उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे केले उद्घाटन
आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचा शुभंकर, संग्रहालयातील एक दिवस- या विषयावरील चित्रमय कादंबरी, भारतीय संग्रहालयांची मार्गदर्शिका, कर्तव्य पथाविषयी माहिती देणारा छोटा नकाशा आणि संग्रहालयाची चित्रकार्डे यांचे केले अनावरण
“हे संग्रहालय भूतकाळापासून प्रेरणा देते आणि भविष्यातील कर्तव्यांची जाणीव ही करून देते”
“देशामध्ये एका नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधेची उभारणी होत आहे”
“प्रत्येक राज्य तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या वारशासह स्थानिक तसेच ग्रामीण भागातील संग्रहालयांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक विशेष अभियान चालवले जात आहे”
“पिढ्यानपिढ्या जपण्यात आलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आता संपूर्ण जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना एकत्र आणत आहेत”
“आपला वारसा जागतिक एकात्मतेचा अग्रदूत होऊ शकतो”
“ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंची जपणूक करण्याचा गुण समाजमनात रुजविला पाहिजे”
“कुटुंबे, विद्यालये, विविध संस्था आणि शहरे यांनी त्यांची स्वतःची संग्रहालये निर्माण केली पाहिजेत”
“युवा वर्ग जागतिक सांस्कृतिक कार्याचे माध्यम होऊ शकतो”
“कोणत्याही देशाच्या कुठल्याही संग्रहालयात अशा प्रकारची कलाकृती असता कामा नये जी तेथे अवैध मार्गाने पोहोचली आहे. या तत्वाला आपण सर्वच संग्रहालयांसाठी नैतिक वचनबद्धतेचे स्वरूप दिले पाहिजे”
“आपण आपल्या वारशाचे जतन करू आणि नवा वारसा निर्माण देखील करू”

मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी जी, मीनाक्षी लेखी जी, अर्जुन राम मेघवाल जी, Louvre (लुव्र) संग्रहालयाचे संचालक  मॅन्युअल रबाते जी, जगातील विविध देशांतून आलेले पाहुणे, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संग्रहालय विश्वातील दिग्गज मंडळी इथे जमली आहेत. आजचा प्रसंगही खास आहे कारण भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनातही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे  इतिहासाचे वेगवेगळे अध्याय जिवंत होत आहेत. जेव्हा आपण एखाद्या संग्रहालयात जातो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याला भूतकाळाची, त्या युगाची ओळख होत आहे, आपला संवाद होत आहे. संग्रहालयात दिसते ते वस्तुस्थितीवर आधारित आहे, ते दृश्यमान आहे, ते पुराव्यावर आधारित आहे. संग्रहालयात एकीकडे भूतकाळातून प्रेरणा मिळते आणि दुसरीकडे भविष्याप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचीही जाणीव होते.

 

तुमची ही जी संकल्पना आहे - शाश्वतता आणि कल्याण, ही आजच्या जगाच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकते आणि हा कार्यक्रम अधिक प्रासंगिक बनवते. मला खात्री आहे की, तुमच्या प्रयत्नांमुळे तरुण पिढीची संग्रहालयांबद्दलची आवड आणखी वाढेल, त्यांना आपल्या वारशाची ओळख होईल.  या प्रयत्नांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

इथे येण्याआधी संग्रहालयात काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, सरकारी, निमसरकारी अशा अनेक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळते, पण मी सांगू शकतो की, मनावर प्रभाव निर्माण करणारे संपूर्ण नियोजन, त्याचे शिक्षण आणि सरकारही या दर्जाचे काम करु शकते, जे अभिमानास्पद आहे, अशी व्यवस्था आहे. आणि मला विश्वास आहे की आजचा प्रसंग भारतीय संग्रहालयांच्या जगात एक मोठे परिवर्तानाचे वळण घेईल.  हा माझा ठाम विश्वास आहे.

 

मित्रांनो,

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात भारताचे असेही नुकसान झाले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट केला गेला.  गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते, अनेक ग्रंथालये जाळली गेली, नष्ट केली गेली. यात केवळ भारताचेच नुकसान नाही तर संपूर्ण जगाचे, संपूर्ण मानव जातीचे नुकसान झाले आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपला वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते झाले नाहीत.

 

वारशाविषयी लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे नुकसान आणखी वाढले.  आणि म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात जाहीर केलेल्या 'पंच-प्रणां'मध्ये मुख्य आहे ते म्हणजे - आपल्या वारशाचा अभिमान! अमृत महोत्सवात भारताचा वारसा जपण्यासोबतच आम्ही नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधाही निर्माण करत आहोत.  देशाच्या या प्रयत्नांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही आहे, हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसाही आहे.

