महामहीम,आदरणीय अध्यक्ष,

दोन्ही देशांचे सन्माननीय प्रतिनिधी,

माध्यमक्षेत्रातले मित्र,

नमस्कार !

कालीम्मेरा !

सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी  आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.  

थोड्याच वेळापूर्वी सायप्रसचा प्रतिष्ठेचा सन्मान मला प्रदान करण्यात आला. हा सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर  140 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. भारत आणि सायप्रस यांच्यातल्या अतूट संबंधांचे हे प्रतिक आहे.या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. 

मित्रहो,

सायप्रससमवेतच्या संबंधाना आम्ही अतिशय महत्व देतो. लोकशाही आणि कायद्याचे राज्य या मुल्यांप्रती आपली सामायिक कटीबद्धता हा आपल्या भागीदारीचा भक्कम पाया आहे.भारत आणि सायप्रस यांच्यातली मैत्री ही परिस्थितीजन्य किंवा सीमांनी बद्ध नव्हे. तर

काळाच्या कसोटीवर पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली मैत्री आहे. प्रत्येक काळात आम्ही सहकार्य,आदर आणि परस्पर समर्थनाची भावना जपली आहे. परस्परांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आम्ही सन्मान केला आहे.

मित्रहो,  

गेल्या दोन दशकात भारताच्या पंतप्रधानांनी सायप्रसला दिलेली ही पहिली भेट आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याची ही सुवर्णसंधी आहे. माननीय राष्ट्राध्यक्ष आणि मी आज दोन्ही देशांच्या  भागीदारीच्या सर्व पैलूंवर विस्तृत चर्चा केली.

सायप्रसचे ‘व्हिजन 2035’ आणि आपला ‘विकसित भारत 2047’ हा दृष्टीकोन यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. म्हणूनच आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी आपण एकत्र काम करायला हवे. आपल्या भागीदारीला धोरणात्मक दिशा देण्यासाठी येत्या पाच वर्षांकरिता आम्ही मजबूत  आराखडा विकसित करू.

संरक्षण आणि सुरक्षा सहयोग आणखी दृढ करण्यासाठी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य कार्यक्रमाअंतर्गत संरक्षण उद्योग सहयोगावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.सायबर  आणि सागरी सुरक्षेवर वेगळा संवाद सुरु करण्यात येईल.

सीमापार दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्याला सातत्याने पाठींबा दिल्याबद्दल आम्ही सायप्रसचे आभारी आहोत.दहशतवाद,अंमली पदार्थ आणि शस्त्रांस्त्रांची तस्करी यांना आळा  घालण्यासाठी तात्काळ माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी  आमच्या संबंधित एजन्सीमध्ये यंत्रणा उभारण्यात येईल. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वृद्धीसाठी अपार संधी आहेत यावर दोन्ही देश सहमत आहेत.

माननीय राष्ट्राध्यक्षांसमवेत काल संवाद साधताना दोन्ही देशांच्या  आर्थिक संबंधांबाबत व्यापार समुदायामध्ये मला मोठा उत्साह आणि उर्जा जाणवली.या वर्षीच्या अखेरपर्यंत परस्पराना लाभदायक भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करार संपन्न करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

या वर्षी ‘भारत-सायप्रस-ग्रीस व्यापार आणि गुंतवणूक परिषद’सुरु झाली आहे.असे उपक्रम द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देतील.

तंत्रज्ञान,नवोन्मेश,आरोग्य,कृषी,नविकरणीय उर्जा आणि न्याय्य हवामान यासारख्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यावर आम्ही तपशीलवार चर्चा केली. सायप्रसमध्ये योग आणि आयुर्वेद लोकप्रिय होत असल्याबद्दल आम्ही उत्साहित आहोत.

भारतीय पर्यटकांसाठी सायप्रस हे पसंतीचे ठिकाण आहे. त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी थेट हवाई संपर्कासाठी आम्ही काम करू.मोबिलिटी कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या कामाला वेग देण्याचा निर्धार आम्ही केला आहे.  

मित्रहो,

युरोपियन महासंघामध्ये सायप्रस हा आमचा विश्वासार्ह भागीदार आहे. युरोपियन महासंघाच्या पुढच्या वर्षीच्या अध्यक्षपदासाठी आम्ही सायप्रसला शुभेच्छा देतो.आपल्या अध्यक्षतेखाली भारत-युरोपियन महासंघ संबंध नव्या उंचीवर पोहोचतील याचा आम्हाला विश्वास आहे.

संयुक्त राष्ट्र महासंघ अधिक  प्रातिनिधिक व्हावा यासाठी सुधारणांच्या आवश्यकतेवर  दोन्ही देशांचे विचार समान आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठींबा  देत असल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.  

पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षाबद्दल आम्ही चिंता व्यक्त केली आहे.या संघर्षाचा प्रतिकूल परिणाम केवळ त्यांच्या प्रदेशापुरताच मर्यादित नाही. हा युद्धाचा काळ नव्हे असे  आमचे दोघांचेही मत आहे.

संवाद आणि स्थैर्य पुन्हा स्थापित करणे ही मानवतेची हाक आहे. भूमध्य प्रदेशात  कनेक्टीव्हिटी वाढविण्यावरही आम्ही चर्चा केली. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर या प्रदेशात शांतता आणि समृद्धीचा मार्ग खुला करेल यावर आम्ही सहमत आहोत.

माननीय राष्ट्राध्यक्ष,

 मी,आपणाला भारतभेटीचे निमंत्रण देत आहे. लवकरच भारतात आपले स्वागत करण्याची संधी मिळेल अशी आशा करतो.

आपण केलेले  विशेष स्वागत आणि सन्मानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.   

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation

Media Coverage

India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust: PM Modi at G7 Summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।