नमस्कार,

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रमेश पोखरियाल निशंक, संजय धोत्रे, IIT खरगपूरचे अध्यक्ष संजीव गोयंका, संचालक व्ही. के तिवारी, अन्य अध्यापक सदस्य, सर्व कर्मचारी मित्र, पालक आणि माझ्या युवा मित्रानो!! आजचा दिवस IIT खरगपुरच्या त्या विद्यार्थ्यांसाठीच महत्वाचा नाही ज्यांना पदवी मिळणार आहे. आजचा दिवस नवभारताच्या निर्मितीसाठी देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. तुम्हा सर्वांशी केवळ तुमचे पालक आणि तुमचे प्राध्यापक यांच्याच आशा निगडित नाहीत तर 130 कोटी भारतवासियांच्या आकांक्षांचे देखील तुम्ही प्रतिनिधी आहात. म्हणूनच या संस्थेतून देशाला 21 व्या शतकातील आत्मनिर्भर भारतात बनणाऱ्या नव्या परिसंस्थेसाठी नव्या नेतृत्वाची देखील आशा आहे. नवी परिसंस्था आपल्या स्टार्टअप्सच्या जगासाठी, आपल्या नवसंशोधन जगतासाठी, आपल्या कॉर्पोरेट जगासाठी आणि देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी, या कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला केवळ तुमचे नवे आयुष्य सुरु करायचे नाही तर तुम्हाला देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणणारे स्वतः एक स्टार्ट अप देखील बनायचे आहे. म्हणूनच ही जी पदवी, हे मेडल तुमच्या हातात आहे, ते एक प्रकारे कोट्यवधी आशांचे आकांक्षा पत्र आहे, जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तुम्ही वर्तमानावर नजर ठेवून भविष्याचाही विचार करावा. आपल्या आजच्या गरज काय आहेत आणि 10 वर्षानंतर गरजा काय असतील, त्यादृष्टीने आज काम केले तर उद्याची नवसंशोधने भारत आज बनवेल.

 

मित्रहो,

इंजीनियर म्हणून एक क्षमता तुमच्यात सहजपणे विकसित होते आणि ती म्हणजे पॅटर्नकडून पेटंट कडे नेण्याची क्षमता ही आहे. म्हणजे एक प्रकारे तुमच्यात एखाद्या विषयाकडे अधिक विस्तृतपणे पाहण्याची , एका नव्या दूरदृष्टीची एक क्षमता असते. म्हणून आज आपल्या आजूबाजूला माहितीचे जे भांडार आहे त्यात समस्या आणि त्यांचा पॅटर्न तुम्ही अधिक बारकाईने पाहू शकता. प्रत्येक समस्येशी पॅटर्न जोडलेला असतो. समस्यांचे पॅटर्न समजून घेऊन त्यावर काम केले तर त्या दीर्घकालीन उपायांच्या दिशेने घेऊन जातात. ही जाणीव भविष्यात नवीन शोध आणि नवीन संशोधनाचा आधार बनते. तुम्ही विचार करा, तुम्ही किती लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकता , जीव वाचवू शकता , देशाच्या संसाधनांची बचत करू शकता, तुम्ही पॅटर्न समजून घ्या आणि त्यावर तोडगा काढा. आणि हे देखील शक्य आहे की भविष्यात हेच उपाय तुम्हाला व्यावसायिक यश देखील मिळवून देतील.

 

मित्रहो,

आयुष्याच्या ज्या मार्गावर आता तुम्ही पुढे जाणार आहात त्यात निश्चितपणे तुमच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतील . हा मार्ग बरोबर आहे की चूक आहे, नुकसान तर नाही ना होणार , वेळ वाया तर नाही ना जाणार ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात डोक्यात येत राहतील. या प्रश्नांचे उत्तर आहे - Self Three, मी सेल्फी म्हणत नाही आहे , सेल्फ थ्री म्हणजे स्वयं -जागरूकता , आत्मविश्वास आणि जी सर्वात मोठी ताकद आहे ती आहे निःस्वार्थीपणा . तुम्ही तुमचे सामर्थ्य ओळखून पुढे जा , पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चला, आणि निःस्वार्थ भावनेने पुढे मार्गक्रमण करा. आपल्याकडे म्हटले आहे - शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वतलंघनम । शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चतानि शनैः शनैः ॥ म्हणजे जेव्हा रस्ता लांबचा असेल, चादरीची शिलाई असेल किंवा पर्वतावर चढाई असेल, शिकणे असेल किंवा आयुष्यासाठी कमाई असेल, या सगळ्यासाठी धैर्य दाखवावे लागते , धीर ठेवावा लागतो. विज्ञानाने शेकडो वर्षांपूर्वीच्या या समस्या आज खूपच सोप्या केल्या आहेत.

