नमो ड्रोन दीदींनी केलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांचे पंतप्रधान झाले साक्षीदार
1,000 नमो ड्रोन दीदींना ड्रोन सुपूर्द
सुमारे 8,000 कोटी रुपयांची बँक कर्जे आणि 2,000 कोटी रुपयांचा भांडवल सहाय्य निधी बचतगटांना वितरीत
लखपती दीदींचा सत्कार
"ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यशाचे नवीन अध्याय लिहित आहेत"
''स्त्री शक्तीचा संधी निर्माण करूनच आणि त्यांचा सन्मान राखूनच कोणताही समाज प्रगती करू शकतो”
“शौचालये, सॅनिटरी पॅड, धुराने भरलेले स्वयंपाकघर, जलवाहिनीद्वारे पाणी यांसारखे मुद्दे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून उपस्थित करणारा मी पहिला पंतप्रधान आहे''
"दैनंदिन जीवनात तळागाळातील अनुभवांमधून मोदींची संवेदनशीलता आणि मोदींच्या योजना उदयाला आल्या आहेत "
"देशातील महिलांच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात परिवर्तनीय प्रभाव दिसत आहे"
"मला पूर्ण विश्वास आहे की स्त्री शक्ती देशात तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल"
"गेल्या दशकात भारतातील बचतगटांचा विस्तार उल्लेखनीय आहे. या गटांनी देशातील महिला सक्षमीकरणाची गाथा पुन्हा लिहिली आहे"

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. गिरीराज सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री. मनसुख मांडविया जी, आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या, मोठ्या संख्येने इथे आलेल्या आणि तुमच्यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातूनही  देशभरातील लाखोंच्या संख्येने दिदी आज आपल्या सोबत सहभागी झाल्या आहेत.  मी तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.  आणि या सभागृहात मला दिसतंय की कदाचित हा तर छोटा भारतच आहे.  भारतातील प्रत्येक भाषेतील आणि कानाकोपऱ्यातील लोक इथे दिसत आहेत. तर,  तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

आजचा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आहे.  आज मला नमो ड्रोन दीदी मोहिमेअंतर्गत 1000 आधुनिक ड्रोन, महिला बचत गटांना सुपूर्द करण्याची संधी मिळाली आहे.  विविध योजना आणि लाखो प्रयत्नांमुळे देशातील 1 कोटीहून अधिक भगिनी लखपती दीदी झाल्या आहेत.  हा आकडा छोटा नाही.  आणि आताच मी बोलत होतो तेव्हा ती किशोरी भगिनी मला सांगत होती की ती दर महिन्याला 60-70 हजार, 80 हजार कमवते.  आता देशातील तरुणांना प्रेरणा देऊ शकतो, गावातील एक भगिनी तिच्या व्यवसायातून दरमहा 60 हजार, 70 हजार रुपये कमवते. त्यांचा आत्मविश्वास बघा, हो मुलगी तिथेच बसली आहे हात वर करत आहे.  आणि जेव्हा मी हे ऐकतो, पाहतो तेव्हा माझा विश्वास खूप वाढतो.  तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी कधी मला तुमच्यासारख्या लोकांकडून छोट्या-मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो... हो… , आपण योग्य दिशेने जात आहोत, देशाचे नक्कीच काहीतरी भले होईल.  कारण आम्ही योजना तर बनवतो, परंतु तुम्ही जे या योजनांचा पाठपुरावा करता ना आणि त्यांची फळेही मिळवून दाखवता.  आणि त्या फळांमुळे सरकारी अधिकाऱ्यांनाही वाटते... हो… काही चांगले घडत असेल तर कामही झपाट्याने होते.  आणि म्हणूनच मी ठरवले की मला 3 कोटी लखपती दीदींचा आकडा पार करायचा आहे.  आणि याच उद्देशाने आज या दिदींच्या खात्यात 10 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  आणि मी तुम्हा सर्व भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो.

