भारताने आपले वैविध्य, मागणी आणि व्याप्तीचे सामर्थ्य तिपटीने वाढवले.: पंतप्रधान
मागील 10 वर्षांत भारतातील 25 कोटी लोक गरिबीतून वर आले आहेत : पंतप्रधान
भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था आहे, त्यापैकी कित्येक स्टार्टअप्स अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत : पंतप्रधान
भारत सातत्याने जागतिक अन्न साखळीत योगदान देत आहे : पंतप्रधान
आज, लहान शेतकरी बाजारपेठेत एक प्रमुख शक्ती बनत आहेत: पंतप्रधान
भारतात सहकारी संस्था दुग्धोत्पादन क्षेत्राला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन सामर्थ्य देत आहेत : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी  उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर   आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदार त्या स्थानाच्या नैसर्गिक बलस्थानांचे मूल्यांकन करतो असे ते म्हणाले. जागतिक गुंतवणूकदार आज विशेषतः खाद्य क्षेत्रातील गुंतवणूकदार भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. "भारताकडे विविधता, मागणी आणि प्रमाण या तिहेरी शक्ती आहेत", असे अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की, भारत सर्व प्रकारची  धान्य, फळे आणि भाज्यांचे उत्पादन करतो आणि ही विविधता देशाला जागतिक परिदृश्यात अद्वितीय स्थान देते. प्रत्येक शंभर किलोमीटरवर, पाककृती आणि त्याचे स्वाद बदलतात, आणि यातूनच  भारतातील समृद्ध पाककलेची विविधता दिसून येते. ही मजबूत देशांतर्गत मागणी भारताला स्पर्धात्मक बनवते आणि गुंतवणूकदारांसाठी हे एक पसंतीचे ठिकाण बनते.

 

भारत अभूतपूर्व आणि असाधारण प्रमाणावर काम करत आहे. गेल्या दहा वर्षांत, 25कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे आणि आता ते नवमध्यम वर्गाचा भाग आहेत - हा भारतातील सर्वात उत्साही आणि महत्त्वाकांक्षी वर्ग आहे ", असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, या वर्गाच्या आकांक्षा खाद्यपदार्थांच्या कल निश्चित करत आहेत आणि मागणीला चालना देत आहेत. भारताचा प्रतिभासंपन्न युवावर्ग सर्व क्षेत्रांमध्ये नवोन्मेष साकारत असून अन्नक्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था आहे, त्यापैकी कित्येक स्टार्टअप्स अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-कॉमर्स, ड्रोन आणि अॅप्स सारख्या तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात समावेश केला जात आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी, किरकोळ विक्री आणि प्रक्रिया पद्धतींमध्ये बदल होत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारत वैविध्य, मागणी आणि नवोन्मेष प्रदान करत आहे - हे तिन्ही प्रमुख घटक गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक स्थान ठरवण्यात महत्त्वाचे आहेत. लाल किल्ल्यावरून दिलेल्या संदेशाचा पुनरुच्चार करताना, पंतप्रधानांनी घोषित केले की भारतात गुंतवणूक आणि विस्तार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

एकविसाव्या शतकातील आव्हाने आपल्या सर्वांनाच माहिती आहेत आणि जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर आव्हाने उद्भवली तेव्हा तेव्हा भारताने सातत्याने सकारात्मक भूमिका बजावली आहे हे मान्य करून, जागतिक अन्न सुरक्षेत भारत सक्रिय योगदान देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बांधवांच्या अथक परिश्रमांना केंद्र सरकारच्या धोरणांचा पाठिंबा असल्याने भारताच्या कृषी क्षेत्राचे सामर्थ्य वाढले आहे यावर त्यांनी भर दिला. भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून  दुधाच्या जागतिक पुरवठ्यात भारताचा 25 % वाटा आहे  आणि श्रीअन्न किंवा भरड धान्याचा देखील आघाडीचा उत्पादक देश आहे. भारत तांदूळ आणि गहू उत्पादनात जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि फळे, भाज्या आणि मत्स्यपालनात त्याचे मोठे योगदान आहे. जागतिक पीक तुटवडा असो किंवा पुरवठा साखळीतील समस्या असो, भारत आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमीच सज्ज असतो, असे पंतप्रधान म्हणाले.

