“30th and 31st October are a source of great inspiration for everyone as the former is the death anniversary of Govind Guru ji and the latter is the birth anniversary of Sardar Patel ji”
“India’s development story has become a matter of discussion around the world”
“Whatever resolution Modi takes, he fulfills it”
“Scope of irrigation in North Gujarat has increased manifold in 20-22 years owing to irrigation projects”
“Water conservation scheme started in Gujarat has now taken the form of Jal Jeevan Mission for the country”
“More than 800 new village dairy cooperative societies have also been formed in North Gujarat”
“Unprecedented work of linking our heritage with development is being done in the country today”

Bharat Mata ki – Jai,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

काय झाले, इतक्या मोठ्याने जयघोष करा  की आपला आवाज अंबाजी यांच्यापर्यंत पोहोचेल.

भारत माता की जय,

भारत माता की जय,

व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई, इतर मंत्री वर्ग, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात भाजपाचे अध्यक्ष भाई सी.आर.पाटील, इतर खासदार आणि आमदार वर्ग,तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने येथे आलेले माझे प्रिय गुजरातचे कुटुंबीय,

आपला खाखरिया टप्पा कसा आहे? सर्वप्रथम मी गुजरातचे  मुख्यमंत्री जी आणि सरकारचा आभारी आहे की आपणा सर्वांना भेटण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. शालेय जीवनातल्या अनेक मित्रांचे चेहरे मला दिसत होते, माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटून घरी आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी मला घडवले त्यांचे ऋण स्वीकारण्याची मला जेव्हा संधी मिळते, मनाला आनंद होतो. म्हणूनच आजची ही भेट म्हणजे माझ्यासाठी ऋण स्वीकारण्याची संधी आहे. आज 30 ऑक्टोबर आणि उद्या 31 ऑक्टोबर, आपणा सर्वांसाठी हे दोन्ही दिवस प्रेरणादायी दिवस आहेत. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे नेतृत्व करत इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे गोविंद गुरुजी यांची आज पुण्यतिथी आहे आणि उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. आपल्या पीढीने जगातला सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार साहेबांप्रती खऱ्या अर्थाने सर्वोच्च आदर  व्यक्त केला आहे. भावी पीढी सरदार साहेबांचा पुतळा पाहील तेव्हा त्यांची मान अभिमानाने उंचावेल. सरदार साहेबांच्या चरणाशी उभी राहिलेली व्यक्ती मान उंचावेल, मान खाली घालणार नाही, असे काम इथे झाले आहे. गुरु गोविंदजी यांचे अवघे जीवन भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यात आणि आदिवासी समाजाच्या सेवेत व्यतीत झाले. सेवा आणि राष्ट्रभक्ती इतकी प्रखर होती की बलिदान करणाऱ्यांची परंपरा निर्माण केली आणि स्वतः बलिदानाचे प्रतिक बनले. गुरु गोविंद जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या सरकारने काही वर्षांपूर्वीपासून मध्य प्रदेश-गुजरात मधल्या मानगढ  धाम आदिवासी भागात या कार्यक्रमाची सुरूवात केली होती. हा कार्यक्रम आता राष्ट्रीय स्तरावर  मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो, याचा मला आनंद  आहे.

 

माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,

येथे येण्यापूर्वी अंबा मातेच्या चरणी आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली, अंबा मातेचे तेज, अंबा मातेचे सुशोभित स्थान पाहून मला आनंद  झाला. गेल्या आठवड्यात आपण साफ-सफाईचे काम केले असे ऐकले. खेरालु म्हणा की अंबाजी म्हणा, येथे स्वच्छता अभियानाचे आपण जे काम केले त्यासाठी मी आपले आणि सरकारमधल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. अंबा मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव कायम राहू दे, गब्बर पर्वताचा येथे जो विकास होत आहे, जी भव्यता दिसून येत आहे, काल मन की बात मध्येही मी याचा उल्लेख केला होता. खरोखरच अभूतपूर्व कार्य होत आहे. अंबे मातेचा आशीर्वाद आणि त्या बरोबरच आज सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे. हे सर्व प्रकल्प शेतकऱ्यांच्या कल्याणाला बळकटी देणार आहेत. संपूर्ण उत्तर गुजरातच्या विकासासाठी, देशासमवेत जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटीचा उत्तम  उपयोग आहे. आपल्या मेहसाणाच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत, पाटण असो, बनासकांठा असो, साबरकांठा असो, महिसागर, खेडा, अहमदाबाद, गांधीनगर असो हा विकासकामांचा खजिना आहे. इथल्या लोकांच्या सुखकर जीवनासाठीच्या वेगवान कामांचा थेट लाभ या भागाच्या विकासाला मिळणार आहे. विकास कामांसाठी गुजरातच्या लोकांचे खूप-खूप अभिनंदन करू इच्छितो.

माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,

भारतातल्या विकासाची आज संपूर्ण जगात चर्चा होत आहे. होत आहे की नाही, जरा मोठ्याने बोला. आपण पाहिले असेल नुकतेच आपल्या भारताने चंद्रावर चंद्रयान पोहोचवले आहे. गावातल्या कधी शाळेतही न गेलेल्या 80-90 वर्षांच्या  माणसालाही वाटतं की भारताने खूप मोठे काम केले आहे, भारत आता चंद्रावर पोहोचला आहे. जगातील कोणताच देश अद्याप तिथे पोहोचू शकलेला नाही, जिथे भारत पोहोचला. जी-20 ची जगभरात कदाचित इतकी चर्चा झाली नसेल जितकी भारतामुळे जी-20 ची चर्चा झाली. जी-20 माहीत नाही अशी कोणतीही व्यक्ती नसेल. क्रिकेटमध्ये 20-20 बाबत माहीत नसेल पण जी-20 ची माहिती असेल असे वातावरण निर्माण झाले. जी-20 मध्ये जगभरातले नेते भारताच्या कानाकोपऱ्यात गेले आणि समारोपाला दिल्लीमध्ये भारताचे वैभव आणि भारताच्या लोकांची क्षमता पाहिली, मित्रांनो, जग चकित झाले, जगभरातल्या नेत्यांमध्ये भारताबाबत कुतूहल जागृत झाले. भारताचे सामर्थ्य आणि क्षमतेचे दर्शन अवघ्या जगाला घडत आहे. भारतात आज एकाहून एक सरस अशा आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. रस्ते असोत, रेल्वे असो किंवा विमानतळ, आज भारताच्या कानाकोपऱ्यात, गुजरातच्या कानाकोपऱ्यात जितकी गुंतवणूक होत आहे पूर्वीच्या काळात याचा मागमूसही नव्हता मित्रांनो. आज इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत,बंधू-भगिनींनो, आपण एक गोष्ट नक्कीच जाणता, जी मोठ-मोठी विकास कामे होत आहेत, धाडसी निर्णय घेतले जात आहेत आणि गुजरात ज्या वेगाने प्रगती करत आहे त्यामध्ये मागील काळात बळकट कार्य करण्यात आले आहे. आज पंतप्रधान आले आहेत, असे आपल्याला वाटले नसेल तर आपले नरेंद्रभाई आले आहेत, असे आपल्याला वाटले असेल. यापेक्षा आणखी चांगले काय असेल? या नरेंद्रईंना तुम्ही ओळखताच,  की एकदा त्यांनी  संकल्प घेतला की ते,  तो पूर्णत्वाला नेणारच. आपण सर्व जण मला जाणताच. आज देशात जो झपाट्याने विकास होत आहे, आज जगभरात भारताचा डंका वाजत आहे, चर्चा होत आहे त्याच्या मागे  कोणते सामर्थ्य आहे, या देशाच्या कोट्यवधी जनतेची ताकद आहे, ज्यांनी देशामध्ये स्थिर सरकारला कौल दिला. आपल्याला गुजरातचा अनुभव आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ स्थिर सरकार असल्याने, पूर्ण बहुमत असलेले  सरकार असल्याने आम्ही एकामागोमाग एक असे निर्णय घेऊ शकलो आणि त्याचा लाभही गुजरातला झाला आहे. जिथे संसाधनांची टंचाई आहे, तिथे आपली मुलगी लग्न करून पाठवायची असेल तर 100 वेळा विचार केला जातो. पाण्याच्या टंचाईने ग्रस्त असलेला हा भाग आज विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामागे हे सामर्थ्य आहे.  एक काळ होता, एकच डेअरी, त्याशिवाय आमच्याकडे  काहीच नव्हते. आज आपल्या चहू बाजूंना विकासाची नव-नवी क्षेत्रे आहेत. त्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या होती. सिंचनाद्वारे  पाणीही  नव्हते. जवळजवळ संपूर्ण उत्तर गुजरातचा मोठा भाग  डार्क झोनमध्ये होता. पाणीही खोल गेले होते,  हजार-बाराशे फुटाखाली कूपनलिकाही बंद पडतील, अशी स्थिती होती. वारंवार कूपनलिका घालावी लागत असे आणि वारंवार मोटारही  बिघडत असे. अनेक समस्यांना  तोंड द्यावे लागत असे, आता या सर्व समस्यांवर मात करून आपण बाहेर आलो आहोत.

 

शेतकरी पूर्वी फार कष्टाने एक पीक घेत असत. आज दोन-दोन, तीन-तीनची हमी मिळाली आहे मित्रांनो. अशा परिस्थितीत आम्ही उत्तर गुजरातचे जीवन बदलण्याचा संकल्प केला.  उत्तर गुजरातला नवसंजीवनी देऊ, नदीचा विस्तार करु आणि आदिवासी भागाला नवसंजीवनी देऊ. त्यात एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली, संपर्क व्यवस्थेवर  भर देण्यात आला. पाणीपुरवठा असो, पाटबंधारे असो, त्यावर भर दिला गेला.  शेतीच्या विकासासाठी पूर्ण ताकद लावली. त्यामुळे आता गुजरात हळूहळू औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत आहे. उत्तर गुजरातमधील लोकांना इथे रोजगार मिळावा हा आमचा उद्देश होता. नाहीतर मी शिकत असताना गावातल्या कुणाला विचारलं की तुम्ही काय करता तर ते म्हणत मी शिक्षक आहे. कुठे काम करता विचारलं तर सांगत मी कच्छमध्ये काम करतो.  मोठ्या भागांतील खेड्यापाड्यांतून दोन-पाच शिक्षक गुजरातच्या किनारी भागात कुठेतरी कामाला जात असत.  कारण येथे रोजगार नव्हता, आज उद्योगाचा झेंडा फडकत आहे.  नर्मदा आणि माहीचे पाणी जे समुद्रात जायचे ते आता आपल्या शेतात पोहोचले आहे.  नर्मदा मातेचे नाव घेतल्याने पावित्र्य प्राप्त होते, आज नर्मदा माता घराघरात पोहोचली आहे. आजच्या 20-25 वर्षांच्या तरुणांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या आयुष्यात किती त्रास सहन केला असेल. आज आपण असा गुजरात निर्माण केला आहे की त्यांना कोणताही त्रास होऊ नये.  सुजलाम-सुफलाम् योजना… आणि आज मी उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांचा पुन्हा-पुन्हा आभारी आहे की त्यांनी एकाच वेळी सुजलाम-सुफलाम् योजनेसाठी जमीन दिली.  जवळपास 500 किलोमीटरचे कालवे, एकही कोर्टकचेरी नाही.  लोकांनी दिलेल्या जमिनीतून कच्चा कालवा झाला, पाणी पाझरु लागले आणि पाण्याची पातळी वाढू लागली. या भागातील जनतेला साबरमतीचे जास्तीत जास्त पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सहा बंधारे बांधले, त्यासाठी आम्ही काम केले आणि आज एका बंधाऱ्याचे उद्घाटनही झाले आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आणि शेकडो गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,

