पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन संबोधित करताना महिला -प्रणित विकासाचे महत्त्व आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते कसे आवश्यक आहे हे अधोरेखित केले. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक असल्याचे भारत आज अभिमानाने सांगू शकतो असे पंतप्रधान म्हणाले. महिला वैज्ञानिक देखील चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की त्यांनी जी - 20 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मुद्दा मांडला आहे आणि जी 20 देशांनी तो स्वीकारला आहे आणि त्याचे महत्त्व ओळखले आहे.
'नारी सन्मान' बद्दल बोलताना, पंतप्रधानांनी त्यांच्या एका परदेश दौऱ्यातील एक अनुभव सांगितला, जिथे त्या देशाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांना भारतातील महिला विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतात का असं विचारले होते . त्यावर आपण उत्तर दिले की आज आमच्या देशात STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे आणि आज जग आपल्या या क्षमतेकडे पाहत आहे असे पंतप्रधानांनी सांगितलं.
The one thing that will take the country forward is women-led development. Today, we can proudly say that India has the maximum number of pilots in civil aviation.
— PIB India (@PIB_India) August 15, 2023
Women scientists are leading the #Chandrayaan mission. The #G20 countries are also recognising the importance of… pic.twitter.com/yjXR697X5T


