भारत टेक्स हा जगभरातील धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्वे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला आहे : पंतप्रधान
भारत टेक्स या उपक्रमाअंतर्गत भारताच्या पारंपारिक वस्त्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडते : पंतप्रधान
गेल्या वर्षात भारताची कापड आणि तयार पोषाखांची निर्यात 7% ने वाढली, आणि आज भारत कापड आणि तयार पोषाखांचा जगातील सहाव्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला आहे : पंतप्रधान
जेव्हा कुशल मनुष्यबळ उपलब्ध असते तेव्हाच कोणतेही क्षेत्र उत्कृष्ट कामगिरी करते आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात कायमच कौशल्य हा महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे : पंतप्रधान
तंत्रज्ञानाच्या युगात हातमाग कारिगिरीची असल्लता जपणे महत्वाचे : पंतप्रधान
पर्यावरण आणि सक्षमीकरणासाठी फॅशन हा दृष्टीकोन जग स्विकारू लागले आहे, आणि भारतात या धारणेचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे : पंतप्रधान
भारताकडे वस्त्र पुनर्वापर आणि मूल्यवर्धित पुनर्निर्मिती करण्याचे पारंपरिक कौशल्य आहे. या कौशल्यांचा उपयोग करून भारत वेगाने बदलणाऱ्या फॅशनमुळे निर्माण होणाऱ्या टाकाऊ वस्त्रांचे नव्या संधींमध्ये रूपांतर करू शकतो- पंतप्रधान

मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री. गिरीराज सिंह, पबित्रा मार्गारिटा महोदया, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनयिक, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, फॅशन आणि वस्त्र उद्योगातील सर्व दिग्गज, व्यावसायिक, विद्यार्थी- विद्यार्थिनीं, विणकर आणि कारागीर सहकारी तसेच स्त्री आणि पुरूषहो.

आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

भारत टेक्स मध्ये आज 120 हून अधिक देश सहभागी होत आहेत, गिरीराज यांनी सांगितल्यानुसार, 126 देश म्हणजेच, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 120 देशांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यांना आपला व्यवसाय स्थानिक ते जागतिक करण्याची संधी मिळणार आहे. नव्या बाजारपेठेच्या शोधात असलेल्या व्यावसायिकांना, विविध देशांच्या सांस्कृतिक गरजांची माहिती इथे मिळते आहे. काही वेळापुर्वी मी प्रदर्शनात लागलेले स्टॉल्स पाहात होते, सगळे नाही पाहू शकलो, सगळे पाहिले असते तर कदाचित मला दोन दिवस लागतील, एवढा वेळ तर मला तुम्ही देऊ शकणार नाही. पण, जितका वेळ काढू शकलो, त्या दरम्यान मी या स्टॉल्सच्या अनेक प्रतिनिंधींशी खूप बोललो, गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक सहकारी सांगत होते की, गेल्या वर्षी भारत टेक्सबरोबर राहिल्याने, त्यांना अनेक मोठ्या स्तरावरचे नवीन खरेदीदार मिळाले, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला आणि मी पाहात असताना एक मोठी सुखद तक्रार माझ्यापुढे आली, ते म्हणाले की, साहेब एवढी मागणी आहे की आम्ही तिथे पोहोचू शकत नाही. आणि काही सहकारी मला म्हणाले की, एक कारखाना उभारायचा तर आम्हाला सरासरी 70-75 कोटी रुपये खर्च येतो आणि 2000 लोकांना रोजगार देतो. सर्वप्रथम बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना मी सांगेन की, या सर्वांची मागणी काय आहे, प्राधान्य समजून घ्या आणि ते द्या.

 

मित्रांनो,

या आयोजनामुळे कपडा क्षेत्रात गुंतवणूक, निर्यात आणि सर्वांगिण विकासाला जबदस्त प्रोत्साहन मिळते आहे.

