अशोक विहार येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वाभिमान अपार्टमेंट्स या गृह संकुलात नव्याने बांधण्यात आलेल्या 1,675 सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दिल्ली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आज गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित परिवर्तनकारी प्रकल्पांचा प्रारंभ झाला, त्यामुळे आजचा दिवस दिल्ली शहरासाठी ऐतिहासिक दिवस आहे - पंतप्रधान
केंद्र सरकारने झोपडपट्ट्यांच्या जागी कायमस्वरूपी घरे बांधण्याची मोहीम सुरू केली आहे : पंतप्रधान
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गरीब कुटुंबातील मुलांना नवीन संधी उपलब्ध करून देणारे धोरण : पंतप्रधान

भारत माता की जय।

भारत माता की जय।

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, धर्मेंद्र प्रधान जी, तोखन साहू जी, डॉक्टर सुकांता मजुमदार जी, हर्ष मल्होत्रा जी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना जी, संसदेतील माझे सर्व सहकारी , सर्व आमदार  आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

तुम्हा सर्वांना वर्ष 2025 च्या खूप-खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. ,जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने आपला प्रवास यावर्षी आणखी वेगवान होणार आहे. आज भारत, जगात राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक बनत आहे. 2025 या वर्षात भारताची ही भूमिका अधिक मजबूत होईल. हे वर्ष जगात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचे वर्ष असेल, हे  वर्ष भारताला जगातील सर्वात मोठे निर्मिती केंद्र बनवण्याचे वर्ष असेल, हे  वर्ष, युवकांना नवीन स्टार्टअप आणि उद्यमशीलतेमध्ये वेगाने पुढे नेण्याचे वर्ष असेल , हे वर्ष कृषी क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे वर्ष असेल. हे वर्ष महिला-प्रणित विकासाच्या आपल्या मंत्राला नवी उंची देण्याचे वर्ष असेल,हे वर्ष जीवन सुलभता वाढवण्याचे, जीवनमान उंचावण्याचे वर्ष असेल. आजचा हा कार्यक्रम देखील याच संकल्पाचा एक भाग आहे.

 

मित्रांनो,

आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे  , त्यामध्ये गरीबांसाठी घरे आहेत , शाळा आणि महाविद्यालयांशी निगडित प्रकल्प आहेत. मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. विशेषतः, मी त्या मित्रांचे , त्या माता-भगिनींचे अभिनंदन करतो, ज्यांचे आता एक प्रकारे नवे आयुष्य सुरु होत आहे. झोपड्यांच्या जागी पक्के घर , भाड्याच्या घराच्या जागी स्वतःचे घर , ही नवी सुरुवातच तर आहे.  ज्यांना ही घरे मिळाली आहेत , हे त्यांच्या स्वाभिमानाचे  घर आहे.  हे आत्मसन्मानाचे घर आहे.  हे नवीन आशा आणि नवीन स्वप्नांचे घर आहे. मी तुम्हा सर्वांच्या आनंदात, तुमच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी इथे आलो आहे. आज इथे आलो आहे तर  अनेक जुन्या आठवणी जाग्या होणे अगदी स्वाभाविक आहे. तुमच्यापैकी बहुधा काही लोकांना माहित असेल, जेव्हा आणीबाणीचा काळ होता, त्यावेळी देश इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढत होता , आणीबाणीविरोधात एक लढा सुरु होता, त्यावेळी माझ्यासारखे अनेक सहकारी भूमिगत चळवळीचा भाग होते. आणि त्याकाळी हे अशोक विहार हे माझे राहण्याचे ठिकाण होते. आणि म्हणूनच आज अशोक विहारमध्ये आल्यावर अनेक जुन्या आठवणी जाग्या होणे अगदी स्वाभाविक आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण  देश, विकसित भारताच्या निर्मितीत व्यस्त आहे. विकसित भारतात , देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर असेल, चांगली घरे असतील , हा संकल्प घेऊन आम्ही काम करत आहोत. हा संकल्प साध्य करण्यात दिल्लीची खूप मोठी भूमिका आहे.  म्हणूनच भाजपा प्रणित केंद्र सरकारने झोपड्यांच्या जागी पक्की घरे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे.  2 वर्षांपूर्वी देखील मला कालकाजी एक्सटेंशन इथे झोपडपट्टीत राहणाऱ्या बंधू-भगिनींसाठी  3 हजारांहून अधिक घरांचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली होती. अशी कुटुंबे ज्यांच्या अनेक पिढ्या केवळ झोपड्यांमध्येच राहिल्या आहेत, ज्यांच्या समोर कुठलीही आशा नव्हती ,ते पहिल्यांदाच पक्क्या घरांमध्ये जात आहेत. तेव्हा मी म्हटले होते की ही तर केवळ सुरुवात आहे. आज इथे आणखी दीड हजार घरांच्या चाव्या लोकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. ही 'स्वाभिमान अपार्टमेंट्स, गरीबांचा स्वाभिमान , त्यांची प्रतिष्ठा वाढवणार आहेत. थोड्या वेळापूर्वी जेव्हा काही लाभार्थ्यांशी मी संवाद साधत होतो, तेव्हा मला हीच भावना त्यांच्यात दिसून येत होती.  मी नवा उत्साह, नवी ऊर्जा अनुभवत होतो.  आणि तिथे मला काही मुलामुलींना भेटण्याची देखील संधी मिळाली , असे वाटत होते की स्वाभिमान अपार्टमेंटची उंची जितकी आहे ना,त्याहीपेक्षा उंच त्यांची स्वप्ने मी पाहत होतो.

 

आणि मित्रांनो,

या घरांचे मालक भलेही दिल्लीतील निरनिराळे लोक असतील, मात्र हे सगळे माझ्या कुटुंबातीलच सदस्य आहेत.

