भारत आता जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे आणि आसाम देखील देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे: पंतप्रधान.
आज संपूर्ण देश विकसित भारत घडवण्यासाठी एकजुटीने पुढे जात आहे; विशेषतः आपल्या तरुण नागरिकांसाठी, विकसित भारत हे एक स्वप्न आणि संकल्प दोन्ही आहे, हा संकल्प पूर्ण करण्यात ईशान्य भारताची महत्त्वाची भूमिका आहे: पंतप्रधान
21 व्या शतकाची 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि या शतकाचा पुढील अध्याय पूर्व आणि ईशान्य भारताचा आहेः पंतप्रधान
कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी भक्कम संपर्कव्यवस्था गरजेची आहे, त्यामुळे आमच्या सरकारने ईशान्य प्रदेशात संपर्कव्यवस्था वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहेः पंतप्रधान
आम्ही एम्सच्या जाळ्याचा विस्तार केला आहे आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये आहेत, विशेषतः आसाममध्ये पूर्णपणे कर्करोगावर उपचार करणारी रुग्णालये देखील स्थापन करण्यात आली आहेतः पंतप्रधान
सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय स्वरुप बदलण्यासाठी घुसखोरीची कारस्थाने सुरू आहेत आणि यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्म

भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.

आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  सर्वानंद सोनोवाल जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, उपस्थित लोकप्रतिनिधी आणि सतत  पाऊस कोसळत असतांनाही तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नॉमोश्कार। अहोमर बिकाश जात्रार एइ ऐतिहाशिक दिनटुत दरंगबासीर लॉगते, हमॉग्र ऑहोमबासीक मय आन्तोरिक उलोग आरु ओभिनोन्दोन जोनाइशु।

मित्रांनो,

ऑपरेशन सिंदूर नंतर काल पहिल्यांदाच माझे आसामला येणे झाले. आई कामाख्याच्या आशीर्वादाने, ऑपरेशन सिंदूरला मोठे यश आले. म्हणूनच, आज आई  कामाख्याच्या या भूमीवर येऊन मला एक वेगळीच अनुभूती येत आहे, आणि आज या प्रदेशात जन्माष्टमी साजरी होत आहे हि देखील दुधात साखर आहे, म्हणून मी जन्माष्टमीच्या या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, चक्रधारी श्रीकृष्णाची मंगलदोई नगरी हे असे ठिकाण आहे जिथे संस्कृतीचा  त्रिवेणी  इतिहासाचा गौरव आणि भविष्याची आशा  सर्वांचा संगम एकत्रितपणे होत असतो. हे क्षेत्र आसामची ओळख कायम राखणारे केंद्रबिंदूही आहे. मी प्रेरणादायी बाबींचा उल्लेख केला, श्रीकृष्णाचे स्मरण केले, आणि भविष्यातील सुरक्षा धोरणात ‘सुदर्शन चक्रची कल्पना लोकांसमोर मांडली आहे. या पराक्रमी भूमीत तुम्हासारख्या जनतेचे दर्शन घेण्याचे मला भाग्य प्राप्त झाले , मी धन्य झालो आहे.

बंधू- भगिनींनो,

काही दिवसांपूर्वीच आपण भारतरत्न शुधा कांठो भूपेंद्र हजारी यांचा जन्मदिवस साजरा केला. काल त्यांच्या सन्मानार्थ झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात भाग घेण्याचा मला योग आला. आसामच्या अशा महान संततींनी आणि आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज भाजपचे डबल इंजिन सरकार प्रामाणिकपणे पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे.

बंधू- भगिनींनो,

काल जेव्हा मी भूपेन दा जींच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात होतो, तेव्हा रात्री मुख्यमंत्री महोदयांनी मला एक गोष्ट सांगितली आणि आज सकाळी त्यांनी ती चित्रफीत देखील दाखवली. ते पाहून मला खूप वेदना झाली. त्यांनी मला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचे एक वक्तव्य दाखवले. ज्या दिवशी केंद्र सरकारने या देशाच्या महान सुपुत्राला, आसामचा अभिमान असलेल्या भूपेनदा हजारिका यांना भारतरत्नाने सन्मानित केले, त्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले होते. खरे तर त्यावेळी ते माझ्या लक्षात आले नाही; आज मला ते दाखवण्यात आले,  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी म्हटले होते,  मोदी नाचणाऱ्या-गाणाऱ्या लोकांना भारतरत्न देत आहे.

 

मित्रांनो,

1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर, पंडित नेहरूंनी जे म्हटले होते, ते ईशान्येकडील लोकांच्या त्या जखमा आजही बऱ्या झालेल्या नाहीत आणि काँग्रेसची सध्याची पिढीही त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. लोकांनी माझ्या विरुद्ध कितीही अपशब्द वापरले तरी, ते मी सहन करतो  मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा दुसऱ्याचा निर्लज्जपणे अपमान केला जातो तेव्हा मी ते सहन करू शकत नाही. तुम्ही मला सांगा की भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय योग्य आहे की नाही? जोरात सांगा की तो योग्य आहे की नाही? भूपेन दा यांना भारतरत्न देण्यात आला, काँग्रेसने त्याची हेटाळणी केली. त्यांनी चूक केली की नाही? काँग्रेस अशा प्रकारे आसामच्या सुपुत्राचा, भारताच्या सुपुत्राचा अपमान करते, त्यामुळे खूप त्रास होतो.

मित्रांनो,

मला माहित आहे की, आता त्यांची संपूर्ण व्यवस्था माझ्यावर हल्ला करेल. मोदींनी पुन्हा रडणे सुरु केले म्हणतील. पण माझ्यासाठी, जनता माझा देव आहे, आणि माझ्या आत्म्याचा आवाज त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार तर मग कुठे पोहोचेल ? तेच माझे स्वामी आहेत, तेच माझे पूज्य आहेत, आणि तेच माझे नियंत्रणकर्ते आहेत. माझ्याकडे दुसरा कोणताही रिमोट कंट्रोल नाही, 140 कोटी देशबांधव माझे रिमोट कंट्रोल आहेत. काही लोकांचा अहंकार इतका प्रचंड आहे की ते स्वतःला मोठे समजून सामान्य कामगारासारख्या लोकांवर अन्याय करतात. जेव्हा त्या अन्यायामुळे कामगाराला वेदना होतात आणि तो व्यक्त होतो, तेव्हा ते लोक त्यालाच दोषी ठरवतात. तुला रडण्याचाही अधिकार नाही; तू लहान आहेस, आमच्यासमोर तोंड कसं उघडलंस? सार्वजनिक जीवनात असा अहंकार योग्य नाही.

