“जागतिक महामारी नसतानाही आरोग्यासाठी भारताची दृष्टी जागतिकच होती”
"शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे भारताचे ध्येय आहे"
"भारतात संस्कृती, हवामान आणि सामाजिक गतिशीलता यांमध्ये प्रचंड विविधता आहे"
“खरी प्रगती ही जनकेंद्रित असते. वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टप्प्यावर त्याचे फायदे मिळायला हवे”
"योग आणि ध्यान ही प्राचीन भारताने आधुनिक जगाला दिलेली देणगी आहे ज्या आता जागतिक चळवळी बनल्या आहेत"
"भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये तणाव आणि जीवनशैलीच्या आजारांवर बरीच उत्तरे आहेत""केवळ आपल्या नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आरोग्यसेवा सोपी आणि परवडणारी बनवणे हे भारताचे ध्येय आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे  नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर "वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया - 2023" चे उद्घाटन केले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जगभरातील आरोग्य मंत्री आणि पश्चिम आशिया, सार्क, आसियान आणि आफ्रिकन देशातील प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले. 'प्रत्येकजण सुखी होवो, प्रत्येकजण रोगमुक्त होवो, प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी घडू दे आणि कोणालाही दुःखाचा त्रास होऊ नये' अशा भारतीय शास्त्रांमधील उल्लेख करून पंतप्रधानांनी भारताच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला आणि  हजारो वर्षांपूर्वी जागतिक महामारी नसतानाही भारताकडे असणाऱ्या जागतिक दृष्टीकोनाचा उल्लेख केला. त्यांनी अधोरेखित केले की "एक पृथ्वी - एक आरोग्य" हे ध्यय समान विश्वासांचे पालन करते आणि कृतीत समान विचारांचे ते एक उदाहरण आहे. “आपली दृष्टी फक्त मानवी समाजापुरती मर्यादित नाही. ही दृष्टी आपल्या संपूर्ण परिसंस्थेपर्यंत विस्तारते. वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत, मातीपासून नद्यांपर्यंत, जेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट निरोगी असते, तेंव्हाच आपण निरोगी राहू शकतो”, असं यावेळी पंतप्रधानांनी सांगितल.

"आजारपणाचा अभाव" हे चांगल्या आरोग्यासारखेच आहे, या लोकप्रिय उक्तीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी यावर भर दिला की आरोग्याकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन केवळ आजारपणाच्या अभावावर थांबत नाही आणि प्रत्येकासाठी निरोगीपणा निरामय आरोग्य आणि कल्याण यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. "आमचे ध्येय शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे आहे", असं ते पुढे म्हणाले.

‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेसह G20 अध्यक्षपदाच्या भारताच्या प्रवासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ही संकल्पना पूर्ण करतांना लवचिक जागतिक आरोग्य सेवा प्रणालींचे महत्त्व लक्षात आले. ते म्हणाले की, वैद्यकीय मूल्य पर्यटन  आणि आरोग्य कर्मचार्‍यांची गतिशीलता हे निरोगी पृथ्वीसाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि ‘वन अर्थ, वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया २०२३’ हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजचा कार्यक्रम  भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी जुळलेला आहे ज्यामध्ये असंख्य देशांचा सहभाग आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या भारतीय तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागधारकांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला.

सर्वांगीण आरोग्य सेवेबाबत भारताची ताकद अधोरेखित करताना पंतप्रधानांनी भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान, यशापयश आणि परंपरा यांचे दाखले दिले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि काळजीवाहक सेवक यांचा प्रभाव जगाने पाहिला आहे आणि त्यांची क्षमता आणि वचनबद्धता आणि प्रतिभेसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो. ते म्हणाले की जगभरातील अनेक आरोग्य सेवा प्रणालींना भारतीय व्यावसायिकांच्या प्रतिभेचा फायदा झाला आहे. पंतप्रधानांनी भारतातील आरोग्यसेवा व्यावसायिकांचे प्रशिक्षण आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेता "भारतात संस्कृती, हवामान आणि सामाजिक गतिशीलता यामध्ये प्रचंड विविधता आहे" अशी टिपणी केली. ते पुढे म्हणाले की भारतीय आरोग्य सेवा प्रतिभेने विविध परिस्थितींच्या गरजा पूर्ण करू शकणार्‍या त्यांच्या अपवादात्मक कौशल्यामुळे जगाचा विश्वास जिंकला आहे.

