ईशान्य हा विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सर्वात वैविध्यपूर्ण प्रदेश आहे: पंतप्रधान
आपल्यासाठी ईस्ट म्हणजे - सक्षमीकरण, कृती, बळकटीकरण आणि परिवर्तन: पंतप्रधान
एक काळ होता जेव्हा ईशान्य प्रदेशाला केवळ सीमावर्ती प्रदेश म्हटले जात असे. आज तो 'विकासातील आघाडीचा प्रदेश' म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान
ईशान्य प्रदेश पर्यटनासाठी एक संपूर्ण पॅकेज आहे: पंतप्रधान
दहशतवाद असो किंवा अशांतता पसरवणारे माओवादी घटक असोत, आमचे सरकार शून्य सहनशीलता धोरणाचा अवलंब करते: पंतप्रधान
ऊर्जा आणि सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांसाठी ईशान्य प्रदेश एक प्रमुख इष्ट स्थान बनत आहे: पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…

आज, जेव्हा मी ‘रायझिंग नॉर्थईस्ट’च्या या भव्य व्यासपीठावर उभा आहे, तेव्हा माझ्या हृदयात अभिमान आहे, जवळीक आहे, आपलेपणा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भविष्याबद्दल अपार विश्वास आहे. काही महिन्यांपूर्वीच, आपण भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सव साजरा केला, आज आपण ईशान्येकडील गुंतवणुकीचा उत्सव साजरा करत आहोत. इतक्या मोठ्या संख्येने विविध उद्योगातील नेतृत्व करणारी मंडळी येथे आले आहेत. यावरून असे दिसून येते की प्रत्येकजण ऊर्जावान आणि उत्साहित असून ईशान्येसाठी नवीन स्वप्ने पाहत आहे. या कार्यासाठी मी सर्व मंत्रालये आणि सर्व राज्य सरकारांचे अभिनंदन करतो. तुमच्या प्रयत्नांमुळे इशान्येत गुंतवणुकीसाठी एक उत्तम वातावरण निर्माण झाले आहे. माझ्या वतीने, भारत सरकारच्या वतीने, मी तुम्हाला सर्वांना नॉर्थ ईस्ट रायझिंग समिटच्या यशासाठी शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

भारत हा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण राष्ट्र असल्याचे म्हटले जाते आणि आपला ईशान्य भाग या वैविध्यपूर्ण राष्ट्राचा सर्वात वैविध्यपूर्ण भाग आहे. व्यापारापासून परंपरेपर्यंत, कापडापासून पर्यटनापर्यंत, ईशान्येकडील विविधता ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ईशान्य म्हणजे जैव अर्थव्यवस्था आणि बांबू, ईशान्य म्हणजे चहा उत्पादन आणि पेट्रोलियम, ईशान्य म्हणजे क्रीडा आणि कौशल्य, ईशान्य म्हणजे पर्यावरणीय पर्यटनाचे उदयोन्मुख केंद्र, ईशान्य म्हणजे सेंद्रिय उत्पादनांचे नवीन जग/स्थान, ईशान्य म्हणजे उर्जेचे पॉवर हाऊस, आणि म्हणूनच ईशान्य आपल्यासाठी 'अष्टलक्ष्मी' आहे. 'अष्टलक्ष्मी'च्या या आशीर्वादाने, ईशान्येकडील प्रत्येक राज्य म्हणत आहे की, आम्ही गुंतवणुकीसाठी तयार आहोत, आम्ही नेतृत्वासाठी तयार आहोत.

मित्रांनो,

विकसित भारत निर्माण करण्यासाठी, पूर्व भारताचा विकास होणे महत्त्वाचे आहे. आणि ईशान्य हा पूर्व भारताचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आमच्यासाठी, EAST चा अर्थ फक्त एक दिशा नाही, तर आमच्यासाठी EAST चा अर्थ आहे - Empower, Act, Strengthen, and Transform अर्थात सक्षमीकरण करणे, कृती करणे, बळकटिकरण करणे आणि परिवर्तन करणे. पूर्व भारतासाठी आमच्या सरकारचे हेच धोरण आहे. या धोरणामुळे, या प्राधान्यामुळे आज पूर्व भारत, आपला ईशान्य भारत, विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे.

