आज संपूर्ण जग विकसित भारताच्या आपल्या संकल्पावर चर्चा करत आहे, ज्यामध्ये विशेषतः पायाभूत सुविधांमधील बदल प्रतिबिंबित होत असून, विकसित भारताची इमारत या पायावर उभारली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
आम्ही एक राष्ट्र, एक गॅस ग्रिड या दृष्टिकोनावर काम केले असून, प्रधानमंत्री ऊर्जा गंगा परियोजनेची निर्मिती केली आहे : पंतप्रधान
आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारत साकारायचा असून, विकासाद्वारे सक्षमीकरण, रोजगाराद्वारे आत्मनिर्भरता आणि प्रतिसादाद्वारे सुशासन, हा आपला मार्ग आहे : पंतप्रधान

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ.सी.व्ही.आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी, शांतनु ठाकुर जी तसेच सुकांता मजूमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सहकारी शौमिक भट्टाचार्य जी ज्योतिर्मय सिंह महतो जी, इतर लोकप्रतिनिधी, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नमस्कार!

आपले हे दुर्गापुर, पोलादी शहर असण्यासोबतच भारताच्या श्रमिक शक्तीचे देखील मोठे केंद्र आहे. भारताच्या विकासात दुर्गापुरने फार मोलाची भूमिका निभावली आहे. हीच भूमिका आणखी मजबूत करण्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे. काही वेळापूर्वी येथून 5 हजार चारशे कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांची कोनशीला आणि लोकार्पण झाले आहे. हे सर्व प्रकल्प या भागातील जोडणीला आणखी सशक्त करतील. येथे वायूआधारित वाहतूक व्यवस्था तसेच वायू आधारित अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. आजच्या प्रकल्पांमुळे या पोलादी शहराची ओळख आणखी ठळक होईल. म्हणजेच हे प्रकल्प, “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” च्या मंत्रासह पश्चिम बंगालला आगेकूच करण्यात मदत करतील. यातून येथील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नव्या संधी देखील निर्माण होतील. मी या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज, संपूर्ण जग ‘विकसित भारता’च्या निश्चयाची चर्चा करत आहे. यामागे भारतात दिसून येणारे परिवर्तन आहे जे ‘विकसित भारता’चा पाया रचत आहे. भारतातील पायाभूत सुविधा या या बदलांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. जेव्हा मी पायाभूत सुविधांविषयी बोलतो तेव्हा त्यात सामाजिक, भौतिक आणि डिजिटल अशा प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधा देखील येतात. देशातील गरिबांसाठी चार कोटींहून अधिक पक्की घरे, कोट्यवधी शौचालये, पाणीपुरवठ्यासाठी 12 कोटींहून अधिक नळ जोडण्या, हजारो किलोमीटर्सचे नवे रस्ते, नवे महामार्ग, नवे रेल्वेमार्ग, लहान शहरांमध्ये विमानतळ, प्रत्येक घरात, गावागावात इंटरनेट सुविधा- अशा आधुनिक पायाभूत सुविधांचा लाभ पश्चिम बंगालसह देशातील प्रत्येक राज्याला मिळू लागला आहे.

 

मित्रांनो,

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेद्वारे संपर्क वाढवण्याबाबत अभूतपूर्व काम झाले आहे. देशातील ज्या  राज्यांमध्ये वंदे भारत रेल्वेगाड्या मोठ्या संख्येने धावतात अशा राज्यांमध्ये पश्चिम बंगालचा समावेश होतो. कोलकाता मेट्रो सेवेचा विस्तार वेगाने होत आहे. या भागात नवे रेल्वे मार्ग निर्माण करण्यात येत आहेत, रुंदीकरण तसेच विद्युतीकरणाचे काम देखील जलदगतीने सुरु आहे. अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्याबरोबरच, मोठ्या संख्येने रेल्वे उड्डाणपूल देखील बांधण्यात येत आहेत.पश्चिम बंगालला आज दोन नवे उड्डाणपूल मिळाले आहेत. या सगळ्या कामांमुळे बंगालच्या लोकांचे जीवनमान लक्षणीयरित्या सुलभ होण्यासाठी मोठी मदत होईल.