मित्रांनो,

भारत टेक्सच्या आयोजनात, आपल्या पेहरावातून भारताच्या सांस्कृतिक विविधतचे दर्शन घडते. पूर्व- पश्चिम, उत्तर – दक्षिण आमच्या इथे कितीतरी प्रकारचे पारंपरिक पेहराव आहेत, एक पेहरावाचे कितीतरी प्रकार आहेत. लखनौ चिकन, राजस्थान आणि गुजरातची बांधणी, गुजरातचे पटोला आणि माझ्या काशीचे बनारसी सिल्क, दक्षिणेतील कांजीवरम सिल्क, जम्मू काश्मिरचे पश्मिना, हीच योग्य वेळ आहे की अशा आयोजनांच्या माध्यमातून आपली विविधता आणि वैशिष्ट्ये वस्त्र उद्योगाच्या विस्ताराचे माध्यम ठरावे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी मी, वस्त्रोद्योगात, शेती, धागे, कापड, फॅशन आणि परदेश या पाच ‘F’ घटकांविषयी बोललो होतोय शेती, धागे, कापड, फॅशन आणि परदेश हा दृष्टीकोन आता भारतासाठी एक मोहिमेचे स्वरुप घेते हे. ही मोहीम शेतकरी, विणकर, डिझायनर आणि व्यावसायिक प्रत्येकासाठी विकासाचे नवे मार्ग खुले करत आहे. गेल्या वर्षी भारताच्या कापड आणि वस्त्र निर्यातीमध्ये 7 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. आता या 7 टक्क्यांसाठी टाळ्या वाजवाल तर माझे काय काय होईल, पुढच्या वेळी ती 17 टक्के असेल तेव्हा पुन्हा टाळ्या वाजवूया. आज आपण जगातले सहावे सर्वात मोठे कापड आणि वस्त्र निर्यातदार आहोत. आपल्या कापडाची निर्यात 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. आता आमचे लक्ष्य आहे 2030 पर्यंत ती 9 लाख कोटी रुपयांपर्यंत न्यायची आहे. मी भले 2030 ची गोष्ट करतोय, पण मला आजची परिस्थिती पाहून वाटते की, कदाचित तुम्ही माझा आकडा चुकीचा सिद्ध कराल आणि 2030 पुर्वीच हे काम पूर्ण होईल.

 

मित्रांनो,

या यशाच्या पाठीमागे, गेल्या दशकभरातल्या मेहनत आहे, एक दशकभरातली सातत्यपूर्ण धोरण आहे. त्यामुळेच, गेल्या दशकामध्ये आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. आणि माझ्या काही साथीदारांनी मला सांगत होते की, अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, मी त्यांना म्हटलं, की तुम्ही आमचे सर्वात मोठे प्रतिनिधी आहात, तुम्ही जेव्हा सांगाल तर कोणीही ती गोष्ट मान्य करेल. सरकार सांगेल तर चौकशी करायला लागतील, हे बरोबर आहे, हे चुकीचे आहे, ते ठीक आहे, ते नाही. पण जेव्हा त्याच क्षेत्रातला व्यावसायिक सांगतो तेव्हा, हीच संधी आहे, चला जाऊया, हे मान्य करतात.

मित्रांनो,

वस्त्रोद्योग हा देशात सर्वात जास्त रोजगाराच्या संधी देणाऱ्या उद्योगांमधील सर्वात महत्वाचा उद्योग आहे, ही गोष्टी आपणा सर्वांना माहित आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्रात या हे क्षेत्र 11 टक्क्यांचे योगदान देते आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात आपण पाहिले असेल की, आम्ही उत्पादन मोहिमेवर भर दिला आहे, त्यात तुमचाही समावेश आहे. त्यासाठी जेव्हा या क्षेत्रात गुंतवणूक येते आहे, विकास होतो आहे, तेव्हा त्याचा फायदा कोट्यवधी वस्त्रोद्योग कामगारांना होतो आहे.

