सुदृढ भारताच्या दिशेने सरकार चार सूत्री धोरणासह काम करत आहे: पंतप्रधान
भारताच्या आरोग्य क्षेत्राने दाखवलेले सामर्थ्य आणि लवचिकतेचे जगभरातून कौतुक : पंतप्रधान
भारताने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची आयात कमी करण्याच्या दिशेने काम केले पाहिजेः पंतप्रधान

नमस्कार!

हा कार्यक्रम आपल्याला थोडा विशेष वाटत असेल, यावेळी अर्थसंकल्पानंतर आम्ही निश्चित केले होते की, अंदाजपत्रकामध्ये ज्या काही नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचा अर्थसंकल्पामधल्या तरतुदींशी थेट संबंध आहे, त्यांच्याबरोबर विस्तारपूर्वक चर्चा करायची आणि एक एप्रिलपासून ज्यावेळी नवीन अंदाजपत्रक लागू होईल, त्या दिवसापासून सर्व योजनाही लागू करायच्या. सर्व योजनांचे काम वेगाने पुढे जावे आणि फेब्रुवारी तसेच मार्चमधल्या दिवसांचा भरपूर उपयोग करून योजनांच्या कामाची पूर्ण तयारी केली जावी.

आम्ही अंदाजपत्रक सादर करण्याची तारीख आधीच्या तुलनेत एक महिना अलिकडे आणली आहे. त्यामुळे आपल्या हातात दोन महिन्यांचा काळ आहे. त्याचा कमाल लाभ आपण कसा घेऊ शकतो हे पाहिले पाहिजे म्हणूनच त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर चर्चा करण्यात येत आहे. कधी पायाभूत सुविधांविषयी सर्वांबरोबर चर्चा झाली, कधी संरक्षण क्षेत्राविषयी संबंधित लोकांबरोबर चर्चा झाली. आज मला आरोग्य क्षेत्रातल्या लोकांबरोबर बोलण्याची संधी मिळाली आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी जेवढी तरतूद करण्यात आली आहे, ती अभूतपूर्व आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, याचे प्रतीक म्हणजे अंदाजपत्रकातल्या आरोग्य विषयक तरतुदी आहेत. गेल्या वर्षभराचा काळ म्हणजे एक प्रकारे देशासाठी, दुनियेसाठी, संपूर्ण मानवजतीसाठी आणि विशेष करून आरोग्य क्षेत्रासाठी एक प्रकारे अग्निपरीक्षेचा काळ होता.

आपण सर्वजण, देशाचे आरोग्य क्षेत्र, या अग्निपरीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत, याचा मला आनंद आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे. काही महिन्यांच्या आतच ज्या पद्धतीने देशाने जवळपास 2500 प्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले, काही डझन चाचण्यांपासून ते आज आपण जवळपास 21 कोटी चाचण्यांच्या टप्प्यांपर्यंत पोहोचलो आहोत. हे सर्वकाही सरकार आणि खाजगी क्षेत्राने मिळून काम केल्यामुळेच शक्य झाले आहे.

 

मित्रांनो,

कोरोनाने आपल्याला धडा शिकवला आहे की, आपण फक्त आजच महामारीच्याविरोधात लढायचे नाही तर भविष्यामध्ये उद्भवणा-या अशा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशाला सज्ज करायचे आहे. म्हणूनच आरोग्य सुविधा या क्षेत्राला मजबूत करणेही तितकेच आवश्यक आहे. वैद्यकीय उपकरणांपासून ते औषधांपर्यंत, व्हँटिलेटर्सपासून ते लसीपर्यंत, वैज्ञानिक संशोधनापासून ते दक्षता घेण्यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांपर्यंत, डॉक्टर्सपासून साथीच्या आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत, सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे, यामुळे देशामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक आपत्ती आली तर त्या संकटाला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देण्यास सज्ज असणार आहोत.

पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेच्या मागे मूळात हीच प्रेरणा आहे. या योजनेअंतर्गत संशोधनापासून ते चाचणी आणि औषधोपचारापर्यंत देशामध्येच एक आधुनिक परिसंस्था विकसित करण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, प्रत्येक दृष्टीकोनातून आपल्या क्षमतांमध्ये वाढ करणारी आहे. 15 व्या वित्त आयोगाने यासंबंधीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर आपल्या ज्या स्थानिक प्रशासन संस्था आहेत, त्यांना आरोग्य सेवांच्या व्यवस्थेसाठी 70 हजार कोटी रूपयांपेक्षाही जास्त निधी मिळणार आहे. म्हणजेच सरकारचा भर फक्त आरोग्य सुविधांमध्ये गुंतवणूक व्हावी, म्हणून नाही तर देशातल्या दुर्गम-अति दुर्गम प्रदेशांमध्येही आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा, असा आग्रह आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आरोग्य क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक आरोग्य सेवा देते असे नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण करीत असते.

 

मित्रांनो,

कोरोनाकाळामध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्राने जी मजबुती दाखवली, आपण सर्वांनी जे अनुभव घेतले आणि आपल्या शक्तीचे जे प्रदर्शन केले, त्याची संपूर्ण जगाने अगदी बारकाईने नोंद घेतली आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली आहे आणि भारताच्या आरोग्य क्षेत्राविषयी भरवसा निर्माण झाला असून त्याचे महत्व एक नवीन स्तरावर पोहोचले आहे. आपल्याला हा विश्वास ध्यानात ठेवून आपल्या क्षेत्रामध्ये अधिक तयारी करायची आहे. आगामी काळामध्ये भारतीय डॉक्टरांना संपूर्ण विश्वामधून आणखी जास्त मागणी वाढणार आहे आणि याचे कारण म्हणजे हा विश्वास, भरवसा आहे. आगामी काळामध्ये भारतीय परिचारिका, भारतीय निमवैद्यकीय कर्मचारी यांना असलेली मागणी संपूर्ण दुनियेतून वाढणार आहे, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी अगदी लिहून-नोंदवून ठेवावी. या काळामध्ये भारतीय औषधे आणि भारतीय लस यांनी एक नवीन विश्वास प्राप्त केला आहे. त्यांना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीही आपल्याला तयारी करायची आहे. आपल्या वैद्यकीय शिक्षण प्रणालीकडेही स्वाभाविक रूपाने लोकांचे लक्ष जाणार आहे, त्या शिक्षणावरही विश्वास वाढणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये जगातल्या इतर देशांमधूनही अनेक विद्यार्थी भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येण्याची शक्यता वाढली आहे. आणि आपल्याला यासाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे.

