PM Modi launches projects pertaining to Patna metro, construction of ammonia-urea complex at Barauni and extension LPG pipe network to Patna and Muzaffarpur
I feel the same fire in my heart that’s burning inside you, says PM Modi in Bihar referring to the anger and grief in the country after the terror attack in Pulwama
Our aim is to uplift status of those struggling to avail basic amenities: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बरौनी येथे बिहारच्या विकासासाठीच्या 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केले. यावेळी बिहारचे राज्यपाल लालजी टंडन, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी एका सभेला संबोधित केले.

पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने 13,365 कोटी रुपयांच्या पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून यामुळे पाटणा आणि लगतच्या भागातली सार्वजनिक वाहतूक सुगम होणार आहे.

जगदीशपूर-वाराणसी नैसर्गिक गॅस पाईपलाईनचा फुलपूर-पाटणा अशा विस्ताराचे उद्‌घाटन त्यांनी केले. ज्या योजनांची पायाभरणी आपल्या हस्ते होते त्याचे उद्‌घाटनही आपल्या हस्ते होते, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पाची सुरुवात जुलै 2015 मध्ये आपल्या हस्ते झाल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. ‘पाटणाला पाईपद्वारे गॅस पुरवण्याव्यतिरिक्त स्थानिक उद्योगांना हा प्रकल्प गॅसचा पुरवठा करेल. तसेच पुनरुज्जीवित बरौनी खत कारखान्यालाही गॅस पुरवठा करेल. गॅस आधारित परिसंस्थेमुळे या भागातील युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पूर्व भारत आणि बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेंतर्गत वाराणसी, भुवनेश्वर, कटक, पाटणा, रांची आणि जमशेदपूर गॅस पाईपलाईनद्वारे जोडले जात आहेत. पाटणा शहर गॅस वितरण प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले.

पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी 70 वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या वंचित घटकातील नागरिकांची उन्नती या दोन बिंदूंवर रालोआ सरकारचा विकासाचा दृष्टीकोन आधारित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आणि गरिबांच्या उन्नतीसाठी प्रतिबद्धता व्यक्त केली.

बिहारमधल्या आरोग्य देशभाल व्यवस्थेच्या विस्तारीकरणाचे अनावरण करताना ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने बिहारसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. छपरा आणि पूर्णिया येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातील तर गया आणि भागलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत केली जतील. पाटणा येथे एम्सची स्थापना झाली असून राज्यात आणखी एक एम्स स्थापन करण्यावर काम सुरू आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात उसळलेला क्षोभ, दु:ख, वेदना याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान म्हणाले, जी आग तुमच्या हृदयात पेटली आहे तिच आग माझ्याही हृदयात आहे. देशासाठी शहीद झालेले पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरचे रतनकुमार ठाकूर यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. या दु:खाच्या क्षणी संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबांसोबत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

बरौनी रिझायनरी विस्तार प्रकल्पाच्या 9 एमएमटी एव्हीयूची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

बरौनी येथे अमोनिया-युरिया खत संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

बरौनी-कुमेदपूर, मुझफ्फरपूर-रक्सौल, फतुहा-इस्लामपूर, बिहारशरीफ-दानियानवाला या क्षेत्रातील रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले. रांची-पाटणा वातानुकुलित एक्सप्रेस गाडीचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report

Media Coverage

EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the valour and duty of the Indian Armed Forces
May 08, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that the courage and valour of the Indian Armed Forces in protecting the honour and dignity of the nation make every citizen proud. He noted that their spirit of sacrificing everything for Mother India is a source of inspiration for all.

The Prime Minister shared a Sanskrit verse-

“स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि |
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ||”

The verse conveys that When one becomes aware of one’s duty, there should be no hesitation or fear of any kind in the mind, because the struggle undertaken to protect religion and honour on the altar of justice is the most excellent and most glorious path to self-welfare for a warrior.