On the 21st of June, crores of people across the country and the world participated in the ‘International Yoga Day’: PM Modi
Three lakh people performed yoga together on the beach of Visakhapatnam and more than two thousand adivasi students performed 108 Surya Namaskars for 108 minutes: PM Modi
According to a report by International Labour Organisation, more than 64% of the population of India is now availing of some social protection benefit or the other: PM Modi
Those who imposed Emergency not only murdered our constitution but also had the intention to keep the judiciary as their slave: PM Modi
We should always remember all those people who fought the Emergency with fortitude. This inspires us to remain constantly vigilant to keep our Constitution strong and enduring: PM Modi
Bodoland today stands out in the country with a new face, a new identity. Bodoland is now increasingly casting its glow on the sports map of the country: PM Modi
The women of Meghalaya are now taking this Eri Silk heritage forward on a larger scale through Self Help Groups: PM Modi

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या  10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

हे याचे देखील द्योतक आहे की अधिकाधिक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात योगसाधना  करत आहेत. यावेळी आपण 'योग दिनाची' कितीतरी आकर्षक छायाचित्रे  पाहिली आहेत. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी तीन लाख लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. विशाखापट्टणम इथूनच आणखी एक अद्भुत दृश्य समोर आलं आहे. दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांमध्ये  108 सूर्यनमस्कार घातले. विचार करा, किती शिस्तीचं पालन आणि समर्पण असेल. आपल्या नौदलाच्या जहाजांवर देखील योगाभ्यासाची भव्य झलक पहायला मिळाली. तेलंगणामध्ये तीन हजार दिव्यांग मित्र एकत्रितपणे योग शिबिरात सहभागी झाले. त्यांनी दाखवून  दिलं की कशा प्रकारे  योग सशक्तीकरणाचे देखील माध्यम आहे. दिल्लीच्या लोकांनी योगला स्वच्छ यमुनेच्या संकल्पाशी  जोडलं आणि यमुना किनारी जाऊन योगसाधना केली. जम्मू-काश्मीरमधला चिनाब पूल, जो  जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे, तिथे देखील लोकांनी योगाभ्यास केला.  हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ‘आयटीबीपी’चे जवान, तिथे देखील त्यांनी योगाभ्यास केला, साहस आणि साधना एकत्र पाहायला मिळाले. गुजरातच्या लोकांनी देखील एक नवीन इतिहास रचला. वडनगर मध्ये 2121 (दोन हजार एकशे एकवीस) लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केलं आणि नवीन विक्रम बनवला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधील योगदिनाची छायाचित्र समोर आली आहेत आणि प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट खास राहिली आहे,  शांतता, स्थैर्य आणि संतुलन. या वर्षाची संकल्पना अतिशय खास होती, Yoga for One Earth, One Health, म्हणजे “एक पृथ्वी एक आरोग्य”. ही केवळ एक घोषणा नाही तर एक दिशा आहे जी आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकएम्’ची जाणीव करून देते. मला विश्वास आहे,  यावर्षीची योग दिनाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग साधनेचा अवलंब करण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.

माझ्या प्रिय देशबांधवानो,

जेव्हा कुणी तीर्थयात्रेसाठी निघतं, तेव्हा एकच भावना सर्वप्रथम मनात येते, 'चलो बुलावा आया है'.  हीच भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे. या यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व,  ईश्वराशी जोडले जाण्याचं माध्यम आहे. त्याशिवाय या तीर्थयात्रांची आणखी एक बाजू असते. या धार्मिक यात्रा सेवेच्या संधींचे एक महाअनुष्ठान देखील असतात. जेव्हा कुठलीही यात्रा असते, तेव्हा जितके लोक यात्रेसाठी जातात त्याहून अधिक लोक यात्रेकरूंच्या सेवेच्या कामात सहभागी होतात. ठिकठिकाणी भंडारे आणि लंगर लावले जातात.  लोक रस्त्याच्या कडेला ‘प्याऊ’ बसवतात. सेवा भावनेनेच वैद्यकीय शिबीरे आणि सुविधांची व्यवस्था केली जाते. कितीतरी लोक स्वखर्चाने यात्रेकरूंसाठी  धर्मशाळांची आणि राहण्याची व्यवस्था करतात.

मित्रांनो,

प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजेच भगवान शिव यांचं धाम. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलास हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, तीन जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि  पवित्र श्रावण महिना देखील काही दिवसांवर आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण भगवान जगन्नाथ जी यांची रथयात्रा देखील पाहिली. ओदिशा असेल, गुजरात असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपरा असेल,  लाखो श्रद्धाळू या यात्रांमध्ये सहभागी होतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धा भावनेनं, पूर्ण समर्पणानं आणि शिस्तबद्धतेनं  आपल्या धार्मिक यात्रा पार पाडतो तेव्हा त्याचं फळ देखील मिळतं. यात्रेला जाणाऱ्या सर्व सौभाग्यशाली श्रद्धाळूंना मी माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवाभावनेनं  या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी झटत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला देशातल्या दोन अशा यशस्वी कामगिरीबाबत सांगू इच्छितो ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. या कामगिरीची चर्चा जागतिक संस्था करत आहेत. डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएलओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांनी देशाच्या या उपलब्धींची भरपूर प्रशंसा केली आहे.  पहिली कामगिरी आहे ती आपल्या आरोग्याशी निगडित आहे . तुमच्यापैकी अनेक लोकांनी डोळ्यांच्या एका आजाराबाबत ऐकलं असेल, ट्रॅकोमा.  हा आजार जिवाणूमुळे पसरतो. एक काळ होता जेव्हा हा आजार देशातल्या अनेक भागांमध्ये सहजपणे आढळत होता. जर लक्ष दिलं नाही तर या आजारामुळे हळूहळू आपली दृष्टी देखील जाऊ शकते. आम्ही संकल्प केला की ट्रॅकोमाचं समूळ  उच्चाटन करायचं आणि मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ने  भारताला ट्रॅकोमा- फ्री घोषित केलं  आहे, आता भारत ट्रॅकोमा-मुक्त देश बनला आहे.

