आत्मनिर्भर भारताची मोहीम यशस्वी करण्यात, भारतीय उद्योगांची जबाबदारी मोठी : पंतप्रधान
ज्या भारतात आधी परदेशी गुंतवणुकीबाबत भय होते त्याच भारतात आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत होत आहे : पंतप्रधान
आज भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांवर लोकांचा विश्वास वाढतो आहे: पंतप्रधान
आपल्या देशाच्या उद्योगक्षेत्रावरील विश्वासामुळेच, देशात उद्योगपूरक वातावरण आणि जीवनमान सुकर होण्यास मदत. कंपनी कायद्यात केलेले बदल याचे सर्वात मोठे द्योतक : पंतप्रधान
आज देशात देशहितासाठी सर्वाधिक जोखीम पत्करणारे सरकार, आधीच्या सरकारांमध्ये राजकीय जोखीम पत्करण्याचे धैर्य नव्हते : पंतप्रधान
हे सरकार कठीण सुधारणा करू शकते कारण आमच्यासाठी सुधारणा हा जबरदस्तीचा नाही तर दृढनिश्चयाचा विषय : पंतप्रधान
पूर्वलक्षी कर रद्द करण्यामुळे सरकार आणि उद्योगांमधील विश्वास अधिक भक्कम होईल: पंतप्रधान

नमस्कार!

भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !

जगातिक महामारीच्या या काळात आजची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. या एवढ्या मोठ्या संकटकाळात आपण सरकार आणि भारतीय उद्योगजगतातील संबंध अधिक दृढ होतांना बघतो आहोत. मास्क, पीपीई, व्हेंटीलेटर्स पासून लसीकरणापर्यंत देशाला, ज्याची ज्याची गरज भासली, जेव्हा जेव्हा गरज भासली, त्यावेळी उद्योग जगताने पुढे येत आवश्यक ती सर्व मदत केली. उद्योग जगतातील आपण सर्व सहकारी, सर्व संघटना भारताच्या विकासगाथेचा एक महत्वाचा घटक कायमच राहिले आहात. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेते आहे.

      आज कदाचित एकही दिवस असा नसतो, ज्यावेळी नव्या संधींबाबत, कोणत्या न कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे वक्तव्य येत नाही, अथवा कुठला अहवाल येत नाही. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात,आज विक्रमी संख्येने लोकांना घेतले जात असल्याचे रिपोर्ट्स देखील आपण वाचतो आहोत. आज देशात सुरु असलेले डिजिटलीकरण आणि मागणीत होणाऱ्या वाढीचाच हा परिणाम आहे. अशा स्थितीत आपला प्रयत्न हा असायला हवा की आपण या नव्या संधींचा वापर करत, आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने दुप्पट वेगाने पुढे जाऊ.

मित्रांनो,  

सीआयआयची ही बैठक यावर्षी 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या वातावरणात,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे. भारतीय उद्योग जगताच्या नव्या संकल्पांसाठी, नवी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी, ही एक खूप मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाची खूप मोठी जबाबदारी भारतीय उद्योगांवर आहे. आणि म्हणूनच, मी आज तुम्हा लोकांना आश्वस्त करू इच्छितो, की सरकार तुमच्या सोबत आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांसोबत आहे, आज देशांत, विकासाबद्दल जे वातावरण निर्माण होत आहे, आपल्या सामर्थ्याविषयी जो विश्वास निर्माण झाला आहे त्याचा संपूर्ण लाभ, भारतीय उद्योग जगताने घ्यायला हवा. गेल्या काही वर्षात, भारतात जे बदल झाले आहेत, मग तो सरकारचा बदललेला विचार असो  किंवा दृष्टीकोन, त्याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेत आहात, बघत आहात, तुम्हाला ते जाणवत असेल. आजचा नवा भारत, नव्या जगासोबत चालण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. ज्या भारतात कधीकाळी परदेशी गुंतवणुकीविषयी आशंका, भीतीची भावना होती, त्याच भारतात आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जात आहे. ज्या भारताची करविषयक धोरणे कधीकाळी गुंतवणूकदारांमध्ये नैराश्य आणणारी होती, आज त्याच भारतात जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक कॉर्पोरेट करप्रणाली आहे आणि चेहराविरहित पारदर्शक करव्यवस्थाही  आहे.

 

ज्या भारतात, कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये अडकवून ठेवणे हीच नोकरशाहीची ओळख मानली जात असे, त्याच भारताने आज उद्योगपूरक वातावरणाच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. जिथे कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवले जात होते, तिथेच आज डझनावारी कायद्यांच्या जागी केवळ चार सुटसुटीत, सुस्पष्ट अशा कामगार संहिता आल्या आहेत. जिथे कधीकाळी कृषी क्षेत्राला केवळ उपजीविकेचे साधन मानले जात असे, तिथे आता कृषीक्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांच्या माध्यमातून भारतातील शेतकऱ्यांना देश-विदेशातील बाजारपेठांशी थेट जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज भारतात विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक येत आहे आणि एफ पी आय चे देखील नवे विक्रम रचले जात आहेत. आज देशातील परदेशी गंगाजळी देखील सर्वाधिक आहे. 

