आज सुरू केलेली विकासकामे आंध्र प्रदेशच्या पायाभूत सुविधा बळकट करतील आणि विकासाला गती देतील: पंतप्रधान
अमरावती ही अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती परस्परांसोबत वाटचाल करतात: पंतप्रधान
एनटीआर गारु यांनी विकसित आंध्र प्रदेशाचे स्वप्न पाहिले होते. एकत्रितपणे, आपल्याला अमरावती, आंध्र प्रदेशला विकसित भारताचे विकासाचे इंजिन बनवायचे आहे: पंतप्रधान
ज्या देशांमध्ये पायाभूत सुविधांचे वेगाने आधुनिकीकरण होत आहे, अशा देशांमध्ये आता भारताचा समावेश आहे: पंतप्रधान
विकसित भारताची उभारणी - गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्ती या चार स्तंभांवर होईल: पंतप्रधान
नागयालंका येथे उभारण्यात येणार असलेला नवदुर्गा चाचणी तळ देशाच्या संरक्षण शक्तीला माँ दुर्गेप्रमाणे बळकट करेल, त्यासाठी मी देशातील शास्त्रज्ञांचे आणि आंध्र प्रदेशातील जनतेचे अभिनंदन करतो: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. "अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.

एकेकाळी इंद्रलोकाच्या राजधानीला अमरावती म्हटले जात होते आणि आता अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी आहे, असे मोदी यांनी सांगितले. हा केवळ योगायोग नाही, तर 'स्वर्ण आंध्र' निर्माण करण्याचा एक सकारात्मक संकेत आहे, जो भारताच्या विकासाच्या मार्गाला अधिक मजबूत करेल, यावर त्यांनी भर दिला. अमरावती 'स्वर्ण आंध्र'च्या दृष्टीकोनाला ऊर्जा देईल, ज्यामुळे ते प्रगती आणि परिवर्तनाचे केंद्र बनेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. "अमरावती हे केवळ एक शहर नाही, ती एक शक्ती आहे, ती एक अशी ताकद आहे जी आंध्र प्रदेशला आधुनिक राज्यात आणि प्रगत राज्यात रूपांतरित करेल," असे मोदी तेलुगू भाषेत म्हणाले.

 

आंध्र प्रदेशातील तरुणांची स्वप्नपूर्ती करणारे शहर म्हणून अमरावतीकडे बघताना येत्या काळात अमरावती माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, स्वच्छ उद्योग, शिक्षण आणि आरोग्यसेवेत आघाडीचे शहर म्हणून उदयास येईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या क्षेत्रांमध्ये विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जलदगतीने विकसित करण्यात केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

मोठ्या प्रमाणावर भविष्यातील तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून तो जलदगतीने राबविण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या प्रगल्भतेचे मोदी यांनी कौतुक केले. 2015 मध्ये, त्यांना प्रजा राजधानीची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले होते याची आठवण सांगत, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अमरावतीच्या विकासासाठी व्यापक पाठिंबा दिला आहे, मूलभूत पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली आहेत यावर त्यांनी भर दिला. नायडू यांच्या नेतृत्वाखाली, नवीन राज्य सरकारने विकासाच्या प्रयत्नांना गती दिल्याचे त्यांनी नमूद केले. उच्च न्यायालय, विधानसभा, सचिवालय आणि राजभवन यासारख्या महत्त्वाच्या संस्थांना आता बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला.

"एनटीआर गारू यांनी विकसित आंध्र प्रदेशची कल्पना केली होती", असे पंतप्रधानांनी सांगितले. अमरावती आणि आंध्र प्रदेशला विकसित भारताचे विकास इंजिन बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन करत, एनटीआर गारू  यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या बांधिलकीचे त्यांनी समर्थन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेलुगूमध्ये सांगितले की ही आपली जबाबदारी आहे आणि आपण एकत्रितपणे हे साध्य केले पाहिजे.

 

गेल्या 10 वर्षांत भारताने भौतिक, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे यावर भर देताना, मोदी यांनी अधोरेखित केले की भारत आता जगातील सर्वात वेगाने आधुनिकीकरण करणाऱ्या पायाभूत सुविधांपैकी एक आहे आणि आंध्र प्रदेश या प्रगतीचा लक्षणीय फायदा घेत आहे. हजारो कोटी रुपयांच्या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची तरतूद आंध्र प्रदेशसाठी करण्यात आल्याने त्याचा जलद विकास होईल असे त्यांनी नमूद केले. "आंध्र प्रदेश कनेक्टिव्हिटीचे एक नवीन युग अनुभवत आहे, ज्यामुळे दोन जिल्ह्यांमधील दळणवळण  वाढेल आणि शेजारील राज्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल आणि सुधारित लॉजिस्टिक कार्यक्षमतेचा फायदा उद्योगांना होईल यावर त्यांनी भर दिला. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे यांना देखील चालना मिळून प्रमुख धार्मिक स्थळे अधिक सुलभ होतील याकडेही मोदींनी लक्ष वेधले. त्यांनी रेनिगुंटा-नैदुपेटा महामार्गाचे उदाहरण देत म्हटले की, यामुळे तिरुपती बालाजी मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि भाविकांना अल्पावधीत भगवान वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेता येईल.

वेगाने विकसित झालेल्या देशांनी त्यांच्या रेल्वे नेटवर्कला खूप महत्त्व दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या दशकात भारतीय रेल्वेसाठी परिवर्तनाचा काळ होता, भारत सरकारने आंध्र प्रदेशात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी दिल्याचे  त्यांनी अधोरेखित केले. 

पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की,  2009 ते 2014 दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी एकत्रित रेल्वे अर्थसंकल्प 900 कोटींपेक्षा कमी होता, तर आज एकट्या आंध्र प्रदेशचा रेल्वे अर्थसंकल्प 9,000 कोटींपेक्षा जास्त आहे म्हणजेच दहा पटीने जास्त आहे. “वाढवलेल्या रेल्वे अर्थसंकल्पासह आंध्र प्रदेशने 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य केले आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्यात आता आधुनिक वंदे भारत गाड्यांच्या आठ जोड्या धावतात. त्यासोबतच आंध्र प्रदेशातून जाणारी अमृत भारत गाडी देखील धावते . गेल्या 10 वर्षांत, राज्यात 750 हून अधिक रेल्वे उड्डाणपूल आणि भूमिगत मार्ग  बांधण्यात आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी सांगितले की अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशातील 70 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे, ज्यायोगे प्रवाशांसाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा सुनिश्चित केली जात आहे.

 

पायाभूत सुविधांच्या विकासाचा बहुआयामी परिणाम अधोरेखित करताना, त्याचा उत्पादन क्षेत्रावरील थेट परिणाम अधोरेखित करताना मोदी यांनी नमूद केले की, मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सिमेंट, पोलाद आणि वाहतूक सेवा यासारख्या कच्च्या मालाचा मोठा फायदा होतो, ज्यामुळे अनेक उद्योगांना बळकटी मिळते. पायाभूत सुविधांच्या विकासाचा थेट फायदा भारतातील तरुणांना होतो, ज्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की आंध्र प्रदेशातील हजारो तरुणांना या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे नवीन रोजगाराच्या संधी मिळत आहेत.

"विकसित भारताचा पाया चार प्रमुख स्तंभांवर उभा आहे - गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला सक्षमीकरण", या लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणातील विधानाचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्यांनी भर दिला की,  हे स्तंभ त्यांच्या सरकारच्या धोरणांमध्ये केंद्रस्थानी आहेत. सरकारकडून  शेतकऱ्यांच्या कल्याणाला विशेष प्राधान्य दिले जाते. शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत सरकारने गेल्या 10 वर्षांत, परवडणाऱ्या किमतीत खते पुरवण्यासाठी जवळजवळ 12 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांनी नमूद केले की, हजारो नवीन आणि प्रगत वाणाची  बियाणे  शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले  आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढली आहे. पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना ₹5,500 कोटींचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आंध्र प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 17,500 कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठी आर्थिक आधार मिळतो, असे ते म्हणाले.

 

भारत देशभरात सिंचन प्रकल्पांचा वेगाने विस्तार करत आहे, तसेच प्रत्येक शेतात पाणी पोहोचावे आणि शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नदीजोडणी उपक्रम सुरू करत आहे यावर भर देत नवीन राज्य सरकारच्या स्थापनेसह पोलावरम प्रकल्पाला नवीन गती मिळाली आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे. त्यांनी पोलावरम प्रकल्पाच्या त्वरित पूर्ततेसाठी राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचा  पुनरूच्चार  केला.

आंध्र प्रदेशाने गेल्या काही दशकांत भारताला अंतराळ शक्ती म्हणून स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की, श्रीहरीकोटावरून प्रक्षेपित होणारी प्रत्येक मोहीम लाखो भारतीयांना अभिमानास्पद असून तिच्यामुळे देशातील तरुणांना अंतराळ संशोधनासाठी प्रेरणा मिळते. त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठा विकास झाल्याचे जाहीर केले, ज्यामध्ये एक नवीन संरक्षण संस्था स्थापन झाली असून, डीआरडीओच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी केंद्राची पायाभरणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. नागायलंका येथील नवदुर्गा चाचणी केंद्र माँ दुर्गाच्या दैवी शक्तीपासून प्रेरणा घेऊन भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी शक्तिवर्धक ठरेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या ऐतिहासिक यशासाठी त्यांनी देशातील शास्त्रज्ञ आणि आंध्र प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.