आसामच्या जनतेने, देशाच्या जनतेने, संगीतप्रेमी लोकांनी, कलाप्रेमी लोकांनी, भारताच्या आत्म्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या लोकांनी काँग्रेसकडून उत्तर मागितले पाहिजे की त्यांनी भूपेन दा यांचा अपमान का केला?

मित्रांनो,

आसामच्या या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करणे, तसेच आसामचा वेगाने विकास करणे, हयालाच दुहेरी इंजिन सरकारने प्राधान्य दिले आहे. जरा एसपीजीच्या लोक, कोणी भाऊ त्यांनी चित्र काढून आणले आहे, ते कदाचित देऊ इच्छितात. ज्यांनी चित्र काढले आहे, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मागे तुमचे नाव आणि पत्ता लिहा, मी तुम्हाला नक्की पत्र लिहीन. खूप सुंदर चित्र , तुम्ही माझ्या आईचेही काढले  आहे. आसामचे हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. तो एक तरुण केव्हापासून एक गमछा घेऊन उभा आहे, तोही घ्या. माझ्यासाठी तर हा जन्माष्टमीचा प्रसाद आहे. आसाममधील एखाद्या गरीब आईने हा गमछा बनवला असेल. खूप खूप धन्यवाद भावा, तुम्ही दिलेल्या या प्रसादासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. मला मिळेल, तो द्या भावा, मिळेल, मी खूप आभारी आहे तुमचा. आणखी एक आहे, तोही घ्या, कदाचित तो हिमंता यांना द्यायचा आहे. ठीक आहे, जिथे पोहचायला हवा योग्य ठिकाणी पोहचेल.तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद तरुणा. पाहा, अनेक मुलांनी काही चित्र काढून आणली आहेत, जरा घ्या हो भाऊ, इतक्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत लोक. अशी छोटी छोटी मुले, असे सौभाग्य कुठे मिळते भाऊ . धन्यवाद मित्रा, धन्यवाद भावा, तुम्ही दोघे भाऊ आहात का, नाही, दोघेही काळ्या रंगाचे टी-शर्ट घालून आला आहात. पण खूप खूप धन्यवाद मित्रांनो.

 

मित्रांनो,

सरकार आणि आसाममधील जनतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज आसाम देश-विदेशात आपले नाव गाजवत आहे. बघा भाऊ , ही मुलगी काहीतरी घेऊन आली आहे, ते घ्या, मुलीला तर अजिबात निराश नाही करू शकत. धन्यवाद पोरी. पोरी, तू नाव लिहिले आहेस का मागे, जर तू नाव लिहिले असेल तर मी तुला पत्र लिहीन, तुझे नाव आणि पत्ता लिहून दे पोरी.

मित्रांनो,

आज भारत, जगातील सर्वात वेगाने प्रगती करत असलेला देश आहे, त्याचवेळी आसामही देशातील सर्वात वेगाने प्रगती करत असलेल्या राज्यांपैकी एक बनले आहे. एक काळ होता, जेव्हा आसाम विकासात मागे पडला होता, देशासोबत त्याच वेगाने वाटचाल करू शकत नव्हता, पण आज आसाम जवळपास 13 टक्के विकास दराने पुढे जात आहे. बेटा , खूप खूप धन्यवाद.

मित्रांनो,

13 टक्के दराने विकास, 13 टक्के दराने विकास, हे खूप मोठे यश आहे, हे तुमचे यश आहे, होऊन जाऊ द्यात टाळ्या आज तुमच्या नावावर. आमच्या नावाने तर तुम्ही खूप टाळ्या वाजवता, मी आज तुमच्या घामासाठी टाळी वाजवू इच्छितो. हे यश आसामवासियांच्या परिश्रमाचे आणि भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहे. मला आनंद आहे की आसामची जनता ही भागीदारी सातत्याने मजबूत करत आहे. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हिमंताजी आणि त्यांच्या टीमला वारंवार मोठा पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतही आसामने आम्हा सर्वांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे, आपला आशीर्वाद दिला आहे.

 

मित्रांनो,

भाजपा सरकार, आसामला भारताच्या विकासाचे प्रगतीचे इंजिन बनवण्याचे ध्येय बाळगून काम करत आहे. आजचा हा कार्यक्रमही आमच्या याच संकल्पाचा भाग आहे. आता काही वेळापूर्वी, या व्यासपीठावरून जवळपास 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. आमचे दुहेरी इंजिन सरकार, आसामला आघाडीचे कनेक्टेड राज्य, आणि आघाडीचे आरोग्य सेवा केंद्र म्हणून विकसित करत आहे. हे प्रकल्प याच संकल्पाला अधिक बळकट करतील. तुम्हा सर्वांचे दरांग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी, महामार्गासाठी, रिंग रोडसाठी खूप खूप अभिनंदन.

मित्रांनो,

संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुट होऊन पुढे वाटचाल करत आहे. विशेषतः आपले जे युवा सहकारी आहेत, त्यांच्यासाठी विकसित भारत स्वप्नही आहे आणि संकल्पही आहे. आणि हा संकल्प साकारण्यात, आपल्या ईशान्य भारताची खूप मोठी भूमिका आहे. हे मी केवळ यामुळे म्हणत नाही की मला तुम्हा लोकांबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, ईशान्य भारताप्रती मला आपुलकी आहे, केवळ यामुळे म्हणत नाही आहे, मी यासाठी म्हणत आहे, यामागे ठोस कारणे आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, मोठी शहरे, मोठी अर्थव्यवस्था, मोठे-मोठे कारखाने, पश्चिम आणि दक्षिण भारतातच विकसित झाले. या काळात पूर्व भारताचा खूप मोठा भाग, खूप मोठी लोकसंख्या विकासाच्या शर्यतीत मागे राहिली.

