पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती लूला यांनी मर्यादित आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली आणि भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. त्यांनी भारत-ब्राझीलमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आधार देणाऱ्या सामायिक मूल्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले.  व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्य आणि औषधनिर्माण, अवकाश, अक्षय ऊर्जा, शेती आणि अन्न प्रक्रिया, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआय, पारंपारिक औषध, योग, क्रीडा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी महत्वपूर्ण खनिजे, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, एआय आणि सुपरकॉम्प्युटर, डिजिटल सहयोग आणि गतिशीलता यासारख्या सहकार्याच्या  क्षेत्रांमध्ये   नवीन संधींचा शोध घेतला.

दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि व्यावसायिक बाबींवर चर्चा करण्यासाठी मंत्रीस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-मर्कोसुर प्राधान्य व्यापार कराराच्या विस्तारासह द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यावर चर्चा केली. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट नेत्यांनी ठेवले. ऊर्जा क्षेत्रातील वर्तमान सहकार्याचा आढावा घेत, दोन्ही नेत्यांनी हायड्रोकार्बन तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्रचंड क्षमता असल्याने गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यावर सहमती दर्शविली.

 

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले. हे दोन्ही देशांच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते. दहशतवादा बाबत  अजिबात सहनशीलता नसावी आणि अशा अमानवी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाशी लढण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आणि जागतिक समुदायासोबत काम केले पाहिजे यावर अध्यक्ष लूला यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बहुपक्षीयता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जागतिक कृती बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याचेही त्यांनी मान्य केले. पंतप्रधानांनी आगामी COP30 हवामान बदल परिषदेसाठी ब्राझीलला शुभेच्छा दिल्या. ग्लोबल साऊथचे हित  जपण्यासाठी   एकत्रितपणे काम करत राहण्याचे त्यांनी मान्य केले.

 

चर्चेनंतर,दहशतवादविरोधी, सुरक्षा क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण, कृषी संशोधन, अक्षय ऊर्जा, बौद्धिक संपदा हक्क आणि डिजिटल सहकार्य [इंडिया स्टॅक] या क्षेत्रातील सहा सामंजस्य करार [तपशील येथे पाहता येतील] अंतिम करण्यात आले. राज्य भेटीच्या निमित्ताने एक संयुक्त निवेदन [लिंक] स्वीकारण्यात आले.

राष्ट्रपती लूला यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या जेवणाचे आयोजन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रपती लूला यांच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले आणि त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.