान पाहायला विसरत नाहीत.
मित्रांनो, ज्याप्रमाणे 'स्वच्छ भारत अभियानाला ’ मिळणारे यश हेच त्या अभियानाचे प्रेरणास्थान बनत आहे, त्याचप्रमाणे ‘व्होकल फॉर लोकल ‘ अभियानाचे यश हेच विकसित भारत - समृद्ध भारत यशाचे महाद्वार उघडत आहे. ‘व्होकल फॉर लोकलचे ‘ हे अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. ‘वोकल फॉर लोकल अभियान’ ही देशवासियांना रोजगार मिळण्याची हमी आहे. हीच विकासाची हमी आहे, हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे. ह्या अभियानामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना समान संधी मिळते. ह्या अभियानामुळे स्थानिक उत्पादनांसाठी मूल्य वर्धनाचा मार्गही मोकळा होतो आणि जर कधी जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार झालेच तर व्होकल फॉर लोकल हा मंत्र आपल्या अर्थव्यवस्थेचेही संरक्षण करतो.
मित्रांनो, भारतीय उत्पादनेच खरेदी करायची हा विचार केवळ सणांच्या दिवसांपुरताच मर्यादित राहू नये. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. काही व्यापारी संस्थांच्या अंदाजानुसार या लग्नसराईत जवळपास 5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवाहसमारंभासाठी खरेदी करताना देखील आपण सर्वांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच महत्त्व द्यावे. आणि हो, जेव्हा लग्नाचा विषय निघालाच आहे तर सांगतो की एक गोष्ट मला खूप काळापासून सलते आहे आणि माझ्या मनातील वेदना, मी माझ्या कुटुंबियांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? जरा विचार करा, आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाहसमारंभ साजरा करण्याची एक नवी पद्धत सुरु होते आहे. पण असे करणे आवश्यक आहे का?
जर आपण भारतातच, भारतातील आपल्या लोकांमध्ये विवाह समारंभ साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील. देशातील लोकांना तुमच्याकडील विवाहसमारंभात काही सेवा पुरवण्याची संधी मिळेल, अगदी गरीब लोकही आपल्या लहान लहान मुलांना तुमच्याकडील लग्नसमारंभाची वर्णने सांगतील. व्होकल फॉर लोकल या अभियानाला तुम्ही अशी साथ देऊन ते अभियान पुढे नेऊ शकता का? असे लग्न सोहळे आपण आपल्याच देशात का करू नयेत? कदाचित तुम्हाला हवी तशी व्यवस्था आज इथे उपलब्ध नसेल, अशीही शक्यता आहे. पण असे सोहळे आपण देशातच आयोजित केले तर आपल्या देशातील व्यवस्थाही विकसित होईल. हा खूप मोठ्या कुटुंबांशी संबंधित असा विषय आहे. मला आशा वाटते आहे की माझी वेदना त्या मोठ्या कुटुंबांपर्यंत नक्कीच पोहोचेल.
माझ्या कुटुंबियांनो, या सणासुदीच्या काळातच लोकांचा आणखी एक मोठा कल दिसला आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे की जेव्हा दिवाळीनिमित्त खरेदी करताना रोख रक्कम देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच आता लोक जास्तीत जास्त वेळा डिजिटल पेमेंट करत आहेत. हे खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही देखील आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्ही ठरवू शकता की पुढचा महिनाभर तुम्ही फक्त UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट कराल आणि रोख रक्कम देणार नाही. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे आता हे शक्य होणार आहे. आणि असा एक महिना पूर्ण झाल्यावर, तुम्ही कृपया आपले अनुभव आणि फोटो मला पाठवा. मी तुम्हाला आत्ताच पुढच्या महिन्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो, आपल्या तरुण मित्रांनी देशाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे आपले मन अभिमानाने फुलून जाणार आहे. बुद्धिमत्ता, नूतन कल्पना आणि नवोन्मेष - ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीनेच त्यांच्या intellectual property मध्ये, बौद्धिक संपदेत देखील सतत वाढ होत राहणे, हीच मुळात देशाच्या क्षमता वाढवणारी महत्त्वाची प्रगती आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट अर्जांमध्ये 2022 मध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने एक अतिशय मनोवेधक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सांगतो की पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप-10 देशांमध्येही ह्या पूर्वी असे कधीच घडले नव्हते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल मी माझ्या तरुण सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण मित्रांना विश्वासाने सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक पाऊलामध्ये देश तुमच्या साथीला आहे. सरकारने ज्या प्रशासकीय आणि नियमांतील सुधारणा केल्या आहेत त्यानंतर आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषात, नव्या संशोधनात गुंतली आहे. 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर आज आमच्या पेटंटसना 10 पट अधिक मंजुरी मिळत आहे.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की पेटंटसमुळे देशाची बौद्धिक संपदाच फक्त वाढते असे नाही, तर त्यामुळे आपल्यासाठी नवनवीन संधींची दारेदेखील खुली होतात. इतकेच नाही तर त्यामुळे आपल्या स्टार्ट-अपस ची ताकद आणि क्षमता देखील वाढते. आज आपल्या शाळकरी मुलांच्या मनात देखील नवीन संशोधनात आणि नवोन्मेषाच्या भावनेचा विकास केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोव्हेशन मिशन, महाविद्यालयात इन्क्युबेशन सेंटर्स, स्टार्ट-अप इंडिया अभियान, अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम देशवासियांसमोर दिसत आहेत. हे देखील भारताच्या युवा शक्तीचे, भारताच्या नाविन्यपूर्ण शक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. याच उत्साहाने आपण ह्या पुढेही चालत राहू व विकसित भारताचा आपला संकल्प निश्चित साध्य करून दाखवू आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो, 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान '.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की मी 'मन की बात' मध्येच, काही दिवसांपूर्वी भारतात मोठ्या संख्येने भरणाऱ्या मेळ्यांबद्दल, जत्रांबद्दल सांगितले होते. तेव्हा एका स्पर्धेची कल्पना समोर आली, ज्यामध्ये लोक मेळ्यांचे वा जत्रांशी संबंधित फोटो प्रसिद्ध करतील. सांस्कृतिक मंत्रालयाने ह्याच विषयी ‘ मेला मोमेंट्स स्पर्धेचे ; - मेळ्यातील क्षण ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की हजारो लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातील अनेकांनी बक्षिसेही जिंकली. कोलकाता येथे राहणारे श्री. राजेश धरजी यांनी “चरक मेळा” मधील फुगे आणि खेळणी विकणाऱ्याच्या त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसाठी पुरस्कार मिळवला. ही जत्रा ग्रामीण बंगालमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनुपम सिंह जी यांना वाराणसीच्या होळी उत्सवाच्या फोटोसाठी “ मेळा पोर्ट्रेट पुरस्कार मिळाला. 'कुलसाई दसरा'शी संबंधित एक आकर्षक पैलू दाखविल्याबद्दल अरुण कुमार नलीमेलाजी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच पंढरपूरमधील भक्तीभाव दाखवणारा एक फोटो लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या फोटोमध्ये समाविष्ट झाला. तो फोटो पाठवला होता महाराष्ट्रातील श्री. राहुलजी ह्यांनी. या स्पर्धेत आलेले अनेक फोटो, जत्रेत मिळणाऱ्या स्थानिक पदार्थांचे, पक्वान्नांचे होते. यामध्ये पुरलिया येथे राहणारे आलोक अविनाश जी ह्यांनी पाठवलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागातील एका जत्रेमधील खाद्यपदार्थ दाखवले होते. प्रणव बसाकजींनी काढलेल्या फोटोलाही बक्षीस मिळाले. त्यांनी भगोरिया महोत्सवात कुल्फीचा आनंद घेणाऱ्या महिलांचा फोटो काढला होता. रुमेला जी ह्यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील गावातील जत्रेत भजी खाणाऱ्या महिलांचा फोटो पाठवला होता - त्यालाही बक्षीस मिळाले.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला , प्रत्येक पंचायतीला अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची विनंती करेन. . आजकाल सामाजिक माध्यमांची शक्ती इतकी वाढली आहे, तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन घरा घरात पोहोचले आहेत. मग तो तुमचा स्थानिक सण असो किंवा उत्पादन, ह्या द्वारे तुम्ही जगापर्यंत पोचू शकता.
मित्रांनो, जसं गावोगाव जत्रा भरतात, त्याचप्रमाणे इथल्या विविध नृत्यांचीही स्वतःची परंपरा आहे. झारखंड, ओडिशा आणि बंगालच्या आदिवासी भागात 'छऊ' नावाचे नृत्य अतिशय प्रसिद्ध आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत ‘ ह्या विचाराने, श्रीनगरमध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान 'छऊ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वांनी 'छऊ' नृत्याचा आनंद लुटला. श्रीनगरमधील तरुणांना 'छऊ' नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. ह्याच प्रकारे, काही आठवड्यांपूर्वी कठुआ जिल्ह्यात 'बसोहली उत्सव' आयोजित करण्यात आला होता. हे स्थान जम्मूपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवात स्थानिक कला, लोकनृत्य आणि पारंपरिक रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते.
मित्रांनो, भारतीय संस्कृतीचं सौदंर्य सौदी अरेबियातही अनुभवायला मिळालं. याच महिन्यात सौदी अरेबियात संस्कृत उत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत अनोखा होता आणि तो संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमध्ये होता. संवाद, संगीत, नृत्य सारे काही संस्कृतमध्ये. त्यात स्थानिक लोकांचा सहभागही पहायला मिळाला.
माझ्या परिवारातील सदस्यांनो, स्वच्छ भारत आता तर संपूर्ण देशाचा प्रिय विषय बनला आहे. माझा तर तो आवडता विषय आहेच. आणि जेव्हा मला त्या विषयाशी एखादी जोडलेली बातमी मिळते तेव्हा माझं मन त्याकडे धावत जातं. आणि हे स्वाभाविक आहे की मन की बातमध्ये त्या बातमीला जागा मिळतेच. स्वच्छ भारत अभियानानं साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला आहे, जिने करोडो देशवासियांचं जीवन सुखमय बनवलं आहे. या अभियानानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना खास करून युवकांच्या सामूहिक भागीदारीसाठी प्रेरित केलं आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न सूरतमध्ये पहायला मिळाला आहे. युवकांच्या एका संघानं इथं प्रोजेक्ट सुरत ची सुरूवात केली आहे. याचं लक्ष्य सुरतला एक आदर्श शहर बनवायचं आहे जे स्वच्छता आणि शाश्वत विकासांचं एक उत्कृष्ट उदाहरण बनले. सफाई संडे नावाच्या सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरतचे युवक प्रथम सार्वजनिक जागा आणि ड्यूमास बीचची स्वच्छता करत असत. नंतर हे लोक तापी नदीच्या किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे जोडले गेले आणि आपल्याला हे समजून आनंद होईल की पाहता पाहता या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांची संख्या आता पन्नास हजारावर पोहचली आहे. लोकांकडून मिळालेल्या समर्थनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी कचरा गोळा करण्याचं कामही सुरू केलं. आपल्याला हे समजून संतोष वाटेल की या लोकांनी लाखो किलो कचरा हटवला आहे. जमिनी स्तरावरून केले जाणारे असे प्रयत्न खूप मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरतात.
मित्रांनो, गुजरातेतूनच एक माहिती हाती आली आहे. काही आठवडे अगोदर तेथे अंबाजीमध्ये भादरवी पून मेळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या मेळ्यात ५० लाखाहून अधिक लोक आले. हा मेळा दरवर्षी होत असतो. या मेळ्याची सर्वात खास बाब ही होती की मेळ्य़ासाठी आलेल्या लोकानी गब्बर हिल च्या एक मोठ्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरांच्या आसपासच्या सर्व जागेची स्वच्छता करण्याचं हे अभियान अत्यंत प्रेरक आहे.
मित्रानो, मी नेहमी हे सांगत असतो की हे स्वच्छता अभियान एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं अभियान नाही. तर ते एक जीवनात झोकून देण्याचं काम आहे. आम्ही आपल्या आसपास असे लोक पहातो की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्वच्छतेशी संबंधित विषयातच घालवलं आहे. तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील लोगानाथजी हे यांचं उदाहरण अजोड आहे. लहानपणी ते गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते व्यथित होत. त्यानंतर त्यांनी अशा मुलांना मदत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या कमाईतील एक भाग ते या मुलांच्या मदतीसाठी दान करू लागले. पैसे कमी पडले तर लोगानाथनजी यांनी लोकांचे स्वच्छतागृहांचीही साफसफाई केली ज्यामुळे गरजू मुलांना मदत होईल. ते गेल्या २५ वर्षात पूर्णपणे समर्पित भावानं या कामाला जोडले गेले आहेत आणि आतापर्यंत १५०० हून अधिक मुलांची त्यांनी मदत केली आहे. मी पुन्हा एकदा अशा प्रयत्नांची प्रशंसा करतो. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न हे आम्हाला केवळ प्रेरणा देत नाहीत तर काही तरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही आमच्यात जागवतात.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, २१व्या शतकातील आव्हानांपैकी एक आहे जल सुरक्षा. पाण्याचं संरक्षण करणं हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आम्ही सामूहिकतेच्या भावनेतून एखादं काम करतो. तेव्हा तर यशही मिळत असतं. याचं एक उदादरण देशातील प्रत्येक जिल्ह्यात तयार होत असलेल्या अमृतसरोवर हेही आहे. अमृत महोत्सव दरम्यान भारताने जी ६५ हजाराहून अधिक अमृत सरोवरं बनवली आहेत, ती येणाऱ्या पिढ्यांना लाभ देतील. आता आमची ही जबाबदारी आहे की जेथे जेथे अमृत सरोवरं बनली आहेत.त्यांची निरंतर देखभाल केली जावी. ते जल संरक्षणाचे प्रमुख स्रोत बनून रहावेत.
मित्रांनो, जल संरक्षणाच्या अशाच चर्चेमध्ये मला गुजरातच्या अमरेलीमध्ये झालेल्या जलउत्सवाबद्दलही समजलं. गुजरातेत बारा मास वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आहे . त्यामुळे लोकांना जास्त करून पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावं लागतं. गेल्या वीस पंचवीस वर्षात सरकार आणि सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांनंतरही तेथील स्थितीत परिवर्तन जरूर आलं आहे. म्हणून तेथे जलउत्सवाची प्रमुख भूमिका आहे. अमरेली मध्ये झालेल्या जल उत्सवाच्या दरम्यान जल संरक्षण आणि तलावाच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यात वॉटर स्पोर्ट्सलाही उत्तेजन देण्यात आलं. जल सुरक्षेबाबत जाणकारांशी चर्चाही करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना तिरंग्याचा कारंजे फारच पसंत पडलं. या जल उत्सवाचं आयोजन सूरतमध्ये हिरे व्यवसायात नाव कमावलेल्या सावजी भाई ढोलकिया प्रतिष्ठाननं केलं होतं. मी तेथे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं
अभिनंदन करतो, जल संरक्षणासाठी असंच काम करत रहाण्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबीयांनो, आज जगभरात कौशल्य विकासासाठी स्वीकारार्हता मिळत आहे. जेव्हा आम्ही एखाद्याला कौशल्य शिकवतो तेव्हा त्याला त्याला एक हुनरच नाही तर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देत असतो. जेव्हा मला हे समजलं की एक संस्था गेल्या चार दशकांपासून कौशल्य विकासाच्या कामात गुतलेली आहे, तर मला अधिकच चांगल वाटलं. ही संस्था आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये आहे. आणि तिचं नाव बेल्जीपुरम यूथक्लब असं आहे. कौशल्य विकासावर फोकस करून बेल्जीपुरम यूथ क्लबनं जवळपास 7000 महिलांना सक्षम बनवलं आहें. यातील सर्वाधिक महिला आज स्वबळावर काही काम करत आहेत. या संस्थेनं बाल मजुरी करणाऱ्या मुलांनाही काही ना काही कौशल्य शिकवून त्यांना दुष्टचक्रातून बाहेर निघण्यास मदत केली आहे. बेल्जीपुरम यूथक्लबच्या टीमनं शेतकरी उत्पादन संघ म्हणजे एफपीओ शी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना नवीन कौशल्य शिकवलं आहे ज्यामुळे शेतकरी सक्षम झाले आहेत. हा यूथ क्लब स्वच्छतेबाबतही गावागावात जागृती करत आहे. संस्थेने अनेक शौचालयं निर्माण करण्यातही मदत केली आहे. मी कौशल्य विकासासाठी या संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं अभिंनंदन करतो. त्यांची प्रशंसा करतो. देशाच्या गावागावात कौशल्य विकासासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. मित्रांनो, जेव्हा एका लक्ष्यासाठी सामूहिक प्रयत्न होतो. तेव्हा, तेव्हा यशाची उंचीही अधिक होऊन जाते. मी आपल्यासर्वांना लद्दाखचे एक प्रेरक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पश्मिना शालींच्याबात तर ऐकलंच असेल,गेल्या काही काळापासून लद्दाखी पश्मिना शालींची खूप चर्चा होत आहे. लद्दाखी पश्मिना लूम्स ऑफ लद्दाखनावाने जगभरात बाजारपेठांत जात आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की या शाली तयार करण्यात १५ गावांतील ४५० हून अधिक महिला सहभागी आहेत. सुरूवातीला त्या ही उत्पादने येथे आलेल्या पर्यटकांनाच विकत होत्या. पण आता डिजिटल भारतच्या या काळात त्यांनी बनवलेल्या या वस्तु देश आणि जगातील वेगवेगळ्या बाजारात पोहचत आहेत. म्हणजे आमचे लोकल आता ग्लोबल होत आहे.आणि यातून या महिलांचं उत्पन्न ही वाढलं आहे.
मित्रांनो, नारी शक्तीचं असं यश देशाच्या कानाकोप-यात आहे. अशा बाबी जास्तीत जास्त समोर आणण्याची आवश्यकता आहे. आणि हे सांगण्यासाठी मन की बातपेक्षा दुसरे अधिक चांगले व्यासपीठ काय असू शकते. तर आपणही अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणे माझ्यासोबत सामायिक करा ते सुद्धा आपल्यासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
माझ्या कुटुंबियांनो, मन की बातमध्ये आपण असे सामूहिक प्रयत्नांची चर्चा करत आहोत. ज्यांनी समाजात मोठमोठी बदल झाले आहेत. मन की बातचं एक यश हेही आहे की, याने घराघरात रेडिओला लोकप्रिय बनवलं आहे. माय गव्ह वर मला उत्तरप्रदेशच्या अमरोहाचे रामसिंह बौद्धजी यांचं पत्र मिळालं आहे. रामसिंह जी गेल्या अनेक वर्षापासून रेडिओंचा संग्रह करण्याच्या कामात जोडले आहेत. त्यांचे असं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रमानंतर त्यांचा रेडिओ म्युझियम संग्रह पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. असंच मन की बात ने प्रेरित होऊन अहमदाबादच्या जवळच तीर्थधाम प्रेरणा तीर्थनं एक मनोरंजक प्रदर्शन भरवलं आहे. यात देशविदेशातले १०० हून जास्त जुने रेडिओ ठेवले आहेत. इथं मन की बात चे सारे भाग ऐकले जाऊ शकतात. आणखी ही अशी उदाहरणे आहेत की जेथे मन की बात पासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपलं स्वतःचं काम सुरू केलं. असंच एक उदाहरण कर्नाटकच्या चामराजनगर च्या वर्षाजींचं आहे. ज्यांना मन की बातनं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. या कार्यक्रमातील एका एपिसोडपासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळीपासून जैविक खत तयार करण्यास सुरूवात केली. निसर्गाशी अत्यंत जवळीक जपलेल्या वर्षाजींचा हा उपक्रम इतरांसाठीही रोजगाराची संधी घेऊन आला आहे.
माझ्या कुटुंबियांनो, उद्या २७ नोव्हेंबरला कार्तिक पूर्णिमेचं पर्व आहे. याच दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते. आणि माझं मन तर असं म्हणतं की काशीची देवदिवाळी जरूर पाहू. यावेळी मी काशीला तर जाऊ शकत नाही. परंतु बनारसच्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून माझ्य़ा शुभकामना पाठवत आहे. यावेळीही काशीच्या घाटांवर लाखो दिवे पेटवले जातील. भव्य आरती होईल, लेसर शो होईल लाखांच्या संख्येने देशविदेशातील लोक येऊन देवदिवाळीचा आनंद लुटतील.
मित्रांनो, उद्या कार्तिक पोर्णिमेच्या दिवशीच गुरू नानकदेवजींचं प्रकाश पर्व आहे. गुरू नानकजींचे अनमोल संदेश भारताच नव्हे तर जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत. ते आम्हाला साधेपणा, सद्भाव आणि दुस-यांप्रती समर्पित होण्यासाठी प्रेरित करतात. गुरू नानकदेवजी यांनी सेवाभावना आणि सेवाकार्याची जी शिकवण दिली आहे, तिचं पालन पूर्ण विश्वातली शीख बंधुभगिनी करताना दिसतात. मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना गुरू नानकदेवजीच्या प्रकाशपर्वबद्दल शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियानो, आज मन की बातमध्ये यावेळी इतकंच. पाहता पाहता वर्ष २०२३ समाप्तीच्या दिशेंनं निघालं आहे. प्रत्येकवर्षी प्रमाणेच आपण आणि मी विचार करत आहोत की अरे किती लवकर हे वर्ष संपलं. पण हेही सत्य आहे की हे वर्ष भारतासाठी असीम यशाचं राहिलं आहे. भारताचं यश हे प्रत्येक भारतीयांचं यश आहे. मला याचा आनंद आहे की मन की बात भारतीयांचं यश समोर आणण्याचं एक सशक्त माध्यम बनलं आहे. पुढील वेळेला देशावासियांच्या अनेक यशांबद्दल पुन्हा आपल्याशी चर्चा होईल. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद,
नमस्कार.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!
मित्रांनो,
सणांच्या या उत्साहातच मला ‘मन की बात’ची सुरुवात दिल्लीच्या एका बातमीनं करायची आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाली. इथे कॅनॉट प्लेस या ठिकाणी, एकाच खादीच्या दुकानात, लोकांनी एकाच दिवसात दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त सामानाची खरेदी केली. या महिन्यात सुरू असलेल्या खादी महोत्सवानं पुन्हा एकदा विक्रीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणून घेऊन खूप बरं वाटेल. दहा वर्षांपूर्वी देशात खादी उत्पादनांची विक्री ३० हजार कोटींपेक्षा कमी होती, आता ती वाढून सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. खादीची विक्री वाढली याचा अर्थ असा होतो की त्याचा फायदा शहरापासून खेड्यापर्यंत, समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचतो. आपले विणकर, हस्तकला कारागीर, आपले शेतकरी, आयुर्वेदिक वनस्पती लावणारे कुटीर उद्योग, सर्वांनाच या विक्रीचा लाभ मिळत आहे, आणि हीच 'वोकल फॉर लोकल' मोहिमेची, स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची ताकद आहे आणि याला हळूहळू तुम्हा सर्व देशबांधवांचा प्रतिसाद सुद्धा वाढत आहे.
मित्रांनो,
आज मला तुमच्या कडे आणखी एक विनंती पुन्हा करायची आहे आणि ती अगदी खूप आग्रहानं करायची आहे. आपण जेव्हा जेव्हा पर्यटनाला जाल, तीर्थयात्रेला जाल, तेव्हा तेव्हा तिथल्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, नक्की खरेदी करा. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या एकूण बजेटमध्ये, खर्चाच्या नियोजनामध्ये, स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला महत्त्वाचं प्राधान्य द्या. तुमचं बजेट 10 टक्के असो, 20 टक्के असो, तुम्ही त्यातून स्थानिक उत्पादनांचीच खरेदी करा, त्या त्या ठिकाणीच खरेदी करा.
मित्रहो,
दरवेळेप्रमाणेच याही वेळी आपल्या सण-उत्सवात आपलं प्राधान्य, आपला आग्रह, 'स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचाच राहू देत. आपलं स्वप्न आहे 'आत्मनिर्भर भारत', स्वावलंबी भारत आणि आपण सर्वजण मिळून ते स्वप्न पूर्ण करूया. यावेळेस अशाच उत्पादनानं घर सजवून टाका, ज्यात माझ्या कुणा देशबांधवाच्या घामाचा सुगंध आहे, माझ्या देशाच्या युवक-युवतीची गुणवत्ता ठासून भरली आहे, ज्या उत्पादनानं माझ्या देशवासीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नेहमीच्या आयुष्यातली कुठलीही गरज असो, ती गरज आपण स्थानिक उत्पादनानच पूर्ण करू. मात्र, तुम्हाला आणखी एका गोष्टीचा बारकाईनं विचार करावा लागेल. 'व्होकल फॉर लोकल' ही भावना केवळ सणासुदीच्या खरेदीपुरती मर्यादित नाही… आणि मी कुठेतरी पाहिलं आहे…लोक दिवाळीचे दिवे खरेदी करतात आणि नंतर समाज माध्यमावर, 'व्होकल फॉर लोकल' अशी टिप्पणी टाकतात. नाही मित्रांनो…ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, जीवनातली प्रत्येक गरज स्थानिक उत्पादनानच पूर्ण करायची आहे….आपल्या देशात, आता, सर्व काही उपलब्ध आहे. हा दृष्टीकोन फक्त लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही. आज भारत जगातलं सर्वात मोठं भव्य उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रँड, नामांकित उत्पादक, त्यांची उत्पादनं इथे तयार करत आहेत. जर आपण ती उत्पादनं स्वीकारली, तर मेक इन इंडियाला चालना मिळते, आणि हा सुद्धा एक प्रकारे लोकल साठी व्होकलच, स्थानिक उत्पादनांसाठीचा आग्रहच असतो.आणि हो, अशी उत्पादनं खरेदी करताना, UPI डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करा… आपल्या जीवनात ही सवय लावून घ्या आणि त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपलं सेल्फी छायाचित्र, नमो अॅप वर टाकून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून! मी यापैकी काही छायाचित्रं, काही टिप्पण्या समाजमाध्यमांवर टाकेन, जेणेकरून इतर लोकांनाही 'व्होकल फॉर लोकल'साठी प्रेरणा मिळेल.
मित्रांनो,
आपण जेव्हा भारतात तयार झालेल्या, भारतीयांनीच बनवलेल्या उत्पादनांनी आपली दिवाळी साजरी कराल, आपल्या कुटुंबाची प्रत्येक छोटी मोठी गरज स्थानिक उत्पादनानं पूर्ण कराल, तेव्हा दिवाळीचा झगमगाट तर आणखी जास्त वाढेलच वाढेल, शिवाय त्या कारागिरांच्या आयुष्यात एक नवी दिवाळी येईल, जीवनातली एक नवी पहाट उगवेल, त्यांचं जीवन शानदार बनेल! भारताला स्वावलंबी बनवा, नेहमी मेक इन इंडिया निवडत जा… यामुळे आपल्या सोबतच आपल्या कोट्यवधी देशवासीयांची दिवाळी बहारदार होईल, चैतन्यपूर्ण होईल, उजळून निघेल, मनोरंजक होईल.
माझ्या प्रिय देशावासीयानो,
31 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप विशेष असतो. याच दिवशी आपण लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करतो. आपण भारतवासीय कितीतरी कारणांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असतो आणि श्रद्धेनं त्यांना वंदन करत असतो. यातलं सगळ्यात मोठं कारण आहे… देशातल्या 580 हून जास्त संस्थानांचं, भारतात विलीनीकरण करण्यात त्यांनी बजावलेली अतुलनीय भूमिका! आपल्या सर्वांनाच हे माहित आहे… प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबरला गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेच्या पुतळ्याजवळ, एकता दिवसाशी निगडीत मुख्य कार्यक्रम होत असतो. या खेपेस या कार्यक्रमा व्यतिरिक्त दिल्लीत कर्तव्यपथावर, एक खूपच विशेष कार्यक्रम होणार आहे. आपल्याला आठवत असेल… मी, गेल्या काही दिवसात, देशातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून माती जमा करण्याचा आग्रह केला होता. प्रत्येक घरातून माती संकलित केल्यानंतर ती कलशात भरली गेली आणि मग अमृत कलश यात्रा निघाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र केलेली ही माती, या हजारो अमृत कलश यात्रा, आता दिल्लीत पोहोचत आहेत. इथे दिल्लीत ही सर्व माती, एका विशाल अशा भारत कलशात एकत्र केली जाईल आणि याच पवित्र मातीतून दिल्लीत अमृत वाटिका उभारली जाईल. अमृतवाटिकेच्या माध्यमातून ही माती, देशाच्या राजधानीच्या हृदयस्थानी, अमृत महोत्सवाचा एक भव्य वारसा म्हणून कायम अस्तित्वात राहील. 31 ऑक्टोबरलाच, देशात गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल. आपण सर्वांनी मिळून या महोत्सवाला, जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवापैकी एक बनवून टाकलं. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान असो किंवा प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम असो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. याच महोत्सवा दरम्यान सामुदायिक सेवेचं सुद्धा एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.
मित्रहो,
आज मी आपल्याला एक आणखी आनंदाची बातमी सांगणार आहे….विशेष करून माझ्या नवतरुण मुला-मुलींना, ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास आहे, स्वप्न आहेत, संकल्प आहेत. आनंदाची ही बातमी देशवासीयांसाठी तर आहेच आहे….. माझ्या नवतरुण मित्रांनो… आपल्यासाठी विशेष आहे. दोन दिवसानंतरच 31 ऑक्टोबरला, एक खूप मोठ्या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे आणि तो सुद्धा सरदार साहेबांच्या जयंतीदिनी! या संघटनेचं नाव आहे…माझा तरुण भारत…माय भारत! माय भारत संघटना, भारताच्या युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपली सक्रीय भूमिका बजावण्याची संधी मिळवून देईल. हा, विकसित भारताच्या निर्मितीत, भारताच्या युवाशक्तीची एकजूट घडवून आणण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. 'माझा युवा भारत' या संघटनेचं संकेतस्थळ…. माय भारत सुद्धा सुरू होणार आहे. मी युवा वर्गाला विनंती करतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो… की आपण सर्व… माझ्या देशाचे नवतरुण-तरुणी, आपण सर्व माझ्या देशाचे पुत्र आणि कन्या, 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' वर नोंदणी करा आणि विविध कार्यक्रमांसाठी तयार राहा. 31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींची पुण्यतिथी सुद्धा आहे. मी त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आपलं साहित्य, लिटरेचर, 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला आणखी बळकट करण्याच्या सगळ्यात उत्तम अशा माध्यमांपैकी एक माध्यम आहे. मी आपल्याला तामिळनाडूच्या गौरवपूर्ण वारशाशी निगडीत अशा दोन खूपच प्रेरक उपक्रमांची माहिती देऊ इच्छितो. मला प्रसिद्ध तमिळ लेखिका भगिनी शिवशंकरीजी यांच्याबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी एक उपक्रम राबवला आहे ….नीट इंडिया, थ्रू लिटरेचर! म्हणजे याचा अर्थ असा आहे की साहित्याच्या माध्यमातून देशाला एका धाग्यात गुंफणं आणि जोडणं! त्या या प्रकल्पावर गेल्या सोळा वर्षांपासून काम करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 18 भारतीय भाषांमधल्या साहित्याचा अनुवाद केला आहे. त्यांनी कितीतरी वेळा, कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत आणि इंफाळपासून जैसलमेर पर्यंत, देशभर भेटी दिल्या आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांमधले लेखक आणि कवींशी त्यांना संवाद साधता येईल. शिवशंकरीजींनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटी, पर्यटन समालोचनासह, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. हे पुस्तक तमिळ आणि इंग्रजी, दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम, ही लेखन गाथा, चार मोठ्या खंडात उपलब्ध आहे आणि प्रत्येक खंड भारताच्या वेगवेगळ्या भागाला समर्पित आहे. मला त्यांच्या या दृढनिश्चयाचा खूप अभिमान वाटतो.
मित्रहो,
कन्याकुमारीच्या, थिरू ए के पेरुमलजी यांचं काम सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी, तामिळनाडूची कथाकथनाची परंपरा संरक्षित करण्याचं, जोपासण्याचं प्रशंसनीय काम केलं आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून आपला हा वसा चालवत आहेत. त्यासाठी ते तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करतात आणि त्या त्या भागातले लोककलांचे विविध प्रकार शोधून काढून त्याबद्दल पुस्तकात लिहितात. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की त्यांनी आतापर्यंत अशी जवळजवळ शंभर पुस्तकं लिहिली आहेत. त्याशिवाय पेरूमलजी यांना आणखी एक छंद आहे. तामिळनाडूच्या मंदिर संस्कृती बद्दल संशोधन करणं त्यांना खूप आवडतं. त्यांनी, लेदर पपेट्स या कळसुत्री बाहुल्यांच्या प्रकारावर सुद्धा खूप संशोधन केलं आहे आणि या संशोधनाचा लाभ तिथल्या स्थानिक लोककलावंतांना होत आहे. शिवशंकरीजी आणि ए.के. पेरूमलजी यांचे हे प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श उदाहरण आहेत, वस्तुपाठ आहे. आपल्या संस्कृती रक्षणाच्या अशा प्रत्येक प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, जे आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासोबतच, देशाचं नाव, देशाचा मान, सर्वच वाढवत असतात.
माझ्या कुटुंबियांनो,
येत्या 15 नोव्हेंबरला संपूर्ण देश, आदिवासी गौरव दिन साजरा करेल. हा विशेष दिवस, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीशी निगडीत आहे. भगवान बिरसा मुंडा आपल्या सर्वांच्याच हृदयात वसले आहेत. निस्सीम साहस काय असतं आणि आपल्या दृढनिश्चयावर कायम राहणं कशाला म्हणतात, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. त्यांनी परदेशी राजवट कधीही स्वीकारली नाही. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला थारा नसेल असा समाज त्यांना अभिप्रेत होता. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि समानतेचं जीवन लाभावं अशी त्यांची इच्छा होती. भगवान बिरसा मुंडा यांनी पर्यावरण पूरक, निसर्गाशी मैत्रीपूर्वक जीवन जगण्यावर नेहमी भर दिला. आपण आजही पाहतो की आपले आदिवासी बंधू-भगिनी निसर्गाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारे कसे समर्पित आयुष्य जगत असतात! आपल्या सर्वांसाठी, आपल्या आदिवासी बंधू-भगिनींचं हे काम खूप प्रेरणादायक आहे.
मित्रांनो,
उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबरला गोविंदगुरु जी यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. आपल्या गुजरात आणि राजस्थानच्या आदिवासी आणि वंचित समाजाच्या जीवनात, गोविंदगुरु जी यांचं महत्त्व खूपच विशेष असं आहे. गोविंदगुरुजीं ना सुद्धा मी आपली श्रद्धांजली अर्पण करतो. नोव्हेंबर महिन्यात आपण मानगढ नरसंहाराचा स्मृतिदिन सुद्धा पाळतो. मी त्या नरसंहारात हुतात्मा झालेल्या, भारतमातेच्या सर्व लेकरांना वंदन करतो.
मित्रांनो, भारताला आदिवासी शूरवीरांचा समृद्ध इतिहास आहे. याच भारतभूमीवर थोर तिलका मांझी यांनी अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. याच भूमीतून सिद्धो-कान्हूंनी समतेचा आवाज बुलंद केला. तंट्या भिल्ल हा योद्धा आपल्या मातीत जन्माला आला याचा आम्हाला अभिमान आहे. बिकट काळात आपल्या लोकांच्या पाठी उभे राहणाऱ्या शहीद वीर नारायण सिंह यांचे आम्ही श्रद्धापूर्वक स्मरण करतो. शूर रामजी गोंड असोत, शूर गुंडाधुर असोत, भीमा नायक असोत, त्यांचे शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासी बंधू-भगिनींमध्ये जी जागृती केली त्याचे देश आजही स्मरण करतो. ईशान्येतील किआंग नोबांग आणि राणी गैडिनलिऊ यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांकडूनही आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातूनच देशाला राजमोहिनी देवी, राणी कमलापती यांसारख्या वीरांगना मिळाल्या. आदिवासी समाजाला प्रेरणा देणार्या राणी दुर्गावतीजींची 500 वी जयंती देश सध्या साजरी करत आहे. मला आशा आहे की देशातील अधिकाधिक तरूण त्यांच्या भागातील आदिवासी व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती जाणून त्यांच्यापासून प्रेरणा घेतील. देशाचा स्वाभिमान आणि प्रगती शिरोधार्य मानणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाबद्दल देश कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, सणासुदीच्या या काळात देशात क्रीडा क्षेत्राचा झेंडाही फडकत आहे. अलीकडेच आशियाई खेळांनंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या खेळांमध्ये भारताने 111 पदके पटकावून नवा इतिहास रचला आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी खूप खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी खेळांकडेही मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. बर्लिनमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गतिमंद खेळाडूंची अद्भुत क्षमता समोर आणते. या स्पर्धेत भारतीय संघाने 75 सुवर्ण पदकांसह 200 पदके जिंकली. रोलर स्केटिंग असो, बीच व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो की लॉन टेनिस असो, भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला.
या पदकविजेत्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हरियाणाच्या रणवीर सैनीने गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. लहानपणापासूनच ऑटिझमने त्रस्त असलेल्या रणवीरसाठी कोणतेही आव्हान गोल्फची आवड कमी करू शकले नाही. त्याची आई तर म्हणते की आज कुटुंबातील प्रत्येकजण गोल्फपटू झाला आहे. पुद्दुचेरीच्या 16 वर्षीय टी-विशालने चार पदके जिंकली. गोव्याच्या सिया सरोदे यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदकांसह चार पदके पटकावली. वयाच्या 9 व्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतरही त्या निराश झाल्या नाहीत. छत्तीसगडच्या दुर्ग येथील रहिवासी असलेल्या अनुराग प्रसादने पॉवरलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे झारखंडच्या इंदू प्रकाशची, जिने सायकलिंगमध्ये दोन पदके पटकावली आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या इंदूने आपल्या यशासमोर गरिबीला कधीही अडसर बनू दिले नाही. मला विश्वास आहे की या खेळांमधील भारतीय खेळाडूंचे यश अध्ययन अक्षमतेचा सामना करत असलेल्या इतर मुलांना आणि कुटुंबांना देखील प्रेरणा देईल. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही तुमच्या गावातील, तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या भागातील अशा मुलांकडे कुटुंबासह जावे, ज्यांनी या खेळात भाग घेतला आहे किंवा विजयी झाले आहेत. त्यांचे अभिनंदन करा. आणि त्या मुलांसोबत काही क्षण घालवा. तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. त्यांच्यातल्या दैवी शक्तीची अनुभूती घेण्याची संधी तुम्हालाही मिळेल. नक्की जा.
माझ्या सुहृदांनो, तुम्ही सर्वांनी गुजरातच्या तीर्थक्षेत्र अंबाजी मंदिराबद्दल ऐकले असेलच. हे एक महत्त्वाचे शक्तीपीठ आहे, जिथे देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने अंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. येथे गब्बर पर्वताच्या वाटेवर तुम्हाला विविध प्रकारच्या योग मुद्रा आणि आसनांच्या मूर्ती दिसतील. या मूर्तींचे वैशिष्ट्य काय आहे माहीत आहे का? खरं तर ही रद्दीसामानापासून बनवलेली शिल्पे आहेत, एका प्रकारे भंगारापासून बनवलेली आहेत आणि ती अतिशय अद्भुत आहेत.
म्हणजे जुन्या वापरलेल्या आणि भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून या मूर्ती बनवल्या गेल्या आहेत. अंबाजी शक्तीपीठातील देवी मातेच्या दर्शनासोबतच या मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या प्रयत्नाला मिळालेले यश पाहून माझ्याही मनात एक कल्पना येत आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे कचऱ्यापासून अशा कलाकृती बनवू शकतात. त्यामुळे मी गुजरात सरकारला एक स्पर्धा भरवून अशा लोकांना आमंत्रित करण्याची विनंती करतो. हा प्रयत्न, गब्बर पर्वताचे आकर्षण वाढवण्याबरोबरच देशभरातील ‘वेस्ट टू वेल्थ’ मोहिमेसाठी लोकांना प्रेरित करेल.
मित्रांनो, जेव्हा जेव्हा स्वच्छ भारत आणि 'वेस्ट टू वेल्थ'चा मुद्दा येतो तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात. आसाममधील कामरूप महानगर जिल्ह्यातील अक्षर फोरम नावाची शाळा मुलांमध्ये शाश्वत विकासाची मूल्ये, संस्कार रुजवण्याचे रुजविण्याचे काम सातत्याने करत आहे. येथे शिकणारे विद्यार्थी दर आठवड्याला प्लॅस्टिक कचरा गोळा करतात, ज्याचा वापर विटा, आणि किचेन यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. याठिकाणी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचर्याचा पुनर्वापर आणि वस्तू बनवण्यास शिकवले जाते. लहान वयातच पर्यावरणाप्रती असलेली ही जाणीव या मुलांना देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्यास खूप मदत करेल.
माझ्या सुहृदांनो, आज जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपण स्त्री शक्तीचे सामर्थ्य अजमावू शकत नाही. या काळात, तिच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असताना, भक्तीचे सामर्थ्य दाखविणाऱ्या एका महिला संताचेही स्मरण आपल्याला करावे लागेल, ज्यांचे नाव इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये कोरले गेले आहे. यंदा देशभरात संत मीराबाई यांची 525 वी जयंती साजरी होत आहे. अनेक कारणांमुळे देशभरातील लोकांसाठी त्या एक प्रेरणादायी शक्ती ठरल्या आहेत. कुणाला संगीताची आवड असेल तर संगीताप्रती समर्पणाचे त्या उत्तम उदाहरण आहेत. कोणी कविताप्रेमी असेल, तर भक्तीरसात तल्लीन झालेली मीराबाईंची भजने त्याला वेगळाच आनंद देतात. जर कोणी दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असेल, तर मीराबाईचे श्रीकृष्णामध्ये लीन होणे त्याच्यासाठी मोठी प्रेरणा ठरू शकते. मीराबाई संत रविदासांना आपले गुरू मानत. त्या म्हणायच्या देखील -
गुरु मिलिया रैदास, दीन्ही ज्ञान की गुटकी |
मीराबाई आजही देशातील माता, भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्या काळातही त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. एक संत म्हणूनही त्या आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. देशावर अनेक प्रकारची आक्रमणं होत असताना भारतीय समाज आणि संस्कृती सक्षम करण्यासाठी त्या पुढे आल्या. साधेपणात किती सामर्थ्य आहे हे मीराबाईंच्या चरित्रातून लक्षात येते. मी संत मीराबाईंना नमन करतो.
माझ्या प्रिय सुहृदांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये एवढेच. तुमच्यासोबतचा प्रत्येक संवाद मला नवीन ऊर्जा देतो. आशा आणि सकारात्मकतेशी संबंधित शेकडो कथा तुमच्या संदेशांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आत्मनिर्भर भारत मोहिमेवर भर देण्याची मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. स्थानिक उत्पादने खरेदी करा, लोकल फॉर व्होकल व्हा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची घरे स्वच्छ ठेवता, तसाच तुमचा परिसर आणि शहर स्वच्छ ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे की, 31 ऑक्टोबर हा सरदार साहेबांचा जयंती दिवस देश एकता दिवस म्हणून साजरा करतो, देशात अनेक ठिकाणी एकता दौड चे आयोजन केले जाते. तुम्हीही 31 ऑक्टोबर रोजी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करा. तुम्हीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकतेचा संकल्प दृढ करा. मी पुन्हा एकदा आगामी सणांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा, निरोगी राहा, आनंदी राहा, हीच माझी कामना आहे. आणि हो, दिवाळीच्या वेळी कुठे आगीची घटना घडेल अशी चूक करू नये. जर एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही त्याला सांभाळा, स्वतःचीही काळजी घ्या आणि संपूर्ण परिसराची देखील काळजी घ्या. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो नमस्कार!
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.
माझ्या कुटुंबियांनो,
चंद्रयान-3च्या यशानंतर, जी-20च्या भव्य आयोजनाने प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला. भारत मंडपम तर स्वतःच एखाद्या सेलिब्रिटी-मान्यवरासारखा झाला आहे. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत आणि अभिमानाने ते पोस्ट करत आहेत. या शिखर परिषदेत भारतानं, आफ्रिकी महासंघाला जी-20 समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्या काळात भारत खूप समृद्ध होता, त्या काळात आपल्या देशात आणि जगात, सिल्क रूट-रेशीम व्यापार मार्गाचा खूप बोलबाला होता. हा रेशीम मार्ग, व्यापार-आर्थिक उलाढालींचे प्रमुख माध्यम होता. आता आधुनिक काळात भारताने जी-20 परिषदेत, आणखी एक आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा, भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे. हा कॉरिडॉर येणारी शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार आहे आणि या कॉरिडॉरची सुरुवात भारतीय भूमीवर झाली, याची नोंद इतिहासात कायम राहील.
मित्रांनो,
आज जी-20च्या अध्यक्षीय कारकीर्दीदरम्यान भारताची युवा शक्ती या परिषदेसोबत ज्याप्रकारे कार्यरत राहिली, त्याबद्दल एक विशेष चर्चा आवश्यक आहे. वर्षभरात देशातील अनेक विद्यापीठांमध्ये जी-20शी संबंधित कार्यक्रम झाले. आता या मालिकेत दिल्लीत आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे - ‘जी-20 University Connect Programme’. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यापीठांमधले लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालये यांसारख्या अनेक प्रतिष्ठित शिक्षण संस्थाही यात सहभागी होणार आहेत. मला असं वाटतं की जर तुम्हीही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर, तुम्ही 26 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम जरूर पहा आणि त्यात सहभागी व्हा. भारताच्या भविष्य काळाबाबत आणि तरुणांच्या भविष्यावर आधारीत अनेक रंजक गोष्टी, या कार्यक्रमात असणार आहेत. मी स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मी देखील माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची वाट पाहत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आजपासून दोन दिवसांनी 27 सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन' आहे. काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे एक माध्यम म्हणून पाहतात, मात्र पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. असं म्हटलं जातं की, जर कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे कुठले क्षेत्र असेल तर ते आहे पर्यटन क्षेत्र! पर्यटन क्षेत्राची भरभराट करताना, कोणत्याही देशासाठी, या क्षेत्राबद्दल सद्भावना बाळगणे, वाढवणे आणि आकर्षण तसेच त्याची ख्याती वाढवणे खूप महत्त्वाचे ठरते. गेल्या काही वर्षांत भारताबद्दलचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर जगभरातील लोकांचा भारतातील रस आणखी वाढला आहे.
मित्रांनो,
जी-20 परिषदेसाठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले. इथली विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारची खाणे-पिणे आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली. इथे आलेले प्रतिनिधी आपापल्या देशात परत जाताना आपल्या सोबत जे सुखद अनुभव घेऊन गेले आहेत, त्यामुळे भारतात पर्यटन आणखी वाढीला लागेल. आपणा सर्वांना माहितच आहे की भारतात एकापेक्षा एक सरस अशी जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातील पवित्र होयसडा मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मी, हा शानदार असा मान मिळाल्याबद्दल, सर्व देशवासियांचं अभिनंदन करतो. मला 2018 मध्ये शांती निकेतनला भेट देण्याचं भाग्य लाभलं होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे शांती निकेतनशी निगडीत होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका प्राचीन संस्कृत श्लोकातून शांतीनिकेतनचे ब्रीदवाक्य-ध्येयवाक्य घेतले होते. तो श्लोक असा आहे -
"यत्र विश्वं भवत्येक नीदम्"
म्हणजेच, एक लहान घरटे संपूर्ण जग सामावून घेऊ शकते.
युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेली कर्नाटकातील होयसडा मंदिरे, 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेसाठी ओळखली जातात. या मंदिरांना युनेस्कोकडून मान्यता मिळणे, हा देखील भारतीय मंदिर स्थापत्य शैलीच्या, भारतीय परंपरेचा सन्मान आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता 42 झाली आहे. भारताचा हाच प्रयत्न आहे की आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे, जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. विविध राज्यांची संस्कृती समजून घ्या, वारसा स्थळे पहा. यामुळे आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी तर परिचित व्हालच, सोबत स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवण्याचं तुम्ही एक महत्त्वाचं माध्यम देखील ठराल.
माझ्या कुटुंबियांनो,
भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत आता जागतिक बनले आहे. जगभरातील लोकांचा त्यांच्याकडे असलेला ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. मी आपल्याला एका छानशा मुलीने केलेल्या सादरीकरणातील एक छोटीशी ध्वनीफीत ऐकवतो...