 

भारत आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक हितासाठी योगदान देण्याकरता वचनबद्ध आहे, यावर भर देऊन पंतप्रधानांनी सांगितले की सरकार प्रत्येक भागधारकाला सहभागी करून संपूर्ण अन्न आणि पोषण परिसंस्था मजबूत करत आहे. ते म्हणाले की आता 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असून सरकार अन्न प्रक्रिया क्षेत्राला सक्रीयपणे चालना दिली जात आहे. पीएलआय योजना आणि मेगा फूड पार्कच्या विस्ताराचाही या क्षेत्राला फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की भारत सध्या जगातील सर्वात मोठी साठवणूक पायाभूत सुविधा योजना राबवत आहे. ते म्हणाले की, सरकारच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत असून, गेल्या दहा वर्षांत भारताची प्रक्रिया क्षमता वीस पटीने वाढली, तर प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात दुप्पट झाली.

भारताच्या अन्न पुरवठा आणि मूल्य साखळीतील शेतकरी, पशुपालक, मच्छीमार आणि लहान प्रक्रिया उद्योगांची महत्वाची भूमिका अधोरेखित करून, गेल्या दशकभरात सरकारने या सर्व भागधारकांना बळकट केल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारतातील 85% पेक्षा जास्त शेतकरी छोटे अथवा अल्पभूधारक आहेत, आणि म्हणूनच त्यांना सक्षम करण्यासाठी धोरणे आणि आधार प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज हे छोटे शेतकरी बाजारपेठेत एक प्रमुख शक्ती म्हणून उदयाला येत आहेत, यावर त्यांनी भर दिला.

 

भारतातील कोट्यवधी गावकऱ्यांचा समावेश असलेल्या बचत गटांद्वारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्स चालवल्या जात आहेत हे निदर्शनास आणून देत, सरकार या गटांना पत-संलग्न अनुदानाद्वारे मदत करत असून लाभार्थ्यांना यापूर्वीच 800 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत असे मोदी यांनी नमूद केले. सरकार शेतकरी उत्पादक संघटनांचा (एफपीओ) विस्तार करत असून, 2014 पासून 10,000 एफपीओ स्थापन करून लाखो लहान शेतकऱ्यांना जोडले  आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की, हे एफपीओ शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आणायला मदत करतात आणि ब्रँडेड उत्पादने विकसित करून अन्न प्रक्रिया क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, भारतातील एफपीओची ताकद आश्चर्यकारक असून, आता 15,000 हून अधिक उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यांनी काश्मीरमधील बासमती तांदूळ, केशर आणि अक्रोड, हिमाचल प्रदेशातील जॅम आणि सफरचंदाचा रस, राजस्थानमधील भरड धान्यांच्या कुकीज, मध्य प्रदेशातील सोया नगेट्स, बिहारमधील सुपरफूड मखाना, महाराष्ट्रातील शेंगदाणा तेल आणि गूळ, आणि केरळमधील केळीचे चिप्स आणि नारळाचे तेल, यासारखी उदाहरणे दिली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, एफपीओ भारतातील कृषी विविधता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशातील 1,100 हून अधिक शेतकरी उत्पादक संघटना लक्षाधीश झाल्या असून, त्यांची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतात शेतकरी उत्पादक संघटनांबरोबरच सहकारी संस्थांची देखील मोठी ताकद असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि भारतात सहकारी संस्था दुग्धव्यवसाय क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम बनवत आहेत. त्यांचे महत्त्व ओळखून, सहकारी संस्थांच्या विशिष्ट गरजांनुसार धोरणे तयार करण्यासाठी एक समर्पित मंत्रालय स्थापन करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की या क्षेत्रासाठी कर आणि पारदर्शकता सुधारणा देखील लागू करण्यात आल्या आहेत. धोरणात्मक पातळीवर होत असलेल्या या बदलांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे.

 

सागरी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भारताचा प्रभावी विकास अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, गेल्या दशकभरात, सरकारने मत्स्यव्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे आणि मच्छिमारांना अर्थसहाय्य केले आहे, ज्यामध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी दिलेली मदत समाविष्ट आहे. परिणामी, सागरी उत्पादन आणि निर्यात दोन्ही क्षेत्रात वाढ झाली आहे. हे क्षेत्र आता सुमारे तीन कोटी लोकांना रोजगार देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आधुनिक प्रक्रिया संयंत्रे, शीतगृह पायाभूत सुविधा आणि स्मार्ट बंदरांमध्ये गुंतवणूक करून सागरी उत्पादन प्रक्रिया वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यावर त्यांनी भर दिला.