कोरोनाकाळामध्ये आम्ही व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय सामुग्री बनविण्याचे कौशल्य हस्तगत केले आहे. या सामुग्रीला संपूर्ण जगामधून असलेली मागणी पूर्ण करण्यासाठीही भारताला वेगाने काम करावे लागणार आहे. जगाला ज्या ज्या आधुनिक वैद्यकीय सामुग्रीची आवश्यकता आहे, ती सर्व सामुग्री कमीतकमी, सर्वांना परवडणा-या दरामध्ये बनवता येईल, असे स्वप्न भारत पाहू शकेल का? भारत वैश्विक पुरवठादार बनू शकेल? भारताची सर्वांना परवडणारी व्यवस्था असेल, शाश्वत व्यवस्था असेल, भारत वापरकर्ता-स्नेही तंत्रज्ञान वापरेल. अशा सर्व गोष्टींचा विचार केला तर मला पक्की खात्री आहे की, संपूर्ण दुनियेची नजर भारताकडे लागणार आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये तर जरूर भारत सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

मित्रांनो,

सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे एक विशिष्ट अंदाज असतो. मात्र ज्यावेळी आपण सर्वजण मिळून काम करू, त्याचवेळी तो अंदाज खरा ठरणार आहे.

 

मित्रांनो,

आरोग्य विषयाबाबत आमच्या सरकारचा दृष्टिकोन आणि आधीच्या सरकारांचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. या अर्थसंकल्पानंतर निर्माण झालेले प्रश्न आपणही सर्वजण जाणता. या अंदाजपत्रकामध्ये स्वच्छतेविषयी चर्चा आहे, पोषणाविषयी चर्चा आहे, आरोग्य कल्याणाविषयी आयुषचे आरोग्य नियोजन असेल. या सर्व गोष्टींविषयी एक सर्वंसमावेशी दृष्टिकोन निश्चित करून आम्ही पुढे जात आहोत. आधी आरोग्य क्षेत्राचा विचार करताना सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या विभागांचा, तुकड्या-तुकड्याने विचार केला जात होता. तुकड्यांचा विचार करूनच या विषयाची हाताळणी केली जात होती.

आमच्या सरकारने आरोग्य विषयाला तुकड्यांऐवजी सर्वंकष पद्धतीने, एकत्रित- एकात्मिक दृष्टिकोनातून पाहिले आणि त्याप्रमाणे लक्ष केंद्रीत करून काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी आम्ही देशामध्ये फक्त औषधोपचारच नाही तर ‘वेलनेस’ म्हणजे कल्याणकारी योजनांवर लक्ष्य केंद्रीत करण्यास प्रारंभ केला आहे. आम्ही प्रतिबंधात्मक उपाय योजनांपासून ते रूग्ण बरा होईपर्यंत सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवला आहे. भारताला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आम्ही एकाचवेळी चार आघाड्यांवर एकत्रितपणे काम करीत आहोत.

पहिली आघाडी आहे, आजारांना रोखणे! म्हणजे आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे. आणि त्याचबरोबर आरोग्य कल्याणाला प्रोत्साहन देणे. स्वच्छ भारत अभियान असेल, योग या विषयावर लक्ष केंद्रीत असेल, पोषणाविषयी गर्भवती आणि लहान मुलांची योग्य काळात काळजी घेणे आणि त्यांच्यावर औषधोपचार करणे असो, शुद्ध पेयजल पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न असो, अशा प्रत्येक उपाय योजना पहिल्या आघाडीमध्ये केल्या जात आहेत.

दुसरी आघाडी, गरीबातल्या गरीबाला स्वस्त आणि प्रभावी औषधोपचार देण्याची आहे. आयुष्मान भारत योजना आणि प्रधानमंत्री जनौषधी केंद्र यासारख्या योजना यामध्ये कार्यरत आहेत.

तिसरी आघाडी आहे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य दक्षता व्यावसायिकांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करणे. गेल्या सहा वर्षांमध्ये एम्स आणि याच स्तरावरच्या इतर संस्थांचा विस्तार देशातल्या दुर्गम-अतिदुर्गम राज्यांपर्यंत करण्यात येत आहे. देशामध्ये जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्यामागे हाच विचार आहे.

चौथी आघाडी आहे, समस्यांना पार करण्यासाठी मिशन मोडवर, लक्ष्य केंद्रीत करून आणि निश्चित कालावधीमध्ये आपल्याला काम करायचे आहे. मिशन इंद्रधनुषचा विस्तार देशातल्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागापर्यंत करण्यात आला आहे.

देशामधून क्षयरोगाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी जो लढा सुरू केला आहे, त्यासाठी संपूर्ण विश्वाने 2030 चे लक्ष्य निश्चित केले आहे. मात्र भारताने हे काम 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भारतातून क्षयरोग निर्मूलनासाठी जी मोहीम सुरू केली आहे, त्याविषयी मला सांगायचे आहे की, क्षयरोग हा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या मुखातून, नाकांतून जे बारीक-बारीक तुषार बाहेर पडतात, त्यांच्यामुळे हा आजार पसरतो. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठीही मास्क लावणे, वेळीच निदान करणे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.

अशातच कोरोना काळामध्ये आपल्याला जो अनुभव आला आहे, तो अनुभव एक प्रकारे हिंदुस्तानच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आता पोहोचला आहे. आता आपल्याला झालेल्या सरावामुळे आपण क्षयरोग हद्दपारीसाठी त्या दृष्टीने काम करू शकतो. क्षयरोगाच्या विरोधात आपल्याला जो लढा द्यायचा आहे, तो आता आपण सहजतेने देऊ शकतो आणि जिंकूही शकतो. आणि म्हणूनच कोरोना काळाचा अनुभव, कोरोनामुळे जन-सामान्यांमध्ये निर्माण झालेली जागृती उपयोगी ठरणार आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी भारतातल्या सामान्य नागरिकांनी जे योगदान दिले आहे, त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असे वाटते की, या मॉडेलमध्येच आवश्यक सुधारणा करून, काही त्यामध्ये नवीन भर घालून आपण जर क्षयरोग निर्मूलनासाठी वापरले तर 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनविण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते.