मात्र ज्ञान आणि विज्ञानाचे प्रयोग, याबाबत हळू हळू धैर्याने , ही म्हण आजही तेवढीच शाश्वत आहे. तुम्ही सर्व विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या ज्या मार्गावर जात आहात , तिथे धांदरटपणाला अजिबात स्थान नाही. तुम्ही जे ठरवले आहे , तुम्ही ज्या नवसंशोधनावर काम करत आहात , शक्य आहे की त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळणार नाही. मात्र तुमच्या त्या अपयशाला देखील यश मानले जाईल कारण तुम्ही त्यातूनही काही शिकणार आहात. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की प्रत्येक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान अपयशातून एक नवीन मार्ग निघतो. , मला तुम्हाला यशाच्या मार्गावर जाताना पाहायचे आहे. अपयश हेच तुमच्या यशाचा मार्ग तयार करू शकतो.

मित्रहो,

एकविसाव्या शतकातील भारताची परिस्थितीही बदलली आहे, गरजादेखील बदलल्या आहेत आणि आकांक्षादेखील बदलल्या आहेत. आता भारतीय तंत्रज्ञान संस्थाच नव्हे तर स्वदेशी तंत्रज्ञान संस्थांच्या बाबतीत आता त्यांना पुढच्या स्तरावर नेण्याची गरज आहे. आपली आयआयटी जितकी जास्त भारताच्या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन करेल, भारतासाठी उपाय शोधेल तितकेच ते जागतिक वापराचे माध्यमही बनेल. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये तुमचा जो प्रयोग यशस्वी होईल तो जगात कुठेही अपयशी ठरणार नाही.

 

मित्रहो,

तुम्हाला हे माहीत आहे की अशा वेळी जेव्हा जग जागतिक हवामान बदलांच्या आव्हानांशी झगडत आहे, तेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) ही कल्पना पुढे आणली. आणि त्याला मूर्त रूपही दिले. आज जगातील अनेक देश भारताने सुरु केलेल्या अभियानात सहभागी होत आहेत. हे अभियान पुढे नेण्याची आता आपली जबाबदारी आहे. आपण जगाला स्वस्त, किफायतशीर , पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान देऊ शकतो का जे भारताच्या या उपक्रमाला आणखी पुढे नेईल , भारताची ओळख आणखी मजबूत करेल. आज भारत त्या देशांपैकी एक आहे जिथे प्रति युनिट सौर उर्जेची किंमत खूप कमी आहे. परंतु घरोघरी सौर उर्जा पोहचवण्यात अजूनही अनेक आव्हाने आहेत. मी तर एकदा म्हणालोही होतो की मी आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर जरूर सांगेन की समजा आपण जेवण बनवण्याचे स्वच्छ अभियान सुरु केले आणि सौर ऊर्जेच्या आधारे घरातच चूल पेटेल आणि सौर ऊर्जेच्या आधारे घरासाठी आवश्यक ऊर्जा साठवणुकीच्या बॅटरीची व्यवस्था आपण बनवू शकतो. तुम्ही बघा, भारतात 25 कोटी चुली आहेत. 25 कोटी घरांमध्ये चुली आहेत. 25 कोटीची बाजारपेठ आहे. जर यात यश मिळाले तर इलेक्ट्रिक वाहनासाठी स्वस्त बॅटरीचा जो शोध सुरु आहे तो त्याला क्रॉस सब्सीडाईज करेल. आता हे काम आयआयटीच्या युवकांव्यतिरिक्त कोण करू शकते?

भारताला असे तंत्रज्ञान हवे आहे की, ते शाश्वत, टिकाऊ असेल, ज्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल, आणि लोकांना त्याचा अगदी सहजतेने वापर करता येईल.