पिकांचे रक्षण करण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असल्याचे नमूद करून, शेतकऱ्यांना अन्न विकिरण तंत्राशी जोडले जात आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांची साठवण कालमर्यादा वाढली आहे आणि अन्न सुरक्षा मजबूत झाली आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कामाशी जोडलेल्या केंद्रांना सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

“भारत नवोन्मेष आणि सुधारणांच्या एका नवीन मार्गावर पुढे जात आहे, आणि नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांबद्दल व्यापक चर्चा सुरू आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्च आणि अधिक परतावा मिळण्याचे आश्वासन मिळते हे त्यांनी अधोरेखित केले. लोणी आणि तुपावर आता फक्त 5% जीएसटी येतो, ज्यामुळे मोठी सवलत मिळते, तर दुधाच्या डब्यांवरही केवळ 5% कर आकारला जातो, ज्यामुळे शेतकरी आणि उत्पादकांना चांगले भाव मिळण्याची खात्री आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना कमी किमतीत अधिक पोषणाची हमी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. अन्न प्रक्रिया क्षेत्राला या सुधारणांमुळे मोठा फायदा होणार असून खाण्यास तयार आणि जतन केलेली फळे, भाज्या आणि सुकामेवा आता 5% जीएसटी स्लॅबमध्ये येतात, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 90% पेक्षा जास्त प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने शून्य किंवा 5% कर श्रेणीत येतात, असेही त्यांनी सांगितले. जैव-कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटकांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे बायो-इनपुट अधिक स्वस्त झाले आहेत आणि त्याचा थेट फायदा लहान सेंद्रीय शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना होणार आहे, असे ते म्हणाले.

 

जैवविघटन होणारे पॅकेजिंग ही काळाची मागणी असल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की उत्पादने ताजी आणि उच्च दर्जाची ठेवणे जितके आवश्यक आहे, तितकेच निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे देखील महत्त्वाचे आहे. या भावनेतून सरकारने जैवविघटन होणाऱ्या पॅकेजिंगवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व उद्योग भागधारकांनी जैवविघटन होणाऱ्या पॅकेजिंगशी संबंधित नवोन्मेषामध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारताने खुल्या मनाने जगासाठी आपले दरवाजे उघडले आहेत आणि अन्न साखळीतील गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे, अशी हमी पंतप्रधानांनी दिली. भारत सहकार्यासाठी सदैव सज्ज असल्याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि कार्यक्रमातील सर्व सहभागींचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पॅट्रुशेव, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, रवनीत सिंग, प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2025 ची आवृत्ती आयोजित केली जात आहे. यात भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सामर्थ्य, अन्न शाश्वतता तसेच पौष्टिक आणि सेंद्रीय अन्न उत्पादन प्रदर्शित केले जाणार आहेत.

वर्ल्ड फूड इंडिया अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत 2,510 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म प्रकल्पांसाठी सुमारे 26,000 लाभार्थ्यांना 770 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाशी संबंधित सहाय्य केले जाणार आहे.

 

वर्ल्ड फूड इंडियामध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी गोलमेज परिषद, तांत्रिक सत्रे, प्रदर्शने आणि बी2बी (व्यवसाय-ते-व्यवसाय), बी२जी (व्यवसाय-ते-सरकार) आणि जी2जी (सरकार-ते-सरकार) बैठका यासह अनेक व्यावसायिक संवादांचा समावेश असेल. यात फ्रान्स, जर्मनी, इराण, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, इटली, थायलंड, इंडोनेशिया, तैवान, बेल्जियम, टांझानिया, एरिट्रिया, सायप्रस, अफगाणिस्तान, चीन आणि यूएसए यासह 21 देशांचा सहभाग असेल तसेच 150 आंतरराष्ट्रीय सहभागी उपस्थित असतील.

 

वर्ल्ड फूड इंडियामध्ये अनेक विषय आधारित सत्रे ही असतील. जागतिक अन्न प्रक्रिया केंद्र म्हणून भारत, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील शाश्वतता आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवी क्षितिजे, भारताचा पाळीव प्राणी खाद्य उद्योग, पोषण आणि आरोग्यासाठी प्रक्रिया केलेले खाद्य, वनस्पती-आधारित खाद्य, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष खाद्य यासह विविध विषयांवर अनेक सत्रे आयोजित केली जातील. यामध्ये 14 मंडप असतील, प्रत्येक मंडप विशिष्ट विषयांना समर्पित असेल आणि ते सुमारे 1,00,000 अभ्यागतांना आकर्षित करेल.