“भारताची ताकद केवळ त्याच्या शस्त्रांमध्ये नाही, तर एकतेत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले, आणि ही एकतेची भावना एकता मॉल्सद्वारे आणखी बळकट होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशभरातील शहरांमध्ये एकता मॉल्स उभारले जात असून, विशाखापट्टणममध्येही लवकरच एकता मॉल उभा राहील, तिथे भारतभरातील कारागीर आणि हस्तकलाकारांचे उत्पादन एकाच छताखाली प्रदर्शित केले जाईल. हे मॉल भारताच्या समृद्ध विविधतेशी लोकांना जोडतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतील आणि “एक भारत, श्रेष्ठ भारत” या दृष्टिकोनाला बळकटी देतील, असे त्यांनी सांगितले.

 

यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दहावे वर्ष असून (21 जून), तो आंध्र प्रदेशात साजरा होईल आणि त्यात ते स्वतः सहभागी होतील असे पंतप्रधानांनी जाहीर केले. पुढील 50 दिवसांत योगासंबंधी अधिक उपक्रम राबवून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. आंध्र प्रदेशात स्वप्न पाहणाऱ्यांची आणि साधकांची कमतरता नाही, असे नमूद करत पंतप्रधानांनी राज्य योग्य मार्गावर आणि योग्य गतीने प्रगती करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. आंध्र प्रदेशच्या प्रगतीला गती देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असे आश्वासन देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे राज्यपाल  सय्यद अब्दुल नजीर, मुख्यमंत्री  एन. चंद्राबाबू नायडू, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था  सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या  वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशात 7  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या विविध भागांचे रुंदीकरण / उड्डाण पूल आणि भूमिगत मार्ग / भुयारी मार्ग बांधणे यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे रस्ते सुरक्षा आणखी वाढेल; रोजगाराच्या संधी निर्माण होतील; तिरुपती, श्रीकालहस्ती, मलाकोंडा आणि उदयगिरी किल्ला यासारख्या धार्मिक स्थाने  आणि पर्यटन स्थळांना अखंड संपर्क सुविधा  मिळेल. पंतप्रधानांनी संपर्क सुविधा  वाढवणे आणि क्षमता वाढवणे या उद्देशाने बनवलेले रेल्वे प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केले.

या प्रकल्पांमध्ये बुग्गनपल्ले सिमेंट नगर आणि पन्याम स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, रायलसीमा आणि अमरावती दरम्यान संपर्क व्यवस्था वाढवणे आणि न्यू वेस्ट ब्लॉक हट केबिन आणि विजयवाडा स्थानकांदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही केली.

 

या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या विविध भागांचे रुंदीकरण; उन्नत मार्ग, हाफ क्लोव्हर लीफ आणि रस्त्यावरील उड्डाण पूल  यांच्या  बांधकामाचा  समावेश आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क सुविधा, आंतरराज्य प्रवास, गर्दीचे नियोजन आणि एकूणच दळणवळण कार्यक्षमता सुधारेल. गुंटकल पश्चिम आणि मल्लप्पा गेट स्थानकांदरम्यान मालगाड्यांना बायपास करण्‍यासाइी ‘रेल्वे ओव्हर रेल’  बांधण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच यामुळे गुंटकल जंक्शनवरील गर्दी कमी होवू शकणार  आहे. पंतप्रधानांनी 11,240 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विधानसभा, उच्च न्यायालय, सचिवालय, इतर प्रशासकीय इमारती आणि 5,200 हून अधिक कुटुंबांसाठी गृहनिर्माण इमारतीं यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये 17,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भूमिगत आणि प्रगत पूर व्यवस्थापन प्रणालींसह 320  किमीचे जागतिक दर्जाचे वाहतूक नेटवर्क असलेल्या  पायाभूत सुविधा आणि पूर निवारण प्रकल्प देखील समाविष्ट असतील. ‘लँड पूलिंग स्कीम’ पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये राजधानी अमरावतीमधील मध्यवर्ती मार्ग, सायकल ट्रॅक आणि एकात्मिक उपयुक्तता असलेल्या 1,281 किमी रस्त्यांचा समावेश असेल, यासाठी अंदाजे  20,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च  येईल.

 

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील नागायलंका येथे सुमारे 1,460 कोटी रुपये किमतीच्या क्षेपणास्त्र चाचणी रेंज /क्षेत्राची पायाभरणी देखील केली. यामध्ये प्रक्षेपण केंद्र, तांत्रिक उपकरणे सुविधा, स्वदेशी रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणालींचा समावेश असेल ज्यामुळे देशाची संरक्षणविषयक तयारी बळकट होईल.

पंतप्रधानांनी विशाखापट्टणममधील मधुरावाडा येथे पीएम एकता मॉलची पायाभरणी देखील केली. राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे, मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देणे, एक जिल्हा एक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ग्रामीण कारागिरांना सक्षम करणे आणि स्वदेशी उत्पादनांची बाजारपेठेत उपस्थिती वाढवणे या उद्देशाने याची कल्पना करण्यात आली आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims

Media Coverage

Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address during launch of development works, nationwide campaign for HPV vaccination from Ajmer
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।