पंतप्रधान गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन
वीज, रस्ते, आरोग्य, शहरी विकास आणि पाणीपुरवठा अशा विविध क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित
पंतप्रधान उत्तर आणि दक्षिण बिहारमधील संपर्क वाढविण्यासाठी गंगा नदीवरील औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाचे करणार उद्घाटन
अवजड वाहनांना वळसा घालून जावे लागणारे 100 किमीपेक्षा जास्त अंतर या नवीन पुलामुळे होणार कमी, सिमरिया धामपर्यंत पोहोचणे सुलभ होणार
पंतप्रधान गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस तसेच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन
पंतप्रधान कोलकाता येथे नव्याने बांधलेल्या मार्गांवर मेट्रो ट्रेन सेवांना हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास  बिहारमधील गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. तसेच ते दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील  आणि उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर, ते गंगा नदीवरील औंटा-सिमरिया  पूल प्रकल्पाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान कोलकाता येथे सायंकाळी 4:15  वाजता नव्याने बांधलेल्या विभागात  मेट्रो रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील आणि जेसोर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद बिमानबंदर आणि तिथून परत असा मेट्रोने प्रवास करतील. तसेच  ते कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

पंतप्रधानांचे बिहारमधले कार्यक्रम  

कनेक्टिव्हिटी सुधारण्याप्रति वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग -31 वरील  8.15 किमी लांबीच्या औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाचे उद्घाटन करतील, ज्यामध्ये गंगा नदीवरील 1.86 किमी लांबीचा 6 पदरी पूल समाविष्ट आहे, जो 1,870  कोटी रुपयांपेक्षा अधिक  खर्चून बांधला आहे. यामुळे पाटण्यातील मोकामा आणि बेगुसराय दरम्यान थेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध होईल.

हा पूल जुन्या मोडकळीस आलेल्या "राजेंद्र सेतू" या 2-पदरी रेल्वे-कम-रस्ते  पुलाला समांतर बांधण्यात आला आहे जो खराब स्थितीत असल्यामुळे जड वाहनांना मार्ग बदलावा लागतो. नवीन पूल उत्तर बिहार (बेगुसराय, सुपौल, मधुबनी, पूर्णिया, अररिया इ.) आणि दक्षिण बिहार क्षेत्र (शेखपुरा, नवादा, लखीसराय इ.) दरम्यान प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांसाठी 100 किमीपेक्षा अधिक  अंतर कमी करेल. या वाहनांना वळसा घालून जावे लागत असल्यामुळे प्रदेशाच्या इतर भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यास देखील यामुळे मदत होईल.

या नव्या पुलाच्या उभारणीमुळे लगतच्या परिसरात, विशेषतः आवश्यक कच्चा माल मिळवण्यासाठी दक्षिण बिहार तसेच झारखंड यांच्यावर अवलंबून असलेल्या बिहारच्या उत्तर भागात आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सिमरीया धाम या सुप्रसिद्ध तीर्थस्थळापर्यंत पोहोचण्याची अधिक उत्तम सोय होणार आहे. हे तीर्थस्थळ प्रख्यात कवी दिवंगत रामधारी सिंह दिनकर यांचे जन्मस्थळ देखील आहे.

यावेळी, राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वरील बख्तियारपूर ते मोकामा टप्प्यातील चौपदरी रस्त्याचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 1,900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक  कोंडी कमी होईल, प्रवासाच्या वेळेची बचत होईल तसेच प्रवासी आणि माल यांच्या वाहतुकीत सुधारणा होईल. तसेच, बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.120 वरील विक्रमगंज-दावत-नवानगर-डूमराव या विभागातील  दुपदरी रस्त्याची पेव्ह शोल्डर्स सह सुधारणा झाल्यामुळे, ग्रामीण भागातील रस्ते वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि स्थानिक जनतेसाठी नव्या आर्थिक संधी उपलब्ध होतील.

बिहारमधील वीज निर्मिती क्षेत्राला बळकट करत, सुमारे 6,880 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बक्सर औष्णिक उर्जा प्रकल्पाचे (660x1 मेगावॉट) उद्घाटन पंतप्रधान करतील.या प्रकल्पामुळे त्या भागातील वीजनिर्मिती क्षमतेत सुधारणा होईल, उर्जा सुरक्षेत वाढ होईल तसेच त्या भागाच्या वाढत्या वीजविषयक मागणीची पूर्तता करता येईल.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देत, पंतप्रधान मुझफ्फरपुर येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करतील. या  केंद्रामध्ये अत्याधुनिक आँकॉलॉजी बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण वॉर्ड्स, शस्त्रक्रिया कक्ष, आधुनिक चाचणी प्रयोगशाळा, रक्त पेढी तसेच 24 खाटांचे आयसीयु (आपत्कालीन सेवा कक्ष) आणि एचडीयु  यांचा  समावेष आहे. या अत्याधुनिक आरोग्य केंद्रामुळे बिहार आणि शेजारील राज्यांमधील रुग्णांना उपचारासाठी प्रवास करून दूरवरच्या महानगरांमध्ये पोहोचण्याची दगदग कमी करत, त्यांच्याच परिसरात अत्याधुनिक तसेच किफायतशीर दरात कर्करोगावरील उपचार मिळणे शक्य होणार आहे.