जगाला अनेक सत्यांची आठवण करून देणार्‍या शतकातील एकेकाळच्या साथीच्या आजारावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, खोलवर जोडलेल्या जगात सीमारेषा आरोग्यविषयक धोक्यांना रोखू शकत नाहीत. त्यांनी असेही निदर्शनास आणले की जगातील दक्षिणेतील देशांना संसाधने नाकारले जाण्यासह इतरही  विविध अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागला. “खरी प्रगती ही जनकेंद्रित असते.वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टप्प्यावर त्याचे फायदे मिळायला हवे”  असे स्पष्ट करून  मोदींनी आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वासू भागीदाराची अनेक राष्ट्रांची गरज असल्याचे अधोरेखित केले. लस आणि औषधांद्वारे जीव वाचवण्याच्या उदात्त कार्यात भारताला अनेक राष्ट्रांचा भागीदार असल्याचा अभिमान वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले. मेड-इन-इंडिया लसीची जगातील सर्वात मोठी आणि जलद कोविड-19 लसीकरण मोहीम आणि त्याच्या पुरवठा व्यवस्थेची उदाहरणे दिली. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये COVID-19 लसींचे 300 दशलक्ष डोस, यातून भारताच्या क्षमतेची आणि वचनबद्धतेची झलक दिसून आली आणि आपल्या नागरिकांसाठी चांगले आरोग्य शोधणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा आपला देश विश्वासू मित्र म्हणून कायम राहील, असा पुनरुच्चार मोदींनी केला.

“भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हजारो वर्षांपासून सर्वांगीण आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी  केली. ते म्हणाले की, भारतामध्ये योग आणि ध्यान यांसारख्या प्रणालींसह प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्याची मोठी परंपरा आहे, ही आधुनिक जगाला भारताची प्राचीन भेट आहे जी आता जागतिक चळवळ बनली आहे. त्यांनी आयुर्वेदाचाही उल्लेख केला जो निरोगीपणाची संपूर्ण शिस्त आहे आणि ते म्हणाले की ते आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक पैलूंची काळजी घेते. “जग तणाव आणि जीवनशैलीतील आजारांवर उपाय शोधत आहे. भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये यासाठी बरीच उत्तरे आहेत”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या पारंपारिक आहारासाठी बनवलेल्या भरड धान्याचाही  उल्लेख केला आणि यात जगभरातील अन्न सुरक्षा आणि पोषण समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेवर प्रकाश टाकला आणि सांगितले की ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. पंतप्रधानांनी सांगितले की यात 50 कोटीहून अधिक भारतीय नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे जिथे 40 कोटीहून  अधिक लोकांनी आधीच कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने सेवांचा लाभ घेतला आहे. परिणामस्वरूप भारतीय नागरिकांची सुमारे 7 अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे.

आपल्या संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी यावर भर दिला की जागतिक पातळीवरील आरोग्यसेवाविषयक आव्हानांना वेगळे करता येणार नाही आणि आता एकात्मिक, सर्वसमावेशक आणि संस्थात्मक प्रतिसादाची वेळ आली आहे. “आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात हे आमच्या लक्ष्यीत  क्षेत्रांपैकी एक आहे. केवळ आपल्या नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आरोग्यसेवा सोपी आणि परवडणारी बनवणे हे आमचे ध्येय आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की भारताचे प्राधान्य असमानता कमी करणे आहे आणि सेवा न मिळालेल्या लोकांची सेवा करणे हे देशासाठी महत्त्वाचे आहे. हा मेळावा या दिशेने जागतिक भागीदारी मजबूत करेल आणि ‘एक पृथ्वी-एक आरोग्य’ या समान प्राधान्याने इतर राष्ट्रांची भागीदारी शोधू असा आशावाद पंतप्रधानांनी यावेळी  व्यक्त केला 

 

पार्श्वभूमी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या सहकार्याने "वन अर्थ वन हेल्थ, अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023" च्या 6व्या आवृत्तीचे भारताच्या G20 अध्यक्षांसह को-ब्रँडिंग केले आहे आणि हा कार्यक्रम येत्या 26 आणि 27 एप्रिल 2023 प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केला गेला आहे.