आता भाजप सरकार ही परिस्थिती बदलत आहे.21व्या शतकाची 25 वर्ष उलटून गेली आहेत. आपण ज्यांचे गाणे गात होतो ना, काँग्रेसच्या काळापासून ऐकत आलो होतो, 21वे शतक येत आहे, 21वे शतक येत आहे, ते येऊनही एक चतुर्थांश काळ संपलाही आहे. आता या 21व्या शतकाचा पुढचा भाग हा पुर्वेचा आहे, इशान्येचा आहे. आता तुमचा काळ आला आहे, आसामचा,ईशान्यचा काळ आला आहे, तुमचा काळ आला आहे. माझ्या तरुण मित्रांनो, आता वेळ तुमच्या मुठीत आहे. अरे आणखी एक मुलगा काहीतरी घेऊन आला आहे, घ्या  भाऊ, आता हे लोकही माझ्या अडचणी समजून घेतात. आईचे चित्र  घेऊन येतात, तर मन होते की घ्यावे. दे बाळा, हे माझ्याकडेच राहील. मागे आपला नाव-पत्ता लिहून दे, मी ते घेईन , तुला पत्र लिहीन. हे घेऊन एसपीजीवाल्यांना देऊन टाका.

मित्रांनो,

कोणत्याही प्रदेशाच्या जलद विकासासाठी जलद जोडणी फारच आवश्यक असते. म्हणूनच आमच्या सरकारचा ईशान्य प्रदेशात  जोडणीवर विशेष भर राहिला आहे. रस्ता, रेल्वे, हवाई अशी भौतिक जोडणी असो किंवा 5जी इंटरनेट, ब्रॉडबँड अशी डिजिटल जोडणी,यामुळे तुम्हाला सुविधा मिळाल्या, जीवन सोपे झाले, व्यवसाय करणे सोपे झाले. या जोडणीमुळे प्रवास सोपा झाला, पर्यटनाला चालना मिळाली आणि आमच्या तरुणांसाठी नोकरी-रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.

 

मित्रांनो, 

कनेक्टिव्हिटीच्या या महाअभियानाचा आसामलाही खूप फायदा झाला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार होते, आसाममध्येही अनेक दशके काँग्रेस होती. पण 60-65 वर्षांत काँग्रेसने ब्रह्मपुत्रेवर फक्त तीन पूल बांधले, 60-65 वर्षांत तीन! आणि मग तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तर एका दशकात आमच्या सरकारने सहा मोठे पूल उभारले. सहा मोठे पूल! आता मला सांगा, इतके काम झाले तर तुम्ही आनंदी व्हाल की नाही? तुमचे आशीर्वाद मिळतील की नाही? तुमचे प्रेम मिळेल की नाही? तुम्ही खुश आहात ना? मी अजून काम करू इच्छितो, फक्त आशीर्वाद देत रहा. आज कुरुवा–नारेंगी पुलाचे भूमिपूजन झाले आहे. या पुलामुळे गुवाहाटी आणि दरांगमधील अंतर फक्त काही मिनिटांचे होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, वाहतूक खर्च कमी होईल, वेळेची बचत होईल, ट्रॅफिकची समस्या कमी होईल आणि परिणामी दरही कमी होतील.

मित्रांनो,

नवीन वळण रस्त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.जेव्हा हा वळण मार्ग तयार होईल, तेव्हा वरच्या आसामकडे जाणाऱ्या गाड्यांना शहरात प्रवेश करण्याची गरजच राहणार नाही. हा वळण मार्ग 5 राष्ट्रीय महामार्ग, 2 राज्य महामार्ग, एक विमानतळ, तीन रेल्वे स्थानके आणि एक आंतरिक जलवाहतूक केंद्र यांना एकमेकांशी जोडणार आहे. म्हणजेच, आसाममध्ये पहिल्यांदाच अखंड बहुविध वाहतूक संपर्काचे संपूर्ण जाळे उभारले जाणार आहे. हा आहे,‘दुहेरी’ इंजिनच्या भाजप सरकारचा विकासाचा आराखडा.

मित्रांनो,

आपण आजच्याच नव्हे, तर पुढील 25-50 वर्षांच्या गरजांनुसार देश तयार करत आहोत. कारण 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील ना, तेव्हा विकसित भारत घडवायचाच आहे मित्रांनो. तो तुमच्यासाठी घडवायचा आहे, तुमच्या मुलांसाठी घडवायचा आहे, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घडवायचा आहे. याच मालिकेत मी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की आता जीएसटीमध्ये नव्या युगातील सुधारणा होणार आहेत. आज मी या सुधारणांची आनंदवार्ता घेऊन तुमच्यात आलो आहे. आजपासून नेमके 9 दिवसांनी, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, जीएसटीच्या दरांमध्ये मोठी घट होईल. आणि याचा फायदा आसामसह देशातील प्रत्येक कुटुंबाला होणार आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तू अधिक स्वस्त होतील. आम्ही सिमेंटवरील कर कमी केला आहे, त्यामुळे ज्याला घर बांधायचे आहे त्याचा खर्च कमी होईल. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील अनेक महागडी औषधे स्वस्त होणार आहेत, विमा घेणे स्वस्त होईल. आणि ज्या तरुणांना दुचाकी घ्यायची आहे, नवीन गाडी विकत घ्यायची आहे, तीही स्वस्त होणार आहे. आजकाल तुम्ही पाहत असाल, मोटर कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा लागली आहे. जाहिराती देत आहेत, 60 हजार कमी, 80 हजार कमी, 1 लाख रुपयांपर्यंत कमी, सतत अशाच जाहिराती येत आहेत. म्हणजे माता-भगिनी  असोत, तरुण असोत, शेतकरी असोत, दुकानदार असोत, सगळ्यांचाच फायदा होणार आहे. हा निर्णय तुमच्या सणांची चमक आणखी वाढवणार आहे.