मित्रांनो,

गेल्या 11 वर्षांत, ईशान्येकडील भागात झालेला बदल हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो प्रत्यक्षात जाणवणारा बदल आहे. आम्ही केवळ योजनांद्वारे ईशान्येशी संबंध निर्माण केले नाहीत, तर आम्ही हृदयाशी संबंध निर्माण केले आहेत. मी तुम्हाला सांगत असलेले आकडे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातशे वेळा, म्हणजे 700  पेक्षा जास्त वेळा आपल्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी ईशान्येला भेट दिली आहे. आणि माझा नियम असा होता की मी केवळ जाऊन परत येऊ नये, तर रात्री राहणे सक्तीचे होते. त्यांनी ती माती अनुभवली, लोकांच्या डोळ्यात आशा पाहिली आणि त्या विश्वासाचे विकास धोरणात रूपांतर केले. आम्ही केवळ विटा आणि सिमेंटच्या बाबतीत पायाभूत सुविधांकडे पाहिले नाही; आम्ही ते भावनिक जोडणीचे माध्यम बनवले. आपण 'लुक ईस्ट'च्या पलीकडे गेलो आणि 'अ‍ॅक्ट ईस्ट'चा मंत्र पाळला आणि आज त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. एक काळ असा होता जेव्हा ईशान्येला फक्त सरहद्द प्रदेश म्हटले जात असे. आज ते विकासाचे अग्रणी स्थान बनत आहे.

 

मित्रांनो,

चांगल्या पायाभूत सुविधा पर्यटनाला आकर्षक बनवतात. जिथे पायाभूत सुविधा चांगल्या असतात तिथे गुंतवणूकदारांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. चांगले रस्ते, चांगली वीज, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स नेटवर्क हे कोणत्याही उद्योगाचा कणा असतात. व्यापार फक्त तिथेच वाढतो जिथे अखंड कनेक्टिव्हिटी असते, म्हणजेच चांगल्या पायाभूत सुविधा ही प्रत्येक विकासाची पहिली अट असते, त्याचा पाया असतो. म्हणूनच आम्ही ईशान्येकडील भागात पायाभूत सुविधा सुधारण्यात क्रांती आणली. ईशान्येकडील प्रदेश बराच विविध अभावत होता. पण आता, ईशान्य संधींची भूमी बनत आहे. ईशान्येकडील कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांवर आम्ही लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत. जर तुम्ही अरुणाचलला गेलात तर तुम्हाला सेला बोगद्यासारख्या पायाभूत सुविधा आढळतील. जर तुम्ही आसामला गेलात तर तुम्हाला भूपेन हजारिका पुलसारखे अनेक मेगा प्रोजेक्ट दिसतील. फक्त एका दशकात, ईशान्येकडे 11 हजार किलोमीटरचे नवीन महामार्ग बांधले गेले आहेत.

ईशान्येकडील भागात शेकडो किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आले आहेत, विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांवर जलमार्ग बांधले जात आहेत. शेकडो मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत आणि इतकेच नाही तर 1600 किमी लांबीची ईशान्य गॅस ग्रिड पाइपलाइन देखील निर्माण करण्यात आली आहे. यामुळे उद्योगाला आवश्यक गॅस पुरवठा सुनिश्चित होतो. म्हणजेच, महामार्ग, रेल्वे, जलमार्ग या सर्व मार्गांनी ईशान्येकडील संपर्कव्यवस्था मजबूत होत आहे. ईशान्येकडील भागात एक पृष्ठभूमी तयार झाली आहे, आपल्या उद्योगांनी पुढे जावे आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. तुम्हाला फर्स्ट मूव्हर अॅडव्हान्टेज चुकवायचा नाहीये.