या सिंचन योजनांचे काम तर झालेच आहे, परंतु गेल्या 20-22 वर्षांत उत्तर गुजरातमध्ये सिंचनाची व्याप्ती जवळपास अनेक पटींनी वाढली आहे. जेव्हा मी उत्तर गुजरातच्या लोकांना तुषार सिंचन करावे लागेल, असे सांगितले तेव्हा सगळे माझे खिल्ली उडवायचे, रागावायचे आणि म्हणायचे, साहेब, याने काय होणार? आज मला आनंद वाटतो की आता माझ्या उत्तर गुजरातमधील प्रत्येक जिल्ह्याने तुषार सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि नवीन तंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे आणि यामुळे उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांची अनेक प्रकारची पिके घेण्याची शक्यता वाढली आहे. आज बनासकांठामधील सुमारे 70 टक्के क्षेत्र लघु सिंचनाखाली आले आहे. गुजरातच्या संपूर्ण कोरडवाहू प्रदेशाला सिंचन आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या मदतीचाही फायदा होत आहे. जिथे एकेकाळी शेतकरी अडचणीत जगायचा आणि कठीण परिस्थितीत पिके घ्यायचा, आज तो गहू, एरंड आणि हरभरा पिकवून अडचणीतून बाहेर पडला आहे आणि अनेक नवीन पिकांकडे वळला आहे. आणि रवी पिके घेण्यास सुरुवात केली आहे, आपल्या बडीशेप, जिरे आणि इसबगोलचा डंका तर सर्वत्र आहे, भाऊ. इसबगोल, तुम्हाला आठवत असेल, कोव्हिडनंतर जगात दोन गोष्टींची चर्चा झाली, एक म्हणजे आपली हळद आणि दुसरी आपली इसबगोल, आज जगभर त्याचीच चर्चा आहे.  आज 90 टक्के इसबगोलची प्रक्रिया उत्तर गुजरातमध्ये केली जाते.  परदेशातही इसबगोलचे गुणगान गायले जात आहे. लोकांमध्ये इसबगोलचा वापर वाढत आहे. आज उत्तर गुजरात फळे, भाजीपाला आणि बटाटे उत्पादनात प्रगती करत आहे. बटाटा असो, गाजर असो, आंबा, आवळा, डाळिंब, पेरू, लिंबू आणि काय नाही.  एक काम मुळापासून केले तर पिढ्यांचे भले होईल, असे काम आम्ही केले आहे. आणि त्यामुळे आपण भव्य जीवन जगत आहोत. आणि उत्तर गुजरातचे बटाटे जगभर प्रसिद्ध होत आहेत. मी इथे होतो तेव्हा केंद्रातल्या कंपन्या विचारायला यायच्या, आज उत्तर गुजरातमध्ये निर्यात दर्जाच्या बटाट्याचे उत्पादन होऊ लागले आहे.  फ्रेंच फ्राईज आणि त्याची उत्पादने आज परदेशात जाऊ लागली आहेत.  आज दिसा येथील बटाटा आणि सेंद्रिय शेती हे त्याचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. आणि त्याला विशेष मागणी आहे. बनासकांठामध्ये बटाटा प्रक्रिया करणारे मोठे कारखाने आहेत, यामुळे असा फायदा झाला की आपले बटाटे जेथे पिकतात, त्या वालुकामय जमिनीतून सोने काढू लागलो आहोत.  महेसाणा येथे कृषी खाद्यान्न पार्क बांधण्यात आले, आता बनासकांठामध्येही मेगा फूड पार्क उभारण्याचे काम आम्ही पुढे नेत आहोत.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

या उत्तर गुजरातमध्ये माझ्या आई-बहिणींना पूर्वी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन 5-10 किलोमीटर चालावे लागायचे. आज घरात नळातून पाणी येऊ लागले, माझ्या आई-बहिणींचे मला जे काही आशीर्वाद मिळाले आहेत, आणि मला नेहमीच माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे, आणि फक्त गुजरातमध्येच नाही, तर भारताच्या कानाकोपऱ्यातून मला आई-बहिणींचे आशीर्वाद मिळाले आहेत त्याची कल्पनाही करु शकत नाही कारण, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा, स्वच्छतागृहासारख्या सुविधांमुळे जलक्रांती अभियान पुढे नेले आहे. भगिनींच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था विकसित झाली आहे. प्रत्येक घरात जलसंधारणाच्या मोहिमेवरही आम्ही भर दिला आहे. त्यामुळे गुजरातमधील घरोघरी पाणीपुरवठा करण्यात आला, भारतातील घराघरांत पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. हर घर जल अभियान असो, आदिवासी भाग असो, टेकड्या असो की छोट्या पर्वतरांगा असोत, कोट्यवधी लोकांचे जीवन बदलण्याचे काम झाले आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,

