Emerging fields, including AI, Machine Learning, IoT, Blockchain and Big Data can take India to new heights of development and improve the quality of life of its citizens: PM
Industry 4.0 has the strength to drive irreversible positive change in India: PM Modi
Fourth Industrial revolution will help bring the required speed and scale to work being done in India: PM Modi
From ‘local solution’ to ‘global application’…We are moving ahead on this path: PM Modi
India’s contribution towards the fourth industrial revolution would leave the world stunned: PM Narendra Modi
#DigitalIndia has brought data to the villages; India has the highest mobile data consumption in the world and is also the country where data is available at the lowest price: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भूतकाळ बदलण्याची क्षमता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहे, असे ते म्हणाले. सॅनफ्रान्सिस्को, टोकियो आणि बिजिंग नंतर जगातले हे चौथे केंद्र असून यामुळे भविष्यातील अफाट संधींसाठी दारे खुली होती, असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रांचा अभ्यास, इंटरनेट, ब्लॉकचेन आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत विकासाची नवी शिखरे पार करेल आणि येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतासाठी हे केवळ औद्योगिक परिवर्तन नव्हे तर सामाजिक परिवर्तन आहे, असे ते म्हणाले. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे, असे सांगत देशात होत असलेल्या कामाला यामुळे गती मिळेल तसेच व्याप्ती वाढेल असे ते म्हणाले.

डिजिटल भारत चळवळीमुळे देशातल्या गावांपर्यंत इंटरनेट सेवा, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या सुविधा कशा प्रकारे पोहोचल्या याचा उल्लेख त्यांनी केला. भारतातील सामायिक सेवा केंद्रात वेगाने होत असलेल्या वाढीबद्दल त्यांनी माहिती दिली. जगात भारतामध्ये मोबाईल डेटाचा सर्वाधिक वापर होतो आणि भारतात कमी दरात ही सेवा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि आधार, यूपीआय, ई-नाम आणि जीईएम यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धीमत्तेतील संशोधनासाठी काही महिन्यांपूर्वी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राष्ट्रीय रणनिती ठरवण्यात आली होती. या नवीन केंद्रांमुळे या प्रक्रिया बळ मिळेल, असे ते म्हणाले. चौथी औद्योगिक क्रांती आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा विस्तार यामुळे उत्तम आरोग्य सेवा कमी खर्चात उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनाही मदत मिळेल आणि कृषी क्षेत्रासाठी ती सहाय्यभूत ठरेल, असे ते म्हणाले. परिवहन आणि स्मार्ट मोबीलिटी यांसह अन्य क्षेत्र ज्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाऊ शकते, त्याचा त्यांनी उल्लेख केला. भारतात जेव्हा या क्षेत्रांमध्ये काम सुरू होईल तेव्हा ‘सॉल्व्ह फॉर इंडिया, सॉल्व्ह फॉर द वर्ल्ड’ हे एक उद्दिष्ट असेल.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ भारत उठवू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. यामध्ये भारत भरीव योगदान देईल, असे ते म्हणाले. कौशल्य भारत अभियान, स्टार्टअप भारत आणि अटल नवोन्मेष अभियान यांसह सरकारी उपक्रम आपल्या युवकांना नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज करत आहेत, असे ते म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
2025 turns into a 'goldilocks year' for India’s economy: Govt

Media Coverage

2025 turns into a 'goldilocks year' for India’s economy: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the loss of lives due to a mishap in Bhandup, Mumbai
December 30, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives due to a mishap in Bhandup, Mumbai.

The PMO India handle in post on X said:

“Saddened by the loss of lives due to a mishap in Bhandup, Mumbai. Condolences to those who have lost their loved ones. May those injured recover at the earliest: PM @narendramodi”

"मुंबईतील भांडुप येथे अपघातात झालेल्या जीवितहानीने अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधार व्हावा, अशी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi"