नमस्कार!

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार आणि आमदार, बंधू आणि भगिनींनो!

उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. भारताचा  गौरव, भारताची ओळख आणि संस्कृती रक्षक, देशाचे महानायक शिवाजी महाराज यांच्या चरणी सर्वात प्रथम मी आदरपूर्वक प्रणाम करतो. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर ठाणे-दिवा यांच्या दरम्यान नव्याने बनविण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रारंभानिमित्त मुंबईकरांचे खूप- खूप अभिनंदन!

ही नवीन रेल्वे मार्गिका, मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठे परिवर्तन आणणार आहे. त्याच्यांसाठी जीवन अधिक सुकर करणार आहे. ही नवीन रेल्वे मार्गिका मुंबईच्या कधीही न थांबणा-या जिवनाला अधिक गती देईल. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यामुळे मुंबईच्या लोकांना अगदी सरळ सरळ चार फायदे होणार आहेत.

पहिला - आता उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी दोन वेगवेगळ्या मार्गिका असतील.

दुसरा - दुस-या राज्यांतून मुंबईला येणा-या-जाणा-या गाड्यांना आता उपनगरी गाड्यांच्या पासिंगसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

तिसरा - कल्याण ते कुर्ला विभागामध्ये मेल-एक्सप्रेस गाड्या आता कोणत्याही अडथळ्यांविना चालवणे शक्य होईल.

आणि चौथा फायदा -  प्रत्येक रविवारी होणा-या मेगाब्लॉकच्या कारणामुळे कळवा आणि मुंब्रा या भागातल्या लोकांचा त्रास आता दूर होणार आहे.

 

मित्रांनो,

आजपासून मध्यरेल्वे मार्गावर 36 नवीन उपनगरी गाड्या सुरू होत आहेत. यापैकी बहुतांश गाड्या वातानुकुलित आहेत. उपनगरी गाड्यांच्या सुविधांचा विस्तार करणे, उपनगरी गाड्या आधुनिक बनविणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईमध्ये मेट्रोचाही विस्तार करण्यात आला आहे. मुंबईला लागून असलेल्या उपनगरांमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारण्यात येत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

दशकांपासून मुंबईची सेवा करीत असलेल्या उपनगरी सेवेचा विस्तार करणे, उपनगरी गाड्या आधुनिक बनविण्याची मागणी खूप जुनी आहे. 2008 मध्ये या 5व्या आणि 6 व्या मार्गिकेचा शिलान्यास झाला होता. हे काम 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दुर्भाग्य असे आहे की, 2014 पर्यंत हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी रखडला होता. त्यानंतर मात्र आम्ही या प्रकल्पाच्या काम वेगाने सुरू केले. प्रकल्पाच्या कामात येणा-या समस्या सोडविल्या.

मला असे सांगण्यात आले की, 34 स्थान तर असे होते की, तिथे नवीन लोहमार्गाला जुना लोहमार्ग जोडला जाणार होता. अनेक आव्हानांचा सामना केल्यानंतर आपल्या श्रमिकांनी, आपल्या अभियंत्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. डझनभर पूल बनवले, उड्डाण पूल बनवले, बोगदे तयार केले. राष्ट्रनिर्माणासाठी अशा समर्पणाला मी अगदी मनापासून-हृदयापासून नमन करतो. सर्वांचे अभिनंदनही करतो.

बंधू आणि भगिनींनो,

मुंबई महानगराने स्वतंत्र भारताच्या प्रगतीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आता प्रयत्न आहे की, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणामध्येही मुंबईचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढले पाहिजे. म्हणूनच मुंबईमध्ये 21 व्या शतकातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचा विशेष भर आहे. रेल्वे संपर्क व्यवस्थेची गोष्ट करायची झाली तर इथे हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरी रेल्वेला आधुनिक आणि श्रेष्ठ तंत्रज्ञानाने युक्त केले जात आहे. आमचा प्रयत्न आहे की, आत्ता जी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेची क्षमता आहे, त्यामध्ये जवळ-जवळ 400 किलोमीटरची अधिक वृद्धी केली जावी. सीबीटीसी सारख्या आधुनिक सिग्नल व्यवस्थेबरोबरच 19 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचीही योजना आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण देशातल्या इतर राज्यांना मुंबईच्या रेल्वे संपर्क व्यवस्थेमध्ये अशाच वेगाची आवश्यकता आहे, त्यांना आधुनिक बनविण्याची गरज आहे. म्हणूनच अहमदाबाद -मुंबई अतिवेगवान रेल्वे म्हणजे आज मुंबई आणि देशाची आवश्यकता आहे. ही आधुनिक रेल्वे मुंबईच्या क्षमतेला, मुंबई म्हणजे स्वप्नातले शहर म्हणून जी ओळख आहे, ती अधिक सशक्त करेल. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्राधान्य आहे. याच प्रकारे मालवाहतूकसमर्पित पश्चिमीमार्गिकाही मुंबईला नव्याने ताकद देणार आहे.