स्वच्छ भारत संकल्पनेचा विस्तार करत आणि गंगा नदीचा अविरल आणि निर्मळ ओघ वाहणे सुनिश्चित करत, पंतप्रधान मोदी मुंगेर येथे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) आणि सांडपाणी नेटवर्कचे उद्घाटन करतील. नमामि गंगे उपक्रमांतर्गत 520 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प गंगा नदीवरील प्रदूषणाचा भार  कमी करेल आणि त्या भागातील स्वच्छतेच्या सोयींमध्ये सुधारणा घडवून आणेल.

या दौऱ्यात पंतप्रधान 1,260 कोटी रुपये खर्चाच्या शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मालिकेची पायाभरणी करतील. औरंगाबादमधील दाउदनगर आणि जेहानाबाद येथे एसटीपी तसेच सांडपाणी नेटवर्क; लखीसराय आणि जामुई येथील बहारीया मध्ये एसटीपी आणि इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन कार्ये यांचा या मालिकेत समावेश आहे. यानंतर पंतप्रधान मोदी,  अमृत 2.0 अंतर्गत औरंगाबाद, बोधगया आणि जेहानाबाद येथील पाणीपुरवठा प्रकल्पांची कोनशीला ठेवतील. या  प्रकल्पामुळे जनतेला स्वच्छ पेयजल, आधुनिक सांडपाणी यंत्रणा आणि अधिक स्वच्छता यांचा लाभ होऊन त्या भागातील जनतेची आरोग्य मानके आणि जीवनमान यांच्यात सुधारणा घडून येईल.

या भागातील रेल्वे संपर्क जोडणीचा चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. यांपैकी पहिली गाडी ही गया आणि दिल्ली दरम्यान धावणारी अमृत भारत एक्सप्रेस असेल. या गाडीमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. दुसरी गाडी ही वैशाली आणि कोडरमा दरम्यान धावणारी बौद्ध सर्किट ट्रेन असेल. या गाडीमुळे या भागातील महत्त्वाची बौद्ध स्थळे परस्परांशी जोडली जातील, त्यामुळे पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला चालना मिळेल.

याचबरोबर, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 12,000 ग्रामीण लाभार्थ्यांचा आणि पंतप्रधान आवास योजना-शहरी योजनेअंतर्गत 4,260 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळाही आयोजित केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील, या माध्यमातून हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

पश्चिम बंगालमधील पंतप्रधानांचे कार्यक्रम

​जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि विकसित शहरी संपर्क जोडणी उपलब्ध देण्याच्या आपल्या वचनबद्धतेच्या पूर्तीच्या अनुषंगाने  पंतप्रधान कोलकाता येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करतील. याअंतर्गत 13.61 किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो रेल्वे जाळ्याचे उद्घाटन होईल, तसेच या मार्गांवरून प्रत्यक्ष मेट्रो सेवेचा प्रारंभही केला जाईल. आपल्या पश्चिम बंगाल भेटीत पंतप्रधान जेस्सोर रोड मेट्रो स्थानकाला भेट देतील आणि तिथून ते नोआपारा-जय हिंद बिमानबंदर मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सियालदह - एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो सेवांनाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान जेस्सोर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद बिमानबंदरपर्यंत आणि तिथून परतीचा मेट्रो रेल्वे प्रवासही करणार आहेत.

या भेटीत पंतप्रधान एका ​सार्वजनिक कार्यक्रमात, मेट्रो विभागाचे  आणि हावडा मेट्रो स्थानकावरील नवीन भुयारी मार्गाचे उद्घाटन करतील. नोआपारा-जय हिंद बिमानबंदर मेट्रो सेवेमुळे विमानतळासोबतच्या संपर्क जोडणीत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे. सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो मार्गामुळे या दोन ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 40 मिनिटांवरून फक्त 11 मिनिटांपर्यंत येणार आहे, तर बेलेघाटा-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग माहिती तंत्रज्ञान केंद्रासोबतच्या संपर्क जोडणीचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. या  मेट्रो मार्गामुळे कोलकातामधील सर्वाधिक वर्दळीचे काही भाग परस्परांशी जोडले जाणार असून, त्यामुळे प्रवासाच्या वेळेची मोठी बचत होऊ शकेल, तसेच बहु-मार्गी संपर्क जोडणी व्यवस्थाही अधिक मजबूत होणार आहे. या सर्व सुविधांचा लाभ इथल्या लाखो प्रवाशांना होणार आहे.

या भागातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 1,200 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या 7.2 किलोमीटर लांबीच्या सहा-पदरी कोन द्रुतगती महामार्गाची पायाभरणीही करणार आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे हावडा, आसपासचे ग्रामीण भाग आणि कोलकाता या भागांच्या परस्पर संपर्क जोडणीत मोठी सुधारणा होऊन, प्रवासाच्या अनेक तासांची बचत होईल, तसेच या भागातील व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।