रोजगारनिर्मितीला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतात रोजगाराबाबत विश्वासार्ह आणि समयोचित आकडेवारीचा अभाव असल्याने, वेगवेगळ्या काळात रोजगारनिर्मितीच्या विस्ताराचे मूल्यांकन करणे धोरणकर्त्यांना आणि स्वतंत्र निरीक्षकांना कठीण जात होते. कामगार ब्युरोसारख्या काही एजंसीकडून काही प्रमाणात आकडेवारी गोळा करून ती प्रकाशितही केली जाते, मात्र त्याच आवाका अल्प आहे. कामगार ब्युरोकडून केवळ काही क्षेत्रातलीच आकडेवारी जमा केली जाते आणि त्यांची पद्धतीही निरीक्षक प्रतिसादाच्या अद्ययावत पॅनेलला अनुसरून नसते. परिणामी धोरणनिर्मिती आणि परीक्षण या दोन्ही बाबी व्यापक आणि नेमक्या आकडेवारीच्या अभावातच कराव्या लागत असत.

रोजगाराबाबत, समयोचित आणि विश्वासार्ह आकडेवारीचे महत्व जाणून, देशाच्या सांख्यिकी रचनेत असलेली ही दीर्घकालीन त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि संबंधित मंत्रालयाला याविषयी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अरविंद पनगढिया यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल निर्माण करण्यात आले असून, कामगार सचिव साथियावती, सांख्यिकी सचिव डॉ टी सी ए अनंत, नीती आयोगाचे प्रो. पुलक घोष आणि रिझर्व्ह बँकेच्या मंडळाचे सदस्य मनीष सबरवाल हे याचे सदस्य राहतील. या कृती दलाच्या शिफारसीची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. विश्वासार्ह आकडेवारीवर आधारित योग्य मूल्यांकनासह रोजगारविषयक धोरण निर्माण करता यावे यासाठी या कामाला गती द्यावी असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Water conservation in India: The community as custodian

Media Coverage

Water conservation in India: The community as custodian
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Delhi meets Prime Minister
March 21, 2026