 

मित्रांनो,

आपत्ती व्यवस्थापन हाही एक असा विषय आहे, ज्यावर भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणतीही मोठी आपत्ती ही जीवतहानीबरोबरच सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे नुकसान करते. हे लक्षात घेऊन भारताने दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये सीडीआरआय म्हणजेच ‘आपत्ती विरोधी पायाभूत सुविधा आघाडी’ तयार करण्याचे आवाहन केले होते. आता जगभरातले अनेक देश या आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये सहभागी होत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाविषयी भारताला वाटणारी चिंता, त्यासाठी भारताने उचललेली पावले यांची माहिती इतर देशांनाही होऊ लागली आहे. भारताच्या प्रयत्नांचे स्वागत जगाकडून होत आहे. अशावेळी भारतातल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडे सर्वांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. आपत्ती विरोधी पायाभूत सुविधा निर्माणामध्ये जगाला आपण नेमका कोणता पर्याय, उत्तर देऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. देशामध्ये आज ज्या लहान-मोठ्या घरांची निर्मिती होत आहे, इमारतींची उभारणी केली जात आहे. त्यांना आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती रोधक कसे बनवू शकतो, याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. मोठे-मोठे पूल बनविण्यात येतात, एक प्रचंड वादळ घोंघावत येते आणि सर्वकाही उद्ध्वस्त होऊन जाते. उत्तराखंडमध्ये काय घडले, ते आपण अलिकडेच पाहिले आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला तशी व्यवस्था विकसित केली पाहिजे.

 

मित्रांनो,

गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते -

‘‘आपल्याला राष्ट्र मिळणे म्हणजे एका अर्थाने व्यापक मार्गाने आपल्याला आत्म्याची जाणीव होणे आहे. ज्यावेळी आपण वैचारिक दृष्टीने आपल्या राष्ट्राचे पुनरूत्थान करण्यास प्रारंभ करतो, त्याचवेळी आपण आपल्या राष्ट्रामध्ये स्वतःचा आत्मा पाहू शकतो.’’

आज खरगपूरसहित देशातल्या संपूर्ण आयआयटीच्या नेटवर्ककडून देशाची अपेक्षा आहे की, त्यांनी आपल्या भूमिकेचा विस्तार करावा. तुमच्या इथे तर आधीपासूनच यासाठी एक समृद्ध परिसंस्था आहे. उद्योग 4.0 साठीही येथे महत्वपूर्ण नवसंकल्पनांवर भर दिला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित संस्थागत संशोधनाला औद्योगिक स्तरावर परिवर्तित करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ असो अथवा आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, आयआयटी खरगपूरमध्ये कौतुकास्पद काम केले जात आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देतानाही तुम्ही सॉफ्टवेयरच्या माध्यमातून उत्तर शोधून देशाला मदत करीत आहात. आता आपल्याला आरोग्य तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन पर्यायांविषयी वेगाने काम करायचे आहे. ज्यावेळी मी आरोग्य तंत्रज्ञानाविषयी बोलतो, त्यावेळी फक्त डाटा, सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर म्हणजे उपकरणे यांच्याविषयीच बोलतो असे नाही. उलट एक परिसंस्था निर्माण करण्याविषयी मी बोलत असतो. प्रतिबंधात्मक उपायांपासून ते उपचारांपर्यंत आधुनिक उपाय आणि पर्याय आपल्याला देशाला द्यायचे आहेत. कोरोनाकाळामध्ये आपण पाहिले आहे की, वैयक्तिक आरोग्य दक्षता घेण्यासाठी वापरण्यात येणा-या उपकरणांच्या बाजारपेठेचा उदय कितीतरी मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आधी लोक थर्मामीटर आणि आवश्यक वाटणारी औषधे घरामध्ये ठेवत होते. परंतु आता रक्तदाब तपासण्यासाठी, रक्तातली साखर तपासण्यासाठी, रक्तातले ऑक्सीजन तपासण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे घरामध्ये ठेवत आहेत. आरोग्य आणि तंदुरूस्ती यांच्याशी संबंधित असणारी उपकरणेही घरांमध्ये मोठ्या संख्येने ठेवली जात आहेत. भारतामध्ये वैयक्तिक आरोग्य दक्षता उपकरणे, सर्वांना परवडणारी असावीत, त्याचबरोबर अचूक माहिती देणारी असावीत, यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उपाय योजना विकसित कराव्या लागतील.

 

मित्रांनो,

कोरोनानंतरच्या काळात वैश्विक परिस्थितीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवसंकल्पना यामध्ये भारत एक मोठा वैश्विक स्तरावरचा खेळाडू बनू शकतो. या विचारातूनच यावर्षी विज्ञान आणि संशोधन यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून तुमच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांसाठी संशोधन क्षेत्रामध्ये नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. आपल्या नवकल्पनांच्या इन्क्यूबेशनसाठी स्टार्टअप इंडिया मिशनमुळेही तुम्हा सर्वांना मदत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच आणखी एका महत्वपूर्ण धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेविषयी विशेषत्वाने तुम्हा सर्वांना मी काही सांगू इच्छितो. सरकारने नकाशा आणि भौगोलिक डाटा यांच्यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. असे पाऊल उचलल्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्टार्टअप परिसंस्था खूप चांगली बळकट होऊ शकणार आहे. तसेच यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानही अधिक वेग घेऊ शकणार आहे. अशी पावले उचलल्यामुळे देशातल्या युवकांच्या स्टार्टअप्सना आणि नवसंशोधकांना अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.