हे त्या लाखो लोकांच्या मेहनतीचं  फळ आहे, ज्यांनी न थकता, न थांबता या आजाराविरुद्ध लढा दिला. हे यश आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे देखील याच्या निर्मूलनात मोठी मदत मिळाली. जलजीवन अभियानाचे देखील या यशात मोठे योगदान राहिलं  आहे. आज जेव्हा घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ ने देखील या गोष्टीची प्रशंसा करताना म्हटलं आहे कि भारताने आजाराविरोधात लढा देण्याबरोबरच त्याला कारणीभूत  मुळांवर देखील घाव घातला आहे.

मित्रांनो, आज भारतात बहुतांश लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा लाभांचा फायदा घेत  आहे आणि आता नुकताच  आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा -आयएलओ चा एक महत्त्वपूर्ण अहवाल आला आहे. या अहवालात म्हटलं आहे की भारतातील  64 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला आता कुठला ना कुठला सामाजिक सुरक्षा लाभ नक्की  मिळत आहे. सामाजिक सुरक्षा ही जगातील सर्वात मोठी व्याप्ती असलेल्यापैकी एक आहे. आज देशात सुमारे 95 कोटी लोक कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. त्या उलट 2015 पर्यंत 25 कोटींपेक्षा कमी लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचू शकत होत्या.

मित्रांनो, भारतात आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेने पुढे जात आहे. हे सामाजिक न्यायाचे देखील एक उत्तम चित्र आहे. या यशामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे की आगामी काळ  अधिक चांगला असेल, प्रत्येक पावलावर भारत आणखी सशक्त होईल.

माझ्या प्रिय देश बांधवांनो, लोक -सहभागाच्या शक्तीने मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो. मी तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवतो, या ध्वनिफितीत तुम्हाला त्या संकटाच्या भीषणतेची कल्पना येईल. ते संकट किती मोठं होतं, आधी ते ऐका, समजून घ्या.

ऑडिओ - मोरारजीभाई देसाई

मित्रांनो, हा आवाज देशाचे माजी पंतप्रधान श्रीमान मोरारजीभाई देसाई यांचा आहे. त्यांनी संक्षिप्त स्वरूपात मात्र अतिशय स्पष्ट पद्धतीने आणीबाणी बाबत माहिती दिली.  तुम्ही कल्पना करू शकता, तो काळ कसा होता. आणीबाणी लादणाऱ्यानी न केवळ आपल्या संविधानाची हत्या केली, तर त्यांचा हेतू न्यायपालिकेला देखील आपला गुलाम बनवून ठेवणं हा होता. या काळात लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला होता. याची अनेक अशी उदाहरणे आहेत जी कधीही विसरता येणार नाहीत. जॉर्ज फर्नांडिस साहेबांना बेड्यांमध्ये जखडून  ठेवण्यात आलं होतं. अनेक लोकांना कठोर यातना सोसाव्या लागल्या.  मिसा (MISA) अंतर्गत कोणालाही विनाकारण अटक केली जात होती.  विद्यार्थ्यांना देखील त्रास दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली.  मित्रांनो, त्या काळात ज्या हजारो लोकांना अटक करण्यात आली त्यांच्यावर विनाकारण मानवी अत्याचार झाले.  मात्र हे भारताच्या जनतेचे सामर्थ्य आहे, ते झुकले नाहीत, वाकले नाहीत आणि लोकशाहीशी  कोणतीही तडजोड त्यांनी मान्य केली  नाही. शेवटी जनता जनार्दनाचा विजय झाला, आणीबाणी हटवण्यात आली आणि आणीबाणी लादणारेपराभूत झाले. बाबू जगजीवन रामजी यांनी याबाबत अतिशय सशक्त पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं होतं

ऑडिओ-

अटलजी यांनी  देखील त्यावेळी आपल्या खास शैलीत जे काही सांगितलं होतं ते देखील आपण नक्की ऐकायला हवं

#Audio

मित्रांनो, देशावर आणीबाणी लादण्यात आली त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्ष पूर्ण झाली. आपण देशवासियांनी संविधान हत्या दिवस पाळला. आपण नेहमी त्या सर्व लोकांचे स्मरण करायला हवं ज्यांनी नेटाने आणीबाणीचा  सामना केला होता. यामुळे आपल्याला आपल्या संविधानाला सशक्त राखण्यासाठी निरंतर सजग राहण्याची प्रेरणा मिळते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही एका चित्राची कल्पना करा. सकाळचं ऊन पर्वतांवर पडत आहे,  हळूहळू सूर्यप्रकाश मैदानाच्या दिशेने पसरत आहे आणि त्या प्रकाशात फुटबॉलप्रेमींची झुंबड त्या दिशेने जात आहे. शिट्टी वाजते आणि काही क्षणातच मैदान टाळ्या आणि घोषणांनी दुमदुमून जातं. प्रत्येक पास, प्रत्येक गोल बरोबरच लोकांचा उत्साह वाढत आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कोणते सुंदर जग आहे? मित्रांनो,  हे चित्र आसामचे एक प्रमुख क्षेत्र बोडोलँड येथील वास्तव आहे.  बोडोलँड आज आपल्या एका नव्या रूपासह देशासमोर उभा आहे. इथल्या युवकांमध्ये जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो फुटबॉलच्या मैदानात सर्वात जास्त पाहायला मिळतो. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रात बोडोलँड सीईएम चषकाचे आयोजन होत आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही तर एकता आणि आशेचा उत्सव बनला आहे. 3 हजार 700 हून अधिक संघ,  सुमारे 70 हजार खेळाडू आणि त्यातही मोठ्या संख्येने आपल्या मुलींचा त्यात सहभाग आहे. हे आकडे बोडोलँडमधील मोठ्या बदलाची गाथा सांगत आहेत. बोडोलँड आता देशाच्या खेळाच्या नकाशावर आपली चमक आणखी वाढवत आहे.

मित्रांनो, एक काळ असा होता की संघर्ष हीच या भागाची ओळख होती. तेव्हा येथील तरुणांसाठी उपलब्ध मार्ग मर्यादित होते. मात्र आज त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्ने आहेत आणि मनात स्वावलंबनाचे धैर्य

आहे. येथे तयार झालेले फुटबॉल खेळाडू आता उच्च स्तरावर स्वतःची ओळख प्रस्थापित करत आहेत. हालीचरण नारजारी, दुर्गा बोरो, अपूर्व नारजारी, मनबीर बसुमतारी, ही केवळ फुटबॉलपटूंची नावे नव्हेत – तर हे त्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी बोडोलँडला मैदानापासून राष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचवले. यापैकी अनेक जणांनी अत्यंत मर्यादित साधनांसह सराव केला, अनेकांनी अत्यंत कठीण

परिस्थितीतून मार्ग शोधला आणि आज यांचे नाव घेऊन कितीतरी लहान मुले स्वतःच्या स्वप्नांचा पाया रचत आहेत.