दोन दिवसीय या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील सहकार्य आणि भागीदारीच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. मूल्य-आधारित आरोग्य सेवा प्रदान करणारे  हेल्थकेअर वर्कफोर्सचा निर्यातदार म्हणून वैद्यकीय मूल्य प्रवासाच्या क्षेत्रात भारताची ताकद प्रदर्शित करणे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा आणि निरोगी सेवांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या  ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’  या संकल्पनेशी सुसंगत आहे आणि त्याला ‘वन अर्थ, वन हेल्थ- अॅडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023’ असे नाव देण्यात आले आहे. भारतातून सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, ही आंतरराष्ट्रीय शिखर परिषद ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, कोण कोण आहे इथपासून ते  जागतिक  वैद्यकीय मूल्य पर्यटन उद्योगातील सहभाग आणि आघाडीचे अधिकारी, निर्णय घेणारे, उद्योग भागधारक, तज्ञ यांच्यातील सहभागाची साक्ष देणारे एक आदर्श मंच प्रदान करेल.  जगभरातील उद्योगातील व्यावसायिक. हे सहभागींना जगभरातील समवयस्कांशी संवाद करण्यास, कल्पनांची देवाणघेवाण करण्यास, संपर्क तयार करण्यास आणि मजबूत व्यावसायिक भागीदारी तयार करण्यास सक्षम करेल.

या शिखर परिषदेत 70 देशांतील 125 प्रदर्शक आणि 500 सहभाग नोंदवलेले विदेशी प्रतिनिधी सहभागी होतील. आफ्रिका, मध्य पूर्व, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स, सार्क आणि आसियान या प्रदेशातील  70   हून अधिक नियुक्त देशांमधील सहभागी झालेल्या प्रतिनिधींसोबत  रिव्हर्स बायर सेलर मीटिंग आणि नियोजन केलेल्या B2B बैठका भारतीय आरोग्य सेवा प्रदाते आणि परदेशी सहभागींना एकत्र आणतील आणि एकमेकांशी जोडतील. या परिषदेमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आयुष मंत्रालय, उद्योग मंच, स्टार्टअप्स इत्यादी विभागातील प्रख्यात वक्ते आणि तज्ञांशी पॅनेल चर्चा देखील केली जाईल,तसेच  भागधारकांशी संवाद घडवून आणणाऱ्या सत्रांचे देखील आयोजन केले जाईल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic

Media Coverage

Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
‘Restoring Balance’ is a global urgency: PM Modi highlights global health challenges at WHO Global Summit on Traditional Medicine
December 19, 2025
It is India’s privilege and a matter of pride that the WHO Global Centre for Traditional Medicine has been established in Jamnagar: PM
Yoga has guided humanity across the world towards a life of health, balance, and harmony: PM
Through India’s initiative and the support of over 175 nations, the UN proclaimed 21 June as International Yoga Day; over the years, yoga has spread worldwide, touching lives across the globe: PM
The inauguration of the WHO South-East Asia Regional Office in Delhi marks another milestone. This global hub will advance research, strengthen regulation & foster capacity building: PM
Ayurveda teaches that balance is the very essence of health, only when the body sustains this equilibrium can one be considered truly healthy: PM
Restoring balance is no longer just a global cause-it is a global urgency, demanding accelerated action and resolute commitment: PM
The growing ease of resources and facilities without physical exertion is giving rise to unexpected challenges for human health: PM
Traditional healthcare must look beyond immediate needs, it is our collective responsibility to prepare for the future as well: PM

WHO के डायरेक्टर जनरल हमारे तुलसी भाई, डॉक्टर टेड्रोस़, केंद्रीय स्वास्थ्य में मेरे साथी मंत्री जे.पी. नड्डा जी, आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव जी, इस आयोजन से जुड़े अन्य देशों के सभी मंत्रीगण, विभिन्न देशों के राजदूत, सभी सम्मानित प्रतिनिधि, Traditional Medicine क्षेत्र में काम करने वाले सभी महानुभाव, देवियों और सज्जनों !