### (MKB EP 105 ऑडिओ बाइट 1) ###
हा आवाज ऐकून तुम्ही देखील चकीत झाला असाल ना? तिचा आवाज किती गोड आहे आणि प्रत्येक शब्दातून जे भाव व्यक्त होत आहेत, त्यातून तिचे देवाशी असलेले प्रेमपूर्वक नाते आपण अनुभवू शकतो. जर मी तुम्हाला सांगितले की हा मधुर आवाज जर्मनीतील मुलीचा आहे, तर कदाचित तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. या मुलीचे नाव आहे - कैसमी! 21 वर्षांची कैसमी सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजतेय. मूळची जर्मनीची असलेली कैसमी भारतात कधीच आलेली नाही, मात्र ती भारतीय संगीताची चाहती आहे. जिने भारत कधी पाहिलाही नाही, तिला भारतीय संगीताची असलेली आवड खूप प्रेरणादायी आहे. कैसमी जन्मापासूनच दृष्टीबाधित आहे, मात्र हे कठीण आव्हान तिला असामान्य कामगिरी करण्यापासून रोखू शकलेलं नाही. संगीत आणि सर्जनशीलतेचा तिला एवढा ध्यास होता की तिने बालवयापासूनच गाणे सुरू केले. आफ्रिकी ड्रमवादनाची सुरुवात तर तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी केली. भारतीय संगीताचा परिचय तिला 5-6 वर्षांपूर्वीच झाला. भारतीय संगीतानं तिला इतकी भुरळ घातली, इतकी भुरळ घातली, की ती त्यात पूर्णपणे लीन झाली. ती तबलावादनही शिकली आहे. सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे तिने अनेक भारतीय भाषांमध्ये गाण्यात प्रभुत्व मिळवले आहे. संस्कृत, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, आसामी, बंगाली, मराठी, उर्दू, या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्याला दुसऱ्या अनोळखी भाषेत दोन-तीन ओळी बोलायच्या असतील तर किती अवघड असते! पण कैसमीसाठी ही बाब म्हणजे हातचा मळ आहे. तुम्हा सर्वांसाठी मी, तिने कन्नडमध्ये गायलेले एक गाणे इथे वाजवत आहे.
###(MKB EP 105 ऑडिओ बाइट 2)###
भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल जर्मनीच्या कैसमीला असलेले हे वेड कौतुकास्पद आहे. मी मनापासून तिचे कौतुक करतो. तिचा हा प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारा आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या देशात शिक्षणाकडे नेहमीच एक सेवा म्हणून पाहिले जाते. मला उत्तराखंडमधील काही युवकांविषयी कळले आहे, जे याच भावनेने मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. नैनिताल जिल्ह्यातील काही तरुणांनी मुलांसाठी अनोखे असे घोडा वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अगदी दुर्गमातील दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत आणि एवढेच नाही तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. आतापर्यंत या माध्यमातून नैनितालमधील 12 गावे सामावून घेण्यात आली आहेत. मुलांच्या शिक्षणाशी निगडीत या उदात्त कामात मदत करण्यासाठी स्थानिक लोकही स्वतःहून पुढे येत आहेत. या घोडा वाचनालयाच्या माध्यमातून, दुरदूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त 'कविता', 'कथा' आणि 'नैतिक शिक्षणावरील' पुस्तके वाचण्याची संधी पूर्णपणे मिळावी, असा प्रयत्न केला जात आहे. हे अनोखे वाचनालय मुलांनाही खूप आवडते.
मित्रांनो, मला हैदराबादमधल्या ग्रंथालयाशी संबंधित अशाच एका अनोख्या प्रयत्नाची माहिती मिळाली. तिथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या 'आकर्षणा सतीश' या मुलीने चमत्कार केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी, ती मुलांसाठी एक- दोन नव्हे तर सात ग्रंथालये चालवत आहे. दोन वर्षांपूर्वी आकर्षणा, जेव्हा तिच्या आई वडिलांबरोबर कर्करोग रुग्णालयात गेली, तेव्हा आकर्षणाला याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील गरजूंना मदत करण्यासाठी तिथे गेले होते. तेथील मुलांनी तिला 'रंगवण्याच्या पुस्तकांसंबंधी' विचारले आणि ही गोष्ट या गोंडस बाहुलीला इतकी भावली, की तिने विविध प्रकारची पुस्तके गोळा करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या शेजारची घरे, नातेवाईक आणि मित्रांकडून पुस्तके गोळा करण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की त्याच कर्करोग रुग्णालयात मुलांसाठीचे पहिले ग्रंथालय उघडण्यात आले. या मुलीने आतापर्यंत गरजू मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेली सात ग्रंथालयांमध्ये आता सुमारे 6 हजार पुस्तके आहेत. छोट्याशा 'आकर्षणा'ने ज्या पद्धतीने मुलांच्या भविष्यासाठी मोठं काम केलं आहे, त्यापासून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
मित्रांनो, हे खरे आहे की आजचे युग डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-पुस्तकांचे आहे. पण तरीही पुस्तके नेहमीच आपल्या जीवनात चांगल्या मित्राची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, आपल्या शास्त्रात म्हटले आहे-
जिवेशू करुणा चापी, मैत्री तेशू विधियताम
म्हणजेच, सजीवांवर दया करा आणि त्यांना तुमचे मित्र बनवा. आपल्या बहुतेक देवी-देवतांचे वाहन प्राणी आणि पक्षी आहेत. अनेक लोक मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेतात; पण त्यांचे वाहन असणाऱ्या प्राण्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत. हे प्राणी आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत, आणि आपण शक्य तितके त्यांचे संरक्षण देखील केले पाहिजे. गेल्या काही वर्षांत देशात सिंह, वाघ, बिबटे आणि हत्तींच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे. या पृथ्वीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांना वाचवण्यासाठी आणखीही अनेक प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. असाच एक अनोखा प्रयत्न राजस्थानातील पुष्कर येथे केला जात आहे. तिथे सुखदेव भट्टजी आणि त्यांची टीम वन्यजीव वाचवण्यात गुंतलेली आहे, आणि त्यांच्या टीमचे नाव काय आहे माहीत आहे? त्याच्या टीमचे नाव आहे- कोब्रा. हे धोकादायक नाव त्यांनी टीमला दिलय, कारण त्याची टीम या भागातील धोकादायक सापांना वाचवण्यासाठी देखील काम करते. या चमूशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत, जे केवळ एका फोन कॉलवर घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांच्या मोहिमेत सामील होतात. सुखदेवांच्या या चमूने आतापर्यंत 30 हजारांहून अधिक विषारी सापांचे प्राण वाचवले आहेत. या प्रयत्नामुळे केवळ लोकांचा धोका दूर झाला नाही तर निसर्गाचे संवर्धनही होत आहे. हा गट इतर आजारी प्राण्यांची सेवा करण्याच्या कार्याशी देखील संबंधित आहे.
मित्रांनो,
तामिळनाडूतील चेन्नई इथले ऑटोचालक एम. राजेंद्र प्रसादजी देखील एक आगळेवेगळे काम करत आहेत. ते गेल्या 25-30 वर्षापासून कबुतरांची सेवा करत आहे. त्याच्या स्वतःच्या घरात 200 हून अधिक कबुतरे आहेत. ते पक्ष्यांचे अन्न, पाणी, आरोग्य यासारख्या प्रत्येक आवश्यकतांची काळजी घेतात. त्यासाठी त्याना खूप पैसेही मोजावे लागतात, पण ते त्याच्या कामासाठी वचनबद्ध आहेत.
मित्रांनो, लोक उदात्त हेतूने असे काम करताना पाहून खरोखरच खूप प्रेरणा आणि आनंद मिळतो. जर तुम्हालाही अशा काही अनोख्या प्रयत्नांची माहिती मिळाली, तर ती जरूर शेअर करा.
माझ्या प्रिय कुटुंबियानो,
स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ हा देशासाठी प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा काळ देखील आहे. आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो, आपल्या इतच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकतो. कर्तव्याची भावना आपल्या सर्वांना एकत्र आणते. उत्तर प्रदेशच्या संभल मध्ये देशाने कर्तव्याचे जे उदाहरण पाहिले आहे, जे मला तुमच्यासोबतही शेअर करायचे आहे. कल्पना करा, 70 हून अधिक गावे आहेत, हजारो लोक आहेत आणि सगळे मिळून एक लक्ष्य, एक ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात, हे फार दुर्मिळ आहे, परंतु संभळच्या लोकांनी ते केले. या लोकांनी एकत्रितपणे लोकसहभाग आणि सामूहिक कामाचे एक उत्तम उदाहरण दाखवले आहे. खरे तर अनेक दशकांपूर्वी या भागात 'सोत' नावाची एक नदी होती. अमरोहापासून सुरू होऊन संभळमधून बदायूंला वाहणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात असे. या नदीला पाण्याचा अखंड प्रवाह होता, जो येथील शेतकऱ्यांसाठी शेतीचा मुख्य आधार होता. कालांतराने, नदीचा प्रवाह कमी झाला, ज्या मार्गांवरून नदी वाहत होती त्यावर अतिक्रमण झालं आणि नदी नामशेष झाली. नदीला आपली माता मानणाऱ्या आपल्या देशात संभळच्या लोकांनी या सोत नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 70 हून अधिक ग्रामपंचायतींनी मिळून सोत नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. ग्रामपंचायतीतल्या लोकांनी सरकारी विभागांनाही बरोबर घेतले; आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत या लोकांनी नदीचा 100 किलोमीटरहून अधिक भाग पुनरुज्जीवित केला होता. पावसाळा सुरू झाला तेव्हा येथील लोकांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि सोत नदी पाण्याने भरली गेली. इथल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची घटना ठरली. लोकांनी नदीच्या काठावर 10 हजारांहून अधिक बांबूची रोपे लावली, ज्यामुळे तिचे किनारे पूर्णपणे सुरक्षित राहतील. डासांची पैदास होऊ नये म्हणून गांबुसियाचे तीस हजारांहून अधिक मासेही नदीच्या पाण्यात सोडले गेले आहेत. मित्रांनो, सोत नदीचे उदाहरण आपल्याला सांगते की जर आपण दृढनिश्चय केला तर आपण सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो आणि मोठा बदल घडवून आणू शकतो. कर्तव्याच्या मार्गावर चालताना तुम्ही देखील तुमच्या सभोवतालच्या अशा अनेक बदलांचे माध्यम बनू शकता.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
जेव्हा हेतू दृढ असतो आणि काहीतरी शिकण्याचा उत्साह असतो, तेव्हा कोणतेही काम कठीण राहत नाही. पश्चिम बंगालच्या श्रीमती शकुंतला सरदार यांनी हे अगदी खरे असल्याचे सिद्ध केले आहे. ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. शकुंतलाजी जंगलमहालमधील सतनाला गावच्या रहिवासी आहेत. बऱ्याच काळापासून तिचे कुटुंब रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. तिच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करणेही कठीण होते. मग त्यांनी एका नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि यश मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी हे कसे केले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल! तर त्याचं उत्तर आहे- एक शिवण यंत्र. एका शिवण यंत्राच्या माध्यमातून त्यांनी 'साल'च्या पानांवर सुंदर डिझाईन्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कौशल्याने संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलले. त्याने बनवलेल्या या अद्भुत हस्तकलेची मागणी सातत्याने वाढत आहे. शकुंतलाजी यांच्या या कौशल्याने केवळ त्यांचेच नव्हे तर 'साल' ची पाने गोळा करणाऱ्या अनेक लोकांचेही जीवन बदलले आहे. आता त्या अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहे. तुम्ही कल्पना करू शकता, एकेकाळी वेतनावर अवलंबून असलेले कुटुंब आता इतरांना रोजगारासाठी प्रेरित करत आहे. दैनंदिन वेतनावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाला तिने स्वतःच्या पायावर उभे केले आहे. यामुळे तिच्या कुटुंबाला इतर गोष्टींवरही लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, शकुंतलाजींची स्थिती सुधारताच त्यांनी बचत करायला सुरुवात केली. आता तिने जीवन विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. शकुंतलाजी यांच्या कार्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच. भारतातील लोक अशा प्रतिभांनी भरलेले आहेत- तुम्ही त्यांना संधी द्या आणि ते काय करतात ते पहा.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेतले ते दृश्य कोण विसरू शकेल? जेव्हा अनेक जागतिक नेते राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत, याचा हा एक मोठा पुरावा आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छतेशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा मला आनंद आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये 'स्वच्छता ही सेवा" मोहीम जोरात सुरू आहे. Indian Swachhata League मध्येही उत्तम सहभाग मिळतो आहे.
आज मी 'मन की बात' च्या माध्यमातून सर्व देशवासियांना एक विनंती करू इच्छितो - की दिनांक 1 ऑक्टोबरला, रविवारी सकाळी 10 वाजता स्वच्छतेवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आपणही आपला वेळ काढून स्वच्छतेशी संबंधित या मोहिमेत सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या रस्त्यावर, परिसरात, उद्यानात, नदीत, तलावात किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि जिथे जिथे अमृत सरोवर बांधले गेले आहेत तिथे तर स्वच्छता आवश्यकच आहे. ही स्वच्छता मोहीम गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. गांधी जयंतीच्या या प्रसंगी खादीचे काहीना काही उत्पादन खरेदी करण्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे.
माझ्या कुटुंब सदस्यांनो,
आपल्या देशात सणांचा हंगामही सुरू झाला आहे. तुम्ही सर्वजण घरी काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल. काहीजण त्यांचे शुभ कार्य सुरू करण्यासाठी नवरात्रीची वाट पाहत असतील. उत्साह आणि आशादायक अशा वातावरणात आपण vocal for local हा मंत्र देखील जरूर लक्षात ठेवा. जिथे शक्य होईल तिथे आपण भारतात तयार झालेला माल खरेदी करा. भारतीय उत्पादनांचा वापर करा.आणि भेट देताना मेड इन इंडिया उत्पादनेच भेट द्या. तुमच्या छोट्याशा आनंदामुळे दुसऱ्याच्या कुटुंबाला देखील मोठा आनंद मिळेल. तुम्ही खरेदी करता त्या भारतीय वस्तूंचा थेट फायदा आमचे कामगार, मजूर, कारागीर आणि इतर विश्वकर्मा बंधू-भगिनींना होईल. आजकाल, अनेक स्टार्टअप्स स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहेत. जर तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी केल्या तर स्टार्ट अप्सच्या या तरुणांना देखील फायदा होईल.
माझ्या प्रिय कुटुंब जनहो,
'मन की बात' मध्ये आज इथेच थांबतो. पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला 'मन की बात' मध्ये भेटेन, तेव्हा नवरात्र आणि दसरा झाला असेल. या सणासुदीच्या काळात तुम्ही प्रत्येक सण उत्साहात साजरा करा. तुमच्या कुटुंबातला प्रत्येकजण आनंदी राहो- ह्याच माझ्या शुभेच्छा.
पुढच्या वेळी, नवीन विषय आणि देशबांधवांच्या नवीन यशोगाथांसह पुन्हा भेटूया. तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत रहा, तुमचे अनुभव सांगण्यास विसरू नका. मी वाट बघेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार!
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.
आसमान में सर उठाकर,
घने बादलों को चीरकर
रोशनी का संकल्प ले,
अभी तो सुरज उगा है
दृढ निश्चय के साथ चलकर
हर मुश्किल को पार कर
घोर अंधेरे को मिटाकने
अभी तो सूरज उगा है
आसमान में सर उठाकर,
घने बादलों को चीरकर
अभी तो सुरज उगा है
माझ्या परिवारातील सदस्यांनो, २३ ऑगस्टला भारतानं आणि भारताच्या चंद्रयानानं हे सिद्ध केलं आहे की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवत असतात. मिशन चांद्रयान भारताच्या त्या प्रवृत्तीचं प्रतीक बनलं आहे. जिला जी कोणत्याही स्थितीत विजयी होव्हायचं आहे आणि जी कोणत्याही स्थितीत जिंकायचं कसं तेही जाणते. मित्रांनो या मोहिमेचा एक बाजू अशीही होती की मी त्याची चर्चा आज आपल्याशी विशेषत्वाने करू इच्छितो. आपल्याला आठवत असेलच की मी यावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हटलं होतं की आम्हाला महिला प्रणित विकासाला राष्ट्रीय चरित्राच्या स्वरूपात विकसित करायचं आहे. जेथे महिला शक्तीचं सामर्थ्य जोडलं जातं. तेथे अशक्यही शक्य करून दाखवलं जाऊ शकतं. भारताचं मिशन चांद्रयान नारीशक्तीचं ही जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंत्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी विविध प्रणालींचे प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापिका, अशा महत्वपूर्ण जबादार्या सांभाळल्या होत्या. भारताच्या कन्या आता अनंत समजल्या जाणार्या आकाशाला आव्हान देऊ लागल्या आहेत. एखाद्या देशाच्या कन्या इतक्या महत्वाकांक्षी होतात तर त्या देशाला विकसित होण्यापासून कोण अडवू शकेल?
मित्रांनो, आपण इतकी उंच उड्डाण यासाठी घेतलं आहे कारण आपली स्वप्नंही मोठी आहेत आणि प्रयत्नही मोठे आहेत. चांद्र यान -३ च्या यशात आमच्या वैज्ञानिकांसोबतच इतर क्षेत्रांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यानाचे सर्व भाग आणि तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कितीतरी देशवासियांनी योगदान दिलं आहे. जेव्हा सर्वांचे प्रयत्न लागले तेव्हा यशही मिळालं. हेच चांद्रयान ३चं सर्वात मोठं यश आहे. मी मनोकामना व्यक्त करतो की पुढेही आपलं अंतराळ क्षेत्र आणि सर्वांचे प्रयत्न असंच यश मिळवत राहील.
माझ्या परिवारातील सद्स्यांनो, सप्टेंबरचा महिना हा भारताचच्या सामर्थ्याचां साक्षीदार बनू पहात आहे. पुढील महिन्यात होणार्या जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी भारत पूर्णतः तयार आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी ४० देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक जागतिक संयोजक राजधानी दिल्ली इथं येत आहेत. जी २० च्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारताने जी २० ला जास्त समावेशक व्यासपीठ बनवलं आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ जी २० शी जोडला गेला आहे. आफ्रिकन लोकांचा आवाज जगातील महत्वच्या व्यासपीठावर पोहचला. मित्रांनो, गेल्या वर्षी बाली मध्ये भारताला जी २० चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आतापर्यंत इतकं काही घडलं आहे की ते आपल्याला स्वाभिमानानं भरून टाकतं. मोठमोठे कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याच्या परंपरेपासून वेगळं होऊन आपण ही परिषद देशातील ६० वेगवेगळ्या शहरांत नेली. देशातील ६० शहरांमध्ये या परिषदेशी संलग्न अशा २०० बैठकांचं आयोजन आम्ही केलं. जी २० प्रतिनिधी जिथं जिथं गेले, तेथे लोकांनी त्यांचे अतिशय उत्साहानं स्वागत केलं. हे प्रतिनिधी भारताची विविधता, आपली चैतन्यशील लोकशाही, पाहून खूपच प्रभावित झाले. भारतात असणाऱ्या विविध शक्यतांचा त्यांना अनुभव आला.
मित्रांनो, G20ची आपली अध्यक्षता ही लोकांची अध्यक्षता आहे, ज्यात लोकसहभागाची भावना सर्वात अग्रेसर आहे. जी २० चे जे ११ कार्यकारी गट होते, त्यात शिक्षणतज्ञ, महिला, नागरी समाज, युवावर्ग, व्य़ावसायिक, आपले संसद सदस्य आणि नागरी प्रशासन यांच्याशी जोडलेल्या लोकांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. याच्यासशी संबंधित जे आयोजन केले जात आहेत, त्यात कोणत्या ना कोँणत्या स्वरूपात जवळपास दीडकोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. लोकसहभागाच्या आपल्या या प्रयत्नात एक नाही तर दोन दोन जागतिक विक्रम स्थापित झाले आहेत. वाराणसीत झालेल्याजी २० प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ८०० शाळांच्या सव्वालाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हा विश्वविक्रम होता. तिथंच लंबानी कारागिरांनी कमाल केली. 450 कारागिरांनी 1800 अभूतपूर्व पॅचेसचं आश्चर्यजनक संकलन करून आपल्या कौशल्याचा आणि कलाकुसरीचा परिचय करून दिला. जी २० मध्ये आलेले सर्व प्रतिनिधी आपल्या कारागिरीतील वैविध्य पाहून आश्चर्यचकित झाले. असाच एक शानदारकार्यक्रम सुरत येथे आयोजित करण्यात आला. साडी वॉकॅथॉनमध्ये १५ शहरांतील १५००० महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे सुरतच्या वस्त्रोदयोगाला चालना तर मिळालीच, पण व्होकल फॉर लोकललाही बळ मिळालं आणि लोकलसाठी ग्लोबल होण्याचाही मार्ग सापडला. जी २० ची बैठक श्रीनगरमध्ये झाल्यानंतर तेथील पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मी सर्वांना आवाहन करतो जी २० संमेलनाला यशस्वी करा, देशाचा मान वाढवा.
माझ्या परिवारातील सदस्यांनो, मन की बातच्या भागांमध्ये आपण नेहमीच आपल्या युवा पिढीच्या सामर्थ्याची चर्चा करत असतो. आज क्रीडा क्षेत्र असं आहे की ज्य़ात आपले युवक खेळाडू निरंतर नवीन यश मिळवत आहेत.
आज मन ती बात मध्य़े अशा एका क्रीडास्पर्धेची चर्चा करू या की ज्यात आपल्या खेळाडूंनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विश्व विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली. आपल्या खेळाडूंनी एकूण २६ पदकं जिंकली ज्यात ११ सुवर्ण पदकं होती. आपल्याला हे जाणून चांगलं वाटेल की १९५९ पासून आतापर्यंत जितके विश्व विद्यापीठ स्पर्धा झाल्या आहेत, त्यात आतापर्यंत जिंकलेल्या सर्व पदकांची संख्या मोजली तर ती १८ च होते. इतक्या दशकांत केवळ १८ पदकं तर आता यावेळी देशानं २६ पदकं जिंकली आहेत. म्हणून विश्वविद्यापीठ स्पर्धेत पदकं जिंकलेले काही खेळाडू,विद्यार्र्थी माझ्याशी फोन लाईनवर आहेत. सर्वात प्रथम आपल्याला सांगतो की उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रगतीने तिरंदाजीत पदक जिंकलं आहे. आसामचा रहिवासी असेलेल्या अम्लाननं अथलेटिक्समध्ये पदक जिंकलं आहे. उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रियांकानं रेसवॉकमध्ये पदक जिंकलं आहे. महाराष्ट्राची रहिवासी अभिज्ञानं नेमबाजीत पदक जिंकलं आहे.
पंतप्रधान मोदीः माझ्या प्रिय युवक खेळाडूंनो नमस्कार.
युवक खेळाडू: नमस्कार. सर.
मोदी जीः मला तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटत आहे. आपण भारताचं नाव जगात चमकवलं आहे, म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. आपण विश्वविद्यापीठ स्पर्धेत आपल्या कामगिरीनं प्रत्येक देशवासियांचीं मान अभिनामानाननं ताठ केली आहे. तर मी आपल्याला सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो.
प्रगती, मी या चर्चेची सुरूवात तुझ्यापासून करतो. दोनपदकं जिंकल्यानंतर आपण इथून गेलात तेव्हा याबाबत विचार केला होता काय़.. आणि इतका मोठा विजय संपादन केला तर आता काय वाटतं आहे...
प्रगतीः सर मला खूप अभिमान वाटत होता. मी माझ्य़ा देशाचा झेंडा इतका उंच फडकवून आले आहे, यामुळे मला खूप छान वाटत होतं. सुवर्ण पदकासाठीच्या लढाईत आम्ही हरलो तेव्हा मला खूप खेद वाटत होता. आता काही झालं तरीही आम्ही लढत गमावणार नव्हतो. हेच आमच्या मनात होतं. दुसर्या वेळेला हेच मनात होतं की काहीही झालं तरीही या झेंड्याला आता खाली जाऊ द्यायचं नाहीये. दरवर्षी आम्हाला सर्वाच उंचावर झेंड़ा फडकवूनच यायचं आहे. जेव्हा आम्ही शेवटच्या लढाईत जिंकलो तेव्हाच आम्ही तेथेच विजय साजरा करून आलो होतो. तो क्षण खूपच छान होता. इतकाअभिमान वाटत होता की त्याचा काही हिशोबच नाही.
मोदी जीः प्रगती आपल्याला तर खूप शारीरिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातून आपण मात करून वर आला आहात.
प्रगती : सर, मे २०२२ ला मला ब्रेन हमरेज झाला होता, मी व्हेनटीलेटर वर होते, मी वाचेन कि नाही याची काही शाश्वती नव्हती. पण इतक होत कि, मला पुन्हा मैदानावर जाऊन उभ राहायचं आहे याची आतून हिम्मत होती. मला वाचवण्यात सर्वात मोठा हात परमेश्वराचा आहे आणि त्यानंतर डॉक्टरांचा आहे आणि नंतर तिरंदाजीचा आहे.
मोदी : आपल्या बरोबर आमलान सुद्धा आहे. आमलान हे सांगा कि, अथलेटिक्समध्ये आपल्याला इतकी आवड कशी निर्माण झाली आणि आपण ती विकसित कशी केली.
आमलान: जी नमस्कार सर,
मोदी: नमस्कार नमस्कार
आमलान : सर,अथलेटिक्सममध्ये पहिल्यांदा इतकी आवड नव्हती. प्रथम मी फुटबॉल मध्ये जास्त रसघेत होतो. पण माझ्या भावाचा एक मित्र आहे त्याने मला सांगितले कि तुला अथलेटिक्सस्पर्धेत गेल पाहिजे, तर मी विचार केला ठीक आहे. राज्य स्पर्धा खेळलो, तिथे हरलो. पण मला पराभव चांगला वाटला नाही , अस करत करत मी अथलेटिक्समध्ये आलो. हळू हळू त्यातही मला आनद वाटू लागला, माझी आवड वाढली.
मोदी: आमलान जरा सांगा कि तुम्ही सराव कुठे केलात?
आमलान : जास्तीतजास्त सराव मी हैद्राबाद ला केला आहे. साई रेड्डी सरांच्या मार्ग्द्शानाखाली, त्यानंतर आम्ही भुवनेश्वरला स्तलांत्रित झालो. नंतर माझी व्यावसायिक सुरवात झाली.
मोदी: आपल्या बरोबर प्रियांका सुद्धा आहे, प्रियांका आपण वीस किलोमीटर रेसावाक संघाचा भाग होतात, सारा देश आपल्याला आज ऐकतो आहे. या क्रीडा प्रकाराबद्दल लोक आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितात. आम्हाला हे सांगा कि, या खेळासाठी कोणत्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असत. आणि आपली कारकीर्द कुठून कुठे पोहचली आहे .
प्रियांका : माझा खेळ खूप अवघड आहे, कारण आमचे पाच परीक्षक उभे असतात , आम्ही पळालो तरीही ते आम्हाला काढून टाकतील, आम्ही गुढघा वाकवला तरी आम्हाला ते काढतील, मला तर वार्निंग आली होती. त्यानंतर मी माझ्या वेगाला इतक नियंत्रित केल कि मी ठरवले मला किमान इथून पदक तर जिंकायचं आहे कारण देशासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला इथून रिक्त हस्ते जायचं नाही.
मोदी: जी पिताजी आणि भाऊ सर्व ठीक आहेत ना ?
प्रियांका : जी सर, सर्व छान आहेत, मी तर सर्वाना सांगते आपण इतक सर्वांना प्रेरित करता आम्हाला इतक छान वाटत. विश्व विद्यापीठ क्रीडाना देशात इतक कोणी महत्व देत नाही. पण इतका पाठींबा मिळत असेल अगदी ऑलिंपिकप्रमाणे, प्रत्येक जण ट्विट करत आहे, आम्ही इतकी पदकं जिंकली आहेत. याला पण इतकी चालना मिळत आहे.
मोदी जीः प्रियंका, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण इतकं नाव झळकवलं आहे. या आता अभिज्ञाशी आपण चर्चा करू या.
मोदी जीः अभिज्ञा, सांगा आपल्याबद्दल.
अभिज्ञाः सर मूळची कोल्हापूर, महाराष्ट्राची आहे. नेमबाजीत २५ मीटर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल दोन्ही क्रीडाप्रकारात भाग घेत असते. माझे आईवडील शाळेत शिक्षक आहेत. मी २०१५ मध्ये नेमबाजीची सुरूवात केली आणि तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी दीड तास लागत असे. दीड तास परत येण्यासाठी आणि सराव चार तासाचा. सहा तास तर येण्याजाण्यात जायचे आणि माझी शाळाही बुडत होती. नंतर ममी पपा मला म्हणाले की आम्ही तुला शनिवारी रविवारी शुटिंगसाठी घेऊन जात जाऊ. उरलेल्या वेळात दुसरे खेळ करत जा. ममी पापा यांना खेळात खूप रस होता. पण ते काही करू शकले नाहीत. आर्थिक पाठिंबाही तितकासा नव्हता. तितकी माहिती ही नव्हती. माझ्या आईचं एक स्वप्न होत मी देशाच प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि मग देशासाठी पदकंही जिंकली पाहिजेत तर मी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले. मी ब्लॅकबेल्ट आहे. मुष्टीयुद्ध आणि जुडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळातही भाग घेऊन 2015 मध्ये नेमबाजीत आले. दोन तीन वर्षे मी खूप संघर्ष केला आणि मलेशियात माझी निवड झाली, मला तिथे कांस्य पदक मिळाले. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळालं. माझ्या शाळेने माझ्यासाठी एक शुटींग रेंज बनवली . नंतर शाळेने मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. मी आता गगन नारंग प्रतिष्ठान मध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला.
मोदीजी : बरं, तुम्हा चौघांनाही मला काही सांगायचं असेल तर मला ऐकायला आवडेल. प्रगती आहे, अम्लान आहे, प्रियांका आहे, अभिज्ञा आहे, तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडलेले आहात, त्यामुळे तुम्हाला काही सांगायचे असेल तर मी नक्की ऐकेन.
अम्लान : सर, मला एक प्रश्न आहे सर.
मोदीजी : होय.
अम्लान : सर तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो?
मोदीजी : भारताने क्रीडा क्षेत्रात खूप चमकले पाहिजे आणि त्यामुळे मी या गोष्टींचा भरपूर प्रचार करत आहे, पण हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे खेळ आपल्या मातीशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यात तर आपण कधीही मागे राहता कामा नये. आणि मी पाहतोय की तिरंदाजी मध्ये, नेमबाजी मध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आणि दुसरं मी पाहतो आहे ते म्हणजे आमच्या तरुणपणात आणि कुटुंबातही खेळाबद्दलची भावना पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी मुलं खेळायला जायची तर घराचे लोक त्यांना अडवायचे. पण आता काळ खूप बदलला आहे आणि तुम्ही सगळे जे यश मिळवून आणत आहात, त्यामुळे सर्व परिवारांना प्रोत्साहन मिळते आहे. प्रत्येक खेळात आज आपली मुले कुठे कुठे जातात, देशासाठी काही न काही करून येतात. आणि ह्या बातम्या आज देशभरात ठळकपणे दाखवल्या जातात, सांगितल्या जातात आणि शाळा, महाविद्यालये ह्यातून ह्या बातम्यांविषयी चर्चा होत राहते. चला. तुमच्याशी बोलून मला खूप चांगले वाटले. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा.
युवा खेळाडू : खूप खूप धन्यवाद! धन्यवाद साहेब! धन्यवाद
मोदीजी : धन्यवाद! नमस्कार |
माझ्या कुटुंबियांनो, यावेळी 15 ऑगस्टला देशाने 'सबका प्रयास’ - सर्वांचे प्रयत्न ह्यातील सामर्थ्य पाहिले. सर्व देशवासीयांच्या प्रयत्नाने 'हर घर तिरंगा अभियान' प्रत्यक्षात 'हर मन तिरंगा अभियान' झाले. या मोहिमेदरम्यान अनेक विक्रमही झाले. देशवासीयांनी करोडोंच्या संख्येने तिरंगा खरेदी केला. सुमारे दीड लाख पोस्ट ऑफिसेस मधून दीड कोटी तिरंग्यांची विक्री झाली. ह्यातून आमचे कामगार, विणकर आणि विशेषतः महिलांनीही शेकडो कोटी रुपये कमावले आहेत.
यावेळी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट करण्याचा नवा विक्रम केला. गेल्या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सुमारे ५ कोटी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट केल्या. या वर्षी त्या संख्येने 10 कोटींचा टप्पाही पार केला आहे.
मित्रांनो, सध्या देशात 'मेरी माती, मेरा देश' - ‘ माझी माती - माझा देश - ही देशभक्तीच्या भावनांना उजाळा देण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून माती गोळा करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. देशातील पवित्र माती हजारो अमृत कलशांमध्ये जमा केली जाईल. ऑक्टोबर अखेरीस हजारोंच्या संख्येने अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्लीला पोहोचतील. या मातीतून दिल्लीत अमृतवाटिका बांधण्यात येईल. मला विश्वास वाटतो आहे की प्रत्येक देशवासीयाच्या प्रयत्नांनी ही मोहीमही यशस्वी होईल.
माझ्या कुटुंबियांनो, यावेळी मला अनेक पत्रे संस्कृत भाषेतील मिळाली आहेत. याचे कारण म्हणजे श्रावण पौर्णिमा या तिथीला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो.
सर्वेभ्य: विश्व-संस्कृत-दिवसस्य हार्द्य: शुभकामना: - सर्वांना जागतिक-संस्कृत-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. तिला अनेक आधुनिक भाषांची जननी देखील म्हटले जाते. संस्कृत भाषा आपल्या प्राचीनतेबरोबरच, भाषेची वैज्ञानिकता आणि व्याकरण ह्या साठी देखील प्रसिद्ध आहे.
भारताचे हजारो वर्षांचे प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेतच जतन केले गेले आहे. योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञानासारख्या विषयांवर संशोधन करणारे लोक आता जास्त करून संस्कृत शिकत आहेत. अनेक संस्थाही या दिशेने चांगले काम करत आहेत. जसे की संस्कृत प्रमोशन फाउंडेशन, योगासाठी संस्कृत, आयुर्वेदासाठी संस्कृत आणि बौद्ध धर्मासाठी संस्कृत ह्या सारखे अनेक पाठ्यक्रम - कोर्सेस करून घेतात. लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी 'संस्कृत भारती' मोहीम चालवते. यामध्ये आपल्याला 10 दिवसांच्या 'संस्कृत संभाषण शिबिरात सहभागी होता येईल. मला आनंद वाटतो आहे की आज लोकांमध्ये संस्कृत विषयी जागरूकता आणि अभिमानाची भावना वाढली आहे. ह्याच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांतील देशाच्या विशेष योगदानाचाही मोठा सहभाग आहे. जसे की तीन संस्कृत डीम्ड विद्यापीठांना 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठे करण्यात आली. वेग- वेगळ्या शहरांमध्ये संस्कृत विद्यापीठांची अनेक महाविद्यालये आणि संस्थादेखील चालू आहेत. आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमध्ये संस्कृत केंद्रे बरीच लोकप्रिय होत आहेत.
मित्रांनो, अनेकदा तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल, आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली माध्यम म्हणजे आपली मातृभाषा. जेव्हा आपण आपल्या
मातृभाषेशी जोडले जातो तेव्हा साहजिकच आपण आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, आपल्या संस्कारांशी जोडले जातो, आपल्या परंपरांशी जोडले जातो. आपल्या चिरंतन प्राचीन भव्य वैभवाशी जोडले जातो.
अशीच भारतातील आणखी एक मातृभाषा आहे, तेलुगू भाषा. 29 ऑगस्ट हा दिवस तेलुगु दिवस म्हणून साजरा केला जातो.
अन्दरिकी तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलु | तेलुगु दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
तेलुगू भाषेच्या साहित्यात आणि परंपरेत भारतीय संस्कृतीची अनेक मौल्यवान रत्ने दडलेली आहेत. तेलुगूच्या या वारशाचा लाभ संपूर्ण देशाला मिळावा यासाठी, अनेक प्रयत्नही केले जात आहेत.
माझ्या कुटुंबियांनो, 'मन की बात'च्या अनेक भागांमध्ये आपण पर्यटनाबद्दल बोललो आहोत. काही गोष्टी किंवा ठिकाणे स्वतः प्रत्यक्ष पाहणे, समजून घेणे आणि काही काळ तिथे घालवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. समुद्राचे कोणी कितीही वर्णन केले तरी समुद्र पाहिल्याशिवाय त्याची विशालता जाणवू शकत नाही. हिमालयाचे कोणी कितीही गुणगान करू दे, आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याचे सौंदर्य समजू शकत नाही. म्हणूनच मी नेहमी सर्वांना विनंती करतो की, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या देशातील सौंदर्य आणि विविधता पाहण्यासाठी अवश्य भेट दिलीच पाहिजे.
अनेकदा आपण आणखी एक गोष्ट पाहतो की आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन येतो पण आपल्या स्वतःच्या शहर किंवा राज्यातील अनेक उत्तमोत्तम ठिकाणांविषयी आणि गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो.
अनेक वेळा असे घडते की लोकांना त्यांच्याच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जास्त माहिती नसते. असेच काहीसे धनपालजींच्या सोबत झाले. धनपाल जी, बेंगळुरूमधील परिवहन कार्यालयात चालक म्हणून काम करायचे. सुमारे 17 वर्षांपूर्वी त्यांना साईटसीइंग विंग- स्थलदर्शन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यालाच आता सर्वजण बंगलोर दर्शनी या नावाने ओळखतात. धनपाल जी पर्यटकांना शहरातील विविध पर्यटनस्थळी घेऊन जायचे. अशाच एका सहलीच्या वेळी एका पर्यटकाने त्यांना विचारले की बंगळुरूमध्ये टाकीला सेनकी टाकी का म्हणतात? आपल्याला ह्याप्रश्नाचे उत्तर माहित नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मग असेच त्यांनी स्वतःचे ज्ञान वाढवण्यावर भर दिला. आपला वारसा जाणून घेण्याच्या वेडापायी त्यांना अनेक दगड आणि शिलालेख सापडले. धनपाल जींचे मन या कामात इतके रमले - इतके रमले की त्यांनी एपिग्राफी मध्ये म्हणजेच शिला लेखांशी संबंधित विषयांत डिप्लोमादेखील केला. जरी ते आता निवृत्त झाले असले तरीपण इतिहास शोधण्याचा त्यांचा छंद आजही अबाधित आहे.
मित्रांनो, मला ब्रायन डी. खारप्राण ह्याच्या विषयी सांगताना अत्यंत आनंद होत आहे. ते मेघालय इथले निवासी आहेत आणि त्यांना Speleology (स्पेलियो-लॉजी) मध्ये खूप रस आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याचा अर्थ आहे - गुहांचा अभ्यास. काही वर्षांपूर्वी ही आवड तेव्हा प्रथम निर्माण झाली जेव्हा त्यांनी अनेक कथांची पुस्तके वाचली. 1964 मध्ये त्यांनी शाळकरी मुलगा म्हणून आपली पहिली शोध मोहीम केली. 1990 मध्ये तो त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून एक संघटना स्थापन केली आणि त्याद्वारे मेघालयमधील अज्ञात गुहांची माहिती शोधू लागले. पाहता पाहता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सोबत मेघालयातील 1700 हून अधिक गुंफा शोधल्या आणि मेघालय राज्याला जागतिक गुहा नकाशावर नेऊन ठेवले.
भारतातील काही सर्वात लांब आणि खोल गुहा मेघालयात आहेत. ब्रायन जी आणि त्यांच्या टीमने cave fauna म्हणजेच गुहांमधील अशा जीवसृष्टीचे दस्तऐवजीकरण केले आहे, जे इतरत्र जगात कोठेही आढळत नाहीत. या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्या सोबतच मी आपणा सर्वांना मेघालयच्या लेण्यांना भेट देण्याची विनंती करतो.
माझ्या कुटुंबियानो, तुम्हा सर्वांना माहिती आहेच की डेअरी क्षेत्र, आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. आपल्या माता आणि बहिणींच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यात तर ह्या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी मला गुजरातच्या बनास डेअरीच्या एका विशेष उपक्रमा विषयी माहिती मिळाली. बनास डेअरी, आशियातील सर्वात मोठी डेअरी मानली जाते. येथे सरासरी दररोज 75 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. या नंतर ते इतर राज्यांत देखील पाठवले जाते. इतर राज्यांमध्ये दूध वेळेवर पोचावे म्हणून, आतापर्यंत टँकर किंवा दुधाच्या गाड्यांची - मिल्क ट्रेन्स ची मदत घेतली जायची.पण ह्यांत देखील आव्हाने काही कमी नव्हती. एक म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगला खूप वेळ लागायचा.त्यात अनेक वेळा दूध खराबही व्हायचे. ह्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवा प्रयोग केला. रेल्वेने पालनपूर ते नवीन रेवाडीपर्यंत ट्रक-ऑन-ट्रॅक ही सुविधा सुरू केली. यामध्ये दुधाचे ट्रक थेट रेल्वेवर चढवले जातात. म्हणजेच त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे. ट्रक ऑन ट्रॅक सुविधेचे परिणाम अतिशय समाधानकारक आहेत. पूर्वी दूध पोहोचायला जे 30 तास लागायचे ते आता निम्म्याहून कमी वेळात पोहोचत आहे. यामुळे एकीकडे इंधनामुळे होणारे प्रदूषण थांबले आहेच, तर दुसरीकडे इंधन खर्चातही बचत होत आहे. याचा मोठा फायदा ट्रक चालकांना होत आहे. त्यांचे जीवन सोपे झाले आहे.
मित्रांनो, सामूहिक प्रयत्नांमुळे आज आपल्या दुग्धशाळाही आधुनिक विचार करून पुढे जात आहेत. बनास डेअरीने पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने कसे एक पाऊल पुढे टाकले आहे ते सीडबॉल वृक्षारोपण अभियानातून कळून येते. वाराणसी मिल्क युनिअन - वाराणसी दूध संघ आपल्या डेअरी- (दुग्ध उत्पादक ) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खत व्यवस्थापनावर काम करते आहे. केरळच्या मलबार दूध संघ डेअरीचा प्रयत्नही अद्वितीय आहे. प्राण्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे विकसित करण्यात ते मग्न आहेत.
मित्रांनो, आज अनेक लोक दुग्धव्यवसायाचा अवलंब करून त्यात विविधता आणत आहेत. राजस्थानमधील कोटा येथे डेअरी फार्म चालवत असलेल्या अमनप्रीत सिंगबद्दल तर तुम्ही अवश्य जाणून घ्यायला हवे. त्यांनी दुग्धव्यवसाया बरोबरच बायोगॅसवरही लक्ष केंद्रित करून दोन बायोगॅस प्रकल्प उभारले. त्यामुळे त्यांचा विजेवरील खर्च सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांचा हा प्रयत्न देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. आज अनेक मोठ्या डेअरीज बायोगॅसवर भर देत आहेत. या प्रकारचे समुदाय चालित मूल्यवर्धनाचे प्रकल्प अतिशय उत्साहवर्धक आहेत. मला विश्वास वाटतो की असे प्रकल्प देशभर नेहमी चालू राहतील.
माझ्या कुटुंबियांनो, आज मन की बातमध्ये एवढेच. आता सणांचा मौसमही आला आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अग्रीम हार्दिक शुभेच्छा. उत्सव साजरा करताना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. 'आत्मनिर्भर भारत' अभियान ही प्रत्येक देशवासियाची स्वतःची मोहीम आहे. आणि जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा तर आपण आपली श्रद्धास्थानं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. पण कायमही स्वच्छ ठेवला पाहिजे. पुढच्या वेळी पुन्हा तुमच्यासोबत मन की बात होईल, काही नवीन विषय घेऊन भेटेन. आपल्या देशवासीयांच्या काही नवीन प्रयत्नांबद्दल, त्यांच्या यशाबद्दल तपशीलवार चर्चा केली जाईल. मग तो पर्यंत निरोप द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.
मित्रांनो, पावसाळ्याचा हा काळ ‘वृक्षारोपण आणि ‘जलसंरक्षण’ यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’च्या दरम्यान निर्माण झालेले 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांच्या परिसराची चमकदमक वाढली आहे. 50 हजाराहून अधिक अमृत सरोवरांच्या निर्मितीचे काम सुद्धा सुरु आहे. आपले देशवासीय संपूर्ण जागरुकता आणि जबाबदारीने जल संरक्षणा’साठी नवनवे प्रयत्न करत आहेत. तुमच्या लक्षात असेल, काही काळापूर्वी मी मध्यप्रदेशात शहडोल येथे गेलो होतो. तिथे माझी भेट पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींशी झाली.तिथेच माझी त्यांच्याशी निसर्ग आणि पाणी वाचवण्याबद्दल देखील चर्चा झाली. मला आत्ताच समजले आहे की पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींनी या संदर्भात काम सूरू देखील केले आहे. तेथे, प्रशासनाच्या मदतीने लोकांनी सुमारे शंभर विहिरींचे जल पुनर्भरण यंत्रणेत रुपांतर केले. पावसाचे पाणी आता या विहिरींमध्ये पडते, विहिरींतील पाणी जमिनीच्या आत शिरते. यामुळे त्याभागातील भूजल स्तर देखील हळूहळू सुधारत जाईल. आता सगळ्या गावकऱ्यांनी त्या भागातील सुमारे 800 विहिरींना पुनर्भरण करण्यासाठी वापरण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अशीच एक उत्साहवर्धक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. काही दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशात, एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यात आला. या अभियानाची सुरुवात राज्य सरकारने केली, आणि हे कार्य तेथील लोकांनी पूर्ण केले. असे उपक्रम म्हणजे लोकसहभागासह जनजागृतीची देखील उत्तम उदाहरणे आहेत.आपण सर्वांनीच झाडे लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नांचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. सदाशिव महादेवाच्या आराधनेसोबतच श्रावण महिना हिरवाई आणि आनंदाशी संबंधित असतो. म्हणूनच श्रावणाच्या अध्यात्मिक दृष्टीकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टीकोनाचे देखील महत्त्व मोठे आहे. श्रावणातील झोपाळे, श्रावणातील मेंदी, श्रावणाचे उत्सव – म्हणजेच श्रावणाचा अर्थच आनंद आणि उत्साह असा होतो.
मित्रांनो, आपला हा विश्वास आणि या परंपरांची आणखी एक बाजू देखील आहे. आपले हे सण आणि परंपरा आपल्याला गतिमानता देतात. श्रावणात शंकराच्या आराधनेसाठी कितीतरी भक्त कावड यात्रेला जातात. ‘श्रावणा’मुळे या काळात 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जात आहेत. वाराणसीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले हे ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. आता काशीला प्रत्येक वर्षी 10 कोटींहून अधिक पर्यटक पोहोचत आहेत. अयोध्या, मथुरा, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे, त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. हे सगळं, आपल्या सांस्कृतिक जन जागृतीचा परिणाम आहे.आपली तिर्थस्थळे पाहण्यासाठी आता संपूर्ण जगातून लोक भारतत येत आहे.मला अशाच दोन अमेरिकन मित्रांची माहिती मिळाली आहे. ते दोघे कॅलिफोर्नियाहून अमरनाथ यात्रा करण्यासाठी इथे आले होते. या विदेशी पाहुण्यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांबद्दल काहीतरी ऐकले होते. त्यामुळे ते इतके प्रेरित झाले की स्वतःच अमरनाथ यात्रा करण्यासाठी भारतात आले. ते या सगळ्याला महादेवाचा आशीर्वाद मानतात. हीच तर भारताची खासियत आहे की हा देश सर्वांचा स्वीकार करतो, सर्वांना काहीनाकाही देतो.अशीच एक फ्रेंच वंशाची स्त्री आहे, शार्लोट शोपा.काही दिवसांपूर्वी मी जेव्हा फ्रान्सला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. शार्लोट शोपा एक योग अभ्यासक आहेत, योग शिक्षक आहेत आणि त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांनी शंभरी पार केली आहे.गेल्या 40 वर्षांपासून त्या योग्याभ्यास करत आहेत. स्वतःची तंदुरुस्ती आणि शंभर वर्षांच्या या वयाचे श्रेय त्या योगालाच देतात. त्या जगात भारताचे योग विज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचा एक प्रमुख चेहेरा झाल्या आहेत. प्रत्येकाने त्यांच्याकडे बघून शिकले पाहिजे. आपण आपल्या वारशाचा स्वीकार करायला हवा, इतकेच नव्हे तर जबाबदारीने हा वारसा जगासमोर मांडायला हवा. सध्या असाच एक प्रयत्न उज्जैनमध्ये सुरु आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. तिथे देशभरातील 18 चित्रकार, पुराणांतील गोष्टींवर आधारित आकर्षक चित्रकथा तयार करत आहेत. ही चित्रे, बुंदी शैली, नाथद्वारा शैली, पहाडी शैली तसेच अपभ्रंश शैली अशा काही विशिष्ट शैलींच्या वापरासह तयार करण्यात येतील. या चित्रकथा उज्जैनच्या त्रिवेणी संग्रहालयात मांडणार आहेत. म्हणजेच काही काळानंतर जेव्हा कधी तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा महाकाल महालोक भगवानासोबत आणखी एका दिव्य स्थानाचे दर्शन तुम्ही घेऊ शकाल.