मित्रांनो,

नव्या भारताची विचार करण्याची पद्धत काय आहे याचे एक उदाहरण मला आपल्याला द्यायचे आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी आपल्याला वाटत असे की जे जे परदेशी आहे , ते सगळे उत्तमच !या मानसिकतेचा काय परिणाम होत असे, हे आपल्यासारख्या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना चांगलेच माहिती आहे. आपले स्वतःचे ब्रांड देखील, जे आपण अनेक वर्षांच्या परिश्रमातून तयार केले होते, त्यांची जाहिरात सुद्धा परदेशी नावाने केली जात असे. आज मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे. आज भारतात तयार झालेल्या उत्पादनांवर भारतीयांचा विश्वास आहे. कंपनी भारतीय नसली तरी चालेल, मात्र आज प्रत्येक भारतीयाला, भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी करण्याची इच्छा आहे. म्हणजे, देशाची मानसिकता आता बदलली आहे, आता उद्योगजगताला या बदललेल्या मानसिकतेनुसार, आपले धोरण तयार करायचे आहे, रणनीती तयार करायची आहे. आत्मनिर्भर भारत अभियान पुढे घेऊन जातांना आपल्याला याची मदत होणार आहे.

आणखी एक घटक आहे, ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. तो घटक म्हणजे, भारतीयांचा वाढता आत्मविश्वास ! हा आत्मविश्वास आपण  आज प्रत्येक क्षेत्रात बघतो आहोत. आता, अलीकडेच, ऑलिम्पिकच्या मैदानात आपण याचा अनुभव घेतला आहे. आज भारताचे युवक जेव्हा मैदानात उतरतात, त्यावेळी त्यांच्या मनात संकोच किंवा बुजरेपणा नसतो. त्यांना परिश्रम करायचे आहेत, त्यांना जोखीम पत्करायची आहे, त्यांना परिणाम हवे आहेत. ही जागा आपल्यासाठीही आहे, ही भावना आज आपल्या युवकांमध्ये आपण बघतो आहोत. याच प्रकारचा आत्मविश्वास आज भारताच्या स्टार्ट अप कंपन्यामध्ये आहे. आज युनिकॉर्न नव्या भारताची ओळख बनले आहेत. सात-आठ वर्षांपूर्वी भारतात 3 ते 4 युनिकॉर्न होते. आज भारतात सुमारे 60 युनिकॉर्न आहेत. यापैकी 21 युनिकॉर्न तर गेल्या काही महिन्यातच तयार झाले आहेत. आणि आणखी एक  गोष्ट आपण अनुभवली असेल, की हे सगळे युनिकॉर्न वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. आरोग्य-तंत्रज्ञान, सामाजिक-वाणिज्य अशा क्षेत्रात युनिकॉर्न तयार होणे म्हणजे भारतात प्रत्येक स्तरावर किती परिवर्तन घडते आहे, त्याचेच हे संकेत आहेत. व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी, आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सातत्याने वाढते आहे. इतक्या मोठ्या महामारीच्या काळातही आपल्या स्टार्ट अप्सच्या महत्वाकांक्षा बुलंद आहेत. गुंतवणूकदारांकडूनही स्टार्ट अप कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक बघायला मिळते आहे.

स्टार्ट अपची विक्रमी नोंदणी भारतीय कंपन्या आणि भारतीय बाजारपेठेसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे. भारतात विकासाच्या अमाप संधी आहेत, प्रचंड वाव आहे, याचेच हे द्योतक आहे.

मित्रांनो,  

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज देशात जो उत्साह आहे, तो सरकारला वेगाने सुधारणा करण्यासाठी प्रेरणा देत असतो. ज्या सुधारणा आमच्या सरकारने केल्या, ते काही सोपे निर्णय नव्हते. काही सर्वसामान्य बदल नव्हते, या सर्व सुधारणांची मागणी कित्येक दशकांपासून होत होती. यांची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले होते. या विषयांवर चर्चा तर खूप होत असे, मात्र निर्णय घेतले जात नसत. कारण अशी समजूत करुन घेतली होती, की हे बदल घडवणे खूप कठीण काम आहे. मात्र, आपणही पहिले आहे, की आम्ही तेच निर्णय दृढनिश्चयाने घेतले आहे. एवढेच नाही, तर, महामारीच्या या काळातही ही प्रक्रिया सुरूच ठेवली होती. आपण हेही बघितले असेल की संपूर्ण देशाने या निर्णयांना कसा पाठींबा दिला. जसे की व्यावसायिक कोळसा खाणक्षेत्राची सुरुवात करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रांच्या सहभागाला मुक्तपणे प्रोत्साहन दिले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मोठमोठ्या सुधारणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अवकाश आणि अणु ऊर्जा सारख्या क्षेत्रांत देखील खाजगी गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.

