From Kargil to Kanyakumari, Kutch to Kamrup, if you travel, you will know at what speed and at how many levels the work is going on: PM Modi
Our focus is on creating next-gen infrastructure: PM Modi
PM Modi reiterates the Union Government's vision of "Housing For All" by 2022
‘Ease of Living’ for people is our aim. Resources are being devoted towards creating urban centres where the development is holistic: PM Modi
Through Startup India, and Atal Innovation Mission, India is emerging as a centre for technology: PM Modi
The work on Delhi Metro was started during the Atal Ji's government; today almost entire Delhi has been connected to the Metro: PM
The infrastructure needed for the fourth industrial revolution is ready for us and we are ready to have an army of Innovative Minds like thousands of young colleagues here: Prime Minister Modi

इथे उपस्थितीत बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील आजचा हा माझा चौथा कार्यक्रम आहे. याआधी मी ठाण्यात होतो. तिथे देखील हजारो-कोटींच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

यामध्ये गरिबांसाठीच्या घरांचे प्रकल्प पण होते आणि मेट्रो विस्ताराशी संबंधित प्रकल्प पण होते.

8 हजार कोटी रुपये खर्च करून निर्माण होत असलेल्या पुणे मेट्रो लाईनच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी करण्याची संधी आता थोड्यावेळापूर्वी मला मिळाली. हिंजेवाडी पासून शिवाजी नगर पर्यंत जोडणाऱ्या या मेट्रो प्रकल्पामुळे देशातील सर्वात व्यस्त आयटी केंद्रांपैकी एक असलेल्या या क्षेत्राला यामुळे खूप सुविधा होणार आहे.

महाराष्ट्र आणि देशातील कानाकोपऱ्यातून इथे काम करायला येणाऱ्या आयटी व्यावसायिकांचे, इथल्या स्थानिक नागरिकांचे जीवन यामुळे सुकर होईल.

मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी मला पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले होते. मला आनंद आहे की, ज्या दोन कॉरीडोरवर हे काम सुरु करण्यात आले होते, तिथे जलद गतीने काम सुरु आहे. मला आशा आहे की, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पुण्यात 12 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावायला सुरुवात होईल.

शिवाजी नगर पासून आज तिसऱ्या टप्प्याचा देखील शुभारंभ झाला. जेव्हा हा टप्पा पूर्ण होईल तेव्हा, लोकांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या चार वेगवेगळ्या कोपऱ्यापासून हिंजेवाडी आयटी पार्कला पोहोचणे खूपच सोयीचे होईल.

इथे उपस्थितीत आयटी क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांचे मी यासाठी विशेष अभिनंदन करतो. आज इथे ज्या प्रकल्पांच्या कामांची सुरुवात झाली हे, ते केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या त्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे ज्याच्या केंद्रस्थानी पायाभूत सुविधा आहेत.

गेल्या चार-साडे चार वर्षांपासून तुम्ही बघतच आहात की, कशाप्रकारे केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे.

देशभरात कनेक्टिव्हिटी, म्हणजेच महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग आणि आय-वे चा विस्तार-वेग वाढवण्यासाठी जलद गतीने काम सुरु आहे.

मित्रांनो, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कामरूपपर्यंत जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल कोणत्या वेगाने आणि किती मोठ्या प्रमाणावर काम चालु आहे.

सरकारच्या वचनबद्धतेमुळे हे सर्व शक्य झाले आहे, त्याचसोबत स्थानिक लोकं, शेतकरी कामगार, व्यवसायिक यांच्या इच्छा- आकांक्षा आणि सहकार्य देखील आहेच.

विकासाच्या महामार्गापासून आज कोणीही वंचित नाही. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने कोणी कितीही समर्थ अथवा असमर्थ असुदे, परंतु तो त्याचा वेळ केवळ प्रवास करण्यामध्ये फुकट घालवू इच्छित नाही. कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे त्याचे पीक, उत्पन्न, त्याचे दुध-दही,  त्याचे उत्पादन वाया जावे अशी त्याची बिल्कुल इच्छा नसते. त्याच्या मुलांना शाळेत यायला जायला कमी वेळ लागावा अशी त्याची इच्छा असते जेणेकरून तो जास्तवेळ अभ्यास करू शकेल आणि त्याला खेळायला पुरेसा वेळ मिळेल. तो तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून 8-9 तासाच्या कार्यालयीन वेळेला 12-13 तास करू इच्छित नाही. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो. आपल्या वेळेचा सदुपयोग करू इच्छितो. याच कारणास्तव गावापासून शहरापर्यंत, पुढील पिढीच्या पायभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्राच्या एकीकरणावर लक्ष दिले जात आहे.