 

मित्रांनो,

सणासुदीच्या या दिवसांत माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी माझं म्हणणं सांगू? तुम्ही म्हणाल तर सांगतो. सांगू? सगळेजण हात वर करुन सांगा मी माझं म्हणणं सांगू का? माझं म्हणणं तुम्ही ऐकाल? बस बाळा बस, धन्यवाद बाळा धन्यवाद.त्याला त्रास देऊ नका. त्याला काहीतरी शारीरिक त्रास आहे. कृपया त्याला त्रास देऊ नका. कॅमेरामन कृपया त्याच्याकडची चिठ्ठी घ्या. बाळा तू बस, काळजी करू नको. अरे त्याला त्रास देऊ नका, त्याला त्रास होतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला त्रास देऊ नका, मला ते चांगलं वाटत नाही. तुम्ही इथे आलात इतके कष्ट सहन करुन इथवर आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

मित्रांनो,

जरा पुन्हा एकदा हात उंचावून सांगा ,की मी जे सांगेन ते तुम्ही ऐकाल का? असं नाही, सगळ्यांनी हात वर केले पाहिजेत. मी जे सांगेन ते ऐकाल, नक्की ऐकाल. एवढं तुम्ही केलंत तर देशाची प्रगती होईल. माझ्यासाठी नाही तर देशासाठी मी तुमच्याकडे एक मागणी करतोय, मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मागणं मागतोय. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सणांसाठी जी काही खरेदी कराल, ती स्वदेशी उत्पादनं असतील असं वचन मला द्या. स्वदेशी, भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी कराल ना? आणि स्वदेशीची माझी व्याख्या खूप सोपी आहे. कंपनी कुठल्याही देशातून आलेली असेल, नाव कुठल्याही देशाचं असेल मात्र त्याचं उत्पादन भारतात झालं असलं पाहिजे. गुंतवणूक जगातल्या कुठल्याही देशातून झालेली असली तरी उत्पादन भारतात तयार झालेलं असावं. पैसे कुठल्याही देशातल्या लोकांनी गुंतवलेले असले; तरी उत्पादन भारतातल्या तरुणांच्या हातांनी तयार केलेलं असावं, आणि जी उत्पादनं मेड इन इंडिया असतील त्यांना भारतीय मातीचा गंध असायला हवा. अशाच वस्तू खरेदी कराल ना? सगळ्यांनी हात वर करुन सांगा, स्वदेशीची खरेदी कराल ना? सगळ्यांनी एका सुरात जोरात सांगा, स्वदेशीचीच खरेदी कराल ना? आणखी मोठ्या आवाजात सांगा, कराल ना? जे दुकानदार मालाची विक्री करतात त्यांनाही माझं सांगणं आहे; आपल्या दुकानावर स्वदेशीची पाटी लावा. लावाल ना? आपल्या गावातल्या प्रत्येक दुकानावर पाटी लावा. त्या पाटीवर लिहा, ‘अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने सांगा हे स्वदेशी आहे.’

स्वदेशीचं सामर्थ्य मी तुम्हाला समजावून सांगतो. साधारण 50 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी तेव्हा काही काळासाठी कन्याकुमारीत राहात होतो. हा गमछा माझ्याजवळ होता. माझ्या सामानात तीन चार गमछे मी ठेवतोच. तर असंच एकदा कन्याकुमारीत मी हा गमछा असा घालून फिरत होतो; तेव्हा लांबून काही लोक पळत माझ्याकडे आले आणि नमस्कार करुन माझा हात पकडला. मला म्हणाले तुम्ही आसामचे आहात ना? मी सांगितलं नाही; मी तर गुजरातचा आहे. तर ते म्हणाले की, तुमचा गमछा पाहून आसामचे आहात असं वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो. ही ताकद आहे स्वदेशीची, या देशाच्या मातीची! काहीही ओळख नसताना माझ्या गळ्यात गमछा असल्यामुळे, आसामच्या लोकांना माझ्याबद्दल आपलेपणा वाटला. म्हणूनच मी म्हणतोय मला वचन द्या की आम्ही स्वदेशीच खरेदी करू. व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा. यासाठी आपण सर्वांनी केलेले प्रयत्न आपल्या देशाचं सामर्थ्य वाढवतील.    

 

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत, देशात आणखी एका क्षेत्रात खूप मोठं काम झालं आहे. ते म्हणजे आरोग्यसेवा क्षेत्र. आपल्याकडे केवळ मोठ्या शहरांमधेच मोठी रुग्णालयं होती, तिथं मोठ्या शहरात उपचारांसाठी जाणं खूपच खर्चिक होतं. आम्ही एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांचं जाळं देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. भाऊ, आता बसा; आता मला बोलू द्या. आता बसा तुम्ही, बसा. अरे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. कॅमेरामन त्यांच्याकडून चिठ्ठी घ्या. माझ्या या दिव्यांग बंधुंना कशाला त्रास देताय तुम्ही. धन्यवाद मित्रा. इथं आसाममध्ये तर आम्ही खास कर्करोगासाठी विशेष रुग्णालयं उभारली. गेल्या 11 वर्षांत भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. याचाच अर्थ स्वातंत्र्याच्या 60-65 वर्षांत जितकी वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन झाली; तेवढी आम्ही गेल्या 11 वर्षांत स्थापन केली. बघा मित्रांनो, 60-70 वर्षांत जेवढं काम झालं; तेवढं तर आम्ही 10-11 वर्षांतच केलं. इथं आसाममध्ये 2014 च्या आधी केवळ 6 वैद्यकीय महाविद्यालयं होती. आता दरांगमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं काम पूर्ण झाल्यावर इथं 24 वैद्यकीय महाविद्यालयं असतील. जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयं तयार होतात; तेव्हा उपचारांच्या चांगल्या सुविधा निर्माण होण्याबरोबरच जास्तीतजास्त युवकांना डॉक्टर होण्याची संधीपण मिळते, हे तर तुम्हाला माहिती आहेच. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची मर्यादित संख्या असल्यामुळे अनेक तरुणांना डॉक्टर होता येत नव्हतं. गेल्या 11 वर्षांत देशभरात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशाची संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. एवढंच नाही तर आम्ही आणखी एक उद्दीष्ट ठरवलं आहे. येत्या 4-5 वर्षांत आम्ही वैद्यकीय शाखेसाठी प्रवेशाची संख्या एक लाखानं वाढवणार आहोत. एक लाख नवीन जागा म्हणजे, आणखी एक लाख तरुण डॉक्टर होतील.