 

मित्रांनो,

जिमखान्यामध्ये तुम्ही मंडळी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि इतर उपक्रम राबविता आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सक्रिय सहभागीही होत असता, असे मला सांगण्यात आले आहे. अशा गोष्टी खूप आवश्यक आहेत . आपले लक्ष फक्त स्वतःपुरते पाहण्याकडे सीमित असता कामा नये. आपले ज्ञान आणि दृष्टिकोन यांचा व्यापक विस्तार झाला पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही यासाठी एक बहुशाखीय दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. आयआयटी खरगपूर याबाबतीत आधीपासूनच खूप चांगले काम करीत आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे. आयआयटी खरगपूरचे मी आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करणार आहे. तुम्ही मंडळी भविष्यातल्या नवसंकल्पनाची एक ताकद म्हणून आपल्या भूतकाळाचे, आपल्या प्राचीन ज्ञान-विज्ञानाचे ज्या प्रकारे अन्वेषण करीत आहात, ही गोष्ट खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे. वेदांपासून ते उपनिषदांपर्यंत आणि इतर संहितांमध्येही जे ज्ञानाचे भांडार आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहात. तुमच्या या कामाची मी खूप कौतुक, प्रशंसा करतो.

 

मित्रांनो,

यावर्षी भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहे. आयआयटी खरगपूरसाठी हे वर्ष विशेष आहे. कारण हे स्थान, जिथे तुम्ही साधना करता, जिथे तुम्ही जीवनाला नवीन वळण देता, त्या या स्थानाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा, खूप महान भूतकाळ लाभला आहे. या भूमीवर आंदोलनातल्या युवकांनी हौतात्म्य पत्करले आहे. टागोर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नैतिकतेची साक्ष ही भूमी देते. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की, गेल्या वर्षांमध्ये जे 75 मोठे, महत्वाचे नवीन संशोधन झाले, आयआयटी खरगपूरमधून समस्यांवर नवीन उपाय, पर्याय शोधले गेले, त्यांचे संकलन तुम्ही करावे. त्यांची माहिती देशात आणि संपूर्ण जगात पोहोचवावी. भूतकाळातल्या या प्रेरणादायी गोष्टींमुळे आगामी वर्षांसाठी देशाला नव्याने प्रोत्साहन मिळेल. नवयुवकांना नव्याने आत्मविश्वास मिळेल. आपण अशाच आत्मविश्वासाने पुढे जात राहू, देशाच्या आशा-अपेक्षांचे कधीही विस्मरण होवू द्यायचे नाही. देशाच्या आकांक्षा म्हणजेच आज आपल्याला मिळालेले प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र काही केवळ भिंतीवर टांगण्यासाठी अथवा करियरसाठी फक्त पाठविण्यासाठी नाही. हे जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले आहे, ते 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे एक प्रकारे मागणीपत्र आहे. विश्वासपत्र आहे, आश्वासनपत्र आहे. आपल्या सर्वांना आजच्या या शुभदिनी मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. आपल्या माता-पित्यांच्या तुमच्याविषयी काही अपेक्षा आहेत. तुमच्या प्राध्यापकांनीही तुमच्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्या सर्व गोष्टींविषयी तुम्ही आपल्या पुरूषार्थाने, आपल्या स्वप्नांनी, आपल्या संकल्पांनी, आपल्या भविष्यातल्या वाटचालीतून आनंद प्राप्त करावा. या अपेक्षेबरोबरच सर्वांना खूप-खूप शुभेच्छा व्यक्त करतो.

 

खूप-खूप धन्यवाद !!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addresses the Indian Community in Paris
June 18, 2026

नमस्ते!

बों जू!

