पंतप्रधानांच्या हस्ते होणार 600 पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांचे उद्घाटन
खतांची किरकोळ विक्री करणारी दुकाने टप्प्या टप्प्याने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांत परिवर्तीत केली जाणार, शेतकऱ्यांच्या विविध गरजा भागवणार
शेतकऱ्यांचे कल्याण करण्याच्या पंतप्रधानांच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब असलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत पंतप्रधान 16,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार
आजपर्यंत पीएम - किसान अंतर्गत 2 लाख कोटींपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आला आहे.
पंतप्रधान ‘भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प - एक देश एक खत’ या योजनेचा शुभारंभ करणार, पंतप्रधानांच्या हस्ते भारत युरिया बॅग्ज उपक्रमाचीही होणार सुरुवात
कृषी क्षेत्रात स्टार्टअप व्यवस्थेला चालना देण्यासाठी, पंतप्रधान ॲग्री स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय ‘पीएम पंतप्रधान शेतकरी सन्मान संमेलन 2022’ चे सकाळी 11.30 वाजता नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्था इथे उद्घाटन करतील.

या कार्यक्रमात देशभरातून 13,500 पेक्षा जास्त शेतकरी तसेच 1500 कृषी स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विविध संस्थांशी संबंधित 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. या संमेलनात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर हितसंबंधीय देखील सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते, रसायने आणि खते मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत, 600 पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांचे उद्घाटन होईल. देशातील खतांची किरकोळ विक्री करणारी दुकाने टप्प्याटप्प्याने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांत परिवर्तीत केली जातील. या केंद्रांतून शेतकऱ्यांच्या विविध गरजा भागवल्या जातील आणि शेतीला लागणारी सामुग्री (खते, बियाणे, उपकरणे), मृदा चाचणी सुविधा पुरवल्या जातील. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली जाईल, विविध सरकारी योजनांची माहिती दिली जाईल तसेच गट/जिल्हा स्तरावर असलेल्या खत दुकानदारांचा नियमित कौशल्यविकास केला जाईल. येत्या काळात 3.3 लाखांहून जास्त किरकोळ खत विक्री केंद्रे पंतप्रधान शेतकरी सन्मान केंद्रात रूपांतरित करण्याची योजना आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान ‘भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प - एक देश एक खत’ योजनेचेही उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत पंतप्रधान भारत युरिया बॅग्सची सुरवात करतील. यामुळे ‘भारत’ या ब्रॅन्डनेमने कंपन्यांना आपल्या खतांचे विपणन करण्यात मदत मिळेल. शेतकरी कल्याणासाठी पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे प्रतिबिंब म्हणून या कार्यक्रमात पंतप्रधान, ‘प्रधानमंत्री थेट लाभ हस्तांतरण’ प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी सन्मान निधीचा 16,000 रुपयांचा 12 वा हप्ता जारी करतील. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना 2000 रुपयांचे तीन हप्ते असा वार्षिक 6000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. आजपर्यंत, पात्र शेतकऱ्यांना पीएम - किसान योजनेअंतर्गत 2 लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळाला आहे.

या प्रसंगी पंतप्रधान कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. जवळपास 300 स्टार्टअप्स अचूक शेती, कापणी नंतरची काळजी आणि मूल्यवर्धन उपाययोजना, कृषी संलग्न व्यवसाय, कचऱ्यातून संपत्ती, लहान शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी लॉजिस्टिक व्यवस्था आणि आपले इतर नवोन्मेष या प्रदर्शनात मांडतील. या मंचावरून स्टार्टअप्स शेतकऱ्यांशी, शेती उत्पादन संस्था, कृषी तज्ञ, कॉर्पोरेट कंपन्या यांच्याशी  संवाद साधू शकतील. तांत्रिक सत्रात स्टार्टअप्स आपले अनुभव सांगू शकतील आणि इतर हितसंबंधियांशी चर्चा करू शकतील.

या कार्यक्रमात, पंतप्रधान ‘इंडियन ईगल’ या खत विषयक ई - मासिकाचे प्रकाशन करतील. यातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खते आणि या क्षेत्रातील इतर घडामोडींची माहिती मिळेल, इतर मुद्द्यांसोबतच  अलीकडच्या घडामोडी, किंमत विषयक कल, उपलब्धता आणि वापर, शेतकऱ्यांच्या यशोगाथा याविषयी माहिती असेल.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein

Media Coverage

Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.