पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम जी,

उभय देशांच्या प्रतिनिधी मंडळांचे सदस्य

प्रसारमाध्‍यमांतील मित्रांनो,

नमस्‍कार !

माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काशी हे अनादी काळापासून भारताच्या सभ्यतेचे आणि सांस्कृतिक आत्म्याचे प्रतीक आहे.

आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत  आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या  गंगेच्या अखंड, अविरत  प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे  स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.

 

मित्रांनो,

मॉरिशस हा भारताच्या 'शेजारी प्रथम' नीतीचा  आणि  ‘व्हिजन महासागर' या धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. मार्चमध्ये मला मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात सहभागी होण्याचे सद्भाग्य लाभले. त्यावेळी आम्ही आपल्या  संबंधांना 'वर्धित धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा दिला. आज आम्ही द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा तपशीलवार आढावा घेतला. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आम्ही आपले विचार सामायिक केले.

मित्रांनो,

चागोस सामंजस्य कराराबद्दल मी पंतप्रधान रामगुलाम  जी यांचे आणि मॉरिशसच्या जनतेचे मनापासून  हार्दिक अभिनंदन करतो. मॉरिशसच्या सार्वभौमत्वासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. भारताने नेहमीच वसाहतवादमुक्ती आणि मॉरिशसच्या सार्वभौमत्वाला पूर्ण मान्यता देण्याचे समर्थन केले आहे. आणि यामध्ये, भारत मॉरिशसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.

मित्रांनो,

मॉरिशसच्या विकासामधला भारत एक विश्वासार्ह आणि प्रमुख  भागीदार असणे, ही गोष्‍ट अभिमानाची आहे. आज, आम्ही मॉरिशसच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन एक विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील,  रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आरोग्यविषयक सुविधा बळकट होतील.

भारताबाहेरील पहिले जनऔषधी केंद्र आता मॉरिशसमध्ये स्थापन झाले आहे. आज, आम्ही निर्णय घेतला आहे की, भारताच्या सहयोगाने  मॉरिशसमध्ये आयुष उत्कृष्‍टता केंद्राचे -500  खाटांचे  सर शिवसागर रामगुलाम राष्ट्रीय रुग्णालय सुरू करण्‍यात येईल तसेच  पशुवैद्यकीय विद्यालय  आणि प्राणी रुग्णालयही उभारण्यात येईल.

याबरोबरच आम्ही  चागोस सागरी  संरक्षित क्षेत्र;  एसएसआर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एटीसी म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, तसेच महामार्ग आणि रिंग रोड- वर्तुळाकार मार्गाचा विस्तार यासारख्या प्रकल्पांचे काम पुढे नेणार आहोत.

 

हे पॅकेज म्हणजे सहाय्यनाही. ही आपल्या सामायिक भविष्यातील गुंतवणूक आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी, मॉरिशसमध्ये यूपीआय  आणि रूपे कार्ड सुरू करण्यात आले होते. आता आम्ही स्थानिक चलनात व्यापार सक्षम करण्याच्या दिशेने काम करू.

उर्जा सुरक्षा आपल्या भागीदारीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारत, मॉरीशसच्या उर्जा संक्रमणात सहकार्य करत आहे. मॉरिशसला 100 विद्युत बस दिल्या जात आहेत, ज्यापैकी 10 पोहोचल्या आहेत. ऊर्जेच्या क्षेत्रात झालेल्या सर्वसमावेशक भागीदारी करारामुळे याला अधिक बळ मिळेल. आम्ही तमारिंड  फॉल्स (धबधबा) क्षेत्रात 17.5 मेगावॉटचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात सहकार्य करण्याचा निर्णयही घेतला आहे.

मनुष्यबळाच्या विकासातही आम्ही बऱ्याच काळापासून सहकार्य देत आलो आहोत. आतापर्यंत 5000 हून अधिक मॉरिशसच्या नागरिकांना भारतात प्रशिक्षण मिळाले आहे. माझ्या मार्चमधील दौऱ्यादरम्यान 500 नागरी सेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मला खूप आनंद आहे की, यातील पहिली तुकडी सध्या मसूरीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

आज आपण मिळून निर्णय घेतला की, मॉरिशसमध्ये एक नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालय स्थापित केले जाईल. आणि, लवकरच आम्ही मॉरिशसमध्ये मिशन कर्मयोगीची प्रशिक्षण प्रारुपेही सुरू करणार आहोत.

भारताच्या आयआयटी मद्रास तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंटने  मॉरीशस विद्यापीठासोबत सोबत करार केले आहेत. हे करार संशोधन, शिक्षण आणि नवोन्मेषातील परस्पर भागीदारीला नवी उंची गाठून देतील.

मित्रहो,

मुक्त, खुला, सुरक्षित, स्थिर, आणि समृद्ध हिंद महासागर आपले सामायिक प्राधान्य आहे. याच अनुषंगाने मॉरिशसच्या  आर्थिक स्वामित्व सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आणि सागरी क्षमता बळकट करण्यासाठी भारत पूर्णतः वचनबद्ध आहे.

भारत हिंद  महासागर क्षेत्रामध्ये नेहमीच प्रथम प्रतिसाद देणारा आणि परिपूर्ण सुरक्षा पुरवणारा एक देश म्हणून उभा राहिला आहे.

मॉरिशसच्या तटरक्षक जहाजाची दुरुस्ती भारतात केली जात आहे. त्यांच्या 120 अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षणही दिले जात आहे.

आज जल सर्वेक्षणच्या क्षेत्रात सहकार्यावर करार करण्यात आला आहे. आणि, पुढील 5 वर्षांपर्यंत विशेष आर्थिक क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण, दिशादर्शक  तक्ते, आणि जलवैज्ञानिक माहितीसाठ्याबाबत परस्परांसोबत सहकार्यही केले जाणार आहे.

महामहीम,

भारत आणि मॉरीशस दोन देश आहेत, पण आपली स्वप्ने आणि प्रारब्ध एकच आहे.

या वर्षी आपण सर शिवसागर रामगुलाम यांची एकशे पंचविसावी जयंती साजरी करत आहोत. ते केवळ मॉरिशसचे राष्ट्रपिताच नाहीत, तर भारत आणि मॉरीशसमधील अतुट दुव्याचे  संस्थापकही होते. त्यांची ही जयंती, आपल्याला परस्परांसोबत मिळून, आपल्या संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.

मी पुन्हा एकदा प्रतिनिधिमंडळाचे मनापासून स्वागत करतो.तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।