दुग्धव्यवसायात माझ्या बहिणींचा मोठा सहभाग आहे, माझ्या आई-बहिणींच्या मेहनतीमुळेच माझ्या गुजरातमधील दुग्धव्यवसाय चालत आहेत, तसेच दुग्धव्यवसायाच्या विकासामुळे घरचे उत्पन्न स्थिर झाले आहे यामध्ये माझ्या माता भगिनींचे खूप मोठे योगदान आहे, असे मी म्हणू शकतो. काहीही झाले नसेल, पण 50 लाख कोटी रुपयांचा दुधाचा व्यवसाय त्या सहज करू शकतात, ही माझ्या आई-बहिणींची ताकद आहे. गेल्या वर्षी उत्तर गुजरातमध्ये शेकडो नवीन पशुवैद्यकीय रुग्णालये बांधली गेली आहेत, याचे कारण आपल्याला त्याची ताकद समजली आहे. आम्ही जनावरांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करणे, सर्वोत्तम सेवा देणे आणि आपल्या जनावरांची दूध उत्पादकता वाढवण्यावर भर देत आहोत. आपण अशा प्रकारे पुढे जात आहोत की आपल्याला दोन जनावरांपासून मिळणारे दूध घेण्यासाठी चार जनावरे ठेवण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकांत, आम्ही गुजरातमध्ये 800 हून अधिक नवीन ग्राम दुग्ध सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. आज बनास डेअरी असो, दूधसागर डेअरी असो, साबर डेअरी असो, तिचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. आणि हे डेअरी प्रारुप पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. दुधासोबतच शेतकऱ्यांना इतर उत्पादन मिळावे यासाठी आम्ही मोठी प्रक्रिया केंद्रेही सुरू केली आहेत.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील शेतकऱ्यांना हे ठाऊक आहे की जनावरे त्यांच्यासाठी किती मोठे धन आहे. आणि शेतकऱ्यांच्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी कोव्हिडच्या काळात या मोदीसाहेबांनी तुम्हाला लस मोफत पाठवली होती ना, प्रत्येकाचा जीव वाचवला होता ना. तुमच्या मुलाने हे काम केले आहे, आम्ही फक्त लोकांचेच नाही तर प्राण्यांचेही लसीकरण करत आहोत. जनावरांसाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांची मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. येथे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संख्येने आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जनावरांना हे लसीकरण करून घ्यावे, ते त्यांच्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहे. लसीकरण झाले पाहिजे, मित्रांनो, दूध तर विकले जातेच पण आता शेणाचाही व्यापार व्हायला हवा, त्यातूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे, शेणसंपदेचे मोठे काम आम्ही करत आहोत, हे काम देशभर सुरू आहे.

आपल्या बनास डेअरीत तर आपण सीएनजी प्लांट देखील शेणापासून बनवायला सुरुवात केली आहे. आज सर्वत्र गोबरधन योजनेचे प्लांट लावले जात आहेत. बायोगॅस, बायो सीएनजी सुरू होत असून आता देशात मोठी जैव इंधन मोहीमही सुरू झाली आहे, आणि म्हणूनच, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पशुधनापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामधूनही त्यांना उत्पन्न मिळावे, यावर काम सुरू आहे. शेणापासून वीज निर्मितीच्या दिशेनेही आपण वाटचाल करत आहोत.

माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,

उत्तर गुजरातने आज विकासाची जी उंची गाठली आहे, त्यामागे या ठिकाणी दिवसरात्र सुरू असलेलेली विकास कामे आहेत. काही दशकांपूर्वी आपण असा विचार करायचो की उत्तर गुजरातमध्ये कोणताही उद्योग येऊ शकत नाही, पण आज पाहा, विरमगामपासूनचा संपूर्ण परिसर, मंडलपासून बहुचराजीपर्यंतचा परिसर इथपासून ते मेहसाणापर्यंत, उत्तर गुजरातच्या दिशेने आणि रांधनपूरपर्यंत विकासचा मार्ग विस्तारला आहे. फक्त कल्पना करा, संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग या क्षेत्रात विस्तारत आहे. मांडल असो, की बहुचराजी असो, संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग, या माझ्या उत्तर गुजरातच्या लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत असे आणि आज, बाहेरचे लोक रोजगारासाठी उत्तर गुजरातमध्ये येऊ लागले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा वर्षांच्या आत, आपण औद्योगिकीकरणाबरोबरच पुढे गेलो आहोत. आज उत्पन्न दुप्पट झाले आहे. अन्नप्रक्रीयेबरोबरच मेहसाणामध्ये औषधे आणि अभियांत्रिकी उद्योगाचाही विकास होऊ लागला आहे. बनासकांठा, साबरकांठा सिरॅमिक उद्योगाच्या दिशेने पुढे गेले आहेत. मी लहान असताना सरदारपूरच्या आजूबाजूची माती सिरॅमिकसाठी नेली जाते, असे ऐकायचो. आज त्याच ठिकाणी हा उद्योग सुरु आहे.

 

माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,

आगामी काळात हरित हायड्रोजन च्या रूपातील एका सशक्त माध्यमाच्या सहाय्याने देश पुढे जाणार आहे. आणि त्यामध्ये उत्तर गुजरातचेही मोठे योगदान राहणार आहे. या ठिकाणी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, आणि आता तर एक महत्वाचे सौर ऊर्जा केंद्र म्हणून या परिसराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. मोढेरा मध्ये तर आपण पहिलेच, सूर्यग्राम आणि संपूर्ण उत्तर गुजरात सौर उर्जेच्या शक्तीने तेजस्वी रुपात प्रगती करणार आहे. सुरुवातीला पाडण आणि नंतर बनासकांठा येथे सौरऊर्जा प्रकल्प बांधण्यात आला आणि आता मोढेरा दिवसाचे 24 तास सौर उर्जेवर चालते. उत्तर गुजरातला सौर शक्तीचा फायदा मिळत आहे. सरकारच्या रुफटॉप सौर धोरणा द्वारे  स्वतःच्या घराच्या छतावर मोफत वीज मिळवण्या बरोबर सरकारला जास्त वीज विकताही यावी, या दिशेने काम केले आहे. आधी वीज पैसे देऊनही मिळत नव्हती, तीच वीज आता गुजरातचे लोक विकू शकतील, या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.