मित्रांनो,

देशाला चांगले ठाऊक आहे की मोदींनी कधीही स्वतःसाठी घर बांधले नाही, मात्र मागील 10 वर्षांमध्ये 4 कोटींहून अधिक गरीबांच्या घरांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी देखील एखादा आलिशान महाल  बांधू शकलो असतो.मात्र माझ्यासाठी तर माझ्या देशवासियांना कायमस्वरूपी घर मिळावे हेच एक स्वप्न होते. आणि मी तुम्हा सर्वांना देखील सांगतो, जेव्हा कधी तुम्ही लोकांमध्ये जाल , लोकांना भेटाल , तेव्हा आता जे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत ना , त्यांना माझ्या वतीने आश्वस्त करा, माझ्यासाठी तर तुम्हीच मोदी आहात ,  त्यांना आश्वासन द्या की आज ना उद्या त्यांच्यासाठी पक्के घर बनेल, त्यांना पक्के घर मिळेल. गरीबांच्या या घरांमध्ये त्या प्रत्येक सुविधा आहेत , ज्या उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत.  त्याच तर गरीबांचा स्वाभिमान जागृत करतात  , आत्मविश्वास वाढवतात , जी विकसित भारताची खरी ऊर्जा आहे. आणि आम्ही इथेच थांबणारे नाही. आता दिल्लीमध्ये अशाच सुमारे 3 हजार इतर घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे.  आगामी काळात हजारो नवी घरे दिल्लीकरांना मिळणार आहेत. या भागात, खूप मोठ्या संख्येने आपले कर्मचारी बांधव राहतात. त्यांची जी घरे होती, ती खूप जुनी झाली होती. त्यांच्यासाठी देखील नवीन घरे बांधण्यात येत आहेत. दिल्लीचा अभूतपूर्व विस्तार पाहता ,  केंद्र सरकार, रोहिणी आणि द्वारका सब-सिटी नंतर , आता नरेला सब-सिटीच्या निर्मितीला गती देत आहे.

मित्रांनो,

विकसित भारत घडवण्यात आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका आहे. आपली ही शहरे आहेत, जिथे दूर-दूरच्या भागातून अनेक लोक मोठी स्वप्ने उराशी बाळगून येतात, अत्यंत प्रामाणिकपणे ती स्वप्ने पूर्ण करण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात. म्हणूनच , केंद्रातील भाजपा सरकार, आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार जीवन देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रयत्न आहे की गरीब असो किंवा मध्यमवर्गीय , त्यांना चांगली घरे देण्यात मदत व्हावी. जे नवनवीन लोक गावांमधून शहरामध्ये आले आहेत , त्यांना योग्य दरात भाड्याची घरे मिळावीत. जी मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत,  त्यांना देखील त्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी सरकार संपूर्ण मदत करत आहे. मागील एका दशकापासून हे  काम सातत्याने , निरंतर सुरु आहे. मागील  10 वर्षांमध्ये  पंतप्रधान  आवास योजना शहरी अंतर्गत देशभरात 1 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. याच योजनेअंतर्गत दिल्लीतही सुमारे  30 हजार नवीन घरे बांधली आहेत.

 

मित्रांनो,

आता या प्रयत्नांना आणखी विस्तारण्याची योजना आम्ही सुरु केली आहे . पंतप्रधान आवास योजना शहरी च्या पुढील टप्प्यात  शहरी गरीबांसाठी एक कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांसाठी केंद्रातील भाजपा सरकारच मदत पुरवणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षा कमी आहे . त्या कुटुंबांना या योजनेचा विशेष लाभ होईल. 

केंद्र सरकार, मध्यम वर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाच्या व्याजात मोठी सूट देत आहे, हे पैसे सरकार देत आहे.

मित्रहो,

प्रत्येक कुटुंबाचे एक स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, खूप शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे. देशात उत्तम शाळा- महाविद्यालये असावीत,विद्यापीठे असावीत,उत्तम व्यावसायिक संस्था असाव्यात यावर भाजपा सरकार भर देत आहे. आपल्याला मुलांना केवळ शिक्षण द्यायचे नाही तर वर्तमान आणि भविष्यातल्या गरजांनुसार नव्या पिढीला सज्जही करायचे आहे.हे लक्षात घेऊनच नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली आहे. गरीब कुटुंबातले मुल असो,मध्यमवर्गीय कुटुंबातले मुल असो,त्यांना नवी संधी देणारे धोरण, नव्या शैक्षणिक धोरणात अवलंबण्यात आले आहे. आपल्या देशात मध्यम वर्गीय कुटुंबातली मुले असोत, गरीब कुटुंबातली मुले असोत, डॉक्टर बनणे, अभियंता बनणे,मोठ्या न्यायालयात वकिली करणे ही सगळी त्यांचीही स्वप्ने असतात.मात्र मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देणे सोपे नसते.गरिबांसाठी मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देणे कठीण असते.माझ्या मध्यम वर्गातली मुले, गरीब कुटुंबातली मुले, इंग्रजीच्या अभावी डॉक्टर- इंजिनियर बनू शकत नाहीत का ?  डॉक्टर- इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला हवे की नको ? आणि म्हणूनच स्वातंत्र्याला इतकी वर्षे होऊनही जे काम झाले नाही ते आपल्या या सेवकाने केले आहे. आता ही मुले आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊनही  डॉक्टर बनू शकतात, अभियंतेही होऊ शकतात आणि मोठ्यात मोठ्या न्यायालयात खटलाही चालवू शकतात.