 

Mothers and sisters,

माता भगिनींनो,

कोणताही देश असो, कोणताही समाज असो, स्त्री शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच तो पुढे जाऊ शकतो.  पण दुर्दैवाने देशातील आधीच्या सरकारांमध्ये तुम्हा सर्व महिलांचे जीवन, तुमच्या समस्या यांना कधीच प्राधान्य नव्हते आणि तुम्हाला तुमच्या नशिबावर सोडण्यात आले.  माझा अनुभव असा आहे की आपल्या माता-भगिनींना थोडीशी जरी संधी मिळाली, सुरुवातीला थोडाबहुत आधार जरी मिळाला तरी नंतर मग त्यांना आधाराची गरज भासत नाही, त्या स्वतःच लोकांचा आधार बनतात.  आणि जेव्हा मी लाल किल्ल्यावरून महिला सक्षमीकरणाबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा मला हे अधिक जाणवले.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून आपल्या माता-भगिनींना शौचालयाअभावी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि गावातील भगिनी आपले जीवन कशाप्रकारे जगतात हे बोलून दाखवले होते.

लाल किल्ल्यावरून सॅनिटरी पॅडचा मुद्दा उपस्थित करणारा मी पहिला पंतप्रधान आहे.  मी असा पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून सांगितले की, स्वयंपाकघरात लाकडं जाळून अन्न शिजवणाऱ्या आमच्या माता-भगिनी  400 सिगारेट एवढा धूर रोज सहन करतात, श्वासावाटे आपल्या शरीरात घेतात.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने तुम्हा सर्व महिलांना घरात नळाच्या पाण्याअभावी भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आणि त्यासाठी जल जीवन मिशनची घोषणा केली.  प्रत्येक महिलेचे बँक खाते असण्याची गरज  लाल किल्ल्यावरून व्यक्त करणारा मी पहिला पंतप्रधान आहे.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून, तुम्हा महिलांबद्दल बोलल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांचा मुद्दा उपस्थित केला.

मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने सांगितले की मुलगी संध्याकाळी उशिरा घरी आली तर आई, वडील आणि भाऊ सगळे विचारतात की  कुठे गेली होतीस आणि तिला उशीर का झाला.  पण दुर्दैव असे की आई-वडिलांचा जेव्हा मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा विचारणा होत नाही की मुलगा कुठे गेला होता, का गेला होता?  तुमच्या मुलालाही विचारा.  आणि हाच मुद्दा मी लाल किल्ल्यावरून मांडला होता.  आणि आज मला हे देशाच्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भगिनीला, प्रत्येक मुलीला सांगायचे आहे.  जेव्हा जेव्हा मी लाल किल्ल्यावरून तुमच्या सक्षमीकरणाबद्दल बोललो तेव्हा दुर्दैवाने काँग्रेससारख्या देशातील राजकीय पक्षांनी माझी टर उडवली आणि माझा अपमान केला.

 

 

मित्रांनो,

मोदींची संवेदनशीलता आणि मोदींच्या योजना तळागाळातील जीवनानुभवातून समोर आल्या आहेत.  त्यांनी लहानपणी, त्यांच्या परिसरात, आजूबाजूच्या परिसरात जे पाहिले आणि त्यानंतर देशातील प्रत्येक गावात अनेक कुटुंबांसोबत राहताना जे अनुभवले, ते आज मोदींच्या संवेदना आणि योजनांमध्ये दिसून येते.  त्यामुळेच या योजना माझ्या माता, भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य करुन त्यांच्या अडचणी कमी करतात.  फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार करणाऱ्या, घराणेशाही जपणाऱ्या नेत्यांना हे कधीच अजिबात समजू शकणार नाही.  देशातील कोट्यवधी माता-भगिनींना अडचणीतून मुक्त करण्याचा विचार आमच्या सरकारच्या अनेक योजनांचा पाया राहिला आहे.

माझ्या माता भगिनींनो,

यापूर्वीच्या सरकारांनी एक-दोन योजना सुरु करण्यालाच महिला सक्षमीकरणाचे नाव दिले होते.  मोदीने ही असली राजकीय विचारसरणीच बदलून टाकली.  2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर मी तुमच्या महिलांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यासाठी योजना तयार केल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.  आज आपल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत मोदी कुठली ना कुठली योजना घेऊन भारतातील भगिनींच्या सेवेला हजर होतो.  गर्भातच मुलींची हत्या (स्त्रीलिंगी गर्भाची भ्रूणहत्या) रोखण्यासाठी आम्ही बेटी बचाओ-बेटी पढाओ (मुलीला वाचवा मुलीला शिकवा) मोहीम सुरू केली.  गरोदरपणात मातेला योग्य पोषण मिळावे यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेला 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जन्मलेल्या  मुलीला अभ्यासात अडचण येऊ नये, यासाठी जास्तीत जास्त व्याज देणारी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली.  मोठी झाल्यावर मुलीला नोकरी करायची असेल तर आज तिच्याकडे मुद्रा योजनेचे एवढे मोठे साधन आहे.  मुलीच्या व्यावसायिक कारकिर्दीवर  परिणाम होऊ नये यासाठी आम्ही गरोदरपणाची रजा 26 आठवड्यांपर्यंत वाढवली आहे.  5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना असो किंवा 80% सवलतीत स्वस्त औषधे उपलब्ध करून देणारे जनऔषधी केंद्र असो, या सगळ्यांचा जास्तीत जास्त फायदा तुम्हा माता, भगिनी आणि मुलींनाच तर होत आहे.