 

बिगर रणनीतीक क्षेत्रांसह, रणनीतीच्या, मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातही खाजगी क्षेत्रांना संधी दिली जात आहे.सरकारचे नियंत्रण कमी केले जात आहे. हे सगळे कठीण निर्णय आज शक्य झाले आहेत. कारण देश आपल्या खाजगी क्षेत्रावर, आपल्या सर्वांवर विश्वास ठेवतो आहे. जशा जशा या क्षेत्रात, आपल्या कंपन्या सक्रीय होतील , त्यात संधींचा विस्तार होईल. आमच्या युवकांना जास्तीत जास्त संधी मिळेल, अभिनव नवोन्मेषांचे नवे युग सुरु होईल.

 मित्रांनो ,

आपल्या उद्योगावरील देशाच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की आज व्यवसाय सुलभता वाढत आहे, आणि लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुधारत आहे. कंपनी कायद्यात झालेला बदल हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आज अशा कितीतरी तरतुदी हटवण्यात येत आहेत ज्या कधीकाळी आपल्या उद्योजकांसाठी डोकेदुखीपेक्षा कमी नव्हत्या. त्याचप्रमाणे  एमएसएमई क्षेत्राला देखील प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत जी त्यांना  सीमित करणाऱ्या बाबींपासून मुक्त करतील. राज्य स्तरीय सुधारणांकडे  देखील आज विशेष लक्ष दिले जात आहे.  राज्यांना  भागीदार बनवण्यात आले आहे आणि त्यांना अतिरिक्त खर्चाची सुविधा दिली जात आहे. मेक इन इंडिया बरोबरच रोजगार आणि निर्यातीला गती देण्यासाठी देशात  प्रभावी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना देखील सुरु केल्या आहेत. या सर्व सुधारणा आज होत आहेत कारण आज देशात जे  सरकार आहे, ते बळजबरीने सुधारणा करत नाही तर सुधारणा हा आमच्यासाठी दृढनिश्चयाचा विषय आहे. आजही आमच्या सुधारणांची गती कायम आहे. संसदेत चालू अधिवेशनात नुकतीच  अनेक विधेयके पारित झाली जी देशाच्या या प्रयत्नांना आणखी गती देतील.  फॅक्टरींग रेग्युलेशन सुधारणा विधेयकामुळे, छोट्या उद्योजकांना कर्ज मिळण्यात मदत होईल.  ठेव विमा आणि पत हमी महामंडळ दुरुस्ती विधेयक,’ छोट्या ठेवीदारांच्या अधिकारांचे  संरक्षण करेल. अगदी अलिकडेच आम्ही भूतकाळातील चुका दुरुस्त करून,  पूर्वलक्षी करप्रणाली देखील रद्द करण्याचा  निर्णय घेतला आहे.  आज उद्योगक्षेत्राकडून या निर्णयांचे कौतुक होत आहे हे पाहून मला विश्वास वाटतो की , सरकार आणि उद्योगक्षेत्रातील विश्वास अधिक दृढ होईल.

मित्रांनो ,

आज देशात असलेले सरकार देशहितासाठी मोठ्यात मोठी जोखीम पत्करण्यासाठी तयार आहे,तुम्हाला आठवत असेल, गेली अनेक वर्षे वस्तू आणि सेवा कायदा रखडला होता, कारण आधीच्या सरकारमध्ये राजकीय धोका पत्करण्याचे धैर्य  नव्हते.  आम्ही केवळ जीएसटीची अंमलबजावणीच केली नाही, तर आज देशात जीएसटीचे विक्रमी संकलन होतानाही आपण पाहत आहोत. अशी कितीतरी उदाहरणे मी तुम्हाला सांगू शकतो. आज तुमच्यासमोर असे सरकार आहे जे प्रत्येक निर्बंध दूर करत आहे, प्रत्येक सीमा वाढवत आहे. आज एक सरकार तुम्हाला विचारत आहे की भारतीय उद्योग जगताची ताकद वाढवण्यासाठी आता आणखी काय करायचे आहे हे सांगा ?