ऐसा लग रहा है, आप सब छुट्टी के मूड में हैं।

साथियों,

ये पेरिस शहर, Lights का शहर है, रंगों का शहर है, यहां Art है, Ideas हैं, और innovation की प्रेरणा भी है। इस शहर को भारत के अलग-अलग राज्यों से आए आप सभी लोग और भी खूबसूरत बना देते हैं। नए नए रंगों से भर देते हैं।

कोई तमिल है, कोई पंजाबी है, कोई गुजराती है, तो कोई मराठी है, और कोई बंगाली है। भारत के हर कोने का प्रतिनिधित्व यहां दिखाई देता है।

साथियों,

मैं जब 14 जून को नीस पहुंचा था तो सबसे पहले भारत इनोवेट्स कार्यक्रम में शामिल हुआ था। आज जब मैं फ्रांस से वापसी की तैयारी में हूं तो लग रहा है जैसे भारत कनेक्ट्स कार्यक्रम में आ गया हूं।

फ्रांस में रहने वाले आप लोगों ने 21वीं सदी के भारत-फ्रांस रिश्तों को जिस तरह कनेक्ट किया है, वो हमारी Strategic Partnership की बहुत बड़ी ताकत बन रही है। मैं आप सभी के लिए भारत से 140 करोड़ देशवासियों की शुभकामनाएं लेकर आया हूं। इस आत्मीय स्वागत के लिए, मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आज मैं ऐसे समय में फ्रांस आया हूं जब कुछ ही दिन पहले हमारी सरकार के 12 वर्ष पूरे हुए हैं। चुने हुए प्रधानमंत्री के रूप निरंतर 12 साल तक देश की सेवा करना मेरे जीवन का बहुत बड़ा सौभाग्य रहा है। यह भारत के लोकतंत्र की शक्ति है जिसने एक चायवाले को यहां तक पहुंचा दिया।

साथियों,

बीते 12 वर्ष, 140 करोड़ भारतीयों के अद्भुत सामर्थ्य के रहे हैं। 12 साल के इस कालखंड में भारत का GDP दोगुना हुआ है। Airports की संख्या दोगुनी हुई है। Universities की संख्या भी दोगुनी हो गई है। Highway Construction की स्पीड तीन गुना बढ़ गई। और Metro Network, चार गुणा बड़ा हो गया है।

मैं आपको कुछ और फैक्ट्स दूंगा, उससे आप अंदाजा लगा पाएंगे कि भारत किस स्पीड और कितने बड़े स्केल पर काम कर रहा है। पिछले 12 वर्षों में भारत का Defence Export 35 गुणा यानि Thirty Five Times बढ़ गया है।

औऱ एक फैक्ट सुनिए भारत में मोबाइल मैन्यूफैक्टरिंग यूनिट्स में, 100 गुणा की बढ़ोतरी हुई है। 100 times. भारत अब दुनिया का दूसरा सबसे बड़ा mobile phone manufacturer है। इसी गति, इसी प्रगति का नतीजा है कि आज भारत दुनिया की Fastest Growing Major Economy है।

साथियों,

आज भारत की कहानी सिर्फ Economic Progress की कहानी नहीं है। सिर्फ यहाँ अटक नहीं जाती है। ये Social Transformation की भी कहानी है।

पिछले 12 साल में देश में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। यानि एक ऐसी प्रगति जिसका लाभ समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंच रहा है। फ्रांस में जितने घर हैं, उससे भी अधिक पक्के घर बीते 12 वर्ष में हमने जरूरतमंदों के लिए बनाए हैं।

अब हर परिवार के पास, गरीब से गरीब क्यों न हो, Bank Account है। Financial Inclusion एक सरकारी कार्यक्रम नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन का अभियान बना है।

साथियों,

इन 12 वर्षों की उपलब्धियों में, एक उपलब्धि ऐसी भी है जिसे किसी आंकड़े से, या अंकों से, नहीं मापा जा सकता। वह है 140 करोड़ भारतीयों का आत्मविश्वास।

आज का भारत और आज के भारत का युवा बहुत बड़े सपने देख रहा है। भारत का किसान नई संभावनाओं के साथ आगे बढ़ रहा है। भारत की महिलाएं नए नेतृत्व का परिचय दे रही हैं। इसलिए ये सिर्फ Achievements के 12 साल नहीं हैं, ये भारत की एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने का कालखंड रहा है।

साथियों,

एक समय था जब दूर-दराज के गांवों तक आधुनिक सुविधाएं पहुंचाना वाकई बहुत मुश्किल भरा था। आज उन्हीं गांवों में बिजली भी है, इंटरनेट भी है, और डिजिटल सेवाओं की पूरी दुनिया भी है। आज एक क्लिक पर, कभी भी, कहीं भी बैंकिंग सेवाएं उपलब्ध हैं।

आज मोबाइल फोन, भारत के नागरिकों को अनेक सुविधाओं से कनेक्ट कर रहा है। हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे dairy farmers, हमारी महिलाएं, हमारे स्टूडेंट्स, सभी टेक्नोलॉजी के माध्यम से सशक्त हो रहे हैं, और अपने लिए नए अवसर बना रहे हैं।

साथियों,

आपने 125 करोड़ से अधिक Aadhaar IDs के बारे में सुना है। लेकिन आज भारत सिर्फ पहचान को डिजिटल नहीं बना रहा। आज करीब 90 करोड़ भारतीयों की Unique Digital Health IDs बनाई जा चुकी हैं। जिससे मेडिकल रिकॉर्ड सुरक्षित और accessible बन गए हैं। इससे हेल्थकेयर डिलीवरी और अधिक आसान और efficient हो रही है।

साथियों,

इन उपलब्धियों की सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें से अधिकांश चीजें कुछ वर्ष पहले तक कल्पना जैसी लगती थीं। कौन सोच सकता था कि गांव-गांव तक हाई-स्पीड इंटरनेट पहुंचेगा ? कौन सोच सकता था कि दूर-सुदूर के गांवों में भी QR code जीवन का हिस्सा बन जायेगा ? गांव में कोई बहन, ड्रोन से खेती करने में मदद करेगी, ये भी असंभव लगता था।

लेकिन आज यह सब, भारत के करोड़ों लोगों के जीवन का सामान्य हिस्सा बनता जा रहा है। और आपको गर्व होगा साथियों, यही नए भारत की पहचान है।

जो कभी सपना था, वह आज सच्चाई है। जो कभी नामुमकिन लगता था, वो आज मुमकिन हुआ है, औऱ ये करने के पीछे सबसे बड़ी ताकत क्या है? किसकी वजह से ये सब संभव हुआ है? यह मोदी के कारण नहीं, वो ताकत है- भारत का लोकतंत्र, भारत की डेमोक्रेसी। इस डेमोक्रेसी में सबका साथ है, सबका विकास है।

साथियों,

आज से 50 या 100 साल बाद जब भारत के इस कालखंड की समीक्षा होगी, तो ये बात उभरकर सामने आएगी कि इस कालखंड को भारत की Aspirations ने ड्राइव किया। यह भारत के एस्पिरेशन्स का नया युग है।

जहां बिजली पहुंची है, वहां लोग सिर्फ बिजली नहीं चाहते, वे Smart Living चाहते हैं। जहां ट्रेन पहुंची है, वहां लोग High-Speed Connectivity चाहते हैं। जहां हाईवे बने हैं, वहां लोग World-Class Expressways चाहते हैं। जहां इंटरनेट पहुंचा है, वहां लोग AI और Digital Innovation में नेतृत्व चाहते हैं।

यानि आज भारत के लोग अपने जीवन को भी Next Level पर ले जाना चाहते हैं, और भारत को भी Next Level पर ले जाना उनका मकसद है, उनका संकल्प है, उनके सपने है।

और साथियों,

यही Aspirations आज भारत की विकास यात्रा की सबसे बड़ी शक्ति हैं। मैं आपको भारत की Space Journey का उदाहरण दूंगा।

भारत ने चंद्रयान को चंद्रमा के South Pole पर उतारा। दुनिया ने इसे एक बहुत बड़ी उपलब्धि माना। लेकिन भारत इसे अपनी मंजिल मानकर रुका नहीं। आज देश गगनयान की तैयारी कर रहा है। भारत अंतरिक्ष में अपना Space Station बनाने की दिशा में आगे बढ़ रहा है।

हमारे Space Startups Global Space Economy में अपनी जगह बनाने के लिए पुरजोश काम कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं।

साथियों,

Green Energy के क्षेत्र में भी भारत की यही एस्पिरेशंस दिखाई देती है। Solar Power में भारत की उपलब्धियों की दुनिया भर में लगातार चर्चा हो रही हैं। लेकिन भारत अगली छलांग की तैयारी कर रहा है।

Green Hydrogen में बड़े निवेश हो रहे हैं। Advanced Nuclear Energy पर तेजी से काम हो रहा है। आपने भारत के Fast Breeder nuclear Reactor से जुड़ी प्रोग्रेस के बारे में भी सुना ज़रूर होगा। ये भारत के न्यूक्लियर एनर्जी लैंडस्केप में क्रांतिकारी परिवर्तन करने का बहुत बड़ा अचीवमेंट हमारे सीसेन्टिस्टों ने किया है।

साथियों,

आज का भारत भविष्य का पूरा Ecosystem बना रहा है। भारत एक साथ हर उस क्षेत्र में निवेश कर रहा है, जो आने वाले दशकों की दिशा तय करेगा।