मित्रांनो,

आपण असं काम करतोय , एकीकडे  या देशात 3 करोड़ लखपती दीदी  तयार  करतोय तर दुसरीकडे 1 लाख नवीन डॉक्टरानांही तयार करतोय.

मित्रांनो,

आसाम देशभक्तांची भूमी  आहे .परकीय आक्रमकांपासून देशाचे रक्षण करायचे असो, की स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेले बलिदान असो, आसामची भूमिका फार महत्त्वाची आहे. पथरुघाटचा शेतकरी सत्याग्रह हा देश कसा विसरू शकतो? ते  ऐतिहासिक स्थळ इथे जवळच आहे. आज मी शहीदांच्या  या पवित्र भूमीवर उभा आहे तेव्हा काँग्रेसची आणखी एक कृती उघड करणे गरजेचे आहे . काँग्रेस आपल्या राजकारणासाठी अशा व्यक्ती आणि अशा विचारांच्या मागे उभी राहते, ज्या भारतविरोधी असतात. ऑपरेशन सिंदूरच्या काळातही हेच दिसले.जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा संपूर्ण देश दहशतीने रंगलेला होता आणि काँग्रेस मात्र मौन धारण करून गप्प होती.

 

आज आपली सेना ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या काना - कोपऱ्यातून दहशतवादी नेत्यांचा नायनाट करते.परंतु काँग्रेस काहीवेळा पाकिस्तानच्या बाजूने उभी राहते. काँग्रेसचे लोक आपल्या सेनेऐवजी दहशतवादींना साथ देणाऱ्यांचा अजेंडा पुढे नेताना दिसतात; पाकिस्तानाचे खोटे आरोप हेच काँग्रेसचा अजेंडा बनतात. त्यामुळे काँग्रेसपासून  तुम्ही सतर्क राहाच.

मित्रांनो,

काँग्रेससाठी तिची वोटबँक महत्त्वाची असते. देशहिताची  त्यांनी कधी पर्वा केली  नाही. आज काँग्रेस देशविरोधी आणि घुसखोरांना मोठी मदत करणाऱ्या पक्षासारखी वागत आहे. काँग्रेसची जेव्हा सत्ता होती, तेव्हा तिने घुसखोरांना प्रोत्साहन दिलं आणि आता ती अपेक्षा करते की घुसखोर कायमचे इथे बसून देशाचे भविष्य ठरवतील. मँगलदोईत आसामची ओळख बचावण्यासाठी घुसखोरांविरुद्ध मोठं आंदोलन उभं झालं होतं; पण पूर्वीच्या काँग्रेस सरकारने तुमच्यावर आरोप केले आणि तुम्हाला यातून यातना भोगाव्या लागल्या. काँग्रेसने जमिनीवर बेकायदेशीर ताबे होऊ दिले, श्रद्धास्थळे, शेतकरी आणि आदिवासी जमिनीची लूट झाली. पण भाजप - राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. इथे बेकायदेशीर ताबे हटवले जात आहेत.

हेमंता यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये लाखो एकर जमिनी घुसखोरांकडून मुक्त करण्यात आल्या; दरांग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जमिनी मोकळ्या करण्यात आल्या.  गोरुखुंटी भागात काँग्रेसच्या काळात घुसखोरांनी कब्जा  केला होता,आज ती जमीन परत घेतली आहे. आता तेथे शेतकऱ्यांसाठी गोरुखुंटी कृषी प्रकल्प सुरू आहे. त्या भागातील तरुण आता ‘कृषि सैनिक’ बनून शेती करतात - मोहरी , मका, उडद, तीळ, भोपळे वगैरे पिकं तिकडं वाढत आहेत. म्हणजे जी जमीन आधी घुसखोरांच्या ताब्यात होती, आज तीच जमीन आसाममध्ये कृषी विकासाचे नवीन केंद्र बनली आहे.

मित्रांनो,

भाजप सरकार घुसखोरांना देशाच्या संसाधनांवर ताबा मिळू देणार नाही. भारताचा शेतकरी, युवक आणि आदिवासी लोकांचे  हक्क आम्ही कुणासाठीही सोडणार नाही. हे घुसखोर आपल्या मातांवर–बहिणींवर–मुलींवर अत्याचार करतात.हे होऊ देणार नाही.घुसखोरी द्वारे सीमेवर लोकसंख्याशास्त्रीय बदल करण्याचा कट रचला जातोय, जो राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. त्यामुळे देशात आता लोकसंख्याशास्त्रीय स्थितीला तोंड देणारी मोहीम सुरू केली आहे.भाजपाचे लक्ष्य आहे."घुसखोरांपासून  देशाचे रक्षण करणं आणि त्यांच्यापासून देशाला मुक्त करणं."

 

आणि त्या राजकीय नेत्यांना मी असं सांगतो- जे आव्हान घेऊन तुम्ही मैदानात आला आहात ना, ते मी स्विकारतो. लिहून ठेवा..... मी पाहीन की तुम्ही घुसखोरांना वाचवण्यासाठी किती ताकद वापरता आणि आम्ही घुसखोरांना हाकलण्यासाठी कसे आमचे जीवन व्यतीत करतो- होऊ द्या सामना. जे लोक घुसखोरांना वाचवायला निघाले आहेत  त्यांना याची किंमत मोजावी  लागेल. हे लक्षात ठेवा - हा देश त्यांना माफ करणार नाही.

मित्रांनो,

आसामचा वारसा जपायचा आहे आणि आसामचा वेगवान विकास करायचा आहे, यासाठी आपल्याला एकत्र काम करावं लागेल. आपल्याला आसाम आणि ईशान्य भारताला विकसित भारताच्या विकासाचे  इंजिन बनवायचं आहे. या विकास प्रकल्पांसाठी माझ्या शुभेच्छा . माझ्यासोबत बोला — भारत मातेचा विजय असो! दोन्ही हात वर करून जोरात नारा द्या — भारत मातेचा विजय असो! (पुन्हा) भारत मातेचा विजय असो!

खूप-खूप धन्यवाद.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addresses the Indian Community in Paris
June 18, 2026

नमस्ते!

बों जू!