मित्रांनो  

आपले पूर्वज सांगून गेले आहेत -- नैकं चक्रं परिभ्रमति. म्हणजेच केवळ एका चाकाने गाडी चालू शकत  नाही.  सगळी चाके व्यवस्थित चालायला हवीत. म्हणूनच उद्योगांनीही जोखीम पत्करण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आणखी थोडीशी वाढवावी लागेल. आत्मनिर्भर भारतच्या  संकल्प सिद्धिसाठी नवीन आणि कठीण मार्गांची निवड देखील आपल्यालाच करावी लागेल. गुंतवणूक आणि रोजगाराची गती वाढवण्यासाठी उद्योग क्षेत्राकडूनही देशाच्या खूप अपेक्षा आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील वावर  तर्कसंगत आणि कमीतकमी करण्यासाठी नवीन सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग धोरणाच्या माध्यमातून निर्णय घेतले जात आहेत. यात उद्योगांकडूनही जास्तीत जास्त उत्साह आणि  ऊर्जा दिसायला हवी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशाने खूप मोठे पाऊल उचलले आहे. यात शाळा, कौशल्यापासून संशोधनापर्यंत एक नवीन परिसंस्था तयार करण्याची रूपरेषा आहे.  यातही उद्योग क्षेत्राची एक सक्रिय  भूमिका खूप आवश्यक आहे. विशेषतः संशोधन आणि विकासावर गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला अतिशय गंभीरतेने काम करायचे आहे.  आत्मनिर्भर भारतसाठी संशोधन आणि विकासातील आपली गुंतवणूक अनेक पटींनी वाढवावी लागेल. आणि हे केवळ सरकारी प्रयत्नांमधून शक्य नाही. यात उद्योगांची खूप मोठी भागीदारी आवश्यक आहे. आपले  लक्ष्य, ब्रँड इंडियाला मजबूत करण्याचे आहे. आपले  लक्ष्य, देशाला  समृद्धि आणि सन्मान देण्याचे आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला आपली भागीदारी मजबूत करायची आहे. मी तुमच्या प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी , तुमच्या प्रत्येक सूचनेसाठी नेहमीच उपलब्ध होतो आणि यापुढेही असेन. मी पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव कार्यकाळात तुम्हालाही अनेक अमृत संकल्प करण्याची प्रेरणा मिळो अशी कामना करतो. तुम्ही सगळे संकल्प आणि नवीन  ऊर्जेसह पुढे या. तुम्हा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.  धन्यवाद।

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
 PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs

Media Coverage

PLI schemes attract over Rs 2.16 lakh crore investment, generate 14.39 lakh jobs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28, 2026
The inauguration of Phase-I of Noida International Airport marks a major step in Uttar Pradesh’s growth story and India’s aviation future: PM
UP has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM
Airports are not just basic facilities in any country, they give wings to progress: PM
Our government is making unprecedented investments in modern infrastructure to build a Viksit Bharat: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

उद्धघाटन हो गया? उद्धघाटन हो गया? नहीं, अभी आधा काम हुआ है। मैंने सिर्फ वो पर्दा हटाया है, लेकिन मैं आज चाहता हूं इस एयरपोर्ट का उद्धघाटन यहां जो भी उपस्थित हैं, आप सब करें, और इसलिए आप अपना मोबाइल फोन निकालिये, अपने मोबाइल फोन का फ्लैश लाईट कीजिए और आपका इसका उद्धघाटन कर रहे हैं। आप दीया जलाकर के यहां उपस्थित हर व्यक्ति, आज इस एयरपोर्ट का उद्धघाटन कर रहा है। ये आपकी अमानत है, ये आपका भविष्य है, ये आपका पुरूषार्थ है और इसलिए इसका उद्धघाटन भी आपके हाथों से हो रहा है, आप अपने भारत माता की जय बोलकर के, हाथ ऊपर करके, फ्लैश लाईट पूरी तरह से दिखाइये। भारत माता जी जय। भारत माता जी जय। भारत माता जी जय। बहुत-बहुत धन्यवाद। अब उद्धघाटन हो गया।

उत्तरप्रदेश की राज्यपाल आनंदीबेन पटेल, यहां के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या, ब्रजेश पाठक, केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे सहयोगी श्री राममोहन नायडू जी, पंकज चौधरी जी, ज्यूरिक एयरपोर्ट के चेयरमैन जोसेफ फेल्डर जी, अन्य मंत्रिगण, सांसद, विधायक, अन्य महानुभाव और मेरे प्यारे भाइयों और बहनों।

मैं देख रहा हूं, आज जहां भी मेरी नजर पड़ रही है, सारे युवा मुझे नजर आ रहे हैं, उत्साह से भरे युवा हैं, जोश से भरे हुए युवा हैं, क्योंकि इन युवाओं को पता है, ये जो काम हो रहा है ना, ये नौजवानों के भविष्य को नई उड़ान देने वाला काम हो रहा है। आज हम विकसित यूपी-विकसित भारत अभियान का एक नया अध्याय शुरू कर रहे हैं। देश का सबसे बड़ा प्रदेश, आज देश के सबसे अधिक इंटरनेशनल एयरपोर्ट्स वाले राज्यों में से एक हो गया है। और आज मेरे लिए गर्व और प्रसन्नता के दो कारण हैं। एक तो ये है कि इस एयरपोर्ट का शिलान्यास भी करने का सौभाग्य आप सबने मुझे दिया था और आप सबने इस एयरपोर्ट के उद्धघाटन का सौभाग्य भी मुझे दिया, लेकिन मैंने उस सौभाग्य को आपके साथ बांट दिया और आपके हाथों से उद्धघाटन करवा दिया। दूसरा, जिस उत्तर प्रदेश ने मुझे अपना प्रतिनिधि चुना, जिस उत्तर प्रदेश ने मुझे सांसद बनाया, उसकी पहचान के साथ, उस उत्तर प्रदेश की पहचान के साथ इस भव्य एयरपोर्ट का नाम भी जुड़ गया है।

