आजच्या दिवशी देशाला सरदार पटेल यांच्या पोलादी इच्छाशक्तीचे झळाळते उदाहरण दिसले, जेव्हा भारतीय लष्कराने हैदराबादला अनन्वित अत्याचारांपासून मुक्ती मिळवून दिली आणि भारताला पुन्हा एकदा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
'माँ भारती'चा सन्मान, अभिमान आणि गौरव, यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही: पंतप्रधान
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ ही मोहीम आपल्या माता भगिनींसाठी समर्पित – पंतप्रधान
गरिबांची सेवा हेच माझ्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे: पंतप्रधान
सरकार वस्त्रोद्योगासाठी फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन, या 5F दृष्टीकोनाच्या वचनबद्धतेने काम करत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
‘मेक इन इंडिया’ च्या यशामागे विश्वकर्मा बंधू आणि भगिनी ही मोठी शक्ती असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
विकासाच्या प्रवासात जे मागे राहिले आहेत त्यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे: पंतप्रधान

भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!

नर्मदा मैया की जय! नर्मदा मैया की जय! नर्मदा मैया की जय!

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

मी ज्ञानाची देवी आणि धार भोजशालाच्या वाग्देवी मातेच्या चरणी वंदन करतो. आज कौशल्य आणि निर्मितीची देवता भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. मी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन करतो. आपल्या कौशल्याद्वारे राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींना देखील मी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन करतो.

मित्रहो,

धारची ही भूमी नेहमीच पराक्रमाची भूमी राहिली आहे. प्रेरणेची भूमी राहिली आहे. महाराजा भोज यांचे शौर्य आपल्याला… बहुधा तिथे एकतर ऐकू येत नाही किंवा दिसत नाही. अरे तुम्ही कितीही दूर असेनात का, तुमच्या मनातील गोष्ट मला तर समजते. इथले जे तंत्रज्ञ आहेत, ते जर त्यांना काही मदत करू शकत असतील तर करा, तसेही हे मध्य प्रदेशचे लोक आहेत, अतिशय शिस्तबद्ध असतात. गैरसोय असेल तरीही सहन करण्याचा स्वभाव मध्य प्रदेशचा आहे आणि इथेही मला त्याचे दर्शन होत आहे.

 

मित्रहो,

महाराजा भोज यांचे शौर्य आपल्याला देशाच्या गौरवाच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण देते. महर्षी दधीची यांचे बलिदान आपल्याला मानवतेची सेवा करण्याचा संकल्प देते. या वारशापासून प्रेरणा घेत, आज देश भारतमातेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या भगिनी आणि मुलींचे कुंकू पुसले होते, आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट केले. आपल्या वीर जवानांनी पाकिस्तानला क्षणार्धात गुडघे टेकायला भाग पाडले. आता कालच देशाने आणि जगाने पाहिले की आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत रडत आपली कथा सांगितली.
मित्रहो,

हा नवा भारत आहे, जो कोणाच्याही अणु युद्धाच्या धमक्यांना घाबरत नाही, हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो.
मित्रहो,

आज 17 सप्टेंबर हा एक ऐतिहासिक दिवस आहे, आजच्याच दिवशी देश सरदार पटेल यांच्या पोलादी दृढनिश्चयाचा साक्षीदार बनला होता. आजच्या दिवशी भारतीय लष्कराने हैदराबादला अनन्वित अत्याचारांपासून मुक्त केले, त्यांच्या अधिकारांचे रक्षण करून भारताचा गौरव पुन: प्रस्थापित केला होता.  देशाच्या या अभूतपूर्व कामगिरीचा आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचा, अनेक दशके लोटली, कुणी आठवण काढणारे नव्हते, मात्र तुम्ही मला संधी दिली, आमच्या सरकारने 17 सप्टेंबर, सरदार पटेल, हैदराबादची घटना, यांना अमर केले आहे. आम्ही भारताच्या एकतेचे प्रतीक असलेला हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे; आणि आज हैदराबादमध्ये मोठ्या उत्साहात मुक्ती दिनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जात आहे. हैदराबाद मुक्ती दिन आपल्याला प्रेरणा देतो, भारतमातेचा सन्मान, अभिमान आणि गौरवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही, आपण जगायचे देशासाठी, आपला प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित असायला हवा.

 

मित्रहो,

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घेऊन आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले होते. त्या सर्वांचे स्वप्न होते- ‘विकसित भारत’, त्यांची इच्छा होती भारताने  गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होऊन वेगाने पुढे जावे. आज, यापासून प्रेरित होऊन, आपण भारतातील 140 कोटी लोकांनी, विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे; आणि विकसित भारताच्या या प्रवासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत- भारताची नारीशक्ती, युवाशक्ती, गरीब आणि शेतकरी. आज, या कार्यक्रमात विकसित भारताच्या या चारही स्तंभांना नवी बळकटी देण्याचे काम झाले आहे. इथे मोठ्या संख्येने माझ्या माता, बहिणी आणि मुली आल्या आहेत. आजच्या कार्यक्रमात नारीशक्तीकडे खूप लक्ष देण्यात आले आहे. हा कार्यक्रम धार येथे होत आहे, मात्र हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी होत आहे, देशभरात होत आहे, संपूर्ण देशातील माता-भगिनींसाठी होत आहे. या व्यासपीठावरून 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या महा अभियानाचा परत होत आहे. देवी वाग्देवीच्या आशीर्वादाने याहून मोठे काम काय असू शकते.

