थोर संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या विचारांमध्ये न्याय आणि करुणेची भावना सर्वोच्च स्थानी होती, आणि तीच आपल्या सार्वजनिक कल्याणकारी योजनांचा गाभा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. "त्यांनी प्रज्वलित केलेला सामाजिक सलोखा आणि सद्भावनेचा दीप, देशवासियांचा मार्ग नेहमीच प्रकाशमय करेल", मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:
"महान संत, मानवतेचे उत्कट भक्त, श्री गुरु रविदास महाराज जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. त्यांच्या विचारांमध्ये, न्याय आणि करूणेची भावना सर्वोच्च होती, जी लोककल्याणाच्या आपल्या योजनांचा गाभा आहे. त्यांनी सामाजिक समरसता आणि सद्भावनेचा जो दीप प्रज्वलित केला, तो देशवासियांचा मार्ग नेहमीच प्रकाशमय करेल.”
मानवता के अनन्य उपासक महान संत श्री गुरु रविदास महाराज जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। उनके विचारों में न्याय और करुणा का भाव सर्वोपरि था, जो जनकल्याण की हमारी योजनाओं के मूल में है। उन्होंने सामाजिक समरसता और सद्भावना के जिस दीप को प्रज्वलित किया, वह देशवासियों के पथ को सदैव…
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2026