माता भगिनींनो,

मोदी समस्या टाळत नाही, त्यांना समोरासमोर भिडतो, त्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी काम करतो.  मला माहीत आहे की भारतातील महिलांना सक्षम बनवायचे असेल तर त्यांचा आर्थिक सहभाग वाढवावा लागेल.  त्यामुळे आम्ही आमच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक योजनेत हा मुद्दा लक्षात ठेवला.  माता भगिनींनो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो.  तुम्हाला हेही माहीत आहे की आपल्या कडे मालमत्ता-संपत्ती नेहमी पुरुषाच्याच नावावर असे.  कुणी जमीन खरेदी केली तर ती पुरुषाच्या नावावर…..दुकान घेतले तर ते पुरुषाच्या नावावर! घरातील स्त्रीच्या नावावर काही होत असे का?  त्यामुळेच आम्ही पीएम आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या घरांची नोंदणी महिलांच्या नावे केली(घरे गृहलक्ष्मीच्या नावावर केली).  तुम्ही स्वतः पाहिले आहे… पूर्वी जेव्हा नवीन गाड्या आणि ट्रॅक्टर यायचे तेव्हा बहुतेक ते पुरुषच चालवत असत.  लोकांना प्रश्न पडायचा की मुलगी कशी चालवणार?  घरात एखादे नवीन उपकरण, नवा टीव्ही, नवा फोन आला की, पुरुषाना वाटे फक्त त्यांनाच त्यातील कळू शकते. आता आपला समाज त्या तशा परिस्थितीतून आणि त्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत पुढे जात आहे.  आणि आजचा हा कार्यक्रम याचेच आणखी एक उदाहरण बनला आहे की भारताच्या कृषी क्षेत्राला एक नवीन दिशा देणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या पहिल्या वापरकर्त्या, या  माझ्या मुली आहेत,  माझ्या भगिनी आहेत.  

 

ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक शेती कशी केली जाते हे आमच्या भगिनी देशाला शिकवतील.  ड्रोन चालक, नमो ड्रोन दीदींचे कौशल्य, मी स्वतः आत्ता नुकतेच शेतात जाऊन पाहून आलो आहे.  

मला विश्वास आहे आणि मला काही दिवसांपूर्वी 'मन की बात' मध्ये अशाच एका ड्रोन दीदीशी बोलण्याची संधी मिळाली होती .ती म्हणाली होती की,  मी एका दिवसात इतक्या शेतात काम करते,   एका दिवसात इतक्या शेतात काम करून माझी इतकी कमाई होते. आणि ती म्हणाली , माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे आणि गावात माझा मान खूप वाढला आहे, आता गावातील माझी ओळख बदलली आहे.जिला  सायकल कशी चालवायची हे देखील माहित नव्हते तिला   ग्रामस्थ वैमानिक म्हणून संबोधतात. मला विश्वास आहे की, देशातील महिला शक्ती 21 व्या शतकातील भारताची तंत्रज्ञान  क्रांती घडवू शकते. आज आपण अंतराळ  क्षेत्रात पाहतो, माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रात पाहतो, विज्ञान क्षेत्रात पाहतो, भारतातील महिला आपला झेंडा कशाप्रकारे  फडकावत आहेत. आणि महिला व्यावसायिक वैमानिकांच्या बाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे.विमान उडवणाऱ्या मुलींची संख्या आपल्याकडे सर्वाधिक आहे. आकाशात व्यावसायिक उड्डाणे असो किंवा शेतीतील ड्रोन असो, भारताच्या मुली कुठेही कोणाच्याही  मागे नाहीत.आणि यावेळी 26 जानेवारीला तुम्ही टीव्हीवर बघितलाच असेल, 26 जानेवारीचा कर्तव्यपथावरचा कार्यक्रम संपूर्ण भारत बघत होता, तिथे स्त्री-स्त्री-स्त्री-स्त्रियांच्या शक्तीचे  प्रदर्शन घडत होते.