त्याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे विशेषतः उत्‍तर प्रदेशमध्ये गोरखपुर वगैरे जो भाग आहे ज्याला पूर्वांचल असेही म्हणतात , त्या पूर्वांचलमध्ये मेंदूज्वरामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने मुलांचे दुःखद मृत्यू झाले होते. संसदेत देखील त्यावर चर्चा झाली होती. एकदा तर या विषयावर चर्चा करताना आपले उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्‍यमंत्री योगीजी त्या मुलांची स्थिती पाहून खूप रडले होते. मात्र जेव्हापासून ते तिथले मुख्‍यमंत्री बनले आहेत , त्यांनी एक प्रकारे केंद्रित कार्य केले आहे. पूर्ण जोमाने काम केले आहे. आज आपल्याला अतिशय आशादायी परिणाम मिळत आहेत. आम्ही मेंदूज्वरचा प्रसार रोखण्यावर भर दिला, उपचार सुविधा वाढवल्या, त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

 

मित्रहो,

कोरोना काळात आयुषसंबंधित आपल्या नेटवर्कने देखील खूप उत्तम काम केले आहे. केवळ मनुष्य संसाधनांच्या बाबतीतच नाही तर प्रतिकार शक्ती आणि वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीतही आपल्या आयुषच्या पायाभूत सुविधा देशासाठी उपयुक्त ठरल्या.

भारताची औषधे आणि लसींबरोबरच आपले मसाले, आपले काढे यांचेही किती मोठे योगदान आहे याचा आज जगाला अनुभव येत आहे. आपल्या पारंपरिक औषधांनी जागतिक मनावर आपले एक स्थान निर्माण केले आहे. जे पारंपरिक औषधांशी निगडित लोक आहेत, जे त्यांच्या उत्पादनाशी जोडलेले लोक आहेत , जे आयुर्वेदिक परंपरांशी परिचित लोक आहेत अशा लोकांचा भर देखील जागतिक असायला हवा.

जग ज्याप्रकारे योगाभ्यासाला सहजपणे स्वीकारत आहे, तसेच जग आता सर्वंकष आरोग्यसेवेकडे वळले आहे. दुष्परिणांपासून मुक्‍त आरोग्यसेवेकडे जगाचे लक्ष गेले आहे. त्यात भारताची पारंपरिक औषधे खूप उपयोगी ठरतील. भारताची जी पारंपरिक औषधे आहेत ती मुख्‍यत्वे वनौषधी आधारित आहेत आणि त्यामुळे जगात त्याचे आकर्षण खूप वेगाने वाढू शकते. त्यातून इजा होण्याच्या बाबतीत लोक निश्चिन्त असतात कारण त्यात अपाय होईल असे काही नाही. त्याकडेही आपण लक्ष केंद्रित करू शकतो का ? आपल्या आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीतून आणि या क्षेत्रात काम करणारे लोक मिळून काही करू शकतात का ?

कोरोना काळात आपल्या पारंपरिक औषधांची ताकद पाहिल्यानंतर आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे आणि आयुर्वेदमध्ये पारंपरिक औषधांवर विश्वास ठेवणारे सर्व तसेच वैद्यकीय व्यवसायाशी निगडित लोकांसाठी अभिमानाची बाब आहे की जागतिक आरोग्य केंद्र - WHO, भारतात आपले पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र सुरु करणार आहे. त्यांनी याची घोषणा देखील केली आहे. भारत सरकार त्याची प्रक्रिया देखील पार पाडत आहे. हा जो मान-सम्‍मान मिळाला आहे , तो जगभरात पोहचवणे आपली जबाबदारी आहे.

 

मित्रहो,

सुगम्यता आणि किफायतशीर यांना आता पुढील स्तरावर नेण्याची वेळ आली आहे . म्हणूनच आता आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे. डिजिटल आरोग्य अभियान देशातील सामान्य नागरिकांना वेळेवर , सोयीनुसार प्रभावी उपचार पुरवण्यात खूप मदत करेल.

 

मित्रहो,

मागील वर्षांचा आणखी एक दृष्टिकोन बदलण्याचे काम वेगाने करण्यात आले आहे. हा बदल आत्मनिर्भर भारतासाठी खूप आवश्यक आहे . आज आपण जगाची फार्मसी बनल्याचा अभिमान बाळगतो आजही अनेक गोष्टींसाठी जो कच्चा माल आहे , त्यासाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत.

औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या कच्च्या मालासाठी देशाचे अन्य देशांवर अवलंबत्व , अन्य देशांवर गुजराण करणे आपल्या उद्योगांसाठी किती वाईट अनुभव आहे हे आपण पाहिले आहे. हे योग्य नाही. म्हणूनच गरीबांना स्वस्त औषधे आणि उपकरण देण्यात यामुळे मोठी अडचण निर्माण होते . आपल्याला यावर मार्ग शोधावाच लागेल. आपल्याला या क्षेत्रात भारताला आत्‍मनिर्भर बनवावेच लागेल. यासाठी चार विशेष योजना सध्या सुरु केल्या आहेत. अर्थसंकल्पातही त्याचा उल्‍लेख आहे , तुम्हीही अभ्यास केला असेल.

या अंतर्गत देशातच औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औषधे आणि वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी मेगा पार्क्स उभारण्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

मित्रहो,

देशाला केवळ शेवटच्या ठिकाणापर्यंत आरोग्य सुविधा पुरवायच्या नाहीत तर भारताच्या कानाकोपऱ्यात , दुर्गम भागात .. जसे आपल्याकडे निवडणुका असतात तेव्हा बातमी येते कि एक मतदार होता तरीही तिथे मतदान केंद्र उभारण्यात आले, मला वाटते की आरोग्य क्षेत्रातही आणि शिक्षण क्षेत्रातही याची अंमलबजावणी व्हावी. जिथे एक नागरिक असेल, तिथेही आपण पोहचू. हा आपला स्वभाव असायला हवा आणि आपल्याला यावर भर द्यायचा आहे . त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच सर्वच क्षेत्रांमध्ये आरोग्य सुगम्यतेवर आपल्याला भर द्यायचा आहे . देशाला निरोगी केंद्र हवी आहेत, देशाला जिल्हा रुग्णालये हवी आहेत, देशाला गंभीर आजारांसाठी उपचार केंद्र हवी आहेत, आरोग्य देखरेखीसाठी पायाभूत सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि टेलिमेडिसिन हवे आहे. आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करायचे आहे , प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन द्यायचे आहे.

आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे कि देशातील लोक, मग ते गरीब असतील, दुर्गम भागात राहणारे असले तरीही त्यांना उत्तम उपचार मिळावेत आणि वेळेवर मिळावेत . आणि यासाठी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारे आणि देशातील स्थानिक संस्था , खासगी क्षेत्र यांनी एकत्र येऊन काम केले तर उत्तम परिणाम देखील मिळतील.

खासगी क्षेत्र पीएमजेएवाय मध्ये भागीदारीसह सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांचे जाळे तयार करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलना मदत करू शकेल . राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, नागरिकांच्या डिजिटल आरोग्य नोंदी आणि इतर अद्ययावत तंत्रज्ञानामध्येही भागीदारी करता येईल.

मला विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून एक मजबूत भागीदारीचे मार्ग शोधू शकू, निरोगी आणि समर्थ भारतासाठी आत्मनिर्भर उपाय शोधू शकू. माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की आपण जी हितधारकांसोबत , या विषयांचे जे ज्ञाता लोक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत आहोत ...अर्थसंकल्प जो यायचा होता तो आला. तुमच्या अनेक अपेक्षा असतील , त्या कदाचित यात नसतील. मात्र त्यासाठी हा काही शेवटचा अर्थसंकल्प नाही ...पुढील अर्थसंकल्पात बघू. आज जो अर्थसंकल्प सादर झाला आहे त्याची आपण सर्व मिळून जलद गतीने जास्तीत जास्त कशी अंमलबजावणी करायची, व्‍यवस्‍था कशा विकसित करायच्या, सामान्‍य माणसापर्यंत आपण वेगाने कसे पोहचू. माझी इच्छा आहे की तुमचे अनुभव, तुमचे मुद्दे सांगा. आम्ही संसदेत तर चर्चा करत असतो. प्रथमच अर्थसंकल्पावरची चर्चा संबंधित लोकांशी आम्ही करत आहोत. अर्थसंकल्पपूर्व चर्चा करतो, तेव्हा सूचना मागवल्या जातात ...अर्थसंकल्पानंतर चर्चा करतो तेव्हा उपायांवर चर्चा होते.

आणि म्हणूनच आपण सर्वजण मिळून उपाय शोधू , आपण सर्वजण मिळून जलद गतीने पुढे जाऊ आणि आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ. सरकार आणि तुम्ही वेगळे नाही. सरकार देखील तुमचेच आहे आणि तुम्ही देखील देशासाठीच आहात. आपण सर्वजण मिळून देशातील गरीब व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून आरोग्य क्षेत्राचे उज्‍ज्‍वल भविष्‍य, तंदुरूस्‍त भारतासाठी आपण पुढे वाटचाल करू. तुम्ही सर्वानी वेळ काढलात. तुमचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरेल. तुमची सक्रिय भागीदारी खूप उपयुक्त ठरेल.

मी पुन्हा एकदा ...तुम्ही वेळ काढलात यासाठी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या मौल्यवान सूचना आम्हाला पुढे जाण्यासाठी खूप उपयोगी ठरतील. तुम्ही सूचनाही द्या, भागीदारही व्हा. तुम्ही अपेक्षा देखील कराल , जबाबदारीही घ्याल . याच विश्वासासह ...

 

खूप-खूप धन्यवाद !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Will walk shoulder to shoulder': PM Modi pushes 'Make in India, Partner with India' at Russia-India forum

Media Coverage

'Will walk shoulder to shoulder': PM Modi pushes 'Make in India, Partner with India' at Russia-India forum
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is becoming the key growth engine of the global economy: PM Modi
December 06, 2025
India is brimming with confidence: PM
In a world of slowdown, mistrust and fragmentation, India brings growth, trust and acts as a bridge-builder: PM
Today, India is becoming the key growth engine of the global economy: PM
India's Nari Shakti is doing wonders, Our daughters are excelling in every field today: PM
Our pace is constant, Our direction is consistent, Our intent is always Nation First: PM
Every sector today is shedding the old colonial mindset and aiming for new achievements with pride: PM

आप सभी को नमस्कार।

यहां हिंदुस्तान टाइम्स समिट में देश-विदेश से अनेक गणमान्य अतिथि उपस्थित हैं। मैं आयोजकों और जितने साथियों ने अपने विचार रखें, आप सभी का अभिनंदन करता हूं। अभी शोभना जी ने दो बातें बताई, जिसको मैंने नोटिस किया, एक तो उन्होंने कहा कि मोदी जी पिछली बार आए थे, तो ये सुझाव दिया था। इस देश में मीडिया हाउस को काम बताने की हिम्मत कोई नहीं कर सकता। लेकिन मैंने की थी, और मेरे लिए खुशी की बात है कि शोभना जी और उनकी टीम ने बड़े चाव से इस काम को किया। और देश को, जब मैं अभी प्रदर्शनी देखके आया, मैं सबसे आग्रह करूंगा कि इसको जरूर देखिए। इन फोटोग्राफर साथियों ने इस, पल को ऐसे पकड़ा है कि पल को अमर बना दिया है। दूसरी बात उन्होंने कही और वो भी जरा मैं शब्दों को जैसे मैं समझ रहा हूं, उन्होंने कहा कि आप आगे भी, एक तो ये कह सकती थी, कि आप आगे भी देश की सेवा करते रहिए, लेकिन हिंदुस्तान टाइम्स ये कहे, आप आगे भी ऐसे ही सेवा करते रहिए, मैं इसके लिए भी विशेष रूप से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

इस बार समिट की थीम है- Transforming Tomorrow. मैं समझता हूं जिस हिंदुस्तान अखबार का 101 साल का इतिहास है, जिस अखबार पर महात्मा गांधी जी, मदन मोहन मालवीय जी, घनश्यामदास बिड़ला जी, ऐसे अनगिनत महापुरूषों का आशीर्वाद रहा, वो अखबार जब Transforming Tomorrow की चर्चा करता है, तो देश को ये भरोसा मिलता है कि भारत में हो रहा परिवर्तन केवल संभावनाओं की बात नहीं है, बल्कि ये बदलते हुए जीवन, बदलती हुई सोच और बदलती हुई दिशा की सच्ची गाथा है।

साथियों,

आज हमारे संविधान के मुख्य शिल्पी, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिवस भी है। मैं सभी भारतीयों की तरफ से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूं।

