कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कोटा श्रीनिवास राव गारू यांची चित्रपटविषयक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते स्मरणात राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे. शानदार अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक सेवेतही ते आघाडीवर होते आणि गरीब तसेच वंचितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले, असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X प्रसार माध्यमावर वर पोस्ट केले की;
“श्री कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांची चित्रपटविषयक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते कायम स्मरणात राहतील. शानदार अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक सेवेतही ते आघाडीवर होते आणि गरीब तसेच दलितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. त्यांच्या कुटुंबियांचे आणि असंख्य चाहत्यांचे आपण सांत्वन करतो. ओम शांती.”
Anguished by the passing of Shri Kota Srinivas Rao Garu. He will be remembered for his cinematic brilliance and versatility. He enthralled audiences across generations with his riveting performances. He was also at the forefront of social service and worked towards empowering the…
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2025
శ్రీ కోట శ్రీనివాసరావు గారి మరణం బాధాకరం. ఆయన సినీ ప్రతిభ, బహుముఖ ప్రజ్ఞకు గుర్తుండిపోతారు. తరతరాలుగా ప్రేక్షకులను తన అద్భుతమైన ప్రదర్శనలతో ఆకట్టుకున్నారు. సామాజిక సేవలో కూడా ఆయన ముందంజలో ఉన్నారు మరియు పేదలు మరియు అణగారిన వర్గాలకు సాధికారత కల్పించడానికి కృషి చేశారు. ఆయన…
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2025