अभी आपने कुछ दिन पहले ही देखा है नीस में भारत इनोवेट्स का एक आयोजन किया। ये इवेंट भारत के डीप टेक सामर्थ्य को दुनिया तक पहुंचाने का एक और माध्यम था। इसमें भारत के 120 Deep-Tech Startups उपस्थित थे। Bharat Innovates में करीब एक हजार चार सौ B2B Meetings हुईं है। कई Startups के लिए Investment Commitments आगे बढ़ीं, Commercial Orders के लिए रास्ते खुले। French और European Universities तथा Incubators के साथ Engagements बढ़ रही हैं।

Student Exchanges, Joint Research, और Innovation Support के नए रास्ते बने। इसलिए Bharat Innovates सिर्फ एक Summit नहीं रहा। यह Innovation Diplomacy का एक नया मॉडल बना है।

और आज ही पेरिस में VivaTech इवेंट के जरिए, इस यात्रा को हमने और आगे बढ़ाया। नीस में हमने Ideas को Capital से जोड़ा और पेरिस में Indian Innovation को Global Scale से जोड़ा। आज दुनिया देख रही है भारत केवल भविष्य के लिए तैयार नहीं हो रहा है। भारत भविष्य को आकार दे रहा है।

साथियों,

एक समय था, जब देशों के बीच रिश्ते केवल व्यापार से तय होते थे। आज व्यापार के साथ-साथ Trust यानि भरोसा भी उतना ही महत्वपूर्ण हो गया है।

हर देश Reliable Supply Chains चाहता है। हर देश Stable Partnerships चाहता है। हर देश ऐसे साथियों की तलाश में है, जिन पर लंबे समय तक भरोसा किया जा सके। और ऐसे समय में, भारत विश्व में एक Trusted Partner के रूप में उभर रहा है।

एवियां में G7 बैठक के दौरान मैंने trust based partnerships बनाने पर ज़ोर दिया। ग्लोबल साउथ के देशों के साथ equal पार्टनर्स के रूप में आगे बढ़ने का आह्वान किया। भारत का G7 समिट में संदेश था Global Governance तभी प्रभावी होगी जब वह Inclusive होगी। Global Growth तभी Sustainable होगी जब वह शेयर्ड होगी। और Global Technology तभी मानवता के लिए उपयोगी होगी जब वह Trusted होगी।

साथियों,

भारत और दुनिया के बीच व्यापारिक रिश्तों में नई ऊर्जा नज़र आ रही है। फ्रांस के साथ भारत का ट्रेड लगतार बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में भारत ने दुनिया के अनेक देशों के साथ Free Trade Agreements किए हैं। यूरोपियन यूनियन हो, यूनाइटेड किंगडम हो दुनिया के हर देश, हर रीजन के साथ भारत समझौते कर रहा है।

अगले महीने से भारत और UK के बीच ट्रेड एग्रीमेंट भी लागू हो जाएगा। यह एग्रीमेंट भारत के farmers, workers और innovators को अनेक नए अवसर प्रदान करेगा।

साथियों,

आज दुनिया Uncertainty और Disruption के दौर से गुजर रही है। ऐसे समय में भारत और फ्रांस की साझेदारी विश्वास, स्थिरता और सहयोग का एक मजबूत स्तंभ बन रहा है।

इस वर्ष हमने भारत और फ्रांस के संबंधों को Special Global Strategic Partnership का दर्जा दिया था। नीस में मेरे मित्र President Macron और मैंने हमारे संबंधों को force for global good बनाने पर चर्चा की। Defence से लेकर space और नुक्लियर तक AI और क्रिटीकल मिनरल्स से लेकर high speed railway तक, हर क्षेत्र में हम मिलकर आगे बढ़ेंगे।

साथियों,

Solar energy हो, या AI के क्षेत्र में सहयोग हो, भारत और फ्रांस मिलकर ऐसे समाधान विकसित कर रहे हैं जो पूरी मानवता के हित में हैं। पिछले वर्ष पेरिस में और इस वर्ष दिल्ली में हमने AI Summit को Co-chair किया।

अब हम साथ मिलकर अगले वर्ष “तृष्णा” satellite को लॉन्च करने जा रहें हैं। यह “तृष्णा” satellite जो विश्व में फूड और वाटर सिक्युरिटी सुनिश्चित करने में योगदान देगा।

और साथियों,

यह सभी गवर्नमेंट टू गवर्नमेंट पहलो में आप सभी का योगदान बहुत महत्वपूर्ण है। ये आप हैं जो भारत और यूरोप के बीच सबसे मजबूत सेतु हैं। आप दोनों समाजों को समझते हैं। दोनों बाजारों को समझते हैं। आने वाले समय में Talent, Trade, Technology, Tourism और Investment के नए अवसरों को आगे बढ़ाने में आपकी भूमिका लगातार बढ़ने वाली हैं।