मित्रांनो, याच विचारा सोबत केंद्र सरकार इथे देवेंद्र फडणवीस याच्या सरकार सोबत महाराष्ट्रात पुण्याची पायभूत सुविधा मजबूत करण्याचे काम करत आहे.

हिंजेवडी- शिवाजीनगर मेट्रो लाईन अजून एका दृष्टीने खास आहे. सरकारने देशातील मेट्रोच्या विकासासाठी पहिल्यांदा जे मेट्रो धोरण बनवले, त्या अंतर्गत तयार होणाऱ्या प्रकल्पांपैकी हा पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प पीपीपी म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून तयार होत आहे.

एका वर्षापूर्वी सरकारने जे नविन मेट्रो धोरण तयार केले आहे, ते देशातील मेट्रोच्या विस्ताराप्रती आमचा संकल्प दर्शवितो. हे धोरण आल्यानंतर मेट्रो निर्माण कार्य वेगाने होत आहे, कारण नियम-कायदे स्पष्ट झाले आहेत.

शहरांमध्ये वाहतूक क्षेत्राच्या वेगवेगळ्या एजन्सींमधील ताळमेळ पद्धती निश्चित केल्या आहेत. या मेट्रो रेल्वे धोरणात सुधारणा केल्या आहेत. मेट्रो ट्रेनबरोबरच मेट्रो स्टेशन पर्यंत फीडर बस, नवीन फुटपथ, नवीन पदपथ देखील विकसित केले जातील. आता मेट्रो मध्ये अंतर्भूत शहरी वाहतूक प्राधिकरण द्वारे सिंगल कमांड सिस्टम अंतर्गत काम चालू आहे. यामुळे लोकांच्या आवश्यक गरजांची माहिती मिळत आहे आणि आगामी काळात अजून आणखी शहरे यात जोडली जातील.

गेल्या चार वर्षांत 300 किलोमीटरचे नवीन मार्ग अधिकृत केले आहे आणि 200 किलोमीटरचे नवीन प्रस्ताव पारित केले आहेत. परिणामी, याच कालावधीत 500 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो लाइन कार्यान्वित आहे आणि जवळजवळ 650 किलोमीटर लांबीच्या मार्गाची पूर्तता होणार आहे.

महाराष्ट्रात देखील केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे 200 किलोमीटरहून अधिक लांबीच्या मेट्रो लाइनचे निर्माण करत आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आज देशात जो मेट्रोचा विस्तार होत आहे त्याला अटलजींच्या सरकारने खऱ्या अर्थाने गती दिली होती. अटलजींनी शहर आणि गावामध्ये पायाभूत सुविधेवर जोर दिला, 10 वर्षानंतर आमच्या सरकारने त्याला वेग दिला आणि त्याची उंची देखील वाढवली.

मला असे सांगण्यात थोडा देखील संकोच वाटत नाही की, अटलजींच्या सरकारला अजून थोडा वेळ मिळाला असता तर कदाचित आज मुंबई आणि आजूबाजूचा परिसर, महाराष्ट्रातील अनेक शहरे मेट्रोशी जोडली गेली असती.

दिल्लीत अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात मेट्रोचे काम सुरू झाले. आज जवळजवळ संपूर्ण दिल्ली मेट्रोने जोडली आहे.

मित्रांनो, आधीच्या सरकारने वाहतूक आणि पायाभूत सुविधेला जितके प्राधान्य द्यायला हवे होते ते दिले नाही.