या कार्यक्रमात तुम्ही स्थानिक आणि ग्रामीण संग्रहालयांना विशेष महत्त्व दिल्याचे मला सांगण्यात आले आहे.  भारत सरकार देखील स्थानिक आणि ग्रामीण संग्रहालये जतन करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे.  आपल्या प्रत्येक राज्याचा, प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक समाजाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.  स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या आदिवासी समाजाचे योगदान संस्मरणीय करण्यासाठी आम्ही 10 विशेष संग्रहालये देखील बांधत आहोत.

मला वाटते की संपूर्ण जगामध्ये हा असा अनोखा उपक्रम आहे ज्यामध्ये आदिवासी विविधतेची इतकी व्यापक झलक पाहायला मिळणार आहे. मिठाच्या सत्याग्रहावेळी महात्मा गांधीजींनी ज्या मार्गावरून मार्गक्रमण केले होते, तो दांडी मार्गही संरक्षित केला गेला आहे. गांधींजींनी मिठाचा कायदा मोडला त्या ठिकाणी भव्य स्मारक बांधले आहे. आज देशभरातून आणि जगभरातून लोक दांडी कुटीर पाहण्यासाठी गांधीनगरमध्ये येतात.

आपल्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले, ती जागा गेली अनेक दशके दुर्लक्षित होती.  आमच्या सरकारने दिल्लीतील 5 अलीपूर रोड या जागेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले आहे.  बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत पंचतीर्थे, जिथे त्यांचा जन्म झाल ते महू, लंडनमध्ये जिथे ते राहिले, नागपुरात जिथे त्यांनी दीक्षा घेतली, मुंबईत चैत्यभूमी जेथे त्यांची समाधी आहे हे सारे विकसित केले जात आहे. भारतातील 580 हून अधिक संस्थानांना एकत्र करणाऱ्या सरदार साहेबांचा गगनचुंबी पुतळा - स्टॅच्यू ऑफ युनिटी आज देशाचा गौरव आहे.  स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतही एक संग्रहालय  आहे.

 

पंजाबमधील जालियनवाला बाग असो, गुजरातमधील गोविंद गुरुजींचे स्मारक असो, उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मान महल संग्रहालय असो, गोव्यातील ख्रिश्चन कला संग्रहालय असो, अशा अनेक ठिकाणांचे जतन करण्यात आले आहे.  संग्रहालयाशी संबंधित आणखी एक अनोखा प्रयत्न भारतात झाला आहे. आम्ही राजधानी दिल्लीत देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास आणि योगदानाला समर्पित असलेले पीएम-संग्रहालय तयार केले आहे.  स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या विकासाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आज देशभरातून लोक पीएम संग्रहालयात येत आहेत. इथे येणाऱ्या पाहुण्यांना मी विशेष विनंती करेन की, एकदा या संग्रहालयाला भेट द्यावी.

 

मित्रांनो,

जेव्हा एखादा देश आपला वारसा जतन करू लागतो तेव्हा त्याची दुसरी बाजू समोर येते.  हा पैलू आहे इतर देशांबरोबरच्या संबंधांमध्ये जवळीक.  भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, भारताने त्यांच्या पवित्र अवशेषांचे पिढ्यानपिढ्या जतन केले आहे.  आणि आज ते पवित्र अवशेष केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी  बौद्ध अनुयायांना एकत्र आणत आहेत.

मागच्याच वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांचे 4 पवित्र अवशेष मंगोलियाला पाठवले होते. हा प्रसंग मंगोलिया देशासाठी आस्थेचे महान पर्व बनला होता.

आपला शेजारी देश श्रीलंकेकडे जे बुद्धांचे पवित्र अवशेष आहेत, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ते देखील इथे कुशीनगरमध्ये आणण्यात आले होते. याच पद्धतीने गोव्यातील सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष वारश्याच्या रुपात भारताने जतन करून ठेवले आहेत. जेंव्हा आपण सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाला पाठवले होते तेंव्हा तिथे कसे राष्ट्रीय उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते ते मला अजूनही आठवते. त्या दिवशी जॉर्जियाचे शेकडो नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जत्रेप्रमाणे  जमले होते. म्हणजेच, आपला वारसा जागतिक  एकतेचा सुत्रधार देखील बनत आहे. आणि म्हणूनच हा वारसा जतन करणाऱ्या आपल्या वस्तू संग्रहालयांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

 

मित्रांनो,

ज्याप्रमाणे आपण कुटुंबांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची भविष्यासाठी तरतूद करुन ठेवतो, त्याचप्रमाणे आपण संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानून आपल्या संसाधनांचे जतन केले पाहिजे. या वैश्विक प्रयत्नांमध्ये आपल्या वस्तू संग्रहालयांनी सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, अशी सूचना मी देऊ इच्छितो. आपल्या धरती मातेने गेल्या काही शतकात अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. त्याच्या आठवणी आणि खूणा आजही अस्तित्वात आहेत. या खुणा, यांच्याशी संबंधित छायाचित्रांची दालने जास्तीत जास्त वस्तू संग्रहालयांमध्ये सुरू करण्याबाबत आपण विचार केला पाहिजे.