मित्रांनो,

आपण सर्वजण जाणून आहात की, जितके लोक भारतीय रेल्वेने एका दिवसात प्रवास करतात, तितकी तर अनेक देशांची लोकसंख्याही नाही. भारतीय रेल्वे अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि आधुनिक बनविण्यासाठी आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलेल्या कार्यांपैकी एक आहे. आमच्या या कटिबद्धतेला कोरोना वैश्विक महामारीसुद्धा डळमळीत करू शकली नाही. गेल्या दोन वर्षात रेल्वेने माल वाहतुकीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्याचबरोबर 8 हजार किलोमीटरच्या रेलमार्गाचे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण केले. जवळपास साडे चार हजार किलोमीटरची नवीन लोहमार्ग बनवणे अथवा असलेल्या मार्गाचे दुपदरीकरणाचे कामही केले आहे. कोरोना काळामध्ये आम्ही शेतकरी रेल्वेच्या माध्यमातून देशातल्या शेतकरी बांधवांना देशभरातल्या बाजारपेठांशी जोडले आहे.

मित्रांनो,

आपण सर्वजण हेही जाणून आहे की, रेल्वेमध्ये सुधारणा झाली तर लॉजिस्टिक सेक्टरमध्ये क्रांतीकारी परिवर्तन घडून येऊ शकते. म्हणूनच गेल्या सात वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या सुधारणांना प्रोत्साहन दिले आहे. भूतकाळामध्ये पायाभूत प्रकल्पांचे काम वर्षानुवर्षे चालत होते, कारण नियोजनापासून ते त्याच्या अंमलबजावणीपर्यंत कोणत्याही बाबतीत संतुलनाची कमतरता होती. असा दृष्टीकोन 21 व्या शतकातल्या भारतामध्ये पायाभूत सुविधांचे निर्माण करताना असणे योग्य नाही.

म्हणूनच आम्ही पीएम गतिशक्ती मास्टरप्लान तयार केला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा  प्रत्येक विभाग, स्थानिक प्रशासनआणि खाजगी क्षेत्र यांना एकाच डिजिटल मंचावर एकत्रित आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. पायाभूत सुविधेसाठी सुरू असलेल्या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती त्या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक भागिदाराला पहिल्यापासूनच मिळाली पाहिजे, यासाठी असा संयुक्त मंच तयार केला आहे. सर्व माहिती असेल तरच प्रत्येकजण आपआपल्या वाटणीचे काम, त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करू शकणार आहे. मुंबई आणि देशात सुरू असलेल्या इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही आम्ही गतिशक्तीच्या भावनेतूनच काम करणार आहोत.

मित्रांनो,

अनेक वर्षांपासून इथे एका विशिष्ट प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीचा पगडा आहे. जी साधन-सामुग्री गरीब वापरतात, मध्यमवर्ग वापरतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केली जावू नये, असा हा विचार होता. या कारणाने भारतामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीच फारशी चांगली  नव्हती. आता मात्र भारत तो जुना विचार मागे सोडून  पुढे जात आहे. आता  सहा हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या देशाच्या रेल्वेला गती आणि आधुनिक सुविधा देत आहेत. आगामी वर्षांमध्ये 400 नवीन वंदे भारत रेल्वे गाड्या देशवासियांना सेवा देण्यास प्रारंभ करतील.

 

बंधू आणि भगिनींनो,

आणखी एक जुना दृष्टीकोन आमच्या सरकारने बदलला आहे, तो म्हणजे रेल्वेला आपल्या सामर्थ्यावर विश्वास आहे. 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत देशातले जे रेल्वे कोच- डबे बनविण्याचे कारखाने होते, त्यांच्याविषयी अतिशय उदासीनता होती. या कारखान्यांची स्थिती पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की, हे कारखाने इतक्या आधुनिक गाड्या  बनवू शकतील. मात्र  आज वंदे भारत गाड्या आणि स्वदेशी विस्टाडोम डबे याच कारखान्यांमध्ये बनत आहेत. आज आपण आपल्या सिग्नल कार्यप्रणालीला स्वदेशी पर्याय निवडून आधुनिक बनविण्यासाठीही सातत्याने काम करीत आहोत. स्वदेशी पर्याय पाहिजे, कारण आपल्याला परदेशी अवलंबित्वातून मुक्त झाले पाहिजे.