मित्रांनो, उज्जैन येथे तयार होत असलेल्या या चित्रांबाबत बोलताना मला दुसरे एक अनोखे चित्र आठवले. राजकोट येथील प्रभात सिंग मोडभाई या कलाकाराने हे चित्र तयार केले. ते चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारलेले होते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता ‘तुळजा माते’चे दर्शन घेण्यासाठी जात असताना आजूबाजूचे वातावरण कसे होते याचे चित्रण कलाकार प्रभात भाई यांनी त्यांच्या चित्रात केले होते. आपल्या परंपरा, आपला वारसा यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना सजवावे लागते, त्यात जगावे लागते, पुढच्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात.या दिशेने आज अनेक प्रयत्न होत आहेत हे पाहून मला आनंद होतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेकदा जेव्हा आपण, इकोलॉजी, फ्लोरा,फौना,बायोडायव्हर्सिटी असे शब्द ऐकतो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते काही वेगळे विषय आहेत, यांच्याशी संबंधित तज्ञांचे विषय आहेत, मात्र असे नाही आहे. कारण आपण खरोखरीच निसर्गावर प्रेम करत असू तर आपण आपल्या लहान लहान प्रयत्नांतून सुद्धा खूप काही साध्य करू शकतो. तामिळनाडूमधील वाडावल्ली येथील एक स्नेही आहेत, सुरेश राघवनजी. राघवन यांना चित्रकलेचा छंद आहे. तुम्हाला तर माहित आहेच की चित्रकला कॅनव्हासशी संबंधित काम आहे.पण राघवनजी यांनी ठरवले की ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून झाडे-झुडुपे आणि जीवजंतूंच्या माहितीचे जतन करतील. ते विविध फ्लोरा आणि फौना यांची चित्रे काढून त्यांच्याशी संबंधित माहितीचे संकलन करुन ठेवतात.आतापर्यंत त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा शेकडो पक्षी, प्राणी, ऑर्किड्स यांची चित्रे काढली आहेत. कलेच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करण्याचे हे उदाहरण खरोखरीच अद्भुत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,मी आज तुम्हांला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी, समाज माध्यमांवर एक अद्भुत पद्धतदिसली. अमेरिकेने आपल्याला शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. ही बातमी समजल्यानंतर समाज माध्यमांवर या कलाकृतींच्या बाबतीत खूप चर्चा झाली. तरुणांमध्ये आपल्या वारशाबाबत अभिमानाची भावना दिसून आली. भारतात परत आलेल्या या मुर्त्या अडीच हजारांपासून अडीचशे वर्ष जुन्या आहेत. या दुर्मिळ वस्तूंचे नाते देशाच्या विविध क्षेत्रांशी आहे. या वस्तू टेराकोटा, दगड, धातू आणि लाकूड यांच्यापासून बनवलेल्या आहेत. यापैकी काही वस्तू अशा आहेत ज्या पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल. तुम्ही या वस्तू बघाल तर बघतच राहाल.यामध्ये 11 व्या शतकातील एक अत्यंत देखणी वालुकाश्म शिल्पकृती सुद्धा आहे. हे शिल्प म्हणजे नृत्य मुद्रेतील एक अप्सरा आहे आणि याचे नाते मध्य प्रदेशाशी आहे. यामध्ये चोल युगातील अनेक मुर्त्या देखील आहेत. देवी आणि भगवान मुरुगन यांच्या प्रतिमा तर 12 व्या शतकातील आहेत आणि त्या तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीशी संबंधित आहेत. गणपतीची सुमारे हजार वर्ष जुनी काशाची मूर्ती देखील भारताला परत करण्यात आली आहे.ललितासनात नंदीवर बसलेल्या उमा-महेश्वर यांची मूर्ती 11 व्या शतकातील आहे असे म्हणतात.दगडात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या दोन मूर्ती देखील भारतात परत आल्या आहेत. सूर्य देवांच्या दोन मूर्ती तुमचे मन मोहून टाकतील. यातील एक मूर्ती वालुकाश्मापासून बनलेली आहे. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लाकडापासून बनवलेला एक तक्ता आहे ज्यावर समुद्रमंथनाची कथा रेखाटली आहे. 16 -17 व्या शतकातील या वस्तूचा सबंध दक्षिण भारताशी आहे.
मित्रांनो, मी इथे अगदी कमीच नावे घेतली आहेत, तसे बघायला गेले तर ही यादी बरीच मोठी आहे. भारताचा अनमोल वारसा आपल्याला परत करणाऱ्या अमेरिकी सरकारचे मी आभार व्यक्त करु इच्छितो. 2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला भेट दिली तेव्हा देखील अनेक कलाकृती भारताला परत करण्यात आल्या होत्या. अशा प्रयत्नांमुळे, आपल्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंच्या चोरीसंदर्भात देशभरात जागरुकता निर्माण होईल. तसेच देशवासियांची आपल्या समृध्द वारशाप्रती ओढदेखील आणखी वाढेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, देवभूमी उत्तराखंडमधील काही माता आणि भगिनींनी मला जी पत्रे लिहिलीं आहेत ती मनाला भावूक करणारी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला, स्वतःच्या भावाला अनेकानेक आशीर्वाद दिले आहेत. त्या लिहितात- त्यांनी कधी असा विचार देखील केला नव्हता की आपला सांस्कृतिक वारसा असलेले ‘भोजपत्र’ त्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते. तुम्ही विचार करत असाल की हे संपूर्ण बाब आहे तरी काय?
मित्रांनो, मला हीपत्रे लिहिली आहेत, चमोली जिल्ह्यातील नीती-माणा भागातील महिलांनी. या त्याच महिला आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मला भोजपत्रावर एक अनोखी कलाकृती काढून पाठवली होती. हा उपहार मिळाल्यावर मी खूप भारावून गेलो. कारण, आपल्याकडे प्राचीन काळापासून आपली शास्त्रे आणि ग्रंथ अशाच भोजपत्रांवर जतन करून ठेवली जात आहेत. महाभारत देखील अशाच भोजपत्रांवर लिहिण्यात आले होते.
आज देवभूमीतील या महिला, भोजपत्रापासून अतिशय सुंदर सुंदर कलाकृती आणि स्मृतिचिन्हे तयार करत आहेत. माझ्या प्रवासात, माणा गावाला जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे मी कौतुक केले होते. मी देवभूमीला येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त स्थानिक उत्पादने खरेदी करा. त्याचा तेथे खूप चांगला परिणाम झाला आहे.
आज येथे येणाऱ्या प्रवाशांना भोजपत्राची उत्पादने खूप आवडत आहेत आणि ते ती चांगल्या किमतीला विकतही घेत आहेत. उत्तराखंडचा हा भोजपत्रांचा प्राचीन वारसा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे नवनवे रंग भरतो आहे.मला हे जाणून आनंद झाला की राज्य सरकार भोजपत्रापासून नवीन उत्पादने बनवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देत आहे. भोजपत्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी देखील राज्य सरकारने एक मोहीम सुरु केली आहे. एकेकाळी देशाचे शेवटचे टोक मानले गेलेले क्षेत्र, आता देशातील पहिले गाव मानून, त्याचा विकास होत आहे. आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासोबतच ते आर्थिक प्रगतीचे साधनही बनत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये मला अनेक अशी पत्रेही मिळाली आहेत, जी मनाला खूप समाधान देतात.
नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लिम महिलांनी ही पत्रे लिहिली आहेत.त्यांचा हा प्रवास अनेक अर्थाने विशेष आहे.या अशा महिला आहेत ज्यांनी कोणत्याही पुरुष सोबत्याशिवाय किंवा मेहरमशिवाय हजयात्रा केलीआणि ही संख्या पन्नास शंभर नाही तर 4 हजारांपेक्षाही जास्त आहे. हा एक मोठा बदल आहे. पूर्वी , मुस्लिम महिलांना मेहरमशिवाय 'हज' करण्याची परवानगी नव्हती. मी, 'मन की बात'च्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या सरकारचेही मनःपूर्वक आभार मानतो. मेहरमशिवाय हजला जाणाऱ्याया महिलांसाठी, खास महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती.
मित्रांनो, गेल्या काही वर्षात हज धोरणात जे बदल केले गेले आहेत, त्यांचे खूप कौतुक होत आहे. आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींनी मला याबद्दल खूप लिहिले आहे. आता, अधिकाधिक लोकांना 'हज'ला जाण्याची संधी मिळत आहे. 'हज यात्रा' करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी विशेषतः आमच्या माता-भगिनींनी पत्रे लिहून जे आशीर्वाद दिले आहेत, ते खूपच प्रेरणादायी आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जम्मू-काश्मीरमधील संगीत संध्या असेल, उंच भागातील बाइक रॅली/ मोटारसायकल प्रवास असेल, चंदीगडमधील स्थानिक क्लब/ मंडळे असतील किंवा पंजाबमधील क्रीडाक्षेत्रातील अनेक गट असतील, ह्यांचा उल्लेख केला की वाटते ही करमणुकीची चर्चा आहे, साहसाची चर्चा चालू आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. ही सगळी आयोजने एका समान उद्दिष्टाने केली गेलेली आहेत. हे समान कारण आहे - ड्रग्ज विरुद्ध/ अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती मोहीम.
जम्मू-काश्मीरच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत. तिथे संगीत संध्या ( म्युझिकल नाईट), मोटारसायकल प्रवास (बाईक रॅलीज) ह्या सारखे कार्यक्रम होत आहेत. चंदीगडमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी स्थानिक क्लब्सना/ मंडळांना त्याच्याशी जोडण्यात आले आहे. ते ह्याला VADA (वादा) क्लब/ मंडळ म्हणतात. VADA म्हणजे Victory Against Drugs Abuse.अंमली पदार्थांच्या गैरवापरावर विजय. पंजाब मध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत, जे फिटनेसवर/ तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नशेविरुद्धच्या ह्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहीमेला बळकटी मिळणार आहे.
आम्हांला देशाच्या भावी पिढ्यांना वाचवायचे असेल तर त्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. याच विचाराने 15 ऑगस्ट 2020 रोजी 'नशा मुक्त भारत अभियान' सुरू झाले. ह्या मोहीमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी भारताने अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा सुमारे दीड लाख किलोचा साठा जप्त करून नष्टही करण्यात आला. भारताने 10 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे. या औषधांची किंमत 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. मी त्या सर्वांचे कौतुक करू इच्छितो जे व्यसनमुक्तीच्या या उदात्त मोहिमेला हातभार लावत आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठीच मोठी समस्या आहे. त्यामुळेच अशा परिस्थितीत, हा धोका कायमचा संपवण्यासाठी, आपण सर्वांनी संघटित होऊन या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अंमली पदार्थ आणि तरुणाईच्या विषयी बोलत आहोत तर मला तुम्हाला मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगायचे आहे. हा प्रेरणादायी प्रवास आहे मिनी ब्राझीलचा. आता तुम्ही विचार करत असाल की मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आले? हीच तर गंमत आहे. मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचे एक गाव आहे. बिचरपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात. मिनी ब्राझील म्हणायचे कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनले आहे. काही आठवड्यांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो, तेव्हा असे अनेक फुटबॉल खेळाडू मला भेटले. मी विचार केला की देशवासीयांना आणि विशेषत: तरुण मित्रांना ह्या सर्व फुटबॉलपटूंच्या विषयी कळायला हवे.
मित्रांनो, साधारण दोन अडीच दशकांपूर्वी बिचारपूर गावाचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होते, नशेच्या आहारी गेले होते. ह्या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान येथील तरुणांचे होत होते. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली. रईसजींच्याकडे फारशी संसाधने नव्हती, परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. काही वर्षांतच इथे फुटबॉल इतके लोकप्रिय झाले की तीच बिचारपूर गावाची ओळख बनली. आता येथे फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून 40 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे.
शहडोल आणि त्याच्या आजूबाजूचा मोठ्या परिसरात 1200 हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत. येथून बरेच असे खेळाडू उदयास येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. अनेक माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक, आज, येथे, तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. जरा विचार करा, जे आदिवासी क्षेत्र बेकायदेशीर दारूसाठी कुप्रसिद्ध होते, व्यसनांसाठी कुप्रसिद्ध होते तेच आता देशाची फुटबॉल नर्सरी बनले आहे. म्हणूनच म्हणतात - जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. आवश्यकता आहे ती अशा प्रतिभावान मुलांना शोधण्याची आणि आकार देण्याची. मग नंतर हेच युवक देशाचे नाव मोठे करतात आणि देशाच्या विकासाला दिशा देतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने आपण सर्वजण ‘अमृत महोत्सव’ पूर्ण उत्साहात साजरा करत आहोत. 'अमृतमहोत्सवा'च्या निमित्ताने देशभरात सुमारे दोन लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम अनेक रंगानी सजले होते, वैविध्यपूर्ण होते. यामध्ये विक्रमी संख्येने तरुण सहभागी झाले होते हे देखील या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते, सौंदर्य होते. ह्या कार्यक्रमांच्या दरम्यान तरुणांना देशातील महान व्यक्तिमत्त्वांबद्दल खूप काही जाणून घेता आले. गेल्या काही महिन्यांबद्दलच बोलायचे झाले तर लोकसहभागातून साजरे झालेले अनेक चांगले कार्यक्रम बघायला मिळाले. असाच एक कार्यक्रम होता दिव्यांग लेखकांसाठी 'लेखक मेळाव्या'चे आयोजन. ह्या कार्यक्रमात विक्रमी संख्येने लोक सहभागी झाले होते. तर आंध्र प्रदेशात तिरुपती येथे 'राष्ट्रीय संस्कृत परिषद' आयोजित करण्यात आली होती. आपल्या इतिहासात किल्ल्यांचे किती महत्त्व होते ते तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. याचेच चित्रण करणारी एक मोहीम होती 'किल्ले आणि कथा' म्हणजे किल्ल्यांशी संबंधित कथा, ती लोकांना खूप आवडली.
मित्रांनो, आज जेव्हा देशभरात सगळीकडे'अमृत महोत्सव' साजरा होत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. 15 ऑगस्ट अगदी जवळ आला आहे, तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश’ - ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू होणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. ह्या विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या अभियानात देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ही काढण्यात येणार आहे. देशातील कानाकोपऱ्यातून, गावागावांतून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ही 'अमृत कलश' यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल. ही यात्रा आपल्या सोबत देशाच्या विविध भागातून रोपेही आणेल. 7500 कलशातून आलेली माती आणि ही रोपे मिळून, नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ 'अमृत वाटिका' निर्माण करण्यात येणार आहे. ही 'अमृत वाटिका', म्हणजे 'एक भारत श्रेष्ठ भारत’ ह्या अभियानाचे भव्य प्रतीक बनेल. मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील 25 वर्षांसाठी, अमृतकालसाठी 'पंच प्रणांबद्दल बोललो होतो. 'मेरी माती मेरा देश' मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे ‘पंच प्राण’ पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत. आपण सगळे, देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाचे सेल्फी काढा आणि yuva.gov.in वर अवश्य अपलोड करा.
गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी, 'हर घर तिरंगा अभियाना' च्या निमित्ताने जणू संपूर्ण देश एकत्र आला होता, त्याच पद्धतीने यावेळीही प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचे मूल्य कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने या प्रयत्नात अवश्य सहभागी झाले पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 'मन की बात'मध्ये इतकेच.
आता थोड्याच दिवसांनी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वात सामील होणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचे आहे, त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि 'मन की बात' हे देशवासियांच्या या मेहनतीला, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचेच एक माध्यम आहे.
भेटू या पुढच्या वेळी, काही नवीन विषयांसह. खूप खूप आभार, नमस्कार!
My dear countrymen, Namaskar. Once again a warm welcome to all of you in 'Mann Ki Baat'. Usually 'Mann Ki Baat' comes your way on the last Sunday of every month, but this time it is being held a week earlier. All of you know, I'll be in America next week and there the schedule is going to be pretty hectic, and hence I thought I'd talk to you before I go, what could be better than that! The blessings of the Janata-Janardan, the people, your inspiration, will also continue to enhance my energy.
Friends, many people say that as Prime Minister I did a certain good work, or some other great work. Many listeners of 'Mann Ki Baat' shower praises in their letters. Some say a particular task was performed; others refer to a job well done; some express that a certain work was much better; in fact very good at that! But when I see the efforts of the common man of India, the sheer hard work, the will power, I myself am moved. Be it the loftiest goal, be it the toughest challenge, the collective might of the people of India, the collective power, provides a solution to every challenge. Just two-three days ago, we saw how big a cyclone hit the western part of the country... Strong winds, heavy rain. Cyclone Biparjoy caused a lot of destruction in Kutch. But, the courage and preparedness with which the people of Kutch fought such a dangerous cyclone is equally unprecedented too. Just a couple of days later, the people of Kutch are also going to celebrate their new year, that is, Ashadhi Beej. It is also a coincidence that Ashadhi Beej is considered a symbol of the onset of rains in Kutch. I have been going to Kutch for many years... I have also had the good fortune to serve the people there... and thats how I know very well the zest and fortitude of the people of Kutch. Kutch, was once termed as never to be able to recover after the devastating earthquake two decades ago... Today, the same district is one of the fastest growing districts of the country. I am sure the people of Kutch will rapidly emerge from the devastation caused by Cyclone Biperjoy.
Friends, no one has any control over natural calamities, but, the strength of disaster management that India has developed over the years, is becoming an example today. There is a significant way to combat natural calamities –viz. conservation of nature. These days during monsoon, our responsibility in this direction increases manifold. That is why today the country is making collective efforts through campaigns like 'Catch the Rain'. Last month in 'Mann Ki Baat', we had discussed about start-ups associated with water conservation. This time too I have come to know through letters about many people who are trying their very best to save every drop of water. One such friend is Tulsiram Yadav ji of Banda district of UP. Tulsiram Yadav ji is the Pradhan of Luktara Gram Panchayat. You too know that there have always been hardships regarding water in Banda and Bundelkhand regions. To overcome this challenge, Tulsiram ji has built more than 40 ponds in the area, taking the people of the village along with him. Tulsiram ji has made the basis of his campaign – farm water in farms, village water in villages. Today, the result of his hard work is that the ground water level in his village is improving. Similarly in Hapur district in U.P., people collectively have revived an extinct river. A long time ago, there used to be a river here named Neem. As time went by, she disappeared, but was always remembered in local memories and folklore. Eventually, people decided to revive this natural heritage of theirs. On account of the collective efforts of the people, the Neem river has started flowing again. The point of origin of the river, the headwater is also being developed as an Amrit Sarovar.
Friends, these rivers, canals, lakes are not only water sources... life's myriad hues & emotions are also associated with them. A similar scene was observed in Maharashtra just a few days ago. This particular area mostly remains in the grip of drought. After waiting for five decades, the canal work of Nilwande Dam is now being completed here. A few days ago, water was released in the canal during testing. The pictures that came up during this time were really emotional. The people of the village were rejoicing as if it were the Holi-Diwali festival!
Friends, when it comes to management, I will also remember Chhatrapati Shivaji Maharaj today. Along with the bravery of Chhatrapati Shivaji Maharaj, there is a lot to learn from his governance and management skills. In particular, the work done by Chhatrapati Shivaji Maharaj regarding water management and navy, they raise the glory of Indian history even today. The Sea-forts built by him still stand proudly in the middle of the sea even after so many centuries. The beginning of this month itself marks the completion of 350 years of the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj. This occasion is being celebrated as a big festival. During this, grand programs related to it were organized in Raigad Fort in Maharashtra. I remember, many years ago in 2014, I had the good fortune to go to Raigad and pay obeisance to that holy land. It is the duty of all of us to know about the management skills of Chhatrapati Shivaji Maharaj on this occasion, learn from him. This will instill in us a sense of pride in our heritage, and will also inspire us to perform our duties in the future.
My dear countrymen, you must have heard about the tiny squirrel from the Ramayana, who came forward to help build the Ram Setu. What I mean to say is that when the intention is noble, there is honesty in the efforts, no goal remains insurmountable. Today, India too, with a noble intention, is facing a huge challenge. The challenge is– T.B., or tuberculosis. India has resolved to create a T.B. free India by 2025. The goal is certainly a lofty one. There was a time when, after coming to know about T.B., family members used to turn away, but today T.B. patients are being helped by making them family members. To eliminate tuberculosis from the root, Nikshay Mitras have taken the lead. A large number of varied social organizations have become Nikshay Mitra in the country. Thousands of people in villages & Panchayats have come forward themselves and adopted T.B. patients. There are many children who have come forward to help TB patients. This public participation is the biggest strength of this campaign. It is due to this participation, that today, more than 10 lakh TB patients in the country have been adopted... and this is a noble deed on the part of close to 85 thousand Nikshay Mitras. I am happy that many sarpanchs of the country, even the village heads, have taken this initiative that they will spare no effort to uproot TB from their villages.
Shriman Dikar Singh Mewari, a Nikshay friend of a village in Nainital, has adopted six TB patients. Similarly, Shriman Gyan Singh, head of a village panchayat of Kinnaur and a Nikshay Mitra also is engaged in providing every necessary help to TB patients in his block. Our children and young friends are also not far behind in the campaign to make India TB free. Look at the wonder of Nalini Singh, a 7-year-old daughter from Una, Himachal Pradesh. Daughter Nalini, is helping T. B. patients through her pocket money.You know how much kids love piggy banks, but 13-year-old Meenakshi from Katni district of MP and 11-year-old Bashwar Mukherjee from Diamond Harbor in West Bengal are both different kids. Both these children have also handed over their piggy bank money to the T.B.-free-India campaign. All these examples, apart from evoking emotions, are also very inspiring. I heartily appreciate all these children who are thinking big at a tender age.
My dear countrymen, it is the nature of us Indians to be always ready to welcome new ideas. We love our things and also imbibe new things. An example of this is - Japan's technique Miyawaki; if the soil at some place has not been fertile, then the Miyawaki technique is a very good way to make that area green again. Miyawaki forests spread rapidly and become biodiversity spots in two to three decades. This is now spreading very fast in different parts of India too. Shriman Raafi Ramnath, a teacher from Kerala, changed the scenario of the area with this technique. Actually, Ramnath ji wanted to explain deeply about nature and environment to his students. For this he went to the extent of creating a herbal garden. His garden has now become a Biodiversity Zone. This success of his inspired him even more. After this, Raafi ji grew a mini forest with the Miyawaki technique and named it - 'Vidyavanam'. Now only a teacher can come up with such a beautiful name – 'Vidyavanam'. In the tiny space in this Vidyavanam of Ramnathji, over 450 trees of 115 varieties were planted. His students also help him in their maintenance. School children from the neighbourhood & common citizens throng in hordes to view this beautiful place. Miyawaki forests can be easily grown anywhere, even in cities. Some time ago, I had inaugurated a Miyawaki forest in Kevadia, Ekta Nagar in Gujarat. In Kutch too, in the memory of the people who died in the 2001 earthquake, a Smriti-Van has been built in the Miyawaki style. Its success in a place like Kutch shows how effective this technology is, even in the toughest of natural environments. Similarly, saplings have been planted in Ambaji and Pavagadh by the Miyawaki method. I have come to know that a Miyawaki garden is also being created in Aliganj, Lucknow. In the last four years, work has been done on more than 60 such forests in Mumbai and its surrounding areas. Now this technique is being appreciated all over the world. It is being used extensively in many countries like Singapore, Paris, Australia, Malaysia. I would urge the countrymen, especially those living in cities, to make an effort to learn about the Miyawaki method. Through this, you can make invaluable contribution in making our earth and nature green and clean.
My dear countrymen, nowadays there is a lot of discussion about Jammu and Kashmir in our country. Sometimes due to rising tourism, at times due to the spectacular events of G-20. Some time ago I had told you in 'Mann Ki Baat’ how 'Nadru' of Kashmir are being relished outside the country as well. Now the people of Baramulla district of Jammu and Kashmir have done a wonderful job. Farming has been going on in Baramulla for a long time, but here, there was a shortage of milk. The people of Baramulla took this challenge as an opportunity. A large number of people started dairy farming here. The women here came to the forefront of this task, such as a sister – Ishrat Nabi. Ishrat, a graduate, has started Mir Sisters Dairy Farm. About 150 litres of milk is being sold every day from their dairy farm. Similarly, one such friend is from Sopore... Wasim Anayat. Wasim has more than two dozen animals and he sells more than two hundred liters of milk every day. Another youth Abid Hussain is also doing dairy farming. His work is also progressing a lot. Due to the hard work of such people, 5.5 lakh liters of milk is being produced daily in Baramulla. The entire Baramulla is turning into the symbol of a new white revolution. During the last two-and-a-half - three years, more than 500 dairy units have come up here. The dairy industry of Baramulla is a testimony to the fact that every part of our country is full of possibilities. The collective will of the people of a region can achieve any goal.
My dear countrymen, this month many a great news has come in for India from the sports world. The Indian team has raised the glory of the Tricolor by winning the Women's Junior Asia Cup for the first time. This month itself our Men's Hockey Team has also won the Junior Asia Cup. With that, we have also become the team with the most wins in the history of this tournament. Our junior team also did wonders in the Junior Shooting World Cup. The Indian team has secured the first position in this tournament. Out of the total gold medals in this tournament, 20% have come in India's account alone. The Asian under Twenty Athletics Championship has also been held this June. In this, India remained in the top three in the medal tally among 45 countries.
Friends, earlier there used to be a time when we used to come to know about international events, but, often there was no mention of India in them. But, today, I am just mentioning the successes of the past few weeks, even then the list becomes so long. This is the real strength of our youth. There are many such sports and competitions, where today, for the first time, India is making her presence felt. For example, in long jump, Shrishankar Murali has won a bronze for the country in a prestigious event like the Paris Diamond League. This is India's first medal in this competition. One such similar success has been registered by our Under Seventeen Women Wrestling Team in Kyrgyzstan. I congratulate all these athletes of the country, their parents and coaches for their efforts.
Friends, behind this success of the country in international events, is the hard work of our sportspersons at the national level. Today, sports are organized with a new enthusiasm in different states of the country. They give players a chance to play, win and to learn from defeat. For example, Khelo India University Games were organized in Uttar Pradesh recently. A lot of enthusiasm was observed in the youth. Our youth have broken 11 records in these games... Punjab University, Amritsar's Guru Nanak Dev University and Karnataka's Jain University have occupied the first three places in the medal tally.
Friends, a major aspect of such tournaments is that many inspiring stories of young players come to the fore. In the rowing event at the Khelo India University Games, Assam's Cotton University's Anyatam Rajkumar became the first Divyang athlete to participate in it. Nidhi Pawaiya of Barkatullah University managed to win a Gold Medal in Shot-put despite a serious knee injury. Shubham Bhandare of Savitribai Phule Pune University, who had suffered a disappointment in Bangalore last year due to an ankle injury, has become a Gold Medalist in Steeplechase this time. Similarly, Saraswati Kundu of Burdwan University is the captain of her Kabaddi team. She has crossed many difficulties and reached there. Many of the best performing Athletes are also getting a lot of help from the TOPS Scheme. The more our sportspersons play, the more they'll bloom.
My dear countrymen, 21st June is also round the corner. This time too, people in every nook and corner of the world are eagerly waiting for the International Day of Yoga. This year the theme of Yoga Day is – ‘Yoga For Vasudhaiva Kutumbakam’ i.e. Yoga for the welfare of all in the form of 'One World-One Family'. It expresses the spirit of Yoga, which unites and takes everyone along. Like every time, this time too programs related to yoga will be organized in every corner of the country.
Friends, this time I will get the opportunity to participate in the Yoga Day program to be held at the United Nations Headquarters in New York. I see that even on social media, there is tremendous enthusiasm about Yoga Day.
Friends, I urge all of you to adopt yoga in your life, make it a part of your daily routine. If you are still not connected with yoga, then the 21st of June is a great opportunity for this resolve. There is no need for many frills in yoga anyway. See, when you join yoga, what a big change will come in your life.
My dear countrymen, the day after tomorrow i.e. the 20th of June is the day of the historical Rath Yatra. Rath Yatra bears a unique identity through out the world. Lord Jagannath's Rath Yatra is taken out with great fanfare in different states of the country. The Rath Yatra in Puri, Odisha is a wonder in itself. When I was in Gujarat, I used to get the opportunity to attend the great Rath Yatra in Ahmedabad. The way people from all over the country, every society, every class turn up in these Rath Yatras is exemplary in itself. Along with inner faith, it is also a reflection of the spirit of Ek Bharat- Shreshtha Bharat. My best wishes to all of you on this auspicious occasion. I pray that Lord Jagannath blesses all countrymen with good health, happiness and prosperity.
Friends, while discussing the festivals related to Indian tradition and culture, I must also mention the interesting events held in the Raj Bhavans of the country. Now Raj Bhavans in the country are being identified with social and development work. Today, our Raj Bhavans are becoming the flag bearers of the T.B.-Free India campaign & the campaign related to Organic farming. In the past, be it Gujarat, Goa, Telangana, Maharashtra, Sikkim, the enthusiasm with which different Raj Bhavans celebrated their foundation days is an example in itself. This is a wonderful initiative which empowers the spirit of 'Ek Bharat-Shreshtha Bharat'.
Friends, India is the mother of democracy. We consider our democratic ideals as paramount, we consider our Constitution as Supreme... therefore, we can never forget June the 25th. This is the very day when Emergency was imposed on our country. It was a dark period in the history of India. Lakhs of people opposed the emergency with full might. The supporters of democracy were tortured so much during that time, that even today, it makes the mind tremble. Many books have been written on these atrocities; the punishment meted out by the police and administration. I had also got the opportunity to write a book named 'Sangharsh Mein Gujarat' at that time. A few days ago I came across another book written on the Emergency, - Torture of Political Prisoners in India. This book, published during the Emergency, describes how, at that time, the government was treating the guardians of democracy most cruelly. There are many case studies in this book, there are many pictures. I wish that, today, when we are celebrating the Azadi Ka Amrit Mahotsav we must also have a glance at such crimes which endanger the freedom of the country. This will make it easier for today's young generation to understand the meaning and significance of democracy.
My dear countrymen, 'Mann Ki Baat' is a beautiful garland adorned with colourful pearls... each pearl unique and priceless in itself. Every episode of this program is full of life. Along with the feeling of collectivity, it fills us with a sense of duty and service towards the society. Here those topics are discussed openly, about which we usually get to read and hear very little. We often see how many countrymen got new inspiration after a certain topic was mentioned in 'Mann Ki Baat'. Recently I received a letter from the country's famous Indian classical dancer Ananda Shankar Jayant. In her letter, she has written about that episode of 'Mann Ki Baat', in which we had discussed about story telling. In that program, we had acknowledged the talent of the people associated with this field. Inspired by that program of 'Mann Ki Baat', Ananda Shankar Jayant has prepared 'Kutti Kahani'. This is a great collection of stories from different languages meant for children. This effort is very good, also since it deepens our children's attachment to their culture. She has also uploaded some interesting videos of these stories on her YouTube channel. I specifically mentioned this effort of Ananda Shankar Jayant because I felt very happy to see how the good deeds of the countrymen are inspiring others too. Learning from this, they also try to do something better for the country and society with their skills. This is the collective power of the people of India, which is instilling new strength in the progress of the country.
My dear countrymen, that's all this time with me in 'Mann Ki Baat'. See you again, next time, with new topics. It is the seasons of rains, hence, take good care of your health. Have a balanced diet and stay healthy. And yes! Certainly do yoga. Now summer vacations are about to end in many schools. I would also tell the children not to keep their homework pending for the last day. Finish your work and be at ease. Thank you very much!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांत आपण ‘मन की बात’ मध्ये 'काशी-तमिळ संगम' बद्दल बोललो, 'सौराष्ट्र-तमिळ संगम'ची देखील चर्चा केली. काही काळापूर्वी, वाराणसी येथे, 'काशी-तेलुगु संगम' सुद्धा झाला. एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळ देणारा असाच आणखी एक प्रयत्न देशात झाला आहे, हा प्रयत्न आहे, 'युवा संगम'चा. मी असा विचार केला की, या अनोख्या प्रयत्नांमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यांनाच यासंदर्भातील तपशील विचारुया. त्यासाठी आत्ता माझ्यासोबत फोनच्या माध्यमातून दोघे तरुण जोडले गेले आहेत – त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुमजी आणि दुसरी आहे बिहारची कन्या विशाखा सिंह. चला आपण सर्वप्रथम ग्यामर न्योकुम यांच्याशी बोलूया.
पंतप्रधान : ग्यामर जी, नमस्ते !
ग्यामर जी : नमस्ते मोदी जी !
पंतप्रधान : अच्छा, ग्यामर जी, सर्वप्रथम मी तुमच्याविषयी जाणून घेऊ इच्छितो.
ग्यामर जी – मोदीजी, सर्वात आधी तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ खर्च केल्याबद्दल मी तुमचे आणि भारत सरकारचे खूप खूप आभार मानतो. मी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत मेकॅनिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
पंतप्रधान: आणि कुटुंबात कोण कोण काय करतात, वडील काय करतात.
ग्यामर जी : माझे वडील लहान-मोठा व्यापार करतात आणि त्यानंतर थोडी शेती करतात.
पंतप्रधान: युवा संगमविषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली, युवा संगमसाठी कसे, कोठे गेला?
ग्यामर जी: माझा अनुभव मस्त होता, फारच छान होता. मोदी जी, युवा संगमची माहिती मला माझ्या एनआयटी या शिक्षणसंस्थेत मिळाली. त्यांनी सांगितले की, तुम्ही युवा संगम मध्ये सहभागी होऊ शकता. मी इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली तर मला समजले की, हा अत्यंत उत्तम कार्यक्रम आहे. याच्या माध्यमातून मी एक भारत,श्रेष्ठ भारत संकल्पनेत देखील योगदान देऊ शकतो. तसेच मला काही नव्या गोष्टींची माहिती मिळवण्याची संधी देखील यातून मिळेल. मग, मी लगेचच जाऊन नोंदणी केली.
पंतप्रधान: तुम्हाला काही पर्याय निवडावे लागले का?
ग्यामर जी : मोदीजी, जेव्हा त्यांच्या संकेतस्थळावर गेलो तेव्हा अरुणाचल प्रदेशातील लोकांसाठी दोन पर्याय होते, पहिला होता आंध्रप्रदेश ज्यात आयआयटी तिरुपती होते आणि दुसरा पर्याय होता राजस्थानचे केंद्रीय विद्यापीठ, म्हणून मी राजस्थानला पहिला पर्याय म्हणून निवडले आणि आयआयटी तिरुपती हा माझा दुसरा पसंतीचा पर्याय होता. राजस्थानसाठी माझी निवड झाली.त्यानंतर मी राजस्थानला गेलो.
पंतप्रधान: तुमची राजस्थान यात्रा कशी झाली? तुम्ही प्रथमच राजस्थानला जात होतात.
ग्यामर जी : खरंय, मी तेव्हा पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशाच्या बाहेर पाय ठेवला होता. मी राजस्थानला आलो तेव्हा तेथील किल्ले इत्यादी गोष्टी मी केवळ चित्रपटात आणि फोनमध्ये पाहिल्या होत्या, त्या प्रत्यक्ष बघायला मी गेलो. हा माझा पहिला अनुभव फारच चांगला ठरला. तेथील लोक स्वभावाने खूपच चांगले आहेत, त्यांनी मला अत्यंत उत्तम पद्धतीची वागणूक दिली. तेथे आम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, राजस्थानातील मोठमोठ्या तलावांबाबत माहिती मिळाली. तिथले लोक ज्या पद्धतीने पर्जन्य जल संधारण करतात, त्याविषयी नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आधी या गोष्टी मला माहितच नव्हत्या, म्हणून राजस्थान भेटीचा हा कार्यक्रम फारच उत्तम वाटला.
पंतप्रधान: हे पहा, तुम्हाला तर सर्वाधिक लाभ झाला झाला आहे. अरुणाचल ही जशी वीरांची भूमी आहे तशीच राजस्थान देखील वीरांची भूमी आहे. राजस्थानातील खूप लोक सेनादलात कार्यरत आहेत आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जे सैनिक तैनात आहेत त्यामध्ये जेव्हा तुम्ही राजस्थानच्या लोक भेटतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नक्की बोला, त्यांना सांगा की कसे तुम्ही राजस्थानला गेला होतात आणि तुम्हाला तिथे फार चांगला अनुभव आला. याबद्दल ऐकल्यानंतर त्या सैनिकांशी तुमची जवळीक वाढेल, तुम्ही एकदम जवळचे व्हाल. आणखी एक म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला काही ओळखीच्या गोष्टी देखील दिसल्या असतील, तुम्हाला असे वाटले असेल की, अरे, अरुणाचल मध्ये देखील असे होते की.
ग्यामर जी : मोदी जी, मला एक समानता जाणवली ती अशी की जे देशप्रेम आहे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेची जी दूरदृष्टी आहे आणि भावना आहे ती दोन्हीकडे समान आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता भारतीय असल्याचा अभिमान बाळगतात तशाच प्रकारे राजस्थानातील लोकांना सुद्धा स्वतःच्या मातृभूमीचा मोठा अभिमान आहे, ही गोष्ट मला फार जाणवली. मी तेथील खूप युवकांशी संवाद साधला तेव्हा मला आणखी समानता जाणवली आणि ती म्हणजे विशेष करून दोन्ही राज्यांतील युवा वर्ग भारतासाठी काहीतरी करू इच्छितात, हे जे देशाप्रती प्रेम आहे ते दोन्हीकडे समान आहे.
पंतप्रधान: तिकडे जे स्नेही झाले त्यांच्याशी ओळख वाढवली की इकडे आल्यावर त्यांना विसरून गेलात?
ग्यामर जी : नाही. नाही, मी त्यांच्याशी ओळख वाढवली.
पंतप्रधान: अच्छा, तुम्ही समाज माध्यमांवर सक्रीय आहात?
ग्यामर जी : हो मोदी जी, मी सक्रीय आहे.
पंतप्रधान: मग तुम्ही ब्लॉग लिहायला हवा. तुमचा युवा संगमचा अनुभव कसा होता, तुम्ही त्यात नोंदणी कशी केली, राजस्थानला गेल्यावर कसे अनुभव आले हे लिहायला हवे, जेणेकरून देशभरातील युवकांना एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची अधिक माहिती मिळेल, ही कोणती योजना आहे आणि युवकांना त्याचा लाभ कसा करून घेता येईल ते समजेल. तुम्ही तुमच्या अनुभवांचे वर्णन करणारा ब्लॉग लिहायला हवा, तो वाचून अनेक लोकांना फायदा होईल.
ग्यामर जी : हो, मी नक्की हे काम करीन.
पंतप्रधान: ग्यामर जी, तुमच्याशी गप्पा मारून छान वाटले. तुम्ही सर्व युवक देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहात, कारण आगामी 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत- देशासाठी देखील आणि तुमच्या स्वतःसाठी देखील. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
ग्यामर जी : तुम्हालाही धन्यवाद मोदी जी,
पंतप्रधान: नमस्कार मित्रा.
मित्रांनो, अरुणाचलातील लोकांमध्ये इतकी आत्मीयता असते की, त्यांच्याशी बोलून मला फार आनंद वाटतो. युवा संगममधील ग्यामर जी यांचा अनुभव तर अत्यंत उत्तम होता. चला आपण बिहारची कन्या विशाखा सिंह हिच्याशी बातचीत करूया.
पंतप्रधान: विशाखा जी, नमस्कार |
विशाखा जी : सर्वप्रथम, भारताच्या माननीय पंतप्रधांनांना माझा नमस्कार आणि माझ्यासह सर्व प्रतिनिधींकडून तुम्हाला वंदन
पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, आधी स्वतःबद्दल काहीतरी सांगा, मग मला युवा संगमबद्दल देखील जाणून घायचे आहे.
विशाखा जी : मी बिहारच्या सासाराम नामक शहराची रहिवासी आहे आणि माझ्या महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या संदेशाच्या माध्यमातून मला युवा संगम बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी अजून चौकशी केली, तपशील शोधले की हे काय आहे, तेव्हा मला समजले की हा एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या माध्यमातून सुरु असलेला युवा संगम उपक्रम आहे. त्यानंतर मी अर्ज केला. यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मात्र, नंतर जेव्हा मी तामिळनाडूला जाऊन आले त्यातून मला जे अनुभव मिळाले त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो आहे. या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूप आनंद झाला आहे आणि मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसाठी असा सर्वोत्कृष्ट उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भारताच्या विविध भागांतील संस्कृतींची माहिती करून घेऊ शकतो.
पंतप्रधान: विशाखा जी, तुम्ही कोणते शिक्षण घेता आहात?
विशाखा जी : मी संगणक शास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षात शिकते आहे.
पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, तुम्ही कोणत्या राज्यात जायचे आहे, कोठे संपर्क करायचा आहे हा निर्णय कसा घेतलात?
विशाखा जी : जेव्हा मी युवा संगम बद्दल गुगल वर शोध सुरु केला तेव्हा मला समजले की बिहारच्या प्रतिनिधींना तामिळनाडूच्या प्रतिनिधींसोबत अदलाबदल करायची आहे. तामिळनाडू हे आपल्या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृध्द राज्य आहे त्यामुळे मला जेव्हा हे समजले की बिहारमधील विद्यार्थ्यांना तामिळनाडूला पाठवले जाणार आहे तेव्हा मला निर्णय घेण्यात मदत झाली. मला वाटले की मी अर्ज भरून तेथे जायला हवे. त्यावेळी मी या उपक्रमात सहभागी झाली याबद्दल मला आज खूप अभिमान वाटतो आहे.
पंतप्रधान: तुम्ही पहिल्यांदाच तामिळनाडूला गेलात का?
विशाखा जी: हो, मी प्रथमच तेथे गेले होते.
पंतप्रधान: अच्छा, तुम्हाला काही विशिष्ट आठवणीत राहिलेली गोष्ट सांगायची असेल तर काय सांगाल? देशातील युवक तुमचे बोलणे ऐकत आहेत.
विशाखा जी : खरे सांगायचे तर हा संपूर्ण प्रवासच माझ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरला. प्रत्येक ठिकाणी आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहोत. मी तामिळनाडूला जाऊन खूप उत्तम मित्र मिळवले. तेथील संस्कृती शिकून घेतली, तेथील लोकांना भेटले. तेथे घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर लोकांना जिथे जाणे अवघड असते, त्या इस्रोच्या केंद्रात जाण्याची संधी आम्हा प्रतिनिधींना देण्यात आली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही राजभवनामध्ये जाऊन तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेतली. या दोन घटना माझ्यासाठी अत्यंत विशेष ठरल्या. आणि आत्ता आम्ही ज्या वयात आहोत त्या वयातील मुलांना अशी संधी मिळत नाही ती आम्हाला युवा संगमच्या माध्यमातून मिळू शकली. हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता.
पंतप्रधान: बिहारमधील खाण्यापिण्याच्या पद्धती आणि तामिळनाडूमधील खाण्यापिण्याच्या पद्धती एकदम वेगवेगळ्या आहेत,
विशाखा जी : होय.
पंतप्रधान: मग त्या बाबतीत तुम्हाला समस्या नाही आली?
विशाखा जी : आम्ही जेव्हा तेथे गेलो, तेव्हा लक्षात आले, तामिळनाडूमध्ये दक्षिण भारतीय पद्धतीचे अन्न मिळते. आम्ही तेथे गेल्यावर आम्हाला डोसा, इडली, सांबार, उत्तपा, वडा, उपमा यांसारख्या पाककृती वाढण्यात आल्या होत्या, तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही पहिल्यांदा चाखलं, तेव्हा तो अत्यंत सुंदर होता. तेथील जेवण अत्यंत आरोग्यसंपन्न होतं आणि वास्तवात अतिशय चविष्ट आहे. आमच्या उत्तरेतील खाद्यपदार्थापासून खूपच वेगळं आहे आणि तरी मला तेथले खाद्यपदार्थही खूप चांगले वाटले आणि तेथील लोकही खूप भले वाटले.
प्रधानमंत्री जीः तर आता खूप मित्रही झाले असतील तामिळनाडूत?
विशाखा जीः हो. आम्ही तेथे उतरलो होतो त्या एनआयटी त्रिचीमध्ये, नंतर आयआयटी मद्रासमध्ये तर दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी माझी चांगली मैत्री झाली आहे. शिवाय मध्ये सीआयआयचा स्वागत समारंभ होता, तर तेथे आजूबाजूच्या महाविद्यालयांतील खूप सारे विद्यार्थी आले होते. तेथे आम्ही त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्या लोकांना भेटून मला इतकं छान वाटलं. त्यातील अनेक लोक माझे मित्र सुद्धा झाले आहेत. आणि काही प्रतिनिधीही मला भेटले जे तामिळनाडूचे प्रतिनिधी बिहारमध्ये आले होते. त्यांच्याशी आमची चर्चाही झाली होती आणि आताही आम्ही जेव्हा आपसात गप्पा मारतो तेव्हा मला खूप छान वाटतं.
प्रधानमंत्री जीः तर विशाखा जी, आपण एक ब्लॉग लिहा आणि समाजमाध्यमांवर हा आपला संपूर्ण अनुभव सांगा. एक भारत श्रेष्ठ भारत चा युवा संगम आणि मग तामिळनाडूत आपल्याला जी आपुलकी मिळाली, जो आपला स्वागत सत्कार समारंभ झाला, तमिळ लोकांचंही आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्याबद्दलही लिहून या साऱ्या गोष्टी देशाला सांगा आपण. तर लिहाल आपण?
विशाखा जीः हो, अवश्य.
प्रधानमंत्री जीः तर माझ्यावतीनं आपल्याला खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.
विशाखा जीः जी धन्यवाद. नमस्कार.
ग्यामर आणि विशाखा, आपल्याला माझ्या खूप शुभेच्छा. युवा संगममध्ये आपण जे शिकलात, ते जीवनभर आपल्याबरोबर रहावं, ही माझी आपल्याप्रति शुभेच्छा आहे.
मित्रांनो, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे. आमच्या देशात पहाण्यासारखं खूप काही आहे, हे लक्षात घेऊनच, शिक्षण मंत्रालयानं युवासंगम नावाचा एक उत्तम पुढाकार आयोजित केला. या पुढाकाराचा उद्देष्य नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील युवकांना आपसात मिळून मिसळून रहाण्याची संधी देणं हाही होता. वेगवेगळ्या राज्यांच्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांना यात जोडण्यात आलं आहे. युवासंगम मध्ये युवक दुसऱ्या राज्यांच्या शहरे आणि गावांमध्ये जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांचा दौरा केला आहे. जे युवक याचा भाग बनले आहेत, ते आपल्यासमवेत अशा स्मृती घेऊन आले आहेत की ज्या स्मृती जीवनभर त्यांच्या ह्रदयात कायम रहातील. आम्ही पाहिलं आहे की, अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ, व्यावसायिक नेते यांनी बॅगपॅकर्सप्रमाणे भारतात वास्तव्य केलं आहे. मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो, तेव्हा अनेकदा तेही सांगतात की, ते तरूण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते. आमच्या भारतात इतकं काही पहाण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळा वाढतच जाते. मला आशा आहे की या रोमांचक अनुभवांना जाणून घेऊन आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवस अगोदर मी जपानच्या हिरोशिमामध्ये होतो. तेथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल संग्रहालयात जाण्याची संधी मिळाली. तो एक भावविवश करणारा अनुभव होता. जेव्हा आम्ही इतिहासातील स्मृती जपून सुरक्षित ठेवतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत सहाय्यकारी असतं ते. अनेकदा संग्रहालयात आम्हाला नवीन धडे मिळतात तर अनेकदा काही शिकायला मिळतं. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय म्युझियम प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात जगातील १२०० हून अधिक वस्तुसंग्रहालयांच्या वैशिष्टयांचं प्रदर्शन केलं होतं. आमल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालये आहेत, जे आमच्या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या अनेक पैलुंचं प्रदर्शन करत असतात. जसे की गुरूग्राममध्ये एक आगळंवेगळं वस्तुसंग्रहालय आहे. म्युसिओ कॅमेरा ज्यात १८६० नंतरच्या ८ हजाराहूंन अधिक कॅमेऱ्यांचं संकलन केलं आहे. तामिळनाडूच्या म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीजची रचना आमच्या दिव्यांगजनांना समोर ठेवून केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय एक असंच संग्रहालय आहे ज्यात ७० हजाराहून अधिक वस्तु सुरक्षित ठेवल्या आहेत. सन २०१० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंडियन मेमरी प्रोजेक्ट म्हणजे भारतीय स्मृती प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन संग्रहालय आहे. जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्रं आणि कथांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे दुवे जोडण्याचं त्याचं कार्य सुरू आहे. देशाच्या फाळणीमुळे झालेल्या जखमांशी जोडलेल्या स्मृतींना समोर आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या काही वर्षात आम्ही भारतात नवनवीन प्रकारचे संग्रहालये आणि स्मारकं बनत असताना पाहिले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी बंधु आणि भगिनींच्या योगदानाला समर्पित नवीन संग्रहालये उभारली जात आहेत. कोलकताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लोबी दालन असो की मग जालियनवाला बाग मेमोरियलचा जीर्णोद्धार, देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असं पीएम संग्रहालय आज दिल्लीच्या शोभेत भर घालत आहे. दिल्लीमध्येच राष्ट्रीय युद्ध स्मारक संग्रहालय आमि पोलिस स्मारक असून तेथे रोज अनेक लोक हुतात्मा झालेल्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. ऐतिहासिक दांडी यात्रेला समर्पित दांडी स्मारक असो की एकतेचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी स्मारक असो, पण मला इथंच थांबावं लागेल कारण देशभरातील संग्रहालयांची यादी खूप मोठी आहे आणि प्रथमच देशातील सर्व संग्रहालयातील माहिती एकत्र संकलित करण्यात आली आहे. संग्रहालय कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तेथे कोणत्या प्रकारच्या वस्तु ठेवल्या आहेत, तेथील संपर्काचा तपशील काय आहे- हे सारे काही एक ऑनलाईन डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केले आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपल्याला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आपण देशातील ही स संग्रहालये पहाण्यासाठी जरूर यावं. तेथे आपण आकर्षक छायाचित्रांना हॅशटॅग म्युझियम मेमरीज करून सामायिक करायलाही विसरू नका. यामुळे या वैभवशाली संस्कृतीच्या बरोबर आम्हा भारतीयांचे असलेले संबंध आणखी मजबूत होतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही सर्वांनी एक म्हण अनेकदा ऐकली असेल,. अनेकवार ऐकली असेल. बिन पानी सब सून. म्हणजे पाण्याविना जीवनात संकट कायम असतेच, व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता, आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांचे निर्माण केले जात आहे. आमचे अमृत सरोवर, यासाठी विशेष आहे की, हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात तयार केले जात आहे आणि यात लोकांचे अमृत प्रयत्न लागले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जल संरक्षणाच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे.
