In Ayushman Bharat, India is home to one of the biggest healthcare programmes in the world: PM
Having seen the hardships we face due to water shortage, it becomes our responsibility to conserve every drop of water: PM Modi
The entire nation agrees that the menace of terror has to be eliminated: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या जामनगर इथे वांद्रे- जामनगर हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.750 खाटांच्या गुरू गोविंदसिंह विस्तारित रुग्णालयाचे राष्ट्रार्पण आणि विविध सौनी प्रकल्पांचे त्यांनी उदघाटन केले.51 किमीच्या आजी -3 ते खिजडिया या वाहिनीच्या उदघाटनासह इतर विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्‌घाटन केले.

 

गुजरात मधली पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी, गुजरात सरकारने गेल्या दोन दशकांपासून केलेले कठोर परिश्रम त्यांनी विषद केले.गुजरातमध्ये टँकर राज ला परवानगी नाही या निर्धाराचा त्यांनी उल्लेख केला आणि सरदार सरोवर धरणामुळे गुजरातमधल्या जनतेला कसा लाभ झाला हे सांगितले.सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठीही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

गुजरातमधल्या आरोग्य क्षेत्रातल्या क्रांतीबद्दल प्रशंसा करतानाच गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमुळे गरीब जनतेला मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुषमान योजनेमुळे गरिबांना दर्जेदार आणि माफक दरातली आरोग्य सेवा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.

 

देशासमोरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी,अल्पकालीन नव्हे तर रचनात्मक आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारने दूरदृष्टीने आणलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला.पीएम-किसान ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीची दीर्घकालीन आणि सर्वंकष आराखडा असल्याचे ते म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना,पत पुरवठ्याची सुलभ उपलब्धता, जन स्नेही वस्तू आणि सेवा कर यामुळे युवावर्गाला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सैन्यदलाची प्रशंसा करताना,संपूर्ण देशाला आपल्या सैनिकांचा अभिमान आहे असे सांगून दहशतवादाचा धोका नष्ट करायला हवा असे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
NTPC approves Rs 20,457 crore investment for 1,600 MW Lara Stage-III project

Media Coverage

NTPC approves Rs 20,457 crore investment for 1,600 MW Lara Stage-III project
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of inclusive development and nation-building
July 13, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi said that when all-round development ensures positive transformation in the lives of every citizen, it gives fresh momentum to the progress of the nation. He noted that it is with this inspiring spirit that the country is continuously working to further strengthen India’s capabilities.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam-

“कन्यानां सम्प्रदानञ्च कुमाराणाञ्च रक्षणम्।

राष्ट्रस्य सङ्ग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्॥”

The Subhashitam conveys that ensuring the welfare of women, protecting and nurturing the younger generation, and continually making the necessary arrangements for the unity, security, prosperity, and orderly governance of the nation are the constant duties of every representative of the people.

The Prime Minister wrote on X;

“जब चौतरफा विकास के साथ हर देशवासी के जीवन में सकारात्मक परिवर्तन सुनिश्चित होता है, तब राष्ट्र की प्रगति को भी नई गति मिलती है। इसी प्रेरक भावना के साथ हम भारत के सामर्थ्य को निरंतर मजबूती देने में जुटे हुए हैं।

कन्यानां सम्प्रदानञ्च कुमाराणाञ्च रक्षणम्।

राष्ट्रस्य सङ्ग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्॥”