मित्रहो,

देशाची शिक्षण व्यवस्था उत्तम करण्यामध्ये सीबीएसईची मोठी भूमिका आहे.याची व्याप्ती सातत्याने वाढत आहे.हे लक्षात घेऊनच सीबीएसईचे नवे भवन उभारण्यात आले आहे. आधुनिक शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी,परीक्षेच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्यासाठी याची मदत होणार आहे.

मित्रहो,

उच्च शिक्षणात दिल्ली विद्यापीठाचीही प्रतिष्ठा सातत्याने वृद्धिंगत होत आहे. दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मलाही लाभले. दिल्लीच्या युवकांना इथेच उच्च शिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त  व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आज ज्या नव्या परिसराची पायाभरणी झाली आहे,त्यातून दर वर्षी शेकडो नव्या युवकांना दिल्ली विद्यापीठामध्ये शिक्षणाची संधी मिळेल. आता ही प्रतीक्षा संपुष्टात  येणार आहे. सुरजमल विहार इथे पूर्व परिसर आणि द्वारका इथे पश्चिम परिसरावर आता झपाट्याने काम होईल. तसेच नजफगढ इथे वीर सावरकर जी यांच्या नावाचे नवे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

 

मित्रहो,

एकीकडे दिल्लीमध्ये शिक्षण व्यवस्थेसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे इथल्या राज्य सरकारचा खोटेपणा आहे.दिल्लीत गेली 10 वर्षे जे राज्य सरकार आहे, त्या सरकारने इथल्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे.दिल्लीमध्ये असे सरकार राज्यात आहे ज्यांना मुलांच्या भविष्याची पर्वा नाही.समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणासाठी भारत सरकारने जे पैसे दिले त्यापैकी अर्धे पैसेही हे लोक खर्च करू शकले नाहीत.

मित्रहो,

ही देशाची राजधानी आहे,दिल्लीवासियांचा हा हक्क आहे,त्यांनी  सुशासनाची कल्पना  केली आहे. सुशासनाचा स्वप्न पाहिले आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून दिल्ली, एका मोठ्या आप- दा ने ग्रासली गेली आहे. अण्णा हजारे जी यांना पुढे करत काही अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला  आप- दा मध्ये लोटले आहे. मद्य धोरण घोटाळा,प्रदुषणाविरोधात लढा देण्याच्या नावाखाली घोटाळा, भर्तीमध्ये घोटाळा, हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गोष्टी करत होते मात्र आप- दा बनून या लोकांनी दिल्लीला ग्रासले आहे.हे लोक राजरोस भ्रष्टाचार करतात आणि त्याचे उदात्तीकरणही करतात,चोरी आणि वर शिरजोरी,हे आप,ही आप-दा दिल्लीवर आली आहे आणि म्हणूनच दिल्लीकरांनी आप-दा विरोधात लढा पुकारला आहे.दिल्लीच्या मतदाराने ,दिल्ली आप-दा मुक्त करण्याचा निश्चय केला आहे.दिल्लीचा प्रत्येक नागरिक म्हणत आहे,दिल्लीमधले  प्रत्येक मूल हे म्हणत आहे,दिल्लीतल्या गल्लोगल्लीमधून हा आवाज येत आहे आप-दा आता सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू.

मित्रहो,

दिल्ली देशाची राजधानी आहे,इथे मोठ्या खर्चाची जी कामे होतात, ती भारत सरकार,केंद्र सरकारची जबाबदारी आहे.दिल्लीमध्ये बहुतांश रस्ते,मेट्रो, मोठ-मोठी रुग्णालये,मोठ-मोठी महाविद्यालये,हे सर्व केंद्र सरकार उभारत आहे.मात्र इथल्या आप-दा सरकारकडे ज्या कामांची जबाबदारी आहे टी कामे इथे रखडली आहेत.दिल्लीला ज्या आप-दा ने घेरले आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. ही कशी आप-दा  आहे,याचे आणखी एक उदाहरण आपली यमुना जी आहे, यमुना नदी.इथे येण्यापूर्वी आत्ता मी स्वाभिमान सदनिका लाभार्थ्यांसमवेत संवाद साधत होतो,त्यातले बरेचजन उत्तर भागात राहणारे होते,मी विचारले छठ पूजा कशी राहिली ?ते म्हणाले साहेब,हात जोडून सांगत होते,यमुनाजीची स्थिती इतकी खराब झाली आहे तर आम्ही छठ पूजा काय करणार ? या भागात काही छोटे-मोठे करून यमुना नदीची क्षमा मागतो. यमुना नदीची ही स्थिती.

 

मित्रहो,

आज दहा वर्षा नंतर हे म्हणत आहे आणि लाज तर जराही नाही.ही कसली  आप-दा,हे सांगतात यमुना नदीची सफाई करून मते मिळत नाहीत. अरे मते मिळणार नाहीत म्हणून यमुना नदीची दुर्दशा  करणार का ? यमुना नदीची सफाई झाली नाही तर दिल्लीला पिण्याचे पाणी  कसे मिळणार ?या लोकांच्या कृत्यांमुळेच आज दिल्लीकरांना अस्वच्छ पाणी मिळत आहे. या आप-दा ने दिल्लीकरांचे जीवन टँकरमाफियांच्या हाती सोपवले आहे. हे आप-दा वाले  राहिल्यास भविष्यात दिल्लीला आणखी भयंकर स्थितीकडे नेतील.

मित्रहो,

देशासाठी ज्या चांगल्या योजना आखल्या जात आहेत त्याचा लाभ दिल्लीच्या माझ्या बंधू-भगिनींना मिळावा असाच माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. केंद्रातल्या भाजपा सरकारच्या योजनांमधून गरीब आणि मध्यम वर्गाला सुविधाही मिळत आहेत आणि त्यांची पैशाची बचतही  होत आहे.