मित्रांनो, प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही पाण्याच्या टंचाईच्या आव्हानाशी जोडलेल्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. याही वर्षी आम्ही या विषयाला घेऊ पण यावेळी जल संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अपबाबत चर्चा करू. एक स्टार्ट अप आहे फ्लक्सजेन. हा स्टार्ट अप आयओटी समर्थित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचे पर्याय देत असतो. हे तंत्रज्ञान पाण्याच्या वापराच्या पॅटर्न सांगून पाण्याच्या प्रभावी वापरासंबंधी सहाय्य करेल. आणखी एक स्टार्ट अप आहे LivNSense. ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगवर आधारित असून असा मंच आहे. याच्या सहाय्यानं जल वितरणावर प्रभावी पद्धतीनं देखरेख केली जाऊ शकते. यातून कुठे किती पाणी वाया जात आहे, याचीही माहिती समजू शकते. आणखी एक स्टार्ट अप आहे कुंभी कागज. हा कुंभी कागज असा विषय आहे की आपल्यालाही खूप आवडेल असा मला पक्का विश्वास आहे. कुंभी कागज स्टार्ट अपने एक विशेष काम सुरू केलं आहे. त्यानं जलकुंभीपासून कागद बनवण्याचं काम सुरू केलं आहे, म्हणडे जी जलकुंभी कधी जलस्त्रोतांसाठी एक समस्या समजली जात होती, त्यापासून आता कागद बनवण्यात येत आहे.
मित्रांनो, अनेक युवक नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर काही युवक असे आहेत की जे समाजाला जागरूक करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत जसे की छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील युवक आहेत. इथल्या युवकांनी पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे युवक घरोघरी जाऊन लोकांना पाणी वाचवण्याविषयक जागरूक करतात. जेथे कुठे विवाह समारंभांचं आयोजन केंलं जातं, तिथं या युवकांचा गट जाऊन पाण्याचा दुरूपयोग कसा रोखला जाऊ शकतो, यावर त्यांना माहिती देतात. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायक प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातही होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढला आहे, ज्याचा उपयोग गावातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातला जातो. या बांधांवर पाणी एकत्र आल्यानं तिथं भाजीपालाही तयार होऊ लागला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रदेशाच्या गरजांचीही पूर्तता होत आहे. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक परिवर्तन घडवू शकतो, याचं खुंटी एक आकर्षक उदाहरण बनला आहे. मी तिथल्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, १९६५ च्या युद्धाच्या वेळेस, आमचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. नंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडलं होतं. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जन संशोधनचा उल्लेख केला होता. मन की बात मध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे प्रतिबिंह आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी श्मामराव डोलेजी. शिवाजी डोले नाशिक जिल्हयातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषीमध्ये पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसान कडे मार्गक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त कसे योगदान दिलं जावं. आपल्या या मोहिमेत शिवाजो डोले यांनी २० लोकांची असं एक पथक बनवलं आणि काही माजी सैनिकांनाही त्यात सामिल करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रीय पडून होती. तिचं पुनरूज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला. आज पहाता पहाता वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास १८ हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे. आता त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत, त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय अनुसंधान. याचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणीकरणावरही ते लक्ष केंद्रीत करत आहेत. सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या पथकातील लोकांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नामुळे केवळ मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण झालं नाही तर उपजीविकेसाठी अनेक साधनंही तयार झाली आहेत. मला आशा आहे की हा प्रयत्न प्रत्येक श्रोत्याला प्रेरित निश्चित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज २८ मे महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, धाडस आणि संकल्पशक्तीशी जोडलेली अनेक कथा आजही आम्हाला प्रेरित करत असतात. मी तो दिवस विसरू शकत नाही की जेव्हा मी अंदमानातील त्यांच्या कोठडीत गेलो होतो जिथं वीर सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतेनं संपूर्ण युक्त होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पंसत नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठीही वीर सावरकर यांनी जितकं केलं, त्याच्या आठवणी आजही काढल्या जातात.
मित्रांनो, काही दिवसांनी ४ जूनला संत कबीरदास यांची जयंती आहे. कबीरदास यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे, तो आजही तितकाच उपयुक्त आहे. कबीरदास जी म्हणत असत,
कबीरा कुआं एक है, पानी भरे अनेक
बर्तन मेंही भेद है, पानी सब में एक
म्हणजे विहिरीवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाणी भरण्यासाठी आले तरीही विहीर कुणात भेदाभेद करत नाही. पाणी तर सर्व भांड्यांमध्ये एकच असतं. संत कबीरांनी समाजात विभाजन करणाऱ्या प्रत्येक वाईट चालीरितीला विरोध केला. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा देश विकसित होण्याच्य संकल्पासह वाटचाल करत आहे, तेव्हा आम्हाला संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता देशातील एका अशा महान व्यक्तीमत्वाबद्दल चर्चा करणार आहे ज्यांनी राजकारण आणि चित्रपट जगतावर अद्भुत प्रतिभेच्या जोरावर अमीट ठसा उमटवला आहे. या महान व्यक्तीचं नाव आहे एन टी रामाराव ज्यांना आम्ही एनटीआर म्हणूनही ओळखतो. आज एनटीआर यांची शंभरावी जयंती आहे. आपल्या बहुसंचारी प्रतिभेच्या जोरावर त्यांनी केवळ तेलगु चित्रपटाचे महानायक बनले एवढेच नव्हे तर त्यांनी कोट्यवधी लोकांचं मनही जिंकलं होतं. आपल्याला हे माहीत आहे का त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटातून अभियन केला होता? त्यांनी अनेक ऐतिहासिक पात्रांना आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा जिवंत केलं होतं. भगवान कृष्ण, राम आणि अशा अनेक भूमिकांमध्ये एनटीआर यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की आजही लोक त्यांची आठवण काढतात. एनटीआर यांनी चित्रपट जगतासह राजकारणातही आपली वेगळीच ओळख स्थापित केली होती. इथंही त्यांना लोकांचं भरपूर प्रेम आणि आशिर्वाद मिळाला. देश आणि दुनियेतील लाखो लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारे एनटी रामाराव जींना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी इतकंच. पुढच्या वेळेस काही नव्या विषयांसह आपल्याकडे येईन तेव्हा काही प्रदेशांत उष्मा आणखी वाढलेला असेल. कुठे कुठे पाऊसही सुरू होईल. आपल्याला हवामानाच्या प्रत्येक स्थितीत आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. २१ जूनला आम्ही जागतिक योगा दिन साजरा करू. त्याचीही देश आणि परदेशातही तयारी सुरू आहे. आपण या तयारीबाबत मला आपल्या मन की बातमध्ये मला लिहीत रहा. अन्य एखादा विषय किंवा माहिती मिळाली तर मला ही सांगा. जास्तीत जास्त सूचना 'मन की बात'मध्ये घेण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू या. तोपर्यंत आता निरोप द्या. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.
मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमीचं ते पर्व होतं आणि आम्ही सर्वानी मिळून विजया दशमीच्या दिवशीच मन की बात चा प्रवास सुरू केला होता. विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचं पर्व. मन की बात सुद्धा देशवासियांच्या भलेपणाचं, सकारात्मकतेचं एक आगळंवेगळं पर्व बनली आहे. एक असं पर्व की जे प्रत्येक महिन्याला येतं, ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच असते. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. आम्ही यात लोक सहभागालाही साजरं करतो. अनेक वेळा मन की बात ने इतके महिने आणि इतके वर्षांचा प्रवास केला, यावर विश्वासच बसत नाही. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस, नवीन उदाहरणांचं नाविन्य, प्रत्येक वेळेस देशवासियांच्या यशस्वीतेचा विस्तार. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडले गेले, प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक वर्गातील लोक जोडले गेले. बेटी बचाओ-बेटी पढाओची गोष्ट असो, स्वच्छ भारत अभियानाची गोष्ट असो, खादी प्रती प्रेम असो की निसर्गाबद्दल चर्चा असो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असो की मग अमृत सरोवर याची चर्चा, मन की बात ज्या विषयाशी जोडला गेला, तो लोक आंदोलनाचा विषय झाला आणि आपण लोकांनी त्याला तसा बनवला. जेव्हा मी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मन की बात सामायिक केली होती, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली.
मित्रांनो, मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते-लक्ष्मणराव जी इनामदार. आम्ही त्यांना वकील साहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत की, कुणीही दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कुणीही असो, आपला साथीदार असो की आपला विरोधी गटातील असो, त्याचे चांगले गुण जाणण्याची, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे. मन की बात दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं एक फार मोठं माध्यम बनलं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या कार्यक्रमानं मला कधीही आपल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. मला आठवतं की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच सामान्य जनांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं होतच होतं. मुख्यमंत्री पदाचं कामकाज आणि कार्यकाल असा असतो की लोकांना भेटण्याची खूप संधी मिळत असते. पण २०१४ मध्ये जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा मला असं आढळलं की येथील जीवन तर खूपच वेगळं आहे. कामाचं स्वरूप वेगळं आहे, जबाबदारी वेगळी आहे आणि स्थिती, परिस्थितीची बंधने, सुरक्षेचा बंदोबस्त, वेळेची मर्यादा सारं काही वेगळं आहे. सुरूवातीच्या दिवसात, काही वेगळेंपण जाणवत होतं. काहीतरी रितेपण वाटत होतं. पन्नास वर्षांपूर्वी मी यासाठी माझें घर सोडलं नव्हतं की आपल्याच देशवासियांशी संपर्क अवघड व्हावा. देशवासी माझ्यासाठी सर्वतोपरी आहेत, मी त्यांच्यापासून अलग होऊन मी जगूच शकत नाही. मन की बात ने मला या आव्हानावर उपाय दिला , सामान्य माणसांशी जोडलं जाण्याचा मार्ग दिला. पदभार आणि शिष्टाचार हा शासकीय व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि लोकभावना, कोटी कोटी भारतीयांसोबत माझ्या भावविश्वाचं अतूट भाग बनून गेला. प्रत्येक महिन्याला मी देशातल्या लोकांची हजारो संदेश वाचतो, प्रत्येक महिन्याला देशवासियांच्या एकाहून एक अद्भुत स्वरूपाचं दर्शन घडतं. मी देशवासियांच्या तपश्चर्या आणि त्यागाची परिसीमा पहातो, ती मला जाणवते. मला असं वाटत नाही की मी आपल्यापासून थोडाही दूर अंतरावर आहे. माझ्यासाठी मन की बात एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी एक श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे. जसे लोक ईश्वराची पूजा करण्यासाठी जातात तेव्हा प्रसादाची थाळी आणतात. माझ्यासाठी मन की बात कार्यक्रम ईश्वररूपी जनता जनार्दनाच्या चरणांच्या प्रसादाची थाळीसारखा आहे. मन की बात माझ्या मनाचा अध्यात्मिक प्रवास बनला आहे.
मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे.
मन की बात अहंपासू ते वयम पर्यंतचा प्रवास आहे.
हा तर मी नाही तर तू ही याची संस्कार साधना आहे.
आपण कल्पना करा, एखादा माझा देशवासी ४०-४० वर्षांपासून निर्जन डोंगरी भाग आणि नापीक जमिनीवर वृक्ष लावतो आहे, कितीही लोक ३०-३० वर्षांपासून जल संरक्षणासाठी विहीरी आणि तलाव तयार करत आहेत आणि त्यांची स्वच्छता करत आहेत. कुणी २५ ते ३० वर्षांपासून निर्धन परिवारांतील मुलांना शिकवत आहे तर कुणी गरीबांच्या इलाजासाठी मदत करतो आहे. कित्येकदा मन की बात मध्ये याचा उल्लेख करताना मी भावविवश झालो आहे. किती वेळा याचं पुन्हा ध्वनीमुद्रण करावं लागलं आहे. आज मागचे कितीतरी भाग, पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. देशवासियांच्या या प्रयत्नांमुळे मला सातत्यानं स्वतःला कार्यरत रहाण्याची प्रेरणा दिली आहे.
मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो, ते सर्व आमचे हिरो आहेते, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलं आहे. आज जेव्हा आम्ही १०० व्या भागाच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत, ते माझी ही इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाच्या बाबत जाणून घ्यावं. आज आम्ही काही मित्रांशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याशी आता हरियाणातील सुनील जगलाल भाईजी जोडले जात आहेत. सुनील जगलानजी यांचा माझ्या मनावर इतका प्रभाव यासाठी पडला की हरियाणातील लिंगगुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणावर जोरदार चर्चा होत असते आणि मी सुद्धा बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान हरियाणातूनच सुरू केलं होतं. याच दरम्यान, जेव्हा सुनील जी यांच्या सेल्फी विथ डॉटर मोहीमेकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांच्यापासून शिकलो आणि याचा मन की बातमध्ये समावेश केला. पहाता पहाता, सेल्फी विथ डॉटर एका जागतिक मोहीमेत परिवर्तित झाली. आणि यात मुद्दा सेल्फीचा नव्हता तर यात कन्येला प्रमुख स्थान दिलं होतं. जीवनात कन्येला किती मोठं स्थान आहे, हे या अभियानातून समोर आलं. अशाच अनेक् प्रयत्नांचा परिणाम असा झाला की आज हरियाणातील लिग गुणोत्तर खूपच सुधारलं आहे. या आपण आता सुनील जी यांच्याशी जरा गप्पा मारू या.
प्रधानमंत्री जी- नमस्कार सुनीलजी.
सुनीलः नमस्कार सर. आपला आवाज ऐकूनच माझा आनंद प्रचंड वाढला आहे सर.
प्रधानमंत्री जी- सुनील जी, सेल्फी विथ डॉटर प्रत्येकाला आठवणीत आहे. आज त्यावर पुन्हा चर्चा होत आहे तर आपल्याला कसं वाटत आहे?
सुनीलः प्रधानमंत्री जी, हे आपण जो हरियाणातील पानिपतच्या चौथं युद्ध मुलींच्या चेहऱ्यांवर स्मितहासय आणण्यासाठी सुरू केलं होतं, आणि ज्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण देशानं जितके प्रयत्न केले आहेत, तर खरोखरच माझ्यासाठी आणि प्रत्येक कन्या प्रेमींसाठी ही खूप मोठी बाब आहे.
प्रधानमंत्री जी- सुनील जी, आता आपली कन्या कशी आहे, आजकाल ती काय करते?
सुनीलः माझ्या दोन कन्या आहेत नंदनी आणि याचिका. त्यापैकी एक सातवी इयत्तेत शिकत आहे तर दुसरी चौथ्या इयत्तेत शिकते. आपली ती मोठी प्रशंसक आहे आणि आणि आपल्यासाठी तिने वास्तवात धन्यवाद प्रधानमंत्रीजी म्हणून तिनेच आपल्या वर्गसहकारी आहेत, त्यांच्याकडून तिने पत्रंही लिहीली होती तिने.
प्रधानमंत्री जी- वाहवा. आपल्या कन्येला माझ्याकडून आणि मन की बातच्या श्रोत्यांकडून खूप सारे आशीर्वाद द्या.
सुनील-खूप धन्यवादजी, आपल्यामुळेच देशाच्या कन्यांच्या चेहऱ्यांवर सातत्याने स्मितहास्य वाढत चाललं आहे.
प्रधानमंत्री जी- खूप खूप धन्यवाद, सुनील जी.
सुनील- जी धन्यवाद.
मित्रांनो,
मला या गोष्टीचा इतका आनंद आहे की मन की बातमधून आम्ही देशातील स्त्री शक्तीच्या शेकडो प्रेरणादायक कहाण्यांचा उल्लेख केला आहे. मग त्यात आमचं सैन्य असो की मग क्रीडा जगत असो. जेव्हा मी महिलांच्या यशाबद्दल उल्लेख केला आहे, त्यांची खूप प्रशंसा केली गेली आहे. जेव्हा आम्ही छत्तीसगढच्या देऊर गावातील महिलांची चर्चा केली होती. तेव्हा या महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून गावातील चौक, रस्ते आणि मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी अभियान चालवत असतात. अशाच प्रकारे, तामिळनाडूतील त्या आदिवासी महिला ज्यांनी मातीचे हजारो पर्यावरणस्नेही कप निर्यात केले आणि त्यांच्यापासूनही देशानं खूप प्रेरणा घेतली. तामिळनाडूतील २० हजार महिलांनी एकत्र येऊन वेल्लोर इथं नाग नदीला पुनरूज्जीवित केलं होतं. अशा कितीतरी अभियानांना आमच्या स्त्री शक्तीनं प्रेरणा दिली आहे आणि मन की बात कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नांना समोर आणण्याचा मंच बनला आहे.
मित्रांनो, आता आमच्याबरोबर फोन लाईनवर आणखी एक सद्गृस्थ आले आहेत. त्यांचं नाव आहे मंजूर अहमद. मन की बात कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या पेन्सील पाट्या(पेन्सील स्लेट्स) बाबत माहिती देताना तेव्हा मंजूर अहमद जी यांचा उल्लेख झाला होता.
प्रधानमंत्री जी-मंजूर जी, कसे आहात आपण?
मंजूर जी- धन्यवाद सर, मजेत आहोत सर.
प्रधानमंत्री जी- मन की बातच्या १०० व्या भागात आपल्याशी चर्चा करताना खूप छान वाटत आहे.
मंजूर जी – धन्यवाद, सर |
प्रधानमंत्री जी- बरं, ते पेन्सील स्लेट्सचं काम कसं चालू आहे?
मंजूर जी – ते काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. जेव्हापासून सर आपण आमची ही गोष्ट मन की बात मध्ये सांगितली, तेव्हापासून खूप कामही वाढलं आहे. इतरांना रोजगारही खूप वाढला आहे या कामातून.
प्रधानमंत्री जी- किती जणांना रोजगार मिळत असेल?
मंजूर जी –आता माझ्याकडे २०० हून अधिक लोक आहेत.
प्रधानमंत्री जी- अरे वा, मला आनंद झाला हे ऐकून.
मंजूर जी – जी सर. आता एक दोन महिन्यातच याचा विस्तार करणार असून आणखी २०० लोकांना रोजगार मिळू लागेल सर.
प्रधानमंत्री जी- वाहवा. हे पहा मंजूर जी...
मंजूर जी- जी सर...
प्रधानमंत्री जी- मला बरोबर आठवतं की त्या दिवशी तुम्ही मला असं सांगितलं होतं की हे असं काम आहे की याची काही प्रसिद्घी नाही की स्वतःची काही ओळख नाही. आणि आपल्याला याचं दुःखंही होतं आणि याचमुळे आपण आपल्याला खूप अवघड परिस्थिती आहे, असं आपण म्हणत होता. आता तर ही ओळख बनली आहे आणि २०० हून अधिक लोकांना रोजगार पुरवत आहात.
मंजूर जी- जी सर... जी सर.
प्रधानमंत्री जी- आपण याचा विस्तार करत आहात आणि २०० लोकांना रोजगार देत आहात, ही तर खूप आनंदाची बातमी सांगितली आपण.
मंजूर जी- आणि सर, येथे जे शेतकरी आहेत, त्यांना याचा खूप मोठा लाभ मिळत आहे तेव्हापासून. २००० रूपयांना झाड विकत होते कघीकधी आता त्या झाडाची किमत ५००० रूपयांपर्यंत वर पोहचली आहे. मागणी इतकी वाढली आहे की तेव्हापासून आणि माझी ओळख बनली आहे. खूप मागण्या आपल्याकडे आल्या आहेत सर तेव्हापासून. मी आता एकदोन महिन्यात आणखी विस्तार करून दोन अडीचशे गावांमध्ये जितकी मुलं मुली आहेत, त्यांना यात सामावून घेता येईल सर आणि त्यांची उपजीविका यातून चालू शकते सर.
प्रधानमंत्री जी- पहा मंजूरजी, व्होकल फॉर लोकलची किती जबरदस्त शक्ती आहे हे आपण प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे.
मंजूर जी- जी सर|
प्रधानमंत्री जी- माझ्याकडून आपल्याला आणि गावातील सर्व शेतकरी आणि आपल्यासमवेत काम करत असलेल्या सर्व साधीदारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भैया.
मंजूर जी- धन्यवाद सर |
मित्रांनो, आमच्या देशात कितीतरी असे प्रतिभाशाली लोक आहेत, की जे आपल्या मेहनतीच्या जोरावर शिखऱस्थानावर पोहचले आहेत. मला आठवतं, विशाखापट्टणमचे वेंकट मुरली प्रसाद जी यांनी आत्मनिर्भर भारत विषयी एक तक्ता तयार केला होता. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांचा उपयोग ते करतील. जेव्हा बेतिया चे प्रमोद जी यांनी एलईडी बल्ब बनवण्याचं छोटासा कारखाना सुरू केला, तेव्हा गढमुक्तेश्वर च्या संतोष जी यांनी चटया बनवण्याचं काम केलं आणि मन की बात कार्यक्रमच त्या सर्व उत्पादनांना सर्वाच्या समोर आणण्याचं एक साधन बनलां होता. आम्ही मेक इन इडियाच्या अनेक उदाहरणांपासून ते अंतराळ स्टार्ट अप्स पर्यंतची चर्चा मन की बात कार्यक्रमात केली आहे.
मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, मी काही भागांपूर्वी मणिपूरच्या भगिनी विजयशांती देवी यांचाही उल्लेख केला होता. विजयशांती देवी कमळाच्या तंतूंपासून कपडे बनवतात. मन की बात कार्यक्रमात या आगळ्यावेगळ्या पर्यावरणस्नेही कल्पनेची चर्चा झाली तेव्हा त्यांचं काम आणखीच लोकप्रिय झालं. आज विजयशांतीजी आमच्याबरोबर फोनवर आहेत.
प्रधानमंत्री जी- नमस्ते विजयशांतीजी, कशा आहात आपण?
विजयशांती जीः सर, मी मजेत आहे.
प्रधानमंत्री जी- आणि आपलं काम कसं चाललं आहे?
विजयशांती जीः माझ्या समवेत ३० महिलांसोबत अजूनही काम करत आहोत.
प्रधानमंत्री जी- इतक्या थोड्या कालावधी आपण ३० महिलांपर्यंत पोहचल्या आहात.
विजयशांती जीः होय सर. यावर्षी आणखी माझ्या भागातील शंभर महिलांना घेऊन विस्तार करणार आहे.
प्रधानमंत्री जी- तर आपलं लक्ष्य. १०० महिलांचं आहे.
विजयशांती जेः होय सर. १०० महिला.
प्रधानमंत्री जी- आणि आता लोकांना कमळाच्या खोडापासून बनवल्या जाणाऱ्ये तंतूचा चांगल्यापैकी परिचय झाला आहे.
विजयशांती जी- होय सर. प्रत्येकाला मन की बात कार्यक्रमापासूनच संपूर्ण भारतात याची माहिती झाली आहे.
प्रधानमंत्री जी- आता ते खूप लोकप्रियही झालं आहे.
विजयशांती जी- होय सर. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमापासून प्रत्येकाला कमलतंतूची (लोटस फायबर) माहिती झाली आहे.
प्रधानमंत्री जी- आता तुम्हाला बाजारपेठही मिळाली आहे?
विजयशांती जी- होय. मला अमेरिकेतूनही बाजारपेठ मिळाली आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करायची आहे. मी यावर्षापासून अमेरिकेलाही पाठवण्याचा विचार करते आहे.
प्रधानमंत्री जी- म्हणजे आता तुम्ही निर्यातदार झाला आहात.
विजयशांती जी- होय सर, मी यावर्षीपासून आमच्या कमलतंतूचे उत्पादन निर्यात करणार आहे.
प्रधानमंत्री जी- म्हणजे, जेव्हा मी म्हणतो की व्होकल फॉर लोकल आणि आता लोकल फॉर ग्लोबल.
विजयशांती जी- होय सर. मला माझं उत्पादन सर्व जगभरात पोहचलेलं हवं आहे.
प्रधानमंत्री जी- अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा.
विजयशांती जी- धन्यवाद सर.
प्रधानमंत्री जी- धन्यवाद, विजयशांती
विजयशांती जी- धन्यवाद सर.
मित्रांनो, मन की बातची अजून एक विशेषतः आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या तसेच त्यांना गती देखील प्राप्त झाली. उदाहरणार्थ आपली खेळणी, आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनरुस्थापित करण्याचे मिशन ‘मन की बात’ पासूनच तर सुरु झाले होते. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्द्ल जागरुकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील ‘मन की बात’ पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरु केली होती, गरीब लहान दुकानदारांसोबत घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरु झाली, तेव्हा देखील देशवासियांना या मोहिमेशी जोडण्यात ‘मन की बात’ ने महत्वाची भूमिका पार पाडली. असे प्रत्येक उदाहरण समाजात परिवर्तनाचे कारण बनले आहे. प्रदीप सांगवान जी यांनीही समाजाला प्रेरणा देण्याचा विडा उचलाल आहे. 'मन की बात' मध्ये, आम्ही प्रदीप सांगवान जी यांच्या 'हिलिंग हिमालय' मोहिमेची चर्चा केली होती. ते आपल्यासोबत फोन लाइनवर उपलब्ध आहेत.
मोदी जी – प्रदीप जी नमस्कार !
प्रदीप जी – सर जय हिंद |
मोदी जी – जय हिंद, जय हिंद ! तुम्ही कसे आहात?
प्रदीप जी- सर खूपच छान. आणि तुमचा आवाज ऐकून तर अजूनच छान.
मोदी जी- तुम्ही हिमालयाला स्वच्छ करण्याचा विचार केला.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी- मोहीम देखील राबवली. सध्या तुमची मोहीम कशी सुरु आहे?
प्रदीप जी- सर खूपच छान सुरु आहे. असे समजा की, 2020 पासून आम्हाला जे काम करायला पाच वर्ष लागायची तेच काम आता एका वर्षात पूर्ण होत आहे.
मोदी जी – अरे वाह !
प्रदीप जी- हो हो सर. सुरुवातीला मी खूप चिंतीत होतो, मी खूप घाबरलो होतो की मी आयुष्यभर हे काम करू शकेन की नाही. परंतु थोडा पाठिंबा मिळाला आणि 2020 पर्यंत आम्ही प्रामाणिकपणे खूपच संघर्ष करत होतो. खूपच कमी लोकं सहभागी होत होते, असे बरेच लोकं होते जे पाठिंबा देत नव्हते. आमच्या मोहिमेकडे तेवढे लक्षही देत नव्हते. पण 2020 नंतर जेव्हा 'मन की बात' मध्ये याचा उल्लेख झाला तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या.म्हणजे, पूर्वी आम्ही एका वर्षात 6-7 स्वच्छता मोहीम राबवायचो, आता आम्ही 10 स्वच्छता मोहीम राबवतो. आजच्या तारखेत वेगवेगळ्या ठिकाणांहून आम्ही दररोज पाच टन कचरा गोळा करतो.
मोदी जी- अरे वाह !
प्रदीप जी - सर, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर की एक वेळ अशी आली होती की मी जवळजवळ हर मानली होती, पण 'मन की बात' मध्ये उल्लेख झाल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आणि गोष्टींना वेग आला. ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.मी तुमचा खरोखर आभारी आहे. मला माहित नाही की तुम्ही आमच्यासारखे लोक कसे शोधता. एवढ्या दुर्गम भागात कोण काम करत आहे, आम्ही हिमालयात जाऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही या उंचीवर काम करत आहोत.त्या तिथे तुम्ही आम्हांला शोधलं. आमचे कार्य जगासमोर आणले. मी माझ्या देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलत आहे हा क्षण मझ्यासाठी तेव्हाही आणि आज देखील खूपच भावनिक क्षण आहे. माझ्यासाठी यापेक्षा भाग्याचे दुसरे काहीही असू शकत नाही.
मोदी जी – प्रदीप जी ! तुम्ही खर्या अर्थाने हिमालयाच्या शिखरांवर साधना करत आहात आणि मला खात्री आहे की लोकांना आता तुमचे नाव ऐकूनच तुम्ही पर्वतांच्या स्वच्छता मोहिमेत कसे सहभागी होता हे आठवेल.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी – आणि तुम्ही सांगितलेच आहे की आता तुमची खूप मोठी टीम तयार होत आहे आणि तुम्ही दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत आहात.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी - आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या प्रयत्नांमुळे आणि त्याबद्दलच्या चर्चेमुळे अनेक गिर्यारोहकांनी आता स्वच्छतेशी संबंधित फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
प्रदीप जी – हो सर! खूपच !
मोदी जी- ही चांगली गोष्ट आहे, तुमच्या सारख्या मित्रांच्या प्रयत्नामुळे कचरा ही सुद्धा एक संपत्ती आहे, ही बाब आता लोकांच्या मनात रुजत आहे आणि आता पर्यावरणाचे देखील संरक्षण होत आहे आणि आपला अभिमान असणाऱ्या हिमालयाचे संवर्धन करण्यात सामान्य लोकं देखील सहभागी होत आहेत. प्रदीप जी मला खूप चांगले वाटले. खूप खूप धन्यवाद.
प्रदीप जी – धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद जय हिंद.
मित्रांनो, देशात पर्यटनाचा विकास वेगाने होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थाने असोत त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयी देखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळे तुम्ही राहता त्या राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातील असली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लास्टिक आणि ई-कचरा यासारख्या गंभीर विषयांवर आम्ही सतत चर्चा केली आहे. आज ज्या पर्यावरणाच्या प्रश्नावर संपूर्ण जग चिंतेत असताना तो सोडवण्यासाठी 'मन की बात'चा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे.
मित्रांनो, यावेळी मला युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले यांनी 'मन की बात' विषयी एक विशेष संदेश पाठवला आहे. 100 भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. प्रथम आपण युनेस्कोच्या महासंचालकांची मन की बात ऐकूया.
#Audio (UNESCO DG)#
युनेस्को महासंचालक - नमस्ते महामहिम, प्रिय पंतप्रधानजी, रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी युनेस्को च्या वतीने तुमचे आभार मानतो. युनेस्को आणि भारताचा इतिहास समान आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहिती या सर्व क्षेत्रात आमची एकत्रित मजबूत भागीदारी आहे आणि मला मिळालेल्या या संधीच्या माध्यमातून आज शिक्षणाचे महत्त्व सांगायचे आहे.2030 पर्यंत जगातील प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी UNESCO त्याच्या सदस्य राष्ट्रांसोबत काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले आपण कोणते प्रयत्न करत आहात याबाबत माहिती द्याल का? युनेस्को संस्कृतीला पाठिंबा देण्याचे आणि वारशाचे संरक्षण करण्याचे देखील कार्य करते आणि भारत यावर्षी G-20 चे अध्यक्षस्थान भूषवत आहे.या कार्यक्रमासाठी जागतिक नेते दिल्लीत येणार आहेत. महामहिम, भारत आंतरराष्ट्रीय विषयसूचीमध्ये संस्कृती आणि शिक्षणाला कसे मांडणार आहे? या संधीसाठी मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे आणि तुमच्या माध्यमातून भारतातील लोकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो.... लवकरच भेटू. खूप खूप धन्यवाद.
पंतप्रधान मोदी - धन्यवाद, महामहिम. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागात तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. शिक्षण आणि संस्कृती यासारखे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत याचाही मला आनंद आहे.
मित्रांनो, युनेस्कोच्या महासंचालकांना शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षणा संदर्भातील भारताच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे दोन्ही विषय 'मन की बात'चे आवडते विषय आहेत.
शिक्षण असो वा संस्कृती, तिचे जतन असो वा संवर्धन असो, ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आज देश या दिशेने जे कार्य करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा पर्याय असो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश असो, असे अनेक प्रयत्न तुम्हाला दिसतील.काही वर्षांपूर्वीगुजरातमध्ये, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 'गुणोत्सव आणि शाला प्रवेशोत्सव' यासारखे कार्यक्रम हे लोकसहभागाचे एक अद्भुत उदाहरण म्हणून स्थापित झाले होते. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांवर आम्ही 'मन की बात' मध्येप्रकाशझोत टाकला आहे. तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही ओदिशातील चहा विक्रेते स्वर्गीय डी. प्रकाश राव यांच्याबद्दल चर्चा केली होती, ज्यांनी गरीब मुलांना शिकवण्याची मोहीम सुरु केली होती.झारखंडच्या गावांमध्ये डिजिटल लायब्ररी चालवणारे संजय कश्यप असोत किंवा मग कोविडच्या काळात ई-लर्निंगद्वारे अनेक मुलांना मदत करणाऱ्या हेमलता एन.के. असोत अशा अनेक शिक्षकांची उदाहरणे आम्ही 'मन की बात'मध्ये घेतली आहेत. सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रयत्नांनबद्दल देखील आम्ही 'मन की बात' मध्ये सतत चर्चा केली आहे.
लक्षद्वीपचा कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब असो, किंवा कर्नाटकचे ‘क्वेमश्री’ जी'कला चेतना' सारखे व्यासपीठ असोत, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मला पत्र लिहून अशी उदाहरणे पाठवली आहेत. देशभक्तीवरील 'गीत', 'अंगाई’ आणि 'रांगोळी' या तीन स्पर्धांबद्दलही आम्ही बोललो होतो.तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही देशभरातील कथाकारांसोबत कथाकथनाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतींवर चर्चा केली होती. सामूहिक प्रयत्नांमुळे मोठ्यातील मोठा बदल घडवून आणता येतो यावर माझा अढळ विश्वास आहे. या वर्षी, आपण स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असतानाच G-20 चे अध्यक्षपदही भूषवत आहोत. शिक्षणासोबत वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ होण्याचे हे देखील एक कारण आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतके आपल्या मनाला प्रेरणा देत आहे.
चरैवेति चरैवेति चरैवेति |
चालत राहा चालत राहा चालत राहा
चरैवेती चरैवेती याच भावनेने आज आम्ही 'मन की बात'चा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये, 'मन की बात' हा माळेतील उभ्या आडव्या
धाग्यासारखा आहे जो प्रत्येक मणी एकत्र गुंफून ठेवण्यात मदत करतो. प्रत्येक भागात देशवासीयांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक देशवासी इतर देशवासीयांसाठी प्रेरणा बनत आहे.एक प्रकारे, मन की बातचा प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी पार्श्वभूमी तयार करतो. 'मन की बात' नेहमीच सद्भावना, सेवाभावनेने आणि कर्तव्यभावनेने पुढे गेली आहे.हीच सकारात्मकता स्वातंत्र्याच्या काळात देशाला पुढे नेईल, एका नव्या उंचीवर नेईल आणि मला आनंद आहे की 'मन की बात' ची जी सुरुवात झाली होती ती आज देशात एक नवीन परंपरा बनत आहे. एक अशी परंपरा ज्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचे प्रयत्न दिसून येतात.
मित्रांनो, हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय संयमाने ध्वनिमुद्रित करणाऱ्या आकाशवाणीच्या सहकाऱ्यांचेही मी आज आभार मानू इच्छितो. अत्यंत कमी वेळात आणि अतिशय वेगाने 'मन की बात'चे विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या भाषांतरकारांचाही मी आभारी आहे. मी दूरदर्शन आणि MyGovच्या सहकाऱ्यांचेही आभार मानतो.कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीशिवाय ‘मन की बात’ दाखवणाऱ्या देशभरातील सर्व वाहिन्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या लोकांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी, भारतातील लोक, भारतावर विश्वास ठेवणारे लोक ज्यांनी ‘मन की बात’ चे हे धनुष्य लीलया पेलले आहे, हे सर्व केवळ तुमची प्रेरणा आणि शक्तीमुळेच शक्य झाले आहे.
मित्रांनो, आज मला इतकं काही सांगायचं आहे की वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तुमच्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासीयांच्या यशाचा आनंद साजरा करूया, तोपर्यंत मला निरोप द्या आणि तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद नमस्कार |
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या चर्चेला सुरूवात करताना मनात किती प्रकारचे भाव दाटून येत आहेत. आपली आणि आमची ही ‘मन की बात’ मध्ये सुरू झालेली साथ आज ९९ व्या पायरीवर य़ेऊन पोहचली आहे. साधारणतः आपण नेहमी ऐकतो की ९९ वी फेरी खूप अवघड असते. क्रिकेटमध्ये तर नर्व्हस नाईंटीज म्हणजे नव्वदी ओलांडणे अत्यंत अवघड मुक्काम मानला जातो. परंतु, जेथे भारतात जनमानसात ‘मन की बात’ असते, तेथे प्रेरणा काही वेगळीच असते. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ‘मन की बात’ च्या शंभराव्या भागाबाबत आज देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मला खूप सारे संदेश येत आहेत, दूरध्वनी येत आहेत. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत, नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत आहोत, तेव्हा शंभराव्या भागाबाबत आपल्या सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आपल्या या सूचना आणि मते 30 एप्रिल रोजी होणाऱ्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला अधिकच संस्मरणीय बनवतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.
मित्रांनो, आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या या टप्प्यात अवयव दान, एखाद्याला जीवन देणं हे एक मोठं माध्यम बनलं आहे. असं म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युनंतर त्याचं शरीर दान करते तेव्हा त्यातून ८ ते ९ जणांना एक नवं आयुष्य मिळायची शक्यता तयार होते. आनंदाची बाब ही आहे की आज देशात अवयव दान याप्रती जागरूकता वाढत चालली आहे. २०१३ या वर्षी, आमच्या देशात अवयव दानाच्या ५ हजारापेक्षाही कमी प्रकरणे होती. परंतु आज २०२२ मध्ये, त्यांची संख्या वाढून, १५ हजाराहून अधिक झाली आहे. अवयव दान करणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबियांनी खरोखरच, खूप पुण्याचं काम केलं आहे.
मित्रांनो, प्रदीर्घ काळापासून मला वाटत होतं की असं पुण्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मन की बात मी जाणून घ्यावी आणि ती देशवासियांबरोबर सामायिक करावी. म्हणून आज, मन की बात मध्ये आमच्यासोबत एक गोंडस मुलगी. एक सुंदर बाहुलीसारख्या मुलीचे पिता आणि त्यांची आई आमच्याशी जोडली जात आहे. वडिलांचे नाव सुखबीर सिंह संधूजी आणि आईंचं नाव सुप्रीत कौर जी आहे आणि हा परिवार पंजाबातील अमृतसर मध्ये राहतो. खूप नवससायास केल्यावर त्यांना एक सुंदर बाहुलीसारखी कन्येची प्राप्ती झाली होती. घरातील लोकांनी तिचं नाव अत्यंत प्रेमानं ठेवलं होतं. अबाबत कौर. अबाबत याचा अर्थ आहे इतरांच्या सेवेशी जोडून घेणं, त्यांचे कष्ट दूर करण्याशी जोडून घेणं. अबाबत जेव्हा केवळ ३९ दिवसांची होती, तेव्हा ती हे जग सोडून गेली. परंतु सुखबीर सिंह संधूजी आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर जी यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी एक अत्यंत प्रेरणादायक निर्णय घेतला. हा निर्णय होता, ३९ दिवसांच्या कन्येच्या अवयवांचं दान करणं. आमच्यासोबत आता फोन वर सुखबीर सिंह आणि त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत. या, त्यांच्याशी चर्चा करू या.
पंतप्रधान: सुखबीर जी नमस्ते.
सुखबीर जीः नमस्ते माननीय प्रधानमंत्री जी,. सत श्री अकाल
पंतप्रधान : सत श्री अकाल जी, सत श्री अकाल जी. सुखबीर जी, मी आज मन की बातसंबंधी विचार करत होतो तेव्हा मला वाटलं की अबाबतची गोष्ट इतकी प्रेरणादायक आहे तर आपल्याच तोंडून ती ऐकावी. कारण घरात जेव्हा एखाद्या कन्येचा जन्म होतो तेव्हा अनेक स्वप्ने अनेक आनंद घेऊन येतात, परंतु जेव्हा कन्या लवकर गेली तर ते दुःख किती भयंकर असते, त्याचा अंदाज मी लावू शकतो. ज्या प्रकारे आपण निर्णय़ घेतला, त्याबाबत मी सारी गोष्ट आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.
सुखबीर जीः सर, ईश्वरानं आम्हाला खूप चांगली कन्या दिली होती. खूप लाडकी बाहुली आमच्या घरात आली होती. तिचा जन्म झाल्याबरोबरच आम्हाला कळलं की तिच्या मेंदूत एक असा मज्जातंतूंचा गुंता बनला आहे की त्यामुळे तिच्या ह्रदयाचा आकार मोठा होत आहे. आम्ही अस्वस्थ झालो की मुलीची प्रकृती तर इतकी चांगली आहे, इतकी सुंदर मुलगी आहे, आणि इतकी मोठी समस्या घेऊन जन्माला आली आहे. तर पहिले चोवीस दिवसांपर्यंत तर सर्व काही ठीक होतं. मुलगी एकदम सामान्य होती. अचानक तिच्या ह्रदयानं काम करणं थांबवलं. तर आम्ही तिला ताबडतोब रूग्णालयात घेऊन गेलो. तेथील ड़ॉक्टरांनी तिला पुनरूज्जीवित तर केलं, पण हे समजण्यास वेळ लागला की इतकी काय समस्या आली की, इतकी लहान मुलगी आणि अचानक तिला ह्रदयविकाराचा झटका आला. तिला आम्ही उपचारांसाठी चंडीगढला पीजीआय रूग्णालयात घेऊन गेलो. तेथे अत्यंत धाडसानं त्या मुलीनं उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी संघर्ष केला. परंतु आजारच असा होता की, इतक्या लहान वयात तो शक्यच नव्हता. डॉक्टरांनी तिला पुन्हा जीवित करण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु ती सहा महिन्यांपर्यंत जगली असती तर तिच्यावर शस्त्रक्रियेचा विचार केला असता. परंतु ईश्वराच्या मनात भलतेच काही होते. केवळ ३९ दिवसांची झाली असतानाच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला पुन्हा झटका आला आहे. आता मुलगी वाचण्याची आशा खूपच कमी आहे. तेव्हा आम्ही पती पत्नी रडत रडतच अशा निर्णयावर आलो. आम्ही ती शौर्यानं आजाराशी झगडत असताना आम्ही पाहिलं होतं. वारंवार असं वाटत होतं की ती आता जाईल आणि ती पुन्हा जीवित होत होती. आम्हाला असं वाटलं की आता या मुलीचा इथं येण्याचा काही उद्देश आहे. डॉक्टरानीही हात टेकले. तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं की या मुलीचे अवयव आम्ही दान का करू नयेत. कदाचित दुसऱ्या एखाद्याच्या जीवनात प्रकाश येईल. मग आम्ही पीजीआयचा जो प्रशासकीय विभाग आहे, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की इतक्या लहान मुलीची केवळ किडनीच दान केली जाऊ शकते. परमेश्वरानं आम्हाला हिमत दिली आणि गुरू नानक साहेब यांचं हेच तत्वज्ञान आहे. तेव्हा याच विचारात आम्ही तो निर्णय घेतला.
पंतप्रधान: गुरूंनी जी शिकवण दिली आहे, ती आपण प्रत्यक्षात अंगीकारून दाखवली आहे जी. सुप्रीत जी आहेत का. त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं का?
सुखबीर जी– होय सर.
सुप्रीत जी– हॅलो
पंतप्रधान : सुप्रीत जी, मी आपल्याला प्रणाम करतो.
सुप्रीत जीः नमस्कार सर नमस्कार. सर आमच्यासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण आमच्याशी बोलत आहात.
पंतप्रधान : आपण इतकं मोठं काम केलं आहे आणि मी असं मानतो की पूर्ण देश जेव्हा ही सारी चर्चा ऐकेल तेव्हा कितीतरी लोक इतर कुणाचे जीव वाचवण्यासाठी पुढे येतील. अबाबतचं जे योगदान आहे, ते खूप मोठं आहे.
सुप्रीत जी: सर, गुरू नानक बादशहा यांची कृपाच होती की त्यांनी आम्हाला असा निर्णय घेण्याची हिमत दिली.
पंतप्रधान : गुरूकृपेशिवाय तर काहीच होऊ शकत नाही जी.
सुप्रीत जीः बिलकुल सर, बिलकुल |
पंतप्रधान : सुखबीर जी, आपण जेव्हा रूग्णालयात असाल आणि हा हादरवून टाकणारी बातमी डॉक्टरानी आपल्याला दिली त्यानंतरही आपण आणि आपल्या पत्नीनं अत्यंत धीरोदात्तपणे इतका मोठा निर्णय घेतला. गुरूंची शिकवण हीच असते की आपल्या मनात इतका मोठा उदार विचार आला आणि खरोखरच अबाबतचा अर्थ सामान्य भाषेत सांगायचा तर मदत करणारा असा आहे. हे काम आपण कसं केलं. त्या क्षणाला मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.
सुखबीर जी– सर, वास्तवात आमच्या एक कौटुंबिक मित्र आहेत प्रिया जी. त्यांनी आपले अवयव दान केले होते. त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली तर तेव्हा तर आम्हाला वाटलं की हे जे शरीर आहे, ते तर पंचतत्वात विलीन होईल. जेव्हा कुणी कायमचा अंतरतो तेव्हा त्याचं शरीर जाळून टाकलं जातं किंवा दफन केलं जातं. परंतु त्याचे अवयव दुसर्या कुणाच्या उपयोगी आले तर हे भलाईचं काम आहे. आणि त्यावेळी आम्हाला अभिमान वाटला की जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आपली कन्या, भारताची सर्वात लहान दाता बनली आहे. जिचे अवयवांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहेत. तर आमची मान अभिमानानं ताठ झाली. आम्ही आमच्या आईवडिलांचं नाव तर जीवनभर उजळवू शकलो नाही. पण आमच्या मुलीनं, इतक्या लहान मुलीनं आमचं नाव उजळून टाकलं. याहून मोठी गोष्ट ही आहे की आज या विषयावर आपल्याशी बोलणं होत आहे. आम्हाला अभिमान वाटत आहे.
पंतप्रधान : सुखबीर जी, आज आपल्या मुलीचां एक अवयव जिवंत आहे, असं नाही. आपली कन्या मानवतेच्या अमर कथेची अमर प्रवासी बनली आहे. आपल्या शरीरातील अंशरूपी अवयवाच्या रूपानं ती आज ही याच जगात आहे. या उदात्त कार्यासाठी मी आपली, आपल्या पत्नीची, आपल्या कुटुंबाची प्रशंसा करतो.
सुखबीर जीः थँक यू सर.
मित्रांनो, अवयव दानाची सर्वात मोठी भावना हीच असते की जाता जात इतर कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाचा तरी जीव वाचावा. जे लोक, अवयव दानाची प्रतीक्षा करत असतात, त्यांना हे ठाऊक असतं की प्रतीक्षेचा एक एक क्षण व्यतीत करणं किती अवघड असतं. आणि अशात कुणी अवयव दान किंवा देहदान करणारा एखादा मिळतो, तेव्हा त्याच्यात त्यांना साक्षात ईश्वराचं रूपच दिसू लागतं.
झारखंडमध्ये राहणाऱ्या स्नेहलता चौधरी या अशाच होत्या ज्यानी ईश्वर होऊन इतरांना नवजीवन दिलं. ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरीजी, आपलं ह्दय, किडनी आणि यकृत दान करून गेल्या. आज मन की बात मध्ये, त्यांचे पुत्र अभिजीत चौधरी आमच्याबरोबर आहेत. या, त्यांच्याकडून ऐकू या.
पंतप्रधान : अभिजीत जी नमस्कार |
अभिजीत जीः प्रणाम सर |
पंतप्रधान : अभिजीत जी, आपण अशा मातेचे पुत्र आहात की ज्यांनी आपल्याला जन्म देऊन एक प्रकारे आपल्याला जीवन दिलंच आहे. पण मृत्युनंतरही आपल्या माताजींनी अनेक लोकांना जीवन देऊन गेल्या आहेत. एक पुत्र या नात्यानं आपल्याला निश्चितच त्यांचा अभिमान वाटत असणार.