साथियों,

भारत और फ्रांस के रिश्तों को साझा इतिहास, साझा मूल्यों और साझा विश्वास ने आगे बढ़ाया है। विश्व युद्धों के दौरान फ्रांस की धरती पर बलिदान देने वाले भारतीय सैनिकों की स्मृतियां आज भी हमें जोड़ती हैं।

मुझे पहले नव शापेल में श्रद्धांजलि देने का अवसर मिला, पिछले वर्ष प्रेसिडेंट मैक्रों के साथ मार्सेय के वॉर मेमोरियल जाने का अवसर भी मिला। ये हमारी साझा विरासत है।

फ्रांस, भारतीयों के योगदान को संजोता भी है और सराहता भी है। भारतीय मूल की नूर इनायत खान हों, जिन्होंने फ्रांस की Resistance के लिए अपना जीवन बलिदान किया, या महाराजा रणजीत सिंह के साथ काम करने वाले जनरल जां फ्रांस्वा अलार हों ये सभी भारत और फ्रांस की साझा विरासत के प्रतीक हैं।

भारत के राज्य पुडुचेरी में भी फ्रेंच विरासत की झलक दिखाई देती है। वहां का Architecture, वहां की कला-संस्कृति और खान-पान सभी में हमारे संबंधों की महेक है।

साथियों,

इस समय फ्रांस समेत पूरी दुनिया में International Yoga Day की तैयारी भी चल रही है। इस अवसर पर मैं, फ्रांस में योग को आगे बढ़ाने वाले श्रीमान महेश घाट्राड्याल जी को भी आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मैं पद्म पुरस्कार से सम्मानित, शार्लोत शोपां जी को भी प्रणाम करता हूं। जिन्होंने सौ वर्ष की आयु में भी, योग के माध्यम से फ़्रांस को भारत की विरासत से जोड़ा है। उनका जीवन यह सिद्ध करता है: Yoga does not add years to life, it adds life to years.

साथियों,

मैं फ्रेद नेग्री जी को भी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक याद करता हूं। भारतीय विरासत को संरक्षित करने में उनका योगदान अतुल्य रहा है।

साथियों,

भारत और फ्रांस को कनेक्ट करने वाली एक और चीज है, और वो है फुटबॉल। इस वक्त यहां फुटबॉल फीवर पूरे जोर पर है। फ्रांस में इसकी दीवानगी, चप्पे-चप्पे पर दिखती है। लेकिन भारत में भी फुटबॉल का क्रेज़ सिर चढ़कर बोलता है।

खासतौर पर फ्रांस की टीम के फैन्स भारत में बहुत अधिक हैं। फ़्रांस ने इस वर्ल्ड कप की शुरुआत एक जोरदार जीत से शुरू की है। मैं फ्रांस की टीम को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

जाने से पहले, आप सभी के लिए कुछ और अच्छी खबरें भी लेकर के आया हूँ। वो आपके लिए हैं। पिछले वर्ष, मार्सेय में कॉन्सुलेट खोला गया, इससे काफी अधिक सुविधा मिल रही है। कुछ हफ्ते पहले, Indian Nationals के लिए French Airports पर Visa-free Transit की व्यवस्था शुरू हो गई है।

Students और Professionals की Mobility बढ़ाना हो, या Educational Qualifications की Mutual Recognition की बात हो, या फिर French Universities के भारत में Campus खोलना हो, इन सभी पर हम मिलकर आगे बढ़ रहें हैं।

अब फ्रांस में UPI के उपयोग का दायरा भी और बढ़ने जा रहा है। यानि भारत-फ्रांस कनेक्ट भी Instant और आपसी Payment भी Instant!

साथियों,

इन सभी पहलों से, हम भारत और फ़्रांस को और करीब ला रहें हैं। और मैं फिर कहूंगा इस साझेदारी की नींव, इस रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप सब मेरे देशवासी हैं।

आज जब भारत तेज़ी से विकसित भारत के लक्ष्य की ओर बढ़ रहा है, तो मैं आप सभी से भारत के साथ और गहराई से जुडने का आग्रह करूंगा। इससे भारत की विकास यात्रा को नई शक्ति मिलेगी, और आपको अपनी पुरखों की धरती की सेवा करने का अवसर भी मिलेगा।

इन्हीं शब्दों के साथ आप सभी के प्रेम आपके उत्साह और इस आत्मीय स्वागत के लिए मैं एक बार फिर आप सभी का आभार व्यक्त करता हूं।

भारत माता की जय!

बहुत बहुत धन्यवाद।