मित्रांनो,

नवीन सुविधा विकसित करण्याच्या या प्रयत्नांचा खूप मोठा लाभ मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना होणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गातल्या परिवारांना या नवीन सुविधा सहजपणे मिळतील आणि त्यांच्यासाठी कमाईचे साधनही मिळेल. मुंबईच्या निरंतर विकासाच्या वचनबद्धतेबरोबरच पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे खूप खूप अभिनंदन करतो.

खूप - खूप धन्यवाद !!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India trained 85,000 engineers in 4 years under Semicon 2.0: Vaishnaw

Media Coverage

India trained 85,000 engineers in 4 years under Semicon 2.0: Vaishnaw
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM's address during post-budget webinar on “Sustaining and Strengthening Economic Growth”
March 03, 2026
This year’s Union Budget reinforces our commitment to sustaining and strengthening economic growth: PM
Our direction is clear, our resolve is clear,Build more, produce more, connect more, export more: PM
The world is looking for reliable and resilient manufacturing partners, and today India has the opportunity to firmly fulfill this role: PM
India has signed Free Trade Agreements with many countries, a very large door of opportunities has opened for us, and in such a situation, it is our responsibility to never compromise on quality: PM
The Carbon Capture, Utilisation and Storage Mission is an important initiative, integrating sustainability in core business strategy will be essential: PM
The industries that invest in clean technology in time will be able to build better access to new markets in the coming years: PM
A major transformation is happening in the world economy today, as markets now look not only at cost but also at sustainability: PM

नमस्कार !

गत् सप्ताह, बजट वेबिनार सीरीज के पहले वेबिनार का आयोजन हुआ, और मुझे ऐसा बताया गया कि वो बहुत सफल रहा, और बजट प्रावधानों के Implementation को लेकर हर किसी ने काफी उत्तम सुझाव दिए, सबकी सक्रिय भागीदारी का मैं स्वागत करता हूं और आज इस सीरीज के दूसरे वेबिनार का आयोजन हो रहा है। और मुझे बताया गया कि आज हजारों की तादाद में, ढेर सारे विषयों पर अनगिनत लोग अपने सुझाव देने वाले हैं। विषय के जो एक्सपर्ट्स हैं, वे भी हमसे जुड़ने वाले हैं। इतनी बड़ी तादाद में बजट पर चर्चा, ये अपने आप में एक बहुत सफल प्रयोग है। आप सब समय निकाल करके इस वेबिनार में जुड़े। मैं आप सभी का अभिनंदन करता हूं, आपका स्वागत करता हूं। इस वेबिनार की थीम देश की Economic Growth को निरंतर मजबूती देने से जुड़ी हुई है। आज जब भारत अपनी मजबूत economy से पूरे विश्व की उम्मीद बना हुआ है, आज जब ग्लोबल सप्लाई चैन re-shape हो रही है, तब अर्थव्यवस्था की तेज प्रगति विकसित भारत का भी बहुत बड़ा आधार है। हमारी दिशा स्पष्ट है, हमारा संकल्प स्पष्ट है, Build more, produce more, connect more और अब जरूरत है Export more, और निश्चित तौर पर इसमें आज आपके बीच जो मंथन होगा, इस मंथन से जो सुझाव निकलेंगे, उनकी बड़ी भूमिका होगी।

साथियों,

आप सब जानते हैं, मैन्युफैक्चरिंग, लॉजिस्टिक्स, हमारे MSME's, लघु उद्योग, कुटीर उद्योग, इतना ही नहीं, हमारे छोटे-बड़े शहर, ये अर्थव्यवस्था के पिलर्स के तौर पर दिखने में तो अलग-अलग लगते हैं, लेकिन वे सभी interconnected हैं। जैसे, मजबूत मैन्युफैक्चरिंग नए अवसर तैयार करती है, और इससे निर्यात में बढ़ोतरी होती है। Competitive MSMEs से flexibility और इनोवेशन को बढ़ावा मिलता है। बेहतर लॉजिस्टिक्स से लागत कम होती है। Well-planned शहर investment और talent दोनों को अपनी ओर खींचते हैं। इन सभी पिलर्स को इस साल के बजट ने बहुत मजबूती दी है।

