Ujjwala Yojana has positively impacted the lives of several people across India: PM
Ujjwala Yojana has strengthened the lives of the poor, marginalised, Dalits, Tribal communities.
This initiative is playing a central role in social empowerment: PM Ujjwala Yojana is leading to better health for India's Nari Shakti: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील उज्ज्वला लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

या संवादासाठी देशभरातल्या 600 हून अधिक केंद्रांवर प्रत्येकी 3 उज्ज्वला लाभार्थी उपस्थित होत्या.

नरेंद्र मोदी ॲप, विविध दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्या आणि सोशल मिडिया मंच तसेच इतर माध्यमातून सुमारे 10 लाख लोकांनी हा संवाद अनुभवला.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेता आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. उज्ज्वला योजना प्रगतीचे चिन्ह ठरत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यापुढे मोठे सामाजिक परिवर्तन घडत असून देशाचा सर्वंकष विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

उज्ज्वला योजनेअंतर्गत, ग्रामीण भागातल्या सुमारे 4 कोटी महिलांना आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मिळाली आहे. 2014 पासून 4 वर्षात 10 कोटी नव्या एलपीजी जोडण्या जारी करण्यात आल्या आहेत. 1955 ते 2014 या 6 दशकांच्या कालावधीत या जोडण्या 13 कोटी होत्या.

मुन्शी प्रेमचंद यांनी 1933 मध्ये लिहिलेल्या कथेचा उल्लेख करून बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उज्ज्वला योजनेमुळे अधिक चांगले आारेग्य, विषारी धुरापासून सुटका आणि स्वच्छ ऊर्जेमुळे अनेक फायदे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्वयंपाक करण्याचा वेळ कमी झाल्याने महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या योजनेत कोणताही दलालाचा सहभाग नसावा याकडे केंद्र सरकार लक्ष देत असून लाभार्थ्यांची निवड पारदर्शक प्रक्रियेतून केली जाते, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

देशातल्या 69 टक्के खेड्यांमध्ये आता 100 टक्के एलपीजी जोडण्या देण्यात आल्या असून 81 टक्के खेड्यात 75 टक्क्यांहून अधिक जोडण्या देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

एलपीजी जोडणीमुळे स्वयंपाक करायच्या वेळेत कशी बचत झाली आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवनमानाचा दर्जा कसा उंचावला हे लाभार्थ्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Budget 2026: Govt to roll out Semiconductor Mission 2.0 with ₹40,000 cr

Media Coverage

Budget 2026: Govt to roll out Semiconductor Mission 2.0 with ₹40,000 cr
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Haryana meets Prime Minister
February 02, 2026

Chief Minister of Haryana, Shri Nayab Saini met the Prime Minister, Shri Narendra Modi, at New Delhi, today.

The Prime Minister posted on X:

"Chief Minister of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister @narendramodi."

@cmohry