मित्रांनो, जर आपल्याला आपले सामर्थ्य वाढवायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपली तंदुरुस्ती, आपले स्वास्थ्य यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. तसे तर मित्रांनो, तुम्हाला तंदुरुस्तीसाठी, लठ्ठपणा कमी

करण्यासाठी मी केलेली सूचना लक्षात आहे ना? जेवणात 10 टक्के तेल कमी वापरा आणि लठ्ठपणा कमी करा. जेव्हा तुम्ही फिट व्हाल तेव्हा आयुष्यात आणखी सुपरहिट व्हाल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला भारत जसा प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यासाठी प्रसिध्द आहे त्याच प्रकारे, कला, शिल्पकला आणि कौशल्यातील विविधता देखील आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्या भागात जाल, तिथली एखादी तरी विशेष बाब आणि स्थानिक गोष्टीविषयी तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही बहुतेकदा ‘मन की बात’ मध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विषयी चर्चा करतो. असेच एक उत्पादन म्हणजे मेघालयातील एरी सिल्क नावाचे रेशीम. याला काही दिवसांपूर्वीच जीआय टॅग मिळालेला आहे. एरी सिल्क हे मेघालयासाठी एखाद्या वारशाप्रमाणे आहे. इथल्या आदिवासी जमातींनी विशेषतः खासी समाजाच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या याचा सांभाळ केला आहे आणि स्वतःच्या कौशल्याने त्याला आणखी समृद्ध देखील केलं आहे. या रेशमामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे इतर कापडापासून वेगळेपणाने उठून दिसते. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे रेशीम तयार करण्याची पद्धत, जे या प्रकारचे रेशीम तयार करणाऱ्या रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळवताना हे किडे मारले जात नाहीत. त्यामुळे या रेशमाला अहिंसा सिल्क देखील म्हणतात. आजकाल जगभरात जी उत्पादने बनवताना हिंसा केलेली नसेल आणि निसर्गावर त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसेल अशा प्रकारच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. आणि म्हणूनच मेघालयातील एरी सिल्क जागतिक बाजारपेठेसाठी एक सुयोग्य उत्पादन आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे रेशीम थंडीत उब देते आणि उन्हाळ्यात थंडावा देते. या रेशमाचे हे वैशिष्ट्य याला बहुतांश भागांमध्ये वापरासाठी अनुकूल बनवते. मेघालयातील महिला आता स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा मोठ्या प्रमाणात पुढे नेत आहेत. एरी सिल्कला जीआय टॅग मिळाल्याबद्दल मी मेघालयातील जनतेचे अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांना देखील आग्रह करतो की तुम्ही एरी सिल्कपासून तयार केलेले कपडे नक्की वापरून पहा. आणि हो, खादी, हातमाग, व्होकल फॉर लोकल यांची देखील नेहमीच आठवण असू द्या. ग्राहकांनी भारतातच निर्मित उत्पादने खरेदी केली आणि व्यापाऱ्यांनी भारतात तयार झालेली उत्पादनेच विकली तर ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी उर्जा मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मंत्र भारताचे नवे भविष्य उभारण्यासाठी सज्ज आहे. आपल्या माता, भगिनी, कन्या आज केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी नवी दिशा शोधून काढत आहेत. तुम्ही तेलंगणा मधील भद्राचलमच्या महिलांच्या यशस्वी कामगिरीची माहिती जाणून घ्याल तर तुम्हाला अधिकच आनंद होईल. या भागातील महिला एकेकाळी शेतात मजुरी करत असत. उपजीविकेसाठी दिवसभर कष्ट उपसत असत. आज त्याच महिला श्रीअन्नापासून म्हणजेच भरड धान्यांपासुन बिस्किटे तयार करत आहेत. ’भद्रादि मिलेट मॅजिक’ या नावाने ही बिस्किटे लंडनपर्यंत पुरवली जाताहेत. भद्राचलमच्या या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून याचे प्रशिक्षण घेतले.

मित्रांनो, या महिलांनी आणखी एक कौतुकास्पद काम केले आहे. त्यांनी ‘गिरी सॅनिटरी पॅड्स’ चे उत्पादन सुरु केले. केवळ तीन महिन्यांमध्ये त्यांनी तब्बल 40,000 पॅड्स तयार केले आणि शाळा तसेच

आजूबाजूच्या कार्यालयांमध्ये त्याची विक्री केली, ती देखील अत्यंत कमी किंमतीत. मित्रांनो, कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिलांनी मिळवलेले यश देखील उल्लेखनीय आहे. या महिलांनी ज्वारीच्या भाकरीला एक ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी जी सहकारी संस्था स्थापन केली आहे त्यामध्ये दररोज सुमारे तीन हजारपेक्षा जास्त भाकऱ्या तयार करण्यात येतात. या भाकऱ्यांचा सुगंध आता केवळ गावापर्यंत मर्यादित राहिलेला नसून, बेंगळूरूमध्ये देखील यांच्या विक्रीचे काउंटर सुरु झाले आहे. अन्नपदार्थांच्या ऑनलाईन मंचावर या भाकऱ्यांसाठी ऑर्डर्स येत आहेत. कलबुर्गीची भाकरी आता मोठमोठ्या शहरांतील स्वयंपाकघरांमध्ये पोहोचली आहे. आणि याचा त्या महिलांच्या जीवनावर फार चांगला परिणाम झाला आहे, त्यांचे उत्पन्न वाढत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या यशोगाथांमधील चेहरे वेगवेगळे असतील मात्र त्या चेहऱ्यांवरचे तेज मात्र एकसारखे आहे. हे तेज आहे आत्मविश्वासाचे, आत्मनिर्भरतेचे. असाच एक चेहरा आहे, मध्यप्रदेशातील सुमा ऊईके यांचा. सुमाजींचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील कटंगी ब्लॉकमध्ये बचत गटामध्ये सहभागी होऊन, अळंबीची शेती तसेच पशुपालन यांचे प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला. सुमा ऊईके यांचे उत्पन्न वाढल्यावर त्यांनी त्यांच्या कार्याचा विस्तार देखील केला. लहानशा प्रयत्नापासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘दीदी कॅन्टीन’ आणि ‘औष्णिक उपचार केंद्रा’ पर्यंत पोहोचला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य महिला स्वतःचे आणि देशाचे भाग्य उजळवत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांत मला व्हिएतनामच्या लोकांनी विविध माध्यमांतून काही संदेश पाठवले. या संदेशांच्या प्रत्येक ओळीत श्रद्धा होती, आत्मीयता होती. त्यांच्या भावना मनाला

स्पर्श करणाऱ्या होत्या.ते सर्वजण, भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे ‘रेलीक्स’ चे दर्शन घडवल्याबद्दल भारताचे आभार मानत होते.त्यांच्या शब्दांमध्ये जे भाव भरलेले होते ते कोणत्याही औपचारिक आभारप्रदर्शनाहून अधिक हृदयस्पर्शी होते.