आपण वेगवेगळ्या काळात पृथ्वीच्या बदलत्या स्वरूपाचे चित्रण देखील करू शकतो. यामुळे भविष्यात लोकांची पर्यावरणाप्रती जागरूकता देखील वाढेल. या प्रदर्शनात खाद्यपदार्थांशी संबंधित अनुभव घेण्यासाठी दालन भरवण्यात आले असल्याचे मला सांगण्यात आले आहे. इथे लोकांना आयुर्वेदात वर्णित आणि भरड धान्य म्हणजेच श्री अन्न यापासून बनलेल्या अनेक व्यंजनांचा आस्वाद घेता येईल. भारताच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेद आणि भरडधान्य म्हणजेच श्री अन्न या दोन्हीही सध्याच्या काळात जागतिक चळवळी बनल्या आहेत. आपण श्री अन्न तसेच वेगवेगळ्या वनस्पतींच्या हजारो वर्षांच्या प्रवासावर आधारित एक नवीन संग्रहालय बनवू शकतो. या प्रकारच्या प्रयत्नांमुळे आपण ही ज्ञान प्रणाली भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो तसेच त्यांना अमर बनवू शकतो.

 

मित्रांनो,

या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्याला तेंव्हाच यश मिळेल जेव्हा आपण ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करणे ही आपल्या देशाची मूळ प्रवृत्ती बनवू. आता असा प्रश्न निर्माण होतो की, आपल्या वारशाचे संरक्षण करणे ही देशाच्या सामान्य नागरिकाची मूळ प्रवृत्ती कशी बनेल ? मी एक छोटेसे उदाहरण देतो. घरातील व्यक्तींच्या संदर्भात आपल्याच कुटुंबीयांकडे असलेली माहिती. यामध्ये घराबाबत, घरातल्या ज्येष्ठांबाबत जुन्या आणि काही खास वस्तू जतन करून ठेवता येऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या कागदावर काही लिहिता ते तुम्हाला खूप सामान्य वाटते. पण, तुम्ही लिहिलेला तो कागदाचा तुकडा तीन-चार पिढ्या नंतर मात्र भावनिक संपत्ती बनून जातो. याच प्रमाणे आपल्या विद्यालयांनी, आपल्या विविध संस्थांनी आणि संघटनांनी आपापली संग्रहालये अवश्य बनवावीत. लक्षात घ्या, यामुळे भविष्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेव्याची निर्मिती होईल. 

शहर संग्रहालयासारखे प्रकल्प आपल्या देशातील विविध शहरे देखील आधुनिक स्वरूपात राबवू शकतात. या संग्रहालयात त्या शहराशी संबंधित ऐतिहासिक वस्तू जपून ठेवल्या जाऊ शकतात. विविध पंथांमध्ये जी नोंदी ठेवण्याची जूनी परंपरा आपल्याला दिसते, ती परंपरा आपल्याला या दिशेने कार्य करण्यात सहाय्यकारी ठरु शकते.

 

मित्रानो,

आजच्या युवकांसाठी वस्तू संग्रहालय ही केवळ सहलीचा भाग म्हणून भेट देण्याची जागा राहिली नसून एक करिअरचा पर्याय देखील बनली आहे, याचा मला आनंद आहे. पण मला असे वाटते की, आपण आपल्या युवकांना केवळ वस्तू संग्रहालय कर्मचारी या दृष्टीने पाहू नये. इतिहास आणि स्थापत्यशास्त्र यासारख्या विषयांच्या अभ्यासाशी जोडले गेलेले हे युवक जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमाचे माध्यम बनू शकतात. हे युवक दुसऱ्या देशात जाऊ शकतात आणि तेथील युवकांकडून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल माहिती घेऊ शकतात, भारताच्या संस्कृतीबद्दल त्यांना अवगत करू शकतात. या युवकांचा अनुभव आणि भूतकाळाशी जोडली गेलेली नाळ या दोन्ही बाबी आपल्या देशाच्या वारशाचे संरक्षण करण्यासाठी खूपच प्रभावी ठरतील.

 

मित्रांनो,

आज आपण जेंव्हा सामायिक वारशाबद्दल बोलत आहोत तेंव्हा मी एका सामायिक आव्हानाबद्दल चर्चा करू इच्छितो. हे आव्हान म्हणजे कलाकृतींची चोरी आणि गैरवापर. प्राचीन संस्कृती असणारे भारतासारखे अनेक देश शेकडो वर्षापासून या आव्हानाला तोंड देत आहेत. स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देखील आपल्या देशातून अनेकानेक कलाकृती अवैधरित्या देशाबाहेर नेण्यात आल्या आहेत. या प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करणे आवश्यक आहे.

