भारतीयत्वाच्या रक्षणासाठी महाराजा सुहेलदेव यांचे योगदान दुर्लक्षित – पंतप्रधान
इतिहास घडवणाऱ्याप्रती इतिहास लेखकांनी केलेला अन्याय आता दूर करण्यात येत आहे- पंतप्रधान
महामारीचे नैराश्य मागे टाकत भारतासाठी हा वसंतऋतू नवी आशा घेऊन आल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
कृषी कायद्याबाबत करण्यात आलेली दिशाभूल उघड झाल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नमस्‍कार !

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल , राज्याचे लोकप्रिय आणि यशस्‍वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , उत्तर प्रदेश सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतील माझे सहकारी, आमदार, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

आपल्या पराक्रमाने मातृभूमीचा मान वाढवणारे राष्ट्रनायक महाराजा सुहेलदेव यांची जन्मभूमी आणि ऋषीमुनींनी जिथे तप केले ,त्या बहराइचच्या पवित्र धरतीला मी आदरपूर्वक वंदन करतो . वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वाना, संपूर्ण देशाला खूप-खूप शुभेच्छा !! सरस्वती माता भारताच्या ज्ञान-विज्ञानाला अधिक समृद्ध करो. आजचा दिवस विद्या आरंभ आणि अक्षर ज्ञानासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. आपल्याकडे म्हटले आहे :-

सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने।

विद्यारूपे विशालाक्षि विद्यां देहि नमोऽस्तु ते॥

म्हणजे , हे महाभाग्यवती, ज्ञानरूपी , कमळासारखे विशाल नेत्र असलेली ज्ञानदात्री सरस्वती, मला विद्या दे, मी तुला वंदन करतो. भारताच्या, मानवतेच्या सेवेसाठी संशोधन आणि अभिनवतेत सहभागी झालेल्या, राष्ट्र निर्मितीत सहभागी झालेल्या प्रत्येक देशवासियाला सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळो, त्यांना यश मिळो हीच आम्हा सर्वांची प्रार्थना आहे.

बंधू आणि भगिनींनो,

रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात , ऋतु बसंत बह त्रिबिध बयारी। म्हणजे वसंत ऋतूमध्ये शीतल, मंद सुगंध, अशी तीन प्रकारची हवा वाहत आहे, याच हवेत, याच ऋतूत शेते , बाग-बगीचा तसेच जीवनाचा प्रत्येक घटक आनंदित होत आहे. खरेच , आपण जिथे पाहू तिथे फुलांचे ताटवे नजरेस पडतात, प्रत्येक प्राणी वसंत ऋतूच्या स्वागतासाठी तयार आहे. हा वसंत महामारीची निराशा झटकून पुढे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी नवी आशा , नवी उमेद घेऊन आला आहे. या उल्हासात भारतीयत्व , आपली संस्कृती , आपल्या संस्कारांसाठी ढाल बनून उभे राहणारे महानायक, महाराजा सुहेल देव यांचा जन्मोत्सव आपला आनंद द्विगुणित करत आहे.

मित्रानो,

मला सुमारे दोन वर्षांपूर्वी गाज़ीपुर येथे महाराजा सुहेल देव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्याची संधी मिळाली होती. आज बहराइच येथे त्यांच्या भव्य स्मारकाचा शिलान्यास करण्याचे सौभाग्य लाभले आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक, ऐतिहासिक चित्तोरा तलावाचा विकास, बहराइचवर महाराजा सुहेलदेव यांचा आशीर्वाद आणखी वाढवेल , भावी पिढयांना देखील प्रेरित करेल.

मित्रानो,

आज महाराजा सुहेल देव यांच्या नावे बांधण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी एक नवीन भव्य इमारत मिळाली आहे. बहराइच सारख्या विकासासाठी महत्वाकांक्षी जिल्ह्यात आरोग्य सुविधेतील वाढ इथल्या लोकांचे जीवन सुलभ करेल. याचा लाभ आसपासच्या श्रावस्ती, बलरामपुर, सिद्धार्थनगर यांना होईलच , नेपाळ इथून येणाऱ्या रुग्णांना देखील ते मदत करेल.

बंधू आणि भगिनींनो

भारताचा इतिहास केवळ तेवढा नाही जो देशाला गुलाम बनवणऱ्या , गुलामगिरीच्या मानसिकतेतून इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला आहे. भारताचा इतिहास तो देखील आहे जो भारताच्या सामान्य लोकांनी , भारताच्या लोककथांमध्ये रचलेला -वसलेला आहे. , जो पिढ्यानी पुढे नेला आहे. आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्यच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे ,अशा महापुरुषांचे योगदान, त्यांचा त्‍याग, त्यांची तपस्‍या, त्यांचा संघर्ष, त्यांची वीरता, त्यांचे हौतात्म्य, या सर्व गोष्टींचे स्‍मरण करणे, त्यांना आदरपूर्वक वंदन करणे , त्यांच्याकडून प्रेरणा घेणे यापेक्षा मोठी कोणतीही संधी असू शकत नाही. हे दुर्भाग्य आहे की भारत आणि भारतीयत्वाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा अनेक नायक-नायिकांना ते स्थान दिले गेले नाही ज्यावर त्यांचा हक्क होता. इतिहास रचणाऱ्यांबरोबरच , इतिहास लिहिण्याच्या नावावर हेर-फेर करणाऱ्यांनी जो अन्याय केला, तो आता आजचा भारत सुधारत आहे , बरोबर करत आहे. चुकांपासुन देशाला मुक्त करत आहे. तुम्ही बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस, जे आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान होते, त्यांच्या या ओळखीला , आझाद हिंद सेनेच्या योगदानाला ते महत्व दिले गेले , जे महत्‍व नेताजी यांना मिळायला हवे होते?