लेकिन साथियों,

कोई भी दिशा अपने आप परिणाम नहीं बन जाती, जमीन पर बदलाव तब आता है, जब industry, financial institutions, राज्य सरकारें, मिलकर उसे वास्तविकता बनाते हैं। मेरी अपेक्षा है, इस वेबिनार में आप सभी अपने मंथन में कुछ विषयों को जरूर प्राथमिकता दें, जैसे मैन्युफैक्चरिंग और प्रॉडक्शन, ये कैसे बढ़े, Cost structure को कैसे कंपटीटिव बनाया जा सकता है, निवेश का प्रवाह कैसे तेज हो, और विकास कैसे देश के कोने-कोने तक पहुंचे। इस दिशा में आपके सुझाव बहुत अहम साबित होंगे।

साथियों,

मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में आज देश कोर इंडस्ट्रियल क्षमताओं को मजबूत कर रहा है। और इस मार्ग में जो चुनौतियां हैं, उन्हें भी दूर किया जा रहा है। Dedicated Rare Earth Corridors, कंटेनर मैन्युफैक्चरिंग, ऐसे सेक्टर्स पर फोकस करके हम अपने ट्रेड इकोसिस्टम को मजबूत करने का प्रयास कर रहे हैं। बजट में बायोफार्मा शक्ति मिशन की घोषणा भी की गई है। इस मिशन का उद्देश्य है, भारत को biologics और next-generation थेरेपीज के क्षेत्र में ग्लोबल हब बनाना। हम Advanced Biopharma Research और मैन्युफैक्चरिंग में लीडरशिप की ओर बढ़ना चाहते हैं।

साथियों,

आज दुनिया विश्वसनीय और resilient manufacturing partners की तलाश में है। भारत के पास यह अवसर है कि वह इस भूमिका को मजबूती से निभाए। इसके लिए आप सभी स्टेकहोल्डर्स को बहुत आत्मविश्वास के साथ निवेश करना होगा, नई टेक्नोलॉजी अपनानी होगी और रिसर्च में जो कंजूसी करते हैं ना, वो जमाना चला गया, अब हमें रिसर्च में बड़ा इनवेस्टमेंट करना होगा, और ग्लोबल स्टैंडर्ड के अनुरूप क्वालिटी भी सुनिश्चित करनी होगी, और मैं बार-बार कहता हूं कि अब हमें आगे बढ़ने के जब अवसर आए हैं, तो हमारा एक ही मंत्र होना चाहिए, क्वालिटी-क्वालिटी-क्वालिटी।

साथियों,

भारत ने बहुत सारे देशों के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट किए हैं। हमारे लिए अवसरों का, यानि अवसरों का बहुत बड़ा द्वार खुला है। ऐसे में हमारी ज़िम्मेदारी है कि हम क्वालिटी पर कभी भी समझौता ना करें, अगर किसी एक चीज पर सबसे ज्यादा ताकत, बुद्धि, शक्ति, समझ लगानी है, तो हमें क्वालिटी पर बहुत ज्यादा जोर देना चाहिए। हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी ग्लोबल स्टैंडर्ड, इतना ही नहीं, उससे भी बेहतर हो। और इसके लिए हमें दूसरे देशों की जरूरतों को, वहां के लोगों की अपेक्षाओं को भी, उसका अध्ययन करना पड़ेगा, रिसर्च करनी पड़ेगी, उसे समझना होगा। हमें दूसरे देशों के लोगों की पसंद और उनके कंफर्ट को स्टडी करना, ये सबसे बड़ी आवश्यकता है, और रिसर्च करनी चाहिए। मान लीजिए कोई छोटा पुर्जा मांगता है, और वो बहुत बड़ा जहाज बना रहा है, लेकिन हम पुर्जे में चलो भेज दो, क्या है? तो कौन लेगा आपका पुर्जा? भले आपके लिए वह छोटा पुर्जा है, लेकिन उसकी एक बहुत बड़ी जो मैन्युफैक्चरिंग की यूनिट है, उसमें बहुत बड़ा महत्व रखता है। और इसलिए आज दुनिया में हमारे लिए क्वालिटी ही इस कंपिटिटिव वर्ल्ड के अंदर सुनहरा अवसर बना देती है। हमें उनके हिसाब से यूजर फ्रेंडली प्रोडक्ट बनाने होंगे। तभी हम उन अवसरों का लाभ उठा पाएंगे, और जो फ्री ट्रेड एग्रीमेंट तैयार हो चुका है, अब ये विकास का महामार्ग आपके लिए तैयार है। मैं उम्मीद करता हूं कि इस वेबिनार में इस विषय पर फोकस करते हुए भी आप सब जरूर चर्चा करेंगे।

 