Friends,

आज हम उस मुकाम पर खड़े हैं, जब 21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। इन 25 सालों में दुनिया ने कई उतार-चढ़ाव देखे हैं। फाइनेंशियल क्राइसिस देखी हैं, ग्लोबल पेंडेमिक देखी हैं, टेक्नोलॉजी से जुड़े डिसरप्शन्स देखे हैं, हमने बिखरती हुई दुनिया भी देखी है, Wars भी देख रहे हैं। ये सारी स्थितियां किसी न किसी रूप में दुनिया को चैलेंज कर रही हैं। आज दुनिया अनिश्चितताओं से भरी हुई है। लेकिन अनिश्चितताओं से भरे इस दौर में हमारा भारत एक अलग ही लीग में दिख रहा है, भारत आत्मविश्वास से भरा हुआ है। जब दुनिया में slowdown की बात होती है, तब भारत growth की कहानी लिखता है। जब दुनिया में trust का crisis दिखता है, तब भारत trust का pillar बन रहा है। जब दुनिया fragmentation की तरफ जा रही है, तब भारत bridge-builder बन रहा है।

साथियों,

अभी कुछ दिन पहले भारत में Quarter-2 के जीडीपी फिगर्स आए हैं। Eight परसेंट से ज्यादा की ग्रोथ रेट हमारी प्रगति की नई गति का प्रतिबिंब है।

साथियों,

ये एक सिर्फ नंबर नहीं है, ये strong macro-economic signal है। ये संदेश है कि भारत आज ग्लोबल इकोनॉमी का ग्रोथ ड्राइवर बन रहा है। और हमारे ये आंकड़े तब हैं, जब ग्लोबल ग्रोथ 3 प्रतिशत के आसपास है। G-7 की इकोनमीज औसतन डेढ़ परसेंट के आसपास हैं, 1.5 परसेंट। इन परिस्थितियों में भारत high growth और low inflation का मॉडल बना हुआ है। एक समय था, जब हमारे देश में खास करके इकोनॉमिस्ट high Inflation को लेकर चिंता जताते थे। आज वही Inflation Low होने की बात करते हैं।

साथियों,

भारत की ये उपलब्धियां सामान्य बात नहीं है। ये सिर्फ आंकड़ों की बात नहीं है, ये एक फंडामेंटल चेंज है, जो बीते दशक में भारत लेकर आया है। ये फंडामेंटल चेंज रज़ीलियन्स का है, ये चेंज समस्याओं के समाधान की प्रवृत्ति का है, ये चेंज आशंकाओं के बादलों को हटाकर, आकांक्षाओं के विस्तार का है, और इसी वजह से आज का भारत खुद भी ट्रांसफॉर्म हो रहा है, और आने वाले कल को भी ट्रांसफॉर्म कर रहा है।

साथियों,

आज जब हम यहां transforming tomorrow की चर्चा कर रहे हैं, हमें ये भी समझना होगा कि ट्रांसफॉर्मेशन का जो विश्वास पैदा हुआ है, उसका आधार वर्तमान में हो रहे कार्यों की, आज हो रहे कार्यों की एक मजबूत नींव है। आज के Reform और आज की Performance, हमारे कल के Transformation का रास्ता बना रहे हैं। मैं आपको एक उदाहरण दूंगा कि हम किस सोच के साथ काम कर रहे हैं।

साथियों,

आप भी जानते हैं कि भारत के सामर्थ्य का एक बड़ा हिस्सा एक लंबे समय तक untapped रहा है। जब देश के इस untapped potential को ज्यादा से ज्यादा अवसर मिलेंगे, जब वो पूरी ऊर्जा के साथ, बिना किसी रुकावट के देश के विकास में भागीदार बनेंगे, तो देश का कायाकल्प होना तय है। आप सोचिए, हमारा पूर्वी भारत, हमारा नॉर्थ ईस्ट, हमारे गांव, हमारे टीयर टू और टीय़र थ्री सिटीज, हमारे देश की नारीशक्ति, भारत की इनोवेटिव यूथ पावर, भारत की सामुद्रिक शक्ति, ब्लू इकोनॉमी, भारत का स्पेस सेक्टर, कितना कुछ है, जिसके फुल पोटेंशियल का इस्तेमाल पहले के दशकों में हो ही नहीं पाया। अब आज भारत इन Untapped पोटेंशियल को Tap करने के विजन के साथ आगे बढ़ रहा है। आज पूर्वी भारत में आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर, कनेक्टिविटी और इंडस्ट्री पर अभूतपूर्व निवेश हो रहा है। आज हमारे गांव, हमारे छोटे शहर भी आधुनिक सुविधाओं से लैस हो रहे हैं। हमारे छोटे शहर, Startups और MSMEs के नए केंद्र बन रहे हैं। हमारे गाँवों में किसान FPO बनाकर सीधे market से जुड़ें, और कुछ तो FPO’s ग्लोबल मार्केट से जुड़ रहे हैं।

साथियों,

भारत की नारीशक्ति तो आज कमाल कर रही हैं। हमारी बेटियां आज हर फील्ड में छा रही हैं। ये ट्रांसफॉर्मेशन अब सिर्फ महिला सशक्तिकरण तक सीमित नहीं है, ये समाज की सोच और सामर्थ्य, दोनों को transform कर रहा है।

साथियों,

जब नए अवसर बनते हैं, जब रुकावटें हटती हैं, तो आसमान में उड़ने के लिए नए पंख भी लग जाते हैं। इसका एक उदाहरण भारत का स्पेस सेक्टर भी है। पहले स्पेस सेक्टर सरकारी नियंत्रण में ही था। लेकिन हमने स्पेस सेक्टर में रिफॉर्म किया, उसे प्राइवेट सेक्टर के लिए Open किया, और इसके नतीजे आज देश देख रहा है। अभी 10-11 दिन पहले मैंने हैदराबाद में Skyroot के Infinity Campus का उद्घाटन किया है। Skyroot भारत की प्राइवेट स्पेस कंपनी है। ये कंपनी हर महीने एक रॉकेट बनाने की क्षमता पर काम कर रही है। ये कंपनी, flight-ready विक्रम-वन बना रही है। सरकार ने प्लेटफॉर्म दिया, और भारत का नौजवान उस पर नया भविष्य बना रहा है, और यही तो असली ट्रांसफॉर्मेशन है।