ऐसा लग रहा है, आप सब छुट्टी के मूड में हैं।

साथियों,

ये पेरिस शहर, Lights का शहर है, रंगों का शहर है, यहां Art है, Ideas हैं, और innovation की प्रेरणा भी है। इस शहर को भारत के अलग-अलग राज्यों से आए आप सभी लोग और भी खूबसूरत बना देते हैं। नए नए रंगों से भर देते हैं।

कोई तमिल है, कोई पंजाबी है, कोई गुजराती है, तो कोई मराठी है, और कोई बंगाली है। भारत के हर कोने का प्रतिनिधित्व यहां दिखाई देता है।

साथियों,

मैं जब 14 जून को नीस पहुंचा था तो सबसे पहले भारत इनोवेट्स कार्यक्रम में शामिल हुआ था। आज जब मैं फ्रांस से वापसी की तैयारी में हूं तो लग रहा है जैसे भारत कनेक्ट्स कार्यक्रम में आ गया हूं।

फ्रांस में रहने वाले आप लोगों ने 21वीं सदी के भारत-फ्रांस रिश्तों को जिस तरह कनेक्ट किया है, वो हमारी Strategic Partnership की बहुत बड़ी ताकत बन रही है। मैं आप सभी के लिए भारत से 140 करोड़ देशवासियों की शुभकामनाएं लेकर आया हूं। इस आत्मीय स्वागत के लिए, मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आज मैं ऐसे समय में फ्रांस आया हूं जब कुछ ही दिन पहले हमारी सरकार के 12 वर्ष पूरे हुए हैं। चुने हुए प्रधानमंत्री के रूप निरंतर 12 साल तक देश की सेवा करना मेरे जीवन का बहुत बड़ा सौभाग्य रहा है। यह भारत के लोकतंत्र की शक्ति है जिसने एक चायवाले को यहां तक पहुंचा दिया।

साथियों,

बीते 12 वर्ष, 140 करोड़ भारतीयों के अद्भुत सामर्थ्य के रहे हैं। 12 साल के इस कालखंड में भारत का GDP दोगुना हुआ है। Airports की संख्या दोगुनी हुई है। Universities की संख्या भी दोगुनी हो गई है। Highway Construction की स्पीड तीन गुना बढ़ गई। और Metro Network, चार गुणा बड़ा हो गया है।

मैं आपको कुछ और फैक्ट्स दूंगा, उससे आप अंदाजा लगा पाएंगे कि भारत किस स्पीड और कितने बड़े स्केल पर काम कर रहा है। पिछले 12 वर्षों में भारत का Defence Export 35 गुणा यानि Thirty Five Times बढ़ गया है।

औऱ एक फैक्ट सुनिए भारत में मोबाइल मैन्यूफैक्टरिंग यूनिट्स में, 100 गुणा की बढ़ोतरी हुई है। 100 times. भारत अब दुनिया का दूसरा सबसे बड़ा mobile phone manufacturer है। इसी गति, इसी प्रगति का नतीजा है कि आज भारत दुनिया की Fastest Growing Major Economy है।

साथियों,

आज भारत की कहानी सिर्फ Economic Progress की कहानी नहीं है। सिर्फ यहाँ अटक नहीं जाती है। ये Social Transformation की भी कहानी है।

पिछले 12 साल में देश में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। यानि एक ऐसी प्रगति जिसका लाभ समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंच रहा है। फ्रांस में जितने घर हैं, उससे भी अधिक पक्के घर बीते 12 वर्ष में हमने जरूरतमंदों के लिए बनाए हैं।

अब हर परिवार के पास, गरीब से गरीब क्यों न हो, Bank Account है। Financial Inclusion एक सरकारी कार्यक्रम नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन का अभियान बना है।

साथियों,

इन 12 वर्षों की उपलब्धियों में, एक उपलब्धि ऐसी भी है जिसे किसी आंकड़े से, या अंकों से, नहीं मापा जा सकता। वह है 140 करोड़ भारतीयों का आत्मविश्वास।

आज का भारत और आज के भारत का युवा बहुत बड़े सपने देख रहा है। भारत का किसान नई संभावनाओं के साथ आगे बढ़ रहा है। भारत की महिलाएं नए नेतृत्व का परिचय दे रही हैं। इसलिए ये सिर्फ Achievements के 12 साल नहीं हैं, ये भारत की एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने का कालखंड रहा है।

साथियों,

एक समय था जब दूर-दराज के गांवों तक आधुनिक सुविधाएं पहुंचाना वाकई बहुत मुश्किल भरा था। आज उन्हीं गांवों में बिजली भी है, इंटरनेट भी है, और डिजिटल सेवाओं की पूरी दुनिया भी है। आज एक क्लिक पर, कभी भी, कहीं भी बैंकिंग सेवाएं उपलब्ध हैं।

आज मोबाइल फोन, भारत के नागरिकों को अनेक सुविधाओं से कनेक्ट कर रहा है। हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे dairy farmers, हमारी महिलाएं, हमारे स्टूडेंट्स, सभी टेक्नोलॉजी के माध्यम से सशक्त हो रहे हैं, और अपने लिए नए अवसर बना रहे हैं।

साथियों,

आपने 125 करोड़ से अधिक Aadhaar IDs के बारे में सुना है। लेकिन आज भारत सिर्फ पहचान को डिजिटल नहीं बना रहा। आज करीब 90 करोड़ भारतीयों की Unique Digital Health IDs बनाई जा चुकी हैं। जिससे मेडिकल रिकॉर्ड सुरक्षित और accessible बन गए हैं। इससे हेल्थकेयर डिलीवरी और अधिक आसान और efficient हो रही है।

साथियों,

इन उपलब्धियों की सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें से अधिकांश चीजें कुछ वर्ष पहले तक कल्पना जैसी लगती थीं। कौन सोच सकता था कि गांव-गांव तक हाई-स्पीड इंटरनेट पहुंचेगा ? कौन सोच सकता था कि दूर-सुदूर के गांवों में भी QR code जीवन का हिस्सा बन जायेगा ? गांव में कोई बहन, ड्रोन से खेती करने में मदद करेगी, ये भी असंभव लगता था।

लेकिन आज यह सब, भारत के करोड़ों लोगों के जीवन का सामान्य हिस्सा बनता जा रहा है। और आपको गर्व होगा साथियों, यही नए भारत की पहचान है।