अभिजीत जीः हो सर.
पंतप्रधान : आपण आपल्या माताजींबद्दल जरा सांगा. कोणत्या परिस्थितीत अवयव दानाचा निर्णय घेतला गेला?
अभिजीत जीः माझी आई सराईकेला म्हणून एक छोटंसं खेडं आहे झारखंडमध्ये. तेथे माझे मम्मी पपा रहात होते. ते गेल्या पंचवीस वर्षांपासून सकाळी चालण्याचा व्यायाम करत. आणि आपल्या सवयीनुसार ४ वाजता सकाळच्या फेरीला निघाले होते. त्यावेळी मोटरसायकल स्वारानं त्यांना मागून ठोकर दिली आणि माताजी तेथेच पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ताबडतोब आम्ही त्यांना सराईकेला इथल्या सदर रूग्णालयात घेऊन गेलो जेथे डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी केली. परंतु रक्तस्त्राव खूपच होत होता. आणि त्यांना कशाचीच जाणीव राहिली नव्हती. लगेच आम्ही त्यांना टाटा मुख्य रूग्णालयात घेऊन गेलो. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ४८ तास त्यांचं निरीक्षण केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे वाचण्याची संधी खूपच कमी आहे. मग आम्ही त्यांना विमानानं दिल्ली एम्सला घेऊन आलो. इथं त्यांच्यावर जवळपास ७-८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर स्थिती एकदम चांगली होती. परंतु त्यांचा रक्तदाब इतका खाली आला की त्यानंतर असं समजलं की त्यांचा मेंदू मृत झाला आहे. तेव्हा डॉक्टर आम्हाला अवयव दानासंबंधी माहिती देत होते. आम्ही आमच्या वडलांना अवयव दान अशी काही गोष्ट असते, हे समजावून सांगू शकत नव्हतो. परंतु आम्हाला वाटलं की जी गोष्ट ते स्वीकारू शकणार नाहीत, तेव्हा असं काही चालू आहे, हे त्यांच्या मनातून आम्ही काढू पहात होतो. जसं आम्ही त्यांना सांगितलं की अवयव दानासंबंधी चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यांन सांगितलं की नाही, मम्मीची अशी खूप इच्छा होती आणि आम्हाला तसं करायचं आहे. मम्मी वाचणार नाही, हे समजेपर्यंत आम्ही खूप निराश होतो. पण जसं आम्हाला जेव्हा अवयव दानासंबंधी चर्चा सुरू झाली तेव्हा ही चर्चा सकारात्मक बाजूकडे गेली आणि आम्ही अत्यंत चांगल्या सकारात्मक वातावरणात आलो. ती प्रक्रिया चालू असतानाच पुन्हा रात्री ८ वाजता समुपदेशन पुन्हा झालं. दुसर्या दिवशी आम्ही अवयव दान केलं. त्यात मम्मीच्या विचारांचा भाग खूपच महत्वाचा होता. कारण त्या प्रथमपासूनच नेत्रदान आणि यासारख्या सामाजिक कार्यात खूपच सक्रीय होत्या. कदाचित याच विचारांनी हा इतका मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो. आणि माझ्या वडलांचा जो अंतिम निर्णय होता, त्यामुळे ही गोष्ट होऊ शकली.
पंतप्रधान : किती लोकांसाठी त्यांचे अवयव कामी आले?
अभिजीत जीः त्यांचं ह्रदय, दोन किडनी, यकृत आणि दोन नेत्र यांचं दान केलं गेलं आणि चार लोकांचे जीव वाचले तर दोघा जणांना नवी दृष्टी मिळाली.
पंतप्रधान: अभिजीत जी, आपले आई आणि वडिल दोघेही वंदनीय आहेत. मी त्यांना प्रणाम करतो. आपल्या पिताजींनी इतका मोठा निर्णय घेतला, कुटुबींयांचं नेतृत्व केलं, हे खरोखरच खूप प्रेरणादायक आहे आणि मी असं मानतो की आई तर आईच असते. आई ही स्वतःच एक प्रेरणादायक असते. परंतु परंपरांना छेद देऊन, प्रत्येक पिढ्यानुपिढ्या आई खूप मोठी शक्ती बनत जाते. अवयव दानासाठी आपल्या मातेची प्रेरणा आज देशापर्यंत पोहचत आहे. मी आपल्या या पवित्र कार्य आणि महान कार्यासाठी आपल्या संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. अभिजीत जी, धन्यवाद जी आणि आपल्या पिताजींना आमचा प्रणाम जरूर सांगा.
अभिजीत जीः अवश्य सर. धन्यवाद
मित्रांनो, ३९ दिवसांची अबाबत कौर असेल किंवा ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरी असतील, यांच्यासारखे दाते आपल्याला जीवनाचे महत्त्व पटवून देतात. आज आपल्या देशात असे अनेक गरजू लोक आहेत, जे निरामय जीवन लाभावे म्हणून मोठ्या आशेने अवयवदात्यांची वाट पाहत आहेत.
अवयव दानासाठी सुलभ कार्यप्रणाली असावी ह्यासाठी आणि लोकांना अवयव दान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशभरात समान धोरणा बाबत विचार केला जात आहे याबद्दल मला समाधान आहे. या दिशेने काम करताना, राज्यांच्या अधिवासाची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजेच आता रुग्ण देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन, अवयव मिळविण्यासाठी नोंदणी करू शकतील. पूर्वी अवयवदानासाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा होती, ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मी आपणां देशवासियांना विनंती करतो की आपण अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावे. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य सुधारु शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे नवरात्रीचे पर्व आहे. शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. आज जी भारताची क्षमता नव्याने उजळून सामोरी येत आहे, त्यात आपल्या महिलांचा मोठा वाटा आहे. सध्या तर अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.
तुम्ही सोशल मीडियावर आशियातील पहिली महिला रेल्वे लोको पायलट सुरेखा यादव जी यांना पाहिलं असेल. सुरेखा जी, अजून एक नवा मानदंड प्रस्थापित करत, वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या महिला लोको चालक झाल्या आहेत.
निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस ह्यांनी याच महिन्यात 'एलिफंट व्हिस्परर्स' या आपल्या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. देशासाठी आणखी एक गौरवाची बाब भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ, भगिनी ज्योतिर्मयी मोहंती जी यांनीही साध्य केली आहे. ज्योतिर्मयीजींना रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रात IUPAC विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे
जर आपण राजकारणात बघितले तर नागालँडमध्ये एक नवी सुरुवात झाली आहे. नागालँडमध्ये 75 वर्षांत प्रथमच दोन महिला आमदार जिंकून विधानसभेत पोहोचल्या आहेत. यापैकी एक नागालँड सरकारमध्ये मंत्रीही झाल्या आहेत, म्हणजेच पहिल्यांदाच राज्यातील जनतेला एक महिला मंत्री मिळाल्या आहेत.
मित्रांनो, तुर्कस्थानमधील विध्वंसक/ विनाशकारी भूकंपानंतर तिथल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या धाडसी मुलींना मी काही दिवसांपूर्वी भेटलो. ह्या सगळ्या एनडीआरएफच्या पथकात समाविष्ट झाल्या होत्या. त्यांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताने यूएन मिशन अंतर्गत संपूर्णपणे महिलांची अशी एक तुकडी देखील तैनात केली आहे. आज आपल्या देशाच्या कन्या, तिन्ही सैन्यदलात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. ग्रुप कॅप्टन शालिजा धामी कॉम्बॅट युनिटमध्ये कमांड नियुक्ती मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी झाल्या आहेत. त्यांच्याकडे सुमारे 3000 उड्डाण तासांचा अनुभव आहे.
त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या शूर कॅप्टन शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीनमध्ये, जेथे तापमान उणे साठ (-60) अंशांपर्यंत जाते तिथे शिवा चौहान तीन महिने तैनात असतील.
मित्रांनो, ही यादी इतकी मोठी आहे की सगळ्यांचा इथे उल्लेख करणे देखील अवघड आहे. अशा सर्व महिला, आमच्या मुली, आज, भारत आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा हाच विकसित भारतासाठी प्राणवायू आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल संपूर्ण जगभरात स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जेबद्दल खूप चर्चा होते आहे. मी जेव्हा जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते भारताच्या ह्या क्षेत्रातील अभूतपूर्व यशाविषयी नक्की चर्चा करतात. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगाने पुढे वाटचाल करतो आहे ती एक मोठीच उपलब्धी आहे. शतकानुशतके भारतातील लोकांचे सूर्याशी विशेष नाते आहे. आपल्या देशात सूर्याच्या शक्तीबद्दल जे वैज्ञानिक ज्ञान आहे, सूर्योपासनेची परंपरा आहे तसे इतर ठिकाणी फार क्वचित आढळते. मला आनंद आहे की आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे महत्त्व जाणतो आहे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्ये आपले योगदान देत आहे.
सर्वांचे प्रयत्न / 'सबका प्रयास' चे तत्वच आज भारताला सौरऊर्जा अभियानात पुढे घेऊन जात आहे.
महाराष्ट्रातील पुण्यामधील अश्याच एका उत्कृष्ट प्रयत्नाने माझे लक्ष वेधून घेतले आहे. एमएसआर-ऑलिव्ह गृहसंकुलातील लोकांनी ठरवले की ते त्यांच्या सामूहिक वापराच्या गोष्टी म्हणजे पिण्याचे पाणी, लिफ्ट/ उदवाहक आणि विद्युत प्रकाश यंत्रे आता सौर उर्जेनेच चालवतील. यानंतर या सोसायटीतील सगळ्यांनी एकत्र येऊन सौर पॅनेल्स लावले. आज या सौर पॅनेलमधून दरवर्षी सुमारे ९० हजार किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. अंदाजे दर महिन्याला 40,000 रुपयांची बचत होते आहे. या बचतीचा फायदा गृहसंकुलातील सर्वाना होतो आहे.
मित्रांनो, पुण्याप्रमाणेच दमण आणि दीवमधील दीव, जो एक वेगळा जिल्हा आहे, तिथल्या लोकांनीही चांगले काम केले आहे. सोमनाथजवळ दीव आहे हे तुम्हाला माहीत असेलच. दीव भारतातील असा पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे दिवसभरच्या संपूर्ण वापरासाठी 100% स्वच्छ ऊर्जा वापरली जात आहे. सर्वांचा प्रयत्न/ सबका प्रयास हाच दीव च्या या यशाचाही मंत्र आहे. कधीकाळी इथे वीज उत्पादनासाठी संसाधनांचे आव्हान होते. लोकांनी ह्या समस्येचा उपाय म्हणून सौर ऊर्जा निवडली. तिथे नापीक ओसाड जमीन आणि अनेक इमारतींवर सौर पॅनेल्स/ सौर पत्रे बसवण्यात आले. या पॅनेल्समुळे दिवसभरासाठी दीव ची जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जाशक्ती निर्माण होते आहे.या सौर प्रकल्पामूळे वीज खरेदीवर होणाऱ्या खर्चातील सुमारे 52 कोटी रुपये वाचले आहेत. ह्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते आहे.
मित्रांनो, त्यांनी पुणे आणि दीवमध्ये केले तसे प्रयत्न देशभरात इतरही अनेक ठिकाणी होत आहेत. यावरून असे दिसून येते की आपण भारतीय लोक पर्यावरण आणि निसर्गाबाबत किती संवेदनशील आहोत आणि आपला देश भावी पिढीविषयी किती जागरूक आहे. अशा सर्व प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार अनेक परंपरा विकसित होतात. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीची शक्ती वाढवतात आणि तिला नित्यनूतन प्राणशक्ती प्रदान करतात. काही महिन्यांपूर्वी काशी मध्ये अशी एक परंपरा सुरू झाली.
काशी -तमिळ संगममध्ये, काशी आणि तामिळ प्रदेशाच्या दरम्यान शतकानुशतके असलेले जुने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध साजरे केले गेले. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' ही भावना आपल्या देशाला शक्ती देते. जेव्हा आपण एकमेकांना ओळखतो, जाणतो तेव्हा एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. एकात्मतेच्या ह्याच भावनेने पुढील महिन्यात गुजरातच्या विविध भागांमध्ये 'सौराष्ट्र-तमिळ संगम' होणार आहे.हा 'सौराष्ट्र-तमिळ संगम' 17 ते 30 एप्रिलपर्यंत चालेल. 'मन की बात'चे काही श्रोते विचार करत असतील, की गुजरातमधील सौराष्ट्राचा तामिळनाडूशी काय संबंध? खरं तर, अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्रातील अनेक लोक तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले होते. हे लोक आजही 'सौराष्ट्री तमिळ' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली, सामाजिक संस्कार ह्या सगळ्यांत आजही सौराष्ट्राची थोडीशी झलक पाहायला मिळते. मला तामिळनाडूतील अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाची पत्रे पाठवली आहेत. मदुराईत राहणाऱ्या जयचंद्रन जी ह्यांनी अतिशय भावूक होऊन लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की - “हजारो वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी, सौराष्ट्र-तामिळ संबंधांचा विचार केला आहे. सौराष्ट्रातून तामिळनाडूत स्थायिक झालेल्या लोकांची विचारपूस केली आहे. जयचंद्रन यांचे हे शब्द हजारो तमिळ बंधू-भगिनींची भावना व्यक्त करीत आहेत.
मित्रांनो, मला 'मन की बात' च्या श्रोत्यांना आसामशी संबंधित एका बातमीबद्दल सांगायचे आहे. ही देखील 'एक भारत-श्रेष्ठ'भारत' ह्या भावनेला बळ देते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण वीर लसीत बोरफुकन जी यांची ४०० वी जयंती साजरी करत आहोत. वीर लसीत बोरफुकन ह्यांनी जुलमी मुघल राजवटीच्या हातून सोडवून गुवाहाटी स्वतंत्र केली. आज देशाला या महान योद्ध्याचे अदम्य धैर्य माहिती होते आहे. काही दिवसांपूर्वी लसीत बोरफुकनच्या जीवनावर आधारित निबंध लिहिण्याची मोहीम/ योजना आखली गेली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी सुमारे 45 लाख लोकांनी निबंध पाठवले. आणि हे ही जाणून तुम्हाला आनंद होईल की हा एक गिनीज रेकॉर्ड तयार झाला आहे. आणि सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट ही आहे की वीर लसीत बोरफुकन यांच्यावर सुमारे 23 वेगवेगळ्या भाषांमध्ये निबंध लिहून पाठवले गेले आहेत. ह्या मध्ये आसामी भाषा तसेच हिंदी, इंग्रजी, बांगला, बोडो, नेपाळी, संस्कृत, संथाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांनी निबंध पाठवले आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा काश्मीर किंवा श्रीनगरचा विषय येतो तेव्हा तर सर्वात आधी आपल्यासमोर काश्मीरमधील डोंगर दऱ्यांचे आणि दल सरोवराचे चित्र येते. आपल्यापैकी प्रत्येकजणच दल सरोवराच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेऊ इच्छितो. पण, दल सरोवरात आणखी एक गोष्ट खास आहे. दल सरोवर, आपल्या मधुर कमल देठ किंवा कमल काकडीसाठी प्रसिद्ध आहे.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कमळाचे देठ वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. . काश्मीरमध्ये त्यांना नादरू म्हणतात. काश्मीरच्या नादरुंची मागणी सातत्याने वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन दल सरोवरात नादरुची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक एफपीओ तयार केला आहे. या एफपीओमध्ये सुमारे 250 शेतकरी सामील झाले आहेत. आज हे शेतकरी आपण लागवड केलेले नादरू परदेशात देखील पाठवत आहेत.
काही काळापूर्वीच या शेतकऱ्यांनी यूएईला दोनदा माल पाठवला होता. हे यश काश्मीरचे नाव तर उंचावत आहेच पण ह्या सोबतच शेकडो शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.
मित्रांनो, काश्मीरमधील शेतीशी संबंधित लोकांचा आणखी एक प्रयत्न आजकाल आपल्या यशाचा सुगंध पसरवत आहे. मी यशाच्या सुगंधाविषयी का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! पण ती आहेच सुगंधाची गोष्ट! जम्मू-काश्मीर मधील दोडा जिल्ह्यातील भदरवाह हे एक शहर आहे. वास्तविक अनेक दशकांपासून येथील शेतकरी पारंपारिक मका शेती करत होते, पण काही शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. फ्लोरिकल्चर, म्हणजे फुलांची लागवड, फुलांच्या शेतीकडे ते वळले. आज सुमारे अडीच हजार शेतकरी लॅव्हेंडरची लागवड करत आहेत.त्यांना केंद्र सरकारच्या सुगंध योजनेने देखील मदत केली आहे. या नवीन शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ केली आहे आणि आज लॅव्हेंडरसह, त्यांच्या यशाचा सुगंधही दूरवर पसरत आहे.
मित्रांनो, काश्मीरची गोष्ट असेल, कमळाचा विषय असेल, फुलाची बात असेल, सुगंधाची गोष्ट असेल तर कमळाच्या फुलावर विराजमान असणाऱ्या माता शारदेची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडामध्ये शरद मातेच्या भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर त्याच मार्गावर बांधले गेले आहे जिथून पूर्वी लोक शारदा पीठाच्या दर्शनाला जात असत. स्थानिक लोकांनी ह्या मंदिराच्या उभारणीसाठी खूप मदत केली आहे. या शुभ कार्यासाठी मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी 'मन की बात' मध्ये इतकेच. पुढच्या वेळी, आपण ‘मन की बात’च्या 100 व्या भागात भेटू या. आपण सर्वांनी आपल्या सूचना जरूर पाठवाव्यात.
या मार्च महिन्यात आपण होळीपासून नवरात्रीपर्यंत अनेक सण, उत्सवात सहभागी झालो होतो. रमजानचा पवित्र महिनादेखील सुरू झाला आहे. लवकरच काही दिवसांत श्री रामनवमीचा महाउत्सवही येणार आहे. त्या नंतर महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि इस्टरही येतील. एप्रिलच्या महिन्यात, आपण भारतातील दोन महान व्यक्तींच्या जयंती देखील साजऱ्या करतो. हे दोन महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात आपण अशा महान व्यक्तींकडून शिकण्याची आणि सतत प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपले कर्तव्य आपण अग्रस्थानी ठेवले पाहिजे. मित्रांनो, सध्या काही ठिकाणी कोरोना वाढत आहे. म्हणून तुम्ही सर्वानी सुरक्षिततेची आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यायची आहे. पुढच्या महिन्यात, 'मन की बात' च्या शंभराव्या (100 व्या) भागात, आपण भेटू या. तोपर्यंत निरोप द्या.
धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ च्या या 98 व्या भागात तुम्हा सर्वांसोबत चर्चा करताना मला खूप आनंद होत आहे. 100 व्या भागाकडे वाटचाल करणाऱ्या या प्रवासात, ‘मन की बात’ ला तुम्ही सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे एक अप्रतिम व्यासपीठ बनविले आहे. प्रत्येक महिन्याला, लाखो संदेशांच्या माध्यमातून कित्येक लोकांची ‘मन की बात’ माझ्या पर्यंत पोहोचते. तुम्हाला तर तुमच्या मनाची ताकद माहीतच आहे, त्याचप्रमाणे समाजाच्या ताकदीने कशाप्रकारे देशाची ताकद वृद्धिंगत होते, हे आपण ‘मन की बात’ च्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिले आहे, समजून घेतले आहे आणि मी याचा अनुभव घेतला आहे – स्वीकारले देखील आहे. मला तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही ‘मन की बात’ मध्ये भारतातील पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत बोललो होतो. त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, त्यांचा आनंद घेण्याची, ते शिकण्याची एक लाट निर्माण झाली. ‘मन की बात’ मध्ये जेव्हा भारतीय खेळण्यांची चर्चा झाली, तेव्हा देशातील लोकांनी लगेचच याला देखील प्रोत्साहन दिले. आता तर भारतीय खेळण्यांची इतकी क्रेझ झाली आहे की परदेशात देखील याची मागणी खूपच वाढत आहे. जेव्हा आम्ही 'मन की बात' मध्ये कथा-कथनाच्या भारतीय शैलींबद्दल बोललो तेव्हा त्यांची कीर्तीही दूरवर पोहोचली. भारतीय कथा-कथन प्रकारांकडे लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत.
मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल, सरदार पटेल यांची जयंती अर्थात ‘एकता दिवस’ चे औचित्य साधत ‘मन की बात’ मध्ये आम्ही तीन स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धेत देशभक्तीपर 'गाणी’, 'अंगाई, आणि 'रांगोळी' यांचा समावेश होता. मला कळविण्यात आनंद होत आहे की, देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे. यामध्ये लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि 20 हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. तुमच्यातील प्रत्येकजण विजेता आहे, कलेचा उपासक आहे. देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे.
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.
मित्रांनो, अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी.एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या‘ मलगू कन्दा’ (Malagu Kanda)या अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाई मधून मिळाली आहे. ही अंगाई ऐकल्यावर तुम्हालाही तो आनंद मिळेल.
“निज रे माझ्या बाळा,
माझ्या शहाण्या बाळा, निज तू,
सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे,
निद्र देवी येईल,
चांदण्याच्या बागेतून, स्वप्ने घेऊन येईल,
निज रे बाळा, निज रे बाळा,
जोजो...जो..जो..
जोजो...जो..जो..”
आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी लिहिलेल्या अंगाई मध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे.
कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत,
झोळीमध्ये काय आहे?
कुंभाराची झोळी उघडून पाहिले तर,
झोळीत होती सुंदरशी वाटी!
आमच्या छकुलीने कुंभाराला विचारले,
कशी दिली ही छोटीशी वाटी!
गाणी आणि अंगाई प्रमाणेच रांगोळी स्पर्धाही खूप गाजली. सहभागींनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या. यामध्ये पंजाबच्या कमल कुमार विजेते ठरले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग, तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचे शौर्य चित्रित केले होते. गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली, तर पुद्दुचेरीतील मालतीसेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांवर लक्ष केंद्रित केले.देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी. विजय दुर्गाजी या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी तेलुगुमध्ये प्रवेशिका पाठवली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नरसिंह रेड्डी गारू जी यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्हीही ऐका विजय दुर्गाजींच्या प्रवेशिकेचा हा भाग
रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तुम्ही अंकुर आहात, अंकुश आहात!
इंग्रजांच्या अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून
तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला!
रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !
तेलुगु नंतर आता मी तुम्हाला मैथिली मधील एक ध्वनिफीत ऐकवतो. ही दीपक वत्स जी यांनी पाठवली आहे. या स्पर्धेत त्यांनी देखील बक्षीस पटकावले आहे.
भारत जगाचा अभिमान आहे,
आपला देश महान आहे,
तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला,
उत्तरेकडे विशाल कैलाश आहे,
गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी,
कोशी, कमला बलान आहे,
आपला देश महान आहे.
तिरंग्यात आमचा प्राण आहे
मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडले असेल. स्पर्धेत आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे. तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन, तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पहा आणि ऐका - तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गोष्ट वाराणसीची असो, शहनाईबद्दल असो, उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल असो, माझे लक्ष त्याकडे जाणे स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार' प्रदान केले. संगीत आणि प्रायोगिक कला (परफॉर्मिंग आर्ट्स) क्षेत्रातील उदयोन्मुख, प्रतिभावान कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात.हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यात देखील आपला हातभार लावत आहेत. काळानुसार ज्या वाद्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती अशा वाद्यांना नव संजीवनी प्रदान करणाऱ्या कलाकारांचा देखील यात समावेश आहे. आता तुम्ही सर्व ही धून नीट ऐका.....
हे कोणते वाद्य आहे तुम्हाला माहीत आहे का? शक्यता फारच कमी आहे! या वाद्याचे नाव 'सुरसिंगार' असून ही धून जयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जयदीप जी यांचा समावेश आहे.50 आणि 60 च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले होते, पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जयदीप प्रयत्नशील आहेत.
त्याचप्रमाणे उप्पलपू नागमणी जी यांचा प्रयत्न देखील खूप प्रेरणादायी आहे, ज्यांना मँडोलिनमध्ये कर्नाटक शैलीतील वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत - व्ही दुर्गा देवी जी यांना 'करकट्टम' या प्राचीन नृत्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराचे आणखी एक विजेते, राज कुमार नायक जी यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरीनी ओडिसीचे आयोजन केले होते. आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावाने ओळखतात. पेरिनी नाट्यम, शंकराला समर्पित एक नृत्य आहे जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होते. या घराण्याची मुळे आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत.साइखौमसुरचंद्रासिंहहे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत. हे मैतेईपुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वाद्य मणिपूरचे आहे. पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे, जो राजुला-मालुशाही, न्यौली, हुडका बोल, जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करत आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफीत देखील त्यांनी तयार केल्या आहेत. पूरण सिंह जी यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.वेळेच्या मर्यादेमुळे कदाचित सर्व पुरस्कार विजेत्यांबद्दल मला इथे बोलता येणार नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचाल. मला आशा आहे की हे सर्व कलाकार,प्रयोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक काना-कोपऱ्यात दिसत आहे. डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध अॅप्सचा मोठा वाटा आहे. असेच एक अॅप म्हणजे ई-संजीवनी. या अॅपवरून टेलि-कन्सल्टेशन, म्हणजे दूर बसून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलि-कन्सल्टेशनची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 कोटी टेलि-कन्सल्टेशन! रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अप्रतिम नाते –हे एक मोठे यश आहे. या यशाबद्दल मी सर्व डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे अभिनंदन करतो.भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला कशाप्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आपण पाहिलं आहे की, कोरोनाकाळात ई-संजीवनी अॅपच्या माध्यमातून टेलि-कन्सल्टेशन लोकांसाठी एक उत्तम वरदान ठरलं. मलाही वाटले की, 'मन की बात'मध्ये आपण एक डॉक्टर आणि एका रुग्णाशी याविषयी बोलून, संवाद साधून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी. लोकांसाठी टेलि-कन्सल्टेशन किती प्रभावी ठरले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत सिक्कीमचे डॉ. मदन मणिआहेत. डॉ. मदन मणी सिक्कीममध्ये राहतात, परंतु त्यांनी धनबादमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एमडी केले. त्यांनी ग्रामीण भागातील शेकडो लोकांना त्यांनी टेलि-कन्सल्टेशनची सेवा दिली आहे.
पंतप्रधान : नमस्कार......नमस्कार मदन मणि जी.
डॉ. मदन मणि: नमस्कार सर.
पंतप्रधान : मी नरेंद्र मोदी बोलत आहे.
डॉ. मदन मणि : हो...हो सर.
पंतप्रधान : तुमचे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे.
डॉ. मदन मणि : हो, माझे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे.
पंतप्रधान : तुमचे वैद्यकीय शिक्षण तिथेच झाले आहे.
डॉ. मदन मणि: हो....हो.
पंतप्रधान : तुम्ही जेव्हा वाराणसी मध्ये राहत होता तेव्हाचे वाराणसी आणि आजचे वाराणसी यातील बदल तुम्ही पाहायला की नाही.
डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, मी सिक्कीमला परत आल्यापासून मला तिथे जाणे शक्य झाले नाही, परंतु मी ऐकले आहे की खूपच बदल झाले आहेत.
पंतप्रधान : वाराणसी सोडून तुम्हाला किती वर्ष झाली?
डॉ. मदन मणि : सर, मी 2006 ला वाराणसी सोडले.
पंतप्रधान : ओह...मग तर तुम्हाला नक्कीच जायला हवे.
डॉ. मदन मणि: हो.....हो.
पंतप्रधान: अच्छा, मी तुम्हाला फोन याकरिता केला आहे की, तुम्ही सिक्कीम मधील दुर्गम डोंगराळ भागात राहून तिथल्या लोकांना टेली कन्सल्टेशनची उत्तम सेवा प्रदान करत आहात.
डॉ. मदन मणि: हो.
पंतप्रधान: मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना तुमचा अनुभव ऐकवू इच्छितो.
डॉ. मदन मणि: हो.
पंतप्रधान: मला तुमचा अनुभव सांगा.
डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, अनुभव खूपच सुंदर आहे. सिक्कीम मध्ये लोकांना अगदी जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी देखील कमीतकमी शंभर-दोनशे रुपयाचे गाडीभाडे लागते, आणि त्यानंतर देखील डॉक्टर मिळतील की नाही ही देखील एक समस्या असते. त्यामुळे टेलि कन्सल्टेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकं थेट आमच्याशीसंपर्क साधतात. आरोग्य आणि कल्याण केंद्राचे सीएचओ त्यांना आमच्याशी जोडतात. आणि ते आम्हाला त्यांच्या जुन्या आजाराचे रिपोर्ट्स, त्यांची सध्याची स्थिती, सर्वकाही सांगतात.
पंतप्रधान : म्हणजे दस्तऐवज हस्तांतरित करता.
डॉ. मदन मणि: हो...हो. दस्तऐवज हस्तांतरित देखील करतात आणि जर हस्तांतरित नाही झाले तर ते आम्हांला वाचून दाखवतात.
पंतप्रधान: तिथल्या कल्याण केंद्राचे डॉक्टर सांगतात.
डॉ. मदन मणि: कल्याण केंद्रात जे CHO असतात सामुदायिक आरोग्य अधिकारी ते वाचून दाखवतात.
पंतप्रधान : आणि रुग्ण त्यांच्या समस्या थेट तुम्हाला सांगतात.
डॉ. मदन मणि:होय, रुग्ण आपल्या अडचणींबद्दल देखील सांगतो. मग जुन्या नोंदी पाहिल्यानंतर काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर. उदाहरणार्थ, एखाद्याचे पाय सुजले आहेत की नाही, एखाद्याची छाती स्टेथोस्कोपने तपासायची की नाही? जर सीएचओने ते तपासले नसेल, तर आम्ही त्यांना पाहायला सांगतो, सूज आहे की नाही हे पहा, डोळे तपासा, त्याला अशक्तपणा आहे की नाही, खोकला असेल तर छातीस्टेथोस्कोपने तपासा आणि तेथे आवाज आहे की नाही तपासा.
पंतप्रधान: तुम्ही Voice Call करता की व्हिडीओ कॉलचा देखील उपयोग करता?
डॉ. मदन मणि: होय, व्हिडीओ कॉलचा उपयोग करतो.
पंतप्रधान: म्हणजे तुम्ही देखील रुग्णाला बघता.
डॉ. मदन मणि: होय, आम्ही रुग्णाला देखील बघू शकतो.
पंतप्रधान: रुग्णाला काय वाटते?
डॉ. मदन मणि:रुग्णाला बरे वाटते कारण तो डॉक्टरांना जवळून पाहू शकतो. औषधाचा डोस वाढवायचा आहे की कमी करायचा आहे या संभ्रमात तो असतो, कारण सिक्कीममधील बहुतेक रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आहेत आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे औषध बदलण्यासाठी डॉक्टर शोधण्यासाठी त्याला किती दूर जावे लागते. परंतु टेली कन्सल्टेशनद्वारे ते तिथेच उपलब्ध होते आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये मोफत औषध उपक्रमाद्वारे त्याला औषध देखील उपलब्ध होतात. त्यामुळे तो तेथूनच औषध घेतो.
पंतप्रधान: बरं मदनमणि जी,तुम्हाला तर माहिती आहेच की जोपर्यंत डॉक्टर येत नाही रुग्णाला तपासात नाहीत तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही हा रुग्णाचा स्वभाव आहे. आणि डॉक्टरांनाही वाटतं की त्यांना रुग्णाला भेटावं लागेल, आता तिथे संपूर्ण टेलिकॉमकन्सल्टेशनद्वारे होते, मग डॉक्टरांना काय वाटते, रुग्णाला काय वाटते?
डॉ. मदन मणि: जी, आम्हालाही वाटतं की जर रूग्णांना असं वाटत असेल की डॉक्टरांनी पहावं, तर आम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टी पहायच्या असतात, त्या आम्ही लोक सीएचओंना सांगून, व्हिडिओमध्येही आम्ही पहायला सांगतो. आणि कधी कधी तर रूग्णांना व्हिडिओमध्येच आम्ही जवळ जाऊन रूग्णांना जे त्रास सोसावे लागतात, किंवा काही त्वचेच्या समस्या असतात, कातडीच्या समस्या असतील तर आम्ही लोकांना व्हिडिओमध्येच ते दाखवून देतो. त्यामुळे ते लोक संतुष्ट असतात.
पंतप्रधान: आणि नंतर त्याच्यावर उपचार केल्यावर त्याला संतोष प्राप्त होतो, काय अनुभव येतो? रूग्ण बरे होत आहेत?
मदन मणि: जी, खूपच आनंद मिळतो. आम्हालाही आनंद होतो सर. कारण मी सध्या आरोग्य विभागात आहे आणि त्याबरोबरच मी टेलि कन्सलटेशनही करत असतो. त्यामुळे फाईलबरोबरच रूग्णाला पहाणे हाही माझ्यासाठी खूप छान, सुखद अनुभव असतो.
पंतप्रधान: सरासरी आपल्याकडे किती टेलि कन्सल्टेशनची प्रकरणे येत असतात?
डॉ. मदन मणि: आतापर्यंत मी 536 रुग्ण पाहिले आहेत.
पंतप्रधान: ओह... म्हणजे आपल्याला यात खूपच कौशल्य प्राप्त झालं आहे.
डॉ. मदन मणि: जी. चांगलं वाटतं रूग्णांना पहाण्यात.
पंतप्रधान: चला, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण सिक्कीमसारख्या दूरवरच्या दुर्गम जंगलांमध्ये, डोंगरी भागात रहाणार्या लोकांची इतकी मोठी सेवा करत आहात. आणि आनंदाची बाब आहे की, आमच्या देशातील दुर्गम आणि दूरवरच्या भागांतही तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग केला जात आहे. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
डॉ. मदन मणि: धन्यवाद !
मित्रांनो, डॉक्टर मदन मणिजींच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की इ संजीवनी अप कशा प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे. डॉक्टर मदन जी यांच्यानंतर आता आपण आणखी एका मदनजींशी जोडले जात आहोत. ते उत्तरप्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी मदनमोहन लालजी आहेत. आता हाही एक योगायोग आहे की चंदौली सुद्धा बनारसला लागूनच आहे. या, आपण मदनमोहनजींकडून जाणून घेऊ या की इ संजीवनीच्या सहाय्याने त्यांचा एक रूग्ण म्हणून काय अनुभव आला आहे.
पंतप्रधान: मदन मोहन जी, नमस्कार!
मदन मोहन जी: नमस्कार, नमस्कार साहेब |
पंतप्रधान: नमस्कार! ठीक आहे, मला सांगण्यात आलं आहे की आपण मधुमेहाचे रूग्ण आहात.
मदन मोहन जी: जी |
पंतप्रधान: आणि आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलि कन्सल्टेशनद्वारे आपल्या आजारासंबंधी वैद्यकीय मदत मिळवत असता.
मदन मोहन जी: हो|
पंतप्रधान: एक रूग्ण या नात्यानं, आपले अनुभव मी जाणून घेऊ इच्छितो. ज्यामुळे मी देशवासियांपर्यंत ही बाब पोहचवू शकेन की आजच्या तंत्रज्ञानामुळे आमचे गावात रहाणारे लोकही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात. जरा सांगा तर कसं करतात ते.
मदन मोहन जी: असं आहे सर जी, रूग्णालये दूरवर असतात आणि जेव्हा मला मधुमेह झाला तेव्हा ५-६ किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते, डॉक्टरांना दाखवावं लागत होतं. परंतु जेव्हापासून आपण ही व्यवस्था तयार केली आहे, आता आम्ही जेव्हा जातो, तेव्हा आमची तपासणी केली जाते, आमची बाहेरच्या डॉक्टरांशी बोलणंही करून दिलं जातं, आणि औषधंही दिली जातात. यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि लोकांनाही याचा खूप लाभ होतो.
पंतप्रधान:एकच डॉक्टर आपली तपासणी करतो की डॉक्टर सतत बदलत असतात?
मदन मोहन जी: त्यांना काही समजलं नाही तर डॉक्टरांना दाखवतात. त्याच बोलून दुसर्या डॉक्टरांशी आमचं बोलणं करून देतात.
पंतप्रधान: आणि जे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण फायदा होतो.
मदन मोहन जी: आम्हाला फायदा होतोच होतो. आम्हाला तर त्यापासून खूपच मोठा फायदा होतो. आणि गावातल्या लोकांनाही त्यापासून खूप फायदा होतो. सर्व लोक तेथे विचारतात की भैया, आम्हाला रक्तदाब आहे, आम्हाला मधुमेह आहे, चाचणी करा, तपासणी करा आणि औषध योजना सांगा. आणि पहिल्यांदा तर ५-६ किलोमीटर दूरवर जात होतो. लांबलचक रांग लागत होती. पॅथॉलॉजी चाचणीसाठी रांग लागत असे. एक एक दिवस त्यातच जाऊन नुकसान व्हायचं.
पंतप्रधान: म्हणजे आता आपला वेळही खूप वाचतो.
मदन मोहन जी: आणि पैसाही खर्च होत होता आणि येथे सारी सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत.
पंतप्रधान: जेव्हा आपण आपल्यासमोर डॉक्टरांना भेटतात तेव्हा एक विश्वास निर्माण होतो. चला, डॉक्टरांनी माझी नाडी तपासली आहे. डोळे तपासणी केली आहे, माझी जीभही तपासली आहे. तर एक वेगळीच भावना निर्माण होते. जसं टेलिकन्सल्टेशन करतत, तसाच आनंद मिळतो आपल्याला ?
मदन मोहन जी: हो, खूप आनंद होतो. के ते आमची नाडी धरून तपासत आहेत, स्टेथोस्कोप लावत आहेत, तर मला खूप बरं वाटतं आणि आम्हाला वेगळंच समाधान वाटतं. भई, इतकी चांगली व्यवस्था आपल्या द्वारे बनवली गेली आहे. ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सोसून जावं लागत होतं, गाडी भाडं द्यावं लागत होतं, तेथे रांग लावावी लागत होती. आणि आता सार्या सुविधा घरबसल्याच मिळत आहेत.
पंतप्रधान: मदनमोहनजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वयाच्या या टप्प्यातही आपण तंत्रज्ञान शिकला आहात, तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहात. आणि इतरांनाही सांगा ज्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल तसेच त्यांना जे मार्गदर्शन मिळतं, त्यातून औषधयोजनाही चांगल्या प्रकारे होऊ शकते.
मदन मोहन जी: हो. आणखीन काय हवं.
पंतप्रधान: चला, माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला मदनमोहन जी.
मदन मोहन जी: बनारसला साहेब आपण काशी विश्वनाथ स्थानक तयार केलं. विकास केला तिथं. यापबद्दल आमच्याकडून आपलं अभिनंदन.
पंतप्रधान: मी आपल्याला धन्यवाद देतो. आम्ही काय बनवलं, बनारसच्या लोकांनी बनारसला तयार केलं आहे. नाही तर आम्ही काय, गंगामातेनं सेवेसाठी पाचारण केलं आहे आम्हाला, माता गंगेनं आम्हाला बोलवलं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. प्रणाम जी.
मदन मोहन जी: नमस्कार सर !
पंतप्रधान: नमस्कार जी !
मित्रांनो, देशातील सामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गासाठी, पहाडी क्षेत्रामध्ये रहाणार्या लोकांसाठी ई संजीवनी हे जीवनाचं संरक्षण करणारं अप तयार होत आहे. ही भारताची डिजिटल क्रांतीची शक्ती आहे. आणि हिचा प्रभाव आज सर्व क्षेत्रात आम्ही पहात आहोत. भारतातील यूपीआयची शक्ती आपण जाणताच. जगातील किती तरी देश त्याकडे आकर्षित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय पे नाऊ लिंक सुरू करण्यात आलं. आता सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या मोबाईलवरून त्याच प्रकारे पैसे हस्तांतरित करत आहेत जसे ते आपल्या देशांतर्गत करत होते. मला याचा आनंद आहे की लोकांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे. भारताचं ई संजीवनी अप असो की हे यूपीआय, हे जीवन अधिक सुखमय करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी सिद्ध झालं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखाद्या देशात नष्ट होत चाललेल्या एखाद्या पक्षी प्रजातीला किंवा एखाद्या जीवजंतुला वाचवलं जातं, तेव्हा संपूर्ण जगात त्याची चर्चा होते. आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या, पण लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या. परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरूज्जीवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी मन की बात यापेक्षा अधिक चांगला मंच कोणता असू शकेल?
आता मी आपल्याला जे सांगणार आहे, ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटेल.
अमेरिकेत वास्तव्य करणार्या श्री. कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाच्या कडे माझं लक्ष वेधलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये, या महिन्यात त्रिबेनी कुंभो मोहोत्शव यांचं आयोजन केलं होतं. त्यात आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. परंतु हे आपल्यला माहीत आहे का, की यात इतकं विशेष असं काय आहे. विशेष हे आहे की तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरूज्जीवित केली आहे. तसं तर ही परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. परंतु दुर्दैवानं ही बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती. तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं. परंतु ते ही करण्यात आलं नाही. दोन वर्षांपूर्वी, स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो पॉरिचालोना शॉमितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. मी त्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आपण केवळ एक परंपरा पुनरूज्जीवित करत नाहीत तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात.
मित्रांनो, पश्चिम बंगालच्या त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्रस्थळ म्हणून ओळखलं जातं. त्याचा उल्लेख, वेगवेगळ्या मंगलकाव्ये, वैष्णव साहित्य, शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्यिक कृतींमध्येही आढळतो. वेगवेगळ्या ऐतिहासिस दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की, एके काळी हे क्षेत्र संस्कृत, शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं. अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे. त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट, शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेली प्राचीन इमारती पहायला मिळतील. त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथं कुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं. सात शतकांनंतर, तीन दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं, या क्षेत्रात एका नव्या उर्जेचा संचार केला आहे. तीन दिवस रोज होणारी गंगा आरती, रूद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले. यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम, मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते. बंगाली परंपरांशी जोडल्या गेलेल्या अनेक विधी जसे की कीर्तन, बाऊल, गोडियो नृत्ये, स्री खोल, पोटेर गान, छोऊ नृत्य, सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षणांचं केंद्र बनले होते. आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे. भारतात अशा कित्येक प्रथा आहेत, ज्यांना पुनरूज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. मला आशा आहे की, याबाबत होणारी चर्चा लोकांना त्या दिशेनं वाटचाल करण्यास अवश्य प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत अभियानात आमच्या देशातील लोकसहभागानं त्याचे संदर्भच बदलून टाकले आहेत. देशात कुठेही काही नं काही स्वच्छतेशी जोडलेलं असतं, तेव्हा लोक मला त्याची माहिती कळवतातच. असंच माझं लक्ष हरियाणातील युवकांच्या स्वच्छता अभियानाकडे गेलं आहे. हरियाणातील एक गाव आहे दुल्हेडी. इथल्या युवकांनी असं ठरवलं की भिवानी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत एक उदाहरण म्हणून स्थापित करायचं. त्यांनी युवा स्वच्छता आणि सेवा समिती नावाची एक संघटना स्थापन केली. त्या समितीशी संबंधित असलेले युवक पहाटे चार वाजता भिवानीला पोहचतात. शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर जाऊन ते मिळून स्वच्छता अभियान राबवतात. या लोकांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कित्येक टन कचरा हटवला आहे.
मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्वपूर्ण परिमाण कचर्यापासून संपत्ती(वेस्ट टु वेल्थ) हे ही आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भगिनी कमला मोहराना एक स्वयंसहाय्यता समूह चालवते. या समूहाच्या महिला दुधाची पिशवी आणि दुसर्या हातात प्लॅस्टिक पॅकिंगचे टोपले, तसेच मोबाईल ठेवण्याचे स्टँड अशा अनेक वस्तु तयार करतात. त्यांच्यासाठी हे स्वच्छतेच्या बरोबरीने उत्पन्न मिळवण्याचं एक साधनही झालं आहे. आम्ही निश्चय केला तर स्वच्छ भारतात खूप मोठं योगदान देऊ शकतो. कमीत कमी प्लॅस्टिकच्या पिशवीच्या ऐवजी, कपड्याची पिशवी वापरण्याच संकल्प आम्हाला सर्वांना केला पाहिजे. आपण पहाल, आपला हा संकल्प किती आनंद देईल, आणि दुसर्या लोकांनाही प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेरणादायक विषयांवर चर्चा केली. कुटुंबाच्या बरोबर बसून आपण ऐकलंत आणि आता दिवसभर ती चर्चा गुणगुणत रहाल. आम्ही देशातील मेहनतीविषयक जितकी चर्चा करतो, तितकीच आम्हाला उर्जा मिळत असते. त्याच उर्जाप्रवाहाबरोबर वाटचाल करत, आज आम्ही मन की बातच्या 98 व्या आवृत्तीच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत. आजपासून काही दिवसांनी होळी सण आहे. आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आम्हाला आपले सण व्होकल फॉर लोकल या संकल्पासहित साजरे करायचे आहेत. आपले अनुभव माझ्याशी सामायिक करायला विसरू नका. तोपर्यंत मला आता निरोप द्या. पुढच्या वेळेस पुन्हा नव्या विषयासहित भेटू या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.
मित्रहो,
देहरादून येथील वत्सल जी यांनी मला लिहिले आहे की, मी नेहमी 25 जानेवारीची वाट बघतो, कारण त्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि एका अर्थाने 25 तारखेची संध्याकाळ 26 जानेवारीसाठीचा माझा उत्साह वाढवते. समर्पण आणि सेवाभावनेसह तळागाळात काम करणाऱ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या पीपल्स पद्म बद्दलच्या आपल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे. आदिवासींचे जगणे शहरांमधल्या गजबजाटापेक्षा वेगळे असते, त्यांच्यासमोरची आव्हानेही वेगळी असतात. मात्र तरीही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असतात. आदिवासी समाजाशी संबंधित बाबींचे जतन आणि संशोधन करण्याचाही प्रयत्न केला जातो. हे लक्षात घेत, टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.धानी राम टोटो, जानुम सिंग सोय आणि बी. रामकृष्ण रेड्डी जी यांची नावे आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत. सिद्धी, जारवा, ओंगे अशा आदीम आदिवासी जमांतींसोबत काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. जशा - हिराबाई लोबी, रतन चंद्र कार आणि ईश्वरचंद्र वर्मा जी. आदिवासी समाज हा आपल्या भूमीचा, आपल्या वारशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्यास नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल. नक्षलग्रस्त असणाऱ्या भागांमध्येही यंदा पद्म पुरस्कारांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखविणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात कांकेरमध्ये लाकडावर कोरीव काम करणारे अजयकुमार मंडावी आणि गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील आपली संस्कृती जपणाऱ्या रामकुईवांगबे निउमे, बिक्रम बहादूर जमातिया आणि कर्मा वांगचू यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
मित्रहो,
यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेल्यांमध्ये संगीतविश्व समृद्ध करणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत. संगीत आवडत नाही, असे कोण असेल? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आवडत असू शकते, पण संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये संतूर, बम्हुम, द्वितारा अशी आपली पारंपारिक वाद्ये वाजवण्यात नैपुण्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. गुलाम मोहम्मद ज़ाज़, मोआ सु-पोंग, री-सिंहबोर कुरका-लांग, मुनी-वेंकटप्पा आणि मंगल कांती राय अशी कित्येक नावे आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा होते आहे.
मित्रहो,
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक जण, आपल्यातील असे सहकारी आहेत ज्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले, राष्ट्र प्रथम या तत्त्वासाठी आपले आयुष्य समर्पित केले. ते सेवाभावनेने त्यांचे कार्य करत राहिले आणि त्यासाठी त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. ज्यांच्यासाठी ते काम करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. अशा समर्पित व्यक्तींचा गौरव करून आपणा संर्व देशवासीयांच्या अभिमानात भर पडली आहे. मला इथे सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घेता येणार नाहीत, पण मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो की पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.
मित्रहो,
आज आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवादरम्यान प्रजासत्ताक दिनाबद्दल चर्चा करत आहोत, तर आज मी इथे एका मनोरंजक पुस्तकाचाही उल्लेख करेन. काही आठवड्यांपूर्वी मला मिळालेल्या या पुस्तकात एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करण्यात आली आहे. India - The Mother of Democracy असे या पुस्तकाचे नाव आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट निबंध आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश, ही लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या धमन्यांमध्ये आहे, ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे - ती शतकानुशतके आपल्या कामकाजाचा अविभाज्य घटक आहे. स्वभावाने आपण लोकशाहीप्रधान समाज आहोत. डॉ.आंबेडकरांनी बौद्ध भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती. त्यांनी एका अशा संस्थेचे वर्णन केले जिथे प्रस्ताव, ठराव, कोरम, मतदान आणि मतमोजणी यासाठी अनेक नियम होते. भगवान बुद्धांना तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून याची प्रेरणा मिळाली असावी, असे बाबासाहेबांचे मत होते.
