आदरणीय महोदय, पंतप्रधान मित्सो-तकिस,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांमधील मित्रहो,

नमस्कार!

सर्वप्रथम, ग्रीसमध्ये जंगलातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो, आणि आगीत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

 

मित्रहो,

ग्रीस आणि भारताचा सहयोग, स्वाभाविक आहे.

जगातील दोन प्राचीन संस्कृतींमधील,

जगातील दोन सर्वात जुन्या लोकशाही विचारधारांमधील, आणि

जगातील प्राचीन व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांमधील सहयोग आहे.

 

मित्रहो,

आपल्या संबंधांचा पाया जितका प्राचीन तितकाच तो मजबूत आहे.

विज्ञान, कला आणि संस्कृती, अशा सर्व विषयांचे ज्ञान आपण एकमेकांकडून घेतले आहे.

आज, आपल्यात भू-राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उत्तम समन्वय आहे, - मग ते हिंद प्रशांत महासागर क्षेत्र असो, की भूमध्यसागरीय क्षेत्र.

दोन जुन्या मित्रांप्रमाणे आपल्याला एकमेकांच्या भावना समजतात आणि आपण त्याचा आदर करतो.

चाळीस वर्षांच्या दीर्घ काळानंतर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी ग्रीसला भेट दिली आहे. तरीही,  ना आपल्या नात्याची खोली कमी झाली, ना स्नेह कमी झाला. म्हणूनच, आज मी आणि ग्रीसच्या पंतप्रधानांनी भारत-ग्रीस भागीदारी ‘सामरिक’ पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

संरक्षण आणि सुरक्षा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवून आम्ही धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मित्रहो,

संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात, दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांसह संरक्षण उद्योगांना चालना देण्यावर आमच्यात सहमती झाली आहे. आज आम्ही दहशतवादविरोधी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावरही चर्चा केली.

आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवरही संवादासाठी एक संस्थात्मक व्यासपीठ असावे, असे आम्ही ठरवले.

पंतप्रधान आणि मी सहमत आहोत की आमचा द्विपक्षीय व्यापार झपाट्याने वाढत आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची अपार क्षमता आहे. त्यामुळे 2030 पर्यंत आमचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. आज, थोड्याच वेळात, पंतप्रधान एका व्यावसायिक बैठकीचे आयोजन करणार आहेत.

यामध्ये आम्ही दोन्ही देशांच्या व्यावसायिक प्रतिनिधींसोबत काही विशिष्ट क्षेत्रांवर चर्चा करणार आहोत.

आम्‍हाला विश्‍वास आहे की ,आपल्‍या देशांमध्‍ये व्‍यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्‍साहन देऊन आपण आपल्‍या औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याला एका नवीन पातळीवर नेऊ शकतो

आज कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी करार करण्यात आला.

या करारामुळे आपण  कृषी आणि बियाणे उत्पादन तसेच संशोधन, पशुसंवर्धन आणि पशुधन उत्पादन क्षेत्रात सहकार्य करू शकतो.

 

मित्रहो,

उभय  देशांमधील कुशल स्थलांतरण सुलभ करण्यासाठी, आम्ही  लवकरच स्थलांतर आणि वाहतूक सहकार्य  करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचा असा विश्वास आहे की, आमच्या  लोकांमधील प्राचीन परस्पर  संबंधांना नवीन आकार देण्यासाठी सहकार्य वाढवले पाहिजे

आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला चालना देऊ

 

मित्रहो,

आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही चर्चा केली.

भारत-ईयू  व्यापार आणि गुंतवणूक करारासाठी ग्रीसने आपला पाठिंबा व्यक्त केला.

युक्रेनच्या बाबतीत, दोन्ही देश मुत्सद्देगिरी आणि संवादाचे समर्थन करतात.

संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मी ग्रीसच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

भारताच्या  जी 20 च्या अध्यक्षपदासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

 

मित्रहो,

मला  आज "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर" ने सन्मानित    केल्याबद्दल मी हेलेनिक प्रजासत्ताकच्या  नागरिकांचे आणि राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो.

140 कोटी भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आणि कृतज्ञता व्यक्त केली.

भारत आणि ग्रीसची सामायिक मूल्ये आमच्या दीर्घ आणि विश्वासार्ह भागीदारीचा पाया आहेत.

लोकशाहीची मूल्ये आणि आदर्श प्रस्थापित करण्यात आणि यशस्वीपणे आचरणात आणण्यात दोन्ही देशांचे ऐतिहासिक योगदान आहे.

मला विश्वास आहे की ,भारतीय आणि ग्रीको-रोमन कलेचे सुंदर मिश्रण असलेल्या गांधार कला विद्यालयाप्रमाणे,  भारत आणि ग्रीस यांच्यातील मैत्री देखील काळाच्या दगडावर आपली अमिट छाप सोडेल.

ग्रीसच्या या सुंदर आणि ऐतिहासिक शहरात आज मला आणि माझ्या शिष्टमंडळाला मिळालेल्या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा पंतप्रधान आणि ग्रीसच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Modi era: From the resolve of a developed India to the renaissance of Devbhoomi

Media Coverage

Modi era: From the resolve of a developed India to the renaissance of Devbhoomi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.