Relationship between India and the Kyrgyz Republic is filled with goodwill from centuries of shared historical links: PM
We regard Kyrgyz Republic as a valuable partner in making Central Asia a region of sustainable peace, stability and prosperity: PM
We will work to strengthen bilateral trade & economic linkages, facilitate greater people-to-people exchanges: PM to Kyrgyz President
We shall give special emphasis to youth exchanges in our technical and economic cooperation programme with Kyrgyz Republic: PM

महामहिम अल्माझबेक अत्माबेव

किरगिझ प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष,

सभ्य स्त्री आणि पुरूषहो,

प्रसारमाध्यम प्रतिनिधी,

राष्ट्राध्यक्ष अल्माझबेक अत्माबेव यांच्या पहिल्या भारत भेटीत मी त्यांचे स्वागत करतो. महोदय, मागील वर्षी जुलै महिन्यात किरगिझप्रजासत्ताक भेटीदरम्यान आपण केलेले स्वागत आणि आदरातिथ्याच्या आठवणी अजून माझ्या मनात ताज्या आहेत. आपल्या या भेटीमुळे आपले सहकार्य आणि उच्चस्तरीय संबंधांना निश्चितच वेग प्राप्त होईल. भारत आणि किरगिझ प्रजासत्ताक यांच्यातील नातेसंबंध हे सद्‌भावनेच्या समांतर ऐतिहासिक दुव्यांवर आधारलेले आहेत. किरगिझ प्रजासत्ताकासह मध्य आशियाशी आमच्या समाजाचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. लोकशाहीची मूल्ये आणि परंपरांवरील विश्वासाचा समान दुवाही आम्हाला जोडणारा आहे. किरगिझ प्रजासत्ताकमध्ये लोकशाहीची मजबूत पायाभरणी आणि उभारणी करण्यासह पोषक वातावरण करण्याचे बरेचसे श्रेयही राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांना जाते.

मित्रांनो,

राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि मी, आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत सर्वसमावेशक चर्चा केली. द्विपक्षीय संबंध बहुआयामी आणि सखोल करण्याच्या आमच्या समान प्राथमिकतेवर आम्ही लक्ष केंद्रीत केले. दहशतवाद, अतिरेक आणि मूलतत्ववाद या समान आव्हानांपासून युवक आणि समाजाला सुरक्षित राखण्यासाठी करावयाच्या एकत्रीत प्रयत्नांबाबतही आम्ही चर्चा केली. आमच्या समान हितासाठी ही आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करण्याच्या दृष्टीने समन्वय राखत काम करण्याबाबतही आमच्यात सहमती झाली. मध्यवर्ती आशियाला शाश्वत शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचे क्षेत्र बनविण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आम्ही किरगिझ प्रजासत्ताकला आमचा मूल्यवान भागिदार मानतो. या मुद्द्यांसदर्भात काम करताना शांघाय संघटनासुद्धा आम्हाला मूल्यवान आराखडा प्रदान करेल.

मित्रांनो,

संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचाही राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि मी आढावा घेतला. किरगिझ-भारताचे पर्वतीय जैव वैद्यकीय संशोधन केंद्र हे यशस्वी सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. तो आम्हाला अपेक्षित असणारा फलदायक उपक्रम ठरला आहे. किरगिझ प्रजासत्ताक येथे आम्ही किरगिझ-भारत संयुक्त लष्करी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीच्या आमच्या संयुक्त लष्करी कवायती, हा आता वार्षिक उपक्रम झाला आहे. यापुढील कवायती पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किरगिझ प्रजासत्ताक येथे आयोजित केल्या जाणार आहेत.