मित्रहो,

देशभरात विविध टप्प्यांमध्ये ‘आदि  सेवा पर्व’चे पडसाद ऐकू येत आहेत. आजपासून याचे मध्य प्रदेश पर्व देखील सुरु होत आहे. हे अभियान धारमधील आदिवासी समुदायांसह मध्य प्रदेशातील आदिवासी समुदायांना विविध सरकारी योजनांशी थेट जोडण्याचा एक सेतू बनेल.
 
मित्रहो,

आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त एक मोठा औद्योगिक उपक्रमही सुरु होत आहे. देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कची पायाभरणी येथे करण्यात आली. हे पार्क देशातील वस्त्रोद्योगाला नवीन उभारी देईल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळेल आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की केवळ धारमध्येच नाही तर देशभरातील लाखो शेतकरी आता या कार्यक्रमात आपल्याबरोबर जोडले गेले आहेत.

 

मित्रहो,

या पीएम मित्र पार्क, या टेक्सटाईल पार्कचा सर्वात मोठा लाभ म्हणजे युवक आणि युवतींना खूप मोठ्या संख्येने रोजगार मिळेल. या प्रकल्पांसाठी आणि अभियानांसाठी मी माझ्या सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. मध्य प्रदेशचे मी विशेष अभिनंदन करतो.

मित्रहो,

आपल्या माता आणि भगिनी, आपली नारी शक्ती देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहेत. आपण सगळे पाहतो, घरात जर माता निरोगी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहते, परंतु मित्रांनो, जर ती आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. म्हणूनच ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ हे अभियान माता-भगिनींसाठी समर्पित आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आहे. माहिती किंवा संसाधनांच्या अभावी एकही महिला गंभीर आजाराला बळी पडू नये हे आमचे ध्येय आहे. असे अनेक आजार आहेत जे गुपचूप येतात आणि निदान न झाल्यामुळे ते हळूहळू खूप गंभीर बनतात, जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरू होतो. महिलांसाठी सर्वात धोकादायक असलेल्या अशा आजारांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच या अभियानाअंतर्गत रक्तदाब आणि मधुमेहापासून ते अशक्तपणा, क्षयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता असेल तर तपासणी केली जाईल. 
आणि देशभरातील माझ्या माता आणि भगिनींनो, तुम्ही नेहमीच मला खूप काही दिले आहे. तुमचे आशीर्वाद माझे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. देशभरातील कोट्यवधी माता-भगिनी मला नेहमीच भरघोस आशीर्वाद देत आल्या आहेत. मात्र माता-भगिनींनो, आज 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिनी मी तुमच्याकडे काही मागायला आलो आहे, देशभरातील माता-भगिनींकडे आज काही मागायला आलो आहे. मातांनो आणि भगिनींनो, जरा मला सांगा, तुम्ही मला देणार की नाही? जरा हात वर उंचावून सांगा, वाह, सर्वांचे हात उंचावले जात आहेत, मी तुमच्याकडे हेच मागतो की तुम्ही संकोच न बाळगता या शिबिरांमध्ये जाऊन अवश्य तपासणी करून घ्या. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, मी तुमच्याकडे एवढं तर मागू शकतो ना? माझे तुम्हाला फक्त एवढेच सांगणे आहे की, या आरोग्य शिबिरांमध्ये, या सर्व चाचण्या कितीही महागड्या असल्या तरी, तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

तपासणी मोफत असेल, आणि एवढेच नाही तर औषधही मोफत असेल. सरकारी तिजोरीपेक्षा तुमच्या चांगल्या आरोग्याचे मोल अधिक आहे. ही तिजोरी तुमच्यासाठी, माता आणि भगिनींसाठी आहे. आणि आयुष्मान कार्डचे सुरक्षा कवच तुमच्या पुढील उपचारांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

या मोहिमेचा प्रारंभ आज होत असून ती विजयी होण्याच्या संकल्पाने 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत म्हणजे दोन आठवडे चालेल. मी पुन्हा एकदा देशभरातील माता, भगिनी आणि मुलींना आवाहन करतो: तुम्ही नेहमीच तुमच्या कुटुंबाची काळजी करत असता. कृपया तुमच्या आरोग्यासाठी देखील थोडा वेळ काढा. शक्य तितक्या संख्येने या शिबिरांना भेट द्या; लाखो शिबिरे भरवण्यात येणार आहेत. आजही, काही  शिबिरांमध्ये, लोकांनी स्वतःची तपासणी करून घेण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या परिसरातील इतर महिलांसोबत ही माहिती नक्की सामायिक करा. आणि प्रत्येक माता, भगिनींना सांगा की आमचे मोदीजी धार येथे आले होते, आपला पुत्र, आपला बंधू धार येथे आला होता आणि त्याने आम्हाला चाचणी करण्यास सांगितले. सर्वांना नक्की सांगा. कोणतीही माता, लेक या तपासणीपासून वंचित राहणार नाही असा आपण संकल्प केला पाहिजे. 