आज जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढत असतानाच अनेक देश भारताचा अमूल्य ठेवा असलेल्या वस्तू आपल्याला परत करत आहेत. वाराणसी मधून चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती असो, गुजरातमधून चोरी गेलेली महिषासुरमर्दिनीची प्रतिमा असो, चोल साम्राज्याच्या काळात तयार झालेल्या नटराजाच्या प्रतिमा असो, आजवर सुमारे 240 प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत.  यापूर्वी अनेक दशकांपर्यंत ही संख्या 20 पर्यंत देखील पोहोचली नव्हती. या नऊ वर्षात भारतातून सांस्कृतिक कलाकृतींची तस्करी होण्याच्या घटनांची संख्या देखील कमी झाली आहे.

या क्षेत्रात सहयोग करून त्याचा आणखी विकास करण्याचे आवाहन मी जगभरातील कलापारखी तज्ञांना आणि विशेष करून संग्रहालयाशी संबंधित लोकांना करत आहे. कोणत्याही देशातील कोणत्याही संग्रहालयात अशी कोणतीही कलाकृती नसावी जी तेथे अवैधरित्या पोहोचली असेल. आपण सर्व संग्रहालयांसाठी एक समान नैतिक बांधिलकी निर्माण केली पाहिजे.

 

मित्रांनो,

भूतकाळाशी नाळ बांधलेली ठेवून भविष्यासाठी नव्या संकल्पनांवर आपण याच प्रकारे काम करत राहू असा मला विश्वास आहे. आपण वारशाचे जतन करू आणि सोबतच नव्या वारशाची निर्मिती देखील करत राहू. याच कामनेसह तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
 PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs

Media Coverage

PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28, 2026
The inauguration of Phase-I of Noida International Airport marks a major step in Uttar Pradesh’s growth story and India’s aviation future: PM
UP has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM
Airports are not just basic facilities in any country, they give wings to progress: PM
Our government is making unprecedented investments in modern infrastructure to build a Viksit Bharat: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

उद्धघाटन हो गया? उद्धघाटन हो गया? नहीं, अभी आधा काम हुआ है। मैंने सिर्फ वो पर्दा हटाया है, लेकिन मैं आज चाहता हूं इस एयरपोर्ट का उद्धघाटन यहां जो भी उपस्थित हैं, आप सब करें, और इसलिए आप अपना मोबाइल फोन निकालिये, अपने मोबाइल फोन का फ्लैश लाईट कीजिए और आपका इसका उद्धघाटन कर रहे हैं। आप दीया जलाकर के यहां उपस्थित हर व्यक्ति, आज इस एयरपोर्ट का उद्धघाटन कर रहा है। ये आपकी अमानत है, ये आपका भविष्य है, ये आपका पुरूषार्थ है और इसलिए इसका उद्धघाटन भी आपके हाथों से हो रहा है, आप अपने भारत माता की जय बोलकर के, हाथ ऊपर करके, फ्लैश लाईट पूरी तरह से दिखाइये। भारत माता जी जय। भारत माता जी जय। भारत माता जी जय। बहुत-बहुत धन्यवाद। अब उद्धघाटन हो गया।

उत्तरप्रदेश की राज्यपाल आनंदीबेन पटेल, यहां के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या, ब्रजेश पाठक, केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे सहयोगी श्री राममोहन नायडू जी, पंकज चौधरी जी, ज्यूरिक एयरपोर्ट के चेयरमैन जोसेफ फेल्डर जी, अन्य मंत्रिगण, सांसद, विधायक, अन्य महानुभाव और मेरे प्यारे भाइयों और बहनों।

मैं देख रहा हूं, आज जहां भी मेरी नजर पड़ रही है, सारे युवा मुझे नजर आ रहे हैं, उत्साह से भरे युवा हैं, जोश से भरे हुए युवा हैं, क्योंकि इन युवाओं को पता है, ये जो काम हो रहा है ना, ये नौजवानों के भविष्य को नई उड़ान देने वाला काम हो रहा है। आज हम विकसित यूपी-विकसित भारत अभियान का एक नया अध्याय शुरू कर रहे हैं। देश का सबसे बड़ा प्रदेश, आज देश के सबसे अधिक इंटरनेशनल एयरपोर्ट्स वाले राज्यों में से एक हो गया है। और आज मेरे लिए गर्व और प्रसन्नता के दो कारण हैं। एक तो ये है कि इस एयरपोर्ट का शिलान्यास भी करने का सौभाग्य आप सबने मुझे दिया था और आप सबने इस एयरपोर्ट के उद्धघाटन का सौभाग्य भी मुझे दिया, लेकिन मैंने उस सौभाग्य को आपके साथ बांट दिया और आपके हाथों से उद्धघाटन करवा दिया। दूसरा, जिस उत्तर प्रदेश ने मुझे अपना प्रतिनिधि चुना, जिस उत्तर प्रदेश ने मुझे सांसद बनाया, उसकी पहचान के साथ, उस उत्तर प्रदेश की पहचान के साथ इस भव्य एयरपोर्ट का नाम भी जुड़ गया है।

