पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ज्या देशात मुलींना लक्ष्मी म्हणून मान दिला जातो, तिथे 11 वर्षांपूर्वी याच दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम सुरू करण्यात आली होती. आज भारतातील मुली प्रत्येक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत असून देशाच्या प्रगतीत लक्षणीय योगदान देत आहेत, ही खूप अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे
पंतप्रधानांनी या पोस्टसोबत भारताच्या कालातीत नीतिपरंपरेत मुलींना असलेले महत्त्व विशद करणारे एक संस्कृत सुभाषित समाजमाध्यमावर सामायिक केले आहे -
“दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्। यत् फलम् लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥”
एक मुलगी दहा मुलांच्या समान असते आणि दहा मुलांमध्ये आढळणारे गुण किंवा गुणवैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीला एकाच मुलीत आढळू शकतात असे या सुभाषितामध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात;
“मुलीला लक्ष्मीसमान मानणाऱ्या आपल्या देशात 11 वर्षांपूर्वी आज या दिवशीच बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानाची सुरूवात झाली होती. आज भारताच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात दररोज नवनवीन विक्रम करत आहेत, ही मोठी अभिमानाची बाब आहे
दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्।
यत् फलम् लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥”
कन्या को लक्ष्मी मानने वाले हमारे देश में 11 साल पहले आज ही के दिन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान की शुरुआत हुई थी। यह बड़े गर्व की बात है कि आज भारत की बेटियां हर क्षेत्र में नित-नए रिकॉर्ड बना रही हैं।
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2026
दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्।
यत् फलम् लभते मर्त्यस्तल्लभ्यं… pic.twitter.com/OOnaRY6OKS