साथियों,

नोएडा का ये एयरपोर्ट, आगरा, मथुरा, अलीगढ़, गाजियाबाद, मेरठ, इटावा, बुलंदशहर, फरीदाबाद, इस पूरे क्षेत्र को बहुत बड़ा लाभ होने वाला है। हिन्दुस्तान को और उत्तर प्रदेश को तो होना ही होना है। ये एयरपोर्ट पश्चिमी उत्तर प्रदेश के किसानों, छोटे और लघु उद्योगों, यहां के नौजवानों के लिए, अनेक नए अवसर लेकर आने वाला है। यहां से दुनिया के लिए विमान तो उड़ेंगे ही, साथ ही, ये विकसित उत्तर प्रदेश की उड़ान का भी प्रतीक बनेगा। मैं उत्तर प्रदेश को, विशेष रूप से पश्चिम उत्तर प्रदेश की जनता को इस भव्य एयरपोर्ट के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज का ये कार्यक्रम, भारत के नए मिज़ाज का प्रतीक है। आप सभी देख रहे हैं कि आज पूरा विश्व कितना चिंतित है। पश्चिम एशिया में एक महीने से युद्ध चल रहा है। युद्ध की वजह से कई सारे देशों में खाने-पीने के सामान, पेट्रोल-डीज़ल-गैस, खाद, ऐसी कई ज़रूरी चीज़ों का चारो तरफ संकट पैदा हो गया है। हर देश इस संकट का सामना करने के लिए कुछ न कुछ कोशिश कर रहा है, प्रयास कर रहा है। और हमारा भारत भी इस संकट का पूरी शक्ति से मुकाबला कर रहा है, देशवासियों की ताकत के भरोसे कर रहा है। भारत तो बहुत बड़ी मात्रा में कच्चा तेल और गैस, ये जहां युद्ध चल रह है ना, इस युद्ध से प्रभावित इलाके से मंगाता रहा है। इसलिए सरकार हर वो कदम उठा रही है, जिससे सामान्य परिवारों पर, हमारे किसान भाई-बहनों पर, इस संकट का बोझ न पड़े।

साथियों,

संकट के इस समय में भी, भारत ने अपने तेज़ विकास को निरंतर जारी रखा है। मैं सिर्फ पश्चिमी उत्तर प्रदेश की ही बात करुं, तो पिछले कुछ सप्ताह में ही, ये चौथा बड़ा प्रोजेक्ट है, जिसका शिलान्यास या लोकार्पण हुआ है। इन कुछ ही सप्ताह में, इस दौरान नोएडा में बहुत बड़ी सेमीकंडक्टर फैक्ट्री का शिलान्यास हुआ, इसी कालखड में देश की पहली दिल्ली-मेरठ नमो-भारत ट्रेन ने गति पकड़ी, इसी कालखंड में मेरठ मेट्रो का विस्तार किया गया, और इतने कम समय में आज नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट का आप सबके हाथों से उद्धघाटन भी हो गया।

साथियों,

ये सारे प्रोजेक्ट्स, यूपी के विकास के लिए, डबल इंजन सरकार के प्रयासों का शानदार उदाहरण हैं। सेमीकंडक्टर फैक्ट्री, भारत को टेक्नोलॉजी में आत्मनिर्भर बना रही है। मेरठ मेट्रो और नमो भारत रेल, तेज और स्मार्ट कनेक्टिविटी दे रही है। और ये हमारा जेवर एयरपोर्ट, पूरे उत्तर भारत को दुनिया से जोड़ रहा है। और आपने अभी वीडियो में देखा, ये ऐसा एयरपोर्ट बन रहा है, हर दो मिनट में एक जहाज उड़ेगा, हर दो मिनट में एक जहाज उड़ेगा। पहले सपा वालों ने नोएडा को अपनी लूट का ATM बना लिया था। लेकिन आज भाजपा सरकार में वही नोएडा, यूपी के विकास का सशक्त इंजन बन रहा है।