 

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s Northeast: Where nature, progress, people breathe together - By Jyotiraditya M Scindia

Media Coverage

India’s Northeast: Where nature, progress, people breathe together - By Jyotiraditya M Scindia
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Devbhoomi Uttarakhand is the heartbeat of India's spiritual life: PM Modi in Dehradun
November 09, 2025
PM inaugurates, lays foundation stones for various development initiatives worth over ₹8140 crores
Seeing the heights Uttarakhand has reached today, it is natural for every person who once struggled for the creation of this beautiful state to feel happy: PM
This is indeed the defining era of Uttarakhand’s rise and progress: PM
Devbhoomi Uttarakhand is the heartbeat of India's spiritual life: PM
The true identity of Uttarakhand lies in its spiritual strength: PM

देवभूमि उत्तराखंड का मेरा भै-बन्धों, दीदी–भुल्यों, दाना-सयाणों। आप सबू कैं, म्यर नमस्कार, पैलाग, सेवा सौंधी।

उत्तराखंड के राज्यपाल गुरमीत सिंह जी, मुख्यमंत्री भाई पुष्कर सिंह, केंद्र में मेरे सहयोगी अजय टम्टा, विधानसभा अध्यक्ष बहन ऋतु जी, उत्तराखंड सरकार के मंत्रिगण, मंच पर मौजूद पूर्व मुख्यमंत्री और सांसदगण, बड़ी संख्या में आशीर्वाद देने आए हुए पूज्य संतगण, अन्य सभी महानुभाव और उत्तराखंड के मेरे भाइयों और बहनों।

साथियों,

9 नवंबर का ये दिन एक लंबी तपस्या का फल है। आज का दिन हम सभी को गर्व का एहसास करा रहा है। उत्तराखंड की देवतुल्य जनता ने वर्षों तक जो सपना देखा था, वो अटल जी की सरकार में 25 साल पहले पूरा हुआ था और अब बीते 25 वर्षों की यात्रा के बाद, आज उत्तराखंड जिस ऊंचाई पर है, उसे देखकर हर उस व्यक्ति का खुश होना स्वाभाविक है, जिसने इस खूबसूरत राज्य के निर्माण के लिए संघर्ष किया था। जिन्हें पहाड़ से प्यार है, जिन्हें उत्तराखंड की संस्कृति, यहां की प्राकृतिक सुंदरता, देवभूमि के लोगों से लगाव है, उनका मन आज प्रफुल्लित है, वो आनंदित हैं।

साथियों,

मुझे इस बात की भी खुशी है कि डबल इंजन की भाजपा सरकार उत्तराखंड के सामर्थ्य को नई ऊंचाई देने में जुटी है। मैं आप सभी को उत्तराखंड की रजत जयंती पर बहुत-बहुत बधाई देता हूं। मैं इस अवसर पर उत्तराखंड के उन बलिदानियों को भी श्रद्धांजलि देता हूं, जिन्होंने आंदोलन के दौरान आपना जीवन न्यौछावर कर दिया। मैं उस वक्त के सभी आंदोलनकारियों का भी वंदन करता हूं, अभिनंदन करता हूं।

साथियों,

आप सब जानते हैं, उत्तराखंड से मेरा लगाव कितना गहरा है। जब मैं spiritual जर्नी पर यहां आता था, तो यहां पहाड़ों पर रहने वाले मेरे भाई बहनों का संघर्ष, उनका परिश्रम, कठिनाइयों को पार करने की उनकी ललक, मुझे हमेशा प्रेरित करती थी।

साथियों,

यहां बिताए हुए दिनों ने, मुझे उत्तराखंड के असीम सामर्थ्य का साक्षात परिचय करवाया है। इसलिए ही जब बाबा केदार के दर्शन के बाद, मैंने कहा कि ये दशक उत्तराखंड का है, तो ये सिर्फ मेरे मुंह से निकला हुआ एक वाक्य नहीं था, मैंने जब ये कहा, तो मुझे पूरा-पूरा भरोसा आप लोगों पर था। आज जब उत्तराखंड अपने 25 वर्ष पूरे कर रहा है, तो मेरा ये विश्वास और दृढ़ हो गया है कि ये उत्तराखंड के उत्कर्ष का कालखंड है।

साथियों,

25 साल पहले जब उत्तराखंड नया-नया बना था, तब चुनौतियां कम नहीं थीं। संसाधन सीमित थे, राज्य का बजट छोटा था, आय के स्रोत बहुत कम थे, और ज्यादातर ज़रूरतें केंद्र की सहायता से पूरी होती थीं। आज तस्वीर पूरी तरह बदल चुकी है। यहां आने से पहले मैंने रजत जयंती समारोह पर शानदार प्रदर्शनी देखी। आपसे भी मेरा आग्रह है, उस प्रदर्शनी को उत्तराखंड के हर नागरिक को देखनी चाहिए। इसमें उत्तराखंड की पिछले 25 वर्षों की यात्रा की झलकियां हैं। इंफ्रास्ट्रक्चर, एजुकेशन, इंडस्ट्री, टूरिज्म, हेल्थ, पावर और ग्रामीण विकास, ऐसे अनेक क्षेत्रों में सफलता की गाथाएं प्रेरित करने वाली हैं। 25 साल पहले उत्तराखंड का बजट सिर्फ 4 हजार करोड़ रुपए था। आज जो 25 साल की उमर के हैं, उनको उस समय का कुछ भी पता नहीं होगा। उस समय 4 हजार करोड़ रूपये का बजट था। आज ये बढ़कर एक लाख करोड़ रुपए को पार कर चुका है। 25 साल में उत्तराखंड में बिजली उत्पादन 4 गुना ज्यादा हो गया है। 25 वर्षों में उत्तराखंड में सड़कों की लंबाई बढ़कर दोगुनी हो गई है। और यहां 6 महीने में 4 हजार यात्री हवाई जहाज से आते थे, 6 महीने में 4 हजार। आज एक दिन में 4 हजार से ज्यादा यात्री हवाई जहाज से आते हैं।

साथियों,

इन 25 सालों में इंजीनियरिंग कॉलेजों की संख्या 10 गुना से ज्यादा बढ़ी है। पहले यहां सिर्फ एक मेडिकल क़ॉलेज था। आज यहां 10 मेडिकल कॉलेज हैं। 25 साल पहले वैक्सीन कवरेज का दायरा सिर्फ 25 प्रतिशत भी नहीं था। 75 प्रतिशत से ज्यादा लोग बिना वैक्सीन की जिंदगी शुरू करते थे। आज उत्तराखंड का करीब-करीब हर गांव वैक्सीन कवरेज के दायरे में आ गया है। यानी जीवन के हर आयाम में उत्तराखंड ने काफी प्रगति की है। विकास की ये यात्रा, अद्भुत रही है। ये बदलाव सबको साथ लेकर चलने की नीति का नतीजा है, हर उत्तराखंडी के संकल्प का नतीजा है। पैली पहाड़ोंक चढ़ाई, विकासक बाट कें रोक दे छी। अब वई बटी, नई बाट खुलण लाग गी।

साथियों,

मैंने कुछ देर पहले उत्तराखंड के युवाओं से, उद्यमियों से बात की, वे सभी उत्तराखंड की ग्रोथ को लेकर बहुत उत्साहित है। आज जो उत्तराखंड वासियों के उद्गार हैं, उनको अगर मैं गढ़वाली में कहूं, तो शायद कोई गलती तो कर लूंगा, लेकिन 2047 मा भारत थे, विकसित देशों की लैन मा, ल्याण खुणी, मेरो उत्तराखंड, मेरी देवभूमि, पूरी तरह से तैयार छिन।

साथियों,

उत्तराखंड की विकास यात्रा को गति देने के लिए, आज भी यहां कई परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया गया है। शिक्षा, स्वास्थ्य, पर्यटन और खेल से जुड़े ये प्रोजेक्ट्स, यहां रोजगार के नए अवसर तैयार करेंगे। जमरानी और सॉन्ग बांध परियोजनाएं, देहरादून और हल्द्वानी शहर की पेयजल की समस्या को दूर करने में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगी। इन सभी स्कीम्स पर 8 हजार करोड़ रुपए से ज्यादा खर्च किए जाएंगे। मैं उत्तराखंड वासियों को इन परियोजनाओं की बधाई देता हूं।