मित्रांनो,

आमच्या अर्थव्यवस्था अधिक सखोलपणे परस्परांशी जोडण्याबाबत राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि माझ्यात सहमती झाली. यापुढे आम्ही द्विपक्षिय व्यापार आणि आर्थिक दुवे अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेमधील आदान-प्रदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू. आरोग्य, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, खाणकाम आणि उर्जा क्षेत्रातील नव्या संधी शोधण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आम्ही दोन्ही देशांमधील उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन देऊ. क्षमता उभारणी आणि प्रशिक्षणासह आमचे विकासविषयक सहकार्य वृद्धींगत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. जनता ही अशा उपक्रमांच्या केंद्रस्थानी असते. किरगिझ प्रजासत्ताकासह तांत्रिक आणि सहकार्य कार्यक्रमात आम्ही युवकांच्या आदान-प्रदानावर विशेष भर दिला पाहिजे. या दिशेने काम पुढे नेण्याच्या दृष्टीने आमची आजची चर्चा सहायक ठरेल. मध्यवर्ती आशिया क्षेत्रात प्रथमच गेल्या वर्षीं आम्ही किरगिझ प्रजासत्ताकासह टेली-मेडिसीन (दूरस्थ-वैद्यकीय) दुव्यांसाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पाचा किरगिझ प्रजासत्ताकाच्या इतर भागांमध्ये विस्तार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

मित्रांनो,

मार्च 2017 मध्ये भारत आणि किरगिझ प्रजासत्ताक हे दोन्ही देश धोरणात्मक संबंध स्थापनेची 25 वर्षे पूर्ण करतील. हा महत्वपूर्ण टप्पा गाठताना, राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांच्या या भारतभेटीमुळे आमची भागिदारी सखोल करण्याच्या प्रक्रियेला आणि आमच्या प्रयत्नांना गती मिळेल. आमच्या सहकार्यातून प्राप्त झालेल्या लाभाचे समावेशन करीत आगामी काळात आमच्यातील बंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनेही ही भेट उपयुक्त ठरेल. राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांची ही भारतभेट संस्मरणीय आणि उत्पादक ठरावी, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

धन्यवाद,

खूप खूप धन्यवाद !!!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
First multilingual Indian speech recognition model trained on 65 languages and dialects released

Media Coverage

First multilingual Indian speech recognition model trained on 65 languages and dialects released
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीचा फटका बसलेल्यांच्या धैर्याचे स्मरण केले
August 14, 2026
पंतप्रधानांनी कठोर परिश्रम आणि मानवी प्रयत्नांची ताकद अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीने प्रभावित झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, तो इतिहासातील असा एक क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, त्याने कुटुंबे विस्थापित झाली, आप्तेष्ट गमावले गेले आणि अतोनात दुःख सोसावे लागले.

त्याचवेळी या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याचे स्मरण करून देतो, असे त्यांनी नमूद केले. देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आणि 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्याचा आपला संकल्प या दिवसामुळे अधिक दृढ होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

त्या भयावह काळातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व देशवासियांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी नमूद केले की, आपल्या धैर्याच्या आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी हे दाखवून दिले की प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात. पंतप्रधानांनी सर्वांना सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना आणखी बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमुळेच विविध कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, कारागिरी आणि नवोन्मेष बहरतो, आणि यशाचा मार्ग मोकळा होतो, यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे. ते म्हणाले की, यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या मालिकेत लिहिले आहे:

"आज आपण #PartitionHorrorsRemembranceDay पाळत आहोत. आजच्या दिवशी फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो एक असा क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे विस्थापित झाली, आप्तस्वकीयांना गमवावे लागले आणि अतोनात दुःख सहन करावे लागले.

त्याचवेळी, या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांचा जीवनप्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.

हा दिवस आपल्या देशातील सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो, आणि सर्वांना एकत्र येऊन 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देवो.”

"फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, मी त्या भीषण कालखंडातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो. प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात हे त्यांनी आपल्या धैर्याने आणि सामर्थ्याने दाखवून दिले. चला, सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना अधिक दृढ करूया.

उद्यमस्य प्रसादेन दृश्यन्ते विविधाः कलाः।
कातरा एव जल्पन्ति यद् भाव्यं तद् भविष्यति॥”

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमधूनच कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, हस्तकला आणि नावोन्मेष यांची भरभराट होते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून, नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि अथक प्रयत्नांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.