आज लाल किल्ला ते अंदमान-निकोबार पर्यंत त्यांची ही ओळख आपण देश आणि जगासमोर सशक्त केली आहे. देशाच्या पाचशेहून अधिक संस्थानांना एकत्र करण्याचे कठीण कार्य करणाऱ्या सरदार पटेल यांच्याबरोबर काय झाले, देशातील प्रत्येक लहान मुलाला हे चांगले माहीत आहे. आज जगातील सर्वात मोठा पुतळा स्टेच्यू ऑफ यूनिटी सरदार पटेल यांचा आहे, जो आपल्याला प्रेरणा देत आहे. देशाला संविधान देण्यात महत्वाची भूमिका देणारे, वंचित, पीडित, शोषित यांचा आवाज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेही केवळ राजकीय चष्म्यातून पाहिले गेले. आज भारत तसेच इंग्लंड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले जात आहे.

मित्रानो

भारताचे असे अनेक सेनानी आहेत ज्यांच्या योगदानाला अनेक कारणांमुळे मान दिला गेला नाही , ओळख दिली गेली नाही . चौरी-चौराच्या वीरांबरोबर जे झाले ते आपण विसरू शकतो का ? महाराजा सुहेल देव आणि भारतीयत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबरोबर देखील असाच व्यवहार केला गेला.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भले ही महाराजा सुहेलदेव यांचे शौर्य, पराक्रम, त्यांची वीरता यांना ते स्थान मिळाले नाही , मात्र अवध आणि तराई पासून पूर्वांचलच्या लोककथांमध्ये , लोकांच्या हृदयात ते कायम राहिले. केवळ वीरताच नाही , एक संवेदनशील आणि विकासवादी शासक म्हणून त्यांचा अमिट ठसा आहे. आपल्या शासनकाळात ज्याप्रकारे त्यांनी उत्तम रस्ते , तलाव , बाग-बगीचे आणि शिक्षण क्षेत्रात काम केले ते अभूतपूर्व होते. त्यांचा हाच विचार , या स्मारक स्थळात देखील दिसणार आहे.

मित्रानो,

महाराजा सुहेलदेव यांच्या जीवनाने पर्यटकांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा 40 फुटाचा कांस्य पुतळा उभारला जाईल. इथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात महाराजा सुहेलदेव यांच्याशी निगडित ऐतिहासिक माहिती असेल. त्याच्या अंतर्गत भागाचा तसेच आजूबाजूच्या रस्त्यांचेरुंदीकरण केले जाईल. मुलांसाठी उद्यान असेल, सभागृह असेल , पर्यटकांसाठी निवासस्थान , पार्किंग, कैफेटीरिया सारख्या अनेक सुविधांची निर्मिती केली जाईल. त्याचबरोबर जे स्थानिक शिल्पकार आहेत, कलाकार आहेत, ते त्यांच्या वस्तू इथे सहज विकू शकतील , यासाठी दुकाने बांधली जातील. त्याप्रमाणे चित्तौरा तलावावर घाट आणि पायऱ्यांचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणामुळे या ऐतिहासिक तलावाचे महत्व आणखी वाढेल. हे सर्व प्रयत्न , बहराइचची सुंदरताच केवळ वाढवणार नाहीत तर इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ करतील. ‘मरी मैय्या’ च्या कृपेने हे कार्य लवकरच पूर्ण होईल.

बंधू आणि भगिनींनो ,

गेल्या काही वर्षात देशभरात इतिहास, आस्था, अध्यात्म, संस्कृतीशी संबंधित जितक्या स्मारकांचे बांधकाम केले जात आहे त्यांचे सर्वात मोठे उद्दिष्ट पर्यटनाला चालना देणे हे देखील आहे . उत्तर प्रदेश तर पर्यटन आणि तीर्थाटन, दोन्ही बाबतीत समृद्ध देखील आहे आणि त्याच्या अपार क्षमता देखील आहेत. मग ते भगवान राम यांचे जन्मस्थान असेल किंवा कृष्णाचे वृंदावन, भगवान बुद्धाचे सारनाथ असेल किंवा मग काशी विश्वनाथ, संत कबीर यांचे मगहर धाम असो किंवा मग वाराणसी इथे संत रविदास यांच्या जन्मस्थळाचे आधुनिकीकरण, संपूर्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. त्यांच्या विकासासाठी भगवान राम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित स्थळे उदा. अयोध्या , चित्रकूट, मथुरा, वृन्दावन, गोवर्धन, कुशीनगर, श्रावस्ती आदि तीर्थस्थळांवर रामायण सर्किट, आध्यात्मिक सर्किट, बौद्ध सर्किटचा विकास केला जात आहे.

