देशभरात संपूर्ण वंदे मातरम गीताचे होणार गायन
या निमित्ताने पंतप्रधान करणार स्मृती तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 

या निमित्ताने पंतप्रधान एका स्मरण तिकीटाचे आणि नाण्याचे देखील प्रकाशन करणार आहेत.  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या वर्षात देशभरात होणाऱ्या स्मरणोत्सवाची  ही औपचारिक सुरवात असेल.

या सोहळ्यात सकाळी 9.50 च्या सुमाराला मुख्य कार्यक्रमाच्या सोबत “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण रचनेचे सार्वजनिक स्थानांवर समाजातील सर्व स्तरांमधील नागरिकांच्या सहभागाने सामूहिक गायन होणार आहे.

2025 या वर्षात वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “वंदे मातरम्” या आपल्या राष्ट्रीय गीताची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या शुभ दिनी केली होती. वंदे मातरम् सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून 'बंगदर्शन' या साहित्यिक नियतकालिकात  प्रकाशित झाले. मातृभूमीला सामर्थ्य, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणारे हे गीत भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि आत्मसन्मानाच्या भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देत होते. हे गीत लवकरच राष्ट्रासाठी भक्तीचे अखंड प्रतीक बनले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Ordinary ‘unsung’ Indians get one-third of Padma awards

Media Coverage

Ordinary ‘unsung’ Indians get one-third of Padma awards
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of Republic Day
January 26, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi said that Republic Day is a powerful symbol of India’s freedom, Constitution and democratic values. He noted that the occasion inspires the nation with renewed energy and motivation to move forward together with a firm resolve towards nation-building.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam on the occasion-
“पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः। अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥”

The Subhashitam conveys that a nation that is dependent or under subjugation cannot progress. Therefore, only by adopting freedom and unity as our guiding principles can the progress of the nation be ensured.

The Prime Minister wrote on X;

“गणतंत्र दिवस हमारी स्वतंत्रता, संविधान और लोकतांत्रिक मूल्यों का सशक्त प्रतीक है। यह पर्व हमें एकजुट होकर राष्ट्र निर्माण के संकल्प के साथ आगे बढ़ने की नई ऊर्जा और प्रेरणा देता है।

पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः।

अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥”