जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये लावले पिंपळाचे झाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेचा आज प्रारंभ  केला.  पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावले. आपल्या पृथ्वीला अधिक उत्तम करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना यावेळी केले. गेल्या दशकात, भारताने अनेक असे सामूहिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे  संपूर्ण देशभरातील वनक्षेत्र वाढले आहे, असे  त्यांनी यावेळी सांगितले.  हे आपल्या शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेल्या  प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी  आपल्या X  पोस्टवर लिहिले आहे;

“आज, जागतिक पर्यावरण दिवस, यानिमित्ताने #एक_पेड़_माँ_के_नाम ही मोहीम सुरू करताना मला आनंद होत आहे. मी भारतातील आणि जगभरातील प्रत्येकाला आवाहन करतो की, तुमच्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून  म्हणून येत्या काळात एक झाड लावा.  ही तुमच्याकडून आईसाठी अनमोल भेट ठरेल.  यासंबधीची छायाचित्रे  #Plant4Mother किंवा #एक_पेड़_माँ_के वापरून  शेअर करा.

 

''आज सकाळी, मी निसर्ग मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली निवडण्याच्या आपल्या  वचनबद्धतेनुसार एक झाड लावले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, की आपण आपल्या पृथ्वीला  अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी आपणही योगदान द्यावे.  #Plant4Mother #एक_पेड़_माँ_के_नाम”

 

“आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब म्हणजे  गेल्या दशकात, भारताने अनेक सामूहिक प्रयत्न केले.  त्यामुळे देशभरात वनक्षेत्रात वाढ झाली आहे.  शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेल्या आपल्या  प्रयत्नांचे  हे उत्तम उदाहरण आहे. स्थानिक समुदायांनी यासाठी घेतलेला पुढाकार  कौतुकास्पद आहे. ''

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."