माता भगिनींनो,

येत्या काही वर्षांत ड्रोन तंत्रज्ञानाचा देशात खूप विस्तार होणार आहे. जर कमी प्रमाणात दूध, भाजीपाला आणि इतर उत्पादने जवळच्या बाजारपेठेत पोहोचवायची असतील तर ड्रोन हे एक सशक्त  माध्यम ठरणार आहे.औषधांचे वितरण असो किंवा वैद्यकीय चाचणीचे नमुने वितरित करणे असो, यातही ड्रोन मोठी भूमिका बजावतात. याचा अर्थ नमो ड्रोन दीदी योजनेतून ड्रोन वैमानिक बनणाऱ्या भगिनींना भविष्यात असंख्य संधींची  दारे खुली होणार आहेत.

 

माता भगिनींनो,

गेल्या 10 वर्षात भारतात ज्या प्रकारे महिला बचत गटांचा विस्तार झाला आहे तो अभ्यासाचा विषय आहे. या महिला बचत गटांनी भारतात महिला सक्षमीकरणाचा नवा इतिहास घडवला आहे.आज या कार्यक्रमाद्वारे मी बचत गटातील प्रत्येक भगिनीचे कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.त्यांच्या मेहनतीने महिला बचत गटांना राष्ट्र उभारणीसाठी एक प्रमुख गट बनवले आहे.आज बचत गटातील महिलांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या 10 वर्षांत, आमच्या सरकारने केवळ बचत गटांचाच विस्तार केला नाही, तर 98 टक्के गटांची बँक खातीही उघडली आहेत. म्हणजे जवळपास 100 टक्के.  आमच्या सरकारने बचत गटांना दिली जाणारी मदत 20 लाख रुपये केली आहे. 8 लाख कोटी  रुपये आत्तापर्यंत हा आकडा लहान नाही. तुमच्या हातात,  8 लाख कोटींहून अधिक  मदत बँकांमधून  माझ्या या भगिनींपर्यंत  पोहोचली  आहे.इतका पैसा थेट गावोगावी , भगिनींपर्यंत पोहोचला आहे. आणि भगिनींचा स्वभाव आहे, सर्वात मोठा गुण असतो तो म्हणजे 'बचत’ ', त्या वाया घालवत नाहीत, बचत करतात. आणि बचतीची शक्ती देखील उज्ज्वल भविष्याचे  सुचिन्ह आहे.आणि जेव्हाही मी या भगिनींशी   बोलतो तेव्हा त्या मला अशाच  नवीन गोष्टी सांगतात, त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. म्हणजेच सामान्य माणसे कल्पनाच  करू शकत नाही.आणि आजकाल खेड्यापाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या  रस्ते आणि महामार्गांचा लाभही या गटांना मिळाला आहे. . आता लखपती दीदी आपली उत्पादने शहरात सहज विकू शकत आहेत. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे शहरातील लोकही खेडोपाडी जाऊन या गटांकडून थेट खरेदी करू लागले आहेत. अशाच कारणांमुळे बचत गटांच्या सदस्यांचे उत्पन्न गेल्या 5 वर्षांत 5 पटीने वाढले आहे.

माता भगिनींनो,

ज्या भगिनींची  स्वप्ने आणि आकांक्षांना मर्यादा आणल्या  होत्या त्या भगिनी आज राष्ट्र उभारणीत आपली भूमिका वाढवत आहेत. आज गावा-गावात नवीन संधी निर्माण होत आहेत, नवीन पदे निर्माण झाली आहेत.आज लाखो बँक सखी, कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी आणि सेवा क्षेत्राशी निगडित दीदी गावोगावी सेवा देत आहेत. या दीदी आरोग्यापासून डिजिटल इंडियापर्यंतच्या देशाच्या राष्ट्रीय मोहिमांना नवी गती  देत आहेत. पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चालवणाऱ्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक महिला आहेत आणि 50 टक्क्यांहून अधिक लाभार्थीही महिला आहेत.यशाची ही मालिका  माझा स्त्रीशक्तीवरचा विश्वास आणखी दृढ करते. मी देशाच्या प्रत्येक माता, भगिनी आणि मुलीला विश्वास देतो की, आमचा तिसरा कार्यकाळ  स्त्री शक्तीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणार आहे.