मित्रहो,

माता, भगिनी आणि मुलींचे आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे. गर्भवती महिला आणि मुलींना योग्य पोषण मिळावे यासाठी आमचे सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. आज आपण आठवा राष्ट्रीय पोषण महिना सुरू करत आहोत. विकसनशील भारतात, आपण माता आणि बालमृत्यू दर शक्य तितका कमी केला पाहिजे. यासाठी, आम्ही 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर बँक खात्यात थेट पाच हजार रुपये आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा हजार रुपये बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत, साडे चार कोटी गर्भवती मातांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि आतापर्यंत, 19 हजार कोटींहून अधिक रुपये - काही लोकांना कदाचित या आकड्याचा अर्थ काय हे देखील समजणार नाही - माझ्या माता आणि भगिनींच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत. आज, फक्त एका क्लिकवर, जे आत्ता मी येथे क्लिक केल्यावर 15 लाखांहून अधिक गर्भवती मातांना मदत पाठवण्यात आली आहे. आज, याच धार भूमीतून त्यांच्या खात्यात 450 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत.

 

मित्रहो,

आज, मी मध्य प्रदेशमधून आणखी एका मोहिमेवर चर्चा करू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे, सिकलसेल अॅनिमिया हे आपल्या आदिवासी भागात एक मोठे संकट आहे. आमचे सरकार आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना या आजारापासून वाचवण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान राबवत आहे. आम्ही 2023 मध्ये मध्य प्रदेशातील शहडोल मधून या अभियानाचा प्रारंभ केला होता. आणि शहडोलमध्येच आम्ही पहिले सिकलसेल स्क्रीनिंग कार्ड वाटप केले होते. आणि आज मध्य प्रदेशात 1 कोटी वे सिकलसेल स्क्रीनिंग कार्ड वाटप करण्यात आले. नुकतेच मंचावर आलेल्या या कन्येला दिलेले कार्ड हे 1 कोटी वे कार्ड होते आणि मी मध्य प्रदेशबद्दल बोलत आहे. आतापर्यंत, या मोहिमेअंतर्गत देशभरात 5 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सिकलसेल स्क्रीनिंगमुळे आपल्या आदिवासी समुदायातील लाखो लोकांचे जीव वाचले आहेत आणि अनेकांना कदाचित याची माहिती नसेल.

मित्रहो,

आपण ज्या कामाचा पाठपुरावा करत आहोत ते भावी पिढ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल. ज्यांनी अद्याप जन्म घेतला नाही त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत, कारण जर सध्याची पिढी निरोगी झाली तर त्यांच्या भावी मुलांच्या आरोग्याची हमी मिळेल. मी विशेषतः आपल्या आदिवासी माता आणि भगिनींना सिकलसेल अॅनिमियाची चाचणी करून घेण्याचे आवाहन करतो.

मित्रहो,

माता आणि भगिनींचे जीवन सुलभ करून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी माझा सतत प्रयत्न राहिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेली कोट्यवधी शौचालये, उज्ज्वला योजनेद्वारे कोट्यवधी मोफत गॅस कनेक्शन, प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना या सर्वांमुळे माता आणि भगिनींच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या आहेत आणि त्यांचे आरोग्य सुधारले आहे. आणि इथे इतक्या मोठ्या संख्येने पुरुषवर्ग आहे, तुमच्या कुटुंबातही एक आई, एक बहीण आणि एक मुलगी आहे. मी माझ्या या बंधूंनाही मला सहकार्य करून माता, भगिनी आणि मुलींची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करतो. 

 

मित्रहो,

जगभरातील लोक जेव्हा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची इतकी मोठी आकडेवारी ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. मित्रहो, कोरोनाच्या कठीण काळात मोफत रेशन योजनेने गरीब मातांच्या चुलीची धग कायम राहिली. या योजनेअंतर्गत अजूनही मोफत धान्य वाटप केले जात आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतही, लाखो घरे देण्यात आली आहेत त्यापैकी बहुतेक घरे महिलांच्या नावे आहेत.

मित्रहो,

आपले सरकार आपल्या भगिनी आणि लेकींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरही भर देते. आपल्या लाखो भगिनी नवीन व्यवसाय, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेत आहेत.

मित्रहो,

आमचे सरकार गावांमध्ये राहणाऱ्या 3 कोटी ग्रामीण महिला, माता आणि भगिनींना लखपती दीदी बनवण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की या मोहिमेला इतके यश मिळाले आहे की इतक्या कमी वेळात जवळजवळ 2 कोटी भगिनी लखपती दीदी बनल्या आहेत. बँक सखी आणि ड्रोन दीदींद्वारे महिलांना सक्षम करून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणत आहोत. बचत गटांच्या माध्यमातून महिला नवीन क्रांती घडवत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या 11 वर्षांपासून गरिबांचे कल्याण, गरिबांची सेवा आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जेव्हा गरीब गरिबीमुक्त होऊन वेगाने प्रगती करतील तेव्हाच देशाची प्रगती होईल असा आमचा विश्वास आहे. आणि गरिबांची सेवा करणे कधीही व्यर्थ जात नाही हे आम्ही अनुभवले आहे. फक्त थोड्याशा पाठिंब्याने आणि मदतीमुळे गरिबांना त्यांच्या कठोर परिश्रमातून समुद्र पार करण्याचे धाडस मिळते. मी गरिबांच्या या भावना वैयक्तिकरित्या अनुभवल्या आहेत. म्हणून, गरिबांचे दुःख हे माझे स्वतःचे दुःख आहे. गरिबांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. म्हणूनच आपले सरकार गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सतत योजना आखत आहे आणि त्या अंमलात आणत आहे.