मित्रांनो,

येत्या दशकात ईशान्येकडील व्यापार क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. आज भारत आणि आसियान यांच्यातील व्यापार अंदाजे 125 अब्ज डॉलर्सचा आहे. येत्या काही वर्षांत तो 200 अब्ज डॉलर्स चा टप्पा ओलांडेल. ईशान्य भारत या व्यापारासाठी एक मजबूत पूल बनेल आणि आसियानसाठी व्यापाराचे प्रवेशद्वार बनेल, आणि यासाठी आम्ही आवश्यक पायाभूत सुविधांवर वेगाने काम करत आहोत. भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग म्यानमारमार्गे थायलंडला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे थायलंड, व्हिएतनाम, लाओस सारख्या देशांशी भारताची कनेक्टिव्हिटी सुलभ होईल. आमचे सरकार कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा प्रकल्प कोलकाता बंदर म्यानमारमधील सिटवे बंदराशी आणि उर्वरित ईशान्येकडील भाग मिझोरममार्गे जोडेल. यामुळे पश्चिम बंगाल आणि मिझोरममधील अंतर बरेच कमी होईल. हे उद्योग आणि व्यापारासाठीही एक मोठे वरदान ठरेल.

मित्रांनो,

आज, गुवाहाटी, इंफाळ, आगरतळा सारखी शहरे देखील मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित केली जात आहेत. मेघालय आणि मिझोरममधील लँड कस्टम स्टेशन्स आता आंतरराष्ट्रीय व्यापाराला नवीन विस्तार देत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे, ईशान्य भारत हे इंडो पॅसिफिक देशांमध्ये व्यापाराचे नवे ठिकाण बनणार आहे. याचा अर्थ ईशान्येकडील भागात तुमच्यासाठी शक्यतांचे एक नवीन आकाश मोकळे होणार आहे.

 

मित्रांनो,

आज आपण भारताला जागतिक आरोग्य आणि आरोग्यदायक उपाययोजना प्रदाता म्हणून उभे करत आहोत. Heal in India, Heal by India हा मंत्र वैश्विक मंत्र व्हावा, हाच आपला प्रयत्न आहे. उत्तर पूर्व भारतामध्ये निसर्गही आहे आणि सेंद्रिय जीवनशैलीसाठी ते एक परिपूर्ण ठिकाण देखील आहे. तेथील जैवविविधता, तेथील हवामान, आरोग्यदायी जीवनासाठी औषधासारखे आहे. त्यामुळे, Heal in India या अभियानात गुंतवणूक करण्यासाठी, मी असे समजतो की तुम्ही नक्कीच उत्तर पूर्वेकडे पहावे.

मित्रांनो,

उत्तर पूर्वेच्या संस्कृतीमध्येच संगीत आहे, नृत्य आहे, साजरे करण्यासाठी लागणारी एक उत्सवप्रियता आहे; त्यामुळे जागतिक परिषदा असोत, मैफीली असोत, किंवा विशिष्ट ठिकाणी आयोजित केलेले विवाह सोहळे असो, यासाठीसुद्धा उत्तर पूर्व एक उत्तम ठिकाण आहे. एका अर्थाने उत्तर पूर्व पर्यटनासाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे. आता उत्तर पूर्व भारतात विकासाचा लाभ कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम पर्यटनावर होत आहे. तेथे पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि हे केवळ आकडे नाहीत, त्यामुळे गावागावांमध्ये घरगुती निवास व्यवस्था तयार होत आहेत, मार्गदर्शक म्हणून तरुणांना नवी संधी मिळत आहे. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हलचे संपूर्ण इकोसिस्टम विकसित होत आहे. आता आपल्याला हे आणखी उच्च पातळीवर घेऊन जायचे आहे. पर्यावरण केंद्रीत पर्यटनामध्ये, सांस्कृतिक पर्यटनामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक नवे पर्याय उपलब्ध होत आहेत.

 

मित्रांनो,

उत्तर पूर्वेच्या संस्कृतीमध्येच संगीत आहे, नृत्य आहे, साजरे करण्यासाठी लागणारी एक उत्सवप्रियता आहे; त्यामुळे जागतिक परिषदा असोत, मैफीली असोत, किंवा विशिष्ट ठिकाणी आयोजित केलेले विवाह सोहळे असो, यासाठीसुद्धा उत्तर पूर्व एक उत्तम ठिकाण आहे. एका अर्थाने उत्तर पूर्व पर्यटनासाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे. आता उत्तर पूर्व भारतात विकासाचा लाभ कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम पर्यटनावर होत आहे. तेथे पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि हे केवळ आकडे नाहीत, त्यामुळे गावागावांमध्ये घरगुती निवास व्यवस्था तयार होत आहेत, मार्गदर्शक म्हणून तरुणांना नवी संधी मिळत आहे. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हलचे संपूर्ण इकोसिस्टम विकसित होत आहे. आता आपल्याला हे आणखी उच्च पातळीवर घेऊन जायचे आहे. पर्यावरण केंद्रीत पर्यटनामध्ये, सांस्कृतिक पर्यटनामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक नवे पर्याय उपलब्ध होत आहेत.