साथियों,

उत्तराखंड सरकार, अब सेब और कीवी के किसानों को डिजिटल करेंसी में अनुदान देना शुरू कर रही है। इसमें आधुनिक टेक्नोलॉजी के माध्यम से आर्थिक मदद की पूरी ट्रैकिंग करना संभव हो रहा है। इसके लिए मैं राज्य सरकार, Reserve Bank of India समेत सभी स्टेकहोल्डर्स की भी प्रशंसा करता हूं।

साथियों,

देवभूमि उत्तराखंड भारत के आध्यात्मिक जीवन की धड़कन है। गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, जागेश्वर और आदि कैलाश, ऐसे अनगिनत तीर्थ हमारी आस्था के प्रतीक हैं। हर वर्ष लाखों श्रद्धालु इन पवित्र धामों की यात्रा पर आते हैं। उनकी यात्रा भक्ति का मार्ग खोलती है, साथ ही, उत्तराखंड की अर्थव्यवस्था में नई ऊर्जा भरती है।

साथियों,

बेहतर कनेक्टिविटी का उत्तराखंड के विकास से गहरा नाता है, इसलिए आज राज्य में दो लाख करोड़ रुपए से अधिक की परियोजनाओं पर काम चल रहा है। ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल परियोजना प्रगति पर है। दिल्ली-देहरादून एक्सप्रेस-वे अब लगभग तैयार है। गौरीकुंड-केदारनाथ और गोविंदघाट-हेमकुंट साहिब रोपवे का शिलान्यास हो चुका है। ये परियोजनाएं उत्तराखंड में विकास को नई गति दे रही हैं।

साथियों,

उत्तराखंड ने 25 वर्षों में विकास की एक लंबी यात्रा तय की है। अब सवाल ये है कि अगले 25 वर्षों में हम उत्तराखंड को किस ऊंचाई पर देखना चाहेंगे? आपने वो कहावत जरूर सुनी होगी, जहां चाह, वहां राह। इसलिए जब हमें ये पता होगा कि हमारा लक्ष्य क्या हैं, तो वहां पहुंचने का रोडमैप भी उतनी ही तेजी से बनेगा। और अपने लक्ष्यों पर चर्चा के लिए 9 नवंबर से बेहतर दिन और क्या होगा?

साथियों,

उत्तराखंड का असली परिचय उसकी आध्यात्मिक शक्ति है। उत्तराखंड अगर ठान ले तो अगले कुछ ही वर्षों में खुद को, “स्पिरिचुअल कैपिटल ऑफ द वर्ल्ड” के रूप में स्थापित कर सकता है। यहाँ के मंदिर, आश्रम, ध्यान और योग के सेंटर, इन्हें हम ग्लोबल नेटवर्क से जोड़ सकते हैं।

साथियों,

देश-विदेश से लोग यहां वेलनेस के लिए आते हैं। यहां की जड़ी-बूटियों और आयुर्वेदिक औषधियों की मांग तेजी से बढ़ रही है। पिछले 25 वर्षों में अरोमैटिक प्लांट्स, आयुर्वेदिक जड़ी-बूटियों, योग और वेलनेस टूरिज़्म में उत्तराखंड ने शानदार प्रगति की है। अब समय है कि उत्तराखंड की हर विधानसभा क्षेत्र में योग केंद्र, आयुर्वेद केंद्र, नैचुरोपैथी संस्थान, होम स्टे, एक कंपप्लीट पैकेज, उस दिशा में हम सोच सकते हैं। ये हमारे विदेशी टूरिस्ट्स को बहुत अपील करेगा।

साथियों,

आप जानते ही हैं कि भारत सरकार बॉर्डर पर वाइब्रेंट विलेज योजना पर कितना जोर दे रही है। मैं चाहता हूँ कि उत्तराखंड का हर वाइब्रेंट विलेज खुद में एक छोटा पर्यटन केंद्र बने। वहां होम-स्टे बने, स्थानीय भोजन और संस्कृति को बढ़ावा मिले। आप कल्पना करिए, जब बाहर से आने वाले पर्यटक, एकदम घरेलू माहौल में डुबके, चुड़कानी खाएंगे, रोट-अरसा, रस-भात खाएंगे, झंगोरे की खीर खाएंगे, तो उन्हें कितना आनंद आएगा। यही आनंद उन्हें दूसरी बार, तीसरी बार उत्तराखंड वापस लेकर आएगा।