मित्रांनो,

आम्ही येथील विमानतळ देखील उडान (उडे देश का आम नागरिक)  योजनेशी जोडले आहेत. गेल्या केवळ एका वर्षात 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी याचा लाभ घेऊन प्रवास केला आहे. जेव्हा अशा पायाभूत सुविधा विकसित होतात तेव्हा जनतेला सोयींचा लाभ तर होतोच, शिवाय हजारो तरुणांना नोकऱ्या देखील मिळतात हे तर तुम्हाला चांगलेच माहित आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याच्या उत्पादनातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.

 

मित्रांनो,

देशात गेल्या 10-11 वर्षांत गॅस जोडण्यांबाबत जे कार्य झाले आहे तेवढे यापूर्वी कधीच झालेले नाही. गेल्या दशकभरात एलपीजी गॅस देशातील प्रत्येक घरा-घरात पोहोचला आहे आणि जगभरात याची प्रशंसा देखील होत आहे.आम्ही ‘एक देश, एक गॅस ग्रीड’ संकल्पनेवर काम केले आणि पंतप्रधान उर्जा गंगा योजना तयार केली. या योजनेंतर्गत, पश्चिम बंगालसह पूर्व भारतातील सहा राज्यांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या राज्यांमध्ये देखील उद्योग तसेच घरांपर्यंत किफायतशीर दरात पाईप गॅस पोहोचेल याची सुनिश्चिती करणे हा यामागील उद्देश आहे. जेव्हा गॅस उपलब्ध होईल तेव्हाच या राज्यांतील वाहने सीएनजीवर चालू शकतील, तसेच आपले उद्योग गॅस-आधारित तंत्रज्ञानांचा स्वीकार करु शकतील. दुर्गापुरमधील औद्योगिक भूमी देखील आता राष्ट्रीय गॅस ग्रीडचा भाग झाली आहे याचा मला आनंद होत आहे. येथील स्थानिक उद्योगांना याचा मोठा लाभ होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील सुमारे 25 ते 30 लाख घरांना परवडण्याजोग्या दरात पाईपद्वारे गॅस पुरवठा होईल. याचा अर्थ असा की, या कुटुंबांचे, विशेषतः आपल्या माता आणि भगिनींचे जीवन सोपे होईल. परिणामी, हजारो रोजगारसंधी देखील उपलब्ध होतील.

मित्रांनो,

आज दुर्गापुर आणि रघुनाथपूर मधील मोठमोठे पोलाद आणि विद्युतनिर्मिती प्रकल्प देखील नव्या तंत्रज्ञानाने सुसज्जित आहेत. या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आता हे प्रकल्प अधिक कार्यक्षम बनले असून जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहेत. हे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल मी बंगालच्या जनतेचे विशेष अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

भारतातील कारखाने असो किंवा आमची शेते आणि जमिनी असोत- प्रत्येक ठिकाणी एकाच स्पष्ट निर्धारासह काम सुरु आहे: भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवणे. आपला मार्ग आहे: विकासाच्या माध्यमातून सक्षमीकरण, रोजगारातून आत्मनिर्भरता आणि संवेदनशीलतेने केलेले उत्तम प्रशासन. या तत्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पश्चिम बंगालला भारताच्या विकासयात्रेचे शक्तिशाली इंजिन बनवण्याचा निर्धार केला आहे. पुन्हा एकदा या विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आतासाठी एवढेच -  अजून खूप काही बोलायचे आहे, पण या मंचावर बोलण्याऐवजी, येथून जवळच दुसरा मंच आहे तेथे जाऊन बोलतो. संपूर्ण बंगाल, आणि पूर्ण देश तेथे होणारे बोलणे ऐकण्यासाठी जास्तच आतुरतेने वाट पाहत आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी देखील उत्सुक आहेत. म्हणूनच मित्रांनो, या कार्यक्रमातील माझे बोलणे मी येथेच थांबवतो. मात्र काही क्षणांतच, मी त्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा दृढ निश्चयाने बोलेन. खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।