साथियों,

जेवर का ये एयरपोर्ट, डबल इंजन सरकार की कार्यसंस्कृति का भी बहुत अच्छा उदाहरण है। अब आप सोचिये, इस एयरपोर्ट को अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार ने 2003 में ही फाइल में मंजूरी दे दी थी। 2003 में, आपमें से बहुत होंगे जिसका जन्म नहीं हुआ होगा, बहुत वो लोग होंगे जो उस समय 25-30 साल के 35 साल के हुए होंगे और आज रिटायर भी हो गए, लेकिन एयरपोर्ट नहीं बना। लेकिन केंद्र में कांग्रेस और यहां की पहले की सरकारों ने सालों तक इस एयरपोर्ट की नींव तक नहीं पड़ने दी। 2004 से 2014 तक ये एयरपोर्ट फाइलों में ही दबा रहा। जब हमारी सरकार बनी तो यूपी में सपा की सरकार थी। शुरु के दो-तीन सालों में सपा वालों ने इस पर काम नहीं होने दिया। लेकिन जैसे ही यहां भाजपा-NDA की सरकार बनी, दिल्ली में भाजपा-एनडीए की सरकार बनी, तो जेवर एयरपोर्ट की नींव भी पड़ी, निर्माण भी हुआ और अब ये शुरु भी हो गया है।

साथियों,

एयरपोर्ट के अलावा ये क्षेत्र देश के दो बड़े फ्रेट कॉरिडोर्स का भी हब बन रहा है। ये फ्रेट कॉरिडोर मालगाड़ियों के लिए बिछाई गई स्पेशल पटरियां हैं। इससे उत्तर भारत की बंगाल और गुजरात के समंदर से कनेक्टिविटी बेहतर हो गई है। और दादरी वो स्थान है जहां ये दोनों कॉरिडोर्स आपस में मिलते हैं। यानी यहां किसान जो उगाते हैं, यहां उद्योग जो कुछ बनाते हैं, वो जमीन से, हवाई मार्ग से, दुनिया के कोने-कोने तक तेज़ी से जा पाएगा। ऐसी मल्टी-मोडल कनेक्टिविटी के कारण, यूपी दुनियाभर के निवेशकों के लिए बहुत बड़ा आकर्षण बन रहा है।

साथियों,

जिस नोएडा को पहले अंधविश्वास के कारण अपने हाल पर छोड़ दिया गया था, कुर्सी जाने के डर से पहले के सत्ताधारी यहां आने से डरते थे, मुझे याद है यहां की सपा सरकार थी और मैंने नोएडा आने का कार्यक्रम बनाया, तो मुख्यमंत्री इतने डरे हुए थे कि वो उस कार्यक्रम में नहीं आए और मुझे भी डराने की लोगों ने कोशिश की, कि नोएडा मत जाओ मोदी जी, अभी-अभी प्रधानमंत्री बने हो। मैंने कहा इस धरती का आशीर्वाद लेने जा रहा हूं, जो मुझे लंबे अर्से तक सेवा करने का मौका देगा। अब वही इलाका पूरी दुनिया का स्वागत करने के लिए तैयार है। ये पूरा क्षेत्र, आत्मनिर्भर भारत के संकल्प को सशक्त कर रहा है।

साथियों,

इस क्षेत्र की अर्थव्यवस्था में, खेती-किसानी का बहुत महत्व है। मैं आज उन मेरे किसान भाई-बहनों का विशेष रूप से आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने इस प्रोजेक्ट को साकार करने के लिए अपनी जमीनें दी है। उन किसानों के लिए जोरदार तालियां बजाइये दोस्तों, मेरे किसान भाई-बहनों के लिए जोरदार तालियां बजाइये। मेरे किसान भाई-बहन, आपके इस योगदान से ही, इस पूरे क्षेत्र में विकास का एक नया दौर शुरु होने जा रहा है। आधुनिक कनेक्टिविटी का जो विस्तार यहां हो रहा है, उससे पश्चिमी यूपी में फूड प्रोसेसिंग की संभावनाओं को और बल मिलेगा। अब यहां के कृषि उत्पाद दुनिया के बाज़ारों में और बेहतर तरीके से जा पाएंगे।

साथियों,

यहां मैं अपने किसान साथियों का एक और बात के लिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं। आपके गन्ने से जो इथेनॉल बनाया गया है, उससे कच्चे तेल, कच्चे तेल पर देश की निर्भरता कम हुई है। अगर इथेनॉल का उत्पादन ना बढ़ता, पेट्रोल में उसकी ब्लेंडिंग ना बढ़ती, तो देश को हर वर्ष साढ़े चार करोड़ बैरल, साढ़े चार करोड़ बैरल यानी लगभग 700 करोड़ लीटर कच्चा तेल विदेशों से मंगवाना पड़ता। किसानों के परिश्रम ने देश को इस संकट के समय में इतनी बड़ी राहत दी है।

