पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाच्या 10 वर्षांच्या यशस्वी वाटचाली बद्दल कौतुक केले आहे. एका दशकानंतर, आपण अशा प्रवासाचे साक्षीदार आहोत ज्याने असंख्य लोकांच्या जीवनांना स्पर्श केला असून सक्षमीकरणाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली, असे त्यांनी म्हटले आहे. भारताने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, आणि त्यामागे 140 कोटी भारतीयांची सामूहिक इच्छाशक्ती आहे. असे मोदी म्हणाले.
MyGovIndia ने एक्स या सामाजिक माध्यमावर लिहिलेली संदेशमालिका सामायिक करतांना पंतप्रधानांनी लिहिले की, :
आजचा दिवस ऐतिहासिक आहे कारण आपण #10YearsOfDigitalIndia हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे!
आपल्या देशाला डिजिटली सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत समाजात रूपांतरित करण्यासाठी एक उपक्रम म्हणून, दहा वर्षांपूर्वी, डिजिटल इंडियाची सुरुवात झाली. एक दशकानंतर, आपण अशा प्रवासाचे साक्षीदार आहोत ज्याने असंख्य जीवनांना स्पर्श करत सक्षमीकरणाच्या नवीन युगाची सुरुवात केली आहे. . 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पाने भारताने डिजिटल पेमेंटमध्ये मोठी प्रगती केली असून , आरोग्य आणि शिक्षण या सारख्या क्षेत्रांनाही या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे. हि संदेश मालिका परिवर्तनाची आणि त्याच्या व्याप्तीची झलक देते !"
Today is a historic day as we mark #10YearsOfDigitalIndia!
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2025
Ten years ago, Digital India began as an initiative to transform our nation into a digitally empowered and technologically advanced society.
A decade later, we stand witness to a journey that has touched countless… https://t.co/gbngf6HcEk