बंधू आणि भगिनींनो

गेल्या काही वर्षात जे प्रयत्न झाले आहेत , त्यांचा प्रभाव देखील दिसू लागला आहे . ज्या राज्यात अन्य राज्यापेक्षा सर्वात जास्त पर्यटक येतात , त्याचे नाव उत्तर प्रदेश आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही उत्तर प्रदेशने देशातील अव्वल तीन राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांबरोबरच आधुनिक संपर्क साधनेही वाढविण्यात येत आहेत. भविष्यामध्ये अयोध्येचे विमानतळ आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातल्या आणि परदेशातल्या पर्यटकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लहान-मोठ्या डझनभर विमानतळांचे काम सुरू आहे. त्यापैकी काही विमानतळे पूर्वांचल भागातही आहेत. ‘उडान’ योजनेअंतर्गत परवडणारे तिकीटदर ठेवून उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांना हवाई सेवेने जोडण्याची मोहीम सुरू आहे.

याशिवाय पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, गंगा द्रुतगती मार्ग, गोरखपूर लिंक द्रुतगती मार्ग, बलिया द्रुतगती मार्ग असे आधुनिक आणि रूंद रस्ते संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये बनविण्यात येत आहेत. आणि या कामामुळे एका पद्धतीने आधुनिक उत्तर प्रदेशमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. हवाई आणि रस्ते संपर्क व्यवस्थेशिवाय उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे संपर्क यंत्रणाही आता आधुनिक होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन मोठी मालवाहतूक समर्पित मार्गिका जंक्शन्स आहेत. अलिकडेच मालवाहतूक समर्पित पूर्वेकडील मार्गिकेच्या एका मोठ्या भागाचे लोकार्पण उत्तर प्रदेशात केले गेले आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे आज आधुनिक पायाभूत सुविधा निर्माणाचे काम सुरू आहे, ते लक्षात घेता उत्तर प्रदेशामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी देश आणि दुनियेतले गुंतवणूकदार उत्साहित होत आहेत. यामुळे येथे नवीन उद्योगांसाठी अधिक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. इथल्या युवकांना रोजगाराच्या नवीन संधीही मिळत आहेत.

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये ज्याप्रकारे उत्तर प्रदेशामध्ये काम झाले आहे, ते खूप महत्वाचे आहे. कल्पना करा, जर उत्तर प्रदेशच्या परिस्थितीत गडबड झाली असती तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने चर्चा केली गेली असती. परंतु योगी यांच्या सरकारने, योगी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचविण्यात यशस्वी झाला नाही तर बाहेरून परत आलेल्या श्रमिकांना रोजगार देण्याचे उत्तर प्रदेशाने जे काम केले आहे, ते खूप कौतुकास्पद आहे.

बंधू आणि भगिनींनो,

कोरोनाच्या विरोधात उत्तर प्रदेशाने जो लढा दिला आहे, त्याच्या मागे गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये राज्यात करण्यात आलेल्या कामांचे खूप मोठे योगदान आहे. पूर्वांचलला दशकांपर्यंत त्रासदायक ठरणा-या मेंदूज्वराची साथ कमी करण्यासाठी खूप प्रभावी काम उत्तर प्रदेशाने करून दाखवले आहे. उत्तर प्रदेशामध्ये 2014 पर्यंत 14 वैद्यकीय महाविद्यालये होती. आज त्यांची संख्या वाढून 24 झाली आहे. त्याचबरोबर गोरखपूर आणि बरेली येथे एम्सच्या उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बनविण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये आधुनिक कर्करोग उपचार रूग्णालयाची सुविधाही आता पूर्वांचल भागाला मिळत आहे. उत्तर प्रदेशात जलजीवन मिशन म्हणजेच प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचविण्यासाठीही अतिशय कौतुकास्पद कार्य केले जात आहे. आता प्रत्येक घरामध्ये शुद्ध पेयजल पोहोचल्यानंतर पाण्यामुळे होणारे अनेक आजार आपोआपच कमी होणार आहेत.

बंधु आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेशमध्ये वीज, पेयजल, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे, थेट लाभ गावांना, गरीब आणि शेतक-यांना होत आहे. विशेषतः ज्या लहान शेतकरी बांधवांकडे खूप कमी जमीन आहे, ते या योजनांचे खूप मोठ्या संख्येने लाभार्थी आहेत. उत्तर प्रदेशातल्या जवळपास अडीच कोटी शेतकरी परिवारांच्या बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. याच शेतकरी बांधवांना यापूर्वी कधी विजेचे बिल भरण्यासाठी किंवा शेतातल्या पिकांसाठी खताचे पोते खरेदी करण्यासाठी इतरांकडून नाइलाजाने कर्ज घ्यावे लागत होते. परंतु अशा लहान शेतकरी बांधवांना आमच्या सरकारने 27 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी थेट हस्तांतरित केला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसा जमा केले आहेत. इथल्या शेतक-यांना विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. बोअरिंगचे पाणी मिळावे, यासाठी रात्र रात्रभर जागावे लागत होते. पाणी मिळावे यासाठी आपली बारी येण्यासाठी वाट पहावी लागत होती. आता विजेचा अखंड पुरवठा होत असल्यामुळे अशा अनेक समस्याही आता संपुष्टात आल्या आहेत.