मित्रांनो,

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या समस्यांचे निराकरण आणि संधीची निर्मिती हा आमचा संकल्प आहे. त्यासाठी आम्ही दूरदृष्टीपूर्ण आणि दीर्घकालीन संकल्पनांवर काम करतो आहोत. या आमच्या प्रयत्नांची झलक यावेळच्या अर्थसंकल्पातही दिसून आली. आमच्या देशात विश्वासार्ह कापसाचा पुरवठा होण्यासाठी, भारतीय कापूस जागतिक स्पर्धात्मक होण्यसाठी आणि आपली मूल्य साखळी मजबूत होण्यासाठी, उद्योगांच्या अशा सर्व गरजां लक्षात घेऊन आम्ही कापूस उत्पादनासाठी अभियानाची घोषणा केली. आमचे लक्ष तांत्रिक वस्त्रोद्योगासारख्या उदयोन्मुख क्षेत्रावरही आहे. आणि मला आठवतंय की, मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मला सेवेची संधी मिळाली होती तेव्हा आपल्या वस्त्रोद्योगाशी निगडीत लोकांशी माझी भेटीगाठी व्हायच्या त्यावेळी मी त्यांच्याशी तांत्रिक वस्त्रांबाबत बोलत असेल तेव्हा ते तुम्हाला काय हवे आहे असे विचारत, आज भारत यामध्ये आपली ओळख निर्माण करतो आहे याचा मला आनंद वाटतो. आपण स्वदेशी कार्बन धागे आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देतो आहे. भारत उच्च-श्रेणी कार्बन धागे निर्मितीच्या दिशेने प्रगती करत आहे. या प्रयत्नांबरोबरच, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज आहे, ते आम्ही घेत आहोत. जसे की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वर्गीकरण निकषांमध्ये बदल करून त्याचा विस्तार केला गेला आहे. त्याचबरोबर पत उपलब्धतेत वृद्धी करण्यात आली आहे. आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्रात, ८० टक्के योगदान आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे, त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

 

मित्रांनो,

कोणतेही क्षेत्र वरचढ किंवा खूप चांगले तेव्हाच होते जेव्हा त्यासाठी कौशल्यपूर्ण कर्मचारी उपलब्ध असतात. वस्त्रोद्योगामध्ये सर्वात मोठी भूमिका कौशल्याची किंवा कसबाची असते. म्हणूनच, आम्ही वस्त्रोद्योगासाठी कौशल्य क्षमता क्षेत्र निर्माणासाठीही कार्यरत आहोत. आमच्या राष्ट्रीय कौशल्य उत्कृष्टता केंद्रे या दिशेने मोठी भूमिका बजावत आहेत. मूल्य साखळीसाठी जी कौशल्ये आत्मसात करण्यासाठीही आम्हाला समर्थ योजनेची मदत मिळते आहे. आणि आज समर्थ मधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक बहिणींशी मी बोलत होतो आणि त्यांनी मागील 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षात जी प्रगती केली आहे ते ऐकून माझे मन अभिमानाने भरून आले. तंत्रज्ञानाच्या या युगात हातमागाच्या अस्सलतेला आणि हाताच्या कौशल्यालाही तितकेच महत्त्व मिळावे हा देखील आमचा प्रयत्न आहे. हातमाग कारागिरांचे कौशल्य जागतिक बाजारपेठेत पोहोचावे , त्यांच्या क्षमता वाढाव्यात आणि त्यांना नवीन संधी मिळाव्यात , या दिशेने देखील आम्ही काम करत आहोत. गेल्या 10 वर्षांमध्ये हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी 2400 हून अधिक प्रमुख विपणन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हातमाग उत्पादनांच्या ऑनलाइन विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी, इंडिया-हॅन्ड-मेड नावाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे. यावर हजारो हातमाग ब्रँडची नोंदणी देखील झाली आहे. हातमाग उत्पादनांचे जीआय टॅगिंग याचाही या ब्रॅण्ड्सना मोठा फायदा होत आहे.

मित्रहो,

गेल्या वर्षी भारत टेक्सच्या आयोजनादरम्यान ‘टेक्सटाइल्स स्टार्टअप ग्रँड चॅलेंज’ सुरू करण्यात आले होते. त्यात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अभिनव शाश्वत उपाय युवकांकडून मागवण्यात आले होते. या चॅलेंजमध्ये देशभरातील युवकांनी उत्साहाने भाग घेतला. या चॅलेंजमधील विजेत्या युवकांनाही येथे आमंत्रित करण्यात आले आहे. ते देखील इथे आपल्यातच बसले आहेत. आज अशा स्टार्ट अप्सनाही येथे आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यांना या युवकांना पुढे जाण्याची संधी द्यावीशी वाटेल. या नवोन्मेषी कल्पनांच्या व्यासपीठाला आयआयटी मद्रास, अटल इनोव्हेशन मिशन आणि अनेक मोठ्या खासगी वस्त्रोद्योग संस्थांचा देखील पाठिंबा मिळत आहे. यामुळे देशात स्टार्ट अप संस्कृतीला चालना मिळेल.

