आदरणीय राष्ट्रपति मुइज्जू,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांतील आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार!

सर्वात आधी मी राष्ट्रपती मुइज्जू आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करतो.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध शतकानुशतके जुने आहेत. आणि भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जिवलग मित्र आहे. आमच्या "नेबरहुड फर्स्ट" धोरणामध्ये आणि "सागर" दृष्टीकोनानुसार मालदीवचे स्थान महत्त्वाचे आहे, या दोन्ही बाबतीत भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादकाची भूमिका बजावली आहे.

मालदीवच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, भारताने एक शेजारी म्हणून नेहमीच आपली जबाबदारी पार पाडली आहे. आणि आज आम्ही आमच्या परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी “व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीचा” दृष्टीकोन स्वीकारला आहे.

 

मित्रहो,

विकासासाठी भागीदारी हा आमच्या परस्पर संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या प्राधान्यांना प्राधान्य दिले आहे. या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मालदीवच्या 100 दशलक्ष डॉलर्सच्या सरकारी ट्रेझरी बिल्स'चे सदस्यत्व घेतले आहे. मालदीवच्या आवश्यकतेनुसार, 400 दशलक्ष डॉलर्स आणि तीन हजार कोटी रुपयांचा चलन स्वॅप करार देखील करण्यात आला आहे.

आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वसमावेशक सहकार्याबद्दल चर्चा केली आहे. आज आम्ही पुनर्विकसित हनीमधू विमानतळाचे उद्घाटन केले. आता ग्रेटर ‘माले’ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या कामालाही वेग येणार आहे. थिलाफुशी मधील नवीन व्यावसायिक बंदराच्या विकासासाठी देखील सहाय्य केले जाईल.

भारताच्या सहकार्याने बांधलेली 700 पेक्षा जास्त सामाजिक गृहनिर्माण एकके आज सुपूर्द करण्यात आली आहेत. मालदीवच्या 28 बेटांवर पाणी आणि सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. इतर सहा बेटांवरचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांमुळे तीस हजार लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

"हा दालू" येथे कृषी आर्थिक क्षेत्र आणि "हा अलिफु" येथे मत्स्य प्रक्रिया सुविधेच्या स्थापनेसाठी देखील सहकार्य केले जाईल. आम्ही समुद्रशास्त्र आणि नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातही एकत्र काम करणार आहोत.

मित्रहो,
आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारातील तडजोडी स्थानिक चलनात करण्याबाबतही काम केले जाईल. आम्ही डिजिटल कनेक्टिव्हिटीवर सुद्धा भर दिला आहे.

मालदीवमध्ये नुकताच रुपे कार्डचा शुभारंभ करण्यात आला. आगामी काळात भारत आणि मालदीव यांनाही युपीआय द्वारे जोडण्याचे काम केले जाईल. आम्ही अड्डू येथे भारताचा नवीन वाणिज्य दूतावास आणि बेंगळुरूमध्ये मालदीवचा नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे. या सर्व उपक्रमांमुळे आमच्या दोन्ही देशांमधल्या लोकांचे परस्पर संबंध दृढ होतील.

 

मित्रहो,

आम्ही संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी आम्ही आमचे सहकार्य सुरू ठेवू. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू. जलविज्ञाान आणि आपत्ती प्रतिसादाच्या कामी सहकार्य वाढवले जाईल. कोलंबो सुरक्षा परिषदेत संस्थापक सदस्य म्हणून समाविष्ट होणाऱ्या मालदीवचे स्वागत आहे. हवामानातील बदल हे आपल्या दोन्ही देशांसाठी मोठे आव्हान आहे. या संदर्भात भारत सौर आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आपले अनुभव मालदीवला सांगण्यास तयार आहे.

 

आदरणीय महोदय,

पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत आहे. तुमची ही भेट आपल्या परस्पर संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करणारी आहे. मालदीवच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत राहू.

 

आदरणीय महोदय,

पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत आहे. तुमची ही भेट आपल्या परस्पर संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करणारी आहे. मालदीवच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत राहू.
    
खूप खूप धन्यवाद.

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways renews 54,600 km of tracks since 2014, boosting speed potential and safety

Media Coverage

Indian Railways renews 54,600 km of tracks since 2014, boosting speed potential and safety
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Shri Narendra Modi speaks with the President of Iran
March 12, 2026
President Pezeshkian shares his perspective on the situation in Iran and the region.
PM reiterates India’s consistent position on resolving all issues through dialogue and diplomacy.
PM highlights India’s priority regarding safety and well-being of Indian nationals and unhindered transit of energy and goods.

Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the President of the Islamic Republic of Iran, H.E. Dr. Masoud Pezeshkian.

President Pezeshkian briefed the Prime Minister on the current situation in Iran and shared his perspective on recent developments in the region.

The Prime Minister expressed deep concern about the evolving security situation in the region and reiterated India’s consistent position that all issues must be resolved through dialogue and diplomacy.

The Prime Minister highlighted India’s priority regarding the safety and well-being of Indian nationals in the region, including in Iran, as also the importance of unhindered transit of energy and goods.

The two leaders agreed to remain in touch.