Not only South Korean companies are strengthening our ‘Make in India’ mission but they are also generating employment opportunities: PM
Our focus is on enhancing the Special Strategic Partnership: PM Modi at Joint press meet with President Moon Jae-in of South Korea

माननीय अध्यक्ष मून,

येथे उपस्थितीत सर्व प्रतिनिधी,

प्रसार माध्यमातील मित्रांनो,

राष्ट्रपती मून यांच्या भारतातील पहिल्या राजकीय दौऱ्यादरम्यान त्यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

अंदाजे एका वर्षापूर्वी हॅमबर्ग येथे G-20 परिषदे दरम्यान राष्ट्रपती मून यांच्यासोबत पहिल्यांदा माझी भेट झाली होती. आणि यावेळी मी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. आज संपूर्ण विश्व कोरियन द्विकल्पात घडत असलेल्या घटनाक्रमाकडे खूप बारकाईने पाहत आहे. अशा परिस्थित त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून भारत दौऱ्यासाठी वेळ काढला आहे. आणि यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो.

मित्रांनो,

कदाचित खूप कमी लोकांना हे माहित असेल की, भारत आणि कोरिया मधील संबंध हे कौटुंबिक आहेत. शेकडो वर्षांपूर्वी अयोध्येची एक राजकुमारी, सुरी-रत्ना यांचा विवाह कोरियाच्या एका राजाशी झाला होता. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आजही कोरियामध्ये लाखो लोकं स्वतःला त्यांचे वंशज मानतात. आधुनिक काळांतही, भारत आणि कोरियाचे संबंध मजबूत होते. कोरियातील युद्धकाळात, भारताच्या पॅराशूट फील्ड एम्बुलेंस युनिटच्या कामाची प्रशंसा आजही केली जाते.

मित्रांनो,

कोरियाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती हे जगातील एक अद्वितीय उदाहरण आहे. कोरियाच्या सामान्य जनतेने हे दाखवून दिले आहे की, जर कोणता देश समान दृष्टी आणि उद्देशाप्रती वचनबद्ध झाला तर अशक्य लक्ष्य देखील सहज साध्य करू शकतो.

कोरियाची ही प्रगती भारतासाठी देखील प्रेरणादायी आहे. आणि ही खूप आनंदाची बाब आहे की कोरियातील कंपन्यांनी भारतामध्ये केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकच केली नाही, तर आमच्या “मेक इन इंडिया” अभियानात सहभागी होऊन भारतामध्ये रोजगाराच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. कोरियन कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवल्यामुळे, कोरियन उत्पादनांनी भारताच्या घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे.

मित्रांनो,

आजच्या आमच्या चर्चेत आम्ही केवळ आमच्या द्विपक्षीय संबंधांचाच आढावा घेतला नाही तर क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर देखील आमच्या विचारांचे आदान प्रदान केले.मला असे वाटते की, धोरणात्मक स्तरावर भारताची अॅक्ट इस्ट पॉलिसी आणि कोरियाची न्यू सदर्न स्ट्रॅटेजीमध्ये एकसमानता आहे. राष्ट्रपती मून यांच्या, भारत आणि कोरियाच्या संबंधांमध्ये त्यांची न्यू सदर्न स्ट्रॅटेजी ही एक आधारस्तंभ आहे या विचाराचे मी हार्दिक स्वागत करतो.

आमच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक दृष्टी परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. आमच्या विशेष धोरणात्मक भागीदारीला अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे. या संबंधांचा एक स्तंभ आमचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. आज थोड्यावेळाने आम्ही दोन्ही देशांच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ. आपले व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या सूचना मिळतील अशी आशा मला वाटते.

मला आनंद आहे की, आमच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला अद्ययावत करण्याच्या दिशेने आम्ही आज अर्ली हार्वेस्ट पॅकेजच्या स्वरुपात ठोस पाऊल उचलले आहे. भविष्यातील आमचे संबंध आणि जगात तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे जलद बदल यांना लक्षात घेत आम्ही एकत्रितपणे नवोन्मेश सहकार्य केंद्र आणि भविष्य धोरण गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

कोरियन द्विकल्पामध्ये शांती प्रक्रियेला गती देणे, ती कायम ठेवणे याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रपती मून यांना जाते. मला असे वाटते की, जी सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे ती राष्ट्रपती मून यांच्या अथक प्रयत्नांचेच फलित आहे. या प्रगतीसाठी मी राष्ट्रपती मून यांचे अभिनंदन करतो. आजच्या आमच्या चर्चेत मी त्यांना सांगितले की, पूर्वोत्तर आणि दक्षिण आशियाचे वाढते संबंध हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आणि म्हणूनच या शांती प्रक्रियेच्या यशात भारत देखील एक लाभधारक आहे.

तणाव कमी करण्यासाठी जेवढी मदत शक्य आहे तेवढी आम्ही नक्कीच करू. सचिव स्तरावरील चर्चा आणि मंत्रीस्तरीय संयुक्त आयोगाच्या आगामी भेटी या संदर्भात खूप महत्वपूर्ण ठरतील.

मित्रांनो,

मी पुन्हा एकदा राष्ट्रपती मून, त्यांची धर्मपत्नी आणि प्रतिनिधी मंडळांचे भारताचे हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या सर्व शांती प्रयत्नांना भविष्यात यश प्राप्त होवो यासाठी मी माझ्यातर्फे आणि सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे त्यांना अनेक शुभेच्छा देतो.

दासी-मान्नायो. (पुन्हा भेटूया)

गोम्प-सुमनिदा. (धन्यवाद)

आपण पुन्हा भेटूया.

खूप खूप धन्यवाद .

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation

Media Coverage

India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister reaffirms commitment to building next-generation infrastructure for Viksit Bharat
June 16, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has said that the last decade has witnessed record infrastructure upgrading. He has reiterated the Government’s commitment to building next-generation infrastructure for the people of the nation to realise the vision of a Viksit Bharat.

In a post on X, the Prime Minister said:

“The last decade has witnessed record infrastructure upgrading. We are committed to building next-generation infrastructure for the people of our nation to realise our vision of a Viksit Bharat.

#12YearsOfNayaBharatNirman”