केंद्र पुरस्कृत तंत्रज्ञान संस्थांच्या  100 हून अधिक संचालकांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सादरीकरण केलेल्या  देशातील प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांबरोबर साधलेल्या संवादातील माहिती सामायिक केली. आयआयएससी बंगळुरू , आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी कानपूर यांच्याबद्दल  पंतप्रधानांनी ट्विट केले.

या संदर्भात केलेल्या ट्विटस् शृंखलेत पंतप्रधान म्हणाले

अग्रगण्य आयआयटी आणि @iiscbangalore आयआयएससी बंगळुरूच्या  संचालकांबरोबर समृद्ध संवाद पार पडला. भारताला संशोधन आणि विकास , अभिनवता यांचे केंद्र बनवणे आणि तरुणांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यासह विविध विषयांवर यावेळी आम्ही चर्चा केली.

@iiscbangalore आयआयएससी बंगळुरूच्या पथकाने  रोबोटिक्स,  गणित / विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासारखे शैक्षणिक प्रयत्न, कोविड -19  यासारख्या क्षेत्रात त्यांच्या प्रमुख संशोधन आणि विकास उपक्रमांबाबत  एक  लक्षवेधी सादरीकरण सामायिक केले. आत्मनिर्भर  भारताच्या  दृष्टीने आरोग्याला महत्त्व देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

नायट्रोजन जनरेटरला ऑक्सिजन जनरेटरमध्ये रूपांतरित करणे , कर्करोगा वरील उपचारांसाठी सेल थेरपी आणि एलएएसई प्रोग्राम सुरू करणे, मास्टर्स इन डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स यासारख्या शैक्षणिक नवकल्पनांबद्दल @iitbombay आयआयटी मुंबईच्या विस्तृत कार्याबद्दल माहिती जाणून घेताना मला आनंद झाला.

@iitmadras आयआयटी मद्रासच्या चमूने  कोविड संसर्ग कमी  करण्याच्या प्रयत्नांविषयी सांगितले. उदा. मॉड्यूलर हॉस्पिटल सुरू करणे, हॉटस्पॉटचा अंदाज वर्तवणे, त्यांचे बहु-शाखीय संशोधन आणि त्यांचे ऑनलाइन बीएससी. इन प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स.  संपूर्ण भारतात  डिजिटल व्याप्ती वाढवण्यावर ते  काम करत आहेत.

@IITKanpur आयआयटी कानपूर   हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यकालीन  संशोधन आणि अभिनव कल्पना  ,  हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, इलेक्ट्रॉनिक इंधन इंजेक्शन इत्यादींचे केंद्र बनल्याचे पाहून  अभिमान वाटतो. स्टार्ट-अप्स, व्यावसायिकांना  कौशल्य वाढवण्यासाठी दिले जात असलेल्या सहकार्यामुळे  भारताच्या युवा शक्तीला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

बैठकीचा  तपशील येथे पाहता येईल - https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1733638

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Apple AmPLIfied! India ships out iPhones worth $50 billion till December 2025

Media Coverage

Apple AmPLIfied! India ships out iPhones worth $50 billion till December 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM shares a Subhashitam emphasising how true strength lies in collective solidarity
January 05, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today paid tribute to India’s timeless culture and spiritual heritage, emphasizing its resilience in the face of countless attacks over centuries.

The Prime Minister noted that India’s civilisational journey has endured because of the collective strength of its people, who have safeguarded the nation’s cultural legacy with unwavering commitment.

Quoting a Sanskrit verse on X, he reflected on the deeper meaning of resilience:

“हमारी महान संस्कृति और आध्यात्मिक विरासत अनगिनत हमलों की भी साक्षी रही है। यह देशवासियों की सामूहिक शक्ति ही है, जिसने हमारी सांस्कृतिक धरोहर को हमेशा अक्षुण्ण रखा है।

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।

स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ।।”