मित्रांनो, मुळात, भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचा शोध आंध्रप्रदेशात पालनाडू जिल्ह्यातील नागार्जुनकोंडा येथे लागला.या स्थानाचे बौद्ध धर्माशी जवळचे नाते आहे. असे म्हटले जाते की एकेकाळी या स्थानाला भेट देण्यासाठी श्रीलंका आणि चीनसह अनेक लांबलांबच्या देशांतून लोक येथे येत. मित्रांनो, गेल्या महिन्यात भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष  व्हिएतनामला नेण्यात आले. तिथल्या वेगवेगळ्या 9 ठिकाणी जनतेच्या दर्शनासाठी हे अवशेष ठेवण्यात आले. भारताचा हा उपक्रम एका अर्थी

व्हिएतनाम साठी एक राष्ट्रीय सोहोळा बनला. तुम्ही कल्पना करू शकता, 10 कोटी लोकसंख्येच्या व्हिएतनाम मध्ये सुमारे दीड कोटीहून अधिक लोकांनी भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले.

समाज माध्यमांवर मी जी छायाचित्रे आणि व्हिडीओ पाहिले त्यातून असे जाणवते की श्रद्धेला कोणतीही सीमा नसते. पाऊस असो, कडक ऊन असो, लोक कोणत्याही परिस्थितीत तासंतास रांगेत उभे होते. लहान मुले,  वयोवृद्ध, दिव्यांगजन, असे सगळेच भावुक झाले होते. व्हिएतनामचे राष्ट्रपती, उपपंतप्रधान, ज्येष्ठ मंत्री, कोणीही असो, प्रत्येक जण नतमस्तक झाला होता. या प्रवासाप्रती तिथल्या लोकांमध्ये इतका आदरभाव होता की व्हिएतनाम सरकारने हा उपक्रम आणखी 12 दिवसांसाठी सुरु ठेवण्याचा आग्रह धरला आणि भारताने याला सहर्ष संमती दिली.

मित्रांनो, भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी, देशांना, संस्कृतींना आणि लोकांना एका धाग्यात बांधते. यापूर्वी भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष थायलंड आणि मंगोलिया येथे नेण्यात आले होते, त्या देशांमध्ये देखील असाच श्रद्धाभाव बघायला मिळाला. माझा तुम्हा सर्वांना असा आग्रह आहे की तुम्ही तुमच्या राज्यात असलेल्या बौद्ध स्थळांना अवश्य भेट द्या. हा एक अध्यात्मिक अनुभव असेल आणि आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी देखील असेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात आपण सर्वांनी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला. मला तुमचे हजारो संदेश मिळाले. अनेकांनी त्यांच्या परिसरातील अशा मित्रांची माहिती दिली जे पर्यावरण रक्षणासाठी एकटेच प्रयत्न करत होते आणि नंतर संपूर्ण समाज त्यांच्यासोबत सहभागी झाला. सर्वांचे हेच योगदान, आपल्या वसुंधरेसाठी एक मोठे सामर्थ्य बनत आहे. पुण्याच्या रमेश खरमाळे यांच्या कार्याबद्दल समजल्यावर तुम्हाला मोठी प्रेरणा मिळेल. आठवड्याच्या शेवटी जेव्हा बाकीचे लोक आराम करतात तेव्हा रमेशजी आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन बाहेर पडतात. ते कुठे जातात माहितीये? जुन्नरच्या डोंगरांच्या दिशेने. ऊन असो की उंचावरची चढाई, ते थांबत नाहीत. ते माजलेली झाडी कापतात, पाणी

थांबवण्यासाठी चर खणतात आणि बिया लावतात. फक्त 2 महिन्यांमध्ये त्यांनी 70 चर खणले रमेशजींनी अनेक लहान लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. ते एक प्राणवायू पार्क देखील

उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की या भागात पक्षी परतू लागले आहेत, वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले आहे.

मित्रांनो, पर्यावरणासाठी आणखी एक सुंदर उपक्रम बघायला मिळतो तो म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद या शहरात. तिथल्या नगरपालिकेने ‘लाखो वृक्षांसाठी अभियान’ सुरु केले असून त्याचे उद्दिष्ट आहे लाखो झाडे लावणे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सिंदूर वन’. हे वन ऑपरेशन सिंदूरमधील वीरांना समर्पित केलेले आहे. ज्या शूर वीरांनी देशासाठी सर्व समर्पण केले त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही सिंदूरची रोपे लावण्यात येत आहेत. इथे आणखी एका अभियानाला वेग देण्यात येत येत आहे आणि ते म्हणजे ‘एक पेड, माँ के नाम’. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात किंवा शहरात सुरु असलेल्या अशा अभियानात नक्की सहभागी व्हा. झाडे लावा, पाणी

वाचवा, धरतीची सेवा करा, कारण जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो तेव्हा खरेतर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करत असतो.

मित्रांनो, महाराष्ट्रातील एका गावाने फार उत्तम उदाहरण घालून दिले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एक ग्रामपंचायत आहे- ‘पाटोदा’ ही कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत आहे. या गावात कोणीही स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था केलेली आहे. इथे सांडपाण्यावर प्रक्रिया देखील करण्यात येते. प्रक्रिया करून स्वच्छ केल्याशिवाय कोणतेही पाणी नदीत सोडले जात नाही. या गावात शेण्या वापरून अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि त्याची राख वापरून दिवंगत व्यक्तीच्या नावे झाड लावले जाते. या गावातली स्वच्छता देखील बघण्यासारखी आहे. लहान लहान सवयी जेव्हा सामुहिक निर्धाराचे रूप घेतात तेव्हा फार मोठे परिवर्तन घडणे निश्चित असते.