मित्रहो,

आज रेल्वेसाठीही खूप काम झाले आहे, गुजरातमध्ये आज 5 हजार कोटींहून अधिक प्रकल्प आले आहेत. मेहसाणा-अहमदाबाददरम्यानचा समर्पित कॉरिडॉर, हे खूप मोठे काम होणार आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे, त्याचे लोकार्पण झाले आहे. यामुळे पिपावाव, पोरबंदर, जामनगर या बंदरांशी संपर्क वाढून गुजरातच्या विकासाचा वेग वाढेल. शेतकरी, पशुपालक आणि उद्योग या सर्वांना त्याचा फायदा होणार असून, त्यामुळे येथे उद्योग क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्तर गुजरातमध्ये लॉजिस्टिक केंद्रे उभारायला, मोठी माल साठवणी क्षेत्रे तयार करायला मोठे बळ मिळणार आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,

गेल्या 9 वर्षांत, पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या कामाचा अंदाजे 2500 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवासी रेल्वे गाडी असो किंवा मालवाहतूक गाडी असो, येथे सर्वांना मोठा फायदा होत असून शेवटच्या स्थानकापर्यंत याचा लाभ मिळावा, याची व्यवस्था करण्यात आली आहे. मालवाहतूक कॉरिडॉरचा फायदा असा आहे की आज जर ट्रक आणि टँकर कोणताही माल घेऊन रस्ता मार्गाने गेले, तर खूप वेळ लागतो आणि ते महागही पडते. आता त्यात फायदा होईल आणि वेगही वाढेल. या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमुळे मोठी वाहने आणि  मालाने भरलेले ट्रक रेल्वेगाडीवर चढवले जाऊ शकतील. बनासमध्ये आपण पहिले असेल, की दूध घेऊन जाणारा ट्रक रेल्वे गाडीवर चढवून रेवाडी येथे नेला जातो. त्यामुळे वेळेची बचत होते, दूध खराब होत नाही आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढायला मदतही होते. या भागातील शेतकऱ्यांचे दुधाचे टँकर पालनपूर, हरियाणा, रेवाडी येथेही पोहोचले आहेत.

 

मित्रहो,

या ठिकाणी कडोसन रोड, बहुचराजी रेल्वे मार्ग आणि विरमगाम  समखियानी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे, त्यांना देखील या दळणवळण सुविधेचा फायदा होणार आहे, गाड्या अधिक वेगाने धावतील. मित्रांनो, उत्तर गुजरातमध्ये स्थलांतराची पूर्ण शक्यता आहे, तुम्ही पहा, काशी तुमच्या शेजारच्या वडनगरइतकीच महत्त्वाची आहे, एक काशी अविनाशी आहे, असा काळ नाही की काशीमध्ये लोक नव्हते, तिथे लोक होते. प्रत्येक युगात, काशीमध्ये लोक राहायचे. काशीनंतर वडनगरचही तसेच आहे. हेसुद्धा कधीच नष्ट झालेले नाही. हे सर्व उत्खननात आढळून आले आहे, येथे जगभरातून लोक पर्यटक म्हणून येणार आहेत, या पर्यटनाचा लाभ घेणे, हे आपले काम आहे. तरंगा टेकडी, राजस्थान आणि गुजरातला जोडणारा अंबाजी-आबू रोड रेल्वे मार्ग. मित्रांनो, हा रेल्वे मार्ग या क्षेत्राचे भाग्य बदलणार आहे, आपल्या इथून या मार्गाचा विस्तार होणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेमार्ग इथून थेट दिल्लीला पोहोचणार आहे. हा प्रदेश संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे, त्यामुळे तरंगा, अंबाजी, धरोई ही सर्व पर्यटन स्थळे विकसित होणार आहेत. हा रेल्वे मार्ग या भागातील औद्योगिक विकास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे अंबाजीपर्यंत रेल्वेद्वारे सर्वोत्तम दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्ली, मुंबई आणि देशभरातील भाविकांना येथे येणे-जाणे सोपे होणार आहे.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

तुम्हाला लक्षात असेल, मी कच्छविषयी चर्चा करायचो. एक काळ असा होता की कच्छचे नावही कुणी घ्यायचे नाही आणि आज कच्छमधील रणोत्सव धोर्डोच्या भूमीत साजरा होत आहे. जगातील सर्वोत्तम ग्राम पर्यटनासाठी आपल्या धोर्डोला पसंती दिली जाते. अशाच प्रकारे आपल्या नडाबेटचे ही लवकरच मोठे नाव होणार आहे, त्यालाही आपल्याला पुढे न्यायचे आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की, आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, नवीन तरुण पीढीमध्ये आलो आहे, म्हणजे आपण आज गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गुजरातच्या कल्याणासाठी काम करत आहोत. गुजरातच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ज्या मातीने मला मोठे केले, त्या  माझ्याच मातीचा आशीर्वाद घेऊन, मी एका नव्या ताकदीने इथून बाहेर पडेन. मी पूर्वी करायचो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत करेन, पूर्वी करत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने विकास कामे करेन, कारण हेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद, हीच माझी उर्जा, माझी शक्ती आहे. गुजरात आणि देशाचं एक स्वप्न आहे. 2047 मध्ये जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा हा देश विकसित देश असावा. जगातील मोठ-मोठ्या देशांच्या बरोबरीने असायला हवा, यासाठी आम्ही कामाचा विडा उचलला आहे. मी आज माझ्या भूमीतील सर्व वरीष्ठ, आप्तस्वकियांकडे आलो आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी पूर्ण ताकदीने काम करेन, जास्तीतजास्त काम करेन, संपूर्ण समर्पणाने काम करेन, याच अपेक्षेने माझ्या बरोबर बोला,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माती की जय।