तामिळनाडूमध्ये उतीरमेरूर हे एक छोटेसे पण प्रसिद्ध गाव आहे. या गावातील अकराशे, बाराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख अवघ्या जगाला चकित करतो. हा शिलालेख एखाद्या संक्षिप्त संविधानासारखा आहे. ग्रामसभा कशी घेतली पाहिजे आणि सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असावी, हे त्यात सविस्तरपणे सांगितले आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील लोकशाही मूल्यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे 12 व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम. येथे मुक्त वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन दिले जात असे. हामॅग्ना कार्टाच्याही पूर्वीचा आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वारंगळच्या काकतीय वंशाच्या राजांच्या प्रजासत्ताक परंपराही खूप प्रसिद्ध होत्या. भक्ती चळवळीने पश्चिम भारतात लोकशाहीची संस्कृती वाढवली. सर्व संमतीसाठी गुरू नानक देव जी यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकणारा, शीख पंथाच्या लोकशाही भावनेवर आधारित एक लेखही पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकात मध्य भारतातील उरांव आणि मुंडा जमातींमधील समुदाय-प्रेरित आणि सहमतीने निर्णय घेण्याबाबतही चांगली माहिती देण्यात आली आहे. शतकानुशतके देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे, हे, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल. लोकशाहीची माता म्हणून आपण या विषयावर सातत्याने सखोल विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जगालाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. यामुळे देशातील लोकशाहीची भावना अधिक दृढ होईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
जर मी तुम्हाला विचारले की योग दिवस आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्ये, यांच्यात काय साम्य आहे, तर तुम्ही विचार कराल की ही काय तुलना आहे? दोघांमध्ये खूप साम्य आहे, असे मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरे तर, भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्ही बाबतचा निर्णय घेतला आहे. दुसरे म्हणजे योगविद्येचा संबंध सुद्धा आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात. तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे - दोन्ही मोहिमांमध्ये लोकसहभागामुळे क्रांती होते आहे. ज्याप्रमाणे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून योगविद्या आणि तंदुरूस्तीला आपल्या जगण्याचा एक भाग बनवले आहे, त्याचप्रमाणे लोक मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अंगिकार करू लागले आहेत. लोक आता भरड धान्यांना आपल्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत. या बदलाचा मोठा परिणामही दिसून येतो आहे. एकीकडे पारंपारिक पद्धतीने भरड धान्याचे उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत. जगाला आता भरड धान्यांचे महत्त्व कळू लागले आहे, याचा त्यांना मनापासून आनंद आहे. तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्ये बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यातील रहिवासी के.व्ही. रामा सुब्बा रेड्डी यांनी भरड धान्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. आईच्या हातच्या भरड धान्यांच्या पदार्थाना अशी चव होती की त्यांनी आपल्या गावात बाजरी प्रक्रिया एकक सुरू केले. सुब्बा रेड्डी जी लोकांना बाजरीचे फायदे देखील समजावून सांगतात आणि ते सहज उपलब्ध सुद्धा करून देतात. महाराष्ट्रात अलिबागजवळील केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल गेल्या वीस वर्षांपासून भरड धान्य उत्पादनात अनोख्या पद्धतीने योगदान देत आहेत. त्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भरड धान्यांचे उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
जर तुम्हाला छत्तीसगडमध्ये रायगड येथे जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तिथल्या मिलेट्स कॅफेला नक्की भेट द्या. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मिलेट्स कॅफेमध्ये चिला, डोसा, मोमोज, पिझ्झा आणि मंचुरियन असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारू का? तुम्ही उद्योजक हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण मिलेटप्रिन्युअर हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? ओदिशातील मिलेटप्रिन्युअर सध्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. सुंदरगढ या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट हा ओदिशा मिलेट्स मिशनशी संलग्न आहे. तिथल्या महिला भरड धान्यापासून बिस्कीटे, रसगुल्ला, गुलाब जामुन आणि केक सुद्धा तयार करत आहेत. बाजारपेठेत या पदार्थांना मोठी मागणी असल्यामुळे महिलांचे उत्पन्नही वाढत आहे.
कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील आलंद भूताई मिलेट्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने गेल्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली काम सुरू केले. येथील खाकरा, बिस्किटे आणि लाडू लोकांना आवडत आहेत. कर्नाटकमधल्या बिदर जिल्ह्यात, हुलसूर मिलेट प्रोड्युसर कंपनीशी संबंधित महिला भरड धान्याची शेती करतात तसेच त्यांचे पीठही तयार करतात. त्यामुळे त्यांची कमाईही चांगलीच वाढली आहे. नैसर्गिक शेतीशी संबंधित छत्तीसगडमधले संदीप शर्माजी यांच्या FPO मध्ये 12 राज्यांमधले शेतकरी सहभागी झाले आहेत. बिलासपूरचा हा एफपीओ 8 प्रकारच्या भरड धान्याची पीठे आणि त्यांचे पदार्थ तयार करतो आहे.
मित्रहो,
आज भारताच्या कानाकोपऱ्यात जी-20 शिखर परिषदेच्या बैठका सातत्याने सुरू आहेत आणि मला आनंद वाटतो की, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, जिथे जिथे जी-20 शिखर परिषदेची बैठक होते आहे, तिथे भरड धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तिथे बाजरीची खिचडी, पोहे, खीर आणि रोटी, तसेच नाचणीपासून तयार केलेले पायसम, पुरी आणि डोसा असे पदार्थही वाढले जातात. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, याची कल्पना तुम्ही करू शकता. भरड धान्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तरुण पिढीला तितकेच आवडत आहेत हे पाहूनही मला आनंद होतो. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची अशी अप्रतिम सुरुवात केल्याबद्दल आणि ते सतत पुढे नेल्याबद्दल मी 'मन की बात'च्या श्रोत्यांचेही अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, जेव्हा तुमच्याशी कोणी पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याबद्दल बोलते, तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो? स्वाभाविकपणे, गोव्याचे नाव येताच, सर्वात प्रथम इथली सुंदर किनारपट्टी, समुद्रकिनारे आणि गोव्यात मिळणारे आवडते पदार्थ आठवतात. पण या महिन्यात गोव्यात अशी घटना घडली जिची सर्वत्र चर्चा होते आहे. आज 'मन की बात' मध्ये, मी तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगू इच्छितो. गोव्यात ‘पर्पल फेस्ट’ नावाचा कार्यक्रम झाला. पणजी येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता. आमचे जवळपास 50 हजारांहून अधिक बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून तुम्ही सर्वजण अंदाज करू शकाल की ‘पर्पल फेस्ट’ किती मोठा कार्यक्रम होता. येथे आलेले लोक, आपण आता 'मीरामार बीच'ला भेट देऊन, समुद्रकिनाऱ्याच्या आनंद उपभोगू शकतो या विचाराने खूप उत्साहित झाले होते. आता गोव्यातील 'मीरामार बीच' हा, आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी प्रवेशाला अनुकूल अशा समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा बनला आहे. येथे क्रिकेट स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा व मॅरेथॉनसोबतच एक मूकबधिर-अंध संमेलनही आयोजित करण्यात आले होते. इथे एका विशेष अशा पक्षी निरीक्षण कार्यक्रमा व्यतिरिक्त एक चित्रपटही दाखवण्यात आला. यासाठी अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती की ज्यामुळे आमचे सर्व दिव्यांग बंधू-भगिनी आणि मुले या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.
पर्पल फेस्टची एक खास गोष्ट म्हणजे देशातील खाजगी क्षेत्राचाही ह्यात सहभाग होता. त्यांच्या वतीने दिव्यांगांना सोयीस्कर अशा उत्पादने प्रदर्शित केली गेली. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले गेले. पर्पल फेस्ट यशस्वी केल्याबद्दल,ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. यासोबतच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला, त्या स्वयंसेवकांचे देखील अभिनंदन करतो. मला विश्वास वाटतो की सुलभ भारताची आमची संकल्पना साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप प्रभावी ठरतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता 'मन की बात'मध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे , ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल, अभिमानही वाटेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल , “व्वा! माझे मन प्रसन्न झाले आहे!”
देशातील सर्वात जुन्या विज्ञान संस्थांपैकी एक, अशी बेंगलुरू येथील भारतीय विज्ञान संस्था, म्हणजे IISc एक उत्तम उदाहरण घालून देत आहे. ‘मन की बात' मध्ये मी ह्या आधीही सांगितले होते की ह्या संस्थेच्या स्थापनेमागे भारतातील दोन महान व्यक्तिमत्वांची, जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आहे. तर तुमच्या आणि माझ्या साठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 2022 ह्या वर्षामध्ये या संस्थेने आपल्या नावावर एकूण 145 पेटंट मिळवले आहेत. याचा अर्थ दर पाच दिवसांत दोन पेटंट!! हा विक्रम अद्भुत आहे. या यशासाठी मी IISc मधील सर्व चमूचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचे 7वे स्थान आहे आणि ट्रेडमार्कमध्ये 5वे आहे. फक्त पेटंटविषयी बोलायचे तर, गेल्या पाच वर्षांत पेटंटसची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक नवोपक्रम/संशोधन निर्देशांकात/ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील भारताच्या क्रमवारीमध्ये, कमालीची सुधारणा झाली आहे आणि आता भारत 40 व्या स्थानावर आहे. 2015 मध्ये भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात 80 व्या स्थानाच्या देखील मागे होता.
मला तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगायची आहे.
भारतात गेल्या 11 वर्षांत प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करण्याची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे. हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे निदर्शक आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहित आहेच की 21 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. मला विश्वास वाटतो आहे की भारताचे Techade चे स्वप्न संशोधकांच्या आणि त्यांच्या पेटंटसच्या बळावर नक्कीच पूर्ण होईल. यामुळे आपण सर्वजण आपल्या देशातल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उत्पादनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
NaMoApp वर मी तेलंगणातील अभियंते विजयजी ह्यांची पोस्ट पाहिली. यात विजयजींनी ई-कचऱ्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी मला अशी विनंती केली आहे की 'मन की बात' मध्ये मी ह्याविषयी चर्चा करावी. या कार्यक्रमात यापूर्वीही आपण 'वेस्ट टू वेल्थ' म्हणजेच “कचऱ्यातून संपत्ती /सोने ‘ या विषयावर बोललो आहोत. पण चला, आज या विषयाशी संलग्न अशा ई-कचऱ्याविषयी बोलू या.
मित्रांनो,
आज प्रत्येक घरात मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट अशी उपकरणे सहजपणे आढळतात. देशभरात मिळून त्यांची संख्या कोट्यावधीनी असेल. पण आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणे देखील भविष्यातील ई-कचराच आहेत. जेव्हा आपण कोणी नवीन उपकरण खरेदी करतो किंवा आपले जुने उपकरण डिव्हाइस बदलतो तेव्हा आधीच्या उपकरणाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ई-कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली नाही तर आपल्या पर्यावरणाचीही हानी होईल. पण, तेच जर का काळजीपूर्वक व्यवस्था केली गेली तर, चक्रीय/ स्थूल / circular अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्नविनीकरण आणि पुनर्वापर ही एक मोठी शक्ती बनेल.
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की प्रत्येक वर्षी 50 दशलक्ष टन ई-कचरा टाकला जात आहे. आपण अंदाज करू शकता का की हा म्हणजे किती कचरा असेल? मानवी इतिहासात आत्तापर्यंत जितकी व्यावसायिक विमाने बनवली गेली आहेत, त्या सर्वांचे वजन जरी एकत्र केले तरी जितका ई कचरा टाकला जातो आहे, त्याची बरोबरी होणार नाही. हे म्हणजे असे आहे की प्रत्येक सेकंदाला 800 लॅपटॉप फेकले जात आहेत.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इ कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे ई-कचऱ्याचा योग्य उपयोग करणे हे 'कचऱ्यातून सोने’ बनवण्यासारखेच आहे.
आज अशा स्टार्ट अप्सची कमतरता नाही, जे या दिशेने संशोधनात्मक नाविन्यपूर्ण काम करत आहेत. आज, सुमारे 500 ई-कचरा पुनर्वापर करणारे या क्षेत्राशी निगडित आहेत आणि अजून अनेक नवीन उद्योजक देखील जोडले जात आहेत. या क्षेत्राने हजारो लोकांना रोजगारही दिला आहे.
बेंगळुरूचा ई-परिसरा हा असाच एक प्रयत्न आहे. त्यांनी मुद्रित सर्किट बोर्डमधून मौल्यवान धातू वेगळे करण्याची (/ वेगळे करून) स्वदेशी तंत्र प्रणाली विकसित केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या इकोरेको (इको-रेको) ने ई-कचरा गोळा करण्यासाठी मोबाईल अँप वरून यंत्रणा तयार केली आहे. उत्तराखंडमधील रुडकीच्या अटेरो (एटेरो) रिसायकलिंगने तर या क्षेत्रात अनेक जागतिक पेटंट मिळवले आहेत. त्यांनी देखील स्वतःची ई-कचरा पुनर्वापर तंत्रप्रणाली विकसित करून खूप नाव कमावले आहे. भोपाळमध्ये 'कबाडीवाला' मोबाईलअँप आणि वेबसाइटद्वारे कित्येक टन ई-कचरा जमा केला जात आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व पर्यटन भारताला जागतिक पुनर्नविनीकरण केंद्र -ग्लोबल रिसायकलिंग हब म्हणून प्रस्थापित करण्यात मदत करत आहेत.
परंतु, ह्या सर्व उपक्रमांच्या यशासाठी एक अनिवार्य अट देखील आहे - ती म्हणजे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या उपयुक्त पद्धतींबद्दल लोकांना जागरूक करणे. त्यांना सतत ह्याची जाणीव करून देत राहिले पाहिजे. ई-कचरा क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की दरवर्षी केवळ 15-17 टक्के ई-कचऱ्याचे रिसायकल- पुनर्नविनीकरण केले जात आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज संपूर्ण जगात हवामान-बदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बरीच चर्चा होत आहे. या दिशेने भारत करत असलेल्या ठोस प्रयत्नांबद्दल आपण नेहमी बोलत असतो. भारताने आपल्या पाणथळ ठिकाणांसाठी जे काम केले आहे ते ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. काही श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पाणथळ जागा म्हणजे काय?
पाणथळ जागा म्हणजेच पाणथळ माती असणारी ठिकाणे, जिथे वर्षभर जमिनीवर पाणी साचून राहते, दलदल असते. काही दिवसांनी, म्हणजे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस आहे. आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागा खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्यावर अनेक जीवजंतू, पक्षी आणि प्राणी अवलंबून असतात. जैवविविधता समृद्ध करण्यासोबतच पूर-नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यात पाणथळ जागांची महत्वाची भूमिका असते.
आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की रामसर साइट्स अशा पाणथळ जागा आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. पाणथळ जागा कोणत्याही देशात असो, परंतु त्यांना अनेक आंतराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात, मगच त्यांना रामसर साइट म्हणून घोषित केले जाते. रामसर साइटवर 20,000 किंवा त्याहून अधिक पाणपक्षी असावेत. स्थानिक माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना, स्वाधीनता अमृत महोत्सवादरम्यान मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची आहे. आपल्या देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 75 झाली आहे. तर 2014 पूर्वी देशात केवळ २६ रामसर स्थळे होती. ह्या साठी स्थानिक समुदायांचे अभिनंदन करायला हवे , ज्यांनी ही जैवविविधता जपली. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरेचाही हा सन्मान आहे. भारतातील या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचेही उदाहरण आहेत. ओडिशातील चिलिका तलाव 40 पेक्षा जास्त जलपक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. कैबुल-लमजा, लोकटाक हे बारशिंगा ( swamp deer )चे एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानले जाते. तामिळनाडूच्या वेदथंगलला 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. येथील पक्ष्यांची वस्ती जपण्याचे संपूर्ण श्रेय परिसरातील स्थानिक शेतकर्यांना जाते.
काश्मीरमधील पंजाथ नाग समाज आपल्या वार्षिक फळे बहार चा महोत्सवातील एक दिवस खास गावातील झऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी राखून ठेवतो. जागतिक रामसर साइट्समध्ये जास्तकरून विशेष सांस्कृतिक वारसा देखील आहे. मणिपूरचे लोकटक आणि पवित्र रेणुका सरोवराशी तिथल्या संस्कृतींचे नाते जडलेले आहे. तसेच ‘सांभार’ हे दुर्गामातेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीशी संबंधित आहे. भारतात पाणथळ प्रदेशांचा हा विस्तार त्या लोकांमुळेच शक्य झाला आहे, जे रामसर साइट्सच्या आसपास राहतात. मला अशा सर्व लोकांचे खूप कौतुक वाटते, 'मन की बात'च्या श्रोत्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
यावेळी आपल्या देशात, विशेषतः उत्तर भारतात कडाक्याची थंडी होती. या हिवाळ्यात लोकांनी डोंगरावर जाऊन बर्फवृष्टीचाही आनंद लुटला. जम्मू-काश्मीरमधील अशीच काही छायाचित्रे आली ज्यांनी संपूर्ण देशाचे मन मोहून टाकले. सोशल मीडियावर/ समज माध्यमांवर तर जगभरातील लोकांना ही छायाचित्रे आवडत आहेत. हिमवृष्टीमुळे आपले काश्मीर खोरे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर झाले आहे. बनिहालहून बडगामला जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ तर लोकांना विशेष आवडत आहे. सुंदर हिमवर्षाव, आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र चादरीप्रमाणे पसरलेला बर्फ. लोक म्हणत आहेत की ही दृश्ये परीकथेतील आहेत!! बरेच जण म्हणत आहेत की ही कोणत्याही परदेशातील नाही, तर आपल्याच देशातील काश्मीरची चित्रे आहेत. एका सोशल मीडिया यूजरने/ सामाजिक माध्यम वापरकर्त्याने लिहिले आहे की 'तो स्वर्ग याहून आणखी काय सुंदर असेल?' हे अगदी बरोबर आहे. म्हणूनच तर काश्मीरला धरतीवरचा स्वर्ग म्हणतात.
तुम्हीदेखील ही चित्रे पाहून काश्मीरच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल. मी तर म्हणेन की तुम्ही पण जा आणि तुमच्या मित्रांनादेखील सोबत घेऊन जा. काश्मीरमध्ये बर्फ़ाच्छादित पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्य ह्या शिवाय देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे. काश्मीरच्या सय्यदाबादमधील हिवाळी क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. या खेळांची संकल्पना / थीम होती - स्नो क्रिकेट/ बर्फावरचे क्रिकेट ! तुम्ही विचार करत असाल की स्नो क्रिकेट हा अधिक रोमांचक खेळ असेल. तर तुमचा विचार अगदी बरोबर आहे. काश्मीरी तरुण बर्फावरील क्रिकेट अधिक रोमांचक बनवतात. याद्वारे काश्मीरमध्ये अशा युवा खेळाडूंचाही शोध सुरू आहे, जे नंतर टीम इंडियाचा/ भारतीय संघाचा भाग बनतील. हा एक प्रकारे खेलो इंडिया चळवळीचा विस्तार आहे. काश्मीरमधील तरुणांमध्ये खेळांविषयी उत्साह वाढतो आहे. आगामी काळात यातील अनेक युवक देशासाठी पदके जिंकतील, तिरंगा फडकवतील. मी तुम्हाला असे सुचवेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काश्मीरच्या सहलीची योजना आखाल तेव्हा या प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढा. हे अनुभव तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
प्रजासत्ताक शक्तिशाली करण्यासाठी आमचे प्रयत्न निरंतर/ सतत चालत राहिले पाहिजे. प्रजासत्ताक मजबूत होते 'लोकसहभागाने’ 'सर्वांच्या प्रयत्नांनी ', 'देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याने ', आणि मला आनंद वाटतो आहे की, आपली 'मन की बात' म्हणजे अशा कर्तव्यनिष्ठ लढवय्यांचा बुलंद आवाज असतो. पुढच्या वेळी भेटू या अशाच कर्तव्यदक्ष लोकांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथांसह.
खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शहाण्णव्या भागात संवाद साधत आहोत. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पुढचा भाग हा 2023 या वर्षातला पहिला भाग असेल. तुम्ही सर्वांनी जे संदेश पाठवले आहेत, त्यात 2022 या सरत्या वर्षाबाबत बोलण्याचा आग्रहसुद्धा केला आहे. भूतकाळाचे अवलोकन आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याची प्रेरणा देत असते. 2022 या वर्षात देशातील लोकांचे सामर्थ्य, त्यांचे सहकार्य, त्यांचे संकल्प आणि त्यांच्या यशाची व्याप्ती इतकी जास्त होती की ‘मन की बात’ कार्यक्रमात त्या सर्वाचा आढावा घेणे खरोखरच कठीण होईल. 2022 हे वर्ष खरेच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायक आणि अद्भुत ठरले. या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला, सर्व देशवासीयांनी एकापेक्षा एक कामे केली. 2022 या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भारताने जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा म्हणजे वर्ष 2022, भारताने 220 कोटी लसीकरणाचा अविश्वसनीय टप्पा ओलांडण्याचा विक्रम म्हणजे वर्ष 2022, भारताने 400 अब्ज डॉलर निर्यातीचा जादुई टप्पा ओलांडणे म्हणजे वर्ष 2022, देशातील प्रत्येक नागरिकाने ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प स्वीकारणे म्हणजे वर्ष 2022, आयएनएस विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वागत म्हणजे वर्ष 2022, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात भारताचा डंका म्हणजे वर्ष 2022, प्रत्येक क्षेत्रात भारताला मिळालेले यश म्हणजे वर्ष 2022. खेळाच्या मैदानात सुद्धा, मग ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, आपल्या तरुणाईने प्रचंड सामर्थ्य दाखवले आहे.
मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.
मित्रहो, या वर्षी G-20 समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी सुद्धा भारताला मिळाली आहे. मागच्या वेळी मी याबाबत सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. वर्ष 2023 मध्ये आपल्याला G-20 च्या उत्साहाला नव्या उंचीवर न्यायचे आहे, या आयोजनाला आता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जगभरात नाताळचा सणही थाटामाटात साजरा केला जातो आहे. येशू ख्रिस्ताचे जीवन आणि शिकवण लक्षात ठेवण्याचा हा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रहो, आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे अटल बिहारी वाजपेयी जी यांचाही आज जन्मदिवस आहे. देशाला असामान्य नेतृत्व देणारे ते महान राजकारणी होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. मला कोलकाताहून आस्थाजींचे पत्र आले आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीला भेट दिली, त्या भेटीचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यांनी लिहिले आहे की यावेळी त्यांनी पीएम म्युझियमला भेट देण्यासाठी वेळ काढला. या संग्रहालयातील अटलजींचे दालन त्यांना खूप आवडले. तिथे अटलजींसोबत काढलेला फोटो त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. अटलजींनी देशासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाचे दर्शन आपल्याला त्या दालनात घडते. पायाभूत सुविधा असो, शिक्षण असो किंवा परराष्ट्र धोरण असो, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले. मी पुन्हा एकदा अटलजींना हृदयापासून अभिवादन करतो.
मित्रहो, उद्या 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ आहे आणि त्यानिमित्त मला दिल्लीमध्ये साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांच्या हौतात्म्याला समर्पित एका कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहिल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
सत्यम किम प्रमाणम, प्रत्यक्षम किम प्रमाणम |
अर्थात सत्याला पुराव्याची आवश्यकता नसते. जे प्रत्यक्ष आहे, त्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसते, असे आपल्याकडे म्हटले जाते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राचा विचार केला तर पुरावा हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. योगाभ्यास आणि आयुर्वेद हे शतकानुशतके आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मात्र पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे आपल्या या शास्त्रांसमोर नेहमीच एक आव्हान राहिले आहे. परिणाम दिसतात पण पुरावा नसतो. मात्र पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्राच्या आजच्या युगात, योगाभ्यास आणि आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या आणि कसोट्यांवर यशस्वी ठरत आहेत, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. संशोधन, नाविन्यता आणि कर्करोग संबंधी देखभालीच्या क्षेत्रात या संस्थेने चांगले नाव कमावले आहे. या केंद्राने केलेल्या सखोल संशोधनातून, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी योगाभ्यास अत्यंत प्रभावी असल्याचे समोर आले आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी अमेरिकेत आयोजित अत्यंत प्रतिष्ठित परिषदेत, टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या संशोधनाचे परिणाम सादर केले आहेत. या परिणामांनी जगातल्यामोठमोठ्या तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, रुग्णांना योगासनांचा कसा फायदा झाला, हे टाटा मेमोरियल सेंटरने पुराव्यासह सांगितले आहे. या केंद्राच्या संशोधनानुसार, नियमित योगाभ्यासामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना पुन्हा हा आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. अशाप्रकारे भारतीय पारंपारिक उपचार पद्धती, पाश्चात्य पद्धतींच्या कठोर मानकांनुसार पारखली जाण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्याचबरोबर स्तनाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगासने उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध करणारा, हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. त्याचे दीर्घकालीन लाभही समोर आले आहेत. पॅरिसमध्ये आयोजित युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ऑन्कॉलॉजी) परिषदेत टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या अभ्यासाचे निकाल सादर केले आहेत.
मित्रहो, आजच्या युगात पुराव्यावर आधारित भारतीय वैद्यकीय पद्धती जितक्या जास्त असतील तितकी संपूर्ण जगात त्यांची स्वीकारार्हता वाढीला लागेल. याच विचारातून दिल्लीतील एम्समध्येही प्रयत्न सुरू आहेत. आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी एकात्मिक औषध आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धतींचा वापर केला जातो. या केंद्रातर्फे आतापर्यंत नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 20 शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये syncope–सिंकपी या आजाराच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे न्यूरोलॉजी विषयक नियतकालिकामधील शोधनिबंधामध्ये मायग्रेनच्या त्रासावर उपकारक ठरणाऱ्या योगाभ्यासाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त हृदयविकार, नैराश्य, निद्रानाश आणि गर्भधारणेदरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अशा इतरही अनेक त्रासांमध्ये उपकारक ठरणाऱ्या योगासनांच्या फायद्यांबाबत अभ्यास केला जातो आहे.
मित्रहो, काही दिवसांपूर्वीच जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी मी गोव्यामध्ये गेलो होतो. 40 पेक्षा जास्त देशांमधले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आणि 550 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध सादर करण्यात आले. या परिषदेतील प्रदर्शनात भारतासह जगभरातील सुमारे 215 कंपन्यांनी आपापली उत्पादने प्रदर्शित केली. चार दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांनी आयुर्वेदाशी संबंधित अनुभवांचा आस्वाद घेतला. या आयुर्वेद परिषदेत, जगभरातून जमलेल्या आयुर्वेद तज्ञांसमोरसुद्धा मी, पुराव्यावर आधारित संशोधनाच्या विनंतीचा पुनरुच्चार केला. कोरोना या जागतिक साथरोगाच्या काळात आपण सगळेच योगाभ्यास आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य अनुभवतो आहोत, त्यामुळेत्यासंबंधी पुराव्यावर आधारित संशोधन खूप महत्त्वाचे ठरेल. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे योगाभ्यास, आयुर्वेद आणि आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींशी संबंधित अशा प्रयत्नांबद्दल काही माहिती असेल, तर ती सोशल मीडियावर अवश्य शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांत आपण आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली आहे. याचे सगळे श्रेय आपले वैद्यकीय तज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशवासीयांच्या इच्छाशक्तीला जाते. आपण भारतातून स्मॉलपॉक्स, पोलिओ आणि 'गिनी वर्म' या आजारांचे समूळ उच्चाटन करून दाखवले आहे.
आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या श्रोत्यांना मी आणखी एका आव्हानाबद्दल सांगू इच्छितो, जे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.हे आव्हान, हा रोग आहे - 'कालाजार म्हणजेच काळा ताप'. सँड फ्लायहा समुद्रकिनारी आढळणारा एक किटक चावल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एखाद्याला काळा ताप हा आजार झाला की महिनोन महिने ताप येतो, रक्ताची कमतरता भासू लागते, शरीर अशक्त होते आणि वजनही घटते. हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळा ताप नावाचा हा आजार आता झपाट्याने नष्ट होतो आहे. अलीकडेच 4 राज्यांमधल्या 50 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काळ्या तापाची साथ आली होती, मात्र आता या काळ्या तापाचा प्रादुर्भाव बिहार आणि झारखंडमधल्या 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. बिहार-झारखंडमधल्या लोकांचे सामर्थ्य आणि त्यांची जागरुकता या चार जिल्ह्यांमधूनही हा काळा ताप हद्दपार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत करेल, असा विश्वास मला वाटतो. काळ्या तापाचे रूग्ण असलेल्या भागातील जनतेने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे मला सांगावेसे वाटते. एक म्हणजे - सँड फ्लाय किंवा वाळूवर आढळणाऱ्या माशांवर नियंत्रण आणि दुसरे म्हणजे या आजाराची लागण झाल्याचे लवकरात लवकर ओळखणे आणि त्यावर पूर्ण उपचार. काळ्या तापावरचे उपचार सोपे आहेत आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही खूप प्रभावी आहेत. तुम्हाला फक्त सतर्क राहायचे आहे.ताप आला तर हलगर्जीपणा करू नका आणि सँड फ्लायला मारणाऱ्या औषधांची फवारणी करत रहा. जरा विचार करा, आपला देश या काळ्या तापापासून जेव्हा मुक्त होईल, तेव्हा आपल्या सर्वांसाठीच ती आनंदाची बाब असेल. ‘सबका प्रयास’ च्या या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंतभारताला टी.बी. मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. तुम्ही पाहिले असेल, मागच्या काही दिवसांत जेव्हा टी.बी. मुक्त भारत मोहीम सुरू झाली, तेव्हा हजारो लोक, टी.बी. रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. हे लोक ‘निक्षय’ मित्र होऊन टी.बी. रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची आर्थिक मदत करत आहेत. लोकसेवेची आणि लोकसहभागाची हीच ताकद प्रत्येक अवघड उद्दिष्टसाध्य करून दाखवते आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपली परंपरा आणि संस्कृती यांचे गंगेशी अतूट नाते आहे. गंगा जल हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये देखील म्हटलेच आहे:-
नमामि गंगे तव पाद पंकजं,
सुर असुरै: वन्दित दिव्य रूपम् |
भुक्तिम् च मुक्तिम् च ददासि नित्यम्,
भाव अनुसारेण सदा नराणाम् ||
अर्थात हे माता गंगा! तू तुझ्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार ऐहिक सुख, आनंद आणि मोक्ष प्रदान करतेस. सर्व तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतात. मी देखील तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतो. अशावेळी, शतकांपासून वाहणाऱ्या गंगा मातेला स्वच्छ ठेवणे हि आपली खूप मोठी जबाबदारी आहे. याच उद्देशाने आठ वर्षांपूर्वी आम्ही ‘नमामि गंगे अभियान’ सुरू केले. भारताच्या या उपक्रमाचे आज जगभरातून कौतुक होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. संयुक्त राष्ट्राने 'नमामि गंगे' अभियानाचा समावेश हा पर्यावरण पुनर्संचयित करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे. जगभरातील अशा 160 उपक्रमांमध्ये 'नमामि गंगे'ला हा सन्मान मिळाला आहे, ही अजून एक आनंदाची बाब आहे.
मित्रांनो, लोकांचा निरंतर सहभाग ही ‘नमामि गंगे’ अभियानाची सर्वात मोठी उर्जा आहे. ‘नमामि गंगे’ अभियानात गंगा प्रहरी आणि गंगा दूत यांची भूमिका देखील महत्वाची आहे. वृक्षारोपण, घाटांची स्वच्छता, गंगा आरती, पथनाट्य, चित्रकला आणि कविता यांच्या माध्यमातून ते जनजागृतीचे काम करत आहेत. या अभियानामुळे जैवविविधतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. हिल्सा मासे, गंगेच्या पत्रातील डॉल्फिन आणि कासवांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगा स्वच्छ झाल्याने उपजीविकेच्या इतर संधीही वाढत आहेत. येथे मी जैवविविधता लक्षात घेऊन तयार केलेल्या 'जलचर आजीविका मॉडेल' ची चर्चा करू इच्छितो. ही पर्यटन आधारित बोट सफारी 26 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. साहजिकच 'नमामि गंगे' अभियानाचा विस्तार, त्याची व्याप्ती ही नदीच्या स्वच्छतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हे अभियान म्हणजे एकीकडे आपल्या इच्छाशक्तीचा आणि अथक प्रयत्नांचा प्रत्यक्ष पुरावा आहे, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगाला एक नवा मार्गही दाखवणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला संकल्प जर दृढ असेल तर मोठ्यातील मोठे आव्हान देखील सोपे होते. सिक्कीमच्या थेगू गावातील ‘संगे शेरपा’ यांनी याचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. मागील 14 वर्षांपासून ते 12,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर पर्यावरण संरक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. संगे जी यांनी सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व असलेले सोमगो सरोवर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी या ग्लेशियर (हिम) सरोवराचे रूप पालटले आहे. 2008 मध्ये जेव्हा संगे शेरपा यांनी ही स्वच्छता मोहीम सुरू केली तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.मात्र अगदी कमी कालावधीतच त्यांच्या या उदात्त कार्यात युवक व ग्रामस्थांसह पंचायतीने देखील त्यांना सहकार्य करायला सुरुवात केली. आज तुम्ही सोमगो सरोवर बघायला गेलात तर आजूबाजूला मोठमोठे कचऱ्याचे डबे दिसतील. आता येथे जमा होणारा कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. येथे येणाऱ्या पर्यटकांना कापडापासून तयार केलेल्या कचऱ्याच्या पिशव्या देखील दिल्या जातात जेणेकरून त्यांनी इकडे-तिकडे कचरा फेकू नये. स्वच्छ झालेले हे सरोवर पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक येथे भेट देतात. सोमगो सरोवराच्या संवर्धनाच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नासाठी संगे शेरपा यांना अनेक संस्थांकडून सन्मानितही करण्यात आले आहे. अशा प्रयत्नांमुळेच आज सिक्कीमची गणना भारतातील स्वच्छ राज्यांमध्ये होते. संगे शेरपाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबतच, पर्यावरण संरक्षणाच्या उदात्त प्रयत्नात व्यस्त असलेल्या देशभरातील लोकांचेही मी मनापासून कौतुक करतो.
मित्रांनो, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘स्वच्छ भारत अभियान’ आहे याचा मला आनंद आहे. 2014 मध्ये हे जन आंदोलन सुरु झाल्यापासून या अभियानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांनी अनेक आगळेवेगळे प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न केवळ समाजामध्येच नाही तर सरकारी पातळीवर देखील दिसून येत आहेत. कचरा काढल्याने, अनावश्यक वस्तू टाकून दिल्यामुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी होते, नवीन जागा उपलब्ध होते. पूर्वी जागेअभावी लांब कार्यालये भाड्याने घ्यावी लागत होती. आजकाल या स्वच्छतेमुळे एवढी जागा उपलब्ध होत आहे की, आता सर्व कार्यालये एकाच आली आहेत हे या सततच्या प्रयत्नांचे फलित आहे. मागील काही दिवसांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, शिलॉंग अशा अनेक शहरांमधील आपल्या कार्यालयांमध्ये खूप प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज त्यांच्याकडे नवीन कामासाठी दोन, तीन मजले उपलब्ध झाले आहेत. या स्वच्छतेमुळेच, आम्हाला आमच्या स्रोतांच्या अधिकाधिक वापराचा उत्तम अनुभव मिळत आहे. हे अभियान देशासाठी, समाजासाठी, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये आणि कार्यालयातही सर्वत्र उपयुक्त ठरत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या कला-संस्कृतीबद्दल आपल्या देशामध्ये एक नवीन जागरुकता, एक नव चेतना जागृत होत आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा उदाहरणांची चर्चा देखील करतो. ज्याप्रमाणे कला, साहित्य आणि संस्कृती ही समाजाची सामूहिक पुंजी असते त्याचप्रमाणे त्यांचा विकास करणे ही देखील संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. असाच एक यशस्वी प्रयत्न लक्षद्वीपमध्ये होत आहे. येथे कल्पेनी बेटावर एक क्लब आहे - कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब. हा क्लब तरुणांना स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देतो. येथे युवकांना कोलकली, परीचाकली, किलिप्पाट्ट आणि पारंपारिक गाण्यांचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच जुना वारसा नवीन पिढीच्या हातात सुरक्षित होत आहे, तो पुढे जात आहे आणि मित्रांनो, असे प्रयत्न देशातच नव्हे तर परदेशातही होत आहेत, याचा मला आनंद आहे. नुकतेच दुबईतील कलारी क्लबने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.दुबईच्या क्लबने विक्रम केला, मग त्याचा भारताशी काय संबंध? असा विचार कोणीही करेल. वास्तविक, हा विक्रम भारतातील प्राचीन मार्शल आर्ट कलारीपयट्टूशी संबंधित आहे. हा विक्रम म्हणजे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी कलारीचे सादरीकरण करण्याच्या कामगिरीचा आहे.कलारी क्लब दुबईने दुबई पोलिसांसोबत याची योजना आखली आणि यूएईच्या राष्ट्रीय दिनी याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात 4 वर्षांच्या मुलांपासून ते 60 वर्षांच्या वृद्धांनी आपल्या क्षमतेनुसार कलारीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विविध पिढ्या एक प्राचीन परंपरा उत्साहाने कशी पुढे नेत आहेत, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.
मित्रांनो, मी 'मन की बात' च्या श्रोत्यांना कर्नाटकातील गडक जिल्ह्यात राहणार्या ‘क्वेमाश्री'जीबद्दल देखील सांगू इच्छितो. दक्षिणेत कर्नाटकातील कला-संस्कृती पुनरुज्जीवीत करण्याच्या कार्यात 'क्वेमश्री' गेली 25 वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची तपश्चर्या किती महान आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. यापूर्वी ते हॉटेल मॅनेजमेंट या व्यवसायाशी संबंधित होते. पण, त्यांची संस्कृती आणि परंपरेसाठी असलेली ओढ इतकी खोल होती की त्यांनी यालाच आपले ध्येय बनवले. त्यांनी 'कला चेतना' नावाने व्यासपीठ सुरु केले. हे व्यासपीठ आज कर्नाटकातील आणि देश-विदेशातील कलाकारांचे अनेक कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये स्थानिक कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण कामेही केली जातात.
मित्रांनो, देशवासीयांचा त्यांच्या कला आणि संस्कृतीबद्दलच्या या उत्साहातून आपल्या वारशाप्रती असलेली अभिमानाची भावना दिसून येते. आपल्या देशातील कानाकोपऱ्यात असे अनेक रंग विखुरलेले आहेत. त्यांना सजवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपल्याला देखील निरंतर काम केले पाहिजे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशातील अनेक भागात बांबूपासून अनेक सुंदर आणि उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. विशेषत: आदिवासी भागात कुशल बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार, कुशल कलाकार आहेत. देशात बांबूशी संबंधित ब्रिटीशकालीन कायदे बदलल्यापासून त्याची मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे. महाराष्ट्रातील पालघरसारख्या भागातही आदिवासी, बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवतात. बांबूपासून तयार केलेले बॉक्स, खुर्च्या, चहाची भांडी, टोपल्या, ट्रे यांसारख्या गोष्टी खूप लोकप्रिय होत आहेत. एवढेच नाही तर हे लोक बांबू गवतापासून सुंदर कपडे आणि सजावटीचे सामान देखील तयार करतात. त्यामुळे आदिवासी महिलांना रोजगारही मिळत आहे आणि त्यांच्या कौशल्याला ओळख देखील प्राप्त होत आहे.
मित्रांनो, कर्नाटकातील एक जोडपे सुपारीच्या तंतुंपासून बनवलेली अनेक अनोखी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत. कर्नाटकातील शिवमोगा येथील हे जोडपे आहे – श्री सुरेश आणि त्यांची पत्नी श्रीमती मैथिली. हे लोक सुपारीच्या तंतूपासून ट्रे, प्लेट्स आणि हँडबॅग्स सारख्या अनेक सजावटीच्या वस्तू बनवत आहेत. या तंतुंपासून बनवलेल्या चपलांनाही आज खूप पसंती मिळत आहे. आज त्यांची उत्पादने लंडन आणि युरोपातील इतर बाजारपेठांमध्ये विकली जात आहेत. हीच तर आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची आणि पारंपारिक कौशल्यांचे वैशिष्ट्य आहे, जे सर्वांनाच आवडत आहे. भारताच्या या पारंपारिक ज्ञानात जग शाश्वत भविष्याचा मार्ग पाहत आहे. आपल्याला देखील अधिकाधिक जागरुक होण्याची आवश्यकता आहे. आपण स्वतःही अशी देशी आणि स्थानिक उत्पादने वापरावीत आणि इतरांनाही भेट द्यावीत. यामुळे आपली एक ठळक ओळख निर्माण होईल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे भविष्य देखील उज्वल होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता आपण 'मन की बात' च्या अभूतपूर्व 100 व्या भागाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहोत. मला अनेक देशवासीयांची पत्रे मिळाली आहेत, ज्यात त्यांनी 100 व्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे. 100 व्या भागामध्ये आपण काय बोलले पाहिजे, त्याला कशाप्रकारे विशेष बनवायचे याबद्दल तुम्ही मला तुमच्या सूचना पाठवल्या तर त्या मला आवडतील. पुढच्या वेळी आपण 2023 मध्ये भेटू. 2023 सालासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. हे वर्षही देशासाठी खास जावो, देश नवनवीन उंची गाठत राहो, आपण सर्वांनी मिळून संकल्प करायचा आहे आणि प्रत्यक्षात त्याचे पालन देखील करायचे आहे. यावेळी अनेकजण सुट्टीच्या मूडमध्ये देखील आहेत. तुम्ही या सणांचा खूप आनंद घ्या, पण थोडं सावध देखील राहा. तुम्ही पाहत असाल कि, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे मास्क आणि हात धुणे यासारख्या उपायांचे अधिकाधीक पालन करा. आपण सावध राहिलो तर आपण सुरक्षितही राहू आणि आपल्या आनंदात कोणताही अडथळा येणार नाही. याबरोबर, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.
मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरवात मी, एकाअनोख्या भेटवस्तूच्या चर्चेने करणार आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिर्सिल्ला जिल्ह्यात एक विणकर बंधू आहे - येल्धी हरिप्रसाद गारू. त्यांनी स्वतःच्या हाताने विणलेला हा जी-२०चा लोगो मला पाठवला आहे. ही अप्रतिम भेट पाहून मला आश्चर्य वाटलं. हरिप्रसादजींचे त्यांच्या कलेवर इतके प्रभुत्व आहे की, ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हरिप्रसादजी यांनी स्वतः विणलेल्या या जी-20 च्या लोगो सोबत मला एक चिठ्ठी देखील पाठवली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या जी-20 परिषदेचे आयोजन भारताने करणे हि भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले आहे. देशाच्या या यशस्वी कामगिरीच्या आनंदा प्रीत्यर्थ त्यांनी जी-20 चा हा लोगो स्वतःच्या हाताने तयार केला आहे. विणकामाच्या या महान प्रतिभेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे आणि आज ते तन्मयतेने आपले काम करत आहेत.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मला जी-20 चा लोगो आणि भारताच्या प्रेसिडेन्सीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला होता. या लोगोची निवड जाहीर स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली होती. हरिप्रसाद गारू यांनी पाठवलेली ही भेट जेव्हा मला मिळाली तेव्हा मनात आणखी एक विचार आला. तेलंगणाच्या एका जिल्ह्यातील व्यक्ती जी-20 सारख्या शिखर परिषदेशी जोडली जात आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. आज हरिप्रसाद गारू यांच्यासारख्या अनेकांनी मला पत्र पाठवून कळविले आहे की, एवढ्या मोठ्या शिखर परिषदेचे यजमानपद आपला देश भूषवणार असल्यामुळे आमचे उर अभिमानाने भरून आले आहे. पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लाराजी आणि कोलकात्याचे तुषार जगमोहन यांच्या पत्राचा देखील मी इथे नक्की उल्लेख करेन. जी-20 संदर्भातील भारताच्या सक्रिय प्रयत्नांचे त्यांनी खूप कौतुक केले आहे.
मित्रांनो, जी-20 ची जागतिक लोकसंख्येमध्ये दोन तृतीयांश, जागतिक व्यापारात तीन चतुर्थांश आणि जागतिक जीडीपीमध्ये 85% भागीदारी आहे. तुम्ही कल्पना करू शकता –भारत आजपासून बरोबर 3 दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबरला इतक्या मोठ्या समूहाचे, इतक्या शक्तिशाली समूहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी ही किती मोठी संधी चालून आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला ही जबाबदारी मिळाल्याने ही बाब अधिकच खास झाली आहे.
मित्रांनो, जी-20 चे अध्यक्षपद आमच्यासाठी एक मोठी संधी आहे. आपल्याला या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे. शांतता असो वा ऐक्य, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा मग शाश्वत विकास असो, भारताकडे या सर्वांशी निगडीत आव्हानांवर उपाय आहेत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) या विषयातून वसुधैव कुटुम्बकमप्रती आपली बांधिलकी दिसून येते, आपण नेहमी म्हणतो -
ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेषां शान्तिर्भवतु ।
सर्वेषां पुर्णंभवतु ।
सर्वेषां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
म्हणजे प्रत्येकाचे कल्याण होवो, प्रत्येकाला शांती मिळो, प्रत्येकाला पूर्णत्व प्राप्त होवो आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. आगामी काळात देशाच्या विविध भागांमध्ये जी-20 शी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या काळात जगाच्या विविध भागांमधील लोकांना तुमच्या राज्यात येण्याची संधी मिळणार आहे. यावेळी तुम्ही आपल्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट रंग जगासमोर आणाल याची मला खात्री आहे आणि तुम्ही हि गोष्ट देखील विसरू नका की जी-20 मध्ये येणारे लोक, हे आता जरी प्रतिनिधी म्हणून आले असले, तरी तेही भविष्यातील पर्यटकच आहेत. माझी तुम्हा सर्वांना आणखी एक विनंती आहे, विशेषत: माझ्या तरुण सहका-यांना, तुम्ही देखील हरिप्रसाद गारू यांच्यासारखे कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा. कपड्यावर जी-20 चा भारतीय लोगो खूप मस्त पद्धतीने, स्टायलिश पद्धतीने छापता येईल. मी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना आवाहन करतो की, त्यांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद , स्पर्धा आयोजित कराव्यात. G20.in या संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या आवडीनुसार तिथे अनेक गोष्टी सापडतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने, भारताच्या खाजगी क्षेत्राने डिझाइन आणि निर्मित केलेले पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. 'विक्रम-एस' असे या रॉकेटचे नाव आहे. स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून, ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाचे शिर अभिमानाने उंचावले.
मित्रांनो, 'विक्रम-एस' रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनाने हलके आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्यातुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणे, ही आता, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटच्या निर्मितीमध्ये आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 'विक्रम-एस'च्या लाँच मिशन ला दिलेले 'प्रारंभ’ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. देशातील आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. आपण कल्पना करू शकता की जी मुले कधीकाळी कागदाचे विमान बनवून उडवायची त्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी मिळत आहे. आपण कल्पना करू शकता की एकेकाळी चंद्र आणि ताऱ्यांकडे पाहून आकाशात आकार तयार करणाऱ्या मुलांना आता भारतातच क्षेपणास्त्र बनविण्याची संधी मिळत आहे. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नंही प्रत्यक्षात उतरत आहेत. रॉकेटची निर्मिती करणारे हे तरुण जणू काही म्हणतायत - Sky is not the limit.
मित्रांनो, अंतराळ क्षेत्रातील आपले हे यश भारत आपल्या शेजारील देशांसोबत देखील सामायिक करीत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हा उपग्रह खूप उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवेल ज्यामुळे भूतानला त्याच्या नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिबिंब आहे.
मित्रांनो, 'मन की बात'च्या मागील काही भागांमध्ये आपण अवकाश, तंत्रज्ञान, नवनिर्मिती या विषयांवर खूप बोललो आहोत, हे तुमच्या लक्षात आले असेलच. याची दोन खास कारणे आहेत, एक म्हणजे आपली तरुणाई या क्षेत्रात उत्तम काम करत आहे. ते आता मोठा विचार करीत आहेत आणि मोठे यश संपादन करत आहेत. आता छोट्या छोट्या यशाने त्यांचे समाधान होणार नाही. दुसरं म्हणजे नाविन्य आणि मूल्यनिर्मितीच्या या रोमांचक प्रवासात ते त्यांच्या इतर तरुण सहकाऱ्यांना आणि स्टार्ट अप्सनाही प्रोत्साहन देत आहेत.
मित्रांनो, जेव्हा आपण तंत्रज्ञानाशी संबंधित नवनिर्मिती संदर्भात बोलत असतो, तेव्हा आपण ड्रोनला कसे विसरू शकतो? ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये कशाप्रकारे ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदांची वाहतूक केली हे आपण पाहिले. किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील दुर्गम जिल्हा असून या हंगामात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. अशा बर्फवृष्टीत किन्नौरचा उर्वरित राज्याशी कित्येक आठवडे संपर्क होणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत तेथून सफरचंदांची वाहतूक करणेही तितकेच कठीण आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे हिमाचलची चविष्ट किन्नौरी सफरचंदं लोकांपर्यंत लवकर पोहोचतील. यामुळे आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा खर्च कमी होईल - सफरचंद वेळेवर बाजारात पोहचेल, सफरचंदाची नासाडी कमी होईल.