साथियों,

नोएडा का ये एयरपोर्ट, आगरा, मथुरा, अलीगढ़, गाजियाबाद, मेरठ, इटावा, बुलंदशहर, फरीदाबाद, इस पूरे क्षेत्र को बहुत बड़ा लाभ होने वाला है। हिन्दुस्तान को और उत्तर प्रदेश को तो होना ही होना है। ये एयरपोर्ट पश्चिमी उत्तर प्रदेश के किसानों, छोटे और लघु उद्योगों, यहां के नौजवानों के लिए, अनेक नए अवसर लेकर आने वाला है। यहां से दुनिया के लिए विमान तो उड़ेंगे ही, साथ ही, ये विकसित उत्तर प्रदेश की उड़ान का भी प्रतीक बनेगा। मैं उत्तर प्रदेश को, विशेष रूप से पश्चिम उत्तर प्रदेश की जनता को इस भव्य एयरपोर्ट के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज का ये कार्यक्रम, भारत के नए मिज़ाज का प्रतीक है। आप सभी देख रहे हैं कि आज पूरा विश्व कितना चिंतित है। पश्चिम एशिया में एक महीने से युद्ध चल रहा है। युद्ध की वजह से कई सारे देशों में खाने-पीने के सामान, पेट्रोल-डीज़ल-गैस, खाद, ऐसी कई ज़रूरी चीज़ों का चारो तरफ संकट पैदा हो गया है। हर देश इस संकट का सामना करने के लिए कुछ न कुछ कोशिश कर रहा है, प्रयास कर रहा है। और हमारा भारत भी इस संकट का पूरी शक्ति से मुकाबला कर रहा है, देशवासियों की ताकत के भरोसे कर रहा है। भारत तो बहुत बड़ी मात्रा में कच्चा तेल और गैस, ये जहां युद्ध चल रह है ना, इस युद्ध से प्रभावित इलाके से मंगाता रहा है। इसलिए सरकार हर वो कदम उठा रही है, जिससे सामान्य परिवारों पर, हमारे किसान भाई-बहनों पर, इस संकट का बोझ न पड़े।

साथियों,

संकट के इस समय में भी, भारत ने अपने तेज़ विकास को निरंतर जारी रखा है। मैं सिर्फ पश्चिमी उत्तर प्रदेश की ही बात करुं, तो पिछले कुछ सप्ताह में ही, ये चौथा बड़ा प्रोजेक्ट है, जिसका शिलान्यास या लोकार्पण हुआ है। इन कुछ ही सप्ताह में, इस दौरान नोएडा में बहुत बड़ी सेमीकंडक्टर फैक्ट्री का शिलान्यास हुआ, इसी कालखड में देश की पहली दिल्ली-मेरठ नमो-भारत ट्रेन ने गति पकड़ी, इसी कालखंड में मेरठ मेट्रो का विस्तार किया गया, और इतने कम समय में आज नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट का आप सबके हाथों से उद्धघाटन भी हो गया।

साथियों,

ये सारे प्रोजेक्ट्स, यूपी के विकास के लिए, डबल इंजन सरकार के प्रयासों का शानदार उदाहरण हैं। सेमीकंडक्टर फैक्ट्री, भारत को टेक्नोलॉजी में आत्मनिर्भर बना रही है। मेरठ मेट्रो और नमो भारत रेल, तेज और स्मार्ट कनेक्टिविटी दे रही है। और ये हमारा जेवर एयरपोर्ट, पूरे उत्तर भारत को दुनिया से जोड़ रहा है। और आपने अभी वीडियो में देखा, ये ऐसा एयरपोर्ट बन रहा है, हर दो मिनट में एक जहाज उड़ेगा, हर दो मिनट में एक जहाज उड़ेगा। पहले सपा वालों ने नोएडा को अपनी लूट का ATM बना लिया था। लेकिन आज भाजपा सरकार में वही नोएडा, यूपी के विकास का सशक्त इंजन बन रहा है।