मनःपूर्वक धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt

Media Coverage

UP's exports to BRICS nations, partners cross $5.36 billion in FY26: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur
June 20, 2026
I extend my heartfelt birthday greetings to President Smt. Droupadi Murmu Ji, I wish her long life and excellent health: PM
Pahadpur village will now be rapidly developed as a solar village, that is, solar power will be ensured in every home here: PM
The vision of the Central Government is the development of India through the development of Eastern India: PM
To uplift tribal society, we are connecting tribal youth with opportunities for education and employment: PM
These children should get better facilities for studies; for this, around 500 Eklavya Model Schools have been opened across the country: PM

जॉय जगन्नाथ! जॉय मां किचकेश्वरी! मोर सबू भाई,भौणी,मां,मौसी मानंकु मोर नमोस्कार।

माननीय राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी, राज्यपाल श्री हरि बाबु जी, यहां के लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, उप मुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव जी, प्रवती परीदा जी, ओडिशा के मंत्री गणेश सिंह खूंटिया जी, कृष्ण चंद्र महापात्र जी, सांसद नबा चरण माझी जी, मनमोहन सामल जी, बैजयंत पांडा जी, अन्य महानुभाव, भाइयों और बहनों।

हमारा ओडिशा इन दिनों उत्सवों के आनंद में डूबा हुआ है। यहाँ का गणपर्व रज, पिछले हफ्ते ही धूमधाम से मनाया गया है। महाप्रभु जगन्नाथ जी की रथ यात्रा की तैयारियां भी पुरजोश चल रही है। मयूरभंज के बारीपदा रथ यात्रा को लेकर भी उत्साह का माहौल है। और, इस सबके बीच ही लोकतन्त्र का विकास का उत्सव भी चल रहा है। ओडिशा की बीजेपी सरकार ने अपने 2 साल भी पूर्ण किए हैं। इस मौके पर, आप सबके बीच आना, मयूरभंज आने का ये सौभाग्य, और इतनी बड़ी संख्या में आप सबकी उपस्थिति, ये अवसर मेरे लिए बहुत खास है। आपका अपनापन मुझे बार-बार यहां खींच लाता है। मैं आप सभी का हृदय से बहुत-बहुत अभिनंदन करता हूँ। और ओडिशा की जनता को डबल इंजन सरकार में विकास यात्रा की भी बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूं। साथ ही, इस अवसर पर मैं पंडित रघुनाथ मुर्मू जी, डॉ. दमयंती बेश्रा जी, और श्री चरण हेम्ब्रम जी जैसी विभूतियों को भी नमन करता हूँ। रघुनाथ मुर्मू जी ने संथाली भाषा के लिए ओल चिकी लिपि का निर्माण किया था। हमारी सरकार ने संथाली भाषा में भारत के संविधान को प्रस्तुत किया है। ओडिशा की संतानों को पद्म सम्मान देकर सम्मानित किया है। पिछले 2 वर्षों में ओडिशा सरकार भी इन सभी विभूतियों के सपनों को पूरा करने में दिन रात पुरुषार्थ कर रही है।

साथियों,

आज का ये अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि मयूरभंज की धरती पर पली-बढ़ीं, ओडिशा की बेटी, माननीय राष्ट्रपति जी हमारे बीच उपस्थित हैं। आज उनका जन्मदिन भी है। मैं राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी को जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकमानाएं देता हूं, मैं उनके दीर्घायु होने और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं। जनगन्नाथ जी भगवान के श्री चरणों में प्रार्थना करता हूं। ओडिशा की बेटी आज देश के इतने बड़े पद पर पहुंची हैं, हमारा मार्गदर्शन कर रही हैं, ये हम सभी के लिए बहुत गौरव की बात है। राष्ट्रपति जी का व्यक्तित्व, उनका उदार और सहृदय स्वभाव, राष्ट्र और समाज की सेवा के लिए उनका अटल समर्पण, उन्होंने मयूरभंज ही नहीं, पूरे ओडिशा की पहचान सशस्त की है। मैं इस अवसर पर, उनका विशेष रूप से अभिनंदन करता हूँ।

साथियों,

ये कार्यक्रम जब बना, तो इसमें मूल कारण तो लॉजिस्टिक था, लंबे अर्से से यहां आने के लिए चर्चा चल रही थी, लेकिन कोई तालमेल नहीं बैठता था। 21 जून को अंतर्राष्ट्रीय योगा दिवस कोलकाता में तय हुआ, तो फिर मैंने कहा अच्छा है, आज बंग दिवस भी है, तो क्यों न मैं सुबह मयूरभंज होकर के शाम को फिर कोलकाता के कार्यक्रम में जाऊं। और इसके कारण ये 20 जून तय हुई। लेकिन कुछ चीजें ऐसी होती हैं, जिसकी मंगल कामनाएं ईश्वरआधीन होती हैं, और इसलिए आज एक शुभ मंगल हो गया, कि राष्ट्रपति का जन्मदिन भी, मुझे आज उनके गांव में जाकर के, उनको शुभकामनाएं देने का अवसर मिला।