मित्रांनो, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत आहेत. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही? अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. मला विश्वास आहे की, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही.
प्रिय देशवासियांनो, मी तुमच्यासाठी एक छोटेसे गाणे वाजवत आहे.
##(Song)##
तुम्ही सगळ्यांनीच हे गाणं कधीतरी नक्कीच ऐकलं असेल. हे बापूंचं आवडतं गाणं आहे, परंतु मी जर तुम्हाला सांगितले की या गाण्याचा गायक ग्रीक आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल! आणि ही गोष्ट तुमच्यासाठी अभिमानास्पद देखील असेल. हे गाणं गाणारा ग्रीसचा गायक आहे- 'कॉन्स्टँटिनोस कलाइत्झीस'. गांधीजींच्या 150 व्या जयंती उत्सवाच्या वेळी त्यांनी हे गाणे गायले होते. पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी याची चर्चा इथे करत आहे. त्यांना भारत आणि भारतीय संगीताची प्रचंड आवड आहे. त्यांना भारताची इतकी ओढ आहे की, गेल्या 42 (बेचाळीस) वर्षांत ते जवळजवळ दरवर्षी भारतात आले आहेत. भारतीय संगीताचे मूळ, विविध भारतीय संगीत, विविध प्रकारचे राग, ताल आणि रस तसेच विविध घराण्यांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींच्या योगदानाचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे, भारतातील शास्त्रीय नृत्यांचे विविध पैलू देखील त्यांनी बारकाईने समजून घेतले आहेत. भारताशी संबंधित या सर्व अनुभवांना त्यांनी आता एका पुस्तकात अतिशय सुंदरपणे गुंफले आहे. इंडियन म्युझिक नावाच्या त्यांच्या पुस्तकात सुमारे 760 छायाचित्रे आहेत. यातील बहुतांश छायचित्रे त्यांनी स्वत: काढलेली आहेत. इतर देशांमध्ये असलेला भारतीय संस्कृतीविषयीचा असा उत्साह आणि आकर्षण खरोखरच उल्हासित करणारा आहे.
मित्रांनो, काही आठवडे अगोदर एक बातमी आली होती ज्यामुळे आमची मान गर्वाने ताठ होणार आहे. आपल्याला हे जाणून खूप छान वाटेल की, गेल्या ८ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात तीन पटींनी वाढली आहे. विद्युत आधारे सगीत वाद्यांपुरते बोलायचं तर त्यांची निर्यात ६० पटींनी वाढली आहे. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत यांचे वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येईल. भारतीय संगीत वाद्यांचे सर्वात मोठे खरेदीदार अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंग्डम यासारखे विकसित देश आहेत. आमच्या देशाला संगीत, नृत्य आणि कलेची अत्यंत समृद्ध असा वारसा आहे, ही आमच्या सर्वांसाठीच सद्भाग्याची बाब आहे.
मित्रांनो, महान मनीषी कवी भर्तृहारी यांना त्यांनी रचलेल्या नीतीशतक या काव्यासाठी आम्ही सर्व ओळखतो. एका श्लोकात ते म्हणतात की, कला, संगीत आणि साहित्याप्रति असलेली आमची आवड ही मानवतेची खरी ओळख आहे. वास्तवात, आमची संस्कृती याला मानवतेच्याही वर अध्यात्मिकतेकडे घेऊन जाते. वेदांमध्ये सामवेदाला तर आमच्या विविध प्रकारच्या संगीतांचा स्त्रोत म्हणून म्हटलं आहे. माता सरस्वतीच्या हातातीतल वीणा असो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी असो, किंवा भोलनाथ यांच्या हातातील डमरू असो, आमच्या देवीदेवताही संगीतापासून अलग राहिलेल्या नाहीत. आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीत संगीताचा शोध घेत असतो. मग तो नदीच्या वाहत्या पाण्याचा झुळुझुळू वाहणारा नाद असो, पावसाच्या थेंबांचा स्वर असो, पक्ष्यांचा गुंजारव असो की हवेचा घुमणारा आवाज असो, आमच्या संस्कृतीमध्ये संगीत सर्वत्र भरून राहिलं आहे. हे संगीत केवळ शरिराला सुखद जाणीव देत नाही तर मनालाही उल्हसित करते. संगीत आमच्या समाजाला जोडतही असतं. जर भांगडा आणि लावणीमध्ये आनंदाची भावना आहे, तर रवींद्र संगीत आमच्या आत्म्याला आल्हाद देतं. देशभरातील आदिवासींची वेगवेगळ्या प्रकारांची संगीत परंपरा आहे. ती आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून रहाण्यासाठी आणि निसर्गासह रहाण्याची प्रेरणा देंत असते.
मित्रांनो, संगीताच्या वेगवेगळ्य़ा शैलीनं केवळ आमच्या संस्कृतीला समृद्ध केलं आहे असं नाही तर जगभरातील संगीतावर आपला कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे. भारतीय संगीताची ख्याती जगभरातील कानाकोपर्यात पसरली आहे. मी एका गीताची एक ध्वनिमुद्रिका आपल्याला ऐकवतो.
गीत...
आपण विचार करत असाल की, घराच्या जवळच कुठल्या तरी मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे. परंतु हा स्वर भारतापासून दूर हजारो मैल वसलेल्या दक्षिण अमेरिकेतील गयाना इथला आहे. १९ आणि २० व्या शतकात खूप मोठ्या संख्येनं आमचे लोक इथनं गयानात गेले होते. ते इथून भारताच्या अनेक परंपरा आपल्याबरोबर घेऊन गेले होते. उदाहरण पहायचं तर, जसे आम्ही भारतात होळी साजरी करतो, गयानामध्येही होळीचे रंग अत्यंत जोशात खेळले जातात. जिथं होळीचे रंग असतात, तेथे फगवा म्हणजे होळीचे संगीतही गायिलं जातं. गयानामध्ये फगवामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या विवाहाशी संबंधित गीतं गाण्याची एक विशेष परंपरा आहे. या गीतांना चौताल असं म्हटलं जातं. या गीतांना त्याच प्रकारची चाल आणि वरच्या पट्टीत गायिलं जातं, जसं की आमच्या इथं गायलं जातं. इतकंच नव्हे तर, गयानात चौताल स्पर्धाही होत असते. याच प्रकारे, खूप सारे भारतीय विशेषतः उत्तरप्रदेश आणि बिहारमधनं लोक फिजीलाही गेले होते. ते पारंपरिक भजन कीर्तनं गात असत, ज्यात मुख्यतः रामचरित मानसमधील दोहे असत. त्यांनी फिजीमध्येसुद्धा भजन कीर्तनाशी जोडलेली अनेक मंडळं स्थापन केली. फिजीमध्ये रामायण मंडळं या नावाची आजसुद्धा दोन हजाराहून अधिक भजन कीर्तन मंडळं आहेत. ते आज प्रत्येक गाव आणि गल्लीत पहाता येतात. मी तर इथं केवळ काहीच उदाहरणं दिली आहेत. आपण पूर्ण जगभर पहाल तर भारतीय संगीताची आवड असलेल्या लोकांची यादी खूपच मोठी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमचा देश जगातील सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आम्ही खूप अभिमान बाळगतो. म्हणून, आम्ही आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं. ही आमची जबाबदारीसुद्धा आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न आमचे ईशान्येतील नागालँड राज्यामधील काही मित्र करत आहेत. मला हा प्रयत्न चांगला वाटला, म्हणून मी असा विचार केला की तो मन की बातच्या श्रोत्यांशी सामायिक करू.
मित्रांनो, नागालँडमध्ये नागा समाजाची जीवनशैली, त्यांची कला संस्कृती आणि संगीत, प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतं. हा आमच्या गौरवशाली वारशाचा महत्वपूर्ण भाग आहे. नागालँडच्या लोकांचं जीवन आणि त्यांचं कौशल्य शाश्वत जीवनशैलीसाठीही खूप महत्वपूर्ण आहे. या परंपरा आणि कौशल्य सांभाळून ठेवून पुढ्ल्या पिढीसाठी पोहचवण्यासाठी तिथल्या लोकांनी एक संस्था स्थापन केली आहे, जिचं नाव आहे लिडि-क्रो-यू. नागा संस्कृतीचे अत्यंत सुंदर आयाम हळूहळू विस्मृतीत चालले होते, लिडि-क्रो-यू संस्थेनं पुन्हा त्यांना पुनरूज्जीवित करण्याचं काम केलं आहे. उदाहरणार्थ, नागा लोकसंगीत स्वतःच एक समृद्ध शैली आहे. या संस्थेंनं नागा संगीताचे अल्बम आणण्याचं काम सुरू केलं आहे. आतापर्यंत असे तीन अल्बम बाजारात आणले गेले आहेत. हे लोक लोकसंगीत, लोकनृत्याशी संबंधित कार्यशाळाही आयोजित करत असतात. युवकांना या सर्व बाबींसाठी प्रशिक्षण दिलं जात असतं. इतकंच नाही तर, नागालँडच्या पारंपरिक शैलीमध्ये कपडे शिवणं, शिलाई आणि विणण्याचं जे काम आहे, त्याचंही प्रशिक्षण तेथील युवकांना दिलं जातं. ईशान्येत बांबूची कितीतरी उत्पादनं बनवली जातात. नव्या पिढीच्या युवकांना बांबू उत्पादनं बनवण्यासही शिकवलं जातं. यामुळे हे युवक आपल्या संस्कृतीशी जोडले जातातच, पण त्याचबरोबर त्यांच्या रोजगारासाठी नवीन संधीही तयार होतात. नागा लोकसंस्कृतीच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, म्हणून लिडि-क्रो-यू ही संस्था प्रयत्न करत असते.
मित्रांनो, आपल्या प्रदेशातही अशा अनेक सांस्कृतिक वैशिष्ट्यं आणि परंपरा असतील. आपणही आपापल्या प्रदेशात अशा प्रकारचे प्रयत्न करू शकता. आपल्या माहितीत असा एखादा आगळावेगळा प्रयत्न होत असेल तर, आपण त्याची माहिती मला त्याची जरूर द्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या इथं असं म्हटलं गेलं आहे की,
विद्याधनं सर्वधनप्रधानम्
म्हणजे, कुणी विद्येचं दान करत असेल तर तो समाजाच्या हिताचं सर्वात मोठं काम करत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लावलेला एक लहानसा दिवाही पूर्ण समाजाला उजळून टाकू शकतो. आज देशभरात असे कितीतरी प्रयत्न केले जात आहेत, याचा मला मोठा आनंद होतो. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौपसून ७०-८० किलोमीटर अंतरावर हरदोईजवळ बानसा गाव वसलं आहे. मला या गावातील जतिन ललितसिंह यांच्याबाबत माहिती मिळाली आहे. जे शिक्षणाचं महत्व प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. जतिन जींनी दोन वर्षांपूर्वी इथं समुदायासाठी वाचनालय आणि साधनसंपत्ती केंद्र सुरू केलं होतं. त्यांच्या या केंद्रामध्ये हिंदी आणि इंग्रजी साहित्य, संगणक. कायदा आणि सरकारी परीक्षांच्या तयारीशी संबंधित तीन हजारहून अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. या वाचनालयात मुलांच्या आवडीची पूर्णपणे जाणीव ठेवली गेली आहे. इथं उपलब्ध कॉमिक्सची पुस्तकं असतील किंवा शैक्षणिक खेळणी असतील, मुलांना त्यांची खूप आवड निर्माण झाली आहे. लहान मुलं खेळता खेळताच इथं नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी येतात. शिक्षण ऑनलाईन असो की ऑफलाईन, जवळपास ४० स्वयंसेवक या केंद्रात विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी जुंपून घेतात. दररोज गावातील जवळपास ८० विद्यार्थी या वाचनालयात वाचण्यासाठी येतात.
मित्रांनो, झारखंडचे संजय कश्यप हेही गरीब मुलांच्या स्वप्नांना नवीन पंख लावण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनात संजय जी यांनी चांगल्या पुस्तकांच्या उणीवेचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांनी मनाशी असा निश्चय केला की, पुस्तकांची कमतरता असल्याने ते आपल्या प्रदेशातील मुलांचं भवितव्य अंधकारमय होऊ देणार नाही. आपल्या या मोहीमेच्या मुळे, ते आज झारखंडच्या अनेक जिल्हयांमध्ये मुलांसाठी लायब्ररी मॅन झाले आहेत. संजयजींनी जेव्हा आपल्या नोकरीस सुरूवात केली, तेव्हा पहिले पुस्तकालय त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जागेत सुरू केलं होतं. नोकरी करत असताना, त्यांची जिथं बदली होत असे, तिथं ते गरीब आणि आदिवासी मुलांसाठी वाचनालय उघडण्याच्या प्रयत्नांना लागत असत. असं करत करत त्यांनी झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी वाचनालयं सुरू केली आहेत. वाचनालय सुरू करण्याची त्यांच्या मोहीमेनं आज एका सामाजिक आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे. संजय जी असोत किंवा जतिनजी, त्यांच्या अनेक प्रयत्नांसाठी मी त्यांची विशेष प्रशंसा करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वैद्यकीय शास्त्राच्या जगानं संशोधन आणि नावीन्यपूर्णेतेच्या बरोबरीनंच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या सहाय्यानं खूपच प्रगती केली आहे. परंतु काही आजार;आजही आपणा सर्वांसाठी एक खूप मोठं आव्हान म्हणून आहे. असाच एक आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रोफी. हा एक स्नायुंचा आजार असून तो मुख्यतः अनुवंशिक आजार आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यात शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. रोग्याला आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज करणंही अवघड होतं. अशा रोग्यांवरील उपचार आणि त्यांच्या शुश्रुषेसाठी खूप मोठ्या सेवाभावाची आवश्यकता असते. आमच्या कडे हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये असं एक केंद्र आहे जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी रोग्यांसाठी आशेंचा नवा किरण बनलं आहे. या केंद्राचं नाव आहे-मानव मंदिर. इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही संस्था त्याचं संचालन करत असते. मानव मंदिर आपल्या नावाप्रमाणेच मानव सेवेचं अद्भुत उदाहरण आहे. इथं रूग्णांना ओपीडी आणि प्रवेशाची सेवा तीन चार वर्षे अगोदर सुरू झाली होती. मानव मंदिरात जवळपास ५० रोग्यांसाठी खाटांची सुविधाही आहे. फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी आणि हायड्रोथेरपी यांच्याबरोबरीनंच योग प्राणायामाच्या सहाय्यानं इथं रोगावर उपचार केले जातात.
मित्रांनो, सर्व प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधांच्या माध्यमातून या केंद्रात रोग्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे प्रयत्न होतात. मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी संबंधित आव्हानाच्या बाबतीत जागरूकतेचाही अभाव आहे. म्हणून, या केंद्रातर्फे हिमाचल प्रदेशातच नव्हे तर देशभरातील रोग्यांसाठी जनजागृती शिबीरे आयोजित केली जातात. या संस्थेचं व्यवस्थापनही या आजारानं त्रस्त लोकच करत असतात, ही सर्वात मोठी स्फूर्तीदायक बाब आहे. सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला बाल्दीजी, इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या अध्यक्ष संजना गोयलजी आणि या संघटनेच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे विपुल गोयल जी या संस्थेसाठी अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहेत. मानव मंदिरला रूग्णालय आणि संशोधन केंद्र या रूपात विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. यामुळे इथं रोग्यांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील. मी या दिशेनं प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांची मनापासून प्रशंसा करतो. त्याचबरोबर, मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगाचा सामना करत असलेल्या सर्व लोकांच्या आरोग्याची कामना करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये आम्ही देशवासियांच्या ज्या विधायक आणि सामाजिक कार्याची चर्चा केली, ते देशातील उर्जा आणि उत्साहाचे उदाहरण आहे. आज प्रत्येक देशवासी कोणत्या नं कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या चर्चेत आम्ही पाहिलं की, जी २० सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमात आमचे एक विणकर मित्रांनी आपली जबाबदारी ओळखून ते पुढे आले. याच प्रकारे, कुणी पर्यावरणासाठी प्रयत्न करत आहे तर कुणी पाण्यासाठी काम करत आहे. कितीतरी लोक शिक्षण, वैद्यकीय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते संस्कृती आणि परंपरापर्यंत असामान्य काम करत आहेत. आज आमचा प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे त्यामुळे हें होत आहे. अशी कर्तव्य भावना जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये येते, तेव्हा त्याचं सोनेरी भविष्य आपोआपच निश्चित होतं आणि देशाच्या सोनेरी भविष्यातच आमचंही सोनेरी भविष्य आहे. मी आपणा सर्व देशवासियांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल नमन करतो. पुढील महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच काही उत्साहवर्धक विषयांवर अवश्य चर्चा करू. आपल्या सूचना आणि विचार आम्हाल अवश्य पाठवत रहा. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
नमस्कार. आज देशाच्या अनेक भागात सूर्य उपासनेचा 'छठ' हा सण साजरा केला जातो आहे. या 'छठ' उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आपापल्या गावी, आपापल्या घरी, आपल्या कुटुंबाकडे पोहोचले आहेत. छठ मातेने सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी करतो.
मित्रहो,
सूर्यपूजेची ही परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची नाळ निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे, याचा पुरावा आहे. या पूजेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सूर्यप्रकाशाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, चढउतार हा जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत चित्त स्थिर ठेवले पाहिजे. छठ मातेच्या पूजेमध्ये वेगवेगळी फळे आणि ठेकुआचा नैवेद्य अर्पण केला जातो. हे व्रत एखाद्या कठीण साधनेसारखेच आहे. छठ पूजेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पूजेसाठी वापरल्या जाणार्या वस्तू समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेल्या असतात. पूजेसाठी बांबूपासून बनवलेली टोपली किंवा सुपली वापरली जाते. मातीच्या दिव्यांचेही महत्त्व आहेच. या सणाच्या माध्यमातून हरभरा पिकवणारे शेतकरी आणि बत्तासे तयार करणारे लहान उद्योजक यांचे महत्त्व समाजात रुजवण्यात आलेआहे. त्यांच्या सहकार्याशिवाय छठ पूजा पूर्ण होऊ शकत नाही. हा सण आपल्या आयुष्यातील स्वच्छतेच्या महत्त्वावरसुद्धा भर देतो. या उत्सवाचे आगमन होताच रस्ते, नद्या, घाट, पाण्याचे विविध स्त्रोत या सर्वांची सामुदायिकरित्या स्वच्छता केली जाते. छठ हा सण हा'एक भारत- श्रेष्ठ भारत' चे सुद्धा उदाहरण आहे. आज बिहार आणि पूर्वांचलमधील लोक, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी छठ मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. दिल्ली तसेचमुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सुद्धा छठपुजेचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते आहे. मला आठवते की पूर्वी गुजरातमध्ये छठपूजा होत नसे. पण बदलत्या काळानुसार आज गुजरातमध्ये जवळपास सर्वत्रच छठपूजेचे रंग दिसू लागले आहेत. हे पाहून मलाही मनापासून आनंद होतो. परदेशात सुद्धा छठपूजेची किती भव्य चित्रे येतात, हे आपण पाहतो. म्हणजेच भारताचा हा समृद्ध वारसा, आपली श्रद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवते आहे. या महान उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझ्यातर्फे अनेकानेक शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.
तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे एक शेतकरी आहेत, थिरू के. एझिलन. त्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतात दहा अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप संच बसवला. आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही. आता ते शेतात सिंचन करण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील भरतपूर येथील कमलजी मीणा हे पीएम कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत. कमलजींनी शेतात सौर पंप बसवला, त्यामुळे त्यांचाही खर्च कमी झाला आहे. खर्च कमी झाला, त्यामुळे उत्पन्नही वाढले. कमलजी इतर अनेक लघु उद्योगांसाठीही सौर उर्जेचा वापर करत आहेत. त्यांच्या भागात लाकूडकाम केले जाते, गायीच्या शेणापासून उत्पादने तयार केली जातात, त्यासाठीही सौरऊर्जेचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबरते 10-12 जणांना रोजगारही देत आहेत. म्हणजेच कमलजींनी कुसुम योजनेतून जी सुरूवात केली, त्याचा सुगंध आता अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे.
मित्रहो,
तुम्ही महिनाभर वीज वापराल आणि त्या विजेचे बिल येण्याऐवजी तुम्हाला विजेचे पैसे मिळतील, अशी कल्पना तुम्ही करू शकता का? सौरऊर्जेनेहे करूनदाखवले आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील मोढेरा, या देशातील पहिल्या सौर गावाबद्दल बरेच काही ऐकले असेल. मोढेरा यासौर गावातील बहुतांश घरांमध्ये सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. आता तिथल्या अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी विजेचे बिल येत नाही, उलट विजेच्या उत्पन्नाचे धनादेश येत आहेत. हे घडताना पाहून आता देशातील अनेक गावांमधले लोक मला पत्र लिहून, त्यांचे गाव सौर ग्राम व्हावे, अशी विनंती करत आहेत. भारतात लवकरच सौरगावांची उभारणी ही फार मोठी लोकचळवळ होईल, असे दिसते आहे. तो दिवस निश्चितच दूर नाही आणि मोढेरा गावातील लोकांनी त्याची सुरुवात केली आहे.
या, 'मन की बात'च्या श्रोत्यांना मोढेरा गावातील लोकांची ओळख करून देऊया. श्री विपिनभाई पटेल हे सध्या आमच्यासोबत फोनवर बोलत आहेत.
पंतप्रधान - विपिन भाई नमस्कार. बघा, आता मोढेरा गाव हे संपूर्ण देशासाठी आदर्श म्हणून समोर आले आहे. पण जेव्हा तुमचे नातेवाईक, ओळखीचे लोक तुम्हाला याबद्दल विचारतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता, काय उपयोग झाला?
विपिन जी - सर, लोक आम्हाला विचारतात, तेव्हा आम्ही सांगतो की आम्हाला पूर्वी जे वीज बिल यायचे ते आता शून्य येते आणि कधी तरी 70 रुपये येते, पण आमच्या संपूर्ण गावाची आर्थिक परिस्थिती आता सुधारते आहे.
पंतप्रधान – म्हणजे आधी वीज बिलाची काळजी वाटायची, ती आता संपली आहे.
विपिन जी - हो सर, हे अगदी खरे आहे. सध्या संपूर्ण गावात काळजीचे वातावरण नाही. सगळे म्हणतात की सरांनी जे काही केले, ते खूप चांगले केले आहे. ते खुश आहेत सर. प्रत्येकजण आनंदात आहे.
पंतप्रधान - आता स्वत:च्याच घरात स्वत:च वीज कारखान्याचे मालक झालात. तुमच्याच घराच्या छतावर वीजनिर्मिती होते आहे.
विपिन जी - हो सर, खरे आहे सर.
पंतप्रधान - मग या बदलामुळे गावातील लोकांवर काय परिणाम झाला आहे?
विपिन जी - सर, गावातले सगळे लोक शेती करत आहेत, विजेबाबतच्या त्रासातून आमची सुटका झाली आहे. वीजेचे बिल भरायचे नाही, त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत सर.
पंतप्रधान - म्हणजे वीजेचे बिलही गेले आणि सोयही वाढली.
विपिन जी –सगळी कटकटच संपली सर. तुम्ही इथे आला होता आणि इथे थ्रीडी शोचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मोढेरा गावाचे चित्रच बदलून गेले आहे सर. आणि सेक्रेटरी सुद्धा आले होते सर...
पंतप्रधान - हां, हां...
विपिन जी – आमचे गाव तर चांगलेच प्रसिद्ध झाले सर...
पंतप्रधान – हो ना. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस.. ही त्यांचीच इच्छा होती. त्यांनी मला अगदीच गळ घातली की भाई, हे एवढं मोठं काम केलं आहे, मला तिथे जाऊन बघायचे आहे. चला विपिन भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या गावातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. अवघ्या जगाने तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ही सौर ऊर्जा मोहीम घरोघरी जावी.
विपिन जी - ठीक आहे सर. आम्ही सुद्धा सर्व लोकांना सांगू कीसौर यंत्रणा लावा, स्वत:चे पैसे खर्चून सुद्धा लावा, त्यात खूप फायदा आहे.
पंतप्रधान – हो, लोकांना नक्की समजावून सांगा. चला, अनेकानेक आभार. धन्यवाद भाऊ.
विपिन जी :- धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून माझे आयुष्य धन्य झाले.
पंतप्रधान:-विपिन भाईंचे मनापासून आभार.
या, आता आपण मोढेरा गावातील वर्षा ताईंशीही बोलूया.
वर्षाबेन – हॅलो, नमस्कार सर.
पंतप्रधान - नमस्कार - नमस्कार वर्षाबेन. तुम्ही कशा आहात ?
वर्षाबेन - आम्ही खुशाल आहोत सर, तुम्ही कसे आहात ?
पंतप्रधान – मी सुद्धा खुशाल आहे.
वर्षाबेन – तुमच्याशी बोलून अगदी धन्य वाटते आहे सर..
पंतप्रधान - अच्छा वर्षाबेन,
वर्षाबेन - हो सर...
पंतप्रधान – तुम्ही मोढेरा गावातल्या आहात, लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातल्या आहात.
वर्षाबेन - मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातली आहे सर. मी माजी सैनिकाची पत्नी आहे सर.
पंतप्रधान - मग यापूर्वी भारतात कुठेकुठे जाण्याची संधी मिळाली तुम्हाला?
वर्षाबेन - मी राजस्थानमध्ये गेले, गांधी नगर मध्ये गेले, जम्मू मध्ये कचरा कांझोर आहे, तिथे जाण्याची संधी मिळाली, सोबत राहता आले. तिथे अनेक सुविधा मिळत होत्या सर.
पंतप्रधान - हा, सैन्यात असल्यामुळे तुम्ही छान हिंदी बोलत आहात.
वर्षाबेन - हो, हो,शिकले आहे सर.
पंतप्रधान - मला सांगा,मोढेरामध्ये इतका मोठा बदल झाला आहे, तुम्ही हा सोलर रूफटॉप प्लांट बसवला. सुरुवातीला लोक बोलत असतील, तेव्हा तुमच्या मनात आलेच असेल, याचा काय उपयोग आहे? काय करत आहेत ? काय होईल ? अशी वीज मिळते का? असे अनेक विचार तुमच्या मनात आले असतील. आता तुमचा अनुभव काय आहे? याचा काय फायदा झाला आहे?
वर्षाबेन -खूपच फायदा झाला आहे सर. तुमच्यामुळे आमच्या गावात रोज दिवाळी साजरी होते. आम्हाला 24 तास वीज मिळते आहे, बिल तर येतच नाही. आमच्या घरात आम्ही सर्व इलेक्ट्रिक वस्तू आणल्या आहेत सर, त्या सर्व आम्ही वापरतो सर, फक्त तुमच्यामुळे. बिल येतच नाही, त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे सगळ्या वस्तू वापरू शकतो.
पंतप्रधान – हो, हे तर खरेच आहे. विजेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे तुम्ही ठरवले आहे तर.
वर्षाबेन – हो सर. आता आम्हाला कोणतीही अडचण नाही. या सर्व वस्तु आता आम्ही निर्धास्तपणे वापरू शकतो, वॉशिंग मशीन, एसी सगळे काही वापरू शकतोसर.
पंतप्रधान - आणि गावातले इतर लोकही यामुळे खुश आहेत का?
वर्षाबेन –खूपच खुश आहेत सर.
पंतप्रधान - बरं. तुमचे पती तर सूर्य मंदिरात काम करतात ना? तिथे लाईट शो चा किती मोठा कार्यक्रम झाला आणि आता जगभरातून पाहुणे येत आहेत.
वर्षा बेन - जगाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी लोक येत असतात सर,, पण तुम्ही आमचे गाव जगभरात प्रसिद्ध केले आहे.
पंतप्रधान –मग आता तुमच्या पतीचे काम वाढले असेल, इतके पाहुणे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत.
वर्षा बेन – काहीच हरकत नाही. कितीही काम वाढले तरी हरकत नाहीसर, माझ्या नवऱ्याचीही हरकत नाही, फक्त तुम्ही आमच्या गावाचा विकास करत राहा.
पंतप्रधान –आता आपल्याला सर्वांना मिळून गावाचा विकास करायचा आहे.
वर्षा बेन – हो, हो, सर, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
पंतप्रधान - आणि मी मोढेरा गावातील लोकांचे अभिनंदन करू इच्छितो, कारण गावाने ही योजना स्वीकारली आणि आपण आपल्या घरात वीज बनवू शकतो, याची खात्री त्यांना वाटली.
वर्षा बेन - 24 तास सर ! आमच्या घरात वीज येते आणि आम्ही खूप आनंदात आहोत.
पंतप्रधान – चला तर. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे पैसे शिल्लक आहेत, ते मुलांच्या भल्यासाठी वापरा. त्या पैशाचा चांगला वापर करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात फायदा होईल. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मोढेरावासीयांना माझा नमस्कार!
मित्रहो,
वर्षाबेन आणि विपीन भाई यांनी जे काही सांगितले ते संपूर्ण देशासाठी, गावांसाठी आणि शहरांसाठी प्रेरक आहे. मोढेराच्या या अनुभवाची देशभरात पुनरावृत्ती होऊ शकते. सूर्याच्या शक्तीमुळे आता पैशाची बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल. मंजूर अहमद लर्हवाल हे जम्मू-काश्मीरमधीलश्रीनगर येथे राहणारे साथी आहेत. काश्मीरमध्ये थंड वातावरण असल्यामुळे विजेचा खर्च जास्त आहे. याच कारणामुळे मंजूर यांचे वीज बिल सुद्धा 4 हजार रुपयांपेक्षा जास्त येत असे. मात्र मंजूरजींनी त्यांच्या घरी सोलर रूफटॉप प्लांट लावला आणि त्यामुळे त्यांचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे ओदीशातीलकुन्नी देउरी या मुलीने स्वत:बरोबरच इतर महिलांसाठी सुद्धा सौरउर्जेच्या माध्यमातून रोजगाराचे साधन प्राप्त केले आहे. कुन्नी ही ओदीशामधल्या केंदुझर जिल्ह्यातल्या करदापाल गावात राहते. ती आदिवासी महिलांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या रीलिंग मशीनवर रेशीम कातण्याचे प्रशिक्षण देते. सौर मशिनमुळे या आदिवासी महिलांना वीजबिलाचा भार सहन करावा लागत नाही, शिवाय त्यांना उत्पन्नही मिळते आहे. हे सूर्यदेवाच्या सौरऊर्जेचेच वरदान आहे. वरदान आणि प्रसादाचा लाभ जितक्या जास्त लोकांना मिळेल, तितके चांगले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही यात सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आत्ताच मी तुमच्यासोबत सूर्याबद्दल बोलत होतो. आता माझे लक्ष अवकाशाकडे वळते आहे, कारण आपला देश सौरऊर्जा क्षेत्राबरोबरच अवकाश क्षेत्रातही चमत्कार करून दाखवतो आहे. आज अवघे जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले आहे. त्यामुळे 'मन की बात'च्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सांगून त्यांनाही आनंदात सहभागी करून घ्यावे, असे मला वाटले.
तुम्ही पाहिले असेल की आत्ता, काही दिवसांपूर्वीच भारताने एकाचवेळी 36 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण केले. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे. या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. आणि याच्या मदतीने अगदी दुर्गम आणि दूरवरचे भाग देखील देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेने जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचे देखीलहे एक उदाहरण आहे. तुमच्याशी बोलत असताना मला जुने दिवस आठवत आहेत, तेव्हा भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण, भारतातील वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलेच आहे पण त्याच बरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज भारत एकाच वेळी अनेक डझन उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारताने स्वतःला अत्यंत सशक्तपणे उभे केले आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारे देखील उघडली आहेत.
मित्रांनो,
विकसित भारताच्या निर्धारासह मार्गक्रमण करणारा आपला देश सर्वांच्या प्रयत्नांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य करू शकतो. पूर्वीच्या काळी, भारतात अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणांच्या कक्षेत मर्यादित झाले होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र, भारतातील युवकांसाठी, खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले तेव्हापासून या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले आहेत.भारतातील उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग या क्षेत्रात अनेक नवनवी अभिनव संशोधने आणि नवनवी तंत्रज्ञाने आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ‘इन-स्पेस’च्या सहकार्याने या क्षेत्रात मोठे बदल घडून येणार आहेत.इन-स्पेसच्या माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पे-लोड्स आणि उपग्रह यांचे प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मी अधिकाधिक स्टार्ट अप उद्योजक आणि संशोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या मोठ्या संधींचा लाभ घ्यावा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
जेव्हा विद्यार्थ्यांचा, युवा शक्तीचा, नेतृत्व शक्तीचा विषय निघतो तेव्हा, असे दिसते की त्यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक जुन्या-पुराण्या समजुती घट्ट बसून राहिल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो की, विद्यार्थी शक्तीबाबत चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी जोडून या शक्तीचा परीघ मर्यादित केला जातो. पण, विद्यार्थी शक्तीचा आवाका फार मोठा, अति प्रचंड आहे. विद्यार्थी शक्ती हा भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठीचा आधारस्तंभ आहे. शेवटी, आज जे युवावस्थेत आहेत तेच सर्वजण भारताला 2047 कडे घेऊन जाणार आहेत. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा वर्गाची ही शक्ती,त्यांचे कष्ट, त्यांचे श्रम, त्यांची प्रतिभा भारताला त्या नव्या उंचीवर घेऊन जाईल जी उंची गाठण्याचा निर्धार आज देशाने केला आहे. आपले युवक सध्या ज्या पद्धतीने देशासाठी कार्य करत आहेत, देश उभारणीच्या कामात एकाग्र झाले आहेत ते पाहून माझे मन अत्यंत विश्वासाने भरून गेले आहे. ज्या पद्धतीने आपले युवक हॅकेथॉन्समध्ये प्रश्नांची उत्तरे शोधतात, त्यासाठी रात्र-रात्र जागून काम करतात, त्यातून मोठी प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये देशातील लाखो युवकांनी एकत्र येऊन अनेक आव्हानांची उत्तरे शोधली आणि देशाला अनेक समस्यांची नवी उत्तरे शोधून दिली आहेत.
मित्रांनो,
तुमच्या लक्षात असेल की मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘जय अनुसंधान’चे आव्हान केले होते. मी, या दशकात भारताला टेकेड बनविण्याविषयी देखील बोललो होतो. मला हे पाहून फार आनंद झाला की या संदर्भात आपल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. याच महिन्यात 14-15 ऑक्टोबरला देशातील सर्व 23 आयआयटी संस्था आपापली अभिनव संशोधने आणि संशोधन प्रकल्प यांचे सादरीकरण करण्यासाठी एका मंचावर एकत्र झाले.या कार्यक्रमात देशभरातील निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी 75 पेक्षा जास्त उत्तमोत्तम प्रकल्प सादर केले.हे प्रकल्प आरोग्यसेवा, कृषी, रोबोटिक्स,सेमी कंडक्टर्स, 5 जी संपर्क यंत्रणा अशा विविध संकल्पनांवर आधारित होते. तसे पाहायला गेले तर हे सर्वच प्रकल्प एकाहून एक उत्कृष्ट होते, पण मी त्यातील काही प्रकल्पांकडे तुमचे लक्ष वेधून इच्छितो. उदाहरणार्थ, आयआयटी भुवनेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या एका पथकाने नवजात अर्भकांसाठी पोर्टेबल व्हेंटीलेटर विकसित केले आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाचा वापर दुर्गम क्षेत्रातील अर्भकांसाठी अत्यंत सुलभतेने करता येऊ शकेल. ज्या बाळांचा जन्म विहित वेळेआधी झाला आहे अशांचा जीव वाचविण्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. आपले अनेक विद्यार्थी विजेच्या सहाय्याने प्रवास, ड्रोन तंत्रज्ञान, 5 जी यांच्याशी संबंधित नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झटत आहेत. देशातील अनेक आयआयटी संस्था एकत्र येऊन एका बहुभाषिक प्रकल्पावर देखील काम करत आहेत. हा प्रकल्प, स्थानिक भाषा शिकण्यासाठी सोप्या पद्धती विकसित करण्यासंबंधी आहे. हा प्रकल्प, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील मदत करेल. आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूर या संस्थांनी एकत्र येऊन भारताचे स्वदेशी 5 जी टेस्ट बेड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ही खरोखरच एक मोठी सुरुवात आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी अनेक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील अशी मला आशा आहे. आयआयटी संस्थांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षण संस्था देखील त्यांची संशोधन आणि विकासाशी संबंधित कार्ये अधिक वेगाने करतील अशी अपेक्षा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आपल्या समाजाच्या कणाकणात भरलेली आहे आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला ती जाणवते. पर्यावरण रक्षणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची आपल्या देशात कमतरता नाही.
कर्नाटकात बेंगळूरू येथे राहणारे सुरेश कुमार यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाची एक प्रबळ भावना त्यांच्यात दिसून येते. शहरातील सहकारनगर परिसरात असलेले जंगल पुन्हा हिरवेगार करण्याचा निश्चय त्यांनी 20 वर्षांपूर्वी केला. हे काम अत्यंत कठीण होते. पण, त्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेली रोपटी आज 40-40 फुटी विशालकाय वृक्ष झाले आहेत. त्यांच्या सौंदर्याने प्रत्येकाचे मन मोहित होते. यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना देखील फार अभिमान वाटतो. सुरेशकुमारजी आणखी एक अनोखे कार्य देखील करतात. त्यांनी कन्नड भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारनगर मध्ये एक बस थांबा देखील तयार केला आहे. त्यांनी शेकडो लोकांना कन्नड भाषेतील वचने कोरलेल्या पितळेच्या ताटल्या भेटीदाखल दिल्या आहेत. पर्यावरण शास्त्र आणि संस्कृती दोन्हींची सोबतीने प्रगती व्हावी, संवर्धन व्हावे ही कल्पना किती महान आहे, तुम्हीच विचार करा.
मित्रांनो,
आजच्या काळात पर्यावरण-स्नेही निवास आणि पर्यावरण-स्नेही उत्पादने यांच्या बाबतीत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरुकता निर्माण झाली आहे. तामिळनाडू येथे सुरु असलेल्या अशाच एका मनोरंजक उपक्रमाची माहिती मिळविण्याची संधी मला मिळाली.हा भव्य उपक्रम कोईम्बतूर येथील अनाईकट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या गटाने सुरु केला आहे. या महिलांनी निर्यातीसाठी टेराकोटा प्रकारच्या दहा हजार पर्यावरण-स्नेही चहाच्या कपांची निर्मिती केली. नवलाची गोष्ट अशी की हे टेराकोटा चहाचे कप बनविण्याची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी स्वतःच निभावली. या महिलांनी मातीचे मिश्रण तयार करण्यापासून ते अखेरच्या पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतःच केले. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतले होते. या अद्भुत उपक्रमाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
मित्रांनो,
त्रिपुरामधील काही गावांनी देखील फार चांगली शिकवण दिली आहे. तुम्ही जैव-गाव या संकल्पनेबद्दल नक्कीच ऐकले असेल, पण त्रिपुरामधील काही गावांनी जैव-गाव संकल्पनेचा दुसराटप्पा देखील पार केला आहे.नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कसे कमी करता येईल यावर जैव-गाव संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात भर दिला आहे. यामध्ये, विविध उपायांच्या मदतीने लोकांचे जीवनमान सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येते. या टप्प्यात सौर उर्जा,बायोगॅस, मधुमक्षिका पालन आणि जैविक खतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाते. समग्र दृष्टीकोनातून पाहिले तर जैव-गाव 2 हवामान बदलाच्या दुष्परिणामांविरुद्ध सुरु असलेल्या अभियानाला आणखी बळकटी देणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वाढता उत्साह पाहून मला फारच आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मिशन लाईफ अर्थात जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी न करणाऱ्या, पर्यावरणाचे नुकसान न करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार ही मिशन लाईफची साधी-सोपी संकल्पना आहे. तुम्ही सर्वांनी देखील या अभियानाची माहिती करून घ्या आणि अशी जीवन शैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे.
मित्रांनो,
उद्या 31 ऑक्टोबरला, राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा दिवस आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम, देशातील एकतेचे बंध मजबूत करतो, आपल्या युवकांना प्रोत्साहित करतो. काही दिवसांपूर्वीच आपल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या काळात देखील अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळाली.’जुडेगा इंडिया तो जितेगा इंडिया’ या संकल्पनेसह राष्ट्रीय क्रीडास्पर्धांनी एकतेचा सशक्त संदेश तर दिलाच पण त्याचबरोबर भारताच्या क्रीडा संस्कृतीला देखील प्रोत्साहन देण्याचे काम केले.भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत्या हे ऐकल्यावर तुम्हांला देखील आनंद होईल. या स्पर्धांमध्ये 36 क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आणि त्यात 7 नव्या तसेच योगासने आणि मल्लखांब या दोन स्वदेशी क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला. सुवर्णपदकांच्या कमाईत सर्विसेसचे पथक आणि महाराष्ट्र तसेच हरियाणा यांची पथके असे तीन संघ आघाडीवर होते. या स्पर्धांमध्ये सहा राष्ट्रीय विक्रम आणि सुमारे साठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील विक्रम नव्याने प्रस्थापित झाले. या स्पर्धांतील पदक विजेत्या, नवे विक्रम स्थापित करणाऱ्या तसेच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो.मित्रांनो, गुजरातमध्ये झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे मी मनापासून कौतुक करतो.तुम्ही पाहिले असेल की गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धांच्या आयोजनापूर्वी एकदा माझ्या मनात असाही विचार आला की या काळात संपूर्ण गुजरात राज्य उत्सवांमध्ये मशगुल असते. अशा वेळी तेथील जनता या खेळांचा आनंद कसा घेऊ शकेल? एकीकडे स्पर्धांसाठी एवढी मोठी व्यवस्था करणे आणि दुसरीकडे नवरात्रीचा गरबा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन. ही सगळी जबाबदारी गुजरात एकाचवेळी कशी पार पाडेल? पण गुजरातच्या जनतेने त्यांच्या आदरातिथ्याने सर्व पाहुण्यांना खुश केले. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या कालावधीत ज्या प्रकारे या भागात कला, क्रीडा आणि संस्कृती यांचा संगम झाला त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडू देखील दिवसभर क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेत तर संध्याकाळी गरबा आणि दांडिया यांच्या रंगात रंगून जात.त्यांनी गुजराती पद्धतीचे जेवण आणि नवरात्रीची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सामायिक केली.हे पाहणे अत्यंत आनंददायी होते. शेवटी अशा प्रकारच्या खेळांमुळे, भारताच्या विविध संस्कृतींची माहिती मिळत असते. हे खेळ ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला देखील आणखी सशक्त करतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला आपला देश आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहे. गेल्या वर्षीपासून आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी वारसा आणि गौरव साजरा करण्याचीसुरुवात केली होती हे तुमच्या लक्षात असेलच. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या लहानशा आयुष्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लाखो लोकांची एकजूट करण्यात यश मिळविले. भारताचे स्वातंत्र्य आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाकरिता त्यांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. धरती आबा बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखे असे बरेच काही आहे. मित्रांनो, जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा विषय निघतो, त्यांच्या लहानशा जीवनकालावधीकडे आपण पाहतो तेव्हा असे दिसते की आज देखील आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि धरती आबा तर म्हणाले होते की – हीआपली भूमी आहे, आपण हिचे रक्षणकर्ते आहोत. त्यांच्या या वाक्यात मातृभूमीप्रती कर्तव्य भावना देखील आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव देखील आहे. आपल्याला आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडता कामा नये, आपण या संस्कृतीपासून दूर जाता कामा नये या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. आजच्या काळात देखील आपण आपल्या देशातील आदिवासी समाजांकडून निसर्ग आणि अपर्यावरण यांच्या बाबतीत खूप काही शिकू शकतो.
मित्रांनो,
गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी मला रांची येथील भगवान बिरसा मुंडा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. देशातील सर्व युवकांना माझा आग्रह आहे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. मी तुम्हांला सांगू इच्छितो की परवा एक नोव्हेंबरला मी गुजरात-राजस्थान सीमेवरील मानगड या ठिकाणी असेन. भारताचे स्वातंत्र्य युध्द आणि आपल्या समृध्द आदिवासी वारशाच्या संदर्भात मानगडया ठिकाणाला विशिष्ट महत्त्व आहे. या ठिकाणी नोव्हेंबर 1913 मध्ये भयानक नरसंहार झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक आदिवासींची निर्दयपणे हत्या केली होती. असे सांगितले जाते की या नरसंहारात एक हजारहून अधिक आदिवासींचे प्राण घेण्यात आले. या आदिवासी आंदोलनाचे नेतृत्व प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोविंद गुरुजींनी केले होते. आज मी त्या सर्व आदिवासी हुतात्म्यांना आणि गोविंद गुरुजींच्या अतुलनीय धाडसाला तसेच शौर्याला नमन करतो. या अमृत काळात भगवान बिरसा मुंडा, गोविंद गुरु आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचे जितक्या निष्ठेने पालन करू तितका आपला देश नव्या उंचीवर जाईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
येत्या 8 नोव्हेंबरला गुरुपर्व आहे. गुरु नानक जी यांचे प्रकाश पर्व आपल्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळते. गुरु नानकजी यांनी आपले संपूर्ण जीवनभर मानवतेचा प्रकाश पसरविण्यासाठी व्यतीत केले. गेल्या काही वर्षांमध्ये देशाने गुरूंची शिकवण जनतेत पोहोचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्याला गुरु नानकदेवजी यांचे 550वे प्रकाश पर्व देश-विदेशात व्यापक पातळीवर साजरे करण्याचे भाग्य लाभले होते. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती होणे देखील तितकेच आनंददायी आहे. काही दिवसांपूर्वी मला हेमकुंड साहिब स्थानासाठी निर्माण होणाऱ्या रोपवे ची कोनशीला रचण्याची संधी प्राप्त झाली. आपल्याला आपल्या गुरूंच्या विचारांतून सतत शिकायचे आहे, त्यांच्याप्रती समर्पित राहायचे आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, नदीत स्नान करतो, गरिबांची सेवा करतो, त्यांना दान देतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्ये त्यांचा राज्य दिन साजरा करणार आहेत.आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करेल, केरळ पिरावी साजरा होईल. कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल. याच प्रकारे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा ही राज्ये देखील त्यांचे स्थापना दिवस साजरे करतील. मी या सर्व राज्यांतील नागरिकांना शुभेच्छा देतो.आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये परस्परांकडून शिकण्याची, सहयोगाने वाटचाल करण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा जितकी सशक्त होईल तितकाच आपला देश प्रगती करेल. आपण या भावनेसह पुढील वाटचाल करू असा विश्वास मला वाटतो. तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या, निरोगी रहा. ‘मन की बात’मधील पुढच्या भेटीपर्यंत मला रजा द्या. नमस्कार, धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?