 

आपल्या युवकांनी नवीन टेक्नो-टेक्सटाईल स्टार्ट अप्स सुरु करावे, नव्या कल्पनांवर काम करावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या उद्योगासाठीही एक सूचना आहे. आपला वस्त्रोद्योग देखील आयआयटी सारख्या संस्थांबरोबर नवीन साधने विकसित करण्यासाठी सहकार्य करू शकतो. आजकाल आपण सोशल मीडिया आणि ट्रेंडमध्ये पाहत आहोत, नवीन पिढी आता आधुनिकतेसोबतच पारंपरिक कपड्यांनाही पसंती देत आहे. म्हणूनच आज परंपरा आणि नवोन्मेष यांच्या एकत्रीकरणाचे महत्त्वही लक्षणीयरित्या वाढले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील नवीन पिढीला आकर्षित करतील अशा पारंपरिक पोशाखाने प्रेरित उत्पादने आपण बाजारात आणली पाहिजेत. आणखी एक महत्त्वाचा विषय तंत्रज्ञानाची वाढती भूमिका हा देखील आहे. आता नवीन ट्रेंड शोधण्यात आणि नवीन स्टाईल निर्माण करण्यात एआय सारख्या तंत्रज्ञानाची भूमिका सातत्याने वाढत आहे. आताच जेव्हा मी एनआयएफटीच्या स्टॉलवर गेलो तेव्हा ते मला सांगत होते की आम्ही आता एआयच्या माध्यमातून 2026 चा ट्रेंड कसा असेल हे सांगत आहोत. नाहीतर यापूर्वी जगातील इतर देश आपल्याला सांगायचे, काळे कपडे घाला, आपण घालायचो, आता आपण जगाला सांगू, कुठले कपडे घालायचे. त्यामुळेच आज एकीकडे पारंपारिक खादीला देखील प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्याचबरोबर एआयच्या माध्यमातून फॅशन ट्रेंडचे विश्लेषणही केले जात आहे.

मला आठवतंय, मी नुकताच मुख्यमंत्री झालो होतो, गांधी जयंतीच्या दिवशी बहुधा 2003 असेल, पोरबंदरमध्ये मी गांधीजींचे जिथे जन्मस्थान आहे, तिथे एक फॅशन शो, खादीचा फॅशन शो आयोजित केला होता. आणि एनआयएफटीचे विद्यार्थी आणि आमच्या एनआयडीच्या विद्यार्थ्यांनी मिळून ते काम पुढे नेले होते. आणि “वैष्णव जन तो तेरे रे कहिये”च्या पार्श्वसंगीतासह तो फॅशन शो पार पडला होता. आणि त्यावेळी विनोबाजींचे जे काही खास मित्र होते, त्यांना मी बोलावले होते, ते माझ्यासोबत बसले होते, कारण फॅशन शो हे शब्द असे आहेत की जुन्या पिढीतील लोक लगेच सतर्क होतात, हे सगळे काय चालले आहे. पण मी त्यांना खूप आग्रह केला, मी त्यांना बोलावले, ते आले आणि नंतर त्यांनी मला सांगितले की खादीला जर आपल्याला लोकप्रिय करायचे असेल तर हाच मार्ग आहे. आणि मी सांगतो, आज खादी ज्या प्रकारे प्रगती करत आहे आणि जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे कारण बनत आहे, आपण खादीला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे. आणि पूर्वी जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, तेव्हा खादी फॉर नेशन होती, आता ती खादी फॉर फॅशन व्हायला हवी.