आणि मी पाहिले आहे की अनेक भगिनींचा  कदाचित बचत गटात स्वतःचा छोटासा आर्थिक व्यवसायच केवळ  नसतो, मी काही लोकांना गावात अनेक कामे करताना पाहिले आहे.क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहेत  आणि बचत गटातील भगिनींना प्रोत्साहन देत आहेत.  ती शिकणाऱ्या मुलींना बोलावते आणि लोकांना त्यांच्याशी बोलायला लावते.गावात खेळामध्ये  चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींचे बचत गटातील भगिनी त्यांचे स्वागत - सन्मान करतात. म्हणजेच मी पाहिले आहे की , काही शाळांमध्ये या बचतगटाच्या भगिनींना भाषणासाठी बोलावले जाते आणि तुमच्या यशाचे कारण सांगा असे त्यांना सांगितले जाते.आणि शाळेतील मुलेही खूप उत्सुकतेने ऐकतात, शिक्षक ऐकतात. म्हणजे एक प्रकारे मोठी क्रांतीच झाली आहे. आणि मी बचत गटाच्या दीदींना सांगेन, मी नुकतीच ड्रोन दीदीसारखी योजना आणली आहे, ती मी तुमच्या चरणी ठेवली आहे, आणि माझा विश्वास आहे, ज्या माता-भगिनींच्या चरणी मी ड्रोन ठेवला आहे ना  त्या माता-भगिनी ड्रोनला केवळ  आकाशातच  घेऊन जाणार नाहीत, तर देशाचा संकल्पही तितक्याच  उंचीवर नेतील.

 

पण एक योजना अशीही आहे ज्यात आमच्या बचत गटाच्या भगिनी पुढे आल्या. मी ‘पीएम सूर्यघर’ योजना बनवली आहे. ‘पीएम सूर्यघर’चे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना एक प्रकारे मोफत विजेसाठी आहे. शून्य वीज देयक. आता हे काम तुम्हाला करता येईल की नाही? आपण करू शकता की नाही? जर तुम्ही बोललात तर मी म्हणेन... करू शकता ... नक्कीच करू शकता.  आम्ही ठरवले आहे की, प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या छतावर सौर संच  लावावेत, सूर्यकिरणांपासून वीज निर्माण करावी आणि ती वीज घरात वापरावी. 300 युनिटपेक्षा अधिक  वीज वापरणारी कुटुंबे फारच कमी आहेत.घरात पंखा, वातानुकूलक, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन असेल तर गाडी 300 युनिटमध्ये चालते. म्हणजे तुम्हाला शून्य देयक, शून्य देयक येईल. इतकेच  नाही तर अधिक  वीज निर्माण केली तर तुम्ही म्हणाल मोठ्या मोठ्या कारखान्यातही  वीज निर्माण होते, मोठे श्रीमंत लोक वीज निर्माण करू शकतात, आम्ही गरीब लोक काय करू शकतो?  मोदी हेच करतात, आता गरीबही वीज निर्माण करतील, त्यांच्या घरी विजेचा कारखाना उभा राहील. आणि जी अतिरिक्त वीज निर्माण होईल ती सरकार खरेदी करेल. यामुळे आमच्या भगिनी  आणि कुटुंबालाही उत्पन्न मिळेल.

त्यामुळे, तुम्ही या पीएम सूर्य घर किंवा तुमच्या ठिकाणच्या कोणत्याही सामान्य केंद्रामध्ये गेल्यास, तुम्ही तेथे अर्ज करू शकता. मी सर्व बचत गटांच्या भगिनींना सांगेन की, मैदानात उतरा आणि ही योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा.तुम्ही हा कारभार हातात घ्या. तुम्ही   बघा कितीतरी मोठे विजेचे काम  आता माझ्या भगिनींद्वारे होणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा प्रत्येक घरात शून्य युनिट वीज देयक  येईल ना ...पूर्ण शून्य देयक तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतील की नाही?  आणि त्यांनी वाचवलेले पैसे त्यांच्या कुटुंबाला उपयोगी पडतील की नाही? तर या योजनेचा सर्वात मोठा लाभ आपल्या  बचत गटातील ज्या भगिनी आहेत ना त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही तुमच्या गावात करून घेऊ शकता.आणि मी सरकारला सुद्धा सांगितले आहे की या कामासाठी जिथे जिथे बचत गटांच्या भगिनी पुढे येतील तिथे आम्ही त्यांना प्राधान्य देऊ आणि शून्य वीज देयकाची  ही मोहीम मला यशस्वीपणे पुढे चालवायची आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला  
खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!