 

मित्रहो,

सातत्यपूर्ण, समर्पित वृत्तीने आणि शुद्ध अंतःकरणाने काम केल्यामुळे, आपल्या धोरणांचे फलित आज जगासमोर आहे. येथे बसलेल्या प्रत्येकाला अभिमान असेल की गेल्या 11 वर्षांच्या अथक आणि कठोर परिश्रमांमुळे देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यमुक्त झाले आहेत. आपल्या संपूर्ण समाजाला एक नवीन आत्मविश्वास मिळाला आहे.

मित्रहो,

आपल्या सरकारचे हे प्रयत्न केवळ योजना नाहीत; तर गरीब माता, भगिनी आणि लेकींचे जीवन बदलण्याची मोदींची हमी आहे. गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, माता आणि भगिनींच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, ही माझी पूजा आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे.

मित्रहो,

मध्य प्रदेशात माहेश्वरी वस्त्रांची दीर्घ परंपरा आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांनी माहेश्वरी साडीला नवा आयाम दिला. अलीकडेच आपण अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी केली. आता धार येथील ‘पीएम मित्र पार्क’च्या माध्यमातून आपण एकप्रकारे देवी अहिल्याबाईंचा वारसा पुढे नेत आहोत. पीएम मित्र पार्कमध्ये विणकामासाठी आवश्यक सामान, जसे की कापूस आणि रेशीम, सहज उपलब्ध होईल. गुणवत्ता तपासणी सुलभ होईल. बाजारापर्यंतची पोहोच वाढेल. येथे सूत कताई होईल, इथेच डिझाइनिंग होईल, इथेच प्रक्रिया होईल आणि इथूनच निर्यात होईल. याचा अर्थ जगाच्या बाजारातही माझ्या धारचे नाव पोहोचणार आहे. याचा अर्थ आता कापड उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. वस्त्रोद्योगासाठी आमचे सरकार ‘5 एफ व्हिजन’वर काम करत आहे, 5 एफ म्हणजे पहिले फार्म (शेत), दुसरे फायबर (सूत), तिसरे फॅक्टरी (कारखाना), चौथे फॅशन, आणि म्हणूनच फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेनपर्यंत (परदेश) हा प्रवास जलद आणि सहजपणे पूर्ण होईल.

 

मित्रहो,

मला सांगण्यात आले आहे की, धारमधल्या या पीएम मित्र पार्कमध्ये सुमारे 1,300 एकर जमीन, 80 हून अधिक युनिट्सना वितरितदेखील करण्यात आली आहे. म्हणजे येथे आवश्यक पायाभूत सुविधा आणि कारखान्याचे बांधकाम दोन्ही एकाच वेळी होतील. या पार्कमध्ये रोजगाराच्या 3 लाख नवीन संधी देखील निर्माण होतील, आणि याचा लॉजिस्टिक्स खर्चावर मोठा परिणाम होईल. पीएम मित्र पार्कमुळे सामान इकडून तिकडे नेण्याचा खर्च कमी होईल, निर्मिती खर्च कमी होईल आणि आमची उत्पादने स्वस्त आणि जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक होतील. म्हणूनच, मी मध्य प्रदेशातील जनतेचे, विशेषतः माझ्या शेतकरी बंधू-भगिनींचे आणि तरुणतरुणींचे पीएम मित्र पार्कसाठी खूप खूप अभिनंदन करतो. आमचे सरकार देशात असे आणखी 6 पीएम मित्र पार्क बांधणार आहे.

मित्रहो,

आज देशभरात विश्वकर्मा पूजेचा उत्सवही साजरा होत आहे. त्याचसोबत ही पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाचा आनंद साजरा करण्याची वेळ आहे. 

देशभरातील माझ्या विश्वकर्मा बंधू आणि भगिनींचे, ज्यात सुतार, लोहार, सोनार, कुंभार, काष्ठकार, गवंडी, कांस्यकार, ताम्रकार आणि हस्तकौशल्यातून अद्भुत कारागिरी करणारे, असे अनेक लोक समाविष्ट आहेत, त्यांचे मी विशेष अभिनंदन करू इच्छितो. ‘मेक इन इंडिया’ची सर्वात मोठी ताकद तुम्हीच आहात. गाव असो वा शहर, तुम्ही निर्माण केलेल्या उत्पादनांद्वारे आणि तुमच्या कलेद्वारे दैनंदिन गरजा पूर्ण होतात. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेने इतक्या कमी वेळात 30 लाखांहून अधिक कारागिरांना मदत केली आहे, याबद्दल मला समाधान आहे. या योजनेद्वारे त्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळाले आणि ते डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक साधनांशी जोडले गेले. 6 लाखांहून अधिक विश्वकर्मा मित्रांना नवीन उपकरणे देण्यात आली. आतापर्यंत विश्वकर्मा बंधू आणि भगिनींपर्यंत 4 हजार कोटींहून अधिक कर्ज पोहोचले आहे.