साथियों,

अब हमें उत्तराखंड में छिपी हुई संभावनाओं के विस्तार पर फोकस करने की आवश्यकता है। यहां हरेला, फूलदेई, भिटौली जैसे त्योहारों का हिस्सा बनने के बाद पर्यटक उस अनुभव को हमेशा याद रखते हैं। यहां के मेले भी उतने ही जीवंत हैं। नंदा देवी का मेला, जौलजीवी मेला, बागेश्वर का उत्तरायणी मेला, देवीधुरा का मेला, श्रावणी मेला और बटर फेस्टिवल, इनमें उत्तराखंड की आत्मा बसती है। यहां के स्थानीय मेलों और पर्वों को वर्ल्ड मैप पर लाने के लिए वन डिस्ट्रिक्ट वन फेस्टिवल, अर्थात एक जिला एक मेला जैसा कोई अभियान चलाया जा सकता है।

साथियों,

उत्तराखंड के सभी पहाड़ी जिले फलों के उत्पादन में काफी पोटेंशियल रखते हैं। हमें पहाड़ी जिलों को हॉर्टिकल्चर सेंटर बनाने पर फोकस करना चाहिए। ब्लूबेरी, कीवी, हर्बल और मेडिसिनल प्लांट्स, ये भविष्य की खेती है। उत्तराखंड में फूड प्रोसेसिंग, हस्तशिल्प, ऑर्गेनिक प्रोडक्ट्स, इन सबके लिए MSMEs को नए सिरे से सशक्त किए जाने की जरूरत है।

साथियों,

उत्तराखंड में बारहों महीने पर्यटन की संभावनाएं हमेशा से रही हैं। अब यहां कनेक्टिविटी सुधर रही है, और इसलिए मैंने सुझाव दिया था कि हमें बारहमासी टूरिज्म की ओर बढ़ना चाहिए। मुझे खुशी है कि उत्तराखंड विंटर टूरिज़्म को नया आयाम दे रहा है। मुझे अभी जो जानकारियां मिलीं, वो उत्साह बढ़ाने वाली हैं। सर्दियों में आने वाले पर्यटकों की संख्या में तेज़ बढ़ोतरी हुई है। पिथौरागढ़ में 14 हजार फुट से अधिक ऊंचाई पर, हाई एल्टीट्यूड मैराथन का आयोजन हुआ। आदि कैलाश परिक्रमा रन भी देश के लिए प्रेरणा बनी है। तीन वर्ष पहले आदि कैलाश यात्रा में दो हजार से भी कम श्रद्धालु आते थे। अब ये संख्या तीस हजार से अधिक हो चुकी है। अभी कुछ दिन पूर्व ही केदारनाथ मंदिर के कपाट बंद हुए हैं। केदारनाथ धाम में इस बार करीब 17 लाख श्रद्धालु, देवदर्शन के लिए आए हैं। तीर्थाटन, बारहमासी पर्यटन, उत्तराखंड का वो सामर्थ्य है, जो उसे निरंतर विकास की नई ऊंचाई पर ले जाएगा। इको टूरिज्म के लिए भी संभावना है, एडवेंचर टूरिज्म के लिए भी बहुत संभावना है। देशभर के नौजवानों के लिए, ये आकर्षण का केंद्र बन सकता है।

साथियों,

उत्तराखंड अब फिल्म डेस्टिनेशन के रूप में भी उभर रहा है। राज्य की नई फिल्म नीति से शूटिंग करना और आसान हो गया है। वेडिंग डेस्टिनेशन के रूप में भी उत्तराखंड लोकप्रिय हो रहा है। और मेरा तो अभियान चल रहा है, Wed In India. Wed In India के लिए, उत्तराखंड को अपने यहां उसी आलीशान स्तर की सुविधाएं विकसित करनी चाहिए। और इसके लिए 5-7 बड़ी डेस्टिनेशंस को तय करके उन्हें विकसित किया जा सकता है।