साथियों,

आज मैं राष्ट्रपति जी के साथ पहाड़पुर भी गया था। मैं इस क्षेत्र के बच्चों के लिए उनके द्वारा बनवाए गए स्कूल भी गया। बच्चों के साथ कुछ यादगार समय बिताने का अवसर मुझे मिला। मैं देख रहा था, बच्चों के चेहरों की चमक, राष्ट्रपति जी की उपस्थिति और आत्मीयता, वहां मुझे ऐसा कुछ भी नहीं लगा, किसी बच्चे को ये लगा हो कि राष्ट्रपति जी आई हैं, हर बच्चे को लगता था उनकी मां आई है। वे बच्चे भी बहुत भाग्यवान हैं, कैसे इस क्षेत्र के गरीब, वंचित और आदिवसी समाज के बच्चों को प्रेरणा मिल रही है, उन्हें देश के लिए कुछ बड़ा करने का आत्मविश्वास मिल रहा है। मैं राष्ट्रपति जी का आभारी हूं कि उन्होंने इन अनुभवों से गुजरने का आज मुझे अवसर दिया। ये मेरा दिन, एक प्रकार से मेरी शिक्षा का दिवस था, कुछ सीखने का अवसर था मेरे लिए।

साथियों,

मैं आपको सरकार का ये निर्णय भी बताना चाहता हूं कि पहाड़पुर गांव को, अब तेजी से सुर्यग्राम, सोलर विलेज के रूप में विकसित किया जाएगा। यानी यहां हर घर में सोलर बिजली बने, इसे सुनिश्चित किया जाएगा। और हम तो बड़ा गर्व के साथ कह सकते हैं कि यही ओडिशा है, जहां कोणार्क में सुर्य मंदिर की एक पहचान है, वैसे ही पहाड़पुर सुर्यग्राम की पहचान बन जाएगा। सुर्यग्राम, से पूरा गांव सोलर विलेज के रूप में पहचाना जाए, इस दिशा में काम तुरंत शुरू हो ऐसा मेरा प्रयास रहेगा। इस अभियान से, पहाड़पुर के लोगों को मुफ्त सोलर बिजली भी मिलेगी और जो ज्यादा बिजली होगी, वो उनकी आय भी बढ़ाएगी।

साथियों,

ओडिशा में डबल इंजन सरकार के 2 साल कई मायनों में ऐतिहासिक रहे हैं। मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी के नेतृत्व में, आज ओडिशा तेज गति से विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है। आज यहां गरीब कल्याण की योजनाओं से सामान्य मानवी का जीवन बदल रहा है। ओडिशा में आर्थिक गतिविधियाँ निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नज़र आ रहा है। यहाँ रोजगार के नए अवसरों के लिए तेजी से काम हो रहा है।

साथियों,

केंद्र सरकार का विज़न है- पूर्वी भारत के विकास से भारत का विकास। इसीलिए, हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं। जिस पूर्वी भारत को काँग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है। आज ओडिशा खुद इस बदलाव का साक्षी बन रहा है।

साथियों,

ओडिशा के पास समुद्र है, खनिज संपदा है, कृषि की शक्ति है और सबसे सामर्थ्यवान यहां युवा प्रतिभा है। इस सामर्थ्य का पूरा उपयोग करने के लिए हम मिलकर काम कर रहे हैं। इसीलिए, आज ओडिशा में रेलवे इनफ्रास्ट्रक्चर में रिकॉर्ड निवेश हो रहा है। नई सड़कें और आर्थिक कॉरिडोर बन रहे हैं। पोर्ट्स का विस्तार हो रहा है। ऊर्जा, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी और आधुनिक उद्योगों में निवेश आ रहा है। आज भी यहां ओडिशा के विकास से जुड़ी अनेक महत्वपूर्ण परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास हुआ है। इन परियोजनाओं पर लगभग 47 हजार करोड़ रुपये खर्च किए जाएंगे। बिजली, सड़क, रेलवे, स्वास्थ्य और शिक्षा से जुड़ी इन परियोजनाओं से, आप सभी लोगों को बहुत सुविधा होने वाली है। मैं इन परियोजनाओं के लिए ओडिशा के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं।

साथियों,

हमारी सरकार ओडिशा के संसाधनों को, ओडिशा की संभावनाओं में बदल रही है। ओडिशा में बड़ा निवेश आए, यहाँ नए उद्योग लगें, इसके लिए उत्कर्ष ओडिशा जैसे अभियान चलाए जा रहे हैं। इसके तहत, अब तक करीब 20 लाख करोड़ रुपए के निवेश प्रस्ताव मिल चुके हैं। साढ़े 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा की अनेक मेगा परियोजनाओं पर भी काम चल रहा है। उद्योगों के लिए अनुकूल वातावरण बने, इसके लिए ओडिशा के समग्र विकास पर ध्यान दिया जा रहा है। पावर सेक्टर में 6 हजार करोड़ रुपए से ज्यादा का निवेश हो रहा है। समृद्ध शहर योजना के तहत शहरी विकास को गति दी जा रही है। आने वाले वर्षों में इन प्रयासों का परिणाम हमें देखने को मिलने वाला है।

साथियों,

डबल इंजन सरकार की बड़ी विशेषता ये है कि वो खुद जनता तक पहुँचती है। हमारा प्रयास है कि सामान्य नागरिक को किसी समस्या के समाधान के लिए अनावश्यक चक्कर न लगाने पड़े। इन्हीं प्रयासों का परिणाम है कि युवाओं, महिलाओं, किसानों और आम लोगों की अपेक्षाएँ आज पूरी हो रही हैं। आप देखिए, धान खरीद में किसानों को 3,100 रुपये प्रति क्विंटल देने का निर्णय लिया गया। सुभद्रा योजना के माध्यम से एक करोड़ से अधिक माताओं और बहनों तक आर्थिक सहायता पहुंचाई गई। आयुष्मान भारत को लागू करके ओडिशा के परिवारों के लिए देशभर के अस्पतालों में इलाज का रास्ता खोला गया। आदिवासी विद्यार्थियों की पढ़ाई बीच में न छूटे, इसके लिए माधो सिंह हाथ-खर्चा योजना शुरू की गई। महाप्रभु श्री जगन्नाथ जी के भक्तों की भावनाओं का सम्मान करते हुए श्रीमंदिर के श्रद्धालुओं के लिए सारे द्वार खोल दिए गए, चारों-चार द्वार खोल दिए गए। डबल इंजन की ताकत मिलने से आज यहां चारों दिशाओं में विकास सुनिश्चित हो रहा है।