 

मित्रहो,

पीएम विश्वकर्मा योजनेचा सर्वात मोठा लाभ, दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या समाजातल्या घटकांना झाला आहे. आपल्या गरीब विश्वकर्मा बंधू-भगिनींकडे कौशल्य तर होते, परंतु मागील सरकारांकडे त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही योजना नव्हती, त्यांचे जीवन सुधारण्यासाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही त्यांच्या प्रतिभेला त्यांच्या प्रगतीचे माध्यम बनवण्यासाठीचे मार्ग खुले केले. म्हणूनच मी म्हणतो- जे मागास आहेत त्यांना आमचे प्राधान्य आहे.

मित्रहो,

आपले धार हे पूज्य कुशाभाऊ ठाकरे यांची जन्मभूमी आहे. त्यांनी राष्ट्र प्रथम या भावनेने आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले. मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्र प्रथम ही भावना देशाला नव्या  उंचीवर नेण्याची प्रेरणा आहे.

मित्रहो,

हा सणांचा काळ आहे, आणि या काळात तुम्हाला स्वदेशीचा मंत्र जागर सातत्याने करायचा आहे, तो तुमच्या जीवनात अंगीकारायचा आहे. तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे, 140 कोटी देशवासियांना माझी विनंती आहे, तुम्ही जे काही खरेदी कराल ते देशातच तयार केलेले असावे. तुम्ही जे काही खरेदी कराल त्यात कुठल्या ना कुठल्या भारतीयाचे कष्ट असावेत. तुम्ही जे काही खरेदी कराल त्यात मातीचा सुगंध माझ्या हिंदुस्थानच्या मातीचा असावा आणि आज मी माझ्या व्यापारी बांधवांना आग्रह करू इच्छितो की, तुम्हीही देशासाठी मला मदत करा, देशासाठी मला साथ द्या आणि मला तुमची मदत देशासाठी हवी आहे, कारण मला 2047 पर्यंत विकसित भारत घडवायचाच आहे; आणि त्याचा मार्ग आत्मनिर्भर भारताद्वारे आहे. म्हणून, माझ्या सर्व लहानमोठ्या, सर्व व्यापारी बंधू-भगिनींनो, तुम्ही जे काही विकता ते आपल्या देशातच तयार झालेले असायला हवे. महात्मा गांधींनी स्वदेशीला स्वातंत्र्याचे माध्यम बनवले होते. आता आपल्याला स्वदेशीला विकसित भारताचा पाया बनवायचे आहे. आणि हे कसे घडेल? हे तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या देशात बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगू. आपण खरेदी करणार असलेली कुठलीही वस्तू, अगदी लहान वस्तूदेखील, मुलांसाठी खेळणी, दिवाळीच्या मूर्ती, घर सजवण्यासाठीच्या वस्तू किंवा मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसारखी कोणतीही मोठी वस्तू, आपण प्रथम ती आपल्या देशात बनवली आहे का ते तपासले पाहिजे. त्यात माझ्या देशबांधवांच्या कष्टाचा सुगंध आहे का? कारण, जेव्हा आपण स्वदेशी गोष्ट खरेदी करतो तेव्हा आपले पैसे देशातच राहतात. आपले पैसे परदेशात जाण्यापासून वाचतात. तेच पैसे पुन्हा देशाच्या विकासासाठी वापरले जातात. त्या पैशातून रस्ते बांधले जातात, गावातील शाळा बांधल्या जातात, गरीब विधवा मातांना मदत मिळते, प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधली जातात, तेच पैसे गरीब कल्याण योजनांसाठी वापरले जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात. माझ्या मध्यमवर्गीय बंधू-भगिनींची स्वप्ने, माझ्या मध्यमवर्गीय तरुणांची स्वप्ने, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धनाची आवश्यकता आहे आणि या छोट्याछोट्या गोष्टी करून आपण हे साध्य करू शकतो. जेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी देशातच तयार होतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारा रोजगार देखील आपल्या देशवासियांना मिळतो.

म्हणूनच, आता जेव्हा 22 सप्टेंबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, जीएसटीचे कमी दरही लागू होत असताना आपल्याला स्वदेशी उत्पादनेच खरेदी करून त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्याला एक मंत्र लक्षात ठेवायाचा आहे आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येक दुकानावर तो लिहून ठेवलेला असावा. मी राज्य सरकारलाही सांगेन, मोहीम चालवा. प्रत्येक दुकानावर एक फलक असावा, गर्व से कहो- ये स्वदेशी है! (अभिमानाने सांगा-हे स्वदेशी आहे). माझ्यासोबत नारा द्याल? तुम्ही सर्व माझ्यासोबत म्हणाल? मी म्हणेन, "गर्व से कहो, तुम्ही म्हणाल, "ये स्वदेशी है." गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है।

मित्रहो,

याच भावनेसह, तुम्हाला पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाचा समारोप करतो. म्हणा- भारतमाता की जय. भारतमाता की जय. भारतमाता की जय. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
38 Per Cent Women In Rural And Semi-Urban Use UPI Weekly For Daily Essentials: Survey

Media Coverage

38 Per Cent Women In Rural And Semi-Urban Use UPI Weekly For Daily Essentials: Survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The government places great emphasis on bringing a 'technology culture' to agriculture: PM Modi
March 06, 2026
This year’s Union Budget gives a strong push to agriculture and rural transformation : PM
Government has continuously strengthened the agriculture sector ,major efforts have reduced the risks for farmers and provided them with basic economic security: PM
If we scale high-value agriculture together, it will transform agriculture into a globally competitive sector: PM
As export-oriented production increases, employment will be created in rural areas through processing and value addition: PM
Fisheries can become a major platform for export growth, a high-value, high-impact sector of rural prosperity: PM
The government is developing digital public infrastructure for agriculture through AgriStack: PM
Technology delivers results when systems adopt it, institutions integrate it, and entrepreneurs build innovations on it: PM

नमस्कार !