 

मित्रांनो,

कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी सर्वात जास्त आवश्यक जे असते ते म्हणजे शांतता आणि कायदा-सुव्यवस्था. दहशतवाद असो किंवा अशांतता पसरवणारे माओवादी, आपले सरकार झिरो टॉलरन्स या नीतीवर काम करते. एक काळ होता, जेव्हा उत्तर पूर्व भारतासोबत बॉम्ब-गन आणि ब्लॉकेड हीच ओळख जोडली गेली होती. 'उत्तर पूर्व' म्हटले की बॉम्ब-गन आणि ब्लॉकेड हेच आठवायचे. याचा खूप मोठा तोटा तेथील युवकांना सहन करावा लागला. त्यांच्या हातून असंख्य संधी निघून गेल्या. आपले लक्ष उत्तर पूर्वेतील तरुणांच्या भविष्यावर आहे. म्हणूनच आम्ही एकामागोमाग एक शांती करार केले, आणि तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली. गेल्या 10-11 वर्षांत, 10 हजारांहून अधिक युवकांनी शस्त्र सोडून शांतीचा मार्ग स्वीकारला आहे. विचार करा तब्बल दहा हजार युवकांनी… आज उत्तर पूर्वेतील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशातच रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी नवनवीन संधी मिळत आहेत. मुद्रा योजनाने उत्तर पूर्वेतील लाखो युवकांना हजारो कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

 

मित्रांनो,

कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी सर्वात जास्त आवश्यक जे असते ते म्हणजे शांतता आणि कायदा-सुव्यवस्था. दहशतवाद असो किंवा अशांतता पसरवणारे माओवादी, आपले सरकार झिरो टॉलरन्स या नीतीवर काम करते. एक काळ होता, जेव्हा उत्तर पूर्व भारतासोबत बॉम्ब-गन आणि ब्लॉकेड हीच ओळख जोडली गेली होती. 'उत्तर पूर्व' म्हटले की बॉम्ब-गन आणि ब्लॉकेड हेच आठवायचे. याचा खूप मोठा तोटा तेथील युवकांना सहन करावा लागला. त्यांच्या हातून असंख्य संधी निघून गेल्या. आपले लक्ष उत्तर पूर्वेतील तरुणांच्या भविष्यावर आहे. म्हणूनच आम्ही एकामागोमाग एक शांती करार केले, आणि तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली. गेल्या 10-11 वर्षांत, 10 हजारांहून अधिक युवकांनी शस्त्र सोडून शांतीचा मार्ग स्वीकारला आहे. विचार करा तब्बल दहा हजार युवकांनी… आज उत्तर पूर्वेतील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशातच रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी नवनवीन संधी मिळत आहेत. मुद्रा योजनाने उत्तर पूर्वेतील लाखो युवकांना हजारो कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's IT industry to hit $315 billion in FY26 as AI revenues reach $10-12 billion: Nasscom

Media Coverage

India's IT industry to hit $315 billion in FY26 as AI revenues reach $10-12 billion: Nasscom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Condoles the Passing of Thiru R. Nallakannu
February 25, 2026

The Prime Minister has expressed his condolences over the passing of Thiru R. Nallakannu, highlighting his grassroots connect and his tireless efforts to give a voice to the underprivileged.

The Prime Minister noted that Thiru R. Nallakannu was widely respected by people from every section of society and his simplicity was noteworthy. The Prime Minister shared that his thoughts are with the family and admirers during this time.

The Prime Minister shared on X;

"Thiru R. Nallakannu will be remembered for his grassroots connect and efforts to give voice to the underprivileged, workers and farmers. He was widely respected by people from every section of society. Equally noteworthy was his simplicity. My thoughts are with his family and admirers."