साथियों,

भारत में आए एक और बदलाव की चर्चा मैं यहां करना ज़रूरी समझता हूं। एक समय था, जब भारत में रिफॉर्म्स, रिएक्शनरी होते थे। यानि बड़े निर्णयों के पीछे या तो कोई राजनीतिक स्वार्थ होता था या फिर किसी क्राइसिस को मैनेज करना होता था। लेकिन आज नेशनल गोल्स को देखते हुए रिफॉर्म्स होते हैं, टारगेट तय है। आप देखिए, देश के हर सेक्टर में कुछ ना कुछ बेहतर हो रहा है, हमारी गति Constant है, हमारी Direction Consistent है, और हमारा intent, Nation First का है। 2025 का तो ये पूरा साल ऐसे ही रिफॉर्म्स का साल रहा है। सबसे बड़ा रिफॉर्म नेक्स्ट जेनरेशन जीएसटी का था। और इन रिफॉर्म्स का असर क्या हुआ, वो सारे देश ने देखा है। इसी साल डायरेक्ट टैक्स सिस्टम में भी बहुत बड़ा रिफॉर्म हुआ है। 12 लाख रुपए तक की इनकम पर ज़ीरो टैक्स, ये एक ऐसा कदम रहा, जिसके बारे में एक दशक पहले तक सोचना भी असंभव था।

साथियों,

Reform के इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए, अभी तीन-चार दिन पहले ही Small Company की डेफिनीशन में बदलाव किया गया है। इससे हजारों कंपनियाँ अब आसान नियमों, तेज़ प्रक्रियाओं और बेहतर सुविधाओं के दायरे में आ गई हैं। हमने करीब 200 प्रोडक्ट कैटगरीज़ को mandatory क्वालिटी कंट्रोल ऑर्डर से बाहर भी कर दिया गया है।

साथियों,

आज के भारत की ये यात्रा, सिर्फ विकास की नहीं है। ये सोच में बदलाव की भी यात्रा है, ये मनोवैज्ञानिक पुनर्जागरण, साइकोलॉजिकल रेनसां की भी यात्रा है। आप भी जानते हैं, कोई भी देश बिना आत्मविश्वास के आगे नहीं बढ़ सकता। दुर्भाग्य से लंबी गुलामी ने भारत के इसी आत्मविश्वास को हिला दिया था। और इसकी वजह थी, गुलामी की मानसिकता। गुलामी की ये मानसिकता, विकसित भारत के लक्ष्य की प्राप्ति में एक बहुत बड़ी रुकावट है। और इसलिए, आज का भारत गुलामी की मानसिकता से मुक्ति पाने के लिए काम कर रहा है।

साथियों,

अंग्रेज़ों को अच्छी तरह से पता था कि भारत पर लंबे समय तक राज करना है, तो उन्हें भारतीयों से उनके आत्मविश्वास को छीनना होगा, भारतीयों में हीन भावना का संचार करना होगा। और उस दौर में अंग्रेजों ने यही किया भी। इसलिए, भारतीय पारिवारिक संरचना को दकियानूसी बताया गया, भारतीय पोशाक को Unprofessional करार दिया गया, भारतीय त्योहार-संस्कृति को Irrational कहा गया, योग-आयुर्वेद को Unscientific बता दिया गया, भारतीय अविष्कारों का उपहास उड़ाया गया और ये बातें कई-कई दशकों तक लगातार दोहराई गई, पीढ़ी दर पीढ़ी ये चलता गया, वही पढ़ा, वही पढ़ाया गया। और ऐसे ही भारतीयों का आत्मविश्वास चकनाचूर हो गया।

साथियों,

गुलामी की इस मानसिकता का कितना व्यापक असर हुआ है, मैं इसके कुछ उदाहरण आपको देना चाहता हूं। आज भारत, दुनिया की सबसे तेज़ी से ग्रो करने वाली मेजर इकॉनॉमी है, कोई भारत को ग्लोबल ग्रोथ इंजन बताता है, कोई, Global powerhouse कहता है, एक से बढ़कर एक बातें आज हो रही हैं।

लेकिन साथियों,

आज भारत की जो तेज़ ग्रोथ हो रही है, क्या कहीं पर आपने पढ़ा? क्या कहीं पर आपने सुना? इसको कोई, हिंदू रेट ऑफ ग्रोथ कहता है क्या? दुनिया की तेज इकॉनमी, तेज ग्रोथ, कोई कहता है क्या? हिंदू रेट ऑफ ग्रोथ कब कहा गया? जब भारत, दो-तीन परसेंट की ग्रोथ के लिए तरस गया था। आपको क्या लगता है, किसी देश की इकोनॉमिक ग्रोथ को उसमें रहने वाले लोगों की आस्था से जोड़ना, उनकी पहचान से जोड़ना, क्या ये अनायास ही हुआ होगा क्या? जी नहीं, ये गुलामी की मानसिकता का प्रतिबिंब था। एक पूरे समाज, एक पूरी परंपरा को, अन-प्रोडक्टिविटी का, गरीबी का पर्याय बना दिया गया। यानी ये सिद्ध करने का प्रयास किया गया कि, भारत की धीमी विकास दर का कारण, हमारी हिंदू सभ्यता और हिंदू संस्कृति है। और हद देखिए, आज जो तथाकथित बुद्धिजीवी हर चीज में, हर बात में सांप्रदायिकता खोजते रहते हैं, उनको हिंदू रेट ऑफ ग्रोथ में सांप्रदायिकता नज़र नहीं आई। ये टर्म, उनके दौर में किताबों का, रिसर्च पेपर्स का हिस्सा बना दिया गया।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने भारत में मैन्युफेक्चरिंग इकोसिस्टम को कैसे तबाह कर दिया, और हम इसको कैसे रिवाइव कर रहे हैं, मैं इसके भी कुछ उदाहरण दूंगा। भारत गुलामी के कालखंड में भी अस्त्र-शस्त्र का एक बड़ा निर्माता था। हमारे यहां ऑर्डिनेंस फैक्ट्रीज़ का एक सशक्त नेटवर्क था। भारत से हथियार निर्यात होते थे। विश्व युद्धों में भी भारत में बने हथियारों का बोल-बाला था। लेकिन आज़ादी के बाद, हमारा डिफेंस मैन्युफेक्चरिंग इकोसिस्टम तबाह कर दिया गया। गुलामी की मानसिकता ऐसी हावी हुई कि सरकार में बैठे लोग भारत में बने हथियारों को कमजोर आंकने लगे, और इस मानसिकता ने भारत को दुनिया के सबसे बड़े डिफेंस importers के रूप में से एक बना दिया।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने शिप बिल्डिंग इंडस्ट्री के साथ भी यही किया। भारत सदियों तक शिप बिल्डिंग का एक बड़ा सेंटर था। यहां तक कि 5-6 दशक पहले तक, यानी 50-60 साल पहले, भारत का फोर्टी परसेंट ट्रेड, भारतीय जहाजों पर होता था। लेकिन गुलामी की मानसिकता ने विदेशी जहाज़ों को प्राथमिकता देनी शुरु की। नतीजा सबके सामने है, जो देश कभी समुद्री ताकत था, वो अपने Ninety five परसेंट व्यापार के लिए विदेशी जहाज़ों पर निर्भर हो गया है। और इस वजह से आज भारत हर साल करीब 75 बिलियन डॉलर, यानी लगभग 6 लाख करोड़ रुपए विदेशी शिपिंग कंपनियों को दे रहा है।