बजट वेबिनार सीरीज के तीसरे वेबिनार में, मैं आप सभी का अभिनंदन करता हूं। इससे पहले, टेक्नोलॉजी, रिफॉर्म्स और इकोनॉमिक ग्रोथ जैसे अहम विषयों पर दो वेबिनार हो चुके हैं। आज, Rural Economy और Agriculture जैसे अहम सेक्टर पर चर्चा हो रही है। आप सभी ने बजट निर्माण में अपने मूल्यवान सुझावों से बहुत सहयोग दिया, और आपने देखा होगा बजट में आप सबके सुझाव रिफ्लेक्ट हो रहे हैं, बहुत काम आए हैं। लेकिन अब बजट आ चुका है, अब बजट के बाद उसके full potential का लाभ देश को मिले, इस दिशा में भी आपका अनुभव, आपके सुझाव और सरल तरीके से बजट का सर्वाधिक लोगों को लाभ हो। बजट का पाई-पाई पैसा जिस हेतु से दिया गया है, उसको परिपूर्ण कैसे करें? जल्द से जल्द कैसे करें? आपके सुझाव ये वेबिनार के लिए बहुत अहम है।

साथियों,

आप सभी जानते हैं, कृषि, एग्रीकल्चर, विश्वकर्मा, ये सब हमारी अर्थव्यवस्था का मुख्य आधार है। एग्रीकल्चर, भारत की लॉन्ग टर्म डेवलपमेंट जर्नी का Strategic Pillar भी है, और इसी सोच के साथ हमारी सरकार ने कृषि सेक्टर को लगातार मजबूत किया है। करीब 10 करोड़ किसानों को 4 लाख करोड़ रुपए से अधिक की पीएम किसान सम्मान निधि मिली है। MSP में हुए Reforms से अब किसानों को डेढ़ गुना तक रिटर्न मिल रहा है। इंस्टिट्यूशनल क्रेडिट कवरेज 75 प्रतिशत से अधिक हो चुका है। पीएम फसल बीमा योजना के तहत लगभग 2 लाख करोड़ रुपए के क्लेम सेटल किए गए हैं। ऐसे अनेक प्रयासों से किसानों का रिस्क बहुत कम हुआ है, और उन्हें एक बेसिक इकोनॉमिक सिक्योरिटी मिली है। इससे कृषि क्षेत्र का आत्मविश्वास भी बढ़ा है। आज खाद्यान्न और दालों से लेकर तिलहन तक देश रिकॉर्ड उत्पादन कर रहा है। लेकिन अब, जब 21वीं सदी का दूसरा क्वार्टर शुरू हो चुका है, 25 साल बीत चुके हैं, तब कृषि क्षेत्र को नई ऊर्जा से भरना भी उतना ही आवश्यक है। इस साल के बजट में इस दिशा में नए प्रयास हुए हैं। मुझे विश्वास है, इस वेबिनार में आप सभी के बीच हुई चर्चा, इससे निकले सुझाव, बजट प्रावधानों को जल्द से जल्द जमीन पर उतारने में मदद करेंगे।

साथियों,

आज दुनिया के बाजार खुल रहे हैं, ग्लोबल डिमांड बदल रही है। इस वेबिनार में अपनी खेती को एक्सपोर्ट ओरिएंटेड बनाने पर भी ज्यादा से ज्यादा चर्चा आवश्य़क है। हमारे पास Diverse Climate है, हमें इसका पूरा फायदा उठाना है। एग्रो क्लाइमेटिक जोन, उस विषय में हम बहुत समृद्ध है। इस साल का बजट इन सब बातों के लिए अनगिनत नए अवसर देने वाला बजट है। प्रोडक्टिविटी बढ़ाने की दिशा तय करता है, और एक्सपोर्ट स्ट्रेंथ को बढ़ावा देता है। बजट में हमने high value agriculture पर फोकस किया है। नारियल, काजू, कोको, चंदन, ऐसे उत्पादों के regional-specific promotion की बात कही है, और आपको मालूम है, दक्षिण के हमारे जो राज्य हैं खासकर केरल है, तमिलनाडु है, नारियल की पैदावार बहुत करते हैं। लेकिन अब वो क्रॉप, वो सारे पेड़ इतने पुराने हो चुके हैं कि उसकी वो क्षमता नहीं रही है। केरल के किसानों को अतिरिक्त लाभ हो, तमिलनाडु के किसानों को अतिरिक्त लाभ हो। इसलिए इस बार कोकोनट पर एक विशेष बल दिया गया है, जिसका फायदा आने वाले दिनों में हमारे इन किसानों को मिलेगा।

