जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी मन:पूर्वक संवाद साधला. पंतप्रधानांनी यावेळी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व आणि महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.

जग आज महिला दिन साजरा करत आहे, मात्र आपल्या परंपरा आणि संस्कृतीमध्ये त्याची सुरुवात आईप्रती परम आदर व्यक्त करणाऱ्या 'मातृ देवो भव' या वचनाने होते, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्यासाठी, वर्षाचा प्रत्येक दिवस 'मातृ देवो भव' आहे, असेही ते म्हणाले.

 

लखपती दीदींपैकी एकीने शिवानी महिला मंडळासोबत काम करण्याचा आपला अनुभव सर्वांना सांगितला. हे महिला मंडळ सौराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असलेले मणीकाम (मोती भारत) करतात. या महिला मंडळाने 400 हून अधिक भगिनींना मणीकामाचे प्रशिक्षण दिले आहे, तर इतर भगिनी विक्री आणि हिशेब सांभाळतात, असे या भगिनीने सांगितले. पंतप्रधानांनी विचारले की विक्री व्यवहार सांभाळणारा चमु राज्याबाहेर प्रवास करतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या भगिनीने सांगितले की त्यांनी भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांना या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. दुसऱ्या सहभागीने 40,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या आणखी एक लखपती दीदी, पारुल बहन यांच्या यशावर प्रकाश टाकला आणि लखपती दीदींच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि आपण ही संख्या पाच कोटीवर नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी एका लखपती दीदीने 65 महिलांच्या सोबतीने मिश्री (खडीसाखर) पासून सरबत तयार करण्याच्या आपल्या उद्योग प्रवासाची माहिती दिली, ज्याची वार्षिक उलाढाल 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही तिने सांगितले. सरकारने दिलेल्या व्यासपीठामुळे आपल्याला असहाय्य महिलांना आधार देणे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देणे शक्य झाले आहे असे तिने सांगितले. त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी वाहने देखील घेतली आहेत, असे तिने आपल्या इतर प्रयत्नांबद्दल माहिती देताना सांगितले. आपण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पदाचे बिरुद न बाळगता अनेक लखपती दीदींच्या स्टॉलला भेट दिली होती असे पंतप्रधान म्हणाले आणि हे आपल्यासाठी सामान्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

आपला अनुभव सांगताना आणखी एका लखपती दीदीने आश्वासन दिले की ती कठोर परिश्रम करून काही वर्षांत करोडपती होईल. आपल्याला यशाचा मार्ग दाखवल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. आपण सुमारे 2 लाख रुपये कमवत असल्याचे एका ड्रोन दीदीने आपल्या अनुभव कथनात सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एका महिलेबद्दल सांगितले जिला सायकलही चालवायची येत नाही पण ती ड्रोन पायलट आहे. महाराष्ट्रातील पुण्यात प्रशिक्षण घेतलेल्या या महिलेला तिचे नातेवाईक आणि मित्रपरिवार तिला 'पायलट' म्हणून संबोधतात असे या भगिनीने पंतप्रधानांना सांगितले. आपल्याला ड्रोन दीदी बनण्याची आणि पर्यायाने आज लखपती दीदी बनण्याची संधी दिल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. ड्रोन दीदी आता प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य बनल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यानंतर पंतप्रधानांनी एका बँक सखीशी संवाद साधला जी दरमहा सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे काम करते. दुसऱ्या एका महिलेने इतर महिलांनाही तिच्यासारखी लखपती दीदी बनवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

 

पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवसाय मॉडेलमध्ये प्रवेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांना त्यांचे उपक्रम अपग्रेड करण्यासाठी सरकारी मदत दिली जाईल याची हमी दिली. तळागाळातील अनेक महिला कमाई करत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. जगाला हे माहित असले पाहिजे की भारतीय महिला केवळ घरगुती कामांपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या एक महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या आर्थिक बळकटीत ग्रामीण महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. महिला तंत्रज्ञानाशी लवकर जुळवून घेतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तीन ते चार दिवसांत ड्रोन चालवायला शिकलेल्या आणि प्रामाणिकपणे सराव करणाऱ्या ड्रोन दीदींबाबतचा आपला अनुभव पंतप्रधानांनी सामायिक केला. भारतातील महिलांमध्ये संघर्ष करण्याची, निर्माण करण्याची, संगोपन करण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची अंतर्निहित शक्ती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या शक्तीचा देशाला मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Womaniya' initiative of GeM, sees 27.6% growth, Rs 28,000 crore contracts awarded to women MSEs

Media Coverage

Womaniya' initiative of GeM, sees 27.6% growth, Rs 28,000 crore contracts awarded to women MSEs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles loss of lives in a mishap in Katihar, Bihar
April 11, 2026
PM announces ex-gratia from PMNRF

Prime Minister Shri Narendra Modi today expressed profound grief over the tragic mishap in Katihar, Bihar, describing the incident as extremely painful.

The Prime Minister extended his heartfelt condolences to the families who have lost their loved ones and prayed for the earliest recovery of those who sustained injuries. Shri Modi further announced an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) for the next of kin of each deceased, noting that Rs. 50,000 would be provided to those injured in the accident.

The Prime Minister wrote on X:

"The mishap in Katihar, Bihar, is extremely painful. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000."