साथियों,

यहां बीते दिनों स्वच्छता को लेकर जो विशेष अभियान चला है, उसकी भी मुझे जानकारी मिली है। और मैं देख रहा था सोशल मीडिया में तो सफाई अभियान छाया हुआ है, यानी स्वच्छता से स्वागत, मैं ओडिशा की इस पहल के लिए, यहां के नगारिको का, सरकार का, मुख्यमंत्री जी का, इस प्रशंसनीय पहल के लिए बहुत ही प्रशंसा करता हूं, संतोष व्यक्त करता हूं।

साथियों,

स्वच्छता हमारे जीवन शैली का हिस्सा होनी चाहिए, हर रोज की आदत होनी चाहिए। मैं यहां स्वच्छता अभियान से जुड़े सभी लोगों का हृदय से बहुत-बहुत अभिनंदन करता हूं।

साथियों,

मैंने अपने जीवन का कुछ महत्वपूर्ण कालखंड जनजातीय क्षेत्रों में एक वालंटियर के रूप में काम करते हुए बिताया है। माननीय राष्ट्रपति जी तो बरसों तक ऐसे क्षेत्रों में चुनौतियां का सामना करती रही हैं। आप और हम जानते हैं कि जनजातीय क्षेत्रों में जीवन की सुविधाएं आसानी से नहीं पहुंचती थीं। इसलिए, हमारी सरकार ने जनजातीय विकास को बहुत प्राथमिकता दी है। हमने ऐसे इलाकों को सुविधाओं से जोड़ने के लिए धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान शुरू किया। इसके तहत स्वास्थ्य, शिक्षा, सड़क, आवास से जुड़े विभाग मिलकर के सर्वागीण विकास के लिए काम कर रहे हैं। ताकि वहां रहने वाले लोगों की कठिनाइयां दूर हो सकें। इसी तरह, पीएम जनमन अभियान तो राष्ट्रपति जी के साथ हुई चर्चाओं का, उनके मार्गदर्शन का ही परिणाम है। ये विशेष रूप से देश के ऐसे जनजातीय समूहों के लिए है, जो जनजातीय समुदाय में भी सबसे पीछे रह गए हैं। ऐसे जनजातीय समुदायों तक अब सरकार स्वयं चलकर उनके गांव, उनके दरवाजे तक पहुंच रही है।

साथियों,

आदिवासी समाज के उत्थान के लिए हम आदिवासी युवाओं को शिक्षा और रोजगार के अवसरों से जोड़ रहे हैं। इन बच्चों को पढ़ाई की बेहतर सुविधा मिले, इसके लिए देश में करीब 500 एकलव्य मॉडल स्कूल खोले गए हैं। करीब साढ़े सात सौ एकलव्य स्कूल स्वीकृत किए गए हैं। प्री-मैट्रिक और पोस्ट मैट्रिक लेवल पर, डेढ़ करोड़ से अधिक आदिवासी बच्चों को सैकड़ों करोड़ रुपए की स्कॉलर्शिप दी गई है। मुझे ये बताते हुए भी खुशी है कि यहां मयूरभंज में एक और नवोदय विद्यालय बनाने के लिए भी स्वीकृति दे दी गई है।

साथियों,

दूर-दराज इलाकों में रहने के कारण, जनजातीय समाज स्वास्थ्य से जुड़ी कठिनाइयों का भी शिकार रहा है। सिकल सेल एनीमिया जैसी बीमारियाँ एक बहुत बड़ी चुनौती रही हैं। हमने इनके खिलाफ देश भर में अभियान चलाया, चार करोड़ से ज्यादा हेल्थ कार्ड बांटे, मुफ्त इलाज के लिए करोड़ों आदिवासी लाभार्थियों को आयुष्मान कार्ड दिये। जल जीवन मिशन के तहत घर-घर साफ पानी पहुंचाया जा रहा है। इन प्रयासों का परिणाम आज हमें दिख रहा है। आदिवासी समाज दशकों पुरानी कठिनाइयों से बाहर आ रहा है, और, विकास की मुख्यधारा का हिस्सा बन रहा है।

साथियों,

आने वाले समय में हमारे सामने दो महत्वपूर्ण पड़ाव हैं। 2036 में ओडिशा के गठन के 100 वर्ष पूरे होंगे। और, 2047 में भारत की स्वतंत्रता के 100 वर्ष पूरे होने वाले हैं। यानी, ओडिशा और देश का लक्ष्य एक ही दिशा में है। ओडिशा की अर्थव्यवस्था मजबूत होगी, तो भारत मजबूत होगा। मुझे ओडिशा के सामर्थ्य पर भरोसा है। हमें मिलकर ओडिशा को विकास की बुलंदियों पर पहुंचाना है।

साथियों,

कल 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है। ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहाँ के संस्कारों का हिस्सा रहा है। मैं ओडिशा की धरती से पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूँ, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें। मैं एक बार फिर आप सभी को आज के अवसर, और विकास परियोजनाओं की बहुत-बहुत बधाई देता हूं। मैं माननीय राष्ट्रपति जी का विशेष रूप से आभार प्रकट करता हूं, कि मुझे उनके साथ उनकी कर्मभूमि को देखने का मौका मिला। एक बार फिर उन्हें जन्मदिन की बहुत-बहुत बधाई। बहुत-बहुत धन्यवाद।

जय जगन्नथ।

जय जगन्नथ।

जय जगन्नथ।