मित्रांनो,

देशाची लोकसंख्या वाढली त्याचबरोबरच शेतीसाठी वापरण्यात येणारी जमीनही लहान, कमी-कमी होऊ लागली आहे. म्हणूनच देशामध्ये शेतकरी उत्पादक संघांची निर्मिती करणे खूप आवश्यक बनले आहे. आज सरकार लहान लहान शेतक-यांसाठी हजारो शेतकरी उत्पादक संघ म्हणजे ‘एफपीओ’ तयार करीत आहे. 1-2 बीघा जमीन असलेले 500 शेतकरी परिवार ज्यावेळी संघटित होवून बाजारात उतरतील त्यावेळी ते 500-1000 बीघा मालकीची जमीन असलेल्या शेतक-यापेक्षाही जास्त शक्तिशाली, प्रबळ बनू शकणार आहेत. त्याच प्रकारे शेतकरी रेल्वेच्या माध्यमातून भाजीपाला, फळे, दूध, मासे आणि अशा अनेक कृषी व्यवसायांशी संलग्न असलेल्या शेतक-यांना आता मोठ्या बाजारांना जोडण्यात येत आहे. ज्या नवीन सुधारणा कृषी क्षेत्रामध्ये लागू करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभही लहान आणि छोट्या-मध्यम शेतकरी बांधवांना सर्वात जास्त होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवीन कायदे झाल्यानंतर ठिकठिकाणच्या शेतकरी बांधवांनी हे कायदे उपयुक्त, चांगले असल्याचा अनुभव घेतल्याचे आता सामोरे आले आहे. या कृषी कायद्यांविषयी अगदी जाणून-बुजून अपप्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला; हे तर आता संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी देशाच्या कृषी बाजारामध्ये परदेशी कंपन्यांनी यावे म्हणून कायदा तयार केला, तेच आज देशी कंपन्यांच्या नावाने शेतकरी बांधवांना घाबरवून सोडत आहेत.

मित्रांनो,

राजकारण करण्यासाठी असा खोटा आणि अपप्रचार केला जातोय, हे आता उघडकीस आले आहे. नवीन कायद्यांना लागू केल्यानंतर उत्तर प्रदेशात यंदा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट शेतक-यांकडून धान्य खरेदी झाली आहे.

यावर्षी जवळपास 64 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची खरेदी उत्तर प्रदेशात झाली आहे. ही खरेदी, गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. इतकेच नाही तर योगी जी यांच्या सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांपर्यंत गेल्या वर्षांतले एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पोहोचवला आहे. कोरोना काळामध्येही ऊस उत्पादकांना कोणताही त्रास होवू नये म्हणून त्यांना सर्वतोपरी मदत दिली आहे. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे चुकते करावेत यासाठी केंद्रानेही हजारो कोटी रुपयांची मदत राज्य सरकारांना दिली आहे. ऊस उत्पादक शेतक-यांची बिले त्यांना वेळेवर मिळावीत, यासाठी योगी जी यांच्या सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

गावांतल्या लोकांचे आणि शेतकरी बांधवांचे जीवनमान चांगले व्हावे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतकरी असो, गावांमध्ये वास्तव्य करणारा गरीब असो त्याला कोणतीही समस्या असू नये, त्याला आपल्या घरावर होणा-या अवैध कब्जाच्या भीतीतून मुक्तता मिळावी, यासाठी स्वामित्व योजनाही संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अलिकडे उत्तर प्रदेशातल्या जवळपास 50 जिल्ह्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. जवळपास 12 हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे आणि आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त परिवारांना मालमत्ता कार्ड देण्यात आले आहे. म्हणजेच हे सर्व परिवार आता सर्व प्रकारच्या शंका, भीतीतून मुक्त झाले आहेत.

मित्रांनो,

आज गावातला गरीब नागरिक, शेतकरी पहात आहेत की, त्यांचे लहानसे घर वाचविण्यासाठी, त्यांची जमीन वाचविण्यासाठी पहिल्यांदाच कोणते तरी सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना चालवतेय. असा अनुभव ही गरीब मंडळी पहिल्यांदा घेत आहेत. इतके मोठे सुरक्षा कवच, प्रत्येक गरीबाला, अगदी प्रत्येक शेतक-याला, प्रत्येक ग्रामवासियाला सरकार देत आहे. म्हणूनच जर कोणाकडून कृषी सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची जमीन लुटण्याचा खोटा प्रचार केला जात असेल तर, त्यावर कसा काय विश्वास ठेवता येईल? आमचे लक्ष्य देशाच्या प्रत्येक नागरिकाला समर्थ बनविण्याचे आहे. आमचा संकल्प देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा आहे. या संकल्पाच्या सिद्धीसाठी समर्पित भावनेने आम्ही कार्यरत राहणार आहोत. ‘रामचरित मानस’ मधील एका चौपाईने मी आज आपले भाषण समाप्त करणार आहे:-

प्रबिसि नगर कीजे सब काजा ।

हृदयँ राखि कोसलपुर राजा ।।

या चौपाईचा भावार्थ असा आहे की, हृदयामध्ये भगवान रामाचे नाव धारण करून आपण जे काही कार्य करणार आहोत, त्यामध्ये निश्चितच यश मिळणार आहे.

पुन्हा एकदा महाराजा सुहेलदेव यांना वंदन करून, आपल्या सर्वांना या नवीन सुविधांसाठी खूप-खूप शुभेच्छा देतो, योगी जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांना खूप- खूप धन्यवाद देतो!!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26

Media Coverage

Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address at the News18 Rising Bharat Summit
February 27, 2026

इजराइल की हवा यहाँ भी पहुँच गई है।

नमस्कार!

नेटवर्क 18 के सभी पत्रकार, इस व्यवस्था को देखने वाले सभी साथी, यहां उपस्थित सभी महानुभाव, देवियों और सज्जनों!