साथियों,

नॉर्थ ईस्ट की तरफ देखें, अगरवुड बहुत कम लोगों को मालूम है, जो ये अगरबत्ती शब्द है ना, वो अगरवुड से आया हुआ है। अब हिमालयन राज्यों में टेम्परेट नट क्रॉप्स, और इन्हें बढ़ावा देने का प्रस्ताव बजट में रखा गया है। जब एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन बढ़ेगा, तो ग्रामीण क्षेत्रों में प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन के जरिए रोजगार सृजन होगा। इस दिशा में एक coordinated action कैसे हो, आप सभी स्टेकहोल्डर्स मिलकर जरूर मंथन करें। अगर हम मिलकर High Value Agriculture को स्केल करते हैं, तो ये एग्रीकल्चर को ग्लोबली कंपेटिटिव सेक्टर में बदल सकता है। एग्री experts, इंडस्ट्री और किसान एक साथ कैसे आएं, किसानों को ग्लोबल मार्केट से जोड़ने के लिए किस तरह से गोल्स सेट किए जाएं, क्वालिटी, ब्रांडिंग और स्टैंडर्ड्स, ऐसे हर पहलू, इन सबको कैसे प्रमोट किया जाए, इन सारे विषयों पर चर्चा, इस वेबिनार को, इसके महत्व को बढ़ाएंगे। मैं एक और बात आपसे कहना चाहूंगा। आज दुनिया हेल्थ के संबंध में ज्यादा कॉनशियस है। होलिस्टिक हेल्थ केयर और उसमें ऑर्गेनिक डाइट, ऑर्गेनिक फूड, इस पर बहुत रुचि है। भारत में हमें केमिकल फ्री खेती पर बल देना ही होगा, हमें नेचुरल फार्मिंग पर बल देना होगा। नेचुरल फार्मिंग से, केमिकल फ्री प्रोडक्ट से दुनिया के बाजार तक पहुंचने में हमारे लिए एक राजमार्ग बन जाता है। उसके लिए सर्टिफिकेशन, लेबोरेटरी ये सारी व्यवस्थाएं सरकार सोच रही है। लेकिन आप लोग इसमें भी जरूर अपने विचार रखिए।

साथियों,

एक्सपोर्ट बढ़ाने में एक बहुत बड़ा फैक्टर फिशरीज सेक्टर का पोटेंशियल भी है। भारत दुनिया का दूसरा सबसे बड़ा मछली उत्पादक देश भी है। आज हमारे अलग-अलग तरह के जलाशय, तालाब, ये सब मिलाकर लगभग 4 लाख टन मछली उत्पादन होता है। जबकि इसमें 20 लाख टन अतिरिक्त उत्पादन की संभावना मौजूद है। अब विचार कीजिए आप, 4 लाख टन से हम अतिरिक्त 20 लाख टन जोड़ दें, तो हमारे गरीब मछुआरे भाई-बहन हैं, उनकी जिंदगी कैसी बदल जाएगी। हमारे पास Rural Income को डायवर्सिफाई करने का अवसर है। फिशरीज एक्सपोर्ट ग्रोथ का बड़ा प्लेटफॉर्म बन सकता है, दुनिया में इसकी मांग है। इस वेबिनार से अगर बहुत ही प्रैक्टिकल सुझाव निकलते हैं, तो कैसे रिज़रवॉयर, उसकी पोटेंशियल की सटीक मैपिंग की जाए, कैसे क्लस्टर प्लानिंग की जाए, कैसे फिशरीज डिपार्टमेंट और लोकल कम्युनिटी के बीच मजबूत कोऑर्डिनेशन हो, तो बहुत ही उत्तम होगा। हैचरी, फीड, प्रोसेसिंग, ब्रांडिंग, एक्सपोर्ट, उसके लिए आवश्यक लॉजिस्टिक्स, हर स्तर पर हमें नए बिजनेस मॉडल विकसित करने ही होंगे। ये Rural Prosperity, ग्रामीण समृद्धि के लिए, वहां की हाई वैल्यू, हाई इम्पैक्ट सेक्टर के रूप में परिवर्तित करने का एक अवसर है हमारे लिए, और इस दिशा में भी हम सबको मिलकर काम करना है, और आप आज जो मंथन करेंगे, उसके लिए, उस कार्य के लिए रास्ता बनेगा।

साथियों,

पशुपालन सेक्टर, ग्रामीण इकोनॉमी का हाई ग्रोथ पिलर है। भारत आज दुनिया का सबसे बड़ा मिल्क प्रोड्यूसर है, Egg प्रोडक्शन में हम दूसरे स्थान पर है। हमें इसे और आगे ले जाने के लिए ब्रीडिंग क्वालिटी, डिजीज प्रिवेंशन और साइंटिफिक मैनेजमेंट पर फोकस करना होगा। एक और अहम विषय पशुधन के स्वास्थ्य का भी है। मैं जब One Earth One Health की बात करता हूं, तो उसमें पौधा हो या पशु, सबके स्वास्थ्य की बात शामिल है। भारत अब वैक्सीन उत्पादन में आत्मनिर्भर है। फुट एंड माउथ डिजीज, उससे पशुओं को बचाने के लिए सवा सौ करोड़ से अधिक डोज पशुओं को लगाई जा चुकी है। राष्ट्रीय गोकुल मिशन के तहत टेक्नोलॉजी का विस्तार किया जा रहा है। हमारी सरकार में अब पशुपालन क्षेत्र के किसानों को किसान क्रेडिट कार्ड का भी लाभ मिल रहा है। निजी निवेश को प्रोत्साहित करने के लिए एनिमल हसबेंड्री इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फंड की शुरुआत भी की गई है, और आपको ये पता है हम लोगों ने गोबरधन योजना लागू की है। गांव के पशुओं के निकलने वाला मलमूत्र है, गांव का जो वेस्ट है, कूड़ा-कचरा है। हम गोबरधन योजना में इसका उपयोग करके गांव भी स्वच्छ रख सकते हैं, दूध से आय होती है, तो गोबर से भी आय हो सकती है, और एनर्जी सिक्योरिटी की दिशा में गैस सप्लाई में भी ये गोबरधन बहुत बड़ा योगदान दे सकता है। ये मल्टीपर्पज बेनिफिट वाला काम है, और गांव के लिए बहुत उपयोगी है। मैं चाहूंगा कि सभी राज्य सरकारें इसको प्राथमिकता दें, इसको आगे बढ़ाएं।