सहकाऱ्यांनो,

केंद्रातील भाजपाचे सरकार वीजचे बिल शून्यावर आणत आहे आणि इतकेच नाही, तर विजेपासून उत्पन्न मिळवण्याची संधी देखील देत आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आज प्रत्येक कुटुंब वीज उत्पादक बनू लागले आहे. भाजपाचे सरकार प्रत्येक इच्छूक कुटुंबाला 78 thousand rupees, जवळ जवळ 75 ते 80 हजार रुपये, एका कुटुंबाला सौर पॅनल बसवण्यासाठी 75 ते 80 हजार रुपये देत आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे साडेसात लाख घरांच्या छतांवर असे पॅनेल लावण्यात आले आहेत. यामुळे वापरासाठी गरजेची असलेली वीज मोफत मिळणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त विजेचे पैसे सरकार तुम्हाला देणार आहे. मी दिल्लीतील जनतेला विश्वासाने सांगू इच्छितो की, दिल्लीमध्ये जसा भाजपापाचा मुख्यमंत्री होईल, तसे लगेचच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आणखी जास्त वेगाने राबविली जाईल.

सहकाऱ्यांनो,

आज दिल्लीतील सुमारे 75 लाख गरजू लोकांना भारत सरकार मोफत रेशन देत आहे. एक देश एक रेशन कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे दिल्लीच्या जनतेची मोठी मदत केली आहे. नाहीतर काही वर्षांपूर्वीपर्यंत तर दिल्लीत रेशनकार्ड बनवणे देखील खूपच अवघड झाले होते. जुनी वर्तमानपत्रे काढा आणि बघा काय काय होत होते ते. आप - दा वाले तर रेशन कार्ड बनवण्यासाठी देखील लाच घेत असत. आता मात्र लाचखोरीच्या वाटा देखील बंद झाल्या आहेत आणि रेशनच्या खर्चात देखील बचत होऊ लागली आहे.

सहकाऱ्यांनो,

दिल्लीमधील गरीब असोत, मध्यम वर्गीय कुटुंब असोत, त्यांना परवडणाऱ्या दरातली औषधे उपलब्ध व्हावीत, याकरता जवळपास 500 जनऔषधी केंद्रे, इथे दिल्लीमध्ये सुरू केली गेली आहेत. या केंद्रांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध आहेत, 100 रुपये किमतीची औषधे 15 रुपयांमध्ये, 20 रुपयांमध्ये मिळतात. या स्वस्त औषधांमुळे दिल्लीतील लोकांची दर महिन्याला हजारो रुपयांची बचत होत आहे.

 

सहकाऱ्यांनो,

मला तर दिल्लीकरांना मोफत उपचारांची सुविधा देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ देखील द्यायचा आहे. पण  आप - दा सरकारचे सरकारचे दिल्लीतील जनतेशी मोठे वैर आहे. संपूर्ण देशात आयुष्मान योजना लागू झाली आहे, परंतु या योजनेला आप - दा वाले लोकं इथे लागू होऊ देत नाहीत. याचे नुकसान दिल्लीच्या जनतेला सहन करावे लागत आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी की, आपले दिल्लीतील व्यापारी देशभर ये जा करत असतात, दिल्लीतील फ्रोफेशनल देशभर ये जा करत असतात, दिल्लीतील युवा वर्ग  देशभर ये जा करत असतो. हिंदुस्थानाच्या कोणत्याही कान कोपऱ्यात गेलात, आणि तिथे काही झालं, आणि आयुष्यमान कार्ड असेल तर, ते कार्ड तेथेही तुमच्या उपचारांची हमी असणार आहे. पण हा लाभ दिल्लीला मिळतच नाही आहे, कारण दिल्लीचे आप - दा सरकार तुम्हाला आयुष्मान सोबत जोडूनच घेत नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही हिंदुस्थानात कुठे तरी गेलात, काही तरी झालं, तर या मोदीची इच्छा असून देखील तो तुमची सेवा करू शकत नाही, कारण या आप - दा च्या पापांमुळेच

सहकाऱ्यांनो,

भाजपाच्या सरकारने 70 वर्षांवरील वृद्धांना देखील आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले आहे. कोणत्याही कुटुंबातील 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आता त्यांच्या मुलांना त्याच्या आजाराची चिंता करत बसण्याची गरज असणार नाही, हा तुमचा मुलगा त्यांची चिंता वाहील. पण मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, हा सुपुत्र, त्याला दिल्लीतील ज्येष्ठ व्यक्तींची कितीही सेवा करायची इच्छा असली, तरी आप - दाच्या लोकांनी दिल्लीतील ज्येष्ठ व्यक्तिंना त्या सेवेपासून वंचित करून ठेवले आहे, त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही. आप - दा वाल्यांचा स्वार्थ, आप - दा वाल्यांचा हट्टीपणा, आप - दा वाल्यांचा अहंकार, ते याला तुमच्या जीवापेक्षा मोठी गोष्ट मानतात.

सहकाऱ्यांनो,

दिल्लीतील लोकांसाठी भारत सरकार पूर्ण संवेदनशीलता बाळगून काम करत आहे. दिल्लीतील अनेक वसाहतींना नियमित करून घेत भाजपाच्या सरकारने लाखो लोकांची चिंता दूर केली, परंतु इथल्या आप - दा सरकारने, इथल्या राज्य सरकारने त्यांना आप - दा चे बळी बनवले आहे. केंद्रातील भाजपाचे सरकार लोकांची मदत करण्यासाठी खास एक खिडकी शिबिरे चालवत आहे, परंतु आप - दा सरकार, या वसाहतींमध्ये पाणीची, सांडपाण्याच्या गटारांची सुविधा देखील योग्यरित्या देत नाही आहे. या सगळ्यामुळेच त्यामुळे लाखो दिल्लीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतर देखील जर सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा नसेल, नाले तुटले असतील, गल्ल्यांमधून घाण पाणी वाहत असेल, तर दिल्लीतील जनता व्यथित होणे हे खूपच स्वाभाविक आहे. जे लोक दिल्लीतील जनतेचा विश्वासघात करून, खोट्या शपथा घेऊन, स्वत:साठी मात्र काचेचा महाल बांधून घेत आहेत, त्यांच्यातून जेव्हा ही आप - दा जाईल आणि भाजपा येईल, त्या वेळी या सर्वच समस्यांचे निराकारण देखील केले जाईल.

 

सहकाऱ्यांनो,

तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जिथे जिथे आप - दा ने हस्तक्षेप केलेला नाही,  तुमचा हस्तक्षेप नसतो, तिथे प्रत्येक काम चांगल्या तऱ्हेने होते आहे. तुमच्यासमोर DDA -दिल्ली विकास प्राधिकरणाचे उदाहरण आहे. DDAमध्ये आप - दाचा तितका हस्तक्षेप नाही आहे. याच कारणामुळे DDA गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी नवी घरे बांधू शकत आहे. दिल्लीतील प्रत्येक घरापर्यंत वाहिन्यांच्या माध्यमातून स्वस्त दरातील गॅस पोहोचवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम देखील यामुळेच होऊ शकते आहे, कारण या कामात देखील आप - चा हस्तक्षेप नाही आहे. दिल्लीमध्ये इतके सारे महामार्ग बांधले जात आहेत, द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत, हे काम देखील यामुळेच पूर्ण होत आहे,  कारण या कामांत देखील आप - दाचा हस्तक्षेप नाही आहेत.

सहकाऱ्यांनो,

आप - दाचे लोक दिल्लीला केवळ समस्या देऊ शकतात, तर त्याचवेळी भाजपा मात्र दिल्लीतील लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामांत गुंतली आहे. दोन दिवसांपूर्वीच आमच्या दिल्लीतील सर्व सात खासदारांनी इथल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारला महत्त्वाच्या सूचना सादर केल्या होत्या. दिल्ली विमानतळाच्या जवळच्या शिवमूर्ती ते नेल्सन मंडेला मार्गापर्यंत बोगदा बांधण्याचे काम असो, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाला K.M.P द्रुतगती मार्गा सोबत जोडण्याचे काम असो, दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्गाला शहर विस्तार रस्ता दोन सोबत जोडण्याचे काम असो, किंवा दिल्लीचा ईस्टर्न बायपासचे काम असो, या आमच्या खासदारांनी सादर केलेल्या सूचना आहेत, या सूचनांचा भारत सरकारने स्विकार केला आहे, त्यांना तत्वतः मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे येता काळात दिल्लीतील वाहतुक कोंडीची समस्या सुटू शकणार आहे.

सहकाऱ्यांनो,

2025 हे वर्ष दिल्लीत सुशासनाचे नवे युग प्रस्थापित करेल. हे वर्ष देश प्रथम, देशवासी प्रथम, माझ्यासाठी दिल्लीतील रहिवासी प्रथम या भावनेला दृढ करेल. हे वर्ष दिल्लीतून राष्ट्र उभारणी आणि लोक कल्याणाच्या नव्या राजकारणाचा शुभारंभ करेल. आणि म्हणूनच आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे, आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे, आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे. याच विश्वासाने पुढे जात, तुम्हा सगळ्यांचे नवीन घरांसाठी, नवीन शैक्षणिक संस्थांसाठी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. चला माझ्या सोबत बोला  -

 

भारत माता की जय.

दोन्ही हाथ वर करून पूर्ण जोषाने बोला, आप - दा पासून मुक्तता मिळवण्याचे नारे हवे आहेत-

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

खूप - खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addresses the Indian Community in Paris
June 18, 2026

नमस्ते!

बों जू!

ऐसा लग रहा है, आप सब छुट्टी के मूड में हैं।

साथियों,

ये पेरिस शहर, Lights का शहर है, रंगों का शहर है, यहां Art है, Ideas हैं, और innovation की प्रेरणा भी है। इस शहर को भारत के अलग-अलग राज्यों से आए आप सभी लोग और भी खूबसूरत बना देते हैं। नए नए रंगों से भर देते हैं।

कोई तमिल है, कोई पंजाबी है, कोई गुजराती है, तो कोई मराठी है, और कोई बंगाली है। भारत के हर कोने का प्रतिनिधित्व यहां दिखाई देता है।

साथियों,

मैं जब 14 जून को नीस पहुंचा था तो सबसे पहले भारत इनोवेट्स कार्यक्रम में शामिल हुआ था। आज जब मैं फ्रांस से वापसी की तैयारी में हूं तो लग रहा है जैसे भारत कनेक्ट्स कार्यक्रम में आ गया हूं।

फ्रांस में रहने वाले आप लोगों ने 21वीं सदी के भारत-फ्रांस रिश्तों को जिस तरह कनेक्ट किया है, वो हमारी Strategic Partnership की बहुत बड़ी ताकत बन रही है। मैं आप सभी के लिए भारत से 140 करोड़ देशवासियों की शुभकामनाएं लेकर आया हूं। इस आत्मीय स्वागत के लिए, मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आज मैं ऐसे समय में फ्रांस आया हूं जब कुछ ही दिन पहले हमारी सरकार के 12 वर्ष पूरे हुए हैं। चुने हुए प्रधानमंत्री के रूप निरंतर 12 साल तक देश की सेवा करना मेरे जीवन का बहुत बड़ा सौभाग्य रहा है। यह भारत के लोकतंत्र की शक्ति है जिसने एक चायवाले को यहां तक पहुंचा दिया।

