पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारने राष्ट्रपतींचा अनादर केल्याची घटना आणि संथाल संस्कृतीप्रती सामान्य वागणूक यांचा जोरदार निषेध केला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, या घटना लज्जास्पद आणि आधी कधीच न घडलेल्या आहेत. लोकशाहीवर आणि आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाला या घटनेचे अत्यंत दुःख झाले आहे.
स्वतः आदिवासी समाजातील असलेल्या राष्ट्रपतींनी या घटनेविषयी व्यक्त केलेले दुःख व संताप देशातील नागरिकांच्या मनाला वेदना देणारे आहे.
मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून राष्ट्रपतींच्या या अवमानाला टीएमसी सरकार जबाबदार आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत पश्चिम बंगाल सरकार बेजबाबदारीने वागत आहे.
राष्ट्रपतींचे पद हे राजकारणापलिकडील आहे या मुद्द्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, या पदाचे पावित्र्य नेहमीच जपले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि टीएमसी पक्षाला सद्बुद्धी लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ माध्यमावर लिहीले आहे की,
“ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि यापूर्वी कधीही न घडलेली आहे. लोकशाही आणि आदिवासींच्या सक्षमीकरणावर विश्वास असणाऱा प्रत्येक जण या घटनेने व्यथित झाला आहे.
स्वतः आदिवासी समुदायातून पुढे आलेल्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलेले दुःख आणि संताप भारतातल्या लोकांसाठी वेदनादायी आहे.
पश्चिम बंगाल सरकारने खरोखरच सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राष्टट्रपतींच्या या अवमानाला त्यांचे प्रशासन जबाबदार आहे.
पश्चिम बंगाल सरकारचे संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या बाबीला इतकी सामान्य वागणूक देणेदेखील तितकेच दुर्दैवी आहे.
राष्ट्रपतीपद राजकारणापलिकडील आहे आणि या पदाचे पावित्र्य नेहमीच जपले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि टीएमसीला सद्बुद्धी लाभो अशी आपण करुया.”
This is shameful and unprecedented. Everyone who believes in democracy and the empowerment of tribal communities is disheartened.
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
The pain and anguish expressed by Rashtrapati Ji, who herself hails from a tribal community, has caused immense sadness in the minds of the people… https://t.co/XGzwMCMFrT
এটি লজ্জাজনক এবং অভুতপূর্ব। গণতন্ত্র এবং জনজাতি সম্প্রদায়ের ক্ষমতায়নে বিশ্বাসী মানুষজন সকলেই মর্মাহত।
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
জনজাতি সম্প্রদায় থেকেই উঠে আসা রাষ্ট্রপতি মহোদয়ার প্রকাশিত বেদনা ও উদ্বেগ ভারতের মানুষের মনে গভীর দুঃখের সঞ্চার করেছে।
পশ্চিমবঙ্গের তৃণমূল কংগ্রেস সরকার সত্যিই সমস্ত সীমা… https://t.co/XGzwMCMFrT
ᱱᱚᱣᱟ ᱫᱚ ᱟᱹᱰᱤ ᱞᱟᱡᱟᱣᱟᱱᱟᱜ ᱟᱨ ᱦᱟᱦᱟᱲᱟᱣᱟᱱᱟᱜ ᱠᱟᱛᱷᱟ ᱠᱟᱱᱟ| ᱞᱳᱠᱛᱚᱱᱛᱨᱚ ᱨᱮ ᱯᱟᱹᱛᱭᱟᱹᱣ ᱫᱚᱦᱚᱠᱚ ᱟᱨ ᱟᱹᱫᱤᱵᱟᱹᱥᱤ ᱠᱚᱣᱟᱜ ᱥᱚᱢᱟᱡᱽ ᱨᱮᱭᱟᱜ ᱠᱮᱱᱮᱴᱮᱡ ᱧᱮᱧᱮᱞ ᱦᱚᱲ ᱛᱮᱦᱮᱧ ᱠᱚ ᱦᱟᱭᱱᱤᱥᱟᱹᱥ… https://t.co/XGzwMCMFrT
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026