आप सभी राइजिंग भारत की चर्चा कर रहे हैं। और इसमें strength within पर आपका जोर है, यानी साधारण शब्दों में कहूं, तो देश के अपने खुद के सामर्थ्य पर आपका फोकस है। और हमारे यहां तो शास्त्रों में कहा गया है - तत् त्वम असि! यानी जिस ब्रह्म की खोज मे हम निकले हैं, वो हम ही हैं, वो हमारे भीतर ही है। जो सामर्थ्य हमारे भीतर है उसे हमें पहचानना है। बीते 11 वर्षों में भारत ने अपना वही सामर्थ्य पहचाना है, और इस सामर्थ्य को सशक्त करने के लिए आज देश निरंतर प्रयास कर रहा है।

साथियों,

सामर्थ्य किसी देश में अचानक पैदा नहीं होता, सामर्थ्य पीढ़ियों में बनता है। वो ज्ञान से, परंपरा से, परिश्रम से और अनुभव से निखरता है, लेकिन इतिहास के एक लंबे कालखंड में, गुलामी की इतनी शताब्दियों में, हमारे सामर्थ्यवान होने की भावना को ही हीनता से भर दिया गया था। दूसरे देशों से आयातित विचारधारा ने समाज में कूट-कूट कर ये भर दिया था, कि हम अशिक्षित हैं और अनुगामी यानी, फॉलोअर हैं, हमारे यहां ये भी कहा गया है – यादृशी भावना यस्य, सिद्धिर्भवति तादृशी। यानी जैसी जिसकी भावना होती है, उसे वैसी ही सिद्धि प्राप्त होती है। जब भावना में ही हीनता थी, तो सिद्धि भी वैसी ही मिल रही है। हम विदेशी तकनीक की नकल करते थे, विदेशी मुहर का इंतजार करते थे, ये वो गुलामी थी जो राजनीतिक और भौगोलिक से ज्यादा मानसिक गुलामी थी। दुर्भाग्य से आजादी के बाद भी, भारत गुलामी की मानसिकता से बाहर नहीं निकल पाया। और इसका नुकसान हम आज तक उठा रहे हैं। इसका ताजा उदाहरण, हम ट्रेड डील्स में हो रही चर्चा में देख रहे हैं। कुछ लोग चौंक गए हैं कि अरे ये क्या हो गया, कैसे हो गया, विकसित देश भारत से ट्रेड डील्स करने में इतने उत्सुक क्यों हैं। इसका उत्तर है हताशा, निराशा से बाहर निकल रहा आत्मविश्वासी भारत। अगर देश आज भी 2014 से पहले वाली निराशा में होता, फ्रेजाइल फाइव में गिना जाता, पॉलिसी पैरालिसिस से घिरा होता, अगर ये हाल होते तो कौन हमारे साथ ट्रेड डील्स करता, अरे हमारी तरफ देखता भी नहीं।

लेकिन साथियों,

बीते 11 वर्षों में देश की चेतना में नई ऊर्जा का प्रवाह हुआ है। भारत अब अपने खोये हुए सामर्थ्य को वापस पाने का प्रयास कर रहा है। एक समय में जब भारत का वैश्विक अर्थव्यवस्था में सबसे ज्यादा दबदबा था, तो हमारा क्या सामर्थ्य था? भारत की मैन्युफैक्चरिंग, भारत के प्रोडक्टस की क्वालिटी, भारत की अर्थ नीति, अब आज का भारत फिर से इन बातों पर फोकस कर रहा है। इसलिए हमने मैन्युफैक्चरिंग पर काम किया, हमने मेक इन इंडिया पर बल दिया, हमने अपनी बैंकिंग सिस्टम को सशक्त किया, महंगाई जो डबल डिजिट की दर से भाग रही थी, उसका कंट्रोल किया और भारत को दुनिया का ग्रोथ इंजन बनाया। भारत का यही सामर्थ्य है कि दुनिया के विकसित देश सामने से भारत के साथ ट्रेड डील करने के लिए खुद आगे आ रहे हैं।

साथियों,

जब किसी राष्ट्र के भीतर, छिपी हुई उसकी शक्ति जागती है, तो वह नई उपलब्धियां हासिल करता है। मैं आपको कुछ और उदाहरण देता हूं। जैसे मैं जब कभी दूसरी देशों के हेड ऑफ द गर्वमेंट से मिलता हूं, तो वो जनधन, आधार और मोबाइल की इतनी शक्ति के बारे में सुनने के लिए बहुत उत्सुक होते हैं। जिस भारत में एटीएम भी, दुनिया की विकसित देशों की तुलना में काफी समय बाद आया, उस भारत ने डिजिटल पेमेंट सिस्टम में ग्लोबल लीडरशिप कैसे हासिल कर ली? जहां पर सरकारी मदद की लीकेज को कड़वा सच मान लिया गया था, वो भारत डीबीटी के जरिये 24 लाख करोड़ रूपये, यानी Twenty four trillion रुपीज कैसे लाभार्थियों को भेज पा रहा है? भारत का डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर, आज पूरे विश्व के लिए चर्चा का विषय बन चुका है।

साथियों,

दुनिया हैरान होती है, कि जिस भारत में 2014 तक, करीब तीन करोड़ परिवार अंधेरे में थे, वो आज सोलर पावर कैपेसिटी में दुनिया के टॉप के देशों में कैसे आ गया? जिस भारत के शहरों में पब्लिक ट्रांसपोर्ट सुधरने की कोई उम्मीद ना थी, वो भारत आज दुनिया का तीसरा बड़ा मेट्रो नेटवर्क वाला देश कैसे बन गया? जिस भारत के रेलवे की पहचान सिर्फ लेट-लतीफी और धीमी-रफ्तार से होती थी, वहां वंदे भारत, नमो भारत, ऐसी सेमी-हाईस्पीड कनेक्टिविटी कैसे संभव हो पा रही है?

