राष्ट्रपती रामना कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठीचे गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलतांना, प्रतिष्ठेच्या गांधी शांतता पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे पंतप्रधानांनी अभिनदंन केले. महात्मा गांधीजींची 150 वी जयंती भारत साजरी करत असताना हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. बापुजींना अत्यंत प्रिय असलेले वैष्णव जन तो हे भजन जगभरातल्या 150 देशातल्या कलाकारांनी सादर केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गांधीजींच्या शिकवणीचे आजही महत्व आहे हे संपूर्ण जगाने स्वीकारल्याचे हे द्योतक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

महात्मा गांधीजींची स्वच्छतेसाठीची कटिबद्धता पंतप्रधानांनी विषद केली.

महात्मा गांधीजीच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या प्रयत्नांमुळे, स्वातंत्र्य लढा हे जन आंदोजन ठरले. जन भागीदारी आणि जन आंदोलन यांचा संगम महात्मा गांधींनी घडवून आणला असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपणही योगदान देत आहोत ही भावना, महात्मा गांधीनी, जनतेच्या मनात रुजवली असे पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit

Media Coverage

Auckland's Sky Tower lights up in India's tricolour as PM Modi begins historic New Zealand visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2026
July 11, 2026

Record Exports, Record Investments, Record Pride: India’s Rise Under PM Modi is Multi-Dimensional