जो कभी सपना था, वह आज सच्चाई है। जो कभी नामुमकिन लगता था, वो आज मुमकिन हुआ है, औऱ ये करने के पीछे सबसे बड़ी ताकत क्या है? किसकी वजह से ये सब संभव हुआ है? यह मोदी के कारण नहीं, वो ताकत है- भारत का लोकतंत्र, भारत की डेमोक्रेसी। इस डेमोक्रेसी में सबका साथ है, सबका विकास है।

साथियों,

आज से 50 या 100 साल बाद जब भारत के इस कालखंड की समीक्षा होगी, तो ये बात उभरकर सामने आएगी कि इस कालखंड को भारत की Aspirations ने ड्राइव किया। यह भारत के एस्पिरेशन्स का नया युग है।

जहां बिजली पहुंची है, वहां लोग सिर्फ बिजली नहीं चाहते, वे Smart Living चाहते हैं। जहां ट्रेन पहुंची है, वहां लोग High-Speed Connectivity चाहते हैं। जहां हाईवे बने हैं, वहां लोग World-Class Expressways चाहते हैं। जहां इंटरनेट पहुंचा है, वहां लोग AI और Digital Innovation में नेतृत्व चाहते हैं।

यानि आज भारत के लोग अपने जीवन को भी Next Level पर ले जाना चाहते हैं, और भारत को भी Next Level पर ले जाना उनका मकसद है, उनका संकल्प है, उनके सपने है।

और साथियों,

यही Aspirations आज भारत की विकास यात्रा की सबसे बड़ी शक्ति हैं। मैं आपको भारत की Space Journey का उदाहरण दूंगा।

भारत ने चंद्रयान को चंद्रमा के South Pole पर उतारा। दुनिया ने इसे एक बहुत बड़ी उपलब्धि माना। लेकिन भारत इसे अपनी मंजिल मानकर रुका नहीं। आज देश गगनयान की तैयारी कर रहा है। भारत अंतरिक्ष में अपना Space Station बनाने की दिशा में आगे बढ़ रहा है।

हमारे Space Startups Global Space Economy में अपनी जगह बनाने के लिए पुरजोश काम कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं।

साथियों,

Green Energy के क्षेत्र में भी भारत की यही एस्पिरेशंस दिखाई देती है। Solar Power में भारत की उपलब्धियों की दुनिया भर में लगातार चर्चा हो रही हैं। लेकिन भारत अगली छलांग की तैयारी कर रहा है।

Green Hydrogen में बड़े निवेश हो रहे हैं। Advanced Nuclear Energy पर तेजी से काम हो रहा है। आपने भारत के Fast Breeder nuclear Reactor से जुड़ी प्रोग्रेस के बारे में भी सुना ज़रूर होगा। ये भारत के न्यूक्लियर एनर्जी लैंडस्केप में क्रांतिकारी परिवर्तन करने का बहुत बड़ा अचीवमेंट हमारे सीसेन्टिस्टों ने किया है।

साथियों,

आज का भारत भविष्य का पूरा Ecosystem बना रहा है। भारत एक साथ हर उस क्षेत्र में निवेश कर रहा है, जो आने वाले दशकों की दिशा तय करेगा।

अभी आपने कुछ दिन पहले ही देखा है नीस में भारत इनोवेट्स का एक आयोजन किया। ये इवेंट भारत के डीप टेक सामर्थ्य को दुनिया तक पहुंचाने का एक और माध्यम था। इसमें भारत के 120 Deep-Tech Startups उपस्थित थे। Bharat Innovates में करीब एक हजार चार सौ B2B Meetings हुईं है। कई Startups के लिए Investment Commitments आगे बढ़ीं, Commercial Orders के लिए रास्ते खुले। French और European Universities तथा Incubators के साथ Engagements बढ़ रही हैं।

Student Exchanges, Joint Research, और Innovation Support के नए रास्ते बने। इसलिए Bharat Innovates सिर्फ एक Summit नहीं रहा। यह Innovation Diplomacy का एक नया मॉडल बना है।

और आज ही पेरिस में VivaTech इवेंट के जरिए, इस यात्रा को हमने और आगे बढ़ाया। नीस में हमने Ideas को Capital से जोड़ा और पेरिस में Indian Innovation को Global Scale से जोड़ा। आज दुनिया देख रही है भारत केवल भविष्य के लिए तैयार नहीं हो रहा है। भारत भविष्य को आकार दे रहा है।

साथियों,

एक समय था, जब देशों के बीच रिश्ते केवल व्यापार से तय होते थे। आज व्यापार के साथ-साथ Trust यानि भरोसा भी उतना ही महत्वपूर्ण हो गया है।

हर देश Reliable Supply Chains चाहता है। हर देश Stable Partnerships चाहता है। हर देश ऐसे साथियों की तलाश में है, जिन पर लंबे समय तक भरोसा किया जा सके। और ऐसे समय में, भारत विश्व में एक Trusted Partner के रूप में उभर रहा है।

एवियां में G7 बैठक के दौरान मैंने trust based partnerships बनाने पर ज़ोर दिया। ग्लोबल साउथ के देशों के साथ equal पार्टनर्स के रूप में आगे बढ़ने का आह्वान किया। भारत का G7 समिट में संदेश था Global Governance तभी प्रभावी होगी जब वह Inclusive होगी। Global Growth तभी Sustainable होगी जब वह शेयर्ड होगी। और Global Technology तभी मानवता के लिए उपयोगी होगी जब वह Trusted होगी।

साथियों,

भारत और दुनिया के बीच व्यापारिक रिश्तों में नई ऊर्जा नज़र आ रही है। फ्रांस के साथ भारत का ट्रेड लगतार बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में भारत ने दुनिया के अनेक देशों के साथ Free Trade Agreements किए हैं। यूरोपियन यूनियन हो, यूनाइटेड किंगडम हो दुनिया के हर देश, हर रीजन के साथ भारत समझौते कर रहा है।

अगले महीने से भारत और UK के बीच ट्रेड एग्रीमेंट भी लागू हो जाएगा। यह एग्रीमेंट भारत के farmers, workers और innovators को अनेक नए अवसर प्रदान करेगा।