साथियों,

एक समय था, जब भारत नई टेक्नोलॉजी का सिर्फ और सिर्फ कंज्यूमर था। आज भारत नई टेक्नोलॉजी का निर्माता भी है और नए मानक भी स्थापित कर रहा है। और ऐसा इसलिए हुआ है क्योंकि हमने अपने सामर्थ्य को पहचाना है, जिस Strength Within की आप चर्चा कर रहे हैं, ये उसका ही उदाहरण है।

साथियों,

जब हम गर्व से आगे बढ़ते हैं, तो दुनिया हमें जिस नजर से देखती रही है, वो नजर भी बदली है। आप याद कीजिए, कुछ साल पहले तक दुनिया में, ग्लोबल मीडिया में, भारत के किसी इवेंट की कितनी कम चर्चा होती थी। भारत में होने वाले इवेंट्स को उतनी तवज्जो ही नहीं दी जाती थी। और आज देखिए, भारत जो करता है, जो एक्शन यहां होते हैं, उसका वैश्विक विश्लेषण होता है। AI समिट का उदाहरण आपके सामने है, इसी भवन में हुआ है। AI समिट में 100 से ज्यादा देश शामिल हुए, ग्लोबल नॉर्थ हो या फिर ग्लोबल साउथ, सभी एक साथ, एक ही जगह, एक टेबल पर बैठे। दुनिया के बड़े-बड़े कॉर्पोरेशन्स हों या फिर छोटे-छोटे स्टार्ट अप्स, सभी एक साथ जुटे।

साथियों,

अब तक जितनी भी औद्योगिक क्रांतियां आई हैं, उनमें भारत और पूरा ग्लोबल साउथ सिर्फ फॉलोअर रहा है। लेकिन आर्टिफिशियल इंटेलीजेंस के इस युग में, भारत निर्णयों में सहभागी भी है और उन्हें शेप भी कर रहा है। आज हमारे पास खुद का AI स्टार्टअप इकोसिस्टम है, डेटा-सेंटर में निवेश करने की ताकत है और AI डेटा को स्टोर करने के लिए, प्रोसेस करने के लिए, जिस पावर की सबसे ज्यादा ज़रूरत है, उस पर भी भारत तेजी से काम कर रहा है। हमने न्यूक्लियर पावर सेक्टर में जो Reform किया है, वो भी भारत के AI इकोसिस्टम को मजबूती देने में मदद करेगा।

साथियों,

AI समिट का आयोजन पूरे भारत के लिए गौरव का पल था। लेकिन दुर्भाग्य से देश की सबसे पुरानी पार्टी ने, देश के इस उत्सव को मैला करने का प्रयास किया। विदेशी अतिथियों के सामने कांग्रेस ने सिर्फ कपड़े नहीं उतारे, बल्कि इसने कांग्रेस के वैचारिक दिवालिएपन को भी expose कर दिया है। जब नाकामी की निराशा-हताशा मन में हो, और अहंकार सिर चढ़कर बोलता हो, तब देश को बदनाम करने की ऐसी सोच सामने आती है। ज़ाहिर है, कांग्रेस की इस हरकत से देश में गुस्सा है। इसलिए, इन्होंने अपने पाप को सही ठहराने के लिए महात्मा गांधी जी को आगे कर दिया। कांग्रेस हर बार ऐसा ही करती है। जब अपने पाप को छुपाना हो तो कांग्रेस बापू को आगे कर देती है, और जब अपना गौरवगान करना हो, तो एक ही परिवार को सारा क्रेडिट देती है।

साथियों,

कांग्रेस अब विचारधारा के नाम पर केवल विरोध की टूलकिट बनकर रह गई है। और ये अंध-विरोध की मानसिकता इतनी बढ़ गई है, कि ये देश को हर मंच, हर प्लेटफॉर्म पर नीचा दिखाने से नहीं चूकते। देश कुछ भी अच्छा करे, देश के लिए कुछ भी शुभ हो रहा हो, कांग्रेस को विरोध ही करना है।

साथियों,

मेरे पास एक लंबी सूची है, देश की संसद की नई इमारत बनी, उसका विरोध। संसद के ऊपर अशोक स्तंभ के शेरों का विरोध। अब जिनके बब्बर शेर सामान्य नागरिकों के जूते खाकर के भाग रहे थे, उनके संसद भवन के शेर के दांत देखकर के डर लग गया उनको। कर्तव्य भवन बना, उसका भी विरोध। सेनाओं ने सर्जिकल स्ट्राइक की, उसका भी विरोध। बालाकोट में एयर स्ट्राइक हुई, उसका भी विरोध। ऑपरेशन सिंदूर हुआ, उसका भी विरोध। यानी देश की हर उपलब्धि पर कांग्रेस के टूलकिट से एक ही चीज निकलती है- विरोध।

साथियों,

देश ने आर्टिकल 370 की दीवार गिराई, देश खुश हुआ। लेकिन कांग्रेस ने विरोध किया। हमने CAA का कानून बनाया- उसका विरोध। हम महिला आरक्षण कानून लाए- उसका विरोध। तीन तलाक के विरुद्ध कानून लाए- उसका विरोध। हम UPI लेकर आए, उसका विरोध। स्वच्छ भारत अभियान लेकर आए, उसका विरोध। देश ने कोरोना वैक्सीन बनाई, तो उसका भी विरोध।