साथियों,

शिप बिल्डिंग हो, डिफेंस मैन्यूफैक्चरिंग हो, आज हर सेक्टर में गुलामी की मानसिकता को पीछे छोड़कर नए गौरव को हासिल करने का प्रयास किया जा रहा है।

साथियों,

गुलामी की मानसिकता ने एक बहुत बड़ा नुकसान, भारत में गवर्नेंस की अप्रोच को भी किया है। लंबे समय तक सरकारी सिस्टम का अपने नागरिकों पर अविश्वास रहा। आपको याद होगा, पहले अपने ही डॉक्यूमेंट्स को किसी सरकारी अधिकारी से अटेस्ट कराना पड़ता था। जब तक वो ठप्पा नहीं मारता है, सब झूठ माना जाता था। आपका परिश्रम किया हुआ सर्टिफिकेट। हमने ये अविश्वास का भाव तोड़ा और सेल्फ एटेस्टेशन को ही पर्याप्त माना। मेरे देश का नागरिक कहता है कि भई ये मैं कह रहा हूं, मैं उस पर भरोसा करता हूं।

साथियों,

हमारे देश में ऐसे-ऐसे प्रावधान चल रहे थे, जहां ज़रा-जरा सी गलतियों को भी गंभीर अपराध माना जाता था। हम जन-विश्वास कानून लेकर आए, और ऐसे सैकड़ों प्रावधानों को डी-क्रिमिनलाइज किया है।

साथियों,

पहले बैंक से हजार रुपए का भी लोन लेना होता था, तो बैंक गारंटी मांगता था, क्योंकि अविश्वास बहुत अधिक था। हमने मुद्रा योजना से अविश्वास के इस कुचक्र को तोड़ा। इसके तहत अभी तक 37 lakh crore, 37 लाख करोड़ रुपए की गारंटी फ्री लोन हम दे चुके हैं देशवासियों को। इस पैसे से, उन परिवारों के नौजवानों को भी आंत्रप्रन्योर बनने का विश्वास मिला है। आज रेहड़ी-पटरी वालों को भी, ठेले वाले को भी बिना गारंटी बैंक से पैसा दिया जा रहा है।

साथियों,

हमारे देश में हमेशा से ये माना गया कि सरकार को अगर कुछ दे दिया, तो फिर वहां तो वन वे ट्रैफिक है, एक बार दिया तो दिया, फिर वापस नहीं आता है, गया, गया, यही सबका अनुभव है। लेकिन जब सरकार और जनता के बीच विश्वास मजबूत होता है, तो काम कैसे होता है? अगर कल अच्छी करनी है ना, तो मन आज अच्छा करना पड़ता है। अगर मन अच्छा है तो कल भी अच्छा होता है। और इसलिए हम एक और अभियान लेकर आए, आपको सुनकर के ताज्जुब होगा और अभी अखबारों में उसकी, अखबारों वालों की नजर नहीं गई है उस पर, मुझे पता नहीं जाएगी की नहीं जाएगी, आज के बाद हो सकता है चली जाए।

आपको ये जानकर हैरानी होगी कि आज देश के बैंकों में, हमारे ही देश के नागरिकों का 78 thousand crore रुपया, 78 हजार करोड़ रुपए Unclaimed पड़ा है बैंको में, पता नहीं कौन है, किसका है, कहां है। इस पैसे को कोई पूछने वाला नहीं है। इसी तरह इन्श्योरेंश कंपनियों के पास करीब 14 हजार करोड़ रुपए पड़े हैं। म्यूचुअल फंड कंपनियों के पास करीब 3 हजार करोड़ रुपए पड़े हैं। 9 हजार करोड़ रुपए डिविडेंड का पड़ा है। और ये सब Unclaimed पड़ा हुआ है, कोई मालिक नहीं उसका। ये पैसा, गरीब और मध्यम वर्गीय परिवारों का है, और इसलिए, जिसके हैं वो तो भूल चुका है। हमारी सरकार अब उनको ढूंढ रही है देशभर में, अरे भई बताओ, तुम्हारा तो पैसा नहीं था, तुम्हारे मां बाप का तो नहीं था, कोई छोड़कर तो नहीं चला गया, हम जा रहे हैं। हमारी सरकार उसके हकदार तक पहुंचने में जुटी है। और इसके लिए सरकार ने स्पेशल कैंप लगाना शुरू किया है, लोगों को समझा रहे हैं, कि भई देखिए कोई है तो अता पता। आपके पैसे कहीं हैं क्या, गए हैं क्या? अब तक करीब 500 districts में हम ऐसे कैंप लगाकर हजारों करोड़ रुपए असली हकदारों को दे चुके हैं जी। पैसे पड़े थे, कोई पूछने वाला नहीं था, लेकिन ये मोदी है, ढूंढ रहा है, अरे यार तेरा है ले जा।

साथियों,

ये सिर्फ asset की वापसी का मामला नहीं है, ये विश्वास का मामला है। ये जनता के विश्वास को निरंतर हासिल करने की प्रतिबद्धता है और जनता का विश्वास, यही हमारी सबसे बड़ी पूंजी है। अगर गुलामी की मानसिकता होती तो सरकारी मानसी साहबी होता और ऐसे अभियान कभी नहीं चलते हैं।