आज दूसरी WHO Global Summit on Traditional Medicine का समापन दिन है। पिछले तीन दिनों में यहां पारंपरिक चिकित्सा के क्षेत्र से जुड़े दुनिया भर के एक्सपर्ट्स ने गंभीर और सार्थक चर्चा की है। मुझे खुशी है कि भारत इसके लिए एक मजबूत प्लेटफार्म का काम कर रहा है। और इसमें WHO की भी सक्रिय भूमिका रही है। मैं इस सफल आयोजन के लिए WHO का, भारत सरकार के आयुष मंत्रालय का और यहां उपस्थित सभी प्रतिभागियों का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

ये हमारा सौभाग्य है और भारत के लिए गौरव की बात है कि WHO Global Centre for Traditional Medicine भारत के जामनगर में स्थापित हुआ है। 2022 में Traditional Medicine की पहली समिट में विश्व ने बड़े भरोसे के साथ हमें ये दायित्व सौंपा था। हम सभी के लिए खुशी की बात है कि इस ग्लोबल सेंटर का यश और प्रभाव locally से लेकर के globally expand कर रहा है। इस समिट की सफलता इसका सबसे बड़ा उदाहरण है। इस समिट में Traditional knowledge और modern practices का कॉन्फ्लूएंस हो रहा है। यहां कई नए initiatives भी शुरू हुए हैं, जो medical science और holistic health के future को transform कर सकते हैं। समिट में विभिन्न देशों के स्वास्थ्य मंत्रियों और प्रतिनिधियों के बीच विस्तार से संवाद भी हुआ है। इस संवाद ने ज्वाइंट रिसर्च को बढ़ावा देने, नियमों को सरल बनाने और ट्रेनिंग और नॉलेज शेयरिंग के लिए नए रास्ते खोले हैं। ये सहयोग आगे चलकर Traditional Medicine को अधिक सुरक्षित, अधिक भरोसेमंद बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा।

साथियों,

इस समिट में कई अहम विषयों पर सहमति बनना हमारी मजबूत साझेदारी का प्रतिबिंब है। रिसर्च को मजबूत करना, Traditional Medicine के क्षेत्र में डिजिटल टेक्नोलॉजी का उपयोग बढ़ाना, ऐसे रेगुलेटरी फ्रेमवर्क तैयार करना जिन पर पूरी दुनिया भरोसा कर सके। ऐसे मुद्दे Traditional Medicine को बहुत सशक्त करेंगे। यहां आयोजित Expo में डिजिटल हेल्थ टेक्नोलॉजी, AI आधारित टूल्स, रिसर्च इनोवेशन, और आधुनिक वेलनेस इंफ्रास्ट्रक्चर, इन सबके जरिए हमें ट्रेडिशन और टेक्नोलॉजी का एक नया collaboration भी देखने को मिला है। जब ये साथ आती हैं, तो ग्लोबल हेल्थ को अधिक प्रभावी बनाने की क्षमता और बढ़ जाती है। इसलिए, इस समिट की सफलता ग्लोबल दृष्टि से बहुत ही अहम है।

साथियों,

पारंपरिक चिकित्सा प्रणाली का एक अहम हिस्सा योग भी है। योग ने पूरी दुनिया को स्वास्थ्य, संतुलन और सामंजस्य का रास्ता दिखाया है। भारत के प्रयासों और 175 से ज्यादा देशों के सहयोग से संयुक्त राष्ट्र द्वारा 21 जून को योग दिवस घोषित किया गया था। बीते वर्षों में हमने योग को दुनिया के कोने-कोने तक पहुंचते देखा है। मैं योग के प्रचार और विकास में महत्वपूर्ण योगदान देने वाले हर व्यक्ति की सराहना करता हूं। आज ऐसे कुछ चुनींदा महानुभावों को पीएम पुरस्कार दिया गया है। प्रतिष्ठित जूरी सदस्यों ने एक गहन चयन प्रक्रिया के माध्यम से इन पुरस्कार विजेताओं का चयन किया है। ये सभी विजेता योग के प्रति समर्पण, अनुशासन और आजीवन प्रतिबद्धता के प्रतीक हैं। उनका जीवन हर किसी के लिए प्रेरणा है। मैं सभी सम्मानित विजेताओं को हार्दिक बधाई देता हूं, अपनी शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