साथियों,

लोकतंत्र में विपक्ष का मतलब सिर्फ अंध-विरोध नहीं होता, डेमोक्रेसी में विपक्ष का मतलब वैकल्पिक विजन होता है। इसलिए देश की प्रबुद्ध जनता, कांग्रेस को सबक सिखा रही है, आज से नहीं, बीते चार दशकों से लगातार ये काम देश की जनता कर रही है। मैं जो कहने जा रहा हूं, मीडिया के साथी उसका भी ज़रा एनालिसिस करिएगा। आपको पता लगेगा कि कांग्रेस के वोट चोरी नहीं हो रहे, बल्कि देश के लोग अब कांग्रेस को वोट देने लायक ही नहीं मानते। और इसकी शुरुआत 1984 के बाद ही होनी शुरू हो गई थी। 1984 में कांग्रेस को 39 परसेंट वोट मिले थे, और 400 से अधिक सीटें मिली थीं। इसके बाद हुए चुनावों में कांग्रेस के वोट कम ही होते चले गए। और आज कांग्रेस की हालत ये है कि, देश में सिर्फ, सिर्फ चार राज्य ऐसे बचे हैं, जहां कांग्रेस के पास 50 से ज्यादा विधायक हैं। बीते 40 वर्षों में युवा वोटर्स की संख्या बढ़ती गई और कांग्रेस साफ होती गई। कांग्रेस, परिवार की गुलामी में डूबे लोगों का एक क्लब बनकर रह गई है। इसलिए पहले मिलेनियल्स ने कांग्रेस को सबक सिखाया, और अब जेन जी भी तैयार बैठी है।

साथियों,

कांग्रेस और उसके साथियों की सोच इतनी छोटी है, कि उन्होंने दूरदृष्टि से काम करने को भी गुनाह बना दिया है। आज जब हम विकसित भारत 2047 की बात करते हैं, तो कुछ लोग पूछते हैं— “इतनी दूर की बात अभी क्यों कर रहे हो?” कुछ लोग ये भी कहते हैं कि तब तक मोदी जिंदा थोड़ी रहेगा, सच्चाई यह है कि राष्ट्र निर्माण कभी भी तात्कालिक सोच से नहीं होता। वो एक बड़े विजन, धैर्य और समय पर लिए गए निर्णयों से होता है। मैं कुछ और तथ्य नेटवर्क 18 के दर्शकों के सामने रखना चाहता हूं। भारत हर साल विदेशी समुद्री जहाजों से मालढुलाई पर 6 लाख करोड़ रुपये से अधिक खर्च करता है किराए पर। फर्टिलाइजर के आयात पर हर साल सवा दो लाख करोड़ रुपये खर्च होते हैं। पेट्रोलियम आयात पर हर साल 11 लाख करोड़ रुपये खर्च होते हैं। यानी हर वर्ष लाखों करोड़ रुपये देश से बाहर जा रहे हैं। अगर यही निवेश 20–25 वर्ष पहले आत्मनिर्भरता की दिशा में किया गया होता, तो आज ये पूंजी भारत के इंफ्रास्ट्रचर, रिसर्च, इंडस्ट्री, किसान और युवाओं की क्षमताओं को मजबूत कर रही होती। आज हमारी सरकार इसी सोच के साथ काम कर रही है। विदेशी जहाजों को 6 लाख करोड़ रुपए ना देना पड़े इसलिए भारतीय शिपिंग और पोर्ट इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत किया जा रहा है। फर्टिलाइजर का domestic प्रोडक्शन बढ़ाने के लिए नए प्लांट लग रहे हैं, नैनो-यूरिया को बढ़ावा दिया जा रहा है। पेट्रोलियम पर निर्भरता कम करने के लिए एथेनॉल ब्लेंडिंग, ग्रीन हाइड्रोजन मिशन, सोलर और इलेक्ट्रिक मोबिलिटी को प्राथमिकता दी जा रही है।

और साथियों,

हमें भविष्य की ओर देखते हुए भी आज ही निर्णय लेने हैं। इसलिए आज भारत में सेमीकंडक्टर इकोसिस्टम का निर्माण हो रहा है। रक्षा उत्पादन में, मोबाइल मैन्युफैक्चरिंग में, ड्रोन टेक्नोलॉजी में, क्रिटिकल मिनरल्स सेक्टर में, और उसमें निवेश, आने वाले दशकों की आर्थिक सुरक्षा की नींव है। 2047 का लक्ष्य कोई राजनीतिक नारा नहीं है। यह उस ऐतिहासिक भूल को सुधारने का संकल्प भी है, जहाँ कांग्रेस की सरकारों के समय कई क्षेत्रों में समय रहते निवेश नहीं किया। आज अगर हम ख़ुद स्वदेशी जहाज, स्वदेशी शिप्स बनाएँगे, ख़ुद एनर्जी का प्रोडक्शन करेंगे, ख़ुद नई टेक्नोलॉजी डेवलप करेंगे, तो आने वाली पढ़ियाँ इम्पोर्ट के बोझ की नहीं, एक्सपोर्ट की क्षमता पर चर्चा करेंगी। राष्ट्र की प्रगति “आज की सुविधा” से नहीं, “कल की तैयारी” से तय होती है। और दूरदृष्टि से की गई मेहनत ही 2047 के आत्मनिर्भर, सशक्त और समृद्ध भारत की आधारशिला है। और इसके लिए कांग्रेस अपने कितने ही कपड़े फाड़ ले, हम निरंतर काम करते रहेंगे।

