जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी मन:पूर्वक संवाद साधला. पंतप्रधानांनी यावेळी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व आणि महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.

जग आज महिला दिन साजरा करत आहे, मात्र आपल्या परंपरा आणि संस्कृतीमध्ये त्याची सुरुवात आईप्रती परम आदर व्यक्त करणाऱ्या 'मातृ देवो भव' या वचनाने होते, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्यासाठी, वर्षाचा प्रत्येक दिवस 'मातृ देवो भव' आहे, असेही ते म्हणाले.

 

लखपती दीदींपैकी एकीने शिवानी महिला मंडळासोबत काम करण्याचा आपला अनुभव सर्वांना सांगितला. हे महिला मंडळ सौराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असलेले मणीकाम (मोती भारत) करतात. या महिला मंडळाने 400 हून अधिक भगिनींना मणीकामाचे प्रशिक्षण दिले आहे, तर इतर भगिनी विक्री आणि हिशेब सांभाळतात, असे या भगिनीने सांगितले. पंतप्रधानांनी विचारले की विक्री व्यवहार सांभाळणारा चमु राज्याबाहेर प्रवास करतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या भगिनीने सांगितले की त्यांनी भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांना या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. दुसऱ्या सहभागीने 40,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या आणखी एक लखपती दीदी, पारुल बहन यांच्या यशावर प्रकाश टाकला आणि लखपती दीदींच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि आपण ही संख्या पाच कोटीवर नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी एका लखपती दीदीने 65 महिलांच्या सोबतीने मिश्री (खडीसाखर) पासून सरबत तयार करण्याच्या आपल्या उद्योग प्रवासाची माहिती दिली, ज्याची वार्षिक उलाढाल 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही तिने सांगितले. सरकारने दिलेल्या व्यासपीठामुळे आपल्याला असहाय्य महिलांना आधार देणे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देणे शक्य झाले आहे असे तिने सांगितले. त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी वाहने देखील घेतली आहेत, असे तिने आपल्या इतर प्रयत्नांबद्दल माहिती देताना सांगितले. आपण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पदाचे बिरुद न बाळगता अनेक लखपती दीदींच्या स्टॉलला भेट दिली होती असे पंतप्रधान म्हणाले आणि हे आपल्यासाठी सामान्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

आपला अनुभव सांगताना आणखी एका लखपती दीदीने आश्वासन दिले की ती कठोर परिश्रम करून काही वर्षांत करोडपती होईल. आपल्याला यशाचा मार्ग दाखवल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. आपण सुमारे 2 लाख रुपये कमवत असल्याचे एका ड्रोन दीदीने आपल्या अनुभव कथनात सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एका महिलेबद्दल सांगितले जिला सायकलही चालवायची येत नाही पण ती ड्रोन पायलट आहे. महाराष्ट्रातील पुण्यात प्रशिक्षण घेतलेल्या या महिलेला तिचे नातेवाईक आणि मित्रपरिवार तिला 'पायलट' म्हणून संबोधतात असे या भगिनीने पंतप्रधानांना सांगितले. आपल्याला ड्रोन दीदी बनण्याची आणि पर्यायाने आज लखपती दीदी बनण्याची संधी दिल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. ड्रोन दीदी आता प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य बनल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यानंतर पंतप्रधानांनी एका बँक सखीशी संवाद साधला जी दरमहा सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे काम करते. दुसऱ्या एका महिलेने इतर महिलांनाही तिच्यासारखी लखपती दीदी बनवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

 

पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवसाय मॉडेलमध्ये प्रवेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांना त्यांचे उपक्रम अपग्रेड करण्यासाठी सरकारी मदत दिली जाईल याची हमी दिली. तळागाळातील अनेक महिला कमाई करत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. जगाला हे माहित असले पाहिजे की भारतीय महिला केवळ घरगुती कामांपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या एक महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या आर्थिक बळकटीत ग्रामीण महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. महिला तंत्रज्ञानाशी लवकर जुळवून घेतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तीन ते चार दिवसांत ड्रोन चालवायला शिकलेल्या आणि प्रामाणिकपणे सराव करणाऱ्या ड्रोन दीदींबाबतचा आपला अनुभव पंतप्रधानांनी सामायिक केला. भारतातील महिलांमध्ये संघर्ष करण्याची, निर्माण करण्याची, संगोपन करण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची अंतर्निहित शक्ती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या शक्तीचा देशाला मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.