पंतप्रधान कुर्नूलमध्ये सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार
उद्योग, वीज पारेषण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह विविध क्षेत्रांमधील प्रकल्पांचा यात समावेश
पंतप्रधान श्रीशैलम येथील श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करणार आणि दर्शन घेणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे स्मरण करण्यासाठी पंतप्रधान श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11:15 च्या सुमारास, ते नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम स्थित श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करून  दर्शन घेतील.  त्यानंतर, दुपारी 12:15  वाजता ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.

त्यानंतर पंतप्रधान कुर्नूलला जातील, तिथे ते दुपारी 2:30 वाजता सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण  करतील. याप्रसंगी ते एका जाहीर  सभेलाही संबोधित करतील.

श्रीशैलम येथे पंतप्रधान

पंतप्रधान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करतील आणि दर्शन घेतील. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच मंदिर परिसरात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे सहअस्तित्व असून ते अशा प्रकारचे संपूर्ण देशातील एकमेव आहे.

पंतप्रधान श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला देखील भेट देतील, हे एक स्मारक संकुल आहे ज्यामध्ये ध्यान मंदिर (ध्यानधारणा सभागृह) समाविष्ट आहे ज्यामध्ये चार कोपऱ्यांमध्ये चार प्रतिष्ठित किल्ले - प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी यांच्या प्रतिकृती  आहेत. त्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यानस्थ पुतळा आहे. हे केंद्र श्री शिवाजी स्मारक समितीद्वारे चालवले जाते, जे 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पवित्र मंदिराला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ श्रीशैलम येथे स्थापन करण्यात आले.

 

पंतप्रधान कुरनूल येथे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. हे प्रकल्प उद्योग, वीज पारेषण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील आहेत, ज्यातून प्रादेशिक पायाभूत सुविधा वाढवणे, औद्योगिकीकरणाला गती देणे आणि राज्यात समावेशक सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणण्याप्रती  सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होते.

पंतप्रधान कुरनूल-III पूलिंग स्टेशन येथे 2,880  कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या पारेषण व्यवस्था मजबुतीकरणाची पायाभरणी करतील. या प्रकल्पात 765 केव्ही डबल-सर्किट कुरनूल-III पूलिंग स्टेशन-चिलाकलुरिपेटा पारेषण लाइनचे बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन क्षमता 6,000 एमव्हीएने वाढेल आणि देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात पारेषण  सक्षम होईल.

पंतप्रधान कुर्नूलमधील ओरवाकल औद्योगिक क्षेत्र आणि कडापा येथील कोप्पर्थी औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी देखील करतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये एकूण गुंतवणूक सुमारे 4,920 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे अत्याधुनिक, बहुऔद्योगिक केंद्र राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्ट (एनआयसीडीआयटी) तसेच आंध्र प्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ लिमिटेड (एपीआयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे. या केंद्रात प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा आणि वॉक-टू-वर्क संकल्पना असलेली रचना करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील, परिणामी आंध्र प्रदेशच्या रायलसीमा प्रदेशात औद्योगिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल.

रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, पंतप्रधान सब्बावरम ते शीलानगर पर्यंत 960 कोटी रुपये खर्चाच्या सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्गाची पायाभरणी करतील. विशाखापट्टणममधील वाहतूक कोंडी कमी करणे तसेच व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, एकूण 1,140 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या सहा रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल, ज्यामध्ये पिलेरू-कलूर विभागाचे चौपदरीकरण, कडापा/नेल्लोर सीमेपासून सीएस पुरमपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्ग-165 वरील गुडीवाडा आणि नुजेला रेल्वे स्थानकांदरम्यानचा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी), राष्ट्रीय महामार्ग-716 वरील पापाग्नी नदीवरील मोठा पूल, राष्ट्रीय महामार्ग-565 वरील कानिगिरी बायपास आणि राष्ट्रीय महामार्ग-544DD वरील एन. गुंडलपल्ली टाउन बायपास विभागाची सुधारणा यांचा समावेश आहे. हे प्रकल्प सुरक्षितता वाढवतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि आंध्र प्रदेशातील प्रादेशिक संपर्क अधिक बळकट करतील.

पंतप्रधान 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रमुख रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्रसमर्पण करतील. या प्रकल्पांमध्ये कोट्टावलसा-विजियानगरम चौथ्या रेल्वे मार्गाची पायाभरणी, पेंडुर्ती आणि सिम्हाचलम उत्तर दरम्यान रेल्वे उड्डाणपूलाची पायाभरणी, तसेच कोट्टावलसा-बोद्दावरा विभाग आणि शिमिलीगुडा-गोरापूर विभागाच्या दुहेरीकरणाचे राष्ट्रार्पण यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासी आणि मालवाहतुकीची गती आणि सुरक्षितता वाढेल, तसेच औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक समुदायासाठी रोजगारांच्या संधी निर्माण होतील.

ऊर्जा क्षेत्रात, पंतप्रधान गेल इंडिया लिमिटेडची श्रीकाकुलम-अंगुल नैसर्गिक वायू पाइपलाइन राष्ट्राला समर्पित करतील. ही पाईपलाईन एकूण 1,730 कोटी रुपये खर्चून टाकण्यात आली आहे, त्यापैकी आंध्र प्रदेशात सुमारे 124 किमी आणि ओडिशामध्ये 298 किमी लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पंतप्रधान आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे इंडियन ऑइलच्या 60 टीएमटीपीए (हजार मेट्रिक टन प्रतिवर्ष) एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील, जो सुमारे 200 कोटी रुपये गुंतवणुकीतून स्थापन झाला आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये, तामिळनाडूतील दोन जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात 80 वितरकांद्वारे 7.2 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देईल. या प्रदेशातील घरे आणि व्यवसायांसाठी विश्वासार्ह एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

संरक्षण उत्पादन मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सुमारे 360 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत कृष्णा जिल्ह्यातील निम्मलुरु येथे उभारलेल्या प्रगत नाईट व्हिजन उत्पादनांच्या कारखान्याचे राष्ट्रार्पण करतील. या कारखान्यात भारतीय संरक्षण दलांसाठी प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणालीचे उत्पादन होणार असून त्यामुळे संरक्षण उत्पादनात क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढेल आणि या प्रदेशात कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।