मुझे ये जानकर भी अच्छा लगा कि इस समिट के आउटकम को स्थायी रूप देने के लिए एक महत्वपूर्ण कदम उठाया गया हैं। Traditional Medicine Global Library के रूप में एक ऐसा ग्लोबल प्लेटफॉर्म शुरू किया गया है, जो ट्रेडिशनल मेडिसिन से जुड़े वैज्ञानिक डेटा और पॉलिसी डॉक्यूमेंट्स को एक जगह सुरक्षित करेगा। इससे उपयोगी जानकारी हर देश तक समान रूप से पहुंचने का रास्ता आसान होगा। इस Library की घोषणा भारत की G20 Presidency के दौरान पहली WHO Global Summit में की गई थी। आज ये संकल्प साकार हो गया है।

साथियों,

यहां अलग-अलग देशों के स्वास्थ्य मंत्रियों ने ग्लोबल पार्टनरशिप का एक बेहतरीन उदाहरण प्रस्तुत किया है। एक साझेदार के रूप में आपने Standards, safety, investment जैसे मुद्दों पर चर्चा की है। इस संवाद से जो Delhi Declaration इसका रास्ता बना है, वो आने वाले वर्षों के लिए एक साझा रोडमैप की तरह काम करेगा। मैं इस joint effort के लिए विभिन्न देशों के माननीय मंत्रियों की सराहना करता हूं, उनके सहयोग के लिए मैं आभार जताता हूं।

साथियों,

आज दिल्ली में WHO के South-East Asia Regional Office का उद्घाटन भी किया गया है। ये भारत की तरफ से एक विनम्र उपहार है। ये एक ऐसा ग्लोबल हब है, जहां से रिसर्च, रेगुलेशन और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा मिलेगा।

साथियों,

भारत दुनिया भर में partnerships of healing पर भी जोर दे रहा है। मैं आपके साथ दो महत्वपूर्ण सहयोग साझा करना चाहता हूं। पहला, हम बिमस्टेक देशों, यानी दक्षिण और दक्षिण-पूर्व एशिया में हमारे पड़ोसी देशों के लिए एक Centre of Excellence स्थापित कर रहे हैं। दूसरा, हमने जापान के साथ एक collaboration शुरू किया है। ये विज्ञान, पारंपरिक पद्धितियों और स्वास्थ्य को एक साथ जोड़ने का प्रयास है।

साथियों,

इस बार इस समिट की थीम है- ‘Restoring Balance: The Science and Practice of Health and Well-being’, Restoring Balance, ये holistic health का फाउंडेशनल थॉट रहा है। आप सब एक्स्पर्ट्स अच्छी तरह जानते हैं, आयुर्वेद में बैलेन्स, अर्थात् संतुलन को स्वास्थ्य का पर्याय कहा गया है। जिसके शरीर में ये बैलेन्स बना रहता है, वही स्वस्थ है, वही हेल्दी है। आजकल हम देख रहे हैं, डायबिटीज़, हार्ट अटैक, डिप्रेशन से लेकर कैंसर तक अधिकांश बीमारियों के background में lifestyle और imbalances एक प्रमुख कारण नजर आ रहा है। Work-life imbalance, Diet imbalance, Sleep imbalance, Gut Microbiome Imbalance, Calorie imbalance, Emotional Imbalance, आज कितने ही global health challenges, इन्हीं imbalances से पैदा हो रहे हैं। स्टडीज़ भी यही प्रूव कर रही हैं, डेटा भी यही बता रहा है कि आप सब हेल्थ एक्स्पर्ट्स कहीं बेहतर इन बातों को समझते हैं। लेकिन, मैं इस बात पर जरूर ज़ोर दूँगा कि ‘Restoring Balance, आज ये केवल एक ग्लोबल कॉज़ ही नहीं है, बल्कि, ये एक ग्लोबल अर्जेंसी भी है। इसे एड्रैस करने के लिए हमें और तेज गति से कदम उठाने होंगे।

साथियों,

21वीं सदी के इस कालखंड में जीवन के संतुलन को बनाए रखने की चुनौती और भी बड़ी होने वाली है। टेक्नोलॉजी के नए युग की दस्तक AI और Robotics के रूप में ह्यूमन हिस्ट्री का सबसे बड़ा बदलाव आने वाले वर्षों में जिंदगी जीने के हमारे तरीके, अभूतपूर्व तरीके से बदलने वाले हैं। इसलिए हमें ये भी ध्यान रखना होगा, जीवनशैली में अचानक से आ रहे इतने बड़े बदलाव शारीरिक श्रम के बिना संसाधनों और सुविधाओं की सहूलियत, इससे human bodies के लिए अप्रत्याशित चुनौतियां पैदा होने जा रही हैं। इसलिए, traditional healthcare में हमें केवल वर्तमान की जरूरतों पर ही फोकस नहीं करना है। हमारी साझा responsibility आने वाले future को लेकर के भी है।