साथियों,

हमें अपने देश को पूरी तरह से, हर क्षेत्र में गुलामी की मानसिकता से पूर्ण रूप से मुक्त करना है। अभी कुछ दिन पहले मैंने देश से एक अपील की है। मैं आने वाले 10 साल का एक टाइम-फ्रेम लेकर, देशवासियों को मेरे साथ, मेरी बातों को ये कुछ करने के लिए प्यार से आग्रह कर रहा हूं, हाथ जोड़कर विनती कर रहा हूं। 140 करोड़ देशवसियों की मदद के बिना ये मैं कर नहीं पाऊंगा, और इसलिए मैं देशवासियों से बार-बार हाथ जोड़कर कह रहा हूं, और 10 साल के इस टाइम फ्रैम में मैं क्या मांग रहा हूं? मैकाले की जिस नीति ने भारत में मानसिक गुलामी के बीज बोए थे, उसको 2035 में 200 साल पूरे हो रहे हैं, Two hundred year हो रहे हैं। यानी 10 साल बाकी हैं। और इसलिए, इन्हीं दस वर्षों में हम सभी को मिलकर के, अपने देश को गुलामी की मानसिकता से मुक्त करके रहना चाहिए।

साथियों,

मैं अक्सर कहता हूं, हम लीक पकड़कर चलने वाले लोग नहीं हैं। बेहतर कल के लिए, हमें अपनी लकीर बड़ी करनी ही होगी। हमें देश की भविष्य की आवश्यकताओं को समझते हुए, वर्तमान में उसके हल तलाशने होंगे। आजकल आप देखते हैं कि मैं मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान पर लगातार चर्चा करता हूं। शोभना जी ने भी अपने भाषण में उसका उल्लेख किया। अगर ऐसे अभियान 4-5 दशक पहले शुरू हो गए होते, तो आज भारत की तस्वीर कुछ और होती। लेकिन तब जो सरकारें थीं उनकी प्राथमिकताएं कुछ और थीं। आपको वो सेमीकंडक्टर वाला किस्सा भी पता ही है, करीब 50-60 साल पहले, 5-6 दशक पहले एक कंपनी, भारत में सेमीकंडक्टर प्लांट लगाने के लिए आई थी, लेकिन यहां उसको तवज्जो नहीं दी गई, और देश सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग में इतना पिछड़ गया।

साथियों,

यही हाल एनर्जी सेक्टर की भी है। आज भारत हर साल करीब-करीब 125 लाख करोड़ रुपए के पेट्रोल-डीजल-गैस का इंपोर्ट करता है, 125 लाख करोड़ रुपया। हमारे देश में सूर्य भगवान की इतनी बड़ी कृपा है, लेकिन फिर भी 2014 तक भारत में सोलर एनर्जी जनरेशन कपैसिटी सिर्फ 3 गीगावॉट थी, 3 गीगावॉट थी। 2014 तक की मैं बात कर रहा हूं, जब तक की आपने मुझे यहां लाकर के बिठाया नहीं। 3 गीगावॉट, पिछले 10 वर्षों में अब ये बढ़कर 130 गीगावॉट के आसपास पहुंच चुकी है। और इसमें भी भारत ने twenty two गीगावॉट कैपेसिटी, सिर्फ और सिर्फ rooftop solar से ही जोड़ी है। 22 गीगावाट एनर्जी रूफटॉप सोलर से।

साथियों,

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ने, एनर्जी सिक्योरिटी के इस अभियान में देश के लोगों को सीधी भागीदारी करने का मौका दे दिया है। मैं काशी का सांसद हूं, प्रधानमंत्री के नाते जो काम है, लेकिन सांसद के नाते भी कुछ काम करने होते हैं। मैं जरा काशी के सांसद के नाते आपको कुछ बताना चाहता हूं। और आपके हिंदी अखबार की तो ताकत है, तो उसको तो जरूर काम आएगा। काशी में 26 हजार से ज्यादा घरों में पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के सोलर प्लांट लगे हैं। इससे हर रोज, डेली तीन लाख यूनिट से अधिक बिजली पैदा हो रही है, और लोगों के करीब पांच करोड़ रुपए हर महीने बच रहे हैं। यानी साल भर के साठ करोड़ रुपये।

साथियों,

इतनी सोलर पावर बनने से, हर साल करीब नब्बे हज़ार, ninety thousand मीट्रिक टन कार्बन एमिशन कम हो रहा है। इतने कार्बन एमिशन को खपाने के लिए, हमें चालीस लाख से ज्यादा पेड़ लगाने पड़ते। और मैं फिर कहूंगा, ये जो मैंने आंकडे दिए हैं ना, ये सिर्फ काशी के हैं, बनारस के हैं, मैं देश की बात नहीं बता रहा हूं आपको। आप कल्पना कर सकते हैं कि, पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, ये देश को कितना बड़ा फायदा हो रहा है। आज की एक योजना, भविष्य को Transform करने की कितनी ताकत रखती है, ये उसका Example है।

वैसे साथियों,

अभी आपने मोबाइल मैन्यूफैक्चरिंग के भी आंकड़े देखे होंगे। 2014 से पहले तक हम अपनी ज़रूरत के 75 परसेंट मोबाइल फोन इंपोर्ट करते थे, 75 परसेंट। और अब, भारत का मोबाइल फोन इंपोर्ट लगभग ज़ीरो हो गया है। अब हम बहुत बड़े मोबाइल फोन एक्सपोर्टर बन रहे हैं। 2014 के बाद हमने एक reform किया, देश ने Perform किया और उसके Transformative नतीजे आज दुनिया देख रही है।

साथियों,

Transforming tomorrow की ये यात्रा, ऐसी ही अनेक योजनाओं, अनेक नीतियों, अनेक निर्णयों, जनआकांक्षाओं और जनभागीदारी की यात्रा है। ये निरंतरता की यात्रा है। ये सिर्फ एक समिट की चर्चा तक सीमित नहीं है, भारत के लिए तो ये राष्ट्रीय संकल्प है। इस संकल्प में सबका साथ जरूरी है, सबका प्रयास जरूरी है। सामूहिक प्रयास हमें परिवर्तन की इस ऊंचाई को छूने के लिए अवसर देंगे ही देंगे।

साथियों,

एक बार फिर, मैं शोभना जी का, हिन्दुस्तान टाइम्स का बहुत आभारी हूं, कि आपने मुझे अवसर दिया आपके बीच आने का और जो बातें कभी-कभी बताई उसको आपने किया और मैं तो मानता हूं शायद देश के फोटोग्राफरों के लिए एक नई ताकत बनेगा ये। इसी प्रकार से अनेक नए कार्यक्रम भी आप आगे के लिए सोच सकते हैं। मेरी मदद लगे तो जरूर मुझे बताना, आईडिया देने का मैं कोई रॉयल्टी नहीं लेता हूं। मुफ्त का कारोबार है और मारवाड़ी परिवार है, तो मौका छोड़ेगा ही नहीं। बहुत-बहुत धन्यवाद आप सबका, नमस्कार।