साथियों,

इथेनॉल से देश को तो फायदा हुआ ही है, किसानों को भी बहुत बड़ा लाभ हुआ है। इससे करीब डेढ़ लाख करोड़ रुपए की विदेशी मुद्रा बची है। यानी इथेनॉल न बनाते तो ये पैसा विदेश जाना जय था। बीते वर्षों में इतना सारा पैसा, देश के किसानों को मिला है, गन्ना किसानों को मिला है।

साथियों,

यहां के गन्ना किसानों ने तो पहले के वो दिन भी देखे हैं, जब कई-कई सालों तक गन्ने का बकाया लटका रहता था। लेकिन आज भाजपा की डबल इंजन सरकार के प्रयासों से गन्ना किसानों की स्थिति बेहतर हुई है।

साथियों,

किसी भी देश में एयरपोर्ट सिर्फ एक सामान्य सुविधा नहीं होता। ये एयरपोर्ट प्रगति को भी उड़ान देते हैं। साल 2014 से पहले, देश में सिर्फ 74 एयरपोर्ट थे। आज 160 से अधिक एयरपोर्ट्स देश में हैं। अब महानगरों के अलावा, देश के छोटे-छोटे शहरों में भी हवाई कनेक्टिविटी पहुंच रही है। पहले जो सरकारें रही हैं, वे मानती थीं कि हवाई यात्रा सिर्फ अमीरों के लिए ही होनी चाहिए। लेकिन भाजपा सरकार ने, सामान्य भारतीय के लिए हवाई यात्रा को आसान बना दिया है। हमारी सरकार ने उत्तर प्रदेश में हवाई अड्डों के नेटवर्क का तेज़ी से विस्तार करते हुए उनकी संख्या बढ़ाकर सत्रह कर दी है।

साथियों,

भाजपा सरकार का निंरतर प्रयास रहा है कि एयरपोर्ट भी बने और किराया-भाड़ा भी सामान्य परिवारों की पहुंच में रहे। इसलिए, हमने उड़ान योजना शुरु की थी। इस स्कीम के कारण, बीते कुछ सालों में एक करोड़ साठ लाख से अधिक देशवासियों ने उड़ान योजना से टिकट लेकर सस्ती दरों पर हवाई यात्रा की है। और मैं आपको एक और जानकारी देना चाहता हूं। हाल में ही केंद्र सरकार ने उड़ान योजना को और विस्तार दिया है। इसके लिए लगभग 29 हज़ार करोड़ रुपए की स्वीकृति दी गई है। आने वाले वर्षों में इसके तहत, छोटे-छोटे शहरों में 100 नए एयरपोर्ट और 200 नए हेलीपैड बनाने की योजना है। यूपी को भी इससे बहुत अधिक लाभ होगा।

साथियों,

भारत का एविएशन सेक्टर, बहुत तेज़ से गति और विकास कर रहा है। जैसे-जैसे भारत में नए-नए एयरपोर्ट बन रहे हैं, वैसे-वैसे नए हवाई जहाज़ों की ज़रूरत भी बढ़ती जा रही है। इसलिए देश की अलग-अलग एयरलाइन्स ने सैकड़ों नए जहाजों के ऑर्डर दिए हैं। ये जो नई सुविधाएं हैं, नए जहाज आ रहे हैं, इनको उड़ाने वाले, इनमें सर्विस देने वाले, मेंटनेस से जुड़े, ऐसे हर काम के लिए बहुत बड़ी संख्या में वर्कफोर्स की ज़रूरत रहेगी। ये युवाओं के लिए बहुत बड़ा अवसर है। इसलिए हमारी सरकार, एविएशन सेक्टर में ट्रेनिंग की सुविधाओं का भी विस्तार कर रही है।

साथियों,

आप जब अपनी कोई गाड़ी खरीदते हैं, तो ये जरूर देखते हैं कि उस गाड़ी बनाने वाली कंपनी का सर्विसिंग सेंटर आसपास है या नहीं है। आप जानकर हैरान हो जाएंगे कि हमारे देश में हवाई जहाजों की सर्विसिंग, यानी उनके मैंटनेंस, रिपेयर एंड ओवरहॉल की पुख्ता व्यवस्थाएं ही नहीं थीं। भारत के 85 एयरपोर्ट, 85 परसेंट हवाई जहाजों को आज भी मैंटनेंस, रिपेयर एंड ओवरहॉल यानी MRO के लिए, इस काम के लिए विदेश भेजना पड़ता है। इसलिए हमारी सरकार ने ठाना है कि MRO सेक्टर में भी भारत को आत्मनिर्भर बनाएंगे। अब भारत में ही, बहुत बड़े पैमाने पर MRO सुविधाएं विकसित की जा रही हैं। आज यहां जेवर में भी MRO सुविधा का शिलान्यास हुआ है। ये सुविधा जब तैयार हो जाएगी, तो ये देश-विदेश के विमानों को सेवा देगी। इससे देश को कमाई भी होगी, हमारा पैसा भी देश में ही रहेगा, और युवाओं को अनेक रोजगार भी मिलेंगे।