साथियों,

हमने MSME classification में जो Reforms किए, उसका व्यापक प्रभाव दिख रहा है। इससे enterprises का ये डर खत्म हुआ है कि वो अपना विस्तार करेंगे, तो उन्हें सरकार की ओर से मिलने वाले फायदे बंद हो जाएंगे। क्रेडिट तक MSME's की आसान पहुंच बनाने, टेक्नोलॉजी अपग्रेडेशन को बढ़ावा देने और कपैसिटी बिल्डिंग की दिशा में लगातार प्रयास हुए हैं।

लेकिन साथियों,

इन प्रयासों का असर तभी दिखाई देगा, जब MSMEs ज्यादा से ज्यादा कंपटीशन में उतरेंगे, और विजयी होने का लक्ष्य लेकर उतरेंगे। अब समय है कि MSMEs अपनी प्रोडक्टिविटी और बढ़ाएं, क्वालिटी स्टैंडर्ड्स को ऊंचा करें, डिजिटल प्रोसेस और मजबूत वैल्यू चैन से जुड़ें। इस दिशा में, इस वेबिनार में आपके सुझाव बहुत अहम होंगे।

साथियों,

इंफ्रास्ट्रक्चर और लॉजिस्टिक्स हमारी growth strategy के कोर पिलर्स हैं। इस वर्ष के बजट में रिकॉर्ड कैपिटल एक्सपेंडिचर का प्रस्ताव है। High-capacity transport systems का निर्माण, रेलवे, हाइवे, पोर्ट, एयरपोर्ट, वाटरवे के बीच बेहतर तालमेल, अलग-अलग फ्रेट कॉरिडोर और मल्टी-मोडल कनेक्टिविटी का विस्तार, ये सभी कदम खर्च कम करने और efficiency improve करने के लिए आवश्यक है। इसलिए, नए वाटरवेज, शिप रिपेयर फैसिलिटी और Regional Centres of Excellence हमारे लॉजिस्टिक इकोसिस्टम को मजबूत करेंगे। सात नए हाई-स्पीड रेल कॉरिडोर विकास के ग्रोथ कनेक्टर बनने वाले हैं। लेकिन आप भी जानते हैं, इस इंफ्रास्ट्रक्चर का वास्तविक लाभ तभी मिलेगा, जब उद्योग और निवेशक अपनी रणनीतियों को इस विजन के अनुरूप में ढालेंगे। ये रणनीतियां क्या होगी, इस पर भी आपको विस्तार से चर्चा करनी चाहिए, और मुझे पूरा विश्वास है कि आप जरूर इन बातों पर ध्यान देंगे।

 

साथियों,

भारत की विकास यात्रा में अर्बनाइजेशन, शहरीकरण का भी बहुत अहम रोल है। भारत की future growth इस बात पर निर्भर करेगी कि हम अपने शहरों को कितना effectively plan और manage करते हैं। हमारे Tier-II और Tier-III शहर, नए growth anchors कैसे बनें, इसके लिए भी इस बजट वेबिनार में आपके सुझाव बहुत अहम होंगे।

साथियों,

आज दुनिया की अर्थव्यवस्था में एक बड़ा परिवर्तन चल रहा है। बाजार अब केवल लागत नहीं देखते हैं, वे sustainability भी देखते हैं। इस दिशा में Carbon Capture, Utilisation and Storage Mission एक महत्वपूर्ण पहल है। अब sustainability उसको आपको core business strategy का हिस्सा बनाना ही होगा। जो उद्योग समय रहते क्लीन टेक्नोलॉजी में निवेश करेंगे, वे आने वाले वर्षों में नए-नए बाजारों तक बेहतर पहुंच बना पाएंगे। इस साल बजट ने नई दिशा दी है। मेरा आग्रह है कि उद्योग, निवेशक और विभिन्न संस्थान मिलकर इस पर आगे बढ़ें।

साथियों,

विकसित भारत का लक्ष्य collective ownership से ही हासिल किया जा सकता है। ये बजट वेबिनार भी सिर्फ discussion का प्लेटफॉर्म ना बने, सिर्फ अपने ज्ञान को हम बटोरते रहे, ऐसा नहीं होना चाहिए, बल्कि इसमें collective ownership दिखे, ये बहुत जरूरी है। बजट ने framework दिया है, अब आपको मिलकर momentum पैदा करना है। आपको हमारे प्रयासों में सहभागी बनना है। आपका हर सुझाव, हर अनुभव जमीन पर बेहतरीन नतीजें लाने की क्षमता रखता है। आपके सुझाव देश की प्रगति में माइलस्टोन बनें, इसी विश्वास के साथ आपका बहुत-बहुत धन्यवाद।

नमस्कार !