मित्रहो, एक कृती दल तयार केले आहे. हे कृती दल चित्त्यांवर लक्ष ठेवणार असून ते इथल्या वातावरणात किती सहज रूळतात, हे पाहणार आहे. त्यानुसार काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते बघता येतील. पण तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना काही कामे सोपवतो आहे.त्यासाठी MyGov मंचावर एक स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेचा एक भाग म्हणून लोकांनी काही गोष्टी शेअर कराव्यात, असे आवाहन मी करतो. चित्त्यांसाठी आपण जी मोहिम राबवतो आहोत, त्या मोहिमेला काय नाव देता येईल? या सर्व चित्यांना कोणत्या नावाने हाक मारता येईल, त्यांचे नामकरण करायचा विचारही आपण करू शकतो. पारंपारिक पद्धतीने आपण त्यांचे नामकरण करू शकलो तर ते उत्तम होईल, कारणआपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी, परंपरेशी आणि वारशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला स्वाभाविकपणे आकर्षित करते. इतकंच नाही तर माणसाने प्राण्यांशी कसं वागावं, हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्येही, प्राणीमात्रांना आदराने वागवण्यावर भर देण्यात आला आहे. तुम्ही या स्पर्धेत जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन मी तुम्हा सर्वांना करतो. कोणी सांगावं, कदाचित बक्षिस म्हणून चित्ता बघायची पहिली संधी तुम्हालाच मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 25 सप्टेंबर रोजी महान मानवतावादी, विचारवंत आणि देशाचे महान सुपुत्र दीनदयाल उपाध्यायजी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. कोणत्याही देशातील तरुणांना आपल्या स्वत्वाचा आणि वारशाचा अभिमान वाटू लागतो, तसतसे त्यांना आदिम कल्पना आणि तत्त्वज्ञानाचे आकर्षण वाटू लागते. दीनदयाळजींनी आपल्या आयुष्यात जगातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या होत्या, हे त्यांच्या विचारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. अनेक वैचारिक संघर्षांचे ते साक्षीदार होते. त्यामुळेच त्यांनी 'एकात्म मानवदर्शन' आणि 'अंत्योदया'ची संकल्पना देशासमोर ठेवली, जी पूर्णपणे भारतीय होती. दीनदयाळजींचे 'एकात्म मानवदर्शन' ही एक अशी संकल्पना आहे, जी विचारसरणीच्या नावाखालील संघर्ष आणि पूर्वग्रहांपासून आपल्याला मुक्त करते. अवघ्या मानवजातीला समान मानणारे भारतीय तत्वज्ञान त्यांनी पुन्हा एकदा जगासमोर आणले. 'आत्मवत् सर्वभूतेषु' अर्थात आपण सर्व जीवांना आपल्यासारखे मानले पाहिजे, आपल्यासारखेच वागवले पाहिजे, असे आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे. आधुनिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून भारतीय तत्त्वज्ञान जगाला कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकते, हे दीनदयाळजींनी आपल्याला शिकवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देशात एक प्रकारची न्यूनगंडाची भावना होती, त्यातून मुक्त करून त्यांनी आपली स्वतःची बौद्धिक जाणीव जागृत केली. आपली संस्कृती आणि अस्मिता आपण अभिव्यक्तकरू शकू, तेव्हाच आपले आपले स्वातंत्र्यसार्थ ठरू शकते, असे ते म्हणत. या कल्पनेच्या बळावर त्यांनी देशाच्या विकासाचा दृष्टीकोन निर्माण केला होता. देशाच्या तळागाळातील व्यक्तीच्या परिस्थितीवरून देशाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते, असे, दीनदयाळ उपाध्याय जी म्हणायचे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण दीनदयाळजींचे विचार जास्तीतजास्त समजून घेतले आणि त्यापासून शिकवण घेत राहिलो, तर आपल्याला सर्वांनाच देशाला पुढे नेण्याची प्रेरणा मिळत राहिल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून तीन दिवसांनंतर म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवातला एक विशेष दिवस येतो आहे. या दिवशी आपण, भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ काळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. मित्रहो, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या आदर्शांना अनुसरून त्यांच्या स्वप्नांमधला भारत आपण घडवूया, हीच त्यांना सार्थ श्रद्धांजली ठरेल. हुतात्म्यांची स्मारके, त्यांची नावे दिलेली स्थाने आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वीच कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून देशाने असाच एक प्रयत्न केला आहे आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित विशेष प्रसंग आपण साजरे करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने २८ सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करून पाहावे, असे मला वाटते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, खरे तर 28 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचे आणखी एक कारण तुमच्याकडे आहे. काय, ते ठाऊक आहे का! मी फक्त दोन शब्द उच्चारतो, पण मला माहित आहे की ते ऐकल्यावर तुमचा उत्साह चार पटीने वाढेल. हे दोन शब्द आहेत - सर्जिकल स्ट्राइक. वाढला ना उत्साह! आपल्या देशात सुरु असलेल्या अमृत महोत्सवाची मोहीम उत्साहात साजरी करूया, आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेऊ या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, असे म्हणतात की आयुष्यातल्या संघर्षातून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या व्यक्तीसमोर कोणतेही संकट टिकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अनेक सहकाऱ्यांना बघतो, जे शारीरिक त्रुटींमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहेत. असे अनेक लोक आहेत, ज्यांना ऐकू येत नाही किंवा ते बोलू शकत नाहीत. अशा सहकाऱ्यांसाठी सांकेतिक भाषा हा सर्वात मोठा आधार आहे. मात्र भारतात वर्षानुवर्षे सांकेतिक भाषेसाठी कोणतेही हावभाव निर्धारित नव्हते, कोणतीही मानके नव्हती. या अडचणींवर मात करण्यासाठी 2015 साली भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या संस्थेने आतापर्यंत दहा हजार शब्द आणि हावभावांचा शब्दकोश तयार केला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.
दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिनानिमित्त अनेक शालेय अभ्यासक्रमही सांकेतिक भाषेत सुरू करण्यात आले आहेत. मानकांनुसार सांकेतिक भाषेचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही बराच भर देण्यात आला आहे. सांकेतिक भाषेचा जो शब्दकोश तयार करण्यात आला आहे, त्याचे व्हिडिओ तयार करून त्याचा सातत्याने प्रसार केला जातो आहे. अनेक लोकांनी, अनेक संस्थांनी यूट्यूबवर भारतीय सांकेतिक भाषेत आपल्या वाहिन्या सुरू केल्या आहेत; म्हणजेच 7-8 वर्षांपूर्वी सांकेतिक भाषेबद्दल देशात जी मोहीम सुरू झाली होती, त्याचा लाभ, आता माझ्या लक्षावधी दिव्यांग बंधू-भगिनींना मिळतो आहे. हरियाणाच्या रहिवासी असणाऱ्या पूजाजींनी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी त्यांना आपल्या मुलाशी संवाद साधता येत नव्हता. 2018 साली त्यांनी सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आणि त्य़ानंतर या मायलेकांचे जगणे सोपे झाले आहे. पूजाजींच्या मुलानेही सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आपल्या शाळेत कथाकथन स्पर्धेत बक्षीसही जिंकून दाखवले. टिंकाजी यांची सहा वर्षांची मुलगी आहे, तिला ऐकू येत नाही. टिंकाजींनी आपल्या मुलीला सांकेतिक भाषेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पाठवले, पण त्यांना स्वतःला सांकेतिक भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना आपल्या मुलीशी संवाद साधता येत नव्हता. आता टिंकाजींनी सुद्धा सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे आणि आता या माय लेकी सुद्धा एकमेकींशी भरपूर गप्पा मारतात. केरळमधल्या मंजूजीं यांनाही या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला आहे. मंजूजी यांना जन्मापासून ऐकू येत नाही, इतकेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचीही हीच परिस्थिती होती. अशात सांकेतिक भाषा हे या संपूर्ण कुटुंबासाठी संवादाचे साधन बनले आहे. आता तर मंजूजींनीही सांकेतिक भाषेच्या शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो, भारतीय सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता वाढली पाहिजे, म्हणूनसुद्धा मी ‘मन की बात’ कार्यक्रमात याबाबत चर्चा करतो आहे. या माध्यमातून आपण आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांची जास्तीत जास्त मदत करू शकू. बंधू आणि भगिनींनो, काही दिवसांपूर्वी मला ब्रेल लिपीतील हेमकोशाची प्रत सुद्धा मिळाली. हेमकोश हा आसामी भाषेतल्या सर्वात जुन्या शब्दकोशांपैकी एक आहे. तो एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता. सुप्रसिद्ध भाषातज्ञ हेमचंद्र बरुआ यांनी त्याचे संपादन केले होते. हेमकोशाची ब्रेल आवृत्ती सुमारे 10,000 पृष्ठांची आहे आणि ती 15 पेक्षा जास्त खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. यातीलएक लाखापेक्षा जास्त शब्दांचे भाषांतर करावे लागणार आहे. या संवेदनशील प्रयत्नाचे मी मनापासून कौतुक करतो. असे सर्व प्रयत्न, दिव्यांग सहकाऱ्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवण्यास मोठा हातभार लावतात. पॅरा स्पोर्ट्स क्षेत्रातही भारताच्या यशाचा ध्वज उत्तुंग फडकतो आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण सर्वच या यशाचे साक्षीदार ठरलो आहोत. आज तळागाळातील दिव्यांगांना फिटनेस कल्चर अर्थात तंदुरूस्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. यामुळे दिव्यांगांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी सुरत मधील अन्वीला भेटलो. या भेटीबद्दल मला 'मन कि बात' च्या सर्व श्रोत्यांना नक्कीच सांगायला आवडेल; कारण अन्वी आणि अन्वीचा योग यांच्यासोबाबत झालेली माझी भेट खूपच स्मरणीय होती. मित्रांनो, अन्वी जन्मतःच डाऊन सिंड्रोमची रुग्ण आहे आणि लहानपणापासूनच ती हृदयरोगाचा सामना करत आहे. ती केवळ तीन महिन्यांची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. इतकी सगळी संकटे येऊन देखील अन्वीने आणि तिच्या आई-बाबांनी कधीच हार मानली नाही. अन्वीच्या आई-वडिलांनी डाऊन सिंड्रोमबाबत सर्व माहिती गोळा केली आणि अन्वीला अधिकाधिक आत्मनिर्भर करण्याचा निश्चय केला. त्यांनी अन्वीला पाण्याचा ग्लास कसा उचलायचा, बुटांची नाडी (लेस) कशी बांधायची, कपडयांची बटणं कशी लावायची अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, चांगलया सवयी कोणत्या या सर्व गोष्टी त्यांनी तिला खूप धीराने शिकवल्या. अन्वीने या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी दाखवलेली इच्छाशक्ती, आपले कौशल्य यासगळ्यामुळे तिच्या आई-वडिलांना देखील खूप बळ मिळाले. त्यांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन्वी आपल्या दोन पायांवर देखील व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तिच्या आई-वडिलांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा जेव्हा ती योग शिक्षकांकडे गेली तेव्हा ते खूपच संभ्रमात होते की हि चिमुरडी योग करू शकेल की नाही; परंतु त्या शिक्षकांना अंदाज नव्हता की अन्वी किती जिद्दी आहे. तिने आपल्या आईसोबत योग अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तर ती योग निपुण झाली आहे. अन्वी आता देशभरात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते आणि पदक जिंकते. योगने अन्वीला नवीन आयुष्य प्रदान केले आहे. अन्वीने योग आत्मसात करून आयुष्य आत्मसात केले आहे. योगमुळे अन्वीच्या आयुष्यात अद्भुत बदल बघायला मिळाले आहेत असे अन्वीच्या आई-वडिलांनी मला सांगितले. आता तिचा आत्मविश्वास खूपच वृद्धिंगत झाला आहे. योगमुळे अन्वीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा झाली आहे आणि आता तिला खूपच कमी औषधे घ्यावी लागतात. योगमुळे अन्वीला झालेल्या लाभांचा, देश-परदेशातील 'मन कि बात' च्या श्रोत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. अन्वी हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. ज्यांना योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचे अध्ययन करावे आणि योगचे सामर्थ्य जगासमोर आणावे. असे कोणतेही संशोधन जगभरातील डाऊन सिंड्रोमने पीडित मुलांसाठी खूपच फायदेशीर ठरेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे हे आता सर्व जगाने मान्य केले आहे. विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडित समस्या सोडवण्यात योगची खूपच मदत होते. योगची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. आता संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अजून एका प्रयत्नाला अधोरेखित करून त्याला सन्मानित केले आहे; आणि तो प्रयत्न आहे 'भारतातील उच्चरक्तदाब नियंत्रण उपक्रम' या उपक्रमा अंतर्गत रक्तदाब पीडित रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात. या उपक्रमाने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे ते अभूतपूर्व आहे. ज्या लोकांवर उपचार करण्यात आले त्यापैकी जवळपास अर्ध्या लोकांचा रक्तदाब आता नियंत्रणात आहे ही आपल्यासाठी उत्सवर्धक बाब आहे. आपल्या अथक प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो, मानवी आयुष्याचा जीवन प्रवास हा निरंतर पाण्याशी जोडलेला आहे - मग तो समुद्र असो, नदी असो किंवा मग तलाव. जवळपास साडे सात हजार किलोमीटरहुन अधिक लांबीचा समुद्रकिनारा भारताला लाभल्यामुळे समुद्राशी आपले एक अतूट नाते आहे. अनेक राज्य आणि बेटांमधून हि सागरी सीमा जाते. भारतातील विविध समुदाय आणि विविधतेने नटलेली संस्कृती इथे विकसित होताना आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर या सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांची खाद्य संस्कृती देखील लोकांना आकर्षित करते. परंतु या सर्व रोचक बाबींसोबतच या सगळ्याचा एक दुखद पैलू देखील आहे. आपला हा सागरी क्षेत्र पर्यावरणाशी निगडित अनेक समस्यांचा सामना करत करत आहे. एकीकडे हवामान बदल, सागरी पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे तर दुसरीकडे आपल्या समुद्र किनाऱ्यावरील अस्वछता खूपच त्रासदायक आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी कठोर आणि निरंतर प्रयत्न करणे हि आपली जबाबदारी आहे. देशातील सागरी परिसर स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न - 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर' या विषयी मी आज इथे बोलू इच्छितो. ५ जुलै रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानाची १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिवशी सांगता झाली. याच दिवशी सागरी किनारा स्वछता दिन देखील होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुरु झालेली हि मोहीम ७५ दिवस सुरु होती. या मधील लोकसहभाग वाखाणण्याजोगा होता. या मोहिमे दरम्यान संपूर्ण अडीच महिने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गोव्यामध्ये एक मोठी मानवी शृंखला तयार करण्यात आली होती. काकीनाडा येथे गणपती विसर्जना दरम्यान लोकांना प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यात आली. 'एनएसएस'च्या अंदाजे ५००० तरुण विद्यार्थ्यांनी तर ३० टनांहून अधिक प्लास्टिक गोळा केले. ओदिशामध्ये २० हजारांहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबतच आपले कुटुंब आणि शेजारील लोकांना 'स्वच्छ सागर-सुरक्षित सागर' मोहिमेसाठी प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.
निवडून आलेले अधिकारी, विशेषतः शहरांचे महापौर आणि गावचे सरपंच यांच्यासोबत जेव्हा मी संवाद साधतो तेव्हा त्यांना स्वच्छता उपक्रमांमध्ये स्थानिक समुदाय आणि स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्याचा आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचा आग्रह करतो.
बंगळुरू मध्ये एक टीम आहे - युथ फॉर परिवर्तन. मागील आठ वर्षांपासून हि टीम स्वच्छता आणि इतर सामुदायिक उपक्रम राबवित आहे. त्याचे बोधवाक्य खूपच स्पष्ट आहे 'तक्रार करणे थांबवा कृती करा'. या टीमने आजवर शहरातील ३७० हुन अधिक जागांचे सौंदर्यीकरण केले आहे. प्रत्येक ठिकाणी युथ फॉर परिवर्तनाच्या अभियाननं शम्भर ते दीडशे नागरिकांना सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरु होऊन दुपारपर्यंत चालतो. या कार्यक्रमा दरम्यान स्वच्छता करण्यासोबतच भिंतींवर चित्र आणि कलात्मक रेखाटने केली जातात. अनेक ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तींची रेखाटने आणि त्यांची प्रेरणादायी वाक्य देखील पहायला मिळतील. बंगळुरूच्या युथ फॉर परिवर्तनाच्या प्रयत्नांनंतर मी आता तुम्हाला मेरठ मधील 'कबाड से जुगाड' या अभियानाबाबत देखील सांगू इच्छितो. हे अभियान पर्यावरण सुरक्षे सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाशी देखील निगडित आहे. या अभियानचे वैशीष्ट्य म्हणजे यामध्ये लोखंडी भंगार, टाकाऊ प्लास्टिक, जुने टायर आणि ड्रम यासारख्या निरुपयोगी झालेल्या वस्तूंचा उपयोग केला जातो. हे अभियान म्हणजे कमी खर्चात सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण कसे केले जावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. या अभियानाशी निगडित लोकांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, सध्या देशात सर्वत्र सणांचा उत्साह आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण 'माँ शैलपुत्री' या देवीच्या पहिल्या रूपाची पूजा करणार. इथून पुढे नऊ दिवस नियम-संयम, उपवासाचे आणि नंतर विजयादशमीचा उत्सव देखील साजरा होणार. एकप्रकारे आपल्या सणांमध्ये विश्वास आणि अध्यात्मासोबतच सखोल संदेश देखील दडलेला आहे. शिस्त आणि संयमाने सिद्धीची प्राप्ती आणि त्यानंतर विजयोत्सव, आपल्या आयुष्यात एखादे लक्ष्य साध्य करण्याचा हाच तर मार्ग आहे. दसऱ्यानंतर धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण देखील येणार आहेत.
मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत एक नवीन संकल्प देखील आपण घेतला आहे. तुम्हां सर्वांना माहीतच आहे, हा संकल्प आहे - 'व्होकल फॉर लोकल'. आता आपण आपल्या सणाच्या आनंदात आपल्या स्थानिक कारागिरांना, शिल्पकारांना आणि व्यापाऱ्यांना देखील सामावून घेत आहोत. आगामी २ ऑक्टोबर ला येणाऱ्या गांधी जयंतीचे औचित्य साधत हे अभियान मोठ्या स्तरावर राबविण्याचा संकल्प करूया. खादी, हातमाग, हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या. जेव्हा सगळे एखाद्या सणामध्ये सहभागी होतात तोच त्या सणाचा खरा आनंद आहे; म्हणूनच स्थानिक उत्पादनांशी निगडित लोकांना आपण पाठबळ दिले पाहिजे. आपण सणाच्यावेळी ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये अशा उत्पादनांचा समावेश करणे हा एक उत्तम, पर्याय आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे. स्वातंत्र्य वीरांना खऱ्या अर्थाने हि श्रद्धांजली असेल. यावेळी तुम्ही खादी, हातमाग, हस्तकलेची उत्पादने विकत घेण्याचे सर्व विक्रम मोडून काढा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सणांमध्ये पॅकिंग आणि पॅकेजिंगसाठी मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. स्वच्छतेच्या या अभियानात प्लास्टिकचा हानिकारक कचरा हा देखील आपल्या सणांच्यामागे असलेल्या भावनांच्या विरोधी आहे. म्हणूनच, आपण स्थानिक स्तरावर उत्पादित प्लास्टिक विरहित पिशव्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या इथे तागाच्या, सुती, केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे. सणाच्या निमित्ताने याला प्रोत्साहन देणे हि आपली जबाबदारी आहे आणि स्वच्छतेसोबतच आपली आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे-
'परहित सरिस धरम नहीं भाई'
याचाच अर्थ, दुसऱ्यांचे हित करण्यासमान, दुसऱ्यांची सेवा, उपकार करण्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही. मागील काही दिवसांमध्ये देशात, समाजसेवेच्या या भावनेची आणखी एक झलक आपल्याला पहायला मिळाली. लोक स्वःहून पुढाकार घेऊन एखाद्या क्षयरोग्याला दत्तक घेत आहेत हे तुम्ही पाहिलंच असेल, त्याला सकस आहार मिळण्याचा संकल्प करत आहेत. क्षयरोयमुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे ज्याचा मुख्य आधार हा लोकसहभाग आणि कर्तव्य भावना आहे. योग्य सकस आहार, वेळेवर औषधांनीच क्षयरोगाचे उपचार शक्य आहेत. लोकसहभागाच्या या ताकदीमुळे वर्ष २०२५ पर्यंत भारत नक्कीच क्षयरोग मुक्त होईल असा माझा विश्वास आहे.
मित्रांनो, दादर-नगर हवेली आणि दमन-दिव या केंद्रशासित प्रदेशातील एक हृदयस्पर्शी उदाहरण मला कळले आहे. इथल्या आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या जिनु रावतीया यांनी मला एक पत्र पाठविले आहे. त्यांनी या पत्रात लिहिले आहे कि, तिथे सुरु असलेल्या ग्राम दत्तक कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५० गावं दत्तक घेतली आहेत. यात जिनु यांचे गाव देखील आहे. हे वैद्यकीय विद्यार्थी गावक गावकऱ्यांना आजारा आणि त्याच्या उपचारां विषयी जागरूक करतात, आजारी व्यक्तींना देखील मदत करतात तसेच सरकारी योजनांची देखील माहिती देतात. परोपकाराच्या या भावनेमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आनंद निर्माण झाला आहे. यासाठी मी वैद्यकीय महाविद्यलयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.
मित्रानो, 'मन कि बात' मध्ये नवीन नवीन विषयांवर चर्चा होत असते. अनेकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या जुन्या विषयामध्ये अधिक सखोल अभ्यास करण्याची देखील संधी मिळते. मागील महिन्यातील 'मन कि बात' मध्ये मी भरड धान्य आणि वर्ष २०२३ ला 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून साजरे करण्याविषयी चर्चा केली होती. लोकांमध्ये या विषयाबाबत खूपच उत्सुकता आहे. लोकांनी कशाप्रकारे भरड धान्याला आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले आहे या संबंधित अनेक पत्र लोकांनी मला पाठवली आहेत. काही लोकांनी भरड धान्यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची देखील माहिती दिली आहे. हा एक मोठ्या बदलाचा संकेत आहे. लोकांचा उत्साह पाहता, आपल्याला एक ई-बुक तयार केली पाहिजे असे मला वाटते. ज्यामध्ये लोकं भरड धान्यांपासून बनणारे पदार्थ आणि आपले अनुभव लिहू शकतील. यामुळे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' सुरु होण्यापूर्वीच आपल्याकडे भरड धान्याविषयी एक सार्वजनिक विश्वकोश देखील तयार असेल आणि त्यानंतर आपण तो MyGov पोर्टल वर प्रकाशित करू शकतो.
मित्रांनो, 'मन कि बात' मध्ये यावेळी इतकेच, परंतु जाता जाता मी तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी सांगू इच्छितो. २९ सप्टेंबर पासून गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. काही वर्षाच्या अंतराळानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे हि एक विशष संधी आहे. कोविड महामारीमुळे मागील आयोजन रद्द करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी यादिवशी मी देखील उपस्थित राहणार आहे. तुम्ही देखील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की बघा आणि आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढील महिन्याच्या 'मन कि बात' मध्ये नवीन विषयांसोबत पुन्हा आपली भेट होईल.
धन्यवाद.
नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. या ऑगस्ट महिन्यात, तुमच्या सर्वांच्या पत्रांनी, संदेशांनी आणि कार्ड्सनी माझ्या कार्यालयाला अगदी तिरंगामय केले आहे. तिरंगा नसलेले किंवा तिरंग्याचा आणि स्वातंत्र्याचा उल्लेखनसलेले पत्र माझ्याकडे आल्याचे मला फारसे आठवत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणियुवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधाराबरसते आहे. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे. आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर, देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला. तिरंगा मोहिमेसाठी लोकांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनाही राबवल्या. कृष्णील अनिल जीहे आपले युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला. आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला, तर इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला. चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या गंगोट पंचायतीमध्ये अशा प्रकारचं एक मोठं प्रेरक उदाहरणही पाहायला मिळालं. या ठिकाणी पंचायतीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता.
मित्रांनो,
अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75 गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली. दुसरीकडे नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.
मित्रांनो,
आणखी एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काही दिवसांपूर्वीच मला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दूरदर्शनवरील 'स्वराज' या मालिकेचे स्क्रीनिंग ठेवले होते. तो प्रीमियर पाहण्याची संधी मला मिळाली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख, देशाच्या युवा पिढीला करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर प्रसारित होतो. तो 75 आठवडे चालणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. तुम्ही वेळात वेळ काढून हा कार्यक्रम स्वतः बघा आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही दाखवा, अशी विनंती मी तुम्हाला करतो. शाळा कॉलेजचे लोक तर हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतात आणि सोमवारी विद्यार्थ्यांना दाखवू शकतात जेणेकरून आपल्या देशात जागरुकता निर्माण होईल. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढील वर्षापर्यंत म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महानायकांची कहाणी अवघ्या देशापर्यंत पोहोचवावी यासाठी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमावरून एक विशेष कार्यक्रमही तयार करू शकतात. देशासाठी, स्वातंत्र्यसैनिकांसाठी, जे लेखन- आयोजन आपण करत आलो आहोत, ते काम आपल्याला यापुढेही करत राहायचे आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या पूर्वजांचे ज्ञान, आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि आपल्या पूर्वजांचे चिंतन आजही किती महत्त्वाचे ठरते आहे, हे आपल्याला समजते, जेव्हा आपण त्याबद्दल सखोल माहिती मिळवतो, तेव्हा आपण आश्चर्याने थक्क होतो. आपला ऋग्वेद तर हजारो वर्ष जुना आहे. ऋग्वेदात म्हटले आहे,
ओमान-मापो मानुषी: अमृक्तम् धात तोकाय तनयाय शं यो: |
यूयं हिष्ठा भिषजो मातृतमा विश्वस्य स्थातु: जगतो जनित्री: ||
अर्थात् -हे पाण्या, तू मानवतेचा सर्वात चांगला मित्र आहेस. तूच जीवन देणारा आहेस, तुझ्यापासूनच अन्न तयार होते आणि तुझ्यापासूनच आमच्या मुलांचे कल्याण होते. तू आमचा रक्षक आहेस आणि आम्हाला सर्व वाईटांपासून दूर ठेवणारा आहेस. तूच सर्वश्रेष्ठ औषध आहेस आणि तूच या विश्वाचे पालनपोषण करणारा आहेस.
विचार करा, हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीत जल आणि जल संरक्षणाचे महत्त्व सांगितले गेले आहे. हे ज्ञान आजच्या संदर्भात पाहिले की आपण रोमांचित होतो, पण जेव्हा हेच ज्ञान, आपले राष्ट्र आपली ताकद म्हणून स्वीकारते तेव्हा त्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. तुम्हाला आठवत असेल, चार महिन्यांपूर्वी 'मन की बात'मध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघता-बघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे. जेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची प्रखर भावना मनात असते, कर्तव्याची जाणीव असते, येणाऱ्या पिढ्यांची काळजी असते, तेव्हा बळही मिळते आणि संकल्प उदात्त होऊन जातो. तेलंगणामधील वारंगल इथल्या अशाच एका चांगल्या कामाबद्दलची माहिती मला मिळाली आहे. त्या ठिकाणी एक नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून तिचे नाव 'मंगत्या-वाल्या थांडा' असे आहे. हे गाव वनक्षेत्रापासून जवळ आहे. या गावाजवळ एक अशी जागा होती, जिथे पावसाळ्यात भरपूर पाणी साचत असे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आता अमृत सरोवर अभियानांतर्गत ही जागा विकसित करण्यात येते आहे. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मंडला येथील मोचा ग्रामपंचायतीत बांधलेल्या अमृत सरोवराबद्दलही मला तुम्हाला सांगायचे आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळ हे अमृत सरोवर बांधण्यात आले असून त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. उत्तर प्रदेशात ललितपूर येथे नव्याने बांधलेले शहीद भगतसिंग अमृत सरोवरही लोकांना आकर्षित करते आहे. इथल्या निवारी ग्रामपंचायतीत बांधलेल्या तलावाने 4 एकरक्षेत्र व्यापले आहे. या तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्यामुळे त्याची शोभा वाढली आहे. सरोवराजवळ उभारलेला 35 फूट उंच तिरंगा पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. अमृत सरोवराची ही मोहीम कर्नाटकमध्येही जोरात सुरू आहे. तिथल्या बागलकोट जिल्ह्यात बिलकेरूर गावात लोकांनी अतिशय सुंदर असे अमृत सरोवर बांधले आहे. खरे तर या भागात डोंगरातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे, शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पिकांचेही नुकसान होत असे. अमृत सरोवर बनवण्यासाठी गावातील लोकांनी डोंगरावरून येणारे सर्व पाणी, चर खोदून एका बाजूला वळवले. त्यामुळे या परिसरातला पुराचा प्रश्नही सुटला. अमृत सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे. जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठी या अमृत सरोवरांचा उपयोग केला जात आहे. या तलावांमुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर या परिसरात सगळीकडे हिरवळही वाढते आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी लोक अमृत सरोवरात मत्स्यपालन करायच्या तयारीत आहेत. मी तुम्हा सर्वांना, विशेषत: माझ्या युवा सहकाऱ्यांना विनंती करतो की अमृत सरोवर मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या, ते यशस्वी करून दाखवा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आसाममधील बोंगई गावात एक रंजक प्रकल्प राबवला जात आहे - प्रकल्प संपूर्णा. कुपोषणाविरुद्ध लढा हा या प्रकल्पाचा उद्देश असून या लढ्याची पद्धतही अतिशय अभिनव आहे. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रातील एखाद्या सुदृढ बालकाची आई दर आठवड्याला एखादया कुपोषित बालकाच्या आईची भेट घेते आणि पोषणविषयक माहितीवर चर्चा करते. म्हणजेच एक आई दुसऱ्या आईची मैत्रीण होऊन तिला मदत करते, तिला शिकवते. या प्रकल्पाच्या मदतीने या भागात एका वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त बालकांचे कुपोषण दूर झाले आहे.
कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी गीत-संगीत आणि भजन यांचाही उपयोग होऊ शकतो, असा विचार तुम्ही करू शकता का? मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात "मेरा बच्चा अभियान"! ही अशा प्रकारची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले, त्यात पोषण गुरू असणाऱ्या शिक्षकांना पाचारण करण्यात आले. यावेळी मडके कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महिला, अंगणवाडी केंद्रात मूठभर धान्य आणतात आणि याच धान्याचा वापर करून शनिवारी 'बालभोज' कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची उपस्थिती वाढली आणि कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. कुपोषणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी झारखंडमध्येही एक अनोखी मोहीम सुरू आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये साप-शिडीचा खेळ तयार करण्यात आला आहे. या खेळाच्या माध्यमातून मुले चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या, ते शिकत आहेत.
मित्रहो,
कुपोषणाशी संबंधित अनेक अभिनव प्रयोगांबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे, कारण येत्या महिनाभरात आपणा सर्वांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे. सप्टेंबर महिना हा सणांचा महिना असला तरी तो पोषणाशी संबंधित एका मोठ्या मोहीमेला समर्पित आहे. आपण दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करतो. कुपोषणाविरुद्ध देशभरात अनेक सर्जनशील आणि वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि लोकसहभाग हा पोषण अभियानाचा अविभाज्य घटक बनला आहे. देशातील लाखो अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपकरणे देण्यात आली आहेत तसेच अंगणवाडी सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर सुद्धा सुरू करण्यात आला आहे.
सर्व आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये, 14 ते 18 वयोगटातील मुलींना सुद्धा पोषण मोहिमेच्या कक्षेत सामावून घेतले आहे. कुपोषणाच्या समस्येच्या निराकरणाचे प्रयत्न या उपाययोजनांपुरतेच मर्यादित नाहीत. या लढ्यात इतर अनेक उपक्रमसुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे. जल जीवन मिशनचे उदाहरण घ्या. भारत कुपोषणमुक्त करण्याच्या कामी या मिशनचाही मोठा परिणाम दिसून येणार आहे. कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीच्या प्रयत्नांची भूमिका महत्वाची असते. येत्या पोषण महिन्यात कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हावे, अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.
'मन की बात' च्या पुढच्या भागात तुम्ही यावर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. देशवासीयांच्या मनातला असा उत्साह पाहून मलाही मनापासून आनंद होतो. तुम्हाला आठवत असेल की संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. मित्रहो, आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.
आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील मिलेट्स/ तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ त्यांना देण्यात/ वाढण्यात यावेत आणि असा अनुभव आला आहे की या मान्यवरांना, हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या भरडधान्याबद्दल, तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात. प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेतीचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे. आपल्या वेदांमध्ये तृणधान्यांचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे पुराणनुरु आणि टोलकप्पियममध्येही त्यांचा उल्लेख आहे.
तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथल्या लोकांच्याजेवणात तुम्हाला तृणधान्यांचे विविध प्रकार नक्कीच पाहायला मिळतील. आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृणधान्यांमध्येही खूप वैविध्य आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे , कंगणी, चेना, कोडो, कुटकी, कुट्टू, ही सर्व तृणधान्येच आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे, त्यामुळे हा उपक्रम/ हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवायची आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला तरचांगलंच माहिती आहे, तृणधान्ये शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहेत आणि तीही विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी. खरं तर, ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही. आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो.
आजकाल तरुण पिढी आरोग्यपूर्ण जीवन आणि अन्नाकडे खूप लक्ष देते. त्या दृष्टीने पाहिले तर तृणधान्यात भरपूर प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. बरेच लोक तर याला सुपर फूड देखील म्हणतात.
तृणधान्याचे केवळ एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासोबतच ते मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी करतात. यासोबतच ते पोट आणि यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.
कुपोषणाबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो. तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी देखील खूप उपयोगी आहेत, कारण ती ऊर्जा तसेच प्रथिनांनी परिपूर्ण आहेत. आज देशभरात तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच FPOs ला प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून उत्पादन वाढवता येईल.
आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा आणि त्याचा लाभ घ्या.
मला हे बघून खूप चांगले वाटते की आज असे अनेक स्टार्ट-अपस उदयाला येत आहेत, जे तृणधान्यावर काम करत आहेत. यापैकी काहीजण तृणधान्यांच्या कुकीज बनवत आहेत, तर काहीजण तृणधान्यांचा पॅन केक आणि डोसा देखील बनवत आहेत. असे काही आहेत जे तृणधान्यांचा एनर्जी बार आणि नाश्ता तयार करत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.
या सणासुदीच्या काळात आपण अनेक पक्वान्न आणि पदार्थांमध्ये तृणधान्ये वापरतो. तुम्ही आपल्या घरात बनवलेल्या अशा पदार्थांची छायाचित्रे सोशल समाज माध्यमांवर जरूर शेअर करा, त्यामुळे लोकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढण्यास मदत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
काही दिवसांपूर्वी मी अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील जोरसिंग गावातील एक बातमी पाहिली. ही बातमी अशा एका बदलाची होती ज्याची या गावातील लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. खरे तर जोरसिंग गावात या महिन्यात, स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून 4G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. जसे पूर्वी कधी खेड्यात वीज पोहोचली तेव्हा लोक खुश झाले होते, तसेच आता नवीन भारतात 4G पोहोचल्यावर लोकांना तसाच आनंद होतो आहे.
अरुणाचल आणि ईशान्येतील दुर्गम भागात 4G च्या रूपाने एक नवा सूर्योदय झाला आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीने नवी पहाट आणली आहे. ज्या सुविधा पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होत्या, त्या आता डिजिटल इंडियाने खेड्यापाड्यात आणल्या आहेत. त्यामुळे देशात नवीन डिजिटल उद्योजक तयार होत आहेत.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सेता सिंह रावत जी 'टेलर ऑनलाइन' 'ई-स्टोअर' चालवतात. तुम्हाला वाटेल हे काय आहे, टेलर ऑनलाईन!!
वास्तविक, सेठा सिंह रावत हे कोविडपूर्वी टेलरिंगचे काम करायचे. जेव्हा कोविड आला तेव्हा रावतजींनी हे आव्हान संकट मानले नाही तर संधी म्हणून स्वीकारले. ते 'कॉमन सर्व्हिस सेंटर' म्हणजेच CSC ई-स्टोअरमध्ये सामील झाले आणि ऑनलाइन काम करू लागले.
त्यांनी पाहिले की ग्राहक मोठ्या संख्येने मास्कसाठी ऑर्डर देत आहेत. त्यांनी काही महिलांना कामावर घेतले आणि मास्क बनवायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'शिंपी /टेलर ऑनलाइन' नावाने आपले ऑनलाइन स्टोअर सुरू केले ज्यामध्ये त्यांनी इतरही अनेक प्रकारचे कपडे शिवून, विकण्यास सुरुवात केली. आज डिजिटल इंडियाच्या सामर्थ्याने सेता सिंह जींचे काम इतके वाढले आहे की आता त्यांना संपूर्ण देशभरातून ऑर्डरस मिळतात. त्यांनी शेकडो महिलांना आपल्या कंपनीत रोजगार दिला आहे.
डिजिटल इंडियाने उन्नाव, यूपी येथे राहणाऱ्या ओम प्रकाश सिंह जी यांना देखील डिजिटल उद्योजक बनवले आहे. त्यांनी आपल्या गावात एक हजाराहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन्स स्थापन केली आहेत. ओम प्रकाश जी यांनी त्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरभोवती मोफत वायफाय झोन देखील तयार केला आहे, ज्याची गरजू लोकांना खूप मदत होत आहे. ओम प्रकाश जी यांचे काम आता इतके वाढले आहे की त्यांनी 20 पेक्षा जास्त लोकांना कामावर घेतले आहे. हे लोक गावागावातील शाळा, रुग्णालये, तहसील कार्यालये, अंगणवाडी केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्शन देत असून त्यातून त्यांना रोजगारही मिळत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरप्रमाणे, सरकारी ई-मार्केट प्लेस अर्थात जीईएम पोर्टलवर अशा किती यशोगाथा पाहायला मिळतात.
मित्रांनो,
मला गावोगावातून असे अनेक संदेश मिळतात, जे इंटरनेटमुळे झालेल्या बदलांच्या विषयी सांगतात. इंटरनेटमुळे आमच्या तरुण मित्रांचा अभ्यास आणि शिक्षणाची पद्धतच बदलली आहे. उदाहरणार्थ, यूपीच्या गुडिया सिंग जेव्हा उन्नावच्या अमोईया गावात आपल्या सासरच्या घरी आल्या तेव्हा त्यांना आपल्या अभ्यासाची काळजी वाटत होती. पण, भारतनेटने त्यांची चिंता दूर केली. गुडिया यांनी इंटरनेटद्वारे त्यांचा अभ्यास सुरू ठेवला आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
खेड्या-पाड्यातील अशा कितीतरी लोकांना डिजिटल इंडिया मोहिमेतून नवी शक्ती मिळत आहे. तुम्ही मला खेड्यापाड्यातील डिजिटल उद्योजकांबद्दल जमेल तितके जास्तीत जास्त कळवत जा आणि त्यांच्या यशोगाथा सामाजिक माध्यमांच्यावरही शेअर करा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
काही दिवसांपूर्वी मला 'मन की बात'चे हिमाचल प्रदेशातील श्रोते रमेश जी यांचे पत्र आले. रमेशजींनी त्यांच्या पत्रात पर्वतांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, डोंगरावरील वसाहती एकवेळ एकमेकांपासून दूर दूर असतीलही पण लोकांची मने मात्र एकमेकांच्या खूप जवळ आहेत.
खरंच, डोंगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो. पर्वतीय जीवनशैली आणि संस्कृतीतून आपल्याला पहिली शिकवण मिळते ती म्हणजे परिस्थितीचे आपण दडपण घेतले नाही तर आपण त्यावर सहज मात करू शकतो आणि दुसरी शिकवण म्हणजे स्थानिक साधनसंपत्तीने आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो.
ज्या पहिल्या शिकवणीचा मी उल्लेख केला होता, त्याचे एक सुंदर चित्र सध्या स्पिती प्रदेशात पाहायला मिळत आहे. स्पिती हा एक जनजातीय भाग आहे. इथे आजकाल मटार - वाटाणा तोडण्याचे काम चालते. डोंगरावरील शेतातले हे काम मोठे कष्टाचे आणि कठीण काम आहे. पण इथे गावातील स्त्रिया एकत्र जमतात, सर्वजणी एकमेकांच्या मदतीने शेतातून वाटाणे तोडतात. काम करता करता महिला 'छपरा माझी छपरा' हे स्थानिक गाणेही गातात. म्हणजेच परस्पर सहकार्य हा देखील इथल्या लोकपरंपरेचाच एक भाग आहे.
स्थानिक संसाधनांच्या वापराचे उत्तम उदाहरणदेखील स्पितीमध्ये आढळते. स्पितीमध्ये गायी पाळणारे शेतकरी, गाईचे शेण वाळवून गोणीत भरतात. हिवाळा आला की गायी ज्या ठिकाणी राहतात त्याला इथे खुड म्हणतात. तर त्या ठिकाणी या गोण्या टाकल्या जातात. बर्फवृष्टीच्या वेळी या गोण्या गायींना थंडीपासून संरक्षण देतात. हिवाळ्यानंतर हेच शेण शेतात खत म्हणून वापरले जाते. म्हणजेच प्राण्यांच्या शेणाच्या मदतीनेच त्यांचे संरक्षण, तसेच शेतासाठी खतदेखील. लागवडीचा खर्चही कमी व शेतात उत्पादनही जास्त. त्यामुळेच तर हा परिसर आजकाल नैसर्गिक शेतीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
मित्रांनो,
असेच अनेक स्तुत्य प्रयत्न आपल्या आणखी एका पहाडी राज्यात, उत्तराखंडमध्येही पाहायला मिळत आहेत. उत्तराखंडमध्ये अनेक प्रकारची औषधे आणि वनस्पती आढळतात. जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यापैकी एक फळ आहे - बेडू. त्याला हिमालयन अंजीर असेही म्हणतात. या फळामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. लोक याचे सेवन केवळ फळाच्या रूपातच करत नाहीत तर अनेक रोगांच्या उपचारातही यांचा वापर केला जातो.
या फळाचे हे सर्व गुण लक्षात घेऊन आता बेडू ज्यूस, फळापासून जाम, चटण्या, लोणचे आणि फळे सुकवून तयार केलेले ड्रायफ्रूट्स बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पिथौरागढ प्रशासनाच्या पुढाकाराने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने बेडू फळाला वेगवेगळ्या स्वरूपात बाजारपेठेत पोहोचवण्यात यश आले आहे. पहाडी अंजीर असे ब्रँडिंग करून बेडू ऑनलाइन बाजारातही लाँच केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन तर मिळालेच, पण बेडूच्या औषधी गुणधर्माचे फायदे दूरदूरपर्यंत पोहोचू लागले आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
'मन की बात' च्या सुरुवातीला आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी बोललो. स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वासोबतच आगामी काळात आणखी अनेक सण येणार आहेत.
अवघ्या काही दिवसांनी श्रीगणेशाच्या पूजेचा सण गणेश चतुर्थी येत आहे. गणेश चतुर्थी, म्हणजेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा सण.
गणेश चतुर्थीच्या आधी ओणमचा सणही सुरू होत आहे. विशेषत: केरळमध्ये ओणम शांतता आणि समृद्धीच्या भावनेने साजरा केला जाईल.
हरतालिका तीजही 30 ऑगस्टला आहे. 1 सप्टेंबर रोजी ओडिशात नुआखाई हा सणही साजरा केला जाणार आहे. नुआखाई चा अर्थच आहे नवीन अन्नधान्य, खाद्यपदार्थ, म्हणजेच हा सण देखील इतर अनेक सणांप्रमाणेच आपल्या कृषी परंपरेशी निगडित सण आहे.
ह्याच दरम्यान, जैन समाजाचा संवत्सरी पर्वही येणार आहे. आपले हे सर्व सण आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे आणि ऊर्जेचे, चैतन्याचे प्रतीक आहेत.
या सणांसाठी आणि विशेष उत्सवाच्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या उत्सवांसोबतच उद्या 29 ऑगस्ट ह्या दिवशी, मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनही साजरा केला जाणार आहे. आमचे युवा खेळाडू आमच्या तिरंग्याचा गौरव जागतिक मंचावर वाढवत राहोत, हीच ध्यानचंदजींना आमची श्रद्धांजली असेल.
आपण सर्वजण मिळून देशासाठी काम करत राहू या, देशाचा सन्मान वाढवत राहू या, अशी मी कामना करतो व हयासोबतच इथे थांबतो. पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा तुमच्याशी 'मन की बात' होईल. खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! “मन की बात’ चा हा 91 वा भाग आहे. आपण सगळ्यांनी याआधी खरंतर इतक्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या आहेत, पण तरीही, यावेळचं ‘मन की बात’ खूप विशेष आहे. याचे कारण आहे, यावर्षीचा आपला स्वातंत्र्यदिन. जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळे अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खूप मोठे सौभाग्य दिले आहे. आपणही विचार करा, जर आपण पारतंत्र्याच्या काळात जन्माला आलो असतो तर या दिवसाचं आपल्याला किती महत्त्व वाटलं असतं? आपल्या भावना कशा असत्या? पारतंत्र्यापासून मुक्ती मिळवण्याची ती आस, पराधीनतेच्या बेड्या तोडून स्वतंत्र होण्यासाठीची ती तडफड—किती मोठी असेल ! ते दिवस जेव्हा आपण, प्रत्येक दिवशी, लाखो देशबांधवांना स्वातंत्र्यासाठी लढा देतांना, कष्ट करतांना, बलिदान देतांना पहिले असते. जेव्हा आपण प्रत्येक सकाळी, आपल्या या एकाच स्वप्नासोबत जागे झालो असतो, की आपला हा भारत केव्हा स्वतंत्र होईल? आणि कदाचित असंही झालं असतं की आपल्या आयुष्यात तो ही दिवस आला असता, जेव्हा ‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असं म्हणत, आपणही आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले असते, आपले तारुण्य वेचले असते.
मित्रांनो,
31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.
मित्रांनो,
मला हे बघून खूप आनंद वाटतो, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने आता एका लोकचळवळीचे रूप घेतले आहे. सर्व क्षेत्रे आणि समजाच्या प्रत्येक वर्गातील लोक, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत. असाच एक कार्यक्रम, या महिन्याच्या सुरुवातीला, मेघालय इथे झाला. मेघालयचे शूरवीर योद्धा, यू. टिरोत सिंह जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकांनी त्यांचे स्मरण केले. टिरोत सिंह जी यांनी खासी हिल्स वर नियंत्रण मिळवण्याच्या आणि तिथल्या संस्कृतीवर आक्रमण करण्याच्या ब्रिटिशांच्या कारस्थानाचा अतिशय ताकदीने विरोध केला होता. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केले. कलाविष्कारातून त्यांनी इतिहासच जिवंत केला. त्यावेळी एका आनंदमेळयाचे पण आयोजन करण्यात आले होते. यात, मेघालयाची महान संस्कृती अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वी, कर्नाटकात, अमृता भारती कन्नडार्थी या नावाने एक आगळावेगळा उपक्रम देखील राबवण्यात आला. यात, राज्यातील 75 जागांवर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित अनेक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात कर्नाटकचया महान स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासोबतच, स्थानिक साहित्यिकांच्या उपलब्धी समाजापुढे मांडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
मित्रांनो,
याच जुलै महिन्यात आणखी एक अतिशय रोचक प्रयत्न देखील करण्यात आला, ज्याचे नाव आहे- ‘आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या प्रयत्नाचे उद्दिष्ट आहे, स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचे योगदान जाणून घेणे. देशांत अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत,जी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत. आपल्यालाही या रेल्वे स्थानकांविषयी जाणून आश्चर्य वाटेल. झारखंडच्या गोमो जंक्शनला, आता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन या नावाने ओळखले जाते. माहिती आहे का, का ते? कारण याच स्थानकावर, कालका मेल मध्ये बसून नेताजी सुभाष, ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगारा देत, पळून जाण्यात यशस्वी होत असत. आपण सगळ्यांनी लखनौ जवळच्या काकोरी रेल्वे स्थानकाचे नावही नक्कीच ऐकले असेल. या स्थानकासोबत, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्लाह खान यांच्यासारख्या शूर क्रांतिकारकांची नावे जोडली गेली आहेत. इथून रेल्वेगाडीने जात असलेल्या इंग्रजांचा खजिना लूटून, वीर क्रांतिकारकांनी आपल्या ताकदीची चुणूक इंग्रजांना दाखवली होती. आपण जर कधी तामिळनाडूच्या लोकांशी संवाद साधला, तर आपल्याला थुथुकुडी जिल्हयातल्या वान्ची मणियाच्ची जंक्शन बद्दल माहिती मिळू शकेल. या स्थानकाला तमिळ स्वातंत्र्यसैनिक वान्चीनाथन जी यांचं नाव दिलेलं आहे. हे तेच रेल्वे स्थानक आहे, जिथे 25 वर्षांच्या युवा वान्ची यांनी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली होती.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे. देशभरातल्या 24 राज्यांत विखुरलेली अशी 75 रेल्वे स्थानकं शोधून काढण्यात आली आहेत. या 75 स्थानकांची अतिशय सुरेख सजावट करण्यात आली आहे. तिथे अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. आपण देखील, वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकाला नक्की भेट द्यायला हवी.
आपल्याला स्वातंत्र्यसंग्रामाच्या अशा इतिहासाविषयी सविस्तर माहिती मिळेल, ज्यापासून आतापर्यंत आपण अनाभिज्ञ होते. मी, या स्थानका जवळच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आग्रह करेन, शिक्षकांना आग्रह करेन, की त्यांनी आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना या स्थानकांवर नक्की घेऊन जावे आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना समजावून सांगावा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक विशेष मोहीम- “हर घर तिरंगा- हर घर तिरंगा” चे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ आपण सर्वांनी, 13 ते 15 ऑगस्ट या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा. किंवा आपल्या घरात लावा. तिरंगा आपल्याला एका सूत्रात जोडतो. आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. माझी एक अशीही सूचना आहे, की 2 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण सगळे आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावू शकतो. तसं तुम्हाला माहिती आहे का, 2 ऑगस्ट चा आपल्या तिरंग्याशी एक विशेष संबंध देखील आहे. याच दिवशी, आपल्या राष्ट्रध्वजाचे रेखाटन करणाऱ्या पिंगली व्यंकय्या जी यांची जयंती देखील असते. मि त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्रध्वजाविषयी बोलतांना मी महान क्रांतिकारक, मादाम कामा यांचेही स्मरण करेन. तिरंग्याला आकार देण्यात त्यांनी पार पाडलेली भूमिका अतिशय महत्वाची होती.
माझी प्रिय देशबांधवांनो,
कोरोनाच्या विरोधात आपली सर्वांची लढाई अजूनही सुरु आहे. संपूर्ण जग आजही या आजाराशी लढा देत आहे. अशावेळी, सर्वंकष आरोग्याकडे लोकांचा वाढत असलेला कल आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जी यात भा