माझ्या प्रिय मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे लागलेल्या आहेत. भारताने नवा इतिहास रचला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाशी काल माझे बोलणे सुद्धा झाले.

तुम्ही देखील माझे शुभांशूसोबत झालेले संभाषण ऐकले असेल. शुभांशूला अजून काही दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहावे लागेल. आपण या मोहिमेबद्दल आणखी चर्चा करू, मात्र ‘मन की बात’ च्या

पुढच्या भागात.

आता या भागात तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. मात्र मित्रांनो, जाताजाता मी तुम्हाला एका विशेष दिवसाची आठवण करून देऊ इच्छितो. परवा, 1 जुलैला आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यवसायांचा सन्मान करतो, डॉक्टर्स आणि सीए. हे दोन्ही आपल्या समाजाचे असे स्तंभ आहेत जे आपल्या जीवनाला अधिक चांगले रूप देतात. डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षक आहेत आणि सीए आपल्या आर्थिक जीवनाचे मार्गदर्शक आहेत. सगळ्या डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाऊन्टंटना माझ्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो, तुमच्या सूचनांची मी वाट पाहत असतो. ‘मन की बात’ चा पुढचा भाग तुमच्या याच सूचनांमुळे आणखी समृध्द होईल. पुन्हा भेटूया, नव्या मुद्द्यांसह, नव्या प्रेरणांसह, देशवासीयांच्या नवनव्या यशांसह. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament

Media Coverage

MSME exports touch Rs 9.52 lakh crore in April–September FY26: Govt tells Parliament
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Assam has picked up a new momentum of development: PM Modi at the foundation stone laying of Ammonia-Urea Fertilizer Project in Namrup
December 21, 2025
Assam has picked up a new momentum of development: PM
Our government is placing farmers' welfare at the centre of all its efforts: PM
Initiatives like PM Dhan Dhanya Krishi Yojana and the Dalhan Atmanirbharta Mission are launched to promote farming and support farmers: PM
Guided by the vision of Sabka Saath, Sabka Vikas, our efforts have transformed the lives of poor: PM

उज्जनिर रायज केने आसे? आपुनालुकोलोई मुर अंतोरिक मोरोम आरु स्रद्धा जासिसु।

असम के गवर्नर लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, केंद्र में मेरे सहयोगी और यहीं के आपके प्रतिनिधि, असम के पूर्व मुख्यमंत्री, सर्बानंद सोनोवाल जी, असम सरकार के मंत्रीगण, सांसद, विधायक, अन्य महानुभाव, और विशाल संख्या में आए हुए, हम सबको आशीर्वाद देने के लिए आए हुए, मेरे सभी भाइयों और बहनों, जितने लोग पंडाल में हैं, उससे ज्यादा मुझे वहां बाहर दिखते हैं।

सौलुंग सुकाफा और महावीर लसित बोरफुकन जैसे वीरों की ये धरती, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह और वीरांगना सती साध`नी की ये भूमि, मैं उजनी असम की इस महान मिट्टी को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।

साथियों,

मैं देख रहा हूँ, सामने दूर-दूर तक आप सब इतनी बड़ी संख्या में अपना उत्साह, अपना उमंग, अपना स्नेह बरसा रहे हैं। और खासकर, मेरी माताएँ बहनें, इतनी विशाल संख्या में आप जो प्यार और आशीर्वाद लेकर आईं हैं, ये हमारी सबसे बड़ी शक्ति है, सबसे बड़ी ऊर्जा है, एक अद्भुत अनुभूति है। मेरी बहुत सी बहनें असम के चाय बगानों की खुशबू लेकर यहां उपस्थित हैं। चाय की ये खुशबू मेरे और असम के रिश्तों में एक अलग ही ऐहसास पैदा करती है। मैं आप सभी को प्रणाम करता हूँ। इस स्नेह और प्यार के लिए मैं हृदय से आप सबका आभार करता हूँ।

साथियों,

आज असम और पूरे नॉर्थ ईस्ट के लिए बहुत बड़ा दिन है। नामरूप और डिब्रुगढ़ को लंबे समय से जिसका इंतज़ार था, वो सपना भी आज पूरा हो रहा है, आज इस पूरे इलाके में औद्योगिक प्रगति का नया अध्याय शुरू हो रहा है। अभी थोड़ी देर पहले मैंने यहां अमोनिया–यूरिया फर्टिलाइज़र प्लांट का भूमि पूजन किया है। डिब्रुगढ़ आने से पहले गुवाहाटी में एयरपोर्ट के एक टर्मिनल का उद्घाटन भी हुआ है। आज हर कोई कह रहा है, असम विकास की एक नई रफ्तार पकड़ चुका है। मैं आपको बताना चाहता हूँ, अभी आप जो देख रहे हैं, जो अनुभव कर रहे हैं, ये तो एक शुरुआत है। हमें तो असम को बहुत आगे लेकर के जाना है, आप सबको साथ लेकर के आगे बढ़ना है। असम की जो ताकत और असम की भूमिका ओहोम साम्राज्य के दौर में थी, विकसित भारत में असम वैसी ही ताकतवर भूमि बनाएंगे। नए उद्योगों की शुरुआत, आधुनिक इनफ्रास्ट्रक्चर का निर्माण, Semiconductors, उसकी manufacturing, कृषि के क्षेत्र में नए अवसर, टी-गार्डेन्स और उनके वर्कर्स की उन्नति, पर्यटन में बढ़ती संभावनाएं, असम हर क्षेत्र में आगे बढ़ रहा है। मैं आप सभी को और देश के सभी किसान भाई-बहनों को इस आधुनिक फर्टिलाइज़र प्लांट के लिए बहुत-बहुत शुभकामनाएँ देता हूँ। मैं आपको गुवाहटी एयरपोर्ट के नए टर्मिनल के लिए भी बधाई देता हूँ। बीजेपी की डबल इंजन सरकार में, उद्योग और कनेक्टिविटी की ये जुगलबंदी, असम के सपनों को पूरा कर रही है, और साथ ही हमारे युवाओं को नए सपने देखने का हौसला भी दे रही है।

