
"माननीय पंतप्रधानजी, भारतातील सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. हे एखाद्या राजकीय चमत्कारासारखे आहे."


भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाच्या उल्लेखनीय योगदानाचा स्वीकार केल्याशिवाय आधुनिक ऑस्ट्रेलियाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. उद्योजकता आणि नवकल्पना पासून ते आरोग्य सेवा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक सेवेपर्यंत, भारतीय-ऑस्ट्रेलियन नागरिक देशाच्या यशाला आकार देण्यास सातत्याने मदत करत आहेत. भारत जसा एक जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसाच व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आणि लोकांचे लोकांशी असलेले सखोल संबंध यांद्वारे आपल्या दोन्ही देशांमधील पूल अधिक मजबूत होत चालला आहे. एकत्रितपणे, ऑस्ट्रेलिया आणि भारत 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारींपैकी एकीची उभारणी करत आहेत.

"यापूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची द्विपक्षीय दौऱ्यावरील शेवटची भेट 2000 सालातील, म्हणजेच 26 वर्षांपूर्वीची आहे आणि आज, या भेटीमुळे आपण केवळ हे अंतरच भरून काढत नाही आहोत, तर आपल्यातील संबंधांना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय आपण एकत्रितपणे घेतला आहे।"

"गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भारतात आहोत आणि या काळात भारतात खूप मोठे बदल झाले आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे भारतातील राज्यांतर्गत व्यापार कशा प्रकारे सुलभ करण्यात आला आहे, हे सांगता येईल. तसेच, आज पंतप्रधान मोदींनी भारतामध्ये जहाजांची निर्मिती करण्याबद्दल भाष्य केले; हा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे, कारण जागतिक 'मरीन कोटिंग्ज' (संरक्षक लेप) उद्योगात आमचा 25% बाजार हिस्सा आहे. त्यामुळे, भारतात जितकी जास्त जहाजे बनवली जातील, तितकीच आम्हाला भारतात व्यवसायाची अधिक मोठी संधी उपलब्ध होईल."

भारतामध्ये व्यवसाय करणे अधिक सुलभ आणि सोपे करण्यासाठी पंतप्रधानांनी दाखवलेले समर्पण आणि निष्ठा, यामुळे एकूणच व्यावसायिक वातावरणात खूप मोठे योगदान मिळाले आहे.

भारतीय पंतप्रधानांनी येथे उपस्थित राहून आपला दृष्टिकोन मांडणे आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. आपल्या संपर्कामुळे आणि अनुभवामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने वाढती आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

"भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराचा निर्णायक निष्कर्ष हा प्रामुख्याने पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी, दृढनिश्चय आणि त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वामुळेच शक्य झाला आहे."

आम्ही 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही अजून कितीतरी जास्त गुंतवणूक कशी करू शकतो, यावर आमची चर्चा सुरू आहे. आम्ही तिथे 'एआय' मॉडेल्स विकसित आणि प्रशिक्षित करण्याचे काम करत आहोत. मला असे वाटते की, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व हे केवळ भारतातील सध्याच्या गुंतवणूकदारांना टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे, तर तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे देशाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी देखील अप्रतिम राहिले आहे; आणि आम्ही याच गोष्टीसाठी वचनबद्ध आहोत."

मला असे वाटते की भारत पूर्णपणे योग्य मार्गावर आहे आणि साहजिकच हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे.

"माननीय पंतप्रधान, आणि जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा 'व्हायब्रंट गुजरात' दरम्यान भेटलो, तेव्हा मला ज्या एका गोष्टीने खूप प्रभावित केले, ती म्हणजे बंदर क्षेत्राबद्दलचे त्यांचे सविस्तर ज्ञान आणि आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी वाहतूक क्षेत्रांचे असलेले महत्त्व. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून त्यांना बंदर क्षेत्राबद्दल अतिशय विशिष्ट आणि सखोल ज्ञान होते."

तुमच्या नेतृत्वासाठी मी तुमचे (पंतप्रधान मोदी) अभिनंदन करू इच्छितो. माझी शेवटची भारत भेट 2013 मध्ये व्यापार मंत्री म्हणून झाली होती आणि आता नवी दिल्लीच्या रस्त्यांवर मला जो बदल जाणवत आहे आणि बहुधा पुढील दोन दिवसांत मुंबईतही जो बदल पाहायला मिळेल तो स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण एका आर्थिक चमत्काराचे साक्षीदार आहोत.