मित्रांनो, त्यांना त्यांच्या विचारांसोबत आनंदी राहूदे, देशातील कोपरानकोपरा, कण आणि कण जोडला जावा, देशाचा संतुलित विकास व्हावा असा आमचा विचार आहे. आम्ही एक भारत-उत्कृष्ट भारत निर्माण करण्याचे मिशन हाती घेऊन बाहेर पडलो आहोत.

होय मला या गोष्टीची नक्कीच आठवण करून द्यायची आहे की, 2004 पासून- 2004 आणि 2018 च्या कालखंडात, एका पिढीचा फरक पडला आहे, विचारांमध्ये फरक आला आहे, आकांक्षा बदलल्या आहेत.

बंधू आणि भगिनींनो, सुलभ जीवन पद्धती आणि सुलभ व्यापार सुनिश्चित करण्यावर सरकारचे प्राधान्य आहे. याच कारणास्तव देशभरात जवळपास शंभर स्मार्ट सिटी विकसित होत आहेत.

पुण्यासह महाराष्ट्रातही 8 शहरांना स्मार्ट बनविण्यात येत आहे. देशभरात या अभियानाखाली 5 हजार पेक्षा जास्त प्रकल्पांची निवड केली गेली आहे.

या प्रकल्पांवर आगामी काळात दोन लाख कोटी रुपये खर्च होतील. 10 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आणि 53 हजार कोटी रुपयांचे 1700 प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे.

मित्रांनो, पुण्यासह महाराष्ट्रातील 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अंदाजे दीड हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली असून साडेतीन हजार कोटी रुपयांची काम वेगाने पूर्ण होत आहेत.

पुण्याची एकीकृत कमांड आणि नियंत्रण प्रणाली सुरु झाली आहे. येथून आता संपूर्ण शहरांच्या व्यवस्थांचे निरीक्षण केले जात आहे.

इतकेच नाही अमृत मिशन अंतर्गत महाराष्ट्राच्या 41 पेक्षा जास्त शहरांमध्ये देखील वेगाने काम चालू आहे.

रस्ता, विद्युत, पाणी, सांडपाणी यासारख्या प्राथमिक सुविधांशी निगडीत जवळजवळ 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या स्तितीत आहेत.

त्याचबरोबर शहरांना प्रकाशमान करण्यासाठी, त्यांची सुंदरता वाढविण्यासाठी, कमी विजेत अधिक प्रकाशासाठी एलईडी पथ दिवे लावले जात आहेत.

महाराष्ट्रात वेगळ्या शहरांमध्ये जवळजवळ एक लाख असे पथ दिवे लावले आहेत. यामुळे शेकडो कोटी रुपयांच्या विजेची बचत होत आहे.

मित्रांनो, सामान्य नागरिकांची बचत व्हावी, तसेच त्यांना सहजपणे सरकारी सेवांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल इंडिया अभियानाने व्यापक स्वरूप घेतले आहे.

आज जन्माच्या दाखल्यापासून हयातीच्या दाखल्यापर्यंत अशा शेकडो सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत.

वीज, पाणी बिलापासून रुग्णालयात वेळ घेणे, बँकांचे व्यवहार, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, प्रवेश, आरक्षण, जवळजवळ प्रत्येक सुविधा ऑनलाइन केली जाते. जेणेकरून रांगेत उभे रहावे लागणार नाही आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल.

आता डीजी-लॉकर मध्ये तुमची सर्व प्रमाणपत्रे सुरक्षित राहू शकतील. देशभरात अंदाजे दीड कोटी खाती उघडली आहेत.

एवढेच नाही, आता वाहनचालक परवान्यासह दुसरी कागदपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. मोबाइल फोनवर त्याच्या सॉफ्ट कॉपी किंवा मग डीजी-लॉकर द्वारे काम होईल.

बंधू आणि भगिनींनो, सरकारचा हा प्रयत्न आहे की, आमच्या व्यावसायिकांनी त्यांची दिनचर्या आमचे उद्योग आणि देशाच्या नवीन गरजानुसार नियम-कायदे तयार करावेत आणि ते बदलावेत. नियम सरळ देखील असावेत आणि सुलभ आणि पारदर्शक देखील.

डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाने सरकारच्या या प्रयत्नांना वेग दिला आहे. आज जर सामान्य ते सामान्य व्यक्तीपर्यंत तंत्रज्ञान पोहोचत असेल तर स्वस्त मोबाइल फोन, स्वस्त आणि जलद इंटरनेट डेटा यात मोठ्या प्रमाणत भूमिका बजावत आहे.

मोबाइल फोन आता स्वस्त झाले, कारण भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन बनविणारा देश बनला आहे. देशभरात जवजवळ सव्वाशे मोबाईल फोन उत्पादन कंपन्या कार्यरत आहेत. चार वर्षापूर्वी फक्त दोनच कंपन्या होत्या. साडे चार ते पाच लाख युवक या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. आता याचा अजून विस्तार होणार आहे. भारत मोबाईल सह संपूर्ण इलेक्ट्रोनिक्स उत्पादनाचे मोठे हब बनत आहे.

मित्रांनो, हार्डवेअरसह स्वस्त आणि जलद डेटा गाव-गाव, गल्ली-गल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे. देशभरात जवळजवळ सव्वा लाख ग्रामपंचायती पर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचले आहे.

तीन लाख पेक्षा अधिक सामान्य सेवा केंद्र गावांमध्ये काम करत आहे. त्यात काम करणारे जवळजवळ दहा लाख युवक, गावांना ऑनलाइन सुविधा देत आहेत.

एक लाखापेक्षा जास्त टपाल कार्यालयांमध्ये आता ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध आहे, घरपोच सेवा केंद्र देखील  बनत आहे.

देशभरातल्या अंदाजे 700 रेल्वे स्टेशनवर मोफत वाई-फाई सुविधा उपलब्ध आहे.

मित्रांनो, 2014 पूर्वी देशात जे डिजिटल व्यवहार होत होते, ते आता 6 पटीने वाढले आहेत. देशांत आतापर्यंत 50 कोटीहून अधिक रुपे, डेबिट कार्ड वितरीत केले गेले आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये यूपीआय, भिम आणि इतर डिजिटल व्यासपीठांच्या माध्यमातून व्यवहारात लाखो पटीने वाढ झाली आहे.

बंधू आणि भगिनींनो, पुणे – शिक्षण, आयटी, अभियांत्रिकी आणि व्यवसाय केंद्र देखील आहे. हे ज्ञानाचे केंद्र आहे, तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. इथेच नव भारताची ओळख पटणार आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक पायभूत सुविधा आमच्याकडे तयार आहेत आणि इथे उपस्थित हजारो युवकांप्रमाणे एकाहून एक नवोन्मेश कल्पनांची फौज आमच्याकडे तयार आहे.

स्टार्टअप इंडिया आणि अटल नवोन्मेश अभियानाद्वारे भारत भविष्यातील तंत्रज्ञानाचे एक मोठे केंद्र बनत आहे. स्टार्टअपमध्ये भारत जगातील दुसरी मोठी कार्यप्रणाली बनला आहे. देशभरात जवळपास 500 जिल्ह्यांमध्ये 14000 हून अधिक स्टार्टअपची स्टार्टअप इंडिया अभियान अंतर्गत निवड करण्यात आली आहे.

आपल्या देशात कल्पनांची कमतरता नाही. कमतरता होती तर टी त्यांना दिशा देण्याची, हात पकडून त्यांना पुढे नेण्याची. सरकार आता कल्पनांना उद्योग बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.

कमी वयातच तंत्रज्ञासाठी प्रवृत्ती विकसित केली जात आहे. शाळांमध्ये अटल टिंकरींग लॅब सुरु केल्या जात आहेत तर स्टार्ट अप साठी अटल इंक्यूबेशन सेंटर देशभरात सुरु केले जात आहेत.

नव भारताच्या नवीन केंद्रांमध्ये देशाचे भविष्य निर्माण होत आहे. जगातील सर्वात मोठे प्रतिभा केंद्र तयार होईल. नव भारताच्या निर्मितीमध्ये तुम्हा सर्वांची, पुण्याची, महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

याच विश्वासा सोबत पुन्हा एकदा मेट्रो लाईनचे काम सुरु झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात यासाठी तुमचे मनापसून आभार मानतो.

खूप-खूप धन्यवाद!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!