साथियों,

विकसित भारत के निर्माण में देश के किसानों की, यहां के अन्नदाताओं की बहुत बड़ी भूमिका है। इसलिए हमारी सरकार किसानों के हितों को सर्वोपरि रखते हुए दिन-रात काम कर रही है। यहां आप सभी को किसान हितैषी योजनाओं का लाभ दिया जा रहा है। कृषि कल्याण की योजनाओं के बीच, ये भी जरूरी है कि हमारे किसानों को खाद की निरंतर सप्लाई मिलती रहे। आने वाले समय में ये यूरिया कारख़ाना यह सुनिश्चित करेगा। इस फर्टिलाइज़र प्रोजेक्ट पर करीब 11 हजार करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। यहां हर साल 12 लाख मीट्रिक टन से ज्यादा खाद बनेगी। जब उत्पादन यहीं होगा, तो सप्लाई तेज होगी। लॉजिस्टिक खर्च घटेगा।

साथियों,

नामरूप की ये यूनिट रोजगार-स्वरोजगार के हजारों नए अवसर भी बनाएगी। प्लांट के शुरू होते ही अनेकों लोगों को यहीं पर स्थायी नौकरी भी मिलेगी। इसके अलावा जो काम प्लांट के साथ जुड़ा होता है, मरम्मत हो, सप्लाई हो, कंस्ट्रक्शन का बहुत बड़ी मात्रा में काम होगा, यानी अनेक काम होते हैं, इन सबमें भी यहां के स्थानीय लोगों को और खासकर के मेरे नौजवानों को रोजगार मिलेगा।

लेकिन भाइयों बहनों,

आप सोचिए, किसानों के कल्याण के लिए काम बीजेपी सरकार आने के बाद ही क्यों हो रहा है? हमारा नामरूप तो दशकों से खाद उत्पादन का केंद्र था। एक समय था, जब यहां बनी खाद से नॉर्थ ईस्ट के खेतों को ताकत मिलती थी। किसानों की फसलों को सहारा मिलता था। जब देश के कई हिस्सों में खाद की आपूर्ति चुनौती बनी, तब भी नामरूप किसानों के लिए उम्मीद बना रहा। लेकिन, पुराने कारखानों की टेक्नालजी समय के साथ पुरानी होती गई, और काँग्रेस की सरकारों ने कोई ध्यान नहीं दिया। नतीजा ये हुआ कि, नामरूप प्लांट की कई यूनिट्स इसी वजह से बंद होती गईं। पूरे नॉर्थ ईस्ट के किसान परेशान होते रहे, देश के किसानों को भी तकलीफ हुई, उनकी आमदनी पर चोट पड़ती रही, खेती में तकलीफ़ें बढ़ती गईं, लेकिन, काँग्रेस वालों ने इस समस्या का कोई हल ही नहीं निकाला, वो अपनी मस्ती में ही रहे। आज हमारी डबल इंजन सरकार, काँग्रेस द्वारा पैदा की गई उन समस्याओं का समाधान भी कर रही है।

साथियों,

असम की तरह ही, देश के दूसरे राज्यों में भी खाद की कितनी ही फ़ैक्टरियां बंद हो गईं थीं। आप याद करिए, तब किसानों के क्या हालात थे? यूरिया के लिए किसानों को लाइनों में लगना पड़ता था। यूरिया की दुकानों पर पुलिस लगानी पड़ती थी। पुलिस किसानों पर लाठी बरसाती थी।

भाइयों बहनों,

काँग्रेस ने जिन हालातों को बिगाड़ा था, हमारी सरकार उन्हें सुधारने के लिए एडी-चोटी की ताकत लगा रही है। और इन्होंने इतना बुरा किया,इतना बुरा किया कि, 11 साल से मेहनत करने के बाद भी, अभी मुझे और बहुत कुछ करना बाकी है। काँग्रेस के दौर में फर्टिलाइज़र्स फ़ैक्टरियां बंद होती थीं। जबकि हमारी सरकार ने गोरखपुर, सिंदरी, बरौनी, रामागुंडम जैसे अनेक प्लांट्स शुरू किए हैं। इस क्षेत्र में प्राइवेट सेक्टर को भी बढ़ावा दिया जा रहा है। आज इसी का नतीजा है, हम यूरिया के क्षेत्र में आने वाले कुछ समय में आत्मनिर्भर हो सके, उस दिशा में मजबूती से कदम रख रहे हैं।

साथियों,

2014 में देश में सिर्फ 225 लाख मीट्रिक टन यूरिया का ही उत्पादन होता था। आपको आंकड़ा याद रहेगा? आंकड़ा याद रहेगा? मैं आपने मुझे काम दिया 10-11 साल पहले, तब उत्पादन होता था 225 लाख मीट्रिक टन। ये आंकड़ा याद रखिए। पिछले 10-11 साल की मेहनत में हमने उत्पादन बढ़ाकर के करीब 306 लाख मीट्रिक टन तक पहुंच चुका है। लेकिन हमें यहां रूकना नहीं है, क्योंकि अभी भी बहुत करने की जरूरत है। जो काम उनको उस समय करना था, नहीं किया, और इसलिए मुझे थोड़ा एक्स्ट्रा मेहनत करनी पड़ रही है। और अभी हमें हर साल करीब 380 लाख मीट्रिक टन यूरिया की जरूरत पड़ती है। हम 306 पर पहुंचे हैं, 70-80 और करना है। लेकिन मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं, हम जिस प्रकार से मेहनत कर रहे हैं, जिस प्रकार से योजना बना रहे हैं और जिस प्रकार से मेरे किसान भाई-बहन हमें आशीर्वाद दे रहे हैं, हम हो सके उतना जल्दी इस गैप को भरने में कोई कमी नहीं रखेंगे।

