Several projects in Delhi which were incomplete for many years were taken up by our government and finished before the scheduled time: PM
All MPs have taken care of both the products and the process in the productivity of Parliament and have attained a new height in this direction: PM
Parliament proceedings continued even during the pandemic: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्‌घाटन केले. या सदनिका  दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत. 76 सदनिका बांधण्यासाठी 80 वर्षाहून अधिक जुन्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, खासदारांसाठीच्या या बहुमजली सदनिकांमध्ये हरित इमारतीच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे.  या नवीन सदनिकांमुळे सर्व रहिवासी व खासदार सुरक्षित राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  त्यांनी सांगितले, खासदारांचे निवास स्थान हा दीर्घकालीन प्रश्न होता परंतु आता त्याचे निराकरण झाले आहे. ते म्हणाले की दशकांपासून प्रलंबित असलेल्या  जुन्या अडचणींना टाळून त्या सुटत नाहीत तर त्यांचे निराकरण शोधावे लागते. दिल्लीतील अशा  अनेक प्रकल्पांची त्यांनी यादी वाचली जे बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण होते ज्यांना या सरकारने हाती घेतले आणि नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण केले. ते म्हणाले, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची चर्चा सुरू झाली होती, 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या सरकारने हे स्मारक उभारले आहे. ते म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली केंद्रीय माहिती आयोगाची नवीन इमारत, इंडिया गेटजवळील युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारक या सरकारने उभारले आहे.

सर्व खासदारांनी संसदेच्या उत्पादन आणि प्रक्रिया या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे आणि या दिशेने एक नवीन उंची गाठली पाहिजे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांचे त्यांच्या कार्यक्षम कार्यपद्धतीसाठी कौतुक केले. नवीन नियम आणि अनेक सावधगिरीच्या उपायांसह, साथीच्या रोगाच्या काळातही संसदेचे कामकाज  सुरू राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहांनी संपूर्ण आठवडा काम केले.

ते म्हणाले की, युवकांसाठी 16-18 वर्ष हे वय  अत्यंत महत्वाचे आहे, आम्ही 2019 च्या निवडणुकीबरोबरच 16 व्या लोकसभेची मुदत पूर्ण केली आहे आणि देशाच्या प्रगती व विकासासाठी हा काळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्येच 17 व्या  लोकसभेचा कार्यकाळ सुरु झाला आहे  आणि या काळात या लोकसभेने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.  पुढची (18वी) लोकसभा देखील देशाला नव्या दशकात पुढे घेऊन जाण्यासाठी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x

Media Coverage

India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.