NCC provides a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM Modi
India has decided that it will confront the challenges ahead and deal with them: PM Modi
A young India will play key role in fourth industrial revolution: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला उपस्थित राहून मानवंदना स्वीकारली आणि एनसीसीच्या विविध पथकांच्या आणि इतर मित्र आणि शेजारी राष्ट्रांच्या कॅडेटसच्या मार्च पास्टची पाहणी केली.

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर या छात्रांनी साहसी क्रीडा, संगीत यासारख्या क्षेत्रातले आपले कौशल्य पंतप्रधानांसमोर सादर केले. गुणवान एनसीसी छात्रांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

देशातल्या युवकांना देशाप्रती निष्ठा, त्याचबरोबर निर्धार आणि शिस्तभावना बळकट करण्यासाठी एनसीसी उत्तम मंच पुरवले असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना देशाच्या विकासाशी जोडलेली असल्याचे ते म्हणाले.

भारतातल्या 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील युवकांची असल्याने भारत हा तरुणाईचा देश आहे. आपल्यासाठी ही अभियानाची बाब आहे मात्र त्याचवेळी विचारांनी तरुण राहण्याची आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आव्हानांना तोंड देताना आणि सध्याच्या गरजांची पूर्तता करताना भविष्यातल्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या दिशेने आपण काम करायला हवे. युवा आणि चैतन्यदायी मानसिकता बाळगून भारत आगेकूच करत आहे. भारत आज युवा मानसिकता बाळगत असल्याने सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादी कॅम्पवर हल्ला करू शकला. प्रगतीच्या या वाटचालीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कोणीही मागे राहू नये अशी भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याच भावनेतून बोडो करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सर्व संबंधितांनी चर्चा करूनच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आव्हानांना तोंड देताना आणि सध्याच्या गरजांची पूर्तता करताना भविष्यातल्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या दिशेने आपण काम करायला हवे. युवा आणि चैतन्यदायी मानसिकता बाळगून भारत आगेकूच करत आहे. भारत आज युवा मानसिकता बाळगत असल्याने सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादी कॅम्पवर हल्ला करू शकला. प्रगतीच्या या वाटचालीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कोणीही मागे राहू नये अशी भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याच भावनेतून बोडो करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सर्व संबंधितांनी चर्चा करूनच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

ईशान्येकडच्या भागांच्या निकासासाठीच्या प्रयत्नांबद्दल माहिती देताना या भागाच्या विकासाबरोबरच खुल्या मनाने आणि विचारधारेने सर्व संबंधितांशी वाटाघाटी सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. बोडो करार हा त्याचाच एक भाग आहे.

युवा भारताचा हा विचार आहे. प्रत्येकाला समवेत घेऊन प्रत्येकाचा विकास साधत, प्रत्येकाचा विश्वास प्राप्त करत देशाला पुढे नेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x

Media Coverage

India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.