साथियों,

जेवर का ये एयरपोर्ट, डबल इंजन सरकार की कार्यसंस्कृति का भी बहुत अच्छा उदाहरण है। अब आप सोचिये, इस एयरपोर्ट को अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार ने 2003 में ही फाइल में मंजूरी दे दी थी। 2003 में, आपमें से बहुत होंगे जिसका जन्म नहीं हुआ होगा, बहुत वो लोग होंगे जो उस समय 25-30 साल के 35 साल के हुए होंगे और आज रिटायर भी हो गए, लेकिन एयरपोर्ट नहीं बना। लेकिन केंद्र में कांग्रेस और यहां की पहले की सरकारों ने सालों तक इस एयरपोर्ट की नींव तक नहीं पड़ने दी। 2004 से 2014 तक ये एयरपोर्ट फाइलों में ही दबा रहा। जब हमारी सरकार बनी तो यूपी में सपा की सरकार थी। शुरु के दो-तीन सालों में सपा वालों ने इस पर काम नहीं होने दिया। लेकिन जैसे ही यहां भाजपा-NDA की सरकार बनी, दिल्ली में भाजपा-एनडीए की सरकार बनी, तो जेवर एयरपोर्ट की नींव भी पड़ी, निर्माण भी हुआ और अब ये शुरु भी हो गया है।

साथियों,

एयरपोर्ट के अलावा ये क्षेत्र देश के दो बड़े फ्रेट कॉरिडोर्स का भी हब बन रहा है। ये फ्रेट कॉरिडोर मालगाड़ियों के लिए बिछाई गई स्पेशल पटरियां हैं। इससे उत्तर भारत की बंगाल और गुजरात के समंदर से कनेक्टिविटी बेहतर हो गई है। और दादरी वो स्थान है जहां ये दोनों कॉरिडोर्स आपस में मिलते हैं। यानी यहां किसान जो उगाते हैं, यहां उद्योग जो कुछ बनाते हैं, वो जमीन से, हवाई मार्ग से, दुनिया के कोने-कोने तक तेज़ी से जा पाएगा। ऐसी मल्टी-मोडल कनेक्टिविटी के कारण, यूपी दुनियाभर के निवेशकों के लिए बहुत बड़ा आकर्षण बन रहा है।

साथियों,

जिस नोएडा को पहले अंधविश्वास के कारण अपने हाल पर छोड़ दिया गया था, कुर्सी जाने के डर से पहले के सत्ताधारी यहां आने से डरते थे, मुझे याद है यहां की सपा सरकार थी और मैंने नोएडा आने का कार्यक्रम बनाया, तो मुख्यमंत्री इतने डरे हुए थे कि वो उस कार्यक्रम में नहीं आए और मुझे भी डराने की लोगों ने कोशिश की, कि नोएडा मत जाओ मोदी जी, अभी-अभी प्रधानमंत्री बने हो। मैंने कहा इस धरती का आशीर्वाद लेने जा रहा हूं, जो मुझे लंबे अर्से तक सेवा करने का मौका देगा। अब वही इलाका पूरी दुनिया का स्वागत करने के लिए तैयार है। ये पूरा क्षेत्र, आत्मनिर्भर भारत के संकल्प को सशक्त कर रहा है।

साथियों,

इस क्षेत्र की अर्थव्यवस्था में, खेती-किसानी का बहुत महत्व है। मैं आज उन मेरे किसान भाई-बहनों का विशेष रूप से आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने इस प्रोजेक्ट को साकार करने के लिए अपनी जमीनें दी है। उन किसानों के लिए जोरदार तालियां बजाइये दोस्तों, मेरे किसान भाई-बहनों के लिए जोरदार तालियां बजाइये। मेरे किसान भाई-बहन, आपके इस योगदान से ही, इस पूरे क्षेत्र में विकास का एक नया दौर शुरु होने जा रहा है। आधुनिक कनेक्टिविटी का जो विस्तार यहां हो रहा है, उससे पश्चिमी यूपी में फूड प्रोसेसिंग की संभावनाओं को और बल मिलेगा। अब यहां के कृषि उत्पाद दुनिया के बाज़ारों में और बेहतर तरीके से जा पाएंगे।

साथियों,

यहां मैं अपने किसान साथियों का एक और बात के लिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं। आपके गन्ने से जो इथेनॉल बनाया गया है, उससे कच्चे तेल, कच्चे तेल पर देश की निर्भरता कम हुई है। अगर इथेनॉल का उत्पादन ना बढ़ता, पेट्रोल में उसकी ब्लेंडिंग ना बढ़ती, तो देश को हर वर्ष साढ़े चार करोड़ बैरल, साढ़े चार करोड़ बैरल यानी लगभग 700 करोड़ लीटर कच्चा तेल विदेशों से मंगवाना पड़ता। किसानों के परिश्रम ने देश को इस संकट के समय में इतनी बड़ी राहत दी है।