साथियों,

आज हमारी सरकार की प्राथमिकता देश के नागरिकों की सुविधा है। देश के नागरिक का समय बचे और उसकी जेब पर ज्यादा बोझ भी न पड़े, ये हमारा लक्ष्य है। मेट्रो और वंदे भारत जैसी आधुनिक रेल सेवाओं का इसी भाव से ही विस्तार किया जा रहा है। दिल्ली-मेरठ नमो भारत रेल, इसका कितना फायदा हो रहा है, ये भी हम सब देख रहे हें। अभी तक नमो भारत, ढाई करोड़ से अधिक लोग सफर कर चुके हैं। दिल्ली-मेरठ के जिस सफर में पहले घंटों लग जाते थे, अब वो सफर मिनटों में ही पूरा हो रहा है।

साथियों,

विकसित भारत के विकसित आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर हमारी सरकार अभूतपूर्व निवेश कर रही है। बीते 11 वर्षों में इंफ्रास्ट्रक्चर का बजट छह गुणा से अधिक बढ़ाया गया है। इन वर्षों में 17 लाख करोड़ रुपये हाईवे और एक्सप्रेसवे पर खर्च किए गए हैं, एक लाख किलोमीटर से अधिक के हाईवे का निर्माण किया गया है। 2014 तक रेलवे में सिर्फ 20 हजार किलोमीटर रूट का बिजलीकरण हुआ था। जबकि 2014 के बाद से 40 हजार किलोमीटर से ज्यादा रेलवे ट्रैक का बिजलीकरण किया गया है। आज ब्रॉडगेज नेटवर्क का लगभग शत-प्रतिशत बिजलीकरण हो चुका है। आज कश्मीर घाटी हो या नॉर्थ ईस्ट की राजधानियां, ये पहली बार रेल नेटवर्क से जुड़ रही हैं। पोर्ट यानी बंदरगाहों की क्षमता, बीते दशक में दोगुने से अधिक हुई है। देश में नदी जलमार्गों की संख्या भी लगातार बढ़ रही है। विकसित भारत के निर्माण के लिए जरूरी हर क्षेत्र में भारत तेज़ी से काम कर रहा है।

साथियों,

विकसित भारत बनाने के लिए सबका प्रयास बहुत ज़रूरी है। ये आवश्यक है कि 140 करोड़ देशवासी कड़े से कड़ा परिश्रम करे, और वैश्विक संकटों का एकजुट होकर सामना करें। अभी जो युद्ध चल रहा है, इससे पैदा हुए संकटों का सामना कैसे करना है, इसके बारे में मैंने संसद में भी विस्तार से बताया है। मेरी कल देश के सभी मुख्यमंत्रियों से भी लंबी चर्चा हुई है और बड़ी सकारात्मक चर्चा हुई है। मैं आज आप सभी जनता-जनार्दन से फिर कहूंगा, मैं देशवासियों से फिर से कहूंगा। हमें शांत मन से, धैर्य के साथ, एकजुटता के साथ, मिल जुलकर के, इस संकट का सामना करना है। ये पूरे विश्व में परेशानी पैदा करने वाला संकट है। हमें अपने देश की सबसे ज्यादा चिंता करनी है। और यही हम भारतीयों की सबसे बड़ी ताकत है। मैं यूपी के, देश के सभी राजनीतिक दलों से भी आग्रहपूर्वक कहना चाहता हूं, विनती पूर्वक कहना चाहता हूं, इस प्रकार के संकट में ऐसी बातें करने से बचें, जो देश के लिए नुकसानदायक हैं। जो भारतीयों के हक में है, जो भारत के हित में है, वही भारत सरकार की नीति और रणनीति है। राजनीति के लिए गलत बयानबाज़ी करने वाले, राजनीतिक बहस में तो कुछ नंबर पा लेंगे, लेकिन देश को नुकसान पहुंचाने वाली हरकतों को देश की जनता कभी माफ नहीं करती। कोरोना के महासंकट के दौरान भी, कुछ लोगों ने अफवाहें फैलाईं, वैक्सीन को लेकर झूठ बोले, ताकि सरकार का काम मुश्किल हो, देश को नुकसान हो। परिणाम क्या हुआ? जनता ने चुनावों के दौरान ऐसी राजनीति को नकार दिया, ठुकरा दिया। मुझे पूरा भरोसा है, कि देश के सभी राजनीतिक दल भी इससे सबक सीखेंगे और देश के एकजुट प्रयासों को वो बल देंगे, ताकत देंगे। इसी आग्रह के साथ, एक बार फिर से उत्तर प्रदेश को इस शानदार एयरपोर्ट के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं।

मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

बहुत-बहुत धन्यवाद।