साथियों,

हमने पिछले अनुभवों से समझा है कि केवल एक ही फसल पर टिके रहना किसान के लिए जोखिम भरा है। इससे आय के विकल्प भी सीमित हो जाते हैं। इसलिए, हम crop diversification पर फोकस कर रहे हैं। इसके अलावा, National Mission on Edible Oils And Pulses, National Mission on Natural Farming, ये सभी एग्रीकल्चर सेक्टर की ताकत बढ़ा रहे हैं।

साथियों,

आप भी जानते हैं एग्रीकल्चर स्टेट सब्जेक्ट है, राज्यों का भी एक बड़ा एग्रीकल्चर बजट होता है, हमें राज्यों को भी निरंतर प्रेरित करना है कि वो अपना दायित्व निभाने में, हम उनको कैसे मदद दें, हमारे सुझाव उनको कैसे काम आएं। राज्य का भी एक-एक पैसा जो गांव के लिए, किसान के लिए तय हुआ है, वो सही उपयोग हो। हमें बजट प्रावधानों को जिला स्तर तक मजबूत करना होगा। तभी नई पॉलिसीज का ज्यादा से ज्यादा फायदा उठाया जा सकता है।

साथियों,

ये टेक्नोलॉजी की सदी है और सरकार का बहुत जोर एग्रीकल्चर में टेक्नोलॉजी कल्चर लाने पर भी है। आज e-NAM के माध्यम से मार्केट एक्सेस का डेमोक्रेटाइजेशन हुआ है। सरकार एग्रीस्टैक के जरिए, एग्रीकल्चर के लिए डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर विकसित कर रही है। इसके तहत डिजिटल पहचान, यानी किसान आईडी बनाई जा रही है। अब तक लगभग 9 करोड़ किसानों की किसान आईडी बन चुकी है, और लगभग 30 करोड़ भूमि पार्सलों का डिजिटल सर्वे किया गया है। भारत-विस्तार जैसे AI आधारित प्लेटफॉर्म, रिसर्च इंस्टीट्यूशंस और किसानों के बीच की दूरी कम कर रहे हैं।

लेकिन साथियों,

टेक्नोलॉजी तभी परिणाम देती है, जब सिस्टम उसे अपनाएं, संस्थाएं उसे इंटीग्रेट करें और एंटरप्रेन्योर्स उस पर इनोवेशन खड़ा करें। इस वेबिनार में आपको इससे जुड़े सुझावों को मजबूती से सामने लाना होगा। हम टेक्नोलॉजी को कैसे सही तरीके से इंटीग्रेट करें, इस दिशा में इस वेबिनार से निकले सुझावों की बहुत बड़ी भूमिका होगी।

साथियों,

हमारी सरकार ग्रामीण समृद्धि के निर्माण के लिए प्रतिबद्ध है। प्रधानमंत्री आवास योजना, स्वामित्व योजना, पीएम ग्रामीण सड़क योजना, स्वयं सहायता समूहों को आर्थिक मदद, इसने रूरल इकोनॉमी को निरंतर मजबूत किया है। लखपति दीदी अभियान की सफलता को भी हमें नई ऊंचाई देनी है। अभी तक गांव की 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने में हम सफल हो चुके हैं। अब 2029 तक, 2029 तक 3 करोड़ में और 3 करोड़ जोड़ना है, और 3 करोड़ और लखपति दीदियां बनाने का लक्ष्य तय किया गया है। ये लक्ष्य और तेजी से कैसे प्राप्त किया जाए, इसे लेकर भी आपके सुझाव महत्वपूर्ण होंगे।

साथियों,

देश में स्टोरेज का बहुत बड़ा अभियान चल रहा है। लाखों गोदाम बनाए जा रहे हैं। स्टोरेज के अलावा एग्री एंटरप्रेन्योर्स प्रोसेसिंग, सप्लाई चैन, एग्री-टेक, एग्री-फिनटेक, एक्सपोर्ट, इन सब में इनोवेशन और निवेश बढ़ाना आज समय की मांग है। मुझे विश्वास है आज जो आप मंथन करेंगे, उससे निकले अमृत से ग्रामीण अर्थव्यवस्था को नई ऊर्जा मिलेगी। आप सबको इस वेबिनार के लिए मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं हैं, और मुझे पूरा विश्वास है कि जमीन से जुड़े हुए विचार, जड़ों से जुड़े हुए विचार, इस बजट को सफल बनाने के लिए, गांव-गांव तक पहुंचाने के लिए बहुत काम आएंगे। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

बहुत-बहुत धन्यवाद। नमस्कार।