साथियों,

जब पारंपरिक चिकित्सा की बात होती है, तो एक सवाल स्वाभाविक रूप से सामने आता है। ये सवाल सुरक्षा और प्रमाण से जुड़ा है। भारत आज इस दिशा में भी लगातार काम कर रहा है। यहां इस समिट में आप सभी ने अश्वगंधा का उदाहरण देखा है। सदियों से इसका उपयोग हमारी पारंपरिक चिकित्सा प्रणालियों में होता रहा है। COVID-19 के दौरान इसकी ग्लोबल डिमांड तेजी से बढ़ी और कई देशों में इसका उपयोग होने लगा। भारत अपनी रिसर्च और evidence-based validation के माध्यम से अश्वगंधा को प्रमाणिक रूप से आगे बढ़ा रहा है। इस समिट के दौरान भी अश्वगंधा पर एक विशेष ग्लोबल डिस्कशन का आयोजन किया गया। इसमें international experts ने इसकी सुरक्षा, गुणवत्ता और उपयोग पर गहराई से चर्चा की। भारत ऐसी time-tested herbs को global public health का हिस्सा बनाने के लिए पूरी तरह कमिटेड होकर काम कर रहा है।

साथियों,

ट्रेडिशनल मेडिसिन को लेकर एक धारणा थी कि इसकी भूमिका केवल वेलनेस या जीवन-शैली तक सीमित है। लेकिन आज ये धारणा तेजी से बदल रही है। क्रिटिकल सिचुएशन में भी ट्रेडिशनल मेडिसिन प्रभावी भूमिका निभा सकती है। इसी सोच के साथ भारत इस क्षेत्र में आगे बढ़ रहा है। मुझे ये बताते हुए खुशी हो रही है कि आयुष मंत्रालय और WHO-Traditional Medicine Center ने नई पहल की है। दोनों ने, भारत में integrative cancer care को मजबूत करने के लिए एक joint effort किया है। इसके तहत पारंपरिक चिकित्सा प्रणालियों को आधुनिक कैंसर उपचार के साथ जोड़ने का प्रयास होगा। इस पहल से evidence-based guidelines तैयार करने में भी मदद मिलेगी। भारत में कई अहम संस्थान स्वास्थ्य से जुड़े ऐसे ही गंभीर विषयों पर क्लिनिकल स्टडीज़ कर रहे हैं। इनमें अनीमिया, आर्थराइटिस और डायबिटीज़ जैसे विषय भी शामिल हैं। भारत में कई सारे स्टार्ट-अप्स भी इस क्षेत्र में आगे आए हैं। प्राचीन परंपरा के साथ युवाशक्ति जुड़ रही है। इन सभी प्रयासों से ट्रेडिशनल मेडिसिन एक नई ऊंचाई की तरफ बढ़ती दिख रही है।

साथियों,

आज पारंपरिक चिकित्सा एक निर्णायक मोड़ पर खड़ी है। दुनिया की बड़ी आबादी लंबे समय से इसका सहयोग लेती आई है। लेकिन फिर भी पारंपरिक चिकित्सा को वो स्थान नहीं मिल पाया था, जितना उसमें सामर्थ्य है। इसलिए, हमें विज्ञान के माध्यम से भरोसा जीतना होगा। हमें इसकी पहुंच को और व्यापक बनाना होगा। ये जिम्मेदारी किसी एक देश की नहीं है, ये हम सबका साझा दायित्व है। पिछले तीन दिनों में इस समिट में जो सहभागिता, जो संवाद और जो प्रतिबद्धता देखने को मिली है, उससे ये विश्वास गहरा हुआ है कि दुनिया इस दिशा में एक साथ आगे बढ़ने के लिए तैयार है। आइए, हम संकल्प लें कि पारंपरिक चिकित्सा को विश्वास, सम्मान और जिम्मेदारी के साथ मिलकर के आगे बढ़ाएंगे। एक बार फिर आप सभी को इस समिट की मैं बहुत-बहुत बधाई देता हूं। बहुत-बहुत धन्यवाद।