साथियों,

बीते 12 वर्ष, 140 करोड़ भारतीयों के अद्भुत सामर्थ्य के रहे हैं। 12 साल के इस कालखंड में भारत का GDP दोगुना हुआ है। Airports की संख्या दोगुनी हुई है। Universities की संख्या भी दोगुनी हो गई है। Highway Construction की स्पीड तीन गुना बढ़ गई। और Metro Network, चार गुणा बड़ा हो गया है।

मैं आपको कुछ और फैक्ट्स दूंगा, उससे आप अंदाजा लगा पाएंगे कि भारत किस स्पीड और कितने बड़े स्केल पर काम कर रहा है। पिछले 12 वर्षों में भारत का Defence Export 35 गुणा यानि Thirty Five Times बढ़ गया है।

औऱ एक फैक्ट सुनिए भारत में मोबाइल मैन्यूफैक्टरिंग यूनिट्स में, 100 गुणा की बढ़ोतरी हुई है। 100 times. भारत अब दुनिया का दूसरा सबसे बड़ा mobile phone manufacturer है। इसी गति, इसी प्रगति का नतीजा है कि आज भारत दुनिया की Fastest Growing Major Economy है।

साथियों,

आज भारत की कहानी सिर्फ Economic Progress की कहानी नहीं है। सिर्फ यहाँ अटक नहीं जाती है। ये Social Transformation की भी कहानी है।

पिछले 12 साल में देश में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। यानि एक ऐसी प्रगति जिसका लाभ समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंच रहा है। फ्रांस में जितने घर हैं, उससे भी अधिक पक्के घर बीते 12 वर्ष में हमने जरूरतमंदों के लिए बनाए हैं।

अब हर परिवार के पास, गरीब से गरीब क्यों न हो, Bank Account है। Financial Inclusion एक सरकारी कार्यक्रम नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन का अभियान बना है।

साथियों,

इन 12 वर्षों की उपलब्धियों में, एक उपलब्धि ऐसी भी है जिसे किसी आंकड़े से, या अंकों से, नहीं मापा जा सकता। वह है 140 करोड़ भारतीयों का आत्मविश्वास।

आज का भारत और आज के भारत का युवा बहुत बड़े सपने देख रहा है। भारत का किसान नई संभावनाओं के साथ आगे बढ़ रहा है। भारत की महिलाएं नए नेतृत्व का परिचय दे रही हैं। इसलिए ये सिर्फ Achievements के 12 साल नहीं हैं, ये भारत की एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने का कालखंड रहा है।

साथियों,

एक समय था जब दूर-दराज के गांवों तक आधुनिक सुविधाएं पहुंचाना वाकई बहुत मुश्किल भरा था। आज उन्हीं गांवों में बिजली भी है, इंटरनेट भी है, और डिजिटल सेवाओं की पूरी दुनिया भी है। आज एक क्लिक पर, कभी भी, कहीं भी बैंकिंग सेवाएं उपलब्ध हैं।

आज मोबाइल फोन, भारत के नागरिकों को अनेक सुविधाओं से कनेक्ट कर रहा है। हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे dairy farmers, हमारी महिलाएं, हमारे स्टूडेंट्स, सभी टेक्नोलॉजी के माध्यम से सशक्त हो रहे हैं, और अपने लिए नए अवसर बना रहे हैं।

साथियों,

आपने 125 करोड़ से अधिक Aadhaar IDs के बारे में सुना है। लेकिन आज भारत सिर्फ पहचान को डिजिटल नहीं बना रहा। आज करीब 90 करोड़ भारतीयों की Unique Digital Health IDs बनाई जा चुकी हैं। जिससे मेडिकल रिकॉर्ड सुरक्षित और accessible बन गए हैं। इससे हेल्थकेयर डिलीवरी और अधिक आसान और efficient हो रही है।

साथियों,

इन उपलब्धियों की सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें से अधिकांश चीजें कुछ वर्ष पहले तक कल्पना जैसी लगती थीं। कौन सोच सकता था कि गांव-गांव तक हाई-स्पीड इंटरनेट पहुंचेगा ? कौन सोच सकता था कि दूर-सुदूर के गांवों में भी QR code जीवन का हिस्सा बन जायेगा ? गांव में कोई बहन, ड्रोन से खेती करने में मदद करेगी, ये भी असंभव लगता था।

लेकिन आज यह सब, भारत के करोड़ों लोगों के जीवन का सामान्य हिस्सा बनता जा रहा है। और आपको गर्व होगा साथियों, यही नए भारत की पहचान है।

जो कभी सपना था, वह आज सच्चाई है। जो कभी नामुमकिन लगता था, वो आज मुमकिन हुआ है, औऱ ये करने के पीछे सबसे बड़ी ताकत क्या है? किसकी वजह से ये सब संभव हुआ है? यह मोदी के कारण नहीं, वो ताकत है- भारत का लोकतंत्र, भारत की डेमोक्रेसी। इस डेमोक्रेसी में सबका साथ है, सबका विकास है।

साथियों,

आज से 50 या 100 साल बाद जब भारत के इस कालखंड की समीक्षा होगी, तो ये बात उभरकर सामने आएगी कि इस कालखंड को भारत की Aspirations ने ड्राइव किया। यह भारत के एस्पिरेशन्स का नया युग है।

जहां बिजली पहुंची है, वहां लोग सिर्फ बिजली नहीं चाहते, वे Smart Living चाहते हैं। जहां ट्रेन पहुंची है, वहां लोग High-Speed Connectivity चाहते हैं। जहां हाईवे बने हैं, वहां लोग World-Class Expressways चाहते हैं। जहां इंटरनेट पहुंचा है, वहां लोग AI और Digital Innovation में नेतृत्व चाहते हैं।