और भाइयों और बहनों,

मैं आपको एक और बात बताना चाहता हूं, आपके हितों को लेकर हमारी सरकार बहुत ज्यादा संवेदनशील है। जो यूरिया हमें महंगे दामों पर विदेशों से मंगाना पड़ता है, हम उसकी भी चोट अपने किसानों पर नहीं पड़ने देते। बीजेपी सरकार सब्सिडी देकर वो भार सरकार खुद उठाती है। भारत के किसानों को सिर्फ 300 रुपए में यूरिया की बोरी मिलती है, उस एक बोरी के बदले भारत सरकार को दूसरे देशों को, जहां से हम बोरी लाते हैं, करीब-करीब 3 हजार रुपए देने पड़ते हैं। अब आप सोचिए, हम लाते हैं 3000 में, और देते हैं 300 में। यह सारा बोझ देश के किसानों पर हम नहीं पड़ने देते। ये सारा बोझ सरकार खुद भरती है। ताकि मेरे देश के किसान भाई बहनों पर बोझ ना आए। लेकिन मैं किसान भाई बहनों को भी कहूंगा, कि आपको भी मेरी मदद करनी होगी और वह मेरी मदद है इतना ही नहीं, मेरे किसान भाई-बहन आपकी भी मदद है, और वो है यह धरती माता को बचाना। हम धरती माता को अगर नहीं बचाएंगे तो यूरिया की कितने ही थैले डाल दें, यह धरती मां हमें कुछ नहीं देगी और इसलिए जैसे शरीर में बीमारी हो जाए, तो दवाई भी हिसाब से लेनी पड़ती है, दो गोली की जरूरत है, चार गोली खा लें, तो शरीर को फायदा नहीं नुकसान हो जाता है। वैसा ही इस धरती मां को भी अगर हम जरूरत से ज्यादा पड़ोस वाला ज्यादा बोरी डालता है, इसलिए मैं भी बोरी डाल दूं। इस प्रकार से अगर करते रहेंगे तो यह धरती मां हमसे रूठ जाएगी। यूरिया खिला खिलाकर के हमें धरती माता को मारने का कोई हक नहीं है। यह हमारी मां है, हमें उस मां को भी बचाना है।

साथियों,

आज बीज से बाजार तक भाजपा सरकार किसानों के साथ खड़ी है। खेत के काम के लिए सीधे खाते में पैसे पहुंचाए जा रहे हैं, ताकि किसान को उधार के लिए भटकना न पड़े। अब तक पीएम किसान सम्मान निधि के लगभग 4 लाख करोड़ रुपए किसानों के खाते में भेजे गए हैं। आंकड़ा याद रहेगा? भूल जाएंगे? 4 लाख करोड़ रूपया मेरे देश के किसानों के खाते में सीधे जमा किए हैं। इसी साल, किसानों की मदद के लिए 35 हजार करोड़ रुपए की दो योजनाएं नई योजनाएं शुरू की हैं 35 हजार करोड़। पीएम धन धान्य कृषि योजना और दलहन आत्मनिर्भरता मिशन, इससे खेती को बढ़ावा मिलेगा।

साथियों,

हम किसानों की हर जरूरत को ध्यान रखते हुए काम कर रहे हैं। खराब मौसम की वजह से फसल नुकसान होने पर किसान को फसल बीमा योजना का सहारा मिल रहा है। फसल का सही दाम मिले, इसके लिए खरीद की व्यवस्था सुधारी गई है। हमारी सरकार का साफ मानना है कि देश तभी आगे बढ़ेगा, जब मेरा किसान मजबूत होगा। और इसके लिए हर संभव प्रयास किए जा रहे हैं।

साथियों,

केंद्र में हमारी सरकार बनने के बाद हमने किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से पशुपालकों और मछलीपालकों को भी जोड़ दिया था। किसान क्रेडिट कार्ड, KCC, ये KCC की सुविधा मिलने के बाद हमारे पशुपालक, हमारे मछली पालन करने वाले इन सबको खूब लाभ उठा रहा है। KCC से इस साल किसानों को, ये आंकड़ा भी याद रखो, KCC से इस साल किसानों को 10 लाख करोड़ रुपये से ज्यादा की मदद दी गई है। 10 लाख करोड़ रुपया। बायो-फर्टिलाइजर पर GST कम होने से भी किसानों को बहुत फायदा हुआ है। भाजपा सरकार भारत के किसानों को नैचुरल फार्मिंग के लिए भी बहुत प्रोत्साहन दे रही है। और मैं तो चाहूंगा असम के अंदर कुछ तहसील ऐसे आने चाहिए आगे, जो शत प्रतिशत नेचुरल फार्मिंग करते हैं। आप देखिए हिंदुस्तान को असम दिशा दिखा सकता है। असम का किसान देश को दिशा दिखा सकता है। हमने National Mission On Natural Farming शुरू की, आज लाखों किसान इससे जुड़ चुके हैं। बीते कुछ सालों में देश में 10 हजार किसान उत्पाद संघ- FPO’s बने हैं। नॉर्थ ईस्ट को विशेष ध्यान में रखते हुए हमारी सरकार ने खाद्य तेलों- पाम ऑयल से जुड़ा मिशन भी शुरू किया। ये मिशन भारत को खाद्य तेल के मामले में आत्मनिर्भर तो बनाएगा ही, यहां के किसानों की आय भी बढ़ाएगा।

साथियों,

यहां इस क्षेत्र में बड़ी संख्या में हमारे टी-गार्डन वर्कर्स भी हैं। ये भाजपा की ही सरकार है जिसने असम के साढ़े सात लाख टी-गार्डन वर्कर्स के जनधन बैंक खाते खुलवाए। अब बैंकिंग व्यवस्था से जुड़ने की वजह से इन वर्कर्स के बैंक खातों में सीधे पैसे भेजे जाने की सुविधा मिली है। हमारी सरकार टी-गार्डन वाले क्षेत्रों में स्कूल, रोड, बिजली, पानी, अस्पताल की सुविधाएं बढ़ा रही है।

साथियों,

हमारी सरकार सबका साथ सबका विकास के मंत्र के साथ आगे बढ़ रही है। हमारा ये विजन, देश के गरीब वर्ग के जीवन में बहुत बड़ा बदलाव लेकर आया है। पिछले 11 वर्षों में हमारे प्रयासों से, योजनाओं से, योजनाओं को धरती पर उतारने के कारण 25 करोड़ लोग, ये आंकड़ा भी याद रखना, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। देश में एक नियो मिडिल क्लास तैयार हुआ है। ये इसलिए हुआ है, क्योंकि बीते वर्षों में भारत के गरीब परिवारों के जीवन-स्तर में निरंतर सुधार हुआ है। कुछ ताजा आंकड़े आए हैं, जो भारत में हो रहे बदलावों के प्रतीक हैं।

साथियों,

और मैं मीडिया में ये सारी चीजें बहुत काम आती हैं, और इसलिए मैं आपसे आग्रह करता हूं मैं जो बातें बताता हूं जरा याद रख के औरों को बताना।