साथियों,

राष्ट्र निर्माण की, Nation Building की एक बहुत अहम शर्त होती है- नेक नीयत की। कांग्रेस और उसके साथी दल, इसमें भी फेल रहे हैं। कांग्रेस और उसके साथियों ने कभी नेक नीयत के साथ काम नहीं किया। गरीब का दुख, उसकी तकलीफ से भी इन्हें कोई वास्ता नहीं है। जैसे बंगाल में आज तक आयुष्मान भारत योजना लागू नहीं हुई। अगर नेक नीयत होती तो क्या गरीबों को 5 लाख रुपए तक मुफ्त इलाज देने वाली इस योजना को बंगाल में रोका जाता क्या? नहीं। आप भी जानते हैं कि देश में पीएम आवास योजना के तहत गरीबों के लिए पक्के घर बनवाए जा रहे हैं। नेटवर्क 18 के दर्शकों को मैं एक और आंकड़ा देता हूं। तमिलनाडु के गरीब परिवारों के लिए, करीब साढ़े नौ लाख पक्के घर एलोकेट किए गए हैं, साढ़े नौ लाख। लेकिन इनमें से तीन लाख घरों का निर्माण अटक गया है, क्यों, क्योंकि DMK सरकार गरीबों के इन घरों के निर्माण में दिलचस्पी नहीं दिखा रही। इसकी वजह क्या है? इसकी वजह है, नीयत नेक नहीं है।

साथियों,

मैं आपको एग्रीकल्चर सेक्टर का भी उदाहरण देता हूं। कांग्रेस के समय में खेती-किसानी को अपने हाल पर छोड़ दिया गया था। छोटे किसानों को कोई पूछता नहीं था, फसल बीमा का हाल बेहाल था, MSP पर स्वामीनाथन कमेटी की रिपोर्ट फाइलों में दबा दी गई थी, कांग्रेस बजट में घोषणाएं जरूर करती थी, लेकिन ज़मीन पर कुछ नहीं होता था, क्योंकि उसकी नीयत ही नहीं थी। हमने देश के किसानों के लिए नेक नीयत के साथ काम करना शुरू किया, और आज उसके परिणाम दुनिया देख रही है। आज भारत दुनिया के बड़े एग्रीकल्चर एक्सपोर्टर्स में से एक बन रहा है। हमने हर स्तर पर किसानों के लिए एक सुरक्षा कवच बनाया है। पीएम किसान सम्मान निधि के माध्यम से किसानों के खाते में चार लाख करोड़ रुपए से अधिक जमा किए गए हैं। हमने लागत का डेढ़ गुणा MSP तय किया और रिकॉर्ड खरीद भी की है। मैं आपको सिर्फ दाल का ही आंकड़ा देता हूं। UPA सरकार ने 10 साल में सिर्फ 6 लाख मीट्रिक टन दाल, किसानों से MSP पर खरीदी- 6 लाख मीट्रिक टन। और हमारी सरकार अभी तक, करीब 170 लाख मीट्रिक टन, यानी लगभग 30 गुणा अधिक दाल MSP पर खरीद चुकी है। अब आप तय करिये, कौन किसानों के लिए काम करता है।

साथियों,

यूपीए सरकार किसान क्रेडिट कार्ड के जरिए भी किसानों को मदद देने में कंजूसी करती थी। अपने 10 साल में यूपीए सरकार ने सात लाख करोड़ रुपए का कृषि ऋण किसानों को दिया। 7 lakh crore rupees. जबकि हमारी सरकार इससे चार गुणा अधिक यानी 28 लाख करोड़ रुपए दे चुकी है। यूपीए सरकार के दौरान जहां सिर्फ पांच करोड़ किसानों को इसका लाभ मिलता था, आज ये संख्या दोगुने से भी अधिक करीब-करीब 12 करोड़ किसानों को पहुंची है। यानी देश के छोटे किसान को भी पहली बार मदद मिली है। हमारी सरकार ने पीएम फसल बीमा योजना का सुरक्षा कवच भी किसानों को दिया। इसके तहत करीब 2 लाख करोड़ रुपए किसानों को संकट के समय मिल चुके हैं। हम नेक नीयत से काम कर रहे हैं, इसलिए भारत के किसानों का आत्मविश्वास बढ़ रहा है, उनकी प्रोडक्टिविटी बढ़ रही है, और आय में भी वृद्धि हो रही है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। अब अगला चरण भारत के विकास का निर्णायक दौर है। वर्तमान में लिए गए निर्णय ही भविष्य की दिशा तय करेंगे। हमें अपने सामर्थ्य को पहचानते हुए, उसे बढ़ाते हुए आगे चलना है। हर व्यक्ति अपने क्षेत्र में श्रेष्ठता को लक्ष्य बनाए, हर संस्था excellence को अपना संस्कार बनाए, हम सिर्फ उत्पाद न बनाएं, best-quality product बनाएं, हम सिर्फ रुटीन काम न करें, world-class काम करें, हम क्षमता को performance में बदलें। मैंने लाल किले से कहा है- यही समय है, सही समय है। यही समय है, भारत को नई ऊँचाइयों पर ले जाने का। एक बार फिर आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं, बहुत-बहुत धन्यवाद। नमस्कार।