साथियों,

इथेनॉल से देश को तो फायदा हुआ ही है, किसानों को भी बहुत बड़ा लाभ हुआ है। इससे करीब डेढ़ लाख करोड़ रुपए की विदेशी मुद्रा बची है। यानी इथेनॉल न बनाते तो ये पैसा विदेश जाना जय था। बीते वर्षों में इतना सारा पैसा, देश के किसानों को मिला है, गन्ना किसानों को मिला है।

साथियों,

यहां के गन्ना किसानों ने तो पहले के वो दिन भी देखे हैं, जब कई-कई सालों तक गन्ने का बकाया लटका रहता था। लेकिन आज भाजपा की डबल इंजन सरकार के प्रयासों से गन्ना किसानों की स्थिति बेहतर हुई है।

साथियों,

किसी भी देश में एयरपोर्ट सिर्फ एक सामान्य सुविधा नहीं होता। ये एयरपोर्ट प्रगति को भी उड़ान देते हैं। साल 2014 से पहले, देश में सिर्फ 74 एयरपोर्ट थे। आज 160 से अधिक एयरपोर्ट्स देश में हैं। अब महानगरों के अलावा, देश के छोटे-छोटे शहरों में भी हवाई कनेक्टिविटी पहुंच रही है। पहले जो सरकारें रही हैं, वे मानती थीं कि हवाई यात्रा सिर्फ अमीरों के लिए ही होनी चाहिए। लेकिन भाजपा सरकार ने, सामान्य भारतीय के लिए हवाई यात्रा को आसान बना दिया है। हमारी सरकार ने उत्तर प्रदेश में हवाई अड्डों के नेटवर्क का तेज़ी से विस्तार करते हुए उनकी संख्या बढ़ाकर सत्रह कर दी है।

साथियों,

भाजपा सरकार का निंरतर प्रयास रहा है कि एयरपोर्ट भी बने और किराया-भाड़ा भी सामान्य परिवारों की पहुंच में रहे। इसलिए, हमने उड़ान योजना शुरु की थी। इस स्कीम के कारण, बीते कुछ सालों में एक करोड़ साठ लाख से अधिक देशवासियों ने उड़ान योजना से टिकट लेकर सस्ती दरों पर हवाई यात्रा की है। और मैं आपको एक और जानकारी देना चाहता हूं। हाल में ही केंद्र सरकार ने उड़ान योजना को और विस्तार दिया है। इसके लिए लगभग 29 हज़ार करोड़ रुपए की स्वीकृति दी गई है। आने वाले वर्षों में इसके तहत, छोटे-छोटे शहरों में 100 नए एयरपोर्ट और 200 नए हेलीपैड बनाने की योजना है। यूपी को भी इससे बहुत अधिक लाभ होगा।

साथियों,

भारत का एविएशन सेक्टर, बहुत तेज़ से गति और विकास कर रहा है। जैसे-जैसे भारत में नए-नए एयरपोर्ट बन रहे हैं, वैसे-वैसे नए हवाई जहाज़ों की ज़रूरत भी बढ़ती जा रही है। इसलिए देश की अलग-अलग एयरलाइन्स ने सैकड़ों नए जहाजों के ऑर्डर दिए हैं। ये जो नई सुविधाएं हैं, नए जहाज आ रहे हैं, इनको उड़ाने वाले, इनमें सर्विस देने वाले, मेंटनेस से जुड़े, ऐसे हर काम के लिए बहुत बड़ी संख्या में वर्कफोर्स की ज़रूरत रहेगी। ये युवाओं के लिए बहुत बड़ा अवसर है। इसलिए हमारी सरकार, एविएशन सेक्टर में ट्रेनिंग की सुविधाओं का भी विस्तार कर रही है।

साथियों,

आप जब अपनी कोई गाड़ी खरीदते हैं, तो ये जरूर देखते हैं कि उस गाड़ी बनाने वाली कंपनी का सर्विसिंग सेंटर आसपास है या नहीं है। आप जानकर हैरान हो जाएंगे कि हमारे देश में हवाई जहाजों की सर्विसिंग, यानी उनके मैंटनेंस, रिपेयर एंड ओवरहॉल की पुख्ता व्यवस्थाएं ही नहीं थीं। भारत के 85 एयरपोर्ट, 85 परसेंट हवाई जहाजों को आज भी मैंटनेंस, रिपेयर एंड ओवरहॉल यानी MRO के लिए, इस काम के लिए विदेश भेजना पड़ता है। इसलिए हमारी सरकार ने ठाना है कि MRO सेक्टर में भी भारत को आत्मनिर्भर बनाएंगे। अब भारत में ही, बहुत बड़े पैमाने पर MRO सुविधाएं विकसित की जा रही हैं। आज यहां जेवर में भी MRO सुविधा का शिलान्यास हुआ है। ये सुविधा जब तैयार हो जाएगी, तो ये देश-विदेश के विमानों को सेवा देगी। इससे देश को कमाई भी होगी, हमारा पैसा भी देश में ही रहेगा, और युवाओं को अनेक रोजगार भी मिलेंगे।