 

मित्रहो,

जसे निवेदक म्हणाले, मी नुकताच परदेश दौऱ्यावरून परतलो आहे, मी पॅरिसमध्ये होतो आणि पॅरिसला जगाची फॅशनची राजधानी म्हटले जाते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. आमच्या चर्चेच्या मुख्य मुद्द्यांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल हे विषयही समाविष्ट होते. आज संपूर्ण जगाला शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व कळत आहे. फॅशन जग देखील त्याच्या प्रभावापासून अस्पर्शित नाही. आज जग पर्यावरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी फॅशन हा दृष्टिकोन स्वीकारत आहे. याबाबतीत भारत जगाला मार्ग दाखवत आहे. टिकाऊपणा हा भारतीय वस्त्रपरंपरेचा अविभाज्य भाग राहिला आहे. आपली खादी, आदिवासी वस्त्रे, नैसर्गिक रंगांचा वापर ही शाश्वत जीवनशैलीचीच उदाहरणे आहेत. आता भारताच्या पारंपरिक टिकाऊ तंत्रज्ञानाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. याचा या उद्योगाशी संबंधित कारागीर, विणकर आणि कोट्यवधी महिलांना थेट लाभ होत आहे.

मित्रहो,

मला वाटतं, संसाधनांचा पुरेपूर वापर आणि कमीत कमी कचरा निर्मिती ही वस्त्रोद्योगाची ओळख बनली पाहिजे. आज जगभरात कोट्यवधी कपडे दर महिन्याला वापरातून बाहेर पडतात. यातील बहुतांश भाग 'फास्ट फॅशन वेस्ट'चा असतो, म्हणजेच, असे कपडे जे लोक फॅशन किंवा ट्रेंड बदलल्यामुळे परिधान करणे सोडून देतात. हे कपडे जगाच्या अनेक भागात कचऱ्यात टाकले जातात. यामुळे पर्यावरण आणि सृष्टीसाठी मोठा धोका निर्माण होत आहे.

एका अंदाजानुसार, 2030 पर्यंत फॅशन संबंधित कचरा 148 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. आज टाकाऊ कपड्यांचा एक चतुर्थांश हिश्श्यावर पुनर्वापर प्रक्रिया केली जात नाही. आपला वस्त्रोद्योग या चिंतेचे संधीत रूपांतर करू शकतो. तुमच्यापैकी अनेक मित्रांना माहित आहे की, आपल्या भारतात कापडाच्या पुनर्वापरात आणि विशेषतः सर्जनशील पुनर्वापरामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण पारंपारिक कौशल्य आहे. उदाहरणार्थ, आपल्या देशात जुन्या किंवा उरलेल्या कपड्यांपासून सतरंज्या बनवल्या जातात. विणकर आणि अगदी गृहिणी देखील अशा कपड्यांपासून अनेक प्रकारच्या चटई, सतरंज्या आणि कव्हर्स बनवतात. महाराष्ट्रात जुन्या आणि अगदी फाटक्या कपड्यांपासून उत्तम प्रकारच्या गोधडी बनवल्या जातात. या पारंपरिक कलांमध्ये आपण नाविन्यपूर्ण कल्पना राबवून ती जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहचवू शकतो. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्जनशील पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक उपक्रम आणि ई-मार्केटप्लेस स्थायी परिषदेसोबत सामंजस्य करारही केला आहे. देशातील अनेक अप-सायक्लर्सनी यामध्ये नोंदणी केली आहे. नवी मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्येही कपड्यांचा जाऊन संकलित करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आपल्या स्टार्टअप्सनी या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हावे, या संधींचा शोध घ्यावा आणि इतक्या मोठ्या जागतिक बाजारपेठेत नेतृत्व करण्यासाठी लवकर पावले उचलावीत असे मला वाटते. पुढील काही वर्षांमध्ये भारताची कापड पुनर्वापर बाजारपेठ 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर, जागतिक पुनर्वापर कापड बाजारपेठ सुमारे 7.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आपण योग्य दिशेने पाऊल टाकले तर भारत यात मोठा वाटा मिळवू शकतो.

 

मित्रहो,

शेकडो वर्षांपूर्वी भारत जेव्हा समृद्धीच्या शिखरावर होता, तेव्हा त्या भरभराटीत आपल्या वस्त्रोद्योगाचा मोठा वाटा होता. आज जेव्हा आपण विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहोत, तेव्हा पुन्हा एकदा वस्त्रोद्योग क्षेत्राचे त्यात मोठे योगदान असणार आहे. भारत टेक्ससारखे आयोजन या क्षेत्रातील भारताचे स्थान मजबूत करत आहेत. हा कार्यक्रम अशाच प्रकारे दरवर्षी यशाचे नवे विक्रम रचेल आणि नवीन उंची गाठेल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा या आयोजनासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!