यानि आज भारत के लोग अपने जीवन को भी Next Level पर ले जाना चाहते हैं, और भारत को भी Next Level पर ले जाना उनका मकसद है, उनका संकल्प है, उनके सपने है।

और साथियों,

यही Aspirations आज भारत की विकास यात्रा की सबसे बड़ी शक्ति हैं। मैं आपको भारत की Space Journey का उदाहरण दूंगा।

भारत ने चंद्रयान को चंद्रमा के South Pole पर उतारा। दुनिया ने इसे एक बहुत बड़ी उपलब्धि माना। लेकिन भारत इसे अपनी मंजिल मानकर रुका नहीं। आज देश गगनयान की तैयारी कर रहा है। भारत अंतरिक्ष में अपना Space Station बनाने की दिशा में आगे बढ़ रहा है।

हमारे Space Startups Global Space Economy में अपनी जगह बनाने के लिए पुरजोश काम कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं।

साथियों,

Green Energy के क्षेत्र में भी भारत की यही एस्पिरेशंस दिखाई देती है। Solar Power में भारत की उपलब्धियों की दुनिया भर में लगातार चर्चा हो रही हैं। लेकिन भारत अगली छलांग की तैयारी कर रहा है।

Green Hydrogen में बड़े निवेश हो रहे हैं। Advanced Nuclear Energy पर तेजी से काम हो रहा है। आपने भारत के Fast Breeder nuclear Reactor से जुड़ी प्रोग्रेस के बारे में भी सुना ज़रूर होगा। ये भारत के न्यूक्लियर एनर्जी लैंडस्केप में क्रांतिकारी परिवर्तन करने का बहुत बड़ा अचीवमेंट हमारे सीसेन्टिस्टों ने किया है।

साथियों,

आज का भारत भविष्य का पूरा Ecosystem बना रहा है। भारत एक साथ हर उस क्षेत्र में निवेश कर रहा है, जो आने वाले दशकों की दिशा तय करेगा।

अभी आपने कुछ दिन पहले ही देखा है नीस में भारत इनोवेट्स का एक आयोजन किया। ये इवेंट भारत के डीप टेक सामर्थ्य को दुनिया तक पहुंचाने का एक और माध्यम था। इसमें भारत के 120 Deep-Tech Startups उपस्थित थे। Bharat Innovates में करीब एक हजार चार सौ B2B Meetings हुईं है। कई Startups के लिए Investment Commitments आगे बढ़ीं, Commercial Orders के लिए रास्ते खुले। French और European Universities तथा Incubators के साथ Engagements बढ़ रही हैं।

Student Exchanges, Joint Research, और Innovation Support के नए रास्ते बने। इसलिए Bharat Innovates सिर्फ एक Summit नहीं रहा। यह Innovation Diplomacy का एक नया मॉडल बना है।

और आज ही पेरिस में VivaTech इवेंट के जरिए, इस यात्रा को हमने और आगे बढ़ाया। नीस में हमने Ideas को Capital से जोड़ा और पेरिस में Indian Innovation को Global Scale से जोड़ा। आज दुनिया देख रही है भारत केवल भविष्य के लिए तैयार नहीं हो रहा है। भारत भविष्य को आकार दे रहा है।

साथियों,

एक समय था, जब देशों के बीच रिश्ते केवल व्यापार से तय होते थे। आज व्यापार के साथ-साथ Trust यानि भरोसा भी उतना ही महत्वपूर्ण हो गया है।

हर देश Reliable Supply Chains चाहता है। हर देश Stable Partnerships चाहता है। हर देश ऐसे साथियों की तलाश में है, जिन पर लंबे समय तक भरोसा किया जा सके। और ऐसे समय में, भारत विश्व में एक Trusted Partner के रूप में उभर रहा है।

एवियां में G7 बैठक के दौरान मैंने trust based partnerships बनाने पर ज़ोर दिया। ग्लोबल साउथ के देशों के साथ equal पार्टनर्स के रूप में आगे बढ़ने का आह्वान किया। भारत का G7 समिट में संदेश था Global Governance तभी प्रभावी होगी जब वह Inclusive होगी। Global Growth तभी Sustainable होगी जब वह शेयर्ड होगी। और Global Technology तभी मानवता के लिए उपयोगी होगी जब वह Trusted होगी।

साथियों,

भारत और दुनिया के बीच व्यापारिक रिश्तों में नई ऊर्जा नज़र आ रही है। फ्रांस के साथ भारत का ट्रेड लगतार बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में भारत ने दुनिया के अनेक देशों के साथ Free Trade Agreements किए हैं। यूरोपियन यूनियन हो, यूनाइटेड किंगडम हो दुनिया के हर देश, हर रीजन के साथ भारत समझौते कर रहा है।

अगले महीने से भारत और UK के बीच ट्रेड एग्रीमेंट भी लागू हो जाएगा। यह एग्रीमेंट भारत के farmers, workers और innovators को अनेक नए अवसर प्रदान करेगा।

साथियों,

आज दुनिया Uncertainty और Disruption के दौर से गुजर रही है। ऐसे समय में भारत और फ्रांस की साझेदारी विश्वास, स्थिरता और सहयोग का एक मजबूत स्तंभ बन रहा है।

इस वर्ष हमने भारत और फ्रांस के संबंधों को Special Global Strategic Partnership का दर्जा दिया था। नीस में मेरे मित्र President Macron और मैंने हमारे संबंधों को force for global good बनाने पर चर्चा की। Defence से लेकर space और नुक्लियर तक AI और क्रिटीकल मिनरल्स से लेकर high speed railway तक, हर क्षेत्र में हम मिलकर आगे बढ़ेंगे।

साथियों,

Solar energy हो, या AI के क्षेत्र में सहयोग हो, भारत और फ्रांस मिलकर ऐसे समाधान विकसित कर रहे हैं जो पूरी मानवता के हित में हैं। पिछले वर्ष पेरिस में और इस वर्ष दिल्ली में हमने AI Summit को Co-chair किया।

अब हम साथ मिलकर अगले वर्ष “तृष्णा” satellite को लॉन्च करने जा रहें हैं। यह “तृष्णा” satellite जो विश्व में फूड और वाटर सिक्युरिटी सुनिश्चित करने में योगदान देगा।

और साथियों,

यह सभी गवर्नमेंट टू गवर्नमेंट पहलो में आप सभी का योगदान बहुत महत्वपूर्ण है। ये आप हैं जो भारत और यूरोप के बीच सबसे मजबूत सेतु हैं। आप दोनों समाजों को समझते हैं। दोनों बाजारों को समझते हैं। आने वाले समय में Talent, Trade, Technology, Tourism और Investment के नए अवसरों को आगे बढ़ाने में आपकी भूमिका लगातार बढ़ने वाली हैं।

साथियों,

भारत और फ्रांस के रिश्तों को साझा इतिहास, साझा मूल्यों और साझा विश्वास ने आगे बढ़ाया है। विश्व युद्धों के दौरान फ्रांस की धरती पर बलिदान देने वाले भारतीय सैनिकों की स्मृतियां आज भी हमें जोड़ती हैं।

मुझे पहले नव शापेल में श्रद्धांजलि देने का अवसर मिला, पिछले वर्ष प्रेसिडेंट मैक्रों के साथ मार्सेय के वॉर मेमोरियल जाने का अवसर भी मिला। ये हमारी साझा विरासत है।

फ्रांस, भारतीयों के योगदान को संजोता भी है और सराहता भी है। भारतीय मूल की नूर इनायत खान हों, जिन्होंने फ्रांस की Resistance के लिए अपना जीवन बलिदान किया, या महाराजा रणजीत सिंह के साथ काम करने वाले जनरल जां फ्रांस्वा अलार हों ये सभी भारत और फ्रांस की साझा विरासत के प्रतीक हैं।

भारत के राज्य पुडुचेरी में भी फ्रेंच विरासत की झलक दिखाई देती है। वहां का Architecture, वहां की कला-संस्कृति और खान-पान सभी में हमारे संबंधों की महेक है।

साथियों,

इस समय फ्रांस समेत पूरी दुनिया में International Yoga Day की तैयारी भी चल रही है। इस अवसर पर मैं, फ्रांस में योग को आगे बढ़ाने वाले श्रीमान महेश घाट्राड्याल जी को भी आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मैं पद्म पुरस्कार से सम्मानित, शार्लोत शोपां जी को भी प्रणाम करता हूं। जिन्होंने सौ वर्ष की आयु में भी, योग के माध्यम से फ़्रांस को भारत की विरासत से जोड़ा है। उनका जीवन यह सिद्ध करता है: Yoga does not add years to life, it adds life to years.

साथियों,

मैं फ्रेद नेग्री जी को भी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक याद करता हूं। भारतीय विरासत को संरक्षित करने में उनका योगदान अतुल्य रहा है।

साथियों,

भारत और फ्रांस को कनेक्ट करने वाली एक और चीज है, और वो है फुटबॉल। इस वक्त यहां फुटबॉल फीवर पूरे जोर पर है। फ्रांस में इसकी दीवानगी, चप्पे-चप्पे पर दिखती है। लेकिन भारत में भी फुटबॉल का क्रेज़ सिर चढ़कर बोलता है।

खासतौर पर फ्रांस की टीम के फैन्स भारत में बहुत अधिक हैं। फ़्रांस ने इस वर्ल्ड कप की शुरुआत एक जोरदार जीत से शुरू की है। मैं फ्रांस की टीम को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

जाने से पहले, आप सभी के लिए कुछ और अच्छी खबरें भी लेकर के आया हूँ। वो आपके लिए हैं। पिछले वर्ष, मार्सेय में कॉन्सुलेट खोला गया, इससे काफी अधिक सुविधा मिल रही है। कुछ हफ्ते पहले, Indian Nationals के लिए French Airports पर Visa-free Transit की व्यवस्था शुरू हो गई है।

Students और Professionals की Mobility बढ़ाना हो, या Educational Qualifications की Mutual Recognition की बात हो, या फिर French Universities के भारत में Campus खोलना हो, इन सभी पर हम मिलकर आगे बढ़ रहें हैं।

अब फ्रांस में UPI के उपयोग का दायरा भी और बढ़ने जा रहा है। यानि भारत-फ्रांस कनेक्ट भी Instant और आपसी Payment भी Instant!

साथियों,

इन सभी पहलों से, हम भारत और फ़्रांस को और करीब ला रहें हैं। और मैं फिर कहूंगा इस साझेदारी की नींव, इस रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप सब मेरे देशवासी हैं।

आज जब भारत तेज़ी से विकसित भारत के लक्ष्य की ओर बढ़ रहा है, तो मैं आप सभी से भारत के साथ और गहराई से जुडने का आग्रह करूंगा। इससे भारत की विकास यात्रा को नई शक्ति मिलेगी, और आपको अपनी पुरखों की धरती की सेवा करने का अवसर भी मिलेगा।

इन्हीं शब्दों के साथ आप सभी के प्रेम आपके उत्साह और इस आत्मीय स्वागत के लिए मैं एक बार फिर आप सभी का आभार व्यक्त करता हूं।

भारत माता की जय!

बहुत बहुत धन्यवाद।