साथियों,

आज हमारी सरकार की प्राथमिकता देश के नागरिकों की सुविधा है। देश के नागरिक का समय बचे और उसकी जेब पर ज्यादा बोझ भी न पड़े, ये हमारा लक्ष्य है। मेट्रो और वंदे भारत जैसी आधुनिक रेल सेवाओं का इसी भाव से ही विस्तार किया जा रहा है। दिल्ली-मेरठ नमो भारत रेल, इसका कितना फायदा हो रहा है, ये भी हम सब देख रहे हें। अभी तक नमो भारत, ढाई करोड़ से अधिक लोग सफर कर चुके हैं। दिल्ली-मेरठ के जिस सफर में पहले घंटों लग जाते थे, अब वो सफर मिनटों में ही पूरा हो रहा है।

साथियों,

विकसित भारत के विकसित आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर हमारी सरकार अभूतपूर्व निवेश कर रही है। बीते 11 वर्षों में इंफ्रास्ट्रक्चर का बजट छह गुणा से अधिक बढ़ाया गया है। इन वर्षों में 17 लाख करोड़ रुपये हाईवे और एक्सप्रेसवे पर खर्च किए गए हैं, एक लाख किलोमीटर से अधिक के हाईवे का निर्माण किया गया है। 2014 तक रेलवे में सिर्फ 20 हजार किलोमीटर रूट का बिजलीकरण हुआ था। जबकि 2014 के बाद से 40 हजार किलोमीटर से ज्यादा रेलवे ट्रैक का बिजलीकरण किया गया है। आज ब्रॉडगेज नेटवर्क का लगभग शत-प्रतिशत बिजलीकरण हो चुका है। आज कश्मीर घाटी हो या नॉर्थ ईस्ट की राजधानियां, ये पहली बार रेल नेटवर्क से जुड़ रही हैं। पोर्ट यानी बंदरगाहों की क्षमता, बीते दशक में दोगुने से अधिक हुई है। देश में नदी जलमार्गों की संख्या भी लगातार बढ़ रही है। विकसित भारत के निर्माण के लिए जरूरी हर क्षेत्र में भारत तेज़ी से काम कर रहा है।

साथियों,

विकसित भारत बनाने के लिए सबका प्रयास बहुत ज़रूरी है। ये आवश्यक है कि 140 करोड़ देशवासी कड़े से कड़ा परिश्रम करे, और वैश्विक संकटों का एकजुट होकर सामना करें। अभी जो युद्ध चल रहा है, इससे पैदा हुए संकटों का सामना कैसे करना है, इसके बारे में मैंने संसद में भी विस्तार से बताया है। मेरी कल देश के सभी मुख्यमंत्रियों से भी लंबी चर्चा हुई है और बड़ी सकारात्मक चर्चा हुई है। मैं आज आप सभी जनता-जनार्दन से फिर कहूंगा, मैं देशवासियों से फिर से कहूंगा। हमें शांत मन से, धैर्य के साथ, एकजुटता के साथ, मिल जुलकर के, इस संकट का सामना करना है। ये पूरे विश्व में परेशानी पैदा करने वाला संकट है। हमें अपने देश की सबसे ज्यादा चिंता करनी है। और यही हम भारतीयों की सबसे बड़ी ताकत है। मैं यूपी के, देश के सभी राजनीतिक दलों से भी आग्रहपूर्वक कहना चाहता हूं, विनती पूर्वक कहना चाहता हूं, इस प्रकार के संकट में ऐसी बातें करने से बचें, जो देश के लिए नुकसानदायक हैं। जो भारतीयों के हक में है, जो भारत के हित में है, वही भारत सरकार की नीति और रणनीति है। राजनीति के लिए गलत बयानबाज़ी करने वाले, राजनीतिक बहस में तो कुछ नंबर पा लेंगे, लेकिन देश को नुकसान पहुंचाने वाली हरकतों को देश की जनता कभी माफ नहीं करती। कोरोना के महासंकट के दौरान भी, कुछ लोगों ने अफवाहें फैलाईं, वैक्सीन को लेकर झूठ बोले, ताकि सरकार का काम मुश्किल हो, देश को नुकसान हो। परिणाम क्या हुआ? जनता ने चुनावों के दौरान ऐसी राजनीति को नकार दिया, ठुकरा दिया। मुझे पूरा भरोसा है, कि देश के सभी राजनीतिक दल भी इससे सबक सीखेंगे और देश के एकजुट प्रयासों को वो बल देंगे, ताकत देंगे। इसी आग्रह के साथ, एक बार फिर से उत्तर प्रदेश को इस शानदार एयरपोर्ट के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं।

मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

बहुत-बहुत धन्यवाद।