साथियों,

पहले गांवों के सबसे गरीब परिवारों में, 10 परिवारों में से 1 के पास बाइक तक होती नहीं थी। 10 में से 1 के पास भी नहीं होती थी। अभी जो सर्वे आए हैं, अब गांव में रहने वाले करीब–करीब आधे परिवारों के पास बाइक या कार होती है। इतना ही नहीं मोबाइल फोन तो लगभग हर घर में पहुंच चुके हैं। फ्रिज जैसी चीज़ें, जो पहले “लग्ज़री” मानी जाती थीं, अब ये हमारे नियो मिडल क्लास के घरों में भी नजर आने लगी है। आज गांवों की रसोई में भी वो जगह बना चुका है। नए आंकड़े बता रहे हैं कि स्मार्टफोन के बावजूद, गांव में टीवी रखने का चलन भी बढ़ रहा है। ये बदलाव अपने आप नहीं हुआ। ये बदलाव इसलिए हुआ है क्योंकि आज देश का गरीब सशक्त हो रहा है, दूर-दराज के क्षेत्रों में रहने वाले गरीब तक भी विकास का लाभ पहुंचने लगा है।

साथियों,

भाजपा की डबल इंजन सरकार गरीबों, आदिवासियों, युवाओं और महिलाओं की सरकार है। इसीलिए, हमारी सरकार असम और नॉर्थ ईस्ट में दशकों की हिंसा खत्म करने में जुटी है। हमारी सरकार ने हमेशा असम की पहचान और असम की संस्कृति को सर्वोपरि रखा है। भाजपा सरकार असमिया गौरव के प्रतीकों को हर मंच पर हाइलाइट करती है। इसलिए, हम गर्व से महावीर लसित बोरफुकन की 125 फीट की प्रतिमा बनाते हैं, हम असम के गौरव भूपेन हजारिका की जन्म शताब्दी का वर्ष मनाते हैं। हम असम की कला और शिल्प को, असम के गोमोशा को दुनिया में पहचान दिलाते हैं, अभी कुछ दिन पहले ही Russia के राष्ट्रपति श्रीमान पुतिन यहां आए थे, जब दिल्ली में आए, तो मैंने बड़े गर्व के साथ उनको असम की ब्लैक-टी गिफ्ट किया था। हम असम की मान-मर्यादा बढ़ाने वाले हर काम को प्राथमिकता देते हैं।

लेकिन भाइयों बहनों,

भाजपा जब ये काम करती है तो सबसे ज्यादा तकलीफ काँग्रेस को होती है। आपको याद होगा, जब हमारी सरकार ने भूपेन दा को भारत रत्न दिया था, तो काँग्रेस ने खुलकर उसका विरोध किया था। काँग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने कहा था कि, मोदी नाचने-गाने वालों को भारत रत्न दे रहा है। मुझे बताइए, ये भूपेन दा का अपमान है कि नहीं है? कला संस्कृति का अपमान है कि नहीं है? असम का अपमान है कि नहीं है? ये कांग्रेस दिन रात करती है, अपमान करना। हमने असम में सेमीकंडक्टर यूनिट लगवाई, तो भी कांग्रेस ने इसका विरोध किया। आप मत भूलिए, यही काँग्रेस सरकार थी, जिसने इतने दशकों तक टी कम्यूनिटी के भाई-बहनों को जमीन के अधिकार नहीं मिलने दिये! बीजेपी की सरकार ने उन्हें जमीन के अधिकार भी दिये और गरिमापूर्ण जीवन भी दिया। और मैं तो चाय वाला हूं, मैं नहीं करूंगा तो कौन करेगा? ये कांग्रेस अब भी देशविरोधी सोच को आगे बढ़ा रही है। ये लोग असम के जंगल जमीन पर उन बांग्लादेशी घुसपैठियों को बसाना चाहते हैं। जिनसे इनका वोट बैंक मजबूत होता है, आप बर्बाद हो जाए, उनको इनकी परवाह नहीं है, उनको अपनी वोट बैंक मजबूत करनी है।

भाइयों बहनों,

काँग्रेस को असम और असम के लोगों से, आप लोगों की पहचान से कोई लेना देना नहीं है। इनको केवल सत्ता,सरकार और फिर जो काम पहले करते थे, वो करने में इंटरेस्ट है। इसीलिए, इन्हें अवैध बांग्लादेशी घुसपैठिए ज्यादा अच्छे लगते हैं। अवैध घुसपैठियों को काँग्रेस ने ही बसाया, और काँग्रेस ही उन्हें बचा रही है। इसीलिए, काँग्रेस पार्टी वोटर लिस्ट के शुद्धिकरण का विरोध कर रही है। तुष्टीकरण और वोटबैंक के इस काँग्रेसी जहर से हमें असम को बचाकर रखना है। मैं आज आपको एक गारंटी देता हूं, असम की पहचान, और असम के सम्मान की रक्षा के लिए भाजपा, बीजेपी फौलाद बनकर आपके साथ खड़ी है।

साथियों,

विकसित भारत के निर्माण में, आपके ये आशीर्वाद यही मेरी ताकत है। आपका ये प्यार यही मेरी पूंजी है। और इसीलिए पल-पल आपके लिए जीने का मुझे आनंद आता है। विकसित भारत के निर्माण में पूर्वी भारत की, हमारे नॉर्थ ईस्ट की भूमिका लगातार बढ़ रही है। मैंने पहले भी कहा है कि पूर्वी भारत, भारत के विकास का ग्रोथ इंजन बनेगा। नामरूप की ये नई यूनिट इसी बदलाव की मिसाल है। यहां जो खाद बनेगी, वो सिर्फ असम के खेतों तक नहीं रुकेगी। ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल और पूर्वी उत्तर प्रदेश तक पहुंचेगी। ये कोई छोटी बात नहीं है। ये देश की खाद जरूरत में नॉर्थ ईस्ट की भागीदारी है। नामरूप जैसे प्रोजेक्ट, ये दिखाते हैं कि, आने वाले समय में नॉर्थ ईस्ट, आत्मनिर्भर भारत का बहुत बड़ा केंद्र बनकर उभरेगा। सच्चे अर्थ में अष्टलक्ष्मी बन के रहेगा। मैं एक बार फिर आप सभी को नए फर्टिलाइजर प्लांट की बधाई देता हूं। मेरे साथ बोलिए-

भारत माता की जय।

भारत माता की जय।

और इस वर्ष तो वंदे मातरम के 150 साल हमारे गौरवपूर्ण पल, आइए हम सब बोलें-

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।