साथियों,

देश ने आत्मनिर्भर भारत का संकल्प लिया है। इसका रास्ता वोकल फॉर लोकल से तय होगा। उत्तराखंड इस विजन को हमेशा से जीता आया है। स्थानीय उत्पाद से लगाव, उनका उपयोग, उनको अपने जीवन का हिस्सा बना लेना, ये यहां की परंपरा का अभिन्न हिस्सा है। मुझे खुशी है कि उत्तराखंड सरकार ने वोकल फॉर लोकल अभियान को तेज गति दी है। इस अभियान के बाद उत्तराखंड के 15 कृषि उत्पादों को जीआई टैग मिला है। यहां के बेडू फल और बद्री गाय के घी को, हाल के दिनों में जी आई टैग मिलना, सचमुच में बहुत गौरव की बात है। बद्री गाय का घी, पहाड़ के हर घर की शान है। अब बेड़ू, पहाड़ के गांवो से निकलकर बाहर के बाजारों तक पहुंच रहा है। इससे बने उत्पादों पर अब जीआई टैग लगा होगा। वो उत्पाद जहां भी जाएगा, अपने साथ उत्तराखंड की पहचान भी लेकर जाएगा। ऐसे ही GI टैग वाले प्रॉडक्ट्स को हमें देश के घर-घर पहुंचाना है।

साथियों,

मुझे खुशी है, हाउस ऑफ हिमालयाज, उत्तराखंड का ऐसा ब्रैंड बन रहा है, जो स्थानीय पहचान को एक मंच पर ला रहा है। इस ब्रैंड के तहत राज्य के विभिन्न उत्पादों को एक साझा पहचान दी गई है, ताकि वे ग्लोबल मार्केट में प्रतिस्पर्धा कर सकें। राज्य के कई उत्पाद अब डिजिटल प्लेटफॉर्म पर उपलब्ध हैं। इससे ग्राहकों तक उनकी सीधी पहुंच बनी है, और किसानों, कारीगरों और छोटे उद्यमियों के लिए एक नया बाजार खुला है। हाउस ऑफ हिमालयाज की ब्रैंडिंग के लिए भी आपको नई ऊर्जा के साथ जुटना है। मैं समझता हूं, इन ब्रैंड के प्रॉडक्ट्स के डिलिवरी मैकेनिज्म पर भी हमें लगातार काम करना होगा।

साथियों,

आप जानते हैं कि, उत्तराखंड की अब तक की विकास यात्रा में कई रुकावटें आईं हैं। लेकिन भाजपा की मजबूत सरकार ने हर बार उन बाधाओं को पार किया, और ये सुनिश्चित किया है कि विकास की गति पर ब्रेक ना लगे। उत्तराखंड की धामी सरकार ने जिस गंभीरता से यहां समान नागरिक संहिता को लागू किया, वो दूसरे राज्यों के लिए भी मिसाल है। राज्य सरकार ने धर्मांतरण विरोधी कानून और दंगा नियंत्रण कानून जैसे राष्ट्रहित से जुड़े विषयों पर साहसिक नीति अपनाई। प्रदेश में तेजी से उभर रहे जमीन कब्जाने और डेमोग्राफी में बदलाव जैसे संवेदनशील मुद्दे पर भी भाजपा सरकार ठोस कार्यवाही कर रही है। आपदा प्रबंधन के क्षेत्र में, उत्तराखंड सरकार ने तेजी और संवेदनशीलता के साथ काम करते हुए, जनता की हर संभव मदद का प्रयास किया है।

साथियों,

आज जब हम राज्य स्थापना की रजत जयंती मना रहे हैं, मुझे पूरा विश्वास है कि आने वाले वर्षों में, हमारा उत्तराखंड विकास की नई ऊंचाइयों को छुएगा, अपनी संस्कृति, अपनी पहचान को उसी गर्व के साथ आगे बढ़ाएगा। मैं एक बार फिर उत्तराखंड के सभी निवासियों को रजत जयंती समारोह की हार्दिक शुभकामनाएं देता हूं। और मैं आपसे अपेक्षा करता हूं कि अभी से 25 साल के बाद जब देश आजादी के 100 साल मनाता होगा, तब उत्तराखंड किस ऊंचाई पर होगा, ये लक्ष्य अभी से तय कर लेना चाहिए, रास्ता चुन लेना चाहिए और इंतजार किए बिना चल पड़ना चाहिए। मैं आपको ये भी भरोसा देता हूं कि भारत सरकार हमेशा उत्तराखंड सरकार के साथ खड़ी है। आपको हर कदम पर सहयोग देने को हम तत्पर हैं। मैं उत्तराखंड के हर परिवार, हर नागरिक के सुख, समृद्धि और उज्ज्वल भविष्य की कामना करता हूं। आप सबका बहुत-बहुत धन्यवाद।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

वंदे मातरम् का 150वां वर्ष है, मेरे साथ बोलिये –

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

बहुत-बहुत धन्यवाद।