भारत कायमच ज्ञानयोगाच्या मार्गावरून समर्पण भावनेनं वाटचाल करत असून, हजारो वर्षांपासूनचे प्राचीन वेद आजही प्रेरणा देणारे : पंतप्रधान
भगवान स्वामीनारायण म्हणजे आध्यात्मिक साधना आणि सेवा यांचे प्रतीक होते : पंतप्रधान
प्राचीन हस्तलिखितांच्या जतनासाठी प्रत्येकाने ज्ञान भारतम मिशनला सहकार्य करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

जय स्वामी नारायण

आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे.  आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.

मित्रांनो,

ज्ञान योग हा भारताचा स्थायीभाव आहे. हजारो वर्षांपूर्वीचे वेद आजही आपले प्रेरणास्थान आहेत. वेदांपासून प्रेरणा घेत आपल्या साधुसंतांनी त्या त्या काळात समाजात विकास घडवला. वेदांपासून उपनिषदांपर्यंत, उपनिषदांपासून पुराणं, श्रुती, स्मृती, कथाकथन, गायन अशा विविध माध्यमातून आपली संस्कृती बहरत गेली, तिचे सामर्थ्य वाढतच राहिले.

मित्रांनो,

विविध कालखंडांमध्ये तत्कालिन गरजेनुसार संतमहात्म्यांनी आणि विचारवंतांनी या परंपरेत भर घातली. भगवान स्वामी नारायण यांनी आपले जीवन लोकशिक्षण आणि लोकसेवेप्रती समर्पित केले होते हे आपण सगळे जाणतोच. शिक्षापत्रीमध्ये त्यांनी आपले हे अनुभव अतिशय सोप्या शब्दांमध्ये मांडले आहेत. त्यातून भगवान स्वामी नारायण यांनी आपल्याला जीवन जगण्याचा अमूल्य मंत्र सांगितला आहे.

मित्रांनो,

शिक्षापत्रीचा आजचा हा द्विशताब्दी सोहळा म्हणजे आपल्या सर्वांसाठीच शिक्षापत्रीमधून नवीन काय शिकता येईल हे तपासून पाहण्याची संधी आहे. आपल्या आयुष्यात आपण या आदर्शांचे कितपत पालन करतो आहोत याचेदेखील मूल्यांकन करण्याची ही संधी आहे.

मित्रांनो,

भगवान स्वामी नारायण यांचे जीवनचरित्र अध्यात्मातून सेवेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांचे शिष्य आज समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवसेवेचे अनेक उपक्रम राबवत आहेत. शिक्षण, आरोग्य, शेतकरी कल्याण, पाणी यासाठीचे त्यांचे उपक्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत. तुम्ही सगळे संत आणि हरि भक्तांनी केलेला हा समाजकार्याचा विस्तार प्रेरणादायी आहे.

मित्रांनो,

आज आपल्या देशात स्वदेशी आणि स्वच्छता या लोकचळवळी राबवल्या जात आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र घराघरांत पोहोचला आहे. तुमचे पाठबळ या चळवळींना मिळाले, तर शिक्षापत्रीचा हा द्विशताब्दी सोहळा अजूनच अविस्मरणीय ठरेल. प्राचीन हस्तलिखितांच्या जतनासाठी देशात ज्ञान भारतम अभियान सुरू आहे, हे तुम्हालादेखील माहिती आहे. या कामी तुमच्यासारख्या सगळ्या ज्ञानयोगी संस्थांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आपल्या भारतातील प्राचीन ज्ञानभांडार आणि त्याचे वेगळेपण आपण जपले पाहिजे. या कामी तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ज्ञान भांडारम अभियानाचे यश कित्येक पटींनी वाढेल. 

मित्रांनो,

सध्या आपल्या देशात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा मोठा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जात आहे. एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथ मंदीर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्यापासून आतापर्यंत त्याच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास आपण सोमनाथ स्वाभिमान पर्व म्हणून साजरा करत आहोत. तुम्ही सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन त्याचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमच्या माध्यमातून भारताच्या विकास यात्रेला भगवान स्वामी नारायणांचा आशीर्वाद मिळत राहील असा मला विश्वास आहे. सर्व संतांना, सर्व हरि भक्तांना आणि सर्व भाविकांना पुन्हा एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा.

जय स्वामी नारायण!

कोटी कोटी धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Media Coverage

"Fast-Track Courts For Paper Leaks": PM Modi's Big Message To Youth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister announces fast-track courts for paper leak cases to safeguard the future of youth
July 23, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today emphasized that nothing is more important than the welfare and future of the youth.

The Prime Minister stated that the government has decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Shri Modi noted that he has directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard, adding that this continues a series of measures aimed at safeguarding the interests of students.

The Prime Minister firmly asserted that those who try to harm the future of the youth will not be spared.

In a post on X, the Prime Minister shared:

"Nothing is more important than the welfare and future of our youth!

We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.

Those who try to harm the future of our youth will not be spared.

देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।

पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।

विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।

युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।"