साथियों,

आज दुनिया Uncertainty और Disruption के दौर से गुजर रही है। ऐसे समय में भारत और फ्रांस की साझेदारी विश्वास, स्थिरता और सहयोग का एक मजबूत स्तंभ बन रहा है।

इस वर्ष हमने भारत और फ्रांस के संबंधों को Special Global Strategic Partnership का दर्जा दिया था। नीस में मेरे मित्र President Macron और मैंने हमारे संबंधों को force for global good बनाने पर चर्चा की। Defence से लेकर space और नुक्लियर तक AI और क्रिटीकल मिनरल्स से लेकर high speed railway तक, हर क्षेत्र में हम मिलकर आगे बढ़ेंगे।

साथियों,

Solar energy हो, या AI के क्षेत्र में सहयोग हो, भारत और फ्रांस मिलकर ऐसे समाधान विकसित कर रहे हैं जो पूरी मानवता के हित में हैं। पिछले वर्ष पेरिस में और इस वर्ष दिल्ली में हमने AI Summit को Co-chair किया।

अब हम साथ मिलकर अगले वर्ष “तृष्णा” satellite को लॉन्च करने जा रहें हैं। यह “तृष्णा” satellite जो विश्व में फूड और वाटर सिक्युरिटी सुनिश्चित करने में योगदान देगा।

और साथियों,

यह सभी गवर्नमेंट टू गवर्नमेंट पहलो में आप सभी का योगदान बहुत महत्वपूर्ण है। ये आप हैं जो भारत और यूरोप के बीच सबसे मजबूत सेतु हैं। आप दोनों समाजों को समझते हैं। दोनों बाजारों को समझते हैं। आने वाले समय में Talent, Trade, Technology, Tourism और Investment के नए अवसरों को आगे बढ़ाने में आपकी भूमिका लगातार बढ़ने वाली हैं।

साथियों,

भारत और फ्रांस के रिश्तों को साझा इतिहास, साझा मूल्यों और साझा विश्वास ने आगे बढ़ाया है। विश्व युद्धों के दौरान फ्रांस की धरती पर बलिदान देने वाले भारतीय सैनिकों की स्मृतियां आज भी हमें जोड़ती हैं।

मुझे पहले नव शापेल में श्रद्धांजलि देने का अवसर मिला, पिछले वर्ष प्रेसिडेंट मैक्रों के साथ मार्सेय के वॉर मेमोरियल जाने का अवसर भी मिला। ये हमारी साझा विरासत है।

फ्रांस, भारतीयों के योगदान को संजोता भी है और सराहता भी है। भारतीय मूल की नूर इनायत खान हों, जिन्होंने फ्रांस की Resistance के लिए अपना जीवन बलिदान किया, या महाराजा रणजीत सिंह के साथ काम करने वाले जनरल जां फ्रांस्वा अलार हों ये सभी भारत और फ्रांस की साझा विरासत के प्रतीक हैं।

भारत के राज्य पुडुचेरी में भी फ्रेंच विरासत की झलक दिखाई देती है। वहां का Architecture, वहां की कला-संस्कृति और खान-पान सभी में हमारे संबंधों की महेक है।

साथियों,

इस समय फ्रांस समेत पूरी दुनिया में International Yoga Day की तैयारी भी चल रही है। इस अवसर पर मैं, फ्रांस में योग को आगे बढ़ाने वाले श्रीमान महेश घाट्राड्याल जी को भी आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मैं पद्म पुरस्कार से सम्मानित, शार्लोत शोपां जी को भी प्रणाम करता हूं। जिन्होंने सौ वर्ष की आयु में भी, योग के माध्यम से फ़्रांस को भारत की विरासत से जोड़ा है। उनका जीवन यह सिद्ध करता है: Yoga does not add years to life, it adds life to years.

साथियों,

मैं फ्रेद नेग्री जी को भी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक याद करता हूं। भारतीय विरासत को संरक्षित करने में उनका योगदान अतुल्य रहा है।

साथियों,

भारत और फ्रांस को कनेक्ट करने वाली एक और चीज है, और वो है फुटबॉल। इस वक्त यहां फुटबॉल फीवर पूरे जोर पर है। फ्रांस में इसकी दीवानगी, चप्पे-चप्पे पर दिखती है। लेकिन भारत में भी फुटबॉल का क्रेज़ सिर चढ़कर बोलता है।

खासतौर पर फ्रांस की टीम के फैन्स भारत में बहुत अधिक हैं। फ़्रांस ने इस वर्ल्ड कप की शुरुआत एक जोरदार जीत से शुरू की है। मैं फ्रांस की टीम को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

जाने से पहले, आप सभी के लिए कुछ और अच्छी खबरें भी लेकर के आया हूँ। वो आपके लिए हैं। पिछले वर्ष, मार्सेय में कॉन्सुलेट खोला गया, इससे काफी अधिक सुविधा मिल रही है। कुछ हफ्ते पहले, Indian Nationals के लिए French Airports पर Visa-free Transit की व्यवस्था शुरू हो गई है।

Students और Professionals की Mobility बढ़ाना हो, या Educational Qualifications की Mutual Recognition की बात हो, या फिर French Universities के भारत में Campus खोलना हो, इन सभी पर हम मिलकर आगे बढ़ रहें हैं।

अब फ्रांस में UPI के उपयोग का दायरा भी और बढ़ने जा रहा है। यानि भारत-फ्रांस कनेक्ट भी Instant और आपसी Payment भी Instant!

साथियों,

इन सभी पहलों से, हम भारत और फ़्रांस को और करीब ला रहें हैं। और मैं फिर कहूंगा इस साझेदारी की नींव, इस रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप सब मेरे देशवासी हैं।

आज जब भारत तेज़ी से विकसित भारत के लक्ष्य की ओर बढ़ रहा है, तो मैं आप सभी से भारत के साथ और गहराई से जुडने का आग्रह करूंगा। इससे भारत की विकास यात्रा को नई शक्ति मिलेगी, और आपको अपनी पुरखों की धरती की सेवा करने का अवसर भी मिलेगा।

इन्हीं शब्दों के साथ आप सभी के प्रेम आपके उत्साह और इस आत्मीय स्वागत के लिए मैं एक बार फिर आप सभी का आभार व्यक्त करता हूं।

भारत माता की जय!

बहुत बहुत धन्यवाद।